Grid Posts

View All
माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

माय मराठी

शहरातील टायर विक्री आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या भव्य शोरूमचे कळंबा येथे उद्घाटन

माय मराठी

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन

माय मराठी

कोल्हापुरी चप्पलसह चर्मकला जतन आणि विकसित करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले संसदेत विधेयक

माय मराठी

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार

Thumbnail

View All
My Marathi

कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा पुरवठा; अफवांवर विश्वास ठेवून ‘पॅनिक बायिंग’ करू नका: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

ग्लोबल ताज्या देश प्रीमियम महाराष्ट्र माय मराठी

मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करूया: जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या बैठकीतील संकल्प

My Marathi

सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय हिंदू, शीख आणि बौद्धांनाच अनुसूचित जातीचा दर्जा

माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

माय मराठी

शहरातील टायर विक्री आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या भव्य शोरूमचे कळंबा येथे उद्घाटन

Tile List

View All
माय मराठी

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन कोल्हापूर (जिमाका) : शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासन कृषी…

माय मराठी

कोल्हापुरी चप्पलसह चर्मकला जतन आणि विकसित करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले संसदेत विधेयक

माय मराठी

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार

माय मराठी

येत्या वर्षात प्रत्येक घरात सौर प्रकल्प राबवून ‘शून्य वीज बिल’ करण्याचे उद्दिष्ट – मंत्री हसन मुश्रीफ

List Posts

View All
माय मराठी

भुये (ता. करवीर) च्या मानाच्या सासनकाठी क्रमांक ४० चा पर्यावरणपूरक उपक्रम गाजला; जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

भुये (ता. करवीर) च्या मानाच्या सासनकाठी क्रमांक ४० चा पर्यावरणपूरक उपक्रम गाजला; जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक भुये (ता. करवीर) : जोतिबा चैत्र…

My Marathi

दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळा पडला पार

दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळा पडला पार कोल्हापूर/प्रतिनिधी : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र…

My Marathi

जोतिबा भक्तांची श्रद्धा गायमुखावर: भक्तांच्या विधिवत पूजनाने अन्नछत्राचा मंगल प्रारंभ झाला!

जोतिबा भक्तांची श्रद्धा गायमुखावर: भक्तांच्या विधिवत पूजनाने अन्नछत्राचा मंगल प्रारंभ झाला! कोल्हापूर/प्रतिनिधी: गेली २५ वर्षे श्रद्धेचा आणि सेवेचा एक अखंड…

My Marathi

भक्तीची पाऊलवाट आणि माणुसकीची थाप: जोतिबाच्या चैत्र यात्रेतील बैलगाड्यांची परंपरा

भक्तीची पाऊलवाट आणि माणुसकीची थाप: जोतिबाच्या चैत्र यात्रेतील बैलगाड्यांची परंपरा कोल्हापूर/प्रमोद पाटील  : "चांगभलं" च्या गजराने अवघा जोतिबा डोंगर दुमदुमून…

Thumbnail

View All
My Marathi

अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीचा विवाह ; पतीसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा

My Marathi

कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा पुरवठा; अफवांवर विश्वास ठेवून ‘पॅनिक बायिंग’ करू नका: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

ग्लोबल ताज्या देश प्रीमियम महाराष्ट्र माय मराठी

मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करूया: जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या बैठकीतील संकल्प

My Marathi

सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय हिंदू, शीख आणि बौद्धांनाच अनुसूचित जातीचा दर्जा

माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुंबई

रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच; विद्रुपीकरण होवू देणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर

रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच; विद्रुपीकरण होवू देणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर   कोल्हापूर/प्रतिनिधी : गेल्या काही वर्षात…

My Marathi

गोकुळ’मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी

‘गोकुळ’मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संघ (गोकुळ) च्या वतीने ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारातील…

My Marathi

रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर डिजिटलवर; भव्य स्टारकास्टमुळे उत्सुकता शिगेला

रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर डिजिटलवर; भव्य स्टारकास्टमुळे उत्सुकता शिगेला कोल्हापूर/प्रतिनिधी : जिओ स्टुडिओज आणि मुंबई…

My Marathi

धुरंधर द रिव्हेंज’सोबत थिएटरमध्ये येणार ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर

‘धुरंधर द रिव्हेंज’सोबत थिएटरमध्ये येणार ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर कोल्हापूर/प्रतिनिधी : जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी प्रस्तुत बहुप्रतिक्षित…

माय मराठी

आज ३ एप्रिलला कोल्हापुरात होणार सहकार सम्राज्ञी पुरस्कार वितरण

सहकार क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा पुढाकार आज ३ एप्रिलला कोल्हापुरात होणार सहकार सम्राज्ञी पुरस्कार वितरण  …

माय मराठी

भुये (ता. करवीर) च्या मानाच्या सासनकाठी क्रमांक ४० चा पर्यावरणपूरक उपक्रम गाजला; जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

भुये (ता. करवीर) च्या मानाच्या सासनकाठी क्रमांक ४० चा पर्यावरणपूरक उपक्रम गाजला; जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक भुये (ता. करवीर) : जोतिबा चैत्र…

My Marathi

दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळा पडला पार

दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळा पडला पार कोल्हापूर/प्रतिनिधी : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र…

My Marathi

जोतिबा भक्तांची श्रद्धा गायमुखावर: भक्तांच्या विधिवत पूजनाने अन्नछत्राचा मंगल प्रारंभ झाला!

जोतिबा भक्तांची श्रद्धा गायमुखावर: भक्तांच्या विधिवत पूजनाने अन्नछत्राचा मंगल प्रारंभ झाला! कोल्हापूर/प्रतिनिधी: गेली २५ वर्षे श्रद्धेचा आणि सेवेचा एक अखंड…

My Marathi

भक्तीची पाऊलवाट आणि माणुसकीची थाप: जोतिबाच्या चैत्र यात्रेतील बैलगाड्यांची परंपरा

भक्तीची पाऊलवाट आणि माणुसकीची थाप: जोतिबाच्या चैत्र यात्रेतील बैलगाड्यांची परंपरा कोल्हापूर/प्रमोद पाटील  : “चांगभलं” च्या गजराने अवघा जोतिबा डोंगर दुमदुमून…

माय मराठी

देशभरातील दुर्मिळ कारागिरी ३१ मार्च ते ४ एप्रिल  सिद्धगिरी मठावर पाहायला मिळणार

देशभरातील दुर्मिळ कारागिरी ३१ मार्च ते ४ एप्रिल  सिद्धगिरी मठावर पाहायला मिळणार देशभरातील कारागिरांचा महाकुंभ पाच दिवस चालणार कोल्हापूर/प्रतिनिधी :…

रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच; विद्रुपीकरण होवू देणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर

रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच; विद्रुपीकरण होवू देणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : गेल्या काही वर्षात उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केलेल्या निधीतून ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. याची भुरळही कोल्हापूर वासियांसह पर्यटकांना पडत असून, रंकाळा तलावास भेट देणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यासह खवय्यांचीही गर्दी होत आहे. या परिसरातील स्थानिक नागरिक याच उदरनिर्वाहावर अवलंबून आहेत. परंतु, रंकाळाचे विद्रुपीकरण करून, सौंदर्यात बाधा येत असेल तर त्यास आपण पाठीशी घालणार नाही, रंकाळा तलावाचे सौंदर्य अबाधित राखण्याची जबाबदारी सर्वांचीच असल्याचे प्रसिद्धीपत्रक राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
यात पुढे म्हंटले आहे कि, काही दिवसांपूर्वी रंकाळा तलाव परिसरातील नागरिकांनी सदर ठिकाणी फेरीवाले संघटना स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार सदर संघटनेच्या उद्घाटनाकरिता सदर ठिकाणी गेलो असता सांगण्यात आलेली बाब आणि प्रत्यक्षात करण्यात आलेली कृती वेगळी असल्याचे निदर्शनास आल्याने सदर अतिक्रमणास कोणत्याही प्रकारे मी मान्यता दिली नाही. यावेळी स्थानिक नागरिकांनी परप्रांतीय लोक याठिकाणी व्यवसाय करतात. या ठिकाणी गाळे घेवून व्यवसाय करण्यास मर्यादा असल्याचे गाऱ्हाणे मांडले. *रंकाळा तलाव ही कोल्हापूरची अस्मिता आहे. नागरिकांनाही व्यवसायासाठी योग्य ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मदत करण्यात येईल. परंतु, सौंदर्याला बाधा पोहचेल असे कोणतेही अतिक्रमण करू नये, अशा सूचना संबधित स्थानिक नागरिकांना दिल्या आहेत.आगामी काळात अशा प्रकारचे कोणतेही अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही प्रशासनास दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी रंकाळ्यात कचरा, नासाडी झालेले अन्न टाकण्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. याबाबतीतही आपण संबधितांची बैठक घेवून तलावाचे कोणतेही नुकसान किंवा प्रदूषण फेरीवाल्यांच्या कृतीमुळे होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या होत्या. रंकाळा तलावाच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासह निधीच्या माध्यमातून असेल, नाविन्यपूर्ण अशी विद्युत रोषणाई, म्युझिकल फौंऊटेन, सेल्फी पाँइंट आदी प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटनवृद्धीसाठी आपले नेहमीच प्रयत्न सुरु आहेत. पूर्वीचा रंकाळा आणि आताच रंकाळा यात अमुलाग्र बदल झाल्याचे दिसून येते. त्यामुळे रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच असल्याचेही आमदार राजेश क्षीरसागर यांनी या पत्रकात म्हंटले आहे.

गोकुळ’मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी

गोकुळ’मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संघ (गोकुळ) च्या वतीने ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारातील श्री हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळी साडेसहा वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड व त्यांच्या पत्नी सौ. भाग्यश्री गायकवाड यांच्या हस्ते श्री हनुमान मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पाळणा, रुद्राभिषेक व भजन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले.या कार्यक्रमास संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युवराज पाटील यांच्यासह पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंखे, संकलन व्यवस्थापक दत्तात्रय वागरे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अशोक पुणेकर, बाजीराव पाटील, निवास पाटील, बाळासो वायदंडे, संकेत खाडे, नितीन तोडकर,सुभाष नाळे, सर्वेश जाधव, अर्जुन पाटील, विनोद पाटील, बाळासो खांडेकर व इतर अधिकारी तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर डिजिटलवर; भव्य स्टारकास्टमुळे उत्सुकता शिगेला

रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर डिजिटलवर; भव्य स्टारकास्टमुळे उत्सुकता शिगेला

कोल्हापूर/प्रतिनिधी : जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित ‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक टीझर’ अखेर डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. नुकताच ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटासोबत चित्रपटगृहांमध्ये विशेषरीत्या प्रदर्शित करण्यात आलेल्या या टीझरला थिएटरमध्ये टाळ्या आणि जल्लोषाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. सोशल मीडियावरही प्रेक्षकांनी टीझर बद्दल प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता हाच टीझर डिजिटल माध्यमातून प्रदर्शित होतो आहे, भारताच्या सर्वश्रेष्ठ महान अश्या राजाची भव्य झलक अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असून, चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
‘राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून त्यांच्या पराक्रम, स्वाभिमान आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणादायी प्रवासाचे भव्य चित्रण यात करण्यात आले आहे. अभिनेता रितेश विलासराव देशमुख यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून मुख्य भूमिका देखील साकारली आहे. त्यांच्या दिग्दर्शनातून ऐतिहासिक विषयाला आधुनिक सिनेमॅटिक भव्यतेची जोड देण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो.
या चित्रपटाची एक मोठी जमेची बाजू म्हणजे त्याची दमदार स्टारकास्ट. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बमन ईरानी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद जोशी,अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख , आणि रितेश विलासराव देशमुख यांसारख्या दिग्गज कलाकारांची फळी या चित्रपटात एकत्र आली आहे.
यात थरारक ॲक्शन दृश्ये, वेधक आणि भावनिक नाट्य, दमदार संवाद आणि अंगावर रोमांच उभे करणारे संगीत यामुळे हा चित्रपट केवळ एक ऐतिहासिक कथा न राहता एक भव्य सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी दिलेले दर्जेदार संगीत, तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार संतोष सिवन यांची सिनेमॅटोग्राफी असल्यामुळे ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट मराठीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट तर आहेच याशिवाय भारताच्या ऐतिहासिक वारस्याला जागतिक स्तरावर सादर करण्याची क्षमता ठेवतो.
चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या टीझरला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद हा या चित्रपटाबद्दलच्या प्रेक्षकांच्या अपेक्षांचा ठोस पुरावा आहे. खचाखच भरलेल्या थिएटर्समध्ये उमटलेल्या टाळ्या, शिट्ट्या आणि जल्लोष यावरून ‘राजा शिवाजी’च्या ऐतिहासिक विश्वात रममाण होण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत, हे स्पष्ट होते. आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर हा टीझर आणखी मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचत असून, या भव्य चित्रपटाच्या यशस्वी प्रवासाची दमदार सुरुवात ठरत आहे.
‘राजा शिवाजी’ हा चित्रपट एका प्रेरणादायी कथा असून हा चित्रपट भाषेच्या सीमा ओलांडत जागतिक स्तरावर सादर करण्याचे निर्मात्यांचे उद्दिष्ट आहे.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी या बॅनरखाली ज्योती देशपांडे व जिनिलीया देशमुख यांनी निर्मिती केली आहे. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या उदयाला समर्पित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भव्य, प्रेरणादायी आणि अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.

धुरंधर द रिव्हेंज’सोबत थिएटरमध्ये येणार ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर

धुरंधर द रिव्हेंज’सोबत थिएटरमध्ये येणार ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर

कोल्हापूर/प्रतिनिधी : जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी प्रस्तुत बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राजा शिवाजी’ चा दमदार फर्स्ट लूक टीझर आता प्रेक्षकांसमोर येणार असून, हा खास अनुभव केवळ चित्रपटगृहांमध्येच पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हा फर्स्ट लूक टीझर ‘धुरंधर-द रिव्हेंज’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासोबत दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे १८ मार्चपासून सुरू होणाऱ्या सशुल्क प्रिव्ह्यूद्वारेही प्रेक्षकांना या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची पहिली झलक पाहण्याची संधी मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, स्वाभिमानाची आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रवासाची सिनेमॅटिक झलक मोठ्या पडद्यावर नक्की बघा. रितेश विलासराव देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेल्या आणि दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात भारतातील एका महान योद्धाची गाथा , त्याचा स्वराज्य स्थापनेचा संघर्ष आता संपूर्ण जग या फर्स्ट लूक टीझर मधून बघेल.या भव्य ऐतिहासिक कलाकृतीत संगीताची जादू अजय-अतुल यांनी दिली असून, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार संतोष सिवन यांनी आपल्या अप्रतिम छायाचित्रणातून या गाथेला भव्य दृश्यरूप दिले आहे. भाषिक आणि भौगोलिक सीमा ओलांडत भारताचा समृद्ध इतिहास आणि वारसा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा या चित्रपटाच्या निर्मात्यांचा उद्देश आहे.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरखाली ज्योती देशपांडे आणि जिनिलीया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून शौर्य, सन्मान आणि स्वराज्याच्या जन्मास भव्य आदरांजली अर्पण करणारी ही ऐतिहासिक गाथा प्रेक्षकांना एका विलक्षण सिनेमॅटिक प्रवासावर घेऊन जाणार आहे. भव्यतेचा नवा अध्याय, इतिहासाची थरारक गर्जना भारतासह जगभरात गाजण्यासाठी भव्य पडद्यावर सज्ज झाली आहे.

आज ३ एप्रिलला कोल्हापुरात होणार सहकार सम्राज्ञी पुरस्कार वितरण

सहकार क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा पुढाकार

आज ३ एप्रिलला कोल्हापुरात होणार सहकार सम्राज्ञी पुरस्कार वितरण

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : सहकार क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून फेडरेशनच्यावतीने येत्या ३ एप्रिल रोजी महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर आणि चर्चासत्र आयोजित केले आहे. यावेळी सहकारी पतसंस्था क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना, सहकार सम्राज्ञी पुरस्काराने गौरवले जाणार आहे अशी माहिती राज्य फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा आणि भागीरथी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी  दिली.
कोल्हापुरातील सायबर महाविद्यालयाच्या आनंद भवन सभागृहात महिला मेळावा आयोजित केला आहे. यापूर्वी शिर्डी येथील पतसंस्था फेडरेशनच्या प्रशिक्षण केंद्रात तीन वेळा मेळावे झाले आहेत. त्यानंतर नाशिक तसेच जुन्नर तालुक्यातील आळे फाटा आणि छत्रपती संभाजीनगर येथे अशा प्रकारचे मेळावे झाले आहेत. यंदाचा मेळावा भागीरथी महिला पतसंस्थेच्या सहकार्यातून कोल्हापुरात होत आहे. सहकार चळवळीत महिलांचा सहभाग वाढावा, हा या मागचा मुख्य उद्देश आहे.
सहकार क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवणार्‍या आणि सामाजिक बांधिलकी जपणार्‍या यशस्वी महिलांचा यावेळी सन्मान होणार आहे. त्यामध्ये बेस्ट चेअरमन, बेस्ट सीईओ आणि बेस्ट विक्री प्रतिनिधीसाठी पुरस्कार दिले जाणार आहेत. सहकार सम्राज्ञी किताबा अंतर्गत पहिल्या क्रमांकासाठी २१ हजार रुपये आणि प्रमाणपत्र,दुसर्‍या क्रमांकासाठी १५ आणि तिसर्‍या क्रमांकासाठी ११ हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे अशी माहिती भागीरथी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी दिली.
खासदार धनंजय महाडिक, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, महापौर रुपाराणी निकम आणि गोदावरी अर्बन पतसंस्थेच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून महिला सबलीकरणासाठी कायद्यातील अपेक्षित बदलांवर चर्चासत्र होईल. तर व्यवसायासाठी निधी कसा उभा करावा, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा, गुणवत्तापूर्ण पॅकेजिंग आणि मार्केटिंग कसे करावे, याबद्दल मार्गदर्शन होणार आहे, अशी माहिती राज्य फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा यांनी दिली.
महाराष्ट्रात अगदी तळागाळापर्यंत पतसंस्थांचे जाळे विस्तारले आहे. आर्थिक दृष्टया कमकुवत आणि गरजू घटकांना पतपुरवठा करण्यात पतसंस्था आघाडीवर असतात. कमकुवत घटकांचा पाया मजबुत करण्याचे काम या माध्यमातून होत आहे. राज्यात १४ हजार ५०० पतसंस्था आहेत. तर कोल्हापूर जिल्हयातील पतसंस्थांची संख्या १ हजार ३०० आहे. पतसंस्थांचे कामकाज कसे करावे, चेअरमन- व्हाईस चेअरमन आणि संचालकांची जबाबदारी, महिला संचालकांचा पतसंस्थांच्या कामकाजात प्रत्यक्ष सहभाग वाढवणे, महिला पतसंस्थांनी कोणत्या प्रकारच्या कर्ज वितरणावर भर द्यावा, ठेवी वाढवण्यासंबंधीचे उपाय, कर्ज वसुली यंत्रणा सक्षम कशी बनवावी, या संदर्भात मेळाव्यात मार्गदर्शन केले जाणार आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यातील पतसंस्थांचे चेअरमन, उपाध्यक्ष, संचालक या मेळाव्यासाठी उपस्थित राहतील. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक सागर चौगुले, जवाहर छाबडा, वीराचार्य पतसंस्थेचे चेअरमन मोहन नवले, चार्टर्ड अकौंटंट शिवराज मगर आदी उपस्थित होते.

भुये (ता. करवीर) च्या मानाच्या सासनकाठी क्रमांक ४० चा पर्यावरणपूरक उपक्रम गाजला; जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

भुये (ता. करवीर) च्या मानाच्या सासनकाठी क्रमांक ४० चा पर्यावरणपूरक उपक्रम गाजला; जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

भुये (ता. करवीर) : जोतिबा चैत्र यात्रेनिमित्त भुये (ता. करवीर) येथील मानाची सासनकाठी क्रमांक ४० यंदा पर्यावरणपूरक उपक्रमामुळे विशेष चर्चेत आली. या उपक्रमाचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कौतुक केले.सालाबादप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र वाडी-रत्नागिरी (जोतिबा डोंगर) येथे चैत्र यात्रा मोठ्या भक्तिभावात पार पडली. सर्व मानाच्या सासनकाठ्यांनी यात्रेत सहभाग घेतला; मात्र सासनकाठी क्रमांक ४० ने पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वेगळी ओळख निर्माण केली.
प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, सासनकाठीच्या मानकऱ्यांनी “पर्यावरण वाचवा” हा संदेश देण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार दुपारी सुमारे ३ वाजता सासनकाठीची बारी सुरू होताच, काठी क्रमांक ४० सोबत भुये गावच्या भाविकांनी पर्यावरण जनजागृतीचे फलक हातात घेत यात्रेत सहभाग घेतला.फलकांवर “जंगलतोड रोखू, पर्यावरण वाचवू”, “प्लास्टिकमुक्त व केमिकलमुक्त चैत्र यात्रा साजरी करू”, “कापडी पिशवीचा वापर करा”, “लावा झाडे, वाचवा पुढची पिढी”, “वनवा पेटवू नका” अशा संदेशांद्वारे भाविकांचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी सासनकाठी परिसरात कापडी पिशव्यांचे वाटप करून परिसर प्लास्टिकमुक्त करण्यात आला. तसेच भाविकांनी “चांगभलं – मानाची सासनकाठी नंबर ४०” असे लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या परिधान करून उपक्रमात सहभाग घेतला.जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सासनकाठी क्रमांक ४० जवळ भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी सासनकाठी नाचवून या उपक्रमास प्रोत्साहन दिले. तसेच अनेक प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि महसूल विभागातील प्रतिनिधींनीही या उपक्रमाचे कौतुक करत छायाचित्रे घेतली.हा उपक्रम सासनकाठीचे मानकरी अमर पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. यावेळी भुये, भुयेवाडी, निगवे, शिये, जठारवाडी या पंचक्रोशीतील जोतिबा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच, सासनकाठी क्रमांक ४० ने यंदाची चैत्र यात्रा केवळ भक्तिभावानेच नव्हे, तर सामाजिक जाणीव आणि पर्यावरण रक्षणाचा आदर्श ठेवत गाजवली.याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा परिषद चे सीईओ एस कार्तिकेएन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे शिवराज नायकवडी भुये चे बाजीराव पाटील रामचंद्र पाटील रमेश पाटील शिवाजी पाटील तानाजी पाटील सर्जेराव पाटील विश्वास पाटील धनाजी पाटील प्रणव पाटील निलेश पाटील आदी मानकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळा पडला पार

दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळा पडला पार

कोल्हापूर/प्रतिनिधी : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या निमित्ताने अवघा जोतिबा डोंगर ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने आणि गुलालाच्या उधळणीने न्हाऊन निघाला. महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथे आज चैत्र यात्रेचा मुख्य सोहळा जवळजवळ आठ लाख भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला. या मंगलप्रसंगी राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठ्यांचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक योगेशकुमार, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, गट विकास अधिकारी सोनाली माडकर, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, महादेव दिंडे आणि व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी जोतिबा देवाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे पाच वाजता श्रींचा शासकीय अभिषेक संपन्न झाला आणि त्यानंतर धार्मिक विधींना प्रारंभ झाला. दुपारी बाराच्या सुमारास मंत्री शंभूराज देसाई यांनी सासनकाठ्यांचे पूजन केल्यानंतर मिरवणुकीला दिमाखात सुरुवात झाली. या वैभवशाली मिरवणुकीमध्ये परंपरेप्रमाणे सातारा जिल्ह्यातील पाडळीच्या सासनकाठीला पहिला मान देण्यात आला. त्यापाठोपाठ मौजे विहे (ता. पाटण), कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज (ता. मिरज), कसबा सांगाव (ता. कागल), किवळ (जि. सातारा) आणि कवठेएकंद (जि. सांगली) यांसह एकूण १०८ मानाच्या सासनकाठ्या ढोल-ताशांच्या आणि हलगीच्या कडकडाटात सहभागी झाल्या होत्या. डौलाने नाचवल्या जाणाऱ्या या सासनकाठ्या आणि त्यावर होणारी गुलाल-खोबऱ्याची उधळण भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत होती.
प्रशासनाच्या वतीने यंदाची यात्रा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. भाविकांच्या सोयीसाठी डोंगरावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर, अन्नछत्र, सुसज्ज दर्शन रांग, पार्किंग व्यवस्था आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. संपूर्ण यात्रा परिसरावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली असून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला होता. अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात आली, तर जे भाविक उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्यासाठी लाईव्ह दर्शनाची सोयही करण्यात आली होती. बैलगाड्या, खासगी वाहने आणि पायी चालत आलेल्या लाखो भाविकांनी डोंगरवाटा ओसंडून वाहत होत्या, ज्यामुळे अवघा जोतिबा डोंगर गुलाबी रंगाच्या छटेत आणि भक्तीच्या रसात न्हाऊन निघालेला पाहायला मिळाला.
ज्योतिबा डोंगरावर आरोग्य व्यवस्था करण्यात आली होती टू व्हीलर मेकॅनिकल असोसिएशनच्या वतीने गाड्यांच्या दुरुस्तीसाठी मोहीम राबवली होती याचबरोबर ज्योतिबा डोंगरावर प्रसादाचे दुकानेही थाटण्यात आली होती. पार्किंग व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आल्या होत्या ज्योतिबा डोंगरावर गुलालाची उधळण मोठ्या प्रमाणात झाली.जोतिबा डोंगरावर आमदार विनय गोरे आणि गायमुखाच्या इथे सहज सेवा ट्रस्टच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ज्योतिबा डोंगर भाविकांच्या उपस्थितीत नाऊन निघाला होता. केरली पासून मंदिरापर्यंत सर्वत्र पाणी वाटप, प्रसादाचे वाटप,कोकम सरबत वाटप करण्यात आले.

जोतिबा भक्तांची श्रद्धा गायमुखावर: भक्तांच्या विधिवत पूजनाने अन्नछत्राचा मंगल प्रारंभ झाला!

जोतिबा भक्तांची श्रद्धा गायमुखावर: भक्तांच्या विधिवत पूजनाने अन्नछत्राचा मंगल प्रारंभ झाला!

कोल्हापूर/प्रतिनिधी: गेली २५ वर्षे श्रद्धेचा आणि सेवेचा एक अखंड यज्ञ कोल्हापूरच्या वाडी रत्नागिरीवर, म्हणजेच दख्खनचा राजा जोतिबाच्या चरणी सुरू आहे. तो यज्ञ म्हणजे ‘सहजसेवा ट्रस्ट’चे अन्नदान! लाखो भक्तांची भूक भागवणारे हे अन्नछत्र केवळ उपक्रम नसून तो लाखो भाविकांच्या विश्वासाचा एक अविभाज्य भाग बनला आहे.यावर्षीच्या अन्नछत्राची सुरुवात एका अत्यंत भावूक आणि मांगल्याने न्हाऊन निघालेल्या प्रसंगाने झाली.

भक्तांची ओढ आणि भावना

अन्नछत्र सुरू होण्यापूर्वीच, बेळगावच्या जोतिबा भक्तांच्या भक्तीचा सुगंध डोंगरावर दरवळला. कोडसकोप (बेळगाव) आणि चव्हाटा गल्ली (बेळगाव) येथील मानाच्या सासनकाट्या जोतिबाच्या डोंगरावर विसावल्या. या भक्तांच्या मनात एकच आर्त इच्छा होती—ज्या ठिकाणी लाखो भाविक प्रसादाचा लाभ घेतात, त्या पवित्र ठिकाणी (गायमुख) पूजा करण्याची.

भक्तांची ओढ इतकी पराकोटीची होती की, त्यांच्या भावनांचा आदर करत सहजसेवा ट्रस्टने या पूजेला आनंदाने संमती दिली. मग काय… वातावरणच बदलून गेले!
स्वयंपाकाची जागा आणि मुख्य मंडप अशा दोन्ही ठिकाणी भक्तांनी मनोभावे पूजेची मांडणी केली.
‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गुलालाची उधळण आणि टाळ-मृदंगाचा गजर यामुळे प्रत्यक्ष देवच तिथे अवतरल्याचा भास होत होता.जेव्हा दोन्ही गावच्या भक्तांनी मनोभावे पूजा अर्चा आटोपली, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हे कोणत्याही शब्दांत न मावणारे होते.
“भक्ती जिथे असते, तिथे देव स्वतःहून धावून येतो. या भक्तांची श्रद्धा आणि निष्ठा खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या पूजनाने अन्नछत्राच्या जागेचे पावित्र्य अधिकच वृद्धिंगत झाले आहे.”या मांगल्याच्या वातावरणात, भक्तांच्या आशीर्वादाने आज रात्रीपासून सहजसेवा ट्रस्टचे अन्नछत्र विधिवत सुरू होत आहे. जेवण बनवणाऱ्यांच्या हातांत सेवाभाव आहे आणि वाढणाऱ्यांच्या मनात आपुलकी. अशा या पवित्र कार्यात सहभागी होणे, हे कोणत्याही भक्तासाठी भाग्याचेच आहे.धन्य तो जोतिबा देव आणि धन्य ते त्याचे भक्त! हा भक्तीचा सोहळा असाच अविरत चालू राहो, हीच चरणी प्रार्थना.

भक्तीची पाऊलवाट आणि माणुसकीची थाप: जोतिबाच्या चैत्र यात्रेतील बैलगाड्यांची परंपरा

भक्तीची पाऊलवाट आणि माणुसकीची थाप: जोतिबाच्या चैत्र यात्रेतील बैलगाड्यांची परंपरा


कोल्हापूर/प्रमोद पाटील  : “चांगभलं” च्या गजराने अवघा जोतिबा डोंगर दुमदुमून गेला आहे. आधुनिकतेच्या युगात जिथे वाहनांचा वेग वाढला आहे, तिथे आजही चैत्र यात्रेच्या निमित्ताने एक जुनी, निखळ आणि तितकीच जिव्हाळ्याची परंपरा कायम आहे. ही परंपरा आहे—आपल्या लाडक्या सर्जा-राजाला सोबत घेऊन, बैलगाडीतून जोतिबाच्या दर्शनाला येण्याची.
बैलगाड्यांचा थाट आणि भक्तीचा प्रवास शेतकरी, कष्टकरी आणि गोर-गरीब जनतेचे कुलदैवत असलेल्या जोतिबाच्या दर्शनासाठी आजही अनेक कुटुंबं शेकडो मैलांचा प्रवास बैलगाडीतून पूर्ण करतात. या प्रवासात थकवा नसतो, असतो तो केवळ देवाच्या दर्शनाचा ओढ. या यात्रेसाठी बैलांना खास नटवण्यात येते; शिंगे रंगवलेली, गळ्यात घुंगरांच्या माळा आणि कपाळावर रेशमी गोंडे अशा थाटात हे ‘लवाजमे’ जोतिबा डोंगराच्या दिशेने कूच करतात. गाड्यांनाही आकर्षक रंगरंगोटी करून सजवले जाते. दोन-तीन दिवसांचा खडतर प्रवास करून आज दुपारपासून या बैलगाड्या डोंगरावर दाखल होऊ लागल्या आहेत.

सहज सेवा ट्रस्ट: मुक्या प्राण्यांची मायेने सेवा

जोतिबा डोंगरावर कडक उन्हाचा तडाखा आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. अशा परिस्थितीत शेकडो मैल चालून आलेल्या या बैलांच्या चाऱ्याची आणि पाण्याची सोय होणे अत्यंत कठीण असते. हीच गरज ओळखून ‘सहज सेवा ट्रस्ट’ गेल्या २५ वर्षांपासून एक स्तुत्य उपक्रम राबवत आहे.केवळ भक्तांसाठी ‘अन्नछत्र’ न चालवता, ‘भूतदया’ हाच खरा धर्म मानून ट्रस्टतर्फे येणाऱ्या बैलांचीही विशेष काळजी घेतली जाते. यामध्ये: कपरी पेंड आणि भुस्सा: बैलांच्या शक्तीसाठी पौष्टिक आहार,चाऱ्याची सोय: हिरवा चारा आणि कोरडे गवत.

२५ वर्षांचे अखंड व्रत

सहज सेवा ट्रस्टने ही सेवा केवळ एक उपक्रम म्हणून नव्हे, तर कर्तव्य म्हणून स्वीकारली आहे. डोंगरावर भर उन्हात बैलांना चारा मिळणे कठीण असते, हा संवेदनशील विचार करून ही ‘भूतदया सेवा’ मनोभावे राबवली जाते. यामुळेच ही प्राचीन परंपरा आजही टिकून आहे.परंपरा आणि सेवा यांचा हा संगम जोतिबाच्या चैत्र यात्रेचे सौंदर्य अधिकच वृद्धिंगत करतो. भक्तांचा उत्साह आणि मुक्या प्राण्यांप्रती असलेली ही कृतज्ञता खरोखरच कौतुकास्पद आहे.ज्योतिबाच्या नावानं चांगभलं!

 

देशभरातील दुर्मिळ कारागिरी ३१ मार्च ते ४ एप्रिल  सिद्धगिरी मठावर पाहायला मिळणार

देशभरातील दुर्मिळ कारागिरी ३१ मार्च ते ४ एप्रिल  सिद्धगिरी मठावर पाहायला मिळणार

देशभरातील कारागिरांचा महाकुंभ पाच दिवस चालणार

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री सिध्दगिरी संस्थान मठ कणेरी, कोल्हापूर आणि पर्यटन मंत्रालय महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने दि. ३१-३-२०२६ ते ०४-०४-२०२६ या कालावधीत ‘सिध्दगिरी कारागीर महाकुंभ’ संपन्न होत आहे. याबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी बोलताना स्वामीजी म्हणाले, “ या कारागीर महाकुंभात पारंपारिक, हस्तकला, कला यातील स्थानिक कलाकार आपल्या कलेचे कौशल्य लोकांसमोर सादर करतील पण अलीकडच्या काळात लोकांच्या आवडीनुसार व मागणीनुसार कला आणि हस्तकलामधील विविध प्रकार बघायला मिळतात. अश्या कला आणि हस्तकला राज्या-राज्यातून पाहायला मिळतात, कलाकारांचे कसब आणि कौशल्य यातून कलात्मक व आकर्षक अशा प्रकारच्या वस्तूंची निर्मिती होते व त्या वस्तूला चांगली मागणी व बाजारपेठ मिळते. इतकेच नाही तर अश्या वैशिष्ट्यपूर्ण कलानिर्मितीला आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील बाजारपेठ मिळते. कारागीर कुंभोत्सवामध्ये अश्या विविध राज्यातील कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. आणि एकूण १७ राज्यांमधून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक प्राप्त २०० हून कलाकार ‘सिध्दगिरी कारागीर महाकुंभा’मध्ये सामील होत आहेत.
कारागीर कुंभामध्ये असे कलाकार आपल्या कलेचे प्रत्यक्षरित्या प्रदर्शन करतील. परंतु त्यासोबत अशा कलेतून तयार केलेले वस्तू देखील विक्रीसाठी उपलब्ध करतील. आणि म्हणून या कारागीर महाकुंभाला प्रत्येकाने भेट देणे आवश्यक आहे.”टेराकोटा, मातीची ज्वेलरी, आकर्षक हस्तकलेपासून तयार झालेली मातीची खेळणी, टॅनिंग वुड कला, बांबू काम, लेदर वर्क विविध राज्यातील एंब्रॉयडरी पॅच वर्क, पिंगुळी चित्रकला, आदिवासी भिल्ल चित्रकला, धागा चित्रकला बाहुलींच्या प्रतीकात्मक ऐतिहासिक मुर्ती, स्टोन वर्क, कच्छ मधील राबरी कला, ग्लास वर्क, मक्याच्या कणसाचे वेस्टर्न पासून वस्तू. मधुवेनी पेंटिंग, लाकेपासून बांगड्या, महाराष्ट्राची पैठणी, बंजारा कला, बनारसी जरदोशी साड्या इ. हस्तकलेचे विविध प्रकार या कारागीर महाकुंभामध्ये बघायला मिळणार आहेत.
यावेळी प्रस्तावना करताना विवेक सिद्ध म्हणाले, “ तंत्र महाविद्यालय, महाविद्यालय, पॉलीटेक्नीक, अभियांत्रिकी महाविद्यालय, आय.टी.आय. यात शिक्षण घेणाऱ्या युवक-युवतींना या कारागीर महाकुंभासाठी पाचारण केले आहे. जेणेकरून हे युवक-युवती या कालेंचा अध्ययन करतील व या कलांच्यामध्ये आधुनिकतेची जोड कशी देता येईल याचा विचार करतील की जेणेकरून या सर्व कला अविष्कारांना छोटे-छोटे उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहतील आणि म्हणून हा ‘सिध्दगिरी कारागीर महाकुंभ’ एक आगळा वेगळा सोहळा आहे. कोल्हापूर शहरातील स्वतः भेट द्यावी, मित्र, आप्टेष्ट, मित्र नातेवाईक यांना देखील प्रोत्साहित करावे त्यामुळे देशभरातील कारागीरांचा सन्मान होईल व त्यांच्या कलेला गौरव होईल. यासाठी एकत्वं इन्फ्रा कंपनीचा सहभाग आहे.
या पत्रकार परिषदेसाठी सिद्धगिरी संस्थान मठाचे कार्यकारी संचालक यशोवर्धन बारामतीकर, मुख्यकार्यकारी अधिकारी जी.पी.वढड, विक्रम पाटील, प्रल्हाद जाधव, विवेक सिद्ध, दयानंद डोंगरे, प्रसाद नेवरेकर, राकेश पाटील, दिवाकर पाटील, पुनीत मुचंडी उपस्थित होते.