Grid Posts

View All
माय मराठी

बिद्रीत गर्भलिंग तपासणीचा काळाबाजार; डॉक्टर-एजंट पकडले,साडे बारा लाखांसह फॉर्च्युन कार जप्त

ग्लोबल ताज्या देश प्रीमियम महाराष्ट्र माय मराठी

मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करूया: जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या बैठकीतील संकल्प

माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

माय मराठी

शहरातील टायर विक्री आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या भव्य शोरूमचे कळंबा येथे उद्घाटन

माय मराठी

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन

Thumbnail

View All
My Marathi

भक्तीची पाऊलवाट आणि माणुसकीची थाप: जोतिबाच्या चैत्र यात्रेतील बैलगाड्यांची परंपरा

माय मराठी

देशभरातील दुर्मिळ कारागिरी ३१ मार्च ते ४ एप्रिल  सिद्धगिरी मठावर पाहायला मिळणार

महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन पंचगंगा घाटावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन शासकीय इतमामात पंचगंगा  घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार, इतिहासाचे समृद्ध पान अनंतात विलीन

माय मराठी

बिद्रीत गर्भलिंग तपासणीचा काळाबाजार; डॉक्टर-एजंट पकडले,साडे बारा लाखांसह फॉर्च्युन कार जप्त

My Marathi

अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीचा विवाह ; पतीसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा

Tile List

View All
My Marathi

कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा पुरवठा; अफवांवर विश्वास ठेवून ‘पॅनिक बायिंग’ करू नका: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा पुरवठा; अफवांवर विश्वास ठेवून 'पॅनिक बायिंग' करू नका: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन   कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात आयओसीएल, एचपीसीएल आणि बीपीसीएल…

ग्लोबल ताज्या देश प्रीमियम महाराष्ट्र माय मराठी

मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करूया: जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या बैठकीतील संकल्प

My Marathi

सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय हिंदू, शीख आणि बौद्धांनाच अनुसूचित जातीचा दर्जा

माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

Tile Posts

View All
My Marathi माय मराठी

नुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी पदभार स्वीकारला

My Marathi

महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम’ (MRDP) राबविण्यास मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागर

'महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम' (MRDP) राबविण्यास मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागर आपत्ती व्यवस्थापनास बळकटी देण्याकरिता विविध उपाययोजना राबविण्यात…

My Marathi

बागल चौक ते बी.टी.काँलेज परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई

My Marathi

सीपीआर रुग्णालयातील दुरुस्ती कामांना प्रारंभ; गोदावरी प्रवेशद्वार तात्पुरते बंद

सीपीआर रुग्णालयातील दुरुस्ती कामांना प्रारंभ; गोदावरी प्रवेशद्वार तात्पुरते बंद कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीतील छत्रपती…

List Posts

View All
My Marathi

‘गोकुळ’चे शिल्‍पकार माजी चेअरमन स्‍व. आनंदराव पाटील-चुयेकर यांची ८८ वी जयंती गोकुळमध्‍ये साजरी

'गोकुळ’चे शिल्‍पकार माजी चेअरमन स्‍व. आनंदराव पाटील-चुयेकर यांची ८८ वी जयंती गोकुळमध्‍ये साजरी   कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुंबई

रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच; विद्रुपीकरण होवू देणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर

रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच; विद्रुपीकरण होवू देणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर   कोल्हापूर/प्रतिनिधी : गेल्या काही वर्षात…

My Marathi

गोकुळ’मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी

‘गोकुळ’मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संघ (गोकुळ) च्या वतीने ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारातील…

My Marathi

रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर डिजिटलवर; भव्य स्टारकास्टमुळे उत्सुकता शिगेला

रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर डिजिटलवर; भव्य स्टारकास्टमुळे उत्सुकता शिगेला कोल्हापूर/प्रतिनिधी : जिओ स्टुडिओज आणि मुंबई…

Thumbnail

View All
My Marathi

जोतिबा भक्तांची श्रद्धा गायमुखावर: भक्तांच्या विधिवत पूजनाने अन्नछत्राचा मंगल प्रारंभ झाला!

My Marathi

भक्तीची पाऊलवाट आणि माणुसकीची थाप: जोतिबाच्या चैत्र यात्रेतील बैलगाड्यांची परंपरा

माय मराठी

देशभरातील दुर्मिळ कारागिरी ३१ मार्च ते ४ एप्रिल  सिद्धगिरी मठावर पाहायला मिळणार

महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन पंचगंगा घाटावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन शासकीय इतमामात पंचगंगा  घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार, इतिहासाचे समृद्ध पान अनंतात विलीन

माय मराठी

बिद्रीत गर्भलिंग तपासणीचा काळाबाजार; डॉक्टर-एजंट पकडले,साडे बारा लाखांसह फॉर्च्युन कार जप्त

माय मराठी

कोल्हापूर जिल्ह्याला “पर्यटन हब” म्हणून अधिकृत दर्जा द्यावा : आमदार राजेश क्षीरसागर यांची मागणी

राष्ट्रीय पर्यटन दिनी ई – मेल द्वारे केले मागणीचे निवेदन सादर कोल्हापूर/प्रतिनिधी : देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी पर्यटनाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि…

माय मराठी

छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस मराठी ६’चा डंका !

रितेश भाऊंच्या ‘लयभारी’ स्वॅगने बहरला ग्रँड प्रीमियर! कोल्हापूर/प्रतिनिधी: “शेकडो दारं, अनेक सदस्य… आणि एकच बॉस!” असं म्हणत सुरू झालेल्या ‘बिग…

माय मराठी

बँकांचे खाजगीकरण हे कर्मचाऱ्यांसमोरील मोठे आव्हान : राष्ट्रीय सरचिटणीस सी.एच.वेंकटाचलम

महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या त्रैवार्षिक अधिवेशनास कोल्हापुरात प्रारंभ कोल्हापूर/प्रतिनिधी : खाजगीकरण हे बँक कर्मचाऱ्यांसमोर सध्या मोठे आव्हान आहे. सर्वात…

माय मराठी

महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेचे “त्रैवार्षिक अधिवेशन” येत्या २४ आणि २५ जानेवारी रोजी कोल्हापुरात

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेचे (महाराष्ट्र स्टेट बैंक एम्प्लॉइज फेडरेशन) त्रैवार्षिक राज्यस्तरीय अधिवेशन” येत्या शनिवारी आणि रविवारी दि. २४…

माय मराठी

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “रस्ता सुरक्षा” अभियानांतर्गत जाणीव जागृती मार्गदर्शन कार्यक्रम

कोल्हापूर, अतिग्रे : रस्ता अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी व तरुण पिढीत रस्ता सुरक्षेबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने संजय घोडावत इन्स्टिट्यूट,…

माय मराठी

शेतामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरणारे दोन चोरटे जेरबंद

शेतामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरणारे दोन चोरटे जेरबंद एकुण २,७०,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण…

माय मराठी

कोल्हापरमध्ये विकासाचे व्हिजन घेऊन मख्यमंत्री फडणवीस ‘मिसळ कटटयावर’साधला कोल्हापूरकरांशी संवाद

कोल्हापरमध्ये विकासाचे व्हिजन घेऊन मख्यमंत्री फडणवीस ‘मिसळ कटटयावर’साधला कोल्हापूरकरांशी संवाद कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने मिसळ कट्रा च्या…

माय मराठी

चार वर्षापासून फरार असलेला मोकातील आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई

कोल्हापूर/प्रतिनिधी:मा. पोलीस अधीक्षक, श्री. योगेश कुमार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पाहीजे, फरार आरोपींचा शोध घेवून कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत.पोलीस…

माय मराठी

तंत्रज्ञानातील सक्षमतेमुळे ‘विकसित भारत’ चे स्वप्न लवकरच सत्यात : प्रा. टी जी सीताराम

आय.एस.टी. ई.’ ग्लोबल टेक कॉन २०२६’ चा शुभारंभ -डी. वाय. पाटील एग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी आणि आय.एस.टी. ई. नवी दिल्लीकडून…

कोल्हापूर जिल्ह्याला “पर्यटन हब” म्हणून अधिकृत दर्जा द्यावा : आमदार राजेश क्षीरसागर यांची मागणी

राष्ट्रीय पर्यटन दिनी ई – मेल द्वारे केले मागणीचे निवेदन सादर

कोल्हापूर/प्रतिनिधी : देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी पर्यटनाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि जागतिक समुदायामध्ये भारतीय पर्यटनाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय पर्यटन दिन आज २५ जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. कोल्हापूर जिल्हा हा ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक, सांस्कृतिक पर्यटनासह उद्योजक आणि व्यापार पर्यटनाची मोठी क्षमता असणारा जिल्हा आहे. गेल्या अनेक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात देशविदेशातील पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला “पर्यटन हब” म्हणून अधिकृत दर्जा द्यावा, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे कडे केली आहे. मागणीचे निवेदन त्यांनी आज ई- मेल द्वारे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.
या निवेदना पुढे म्हंटले आहे कि, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा धार्मिक सणांसह साप्ताहिक, वार्षिक सुट्ट्यांच्या दिवशीही कोल्हापुरात पर्यटकांची प्रचंड गर्दी पहायला मिळते. एकंदरीत कोल्हापूर जिल्हा एकप्रकारे “पर्यटन हब” च्या दृष्टीने वाटचाल करत आहे. कोल्हापूर जिल्ह्याला “पर्यटन हब” म्हणून अधिकृत दर्जा मिळाल्यास कोल्हापूर हे पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठे आर्थिक केंद्र म्हणून उदयाला येऊ शकते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला “पर्यटन हब” म्हणून अधिकृत दर्जा देणेबाबतची मागणी समस्त कोल्हापूरवासियांकडून केली जात आहे.
कोल्हापूरमध्ये ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनाची मोठी क्षमता असून, यासाठी खालील मुद्दे महत्त्वपूर्ण ठरतात.

धार्मिक वारसा :

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर: हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असून येथे दरवर्षी कोट्यवधी भाविक येतात. यासह खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर, श्री जोतीबा मंदिर, श्री नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर, आदमापूर येथील श्री बाळूमामा मंदिर, पट्टणकोडोली येथील श्री बिरदेव मंदिर, श्री बाहुबली ब्रम्हचर्य आश्रम, श्री कणेरी मठ असा धार्मिक श्रद्धास्थाने कोल्हापूरमध्ये वसली आहेत.

ऐतिहासिक वारसा :

कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत, ज्यांनी मराठा साम्राज्याच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे किल्ले केवळ लष्करी तळ नव्हते, तर त्या काळातील स्थापत्यकलेचे उत्तम नमुने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावनझालेला किल्ले पन्हाळा गड, किल्ले विशाळगड, वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाची साक्ष देणारी पवित्र पावनखिंड, गगनगिरी गड, भुदरगड, रांगणा किल्ला, सामानगड येथील सात दरवाजांची विहीर, यासह न्यू पॅलेस, शालिनी पॅलेस, भवानी मंडप हे कोल्हापूरच्या राजघराण्याचा इतिहास आणि वास्तुकलेचा हा एक उत्तम नमुना आहे.

नैसर्गिक सौंदर्य आणि वन्यजीव :

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्य: गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे अभयारण्य निसर्गप्रेमींना आकर्षित करते. दाजीपूर जंगल: ट्रेकिंग आणि जंगल सफारीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. त्याचबरोबर आंबा घाट हा सह्याद्री वाघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. ‘विशाळगड संवर्धन राखीव क्षेत्रात’ पर्यकांसाठी जंगल सफारी उपलब्ध आहे. कोकण किनारपट्टीशी जवळीक: कोल्हापूर हे गोवा, कोकण तसेच कर्नाटक राज्यात जाणाऱ्या पर्यटकांचे महत्त्वाचे ठिकाण आहे. यासह कोल्हापुरातील ऐतिहासिक रंकाळा तलाव सद्या पर्यटकांचा आकर्षकबिंदू ठरत आहे. यासह जिल्ह्यात उपलब्ध असणारे राधानगरी सह इतर धरणे, नैसर्गिक धबधबे, सनसेट पाँइंट, सह्याद्री पर्वतरांगा, घाट कोल्हापूरच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालत आहेत.

सांस्कृतिक व औद्योगिक ओळख :

कोल्हापूरी खाद्यसंस्कृती: तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ-पाव, गुळ, साखर जगभरात प्रसिद्ध आहे. कोल्हापूरी चप्पल, साज दागिने, चांदीचे दागिने, वस्त्रोद्योग, कास्टिंग, मशिनिंग आणि फाऊंड्री उद्योगांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या औद्योगिक वसाहती, साखर कारखाने, पारंपारिक हस्तकला उद्योग हे कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्र राज्यातील एक प्रगत औद्योगिक जिल्हा बनवत आहेत. यासह नुकत्याच मंजूर झालेल्या सर्किट बेंच, आय.टी. पार्क मुळे कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसागणिक वाढत जाणार आहे.

कला, क्रीडा, शिक्षण, वैद्यकीय नगरी :

राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण, विशेषतः गरीब आणि मागास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा पाया रचला, ज्यामुळे कोल्हापूरमध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण झाले.  येथे विविध अभ्यासक्रमांसाठी अनेक महाविद्यालये आहेत. शिवाजी विद्यापीठ या विद्यापीठाच्या अखत्यारीत कोल्हापूर, सांगली आणि सातारा हे तीन जिल्हे येतात. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याने शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

राजर्षी शाहू महाराजांच्या काळात संगीत, नाटक, चित्रकला आणि हस्तकला यांसारख्या कलांना राजाश्रय मिळाला, ज्यामुळे अनेक कलाकारांना प्रोत्साहन मिळाले. मराठी चित्रपटसृष्टीची सुरुवात आणि सुवर्णकाळात कोल्हापूरचे मोठे योगदान आहे. या सर्व कलात्मक आणि सांस्कृतिक वारशामुळे कोल्हापूरला खऱ्या अर्थाने ‘कलानगरी’ म्हटले जाते.
राजर्षी शाहू महाराजांनी या नगरीत खेळांचा पाया रचला, जो आजही तितक्याच उत्साहाने जपला जात आहे. कोल्हापूरला “क्रीडानगरी” किंवा “क्रीडापंढरी” म्हणून ओळखले जाते, कारण येथील रक्तातच कुस्ती आणि फुटबॉलसारख्या खेळांची आवड भिनलेली आहे. कोल्हापूर ही कुस्तीगिरांची खाण आहे. येथील खासबाग मैदान हे भारतातील एकमेव गोलाकार कुस्ती मैदान असून, शहरात आणि जिल्ह्यात अनेक “तालीम” (आखाडे) आहेत, जिथे देशविदेशातील मल्ल आजही मातीच्या कुस्तीचे धडे गिरवतात. त्यामुळे कोल्हापूर हे खऱ्या अर्थान कुस्तीचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. कोल्हापूरला ‘महाराष्ट्राचे फुटबॉल हब’ म्हटले जाते. येथे स्थानिक क्लबच्या सामन्यांनाही ६०,००० हून अधिक प्रेक्षक गर्दी करतात. कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक नामवंत फुटबॉल खेळाडूंनी राज्याच्या आणि देशाच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. भारताला पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव याच मातीतील होते. तसेच नेमबाजीमध्ये राही सरनोबत, तेजस्विनी सावंत आणि पोहण्यामध्ये वीरधवल खाडे यांसारख्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचा डंका वाजवला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याने आरोग्यसेवेत मोठी प्रगती केली असून, अत्याधुनिक सुविधा, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आणि वैद्यकीय महाविद्यालयांमुळे गोवा, कोकण आणि कर्नाटकच्या सीमेवरील रुग्णांसाठी कोल्हापूर हे सोयीस्कर ठिकाण आहे, ज्यामुळे येथे वैद्यकीय पर्यटनाला चालना मिळाली आहे.

पायाभूत सुविधा, दळणवळण :

कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि कोकण- गोवा राज्यांना जोडणारा महत्वाचा केंद्रबिंदू आहे. नुकतेच कोल्हापूर विमानतळाचा झालेला विस्तार, प्रस्तावित कोल्हापूर - कोकण रेल्वेमार्ग, शक्तीपीठ महामार्ग, सोलापूर - रत्नागिरी महामार्ग यामुळे वाहतुकीची कनेक्टीव्हिटी वाढणार आहे. यासह आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर, पूरनियंत्रण प्रकल्प, यामुळे पायाभूत सुविधांचाही विकास होणार आहे. 

वरील सर्व बाबींचा विचार होवून कोल्हापूरला अधिकृत ‘पर्यटन हब’ चा दर्जा देणेबाबत शासन स्तरावर सकारात्मक निर्णय व्हावा, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी निवेदनातून केली आहे.

छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस मराठी ६’चा डंका !

रितेश भाऊंच्या ‘लयभारी’ स्वॅगने बहरला ग्रँड प्रीमियर!

कोल्हापूर/प्रतिनिधी: “शेकडो दारं, अनेक सदस्य… आणि एकच बॉस!” असं म्हणत सुरू झालेल्या ‘बिग बॉस मराठी ६’ च्या अभूतपूर्व यशाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. या सिझनच्या पहिल्याच आठवड्यात रितेश भाऊंने सर्वांचं मन जिंकलं आहे. रितेश भाऊंचा तोच कडक अंदाज, त्यांचा जबरदस्त स्वॅग आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्याची त्यांची खास शैली यामुळे हा सिझन घराघरांत पोहोचला आहे. रितेश भाऊंच्या जादूने यंदा केवळ टीव्हीच नाही, तर डिजिटल जगतावरही अधिराज्य गाजवलं असून, खऱ्या अर्थाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली मोहोर उमटवली आहे. कलर्स मराठी आणि JioHotstar वर एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या या सिझनने लोकप्रियतेचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत.
कलर्स मराठीवर, ग्रँड प्रीमियर आणि दैनंदिन भागांना जोरदार सुरुवात मिळाली असून, लाँचिंगच्या पहिल्याच आठवड्यात ३३ लाखांहून अधिक प्रेक्षकांनी हा कार्यक्रम पाहिला. ‘बिग बॉस मराठी’च्या आगमनामुळे मराठी जनरल एंटरटेनमेंट चॅनेलच्या (GEC) प्रेक्षकसंख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ दिसून आली आहे; ३४ GRPs वरून ७७ GRPs पर्यंत झालेली ही २.३ पट वाढ या शोची जनमानसातील पकड अधोरेखित करते. जिओ स्टार पहिल्या भागाच्या ‘रीच’मध्ये ५ व्या सीझनच्या प्रीमियरच्या तुलनेत २.२ पट आणि ‘वॉच-टाइम’मध्ये ६.५ पट वाढ नोंदवण्यात आली. पहिल्या आठवड्यात जिओ स्टारवर देखील हा वेग कायम राहिला; गेल्या सीझनच्या तुलनेत व्हिडिओ व्ह्यूजमध्ये १.८ पट आणि वॉच-टाइममध्ये १.३ पट वाढ झाली असून, हे प्रेक्षकांचा वाढता कल आणि वारंवार पाहिल्या जाणाऱ्या संख्येचे निदर्शक आहे..
या अभूतपूर्व यशाचे मोठे श्रेय जाते ते म्हणजे महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार आणि शोचा होस्ट रितेश देशमुख यांना. प्रोमो रिलीज झाल्यापासूनच रितेश भाऊंच्या कडक डायलॉग्स नी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. “मागचा सिझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय… आहात ना तय्यार!” या त्यांच्या वाक्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली होती. ग्रँड प्रीमियर च्या दिवशी रितेश भाऊंचा तो अस्सल महाराष्ट्रीयन स्वॅग, ‘लार्जर-दॅन-लाईफ’ परफॉर्मन्स आणि त्यांच्या एन्ट्री ने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. त्यांचं प्रभावी सूत्रसंचालन, आणि त्यांच्या शब्दांमधली धार यामुळे ग्रँड प्रीमियर ची रंगत अजूनच वाढली. या सगळ्यामुळेच सिझन ६ चा ग्रँड प्रीमियर हा विक्रमी टीआरपी मिळवणारा कार्यक्रम ठरला आहे. बिग बॉस मराठीच्या घरात १७ सदस्यांनी मोठ्या दिमाखात एंट्री घेतली, आणि संपूर्ण आठवडा प्रेक्षकांना राडा, भांडणं, मैत्री, याने खिळवून ठेवले.

बँकांचे खाजगीकरण हे कर्मचाऱ्यांसमोरील मोठे आव्हान : राष्ट्रीय सरचिटणीस सी.एच.वेंकटाचलम

महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या त्रैवार्षिक अधिवेशनास कोल्हापुरात प्रारंभ

कोल्हापूर/प्रतिनिधी : खाजगीकरण हे बँक कर्मचाऱ्यांसमोर सध्या मोठे आव्हान आहे. सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशात बँकांच्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी सध्या राष्ट्रीय संघर्षाला सुरुवात झालेली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात होणारे हे कर्मचाऱ्यांचे अधिवेशन महत्त्वाचे आहे. संघटनेमुळे कर्मचाऱ्यांना धैर्य मिळते. आपल्या हक्कासाठी लढण्याचे बळ मिळते. आज बँकांमध्ये जनतेचे २.२५ लाख कोटी आहेत. त्याचे संपूर्ण संरक्षण करण्याची जबाबदारी ही बँक कर्मचाऱ्यांवर आहे.नवीन आर्थिक धोरण, उदारीकरण या नावाखाली सरकारने खाजगीकरणाचा घाट घातला आहे. बँकेतील ठेवीमुळे देशाला भांडवल मिळते. पण जर खाजगी बँका अस्तित्वात आल्या तर त्याच्यावर सरकारचे नियंत्रण राहणार नाही.आणि कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ येईल. याला जबाबदार कोण असेल? असा सवाल ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे सरचिटणीस कॉम. सी. एच वेंकटाचलम यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना केला.
महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या त्रैवार्षिक अधिवेशन कोल्हापुरातील सायबर कॉलेज येथील आनंद भवन येथे होत आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, मोठ्या बँकांच्या तुलनेत लहान बँकांची गुणवत्ता ही जास्त चांगली आहे. तरीही सरकारकडून छोट्या बँकांचे विलीनीकरण सुरू आहे.गेल्या दहा वर्षांपूर्वी बँक कर्मचारी संख्या कमी झाली असून अधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने ग्राहकाला सेवा कशी देणार? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.सध्या दोन लाख जागा रिक्त असून कर्मचाऱ्यांना कंत्राट बेसिसवर घेण्याच धोरण आखले जात आहे.बँकेचे कर्ज हे गरजू आणि विकसनशील क्षेत्राला मिळणे आवश्यक आहे.बँका नफेखोरीसाठी कार्यरत आहेत.बँक कर्जाचे बुडीत प्रमाण वाढलं आणि अनेक कर्जे माफ केली गेली. हे पैसे सर्वसामान्य लोकांचे आहेत. याविरुद्ध लढा देण्यासाठी संघटना आणि एकात्मतेच्या जोरावरच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे भवितव्य ठरणार आहे.असे देखील सी.एच वेंकटाचलम म्हणाले.

        सर्वांनी एकत्र येऊन संघटितपणे काम केल्याशिवाय आपल्याला न्याय मिळत नाही. बँक कर्मचारी हे सर्वसामान्यांसाठी काम करतात. त्यांच्या पैशांचे संरक्षण करतात. आज जवळजवळ सगळेच लोक हे बँकांवर अवलंबून आहेत. आज जर बँक कर्मचारी अडचणीत  असतील तर त्यांनी एकत्रितपणे आपल्या हक्कासाठी लढल्याशिवाय त्यांना न्याय मिळणार नाही. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी दिली.

        बँकांचे विलीनीकरण करून अगदी मोजक्याच बँका देशांमध्ये चालवायच्या. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण करायचे. याला महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज संघटनेचा तीव्र विरोध आहे. तसेच खाजगी बँकांमध्ये विदेशी भांडवल आणून या देशाचे आर्थिक स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व धोक्यात येईल. ग्रामीण बँकांचेही खाजगीकरण झाले तर सहकार तत्त्वावर चाललेल्या बँका तसेच ग्रामीण पतपेढ्या यांचे अस्तित्व संपेल. ही धोक्याची घंटा आहे. महाराष्ट्रामधील मुंबई हे एक मोठे भांडवल देणारे आणि सर्व बँकांची मुख्यालय असणारे शहर आहे. त्यामुळे तेथील बँक कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक भूमिका घ्यावे लागेल. आणि संघर्षाची प्रतिमा आपल्याला पुढे न्यायची आहे. अशी भूमिका संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम. देविदास तुळजापूरकर यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात मांडली.

            बँकांचे खाजगीकरण हा मुद्दा फक्त आर्थिक धोरणानुसार नसून हा आंतरराष्ट्रीय विषय आहे. विदेशी लोक भारतात येऊन गुंतवणूक करणार आणि सरकारच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर आज भारतात बँक कर्मचारी संघर्ष करत आहेत. हा विरोधाभास आहे. पण अमेरिकेने भारतावर जो आर्थिक बोजा टाकलेला आहे त्याला सरकार कोणतेही प्रत्युत्तर देत नाही. कारण भारताचे राजकारण हे, जसे अमेरिकेला हवे आहे तसेच सुरू आहे . आंतरराष्ट्रीय व्यापक राजकारणाचा एक भाग म्हणजे बँकांचे खाजगीकरण करणे असा आहे.असे मत माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी व्यक्त केले. नोटाबंदीची कल्पना खुद्द अर्थमंत्र्यांना आणि अर्थ सल्लागारांना देखील नव्हती. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना बँक राष्ट्रीयकरणामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा झाली. आणि एक नवीन मध्यमवर्ग निर्माण झाला. आर्थिक चलनवलन वाढले. पण आता खाजगीकरणामुळे बँक कर्मचाऱ्यांवर मोठे संकट येणार आहे. यासाठी एकत्रितपणे याला विरोध केला पाहिजे. अशी अपेक्षा पत्रकार कुमार केतकर यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमास कॉम.देविदास तुळजापूरकर,कॉम.ललिता जोशी, कॉम.एन.शंकर,कॉम.जयराम,कॉम महेन्द्र प्रभुलकर, कॉम.अक्षय स्वामी, महिंद्र ताटे,मकरंद करंदीकर उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेचे “त्रैवार्षिक अधिवेशन” येत्या २४ आणि २५ जानेवारी रोजी कोल्हापुरात

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेचे (महाराष्ट्र स्टेट बैंक एम्प्लॉइज फेडरेशन) त्रैवार्षिक राज्यस्तरीय अधिवेशन” येत्या शनिवारी आणि रविवारी दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी कोल्हापूर येथे होत आहे. या अधिवेशनास विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील सुमारे ५०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होत असून, ते बँक कर्मचारी चळवळीचे प्रतिनिधित्व करणार आहेत. हे दोन दिवसीय अधिवेशन सायबर कॉलेज येथील आनंद भवन येथे होणार आहे,अशी माहिती संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम.देविदास तुळजापूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

या अधिवेशनात सार्वजनिक क्षेत्रातील बँका, जुन्या खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी सहकारी बँका तसेच विदेशी बँकांमधील कर्मचारी प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

या अधिवेशनाचे उद्घाटन ऑल इंडिया बैंक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) चे अखिल भारतीय जनरल सेक्रेटरी कॉ. सी. एच. वेंकटाचलम यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभेचे माजी खासदार कुमार केतकर तसेच कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

हा उद्घाटन सोहळा शनिवार दि. २४ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वाजता होणार आहे.
या अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वागत समितीचे अध्यक्ष सतेज (बंटी) पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यातील बैंक कर्मचारी संघटनांचे कार्यकर्ते जोमाने तयारी करत आहेत.
याच दिवशी सायंकाळी ५:०० वाजता, त्याच ठिकाणी तरुण सिने दिग्दर्शक, लोकसत्ता दैनिकाचा ‘तरुण तेजांकित’ पुरस्कारप्राप्त वरुण सुखराज यांच्या निर्मितीतील “दि
ग्रेट बैंकिंग इल्यूजन” या माहितीपटाचा प्रीमियर शो आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास वरुण सुखराज स्वतः उपस्थित राहणार आहेत.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी दि. २५ जानेवारी रोजी सकाळी १०:०० वाजता, त्याच ठिकाणी नवीन कामगार कायदे या अत्यंत महत्वाच्या विषयावर
निवृत्त प्रादेशिक कामगार आयुक्त
धनराज एस. जाधव यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
सध्या केंद्र सरकारकडून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांबाबत पुन्हा एकदा एकत्रीकरण व खाजगीकरणाची धोरणे राबवण्याची भाषा केली जात आहे. संघटनेचा या धोरणांना ठाम विरोध असून, यामुळे सामान्य नागरिकांच्या ठेवी असुरक्षित होण्याचा धोका निर्माण होतो. शेतकरी, छोटे व्यापारी व लघुउद्योग पुन्हा एकदा बँकिंग व्यवस्थेच्या बाहेर फेकले जाण्याची शक्यता आहे, कारण खाजगी बँका प्रामुख्याने नफ्यावर आधारित कार्य करतात.
संघटनेची अशी ठाम भूमिका आहे की, बँकिंग सेवा ही मूलभूत हक्क म्हणून घोषित झाली पाहिजे. तसेच सामान्य बचत खातेदारांकडून कोणतेही सेवा शुल्क आकारले जाऊ नये. याशिवाय कॉर्पोरेट थकबाकीदारांकडून कोणतीही सवलत न देता संपूर्ण थकबाकी वसूल केली जावी. अशी संघटनेची ठाम मागणी आहे.
या अधिवेशनात बँकिंग उद्योगाशी संबंधित असंघटित कर्मचारी बैंक मित्र, आऊटसोर्ड व कंत्राटी कर्मचारी – यांना संघटित करण्यासाठी विशेष पुढाकार घेण्यात येणार आहे. तसेच पुरेशी नोकरभरती, पाच दिवसांचा आठवडा लागू करणे आदी महत्त्वाच्या मागण्यांवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे.
या अधिवेशनाच्या निमित्ताने बैंकिंग उद्योग आणि बँक कर्मचारी चळवळीसमोरील सर्व महत्वाच्या प्रश्नांवर सखोल आणि व्यापक चर्चा घडून येईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. पत्रकार परिषदेस कॉम.जयराम,कॉम महेन्द्र प्रभुलकर, कॉम.अक्षय स्वामी, कॉम एन शंकर, महिंद्र ताटे,मकरंद करंदीकर, उपस्थित होते.

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “रस्ता सुरक्षा” अभियानांतर्गत जाणीव जागृती मार्गदर्शन कार्यक्रम

कोल्हापूर, अतिग्रे : रस्ता अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी व तरुण पिढीत रस्ता सुरक्षेबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत जाणीव जागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इचलकरंजी परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. विजय इंगवले, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अंकिता वांडेकर, सहाय्यक निरीक्षक श्री. अजिंक्य डुबल, सहाय्यक निरीक्षक अनुसया माळी, निरीक्षक. कुलकर्णी इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, विद्यार्थी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी इंगवले यांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व अत्यंत उदाहरणासह अधोरेखित केले. ते म्हणाले, “रस्ता सुरक्षा नियमांचे पालन केल्याने केवळ शासकीय दंड टळत नाही, तर स्वतःच्या व इतरांच्या अमूल्य प्राणांचेही संरक्षण होते.” विद्यार्थ्यांकडे देशाच्या भवितव्याची धुरा असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, “आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. त्यांनी वाहतूक नियम काटेकोरपणे पाळले, तर अपघातांचे प्रमाण निश्चितच घटेल. सुरक्षित वाहतूक संस्कृतीमुळे देश, राज्य आणि गावाचा सर्वांगीण विकास साध्य होईल.” रस्ता सुरक्षा ही केवळ नियमांची अंमलबजावणी नसून, ती सामाजिक जबाबदारी आणि संवेदनशीलतेची जाणीव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नवीन रुजू झालेले सहाय्यक निरीक्षक अजिंक्य डुबल यांनी विद्यार्थ्यांना रस्त्यावरील नियमावली, वाहन चालवताना पाळावयाची शिस्त, हेल्मेट व सीट बेल्टचे महत्त्व, वेगमर्यादा, सिग्नलचे पालन आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेचे नियम समजावून सांगत सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व पटवून दिले.

या मार्गदर्शन कार्यक्रमास संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन श्री. संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.

शेतामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरणारे दोन चोरटे जेरबंद

शेतामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरणारे दोन चोरटे जेरबंद

एकुण २,७०,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कामगिरी

कोल्हापूर/प्रतिनिधी : दिनांक ०७/१२/२०२५ रोजी दुपारी १२.१५ वा. चे सुमारास खळखळीचा माळ नावाचे शेतात आदमापूर, ता. भुदरगड येथे फिर्यादी लक्ष्मीबाई सर्जेराव भोसले व.व.६७, रा. आदमापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर ह्या व त्यांचे सोबत लक्ष्मी दिनकर पाटील रा. आदमापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर अश्या दोघीजण शेतात काम करीत असताना दोन अज्ञात इसम तेथे येवुन लक्ष्मीबाई यांचेकडून पिण्यासाठी पाणी मागून घेवुन पाणी पिवुन परत जाण्याचा बहाणा करून फिर्यादी व लक्ष्मी यांचे पाठीमागून येवून त्यापैकी एका इसमाने लक्ष्मीबाई भोसले यांचे गळ्यातील सोन्याचे प‌ट्टीमध्ये असलेले मंगळसूत्र व दुसऱ्या इसमाने लक्ष्मी पाटील यांचे गळ्धातील सोन्याची एकसर माळ जबरदस्तीने हिसडा मारून हिसकावून घेवून तेथून पळुन गेलेबाबत फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरून भुदरगड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३१६/२०२६ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०४, ३(५) प्रमाणे दिनांक ०७/१२/२०२५ रोजी २२.३६ वा. गुन्हा नोंद आहे.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून मा. पोलीस अधीक्षक, श्री. योगेश कुमार साो यांनी गुन्हा उघडकीस आणणेच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. मा. पोलीस अधीक्षक सो यांनी दिले सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक, श्री. सुशांत चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांचे तपास पथक तयार करून त्यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टिने मार्गदर्शन करून तपास सुरू केला. सदर तपास पथकामार्फत अज्ञात आरोपीचा सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदारामार्फत माहीती काढून शोध घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार राजु कोरे, योगेश गोसावी व अमित सर्जे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, भुदरगड पोलीस ठाणे गु.र.नं. ३१६/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०४, ३(५) प्रमाणे दाखल गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार राम केंद्रे रा पुणे याने त्याचे साथीदारासह मिळून केला असून तो व त्याचा साथीदार असे किणी, ता. हातकणंगले गावचे हद्दीतील पुणे ते बेंगलोर जाणारे रोडवरील माऊली पान शॉप जवळ येणार आहेत. मिळाले माहितीचे अनुषंगाने तपास पथकाने किणी, ता. हातकणंगले गावचे हद्दीतील पुणे ते बेंगलोर जाणारे रोडवरील माऊली पान शॉप जवळ सापळा लावून आरोपी नामे राम ज्ञानोबा केंद्रे व.व. २७, रा. मौजे खोकलेवाडी, ता. गंगाखेड, जि. परभणी, सध्या रा. शिवाजी चौक, साखरेवस्ती, हिंजवडी, ता. मुळशी, जि. पुणे, मनोज शिवाजी लंगडे व.व. ३४, रा. तगरखेडा, पोष्ट औराद शहाजनी, ता.निलंगा, जि. लातूर, सध्या रा. नेऊर फाटा, सोलापूर रोड, पुणे यांना ताब्यात घेवून त्यांचे कब्जातून गुन्ह्यातील जबरदस्तीने चोरलेले १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पट्टीमध्ये तुटलेले मणीमंगळसुत्र व अंदाजे ०५ ग्रॅम वजनाचे सोन्याची एकसर माळ असा एकुण २,७०,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली असून जप्त मुद्देमालासह आरोपीना पुढील कायदेशीर कारवाईकामी भुदरगड पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले आहे.
आरोपी राम ज्ञानोबा केंद्रे यांच्यावर यापुर्वी देखील पुणे, रायगड, लातुर जिल्ह्यातील पोलीस ठाणेमध्ये चोरीचे एकुण १२ गुन्हे व आरोपी,मनोज शिवाजी लंगडे याचेवर कोंडवा पोलीस ठाणे, पुणे येथे चोरीचा ०१ गुन्हा नोंद आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार , मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. डॉ. बी. धीरजकुमार बच्चु यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अतिश म्हेत्रे, अनिल जाधव पोलीस अंमलदार संजय देसाई, राजु कोरे, योगेश गोसावी, समीर कांबळे, रोहीत मर्दाने, अमित सर्जे, अमित मर्दाने, सतिश सुर्यवंशी, राजेंद्र ताटे, अमर वासुदेव यांनी केली आहे.

कोल्हापरमध्ये विकासाचे व्हिजन घेऊन मख्यमंत्री फडणवीस ‘मिसळ कटटयावर’साधला कोल्हापूरकरांशी संवाद

कोल्हापरमध्ये विकासाचे व्हिजन घेऊन मख्यमंत्री फडणवीस ‘मिसळ कटटयावर’साधला कोल्हापूरकरांशी संवाद

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने मिसळ कट्रा च्या अनोख्या व्यासपीठावरून मूख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायतीच्या प्रचारा बरोबरच कोल्हापूर शहर आणि जिल्हयाचे प्रश्न आणि विकास याबाबत ठोस भमिका मांडली.त्यांनी या मिसळ कट्टा च्या माध्यमातून साधला संवाद रस्ते, हद्दवाढ पंचगंगा प्रद्षण, महापूर, उद्योग, विमानतळ, खेळ आणि कला, सांस्कतीक परंपरा याबाबत निर्णय आणि नियोजन याबाबतची दिशा स्पष्ट केली कोल्हापूरातील महायुतीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या मिसळ कट्रयावर विविध क्षेत्रातील शहर आणि जिल्हयातील शेकडो निमंत्रित मान्यवरांच्या साक्षीने म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बी न्यूज वृत्त वाहीनीचे संपादक चारूदत्त जोशी, खासदार पुत्र युथ आयकान कृष्णराज महाडिक, सिने अभिनेते स्वप्निल राजशेखर यांनी प्रकट मुलाखत घेतली
कोल्हापर शहरातील रस्त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की शहरातील रस्ते चांगले झाले पण त्याबरोबरच सर्व नागरीकांच्यावर टोलचा बोजा पडणार होता. त्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र निधी देऊन कोल्हापूर शहराला टोल मक्त केले. याबरोबरच हद्दवाढीबाबत बोलताना ते म्हणाले की कोणत्या शहराची हद्दवाढ झाल्यानंतर त्या शहराचा विकास झाला आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर शहराचा विकास होण्यासाठी हद्वाढ झालीच पाहिजे अशी माझी व्यक्तिगत तसेच सरकारची भमिका आहे पण हद्दवाढीला ‘ येथील अनेक राजकीय नेत्यांनी संबधीत गावानी प्रखर विरोध केला त्यामळे हद्दवाद करता आली नाही. तसेच प्रस्तावित गावांना करवाढी बाबतची भीती निर्माण झाली आहे
आता सरकारने निर्णय घेतला आहे की हह् वाढ झाल्यानंतर प्रस्तावित गावांना पाच वर्षे कोणतीही कर वाढ केली जाणार नाही त्यामळे आता ही भीती बाळगण्याचे कारण नाही.. तसेच ज्यांचा विरोध आहे त्यांच्याशी सविस्तर चचा करून हद्द वाढोबाबत सकारात्मक प्रातिसाद दिला तरच मी ताबडतोब हद्दवाढ करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
पंचगंगा नदीचे प्रद्षण रोखण्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की कोल्हापुर, इचलकरंजीसह काही प्रमख शहर आणि गावांचे सांडपाणी नाल्याद्वारे नदीत मिसळते त्याबरोबरच काही औद्योगिक क्षेत्राचेही पाणी नदीत येते त्यामळे नदीचे प्रदरषण मोठ्या प्रमाणात होते. हे रोखण्यासाठी या साडपाण्यावर प्राक्रेया करण्याचे प्रकल्प उभा केले पाहिजेत ‘ काही प्रमाणात’ ते केले असन आणखी याप्ढेही सर्व शंभर टक्के हे सांडपाणी रोखण्या साठी प्रयत्न केले जातील त्यासाठी आवश्यक तो सर्व निर्धी दिला जार्डल असेही त्यांनी स्पष्ट केले. याबरोबरच ने =्पूर शहर आणि परिसराला होणारा महापूराचा विळखा रोखण्यासाठी आता नदीजोड प्रकल्पावर भर देण्यात आला असन त्यात्न कोल्हापर जिल्ह्यातून पावसाळ्यात वाया जाणारे पाणी मराठवाडा भागात वळवण्याचे प्रकल्प हाती घेतले आहेत ते लवकरच पूर्ण होतील त्यानंतर कोल्हापूर शहराला मोठ्या महापूराचा धोका कधीही उद्भवणार नाही असेही त्यांनी सांगितले उद्योग क्षेत्रातील समस्या बाबत बोलताना ते म्हणाले की कोल्हापूर शहरात फौंड्री हब तसेच अनेक चांगले उद्योग आहेत पण त्याचा विस्तार करण्यासाठी आता जागांचा प्रश्न निर्माण झाले आहे नवीन औद्योगिक क्षेत्र निर्माण होत असन या ठिकाणी आयटी सह इतर उद्योग विस्तारण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामळे हा प्रश्न मार्गी लागेल. तसेच पणे बेंगलोर कॅरिडॉर मळे ही येथील अनेक संधी उपलब्ध होणार असन त्याचा उपयोग कोल्हापर जिल्ह्यातील विकासासाठी होणार आहे. कष्णाराज महाडिक यां्न कोल्हापूर जिल्ह्याला खेळाची मोठी परंपरा आहे अनेक राष्ट्रीय, ऑलिम्पिक, आंतरराष्ट्ीय दर्जाचे खेळाड्र निर्माण झाले आहेत यापुढेही असेच खेळाचा विकास व्हावा यासाठी काय करणार असे विचारले असता त्यांनी केंद् शासनाच्या खेलो डंडियासह अनेक राज्य शासनाच्या योजनांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात खेळाचा विकास करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील असे सांगितले. अभिनेते स्वप्निल राजशेखर यांनी कोल्हापर जिल्ह्यात कला आणि संस्कती परंपरा जपण्यासाठी फिल्म इन्स्टिट्यूट आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा यांच्या शाखा सुरू कराव्यात अशी मागणी केली यावर ते म्हणाले की चित्रपट क्षेत्रासह इतर सर्व कला आणि सांस्कृतिक क्षेत्राला चालना देण्यासाठी काही शैक्षणिक आणि प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल
यावेळी पालक मंत्री प्रकाश आबिटकर,मंत्री हसन मश्रीफ, चंद्रकांत दादा पाटील, खा. धनंजय महाडिक आ. राजेश क्षीरसागर, आ. चंद्रदीप नरके आदींसह महायतीचे नेते, उमेदवार, सहकार, उद्योग सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

चार वर्षापासून फरार असलेला मोकातील आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई

कोल्हापूर/प्रतिनिधी:
मा. पोलीस अधीक्षक, श्री. योगेश कुमार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पाहीजे, फरार आरोपींचा शोध घेवून कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत.पोलीस अधीक्षक यांनी दिले सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुशांत चव्हाण यांनी त्यांचे शाखेकडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांची पथके तयार करून पाहीजे, फरार आरोपींची माहिती काढून कायदेशीर कारवाई करणेबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या.
जुना राजवाडा पोलीस ठाणे गु.र.नं. 552/2021 भा.द.वि.स. कलम 364(1), 384, 386,388,397,327, 452,120 (ब) सह मोका कलम कलम 3(1), (2), 3(2), 3(4) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे विजय रामचंद्र गौड रा. कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर हा गुन्हा घडलेपासून गेले चार वर्षापासून मिळून येत नव्हता. सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ यांचे पथक आरोपी नामे विजय रामचंद्र गौड रा. कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर याचा शोध घेत असताना पथकातील पोलीस अंमलदार सुरेश पाटील यांना त्यांचे गोपनिय बातमी मिळाली की, आरोपी नामे विजय रामचंद्र गौड हा तलवार चौक, सानेगुरूजी वसाहत, कोल्हापूर येथे उभा आहे. सदर बातमीचे अनुषंगाने पथकाने पुष्कराज वाईन शॉपी समोर तलवार चौक, सानेगुरूजी वसाहत, कोल्हापूर येथे जावून सापळा लावून आरोपी नामे विजय रामचंद्र गौड व.व. 42, रा. राम गल्ली, कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांस दिनांक 06/01/2026 रोजी 21.00 वा. चे सुमारास ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाईकामी जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक साो, श्री. योगेश कुमार व मा. अपर पोलीस अधीक्षक , श्री. डॉ. बी. धीरजकुमार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, राम कोळी, रूपेश माने, विनोद कांबळे, सचिन पाटील, अमित मर्दाने यानी केली आहे.

तंत्रज्ञानातील सक्षमतेमुळे ‘विकसित भारत’ चे स्वप्न लवकरच सत्यात : प्रा. टी जी सीताराम

आय.एस.टी. ई.’ ग्लोबल टेक कॉन २०२६’ चा शुभारंभ

-डी. वाय. पाटील एग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी आणि आय.एस.टी. ई. नवी दिल्लीकडून आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी:
भारतामध्ये मिळणारे अभियांत्रिकी शिक्षण हे अतिशय उच्च दर्जाचे असून त्या जोरावर आज जागतिक पातळीवर भारत तांत्रिक नेतृत्वकडे वाटचाल करत आहे. भारताच्या या तंत्रज्ञान सक्षमतेमुळे ‘विकसित भारत’ हे आता स्वप्न राहिलेले नसून लवकरच ते सत्यात उतरेल असे प्रतिपादन अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे (ए. आय. सी. टी. ई) चे माजी चेअरमन प्रा. टी जी सिताराम यांनी केले. डी वाय पाटील एग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी तळसंदे आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आय.एस.टी. ई.) नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आय.एस.टी. ई. ग्लोबल टेक कॉन २०२६’मध्ये प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
हॉटेल सयाजीच्या मेघ मल्हार सभागृहात या जागतिक परिषदेच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन डी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील व प्रा. टी. जी. सिताराम यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी सनदी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी कुलगुरू डॉ. जी. डी. यादव, आय.आय. आय. टी.एम. ग्वाल्हेरचे संचालक प्रा. एस. एन. सिंह,कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, आय.एस. टी. ई.चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई, महाराष्ट्र गोवा अध्यक्ष डॉ. रणजीत सावंत, कार्यकारी समिती सदस्य डॉ. महादेव नरके, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, आय.क्यू.ए.सी. डायरेक्टर डॉ. शिवानंद शिरकोले आदी उपस्थित होते.
प्रा. सीताराम म्हणाले, रिसर्च, इनोव्हेशन, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट यावर भर दिला तर भारत जगाला विकासाची नवी दिशा देऊ शकेल. ए. आय. असो किंवा कोणतेही नवे तंत्रज्ञान त्याचा स्वीकार करून अधिक चांगले काम करा. आपण जेवढे सक्षमपणे समस्या सोडवण्यासाठी आणि जीवनमान सुधारण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तेवढे देशाचे भविष्य उज्वल बनेल. तंत्र शिक्षण हे केवळ पदवीप्रथम मर्यादित नसून समस्या सोडवणारे उद्योजकता घडवणारे असावे. नोकरी त्यातून नोकरी देणारे विद्यार्थी घडावेत यासाठी भर देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता यांनी डी. वाय पाटील ग्रुपच्या विस्ताराबाबत माहिती देऊन तंत्रशिक्षणात केलेल्या प्रगतीचा आढावा मांडला.माजी सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, आर्थिक, संरक्षण आणि शिक्षण या तीन गोष्टी सध्याच्या काळात महत्त्वाच्या आहेत. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जपान आणि युएसए कडून आपण बरेच काही शिकू शकतो. टेक्नॉलॉजी बाहेर नाही तर आपल्या आत मध्ये विकसित केली पाहिजे.
डॉ. जी डी. यादव म्हणाले, आपल्याकडे खूप संधी व अनेक क्षमता आहे. शैक्षणिक पॉलिसी मध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे.डॉ. प्रतापसिंह देसाई म्हणाले,.नवीन पिढीमध्ये क्षमता आहे, नवनवीन संकल्पनातून हे जीवन बदलू शकतात. नवनवीन गोष्टी तंत्रज्ञान शिकणे, आत्मसात करण्याची संधी या परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे याचा फायदा घ्यावा.
प्रा. एस एन सिंग म्हणाले,
तंत्रज्ञान गतीने बदलत आहे. त्या पद्धतीचे शिक्षण आणि अशा परिषदांची गरज आहे. ए. आय. मुळे नोकऱ्या जातील हा निव्वळ गैरसमज आहे. तंत्रज्ञानाच्या युगात टाईम मॅनेजमेंट हा यशाचा मार्ग आहे.स्टार्ट अप मार्गदर्शक सचिन कुंभोजे म्हणाले, अभियांत्रिकी करत असतानाच स्टार्टअप वर भर द्यावा. त्या माध्यमातून विकासाला अधिक चालना मिळेल. प्रा. शुभदा यादव, प्रा. शारोन काळे
सूत्रसंचालन केले. डॉ. शिवानंद शिरकोले यांनी आभार मानले.

जिल्हा परिषद अंतर्गत ५४ शाळांमध्ये दर्जेदार स्वच्छता ग्रहांची उभारणी,कोल्हापूर स्टाईल इंटिग्रेटेड स्कूल हेल्थ कॉम्प्लेक्स”ची संकल्पना अस्तित्वात : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.एस कार्तिकेएन यांची माहिती

कोल्हापूर/प्रतिनिधी : एका विद्यार्थिनीला शाळेत योग्य स्वच्छता सुविधा न मिळाल्यामुळे तिच्या आरोग्यावर परिणाम झाला. ही गंभीर बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे आणि शिक्षण विभागाचे लक्ष वेधले गेले. “शाळेची इमारत महत्त्वाची आहेच, पण एका विद्यार्थिनीला शाळेत योग्य स्वच्छता सुविधा न मिळाल्यामुळे तिच्या आरोग्यावर परिणाम झाला. या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः मुलींसाठी स्वच्छता सुविधा त्याहूनही अधिक महत्त्वाच्या आहेत.”यातूनच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एकूण 54 शाळांमध्ये स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कार्तिकेएन एस, आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेने ठोस टिकाऊ आणि संवेदनशील आराखडा तयार केला आणि त्यातूनच जिल्हा परिषद ५४ शाळांमध्ये दर्जेदार स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. मीना शेंडकर उपस्थित होत्या.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री कोल्हापूर, नाम. श्रीमती माधुरी मिसाळ, राज्यमंत्री कोल्हापूर स्टाईल इंटिग्रेटेड स्कूल हेल्थ कॉम्प्लेक्स या प्रकल्पासाठी मा. नाम. प्रकाश आबिटकर, मंत्री नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक व औकाफ तथा सहपालकमंत्री कोल्हापूर, मा. नाम. श्री. हसन मुश्रीफ, मंत्री वैद्यकीयकीय शिक्षा विशेष सहाय्य, महाराष्ट्र राज्य या सर्वांच्या मार्गदर्शन व सहकार्यातून १५ व्या वित्त आयोग (जि.प. सिर) निधीतून हा उपक्रम राबवला गेला असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.एस. कार्तिकेयन यांनी सांगितले. यामध्ये एकूण शंभर शाळांमध्ये हा प्रकल्प राबविला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
हा निधी ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या आणि विशेषतः मुलींची उपस्थिती जास्त आहे, त्या शाळांमध्ये आधुनिक स्वच्छता सुविधा निर्माण करण्यासाठी वापरला गेला असून निकषानुसार हेल्थ कॉम्प्लेक्सचे तीन प्रकार निश्चित करणेत आले. यात २०० पेक्षा जास्त विद्यार्थी), १०० ते २०० विद्यार्थी आणि १०० पेक्षा कमी विद्यार्थी या प्रकल्पात वापरलेले साहित्य केवळ टिकाऊच नाही तर सौंदर्यपूर्ण आहे व नामवंत कंपनीचे वापरणेत आलेले आहे.असेही यावेळी सांगण्यात आले.
पाण्याच्या लाईन्ससाठी फिनोलेक्स टाकी,जैन, किसान पाईप्स वापरण्यात आले आहेत.
विद्युत कामासाठी पॉली कॅब, एपीएर वायर्स वापरण्यात आले आहेत. प्रकाश योजनेसाठी फिलिप्स सिस्का बल्ब, फ्लोअरिंग आणि डॅडोसाठी कजारिया जॉन्सन सिम्प्लो टाइल्स वापरण्यात आले आहेत.
युरिनल्समधील विभाजनासाठी ग्रॅनाईट पार्टीशन करण्यात आले आहे. दरवाजे टिकाऊ आणि जलरोधक केले आहेत.सुरक्षिततेसाठी लॉक्स अँड हँगस करण्यात आले आहेत.
कमोड, बेसिन, युरिनल पॅन, शॉवर्स आणि कॉकसाठी जग्वार कोल्हार टोटो कंपनीचे नळ बसविण्यात आले आहेत.प्रत्येक स्वच्छतागृहामध्ये सुव्यवस्थित सुविधा,आरसा,
हॅन्ड वॉश, एअर फ्रेशनर, पेपर डिस्पेन्सर सुविधा करण्यात आल्या आहेत.
मुलींच्या आरोग्य आणि सन्मानाचा विचार करून वेंडिंग मशीन सॅनिटरी पॅड डिस्पेन्सर, इनक्लीनरटर बसविण्यात आले या सुविधेमुळे मुलींचा आत्मविश्वास वाढला,शाळेत उपस्थिती वाढली आणि शिक्षणात सहभाग अधिक झाला आहे असे शेंडकर यांनी नमूद केले.या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय निर्माण झाली. शाळेचा दर्जा उंचावला आणि शाळेचे वातावरण अधिक आनंदी झाले आहे.प्रकल्पाची वैशिष्ट्यपूर्णता म्हणजे बांधकाम, सौंदर्य, शिस्त आणि संवेदनशीलता या चारही गोष्टींचा उत्तम संगम यात दिसतो.प्रकल्पाचे सर्व आराखडे, खर्च आणि बांधकाम नुसार पूर्ण करण्यात आले. यासाठी कोणताही जादा निधी उपलब्ध करावा लागला नाही. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली, शिक्षण अधिकारी (प्राथमिक), कार्यकारी अभियंता (समग्र शिक्षा) आणि कनिष्ठ अभियंता (समग्र शिक्षा) यांच्या संयुक्त देखरेखीखाली गुणवत्ता कायम ठेवली गेली आहे.
हेल्थ कॉम्प्लेक्सची नियमित स्वच्छता व देखभाल शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांचे माध्यमातून करणेचे नियोजन केले आहे.”कोल्हापूर स्टाईल हेल्थ कॉम्प्लेक्स” हा विद्यार्थ्यांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सन्मानाचा उत्सव. “स्वच्छ शाळा म्हणजे आरोग्यदायी समाज!” या मंत्राने जिल्हा परिषद कोल्हापूर शाळांना आरोग्यदायी, सुरक्षित आणि सन्मानपूर्ण वातावरण देण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी यावेळी सांगितले आहे.यावेळी जिल्हा परिषद समग्र शिक्षाचे एक्झिक्युटीव्ह इंजिनिअर श्री. अमोल पाटील ज्युनिअर इंजिनिअर समग्र शिक्षा हेड ऑफिस सौ.सुप्रिया जोगळेकर आदी उपस्थित होते.