Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापुरात ड्रग्ज माफियांना जबर धक्का! तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा ,एमडी आणि चरस आगीत खाक

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात डॉ. युवराज येडूरे यांच्या आत्मक्लेश आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकरी महिला सहभागी

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

द इंडिया स्टोरी’च्या नव्या पोस्टरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा लोकांच्या रोषाशी सामना

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा आयआयएम तिरुचिरापल्ली येथे डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम संपन्न

Thumbnail

View All
माय मराठी

गोकुळ निवडणूकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी ९१ व्या दिवशी याचिका दाखल करणार ​

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला ‘एक्सलंट’ श्रेणी

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समवेत आत्मक्लेश आंदोलन करणार -डॉ. युवराज येडूरे यांची माहिती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समवेत आत्मक्लेश आंदोलन करणार -डॉ. युवराज येडूरे यांची माहिती कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हयातील तमाम शेतकरी परिवाराची आर्थिक सह सर्वागीण प्रगतीसाठी मोलाचे योगदान देत असलेल्या गोकुळची निवडणुक पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या बदनामी संदर्भात शेतकरी बंधू भगिनींसह आपण येत्या बुधवारी ८ जुलै रोजी आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ . युवराज येडुरे यांनी.पत्रकार परिषदेत सांगितले . यावेळी त्यांनी मांडलेली भूमिका अशी – लहानपणापासून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती आणि पशुपालनावर होत आहे. घरच्या जनावरांच्या दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आमचा संसार चालला. त्याच दुधाच्या पैशातून माझे प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण आणि आयुष्याची वाटचाल घडली. माझ्यासारख्या असंख्य सामान्य शेतकरी कुटुंबांना गोकुळने आधार दिला आहे. दर दहा दिवसांनी मिळणाऱ्या दुधाच्या बिलावर लाखो कुटुंबांचे घर चालले, मुलांचे शिक्षण झाले, मुलींची लग्ने झाली आणि अनेकांची स्वप्ने पूर्ण झाली. ग्रामीण भागातील अनेकांनी सकाळ-संध्याकाळ जनावरे सांभाळत शिक्षण घेत आहेत. आज तोच ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून शहरात नोकरी किंवा व्यवसायासाठी जातो आणि आपल्या दैनंदिन गरजेसाठी गोकुळचेच दूध विकत घेतो. कारण त्याला माहीत असते की, हेच दूध त्याच्या आई-वडिलांनी, भावंडांनी किंवा गावातील शेतकऱ्यांनी संघाला दिलेले आहे.म्हणूनच गोकुळ हा आमच्यासाठी केवळ एक ब्रँड नाही, तर भावना, विश्वास आणि अस्मिता आहे. गोकुळ ही कोल्हापूरच्या सहकार चळवळीची ओळख असून लाखो दूध उत्पादकांच्या कष्टांचे प्रतीक आहे.गोकुळचे संस्थापक स्वर्गीय एन. टी. सरनाईक, गोकुळच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे आनंदराव पाटील चुयेकर साहेब तसेच आजपर्यंत गोकुळच्या उभारणीत योगदान देणारे सर्व माजी व विद्यमान संचालक, अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक, वितरक आणि ग्राहक यांच्याप्रती मी एक दूध उत्पादक म्हणून मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.आमची इच्छा एकच आहे—गोकुळ आणखी मोठे व्हावे. देशातील आणि जगातील नामांकित दुग्धसंघांच्या बरोबरीने गोकुळची उत्पादने प्रत्येक राज्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचावीत. गोकुळ हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक सक्षम ब्रँड बनावा, हे प्रत्येक दूध उत्पादकाचे स्वप्न आहे. परंतु अलीकडच्या काळात गोकुळ दूध संघाभोवती सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, राजकीय संघर्ष, बदनामीची मोहीम आणि स्वार्थी राजकारण यामुळे संघाची प्रतिमा मलिन होत आहे. याचा सर्वाधिक फटका कोणाला बसतो, तर तो लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना. गोकुळ ही कोणत्याही एका व्यक्तीची किंवा राजकीय गटाची मालमत्ता नाही. ही लाखो दूध उत्पादकांची सामूहिक संपत्ती आहे. अल्पभूधारक, भूमिहीन, लहान शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा हा कणा आहे. त्यामुळे या संस्थेची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि स्वायत्तता कायम राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. याच पार्श्वभूमीवर, मी एक सामान्य दूध उत्पादक, सभासद आणि या संस्थेचा हितचिंतक म्हणून गोकुळच्या अस्तित्वाचे, प्रतिष्ठेचे आणि हिताचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे असे डॉ . युवराज येडुरे यावेळी म्हणाले. हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा संघटनेविरोधात नाही. हे आंदोलन केवळ गोकुळच्या हितासाठी, दूध उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि सहकाराची ही महान परंपरा जपण्यासाठी आहे.मी सर्व दूध उत्पादक, ग्राहक, सहकारप्रेमी आणि जनतेला विनम्र आवाहन करतो की, गोकुळला राजकारणापलीकडे जाऊन सहकाराच्या दृष्टीने पाहावे आणि या संस्थेची प्रतिष्ठा जपण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी. या विचाराला पाठींबा देण्यासाठी गोकुळ वर प्रेम करणाऱ्या दूध उत्पादक, दूध संस्था प्रतिनिधी, वाहतूकदार, वितरक, ग्राहक कर्मचारी यांच्या सह संस्था आणि संघटनांनी आपला सहभाग बुधवार दिनांक ८ जुलै रोजी गोकुळ शिरगांव येथे दिवसभर आत्मक्लेश आंदोलनात सहभागी व्हावे असे आहवान ही डॉ.येडुरे यांनी केले आहे.

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

हॅप्पी मेडिकर थेरपी सेंटर, कोल्हापूरतर्फे गरजू विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांचा वारसा मोदी सरकारने पुढे नेला; राष्ट्रहितासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सज्ज व्हावे – किरीट सोमय्या

Tile List

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

‘गोकुळ’ मध्ये सहकार सप्ताह उत्साहात साजरावृक्षारोपण, सहकार विषयावरील व्याख्यानातून अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

‘गोकुळ’ मध्ये सहकार सप्ताह उत्साहात साजरावृक्षारोपण, सहकार विषयावरील व्याख्यानातून अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन   कोल्हापूर, ता. ६/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

१२ वी PCB नंतर करिअरच्या अमर्याद संधी: डॉ. आर. के. शर्मा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

घोडावत विद्यापीठातील फार्मसीच्या विद्यार्थ्याला ३८.४३ लाखाचे पॅकेज

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

फलटण- वाठारच्या नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास, परंपरा आणि स्वाद या पुस्तकाची सौ. अरूंधती महाडिक यांच्याकडून निर्मिती

Tile Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पशुवैद्यकीय महाविद्यालय कणेरी, कोल्हापूर येथे स्थापनेसाठी केंद्र सरकारची मंजूरी

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे ४० दिवसात दूध विक्रीत सुमारे एक ते दीड लाख लिटरची वाढ

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

List Posts

View All
माय मराठी

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्र सुरु

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्र सुरु   कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त एनआयटी कोल्हापूर येथे ‘विद्युत सुरक्षा’ विषयावर कार्यशाळा

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त एनआयटी कोल्हापूर येथे 'विद्युत सुरक्षा' विषयावर कार्यशाळा कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह २०२६ निमित्त एनआयटी,…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग व…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास कोल्हापूर/प्रतिनिधी : अल्पवयीन विद्यार्थिंनीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करत फूस…

Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समवेत आत्मक्लेश आंदोलन करणार -डॉ. युवराज येडूरे यांची माहिती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समवेत आत्मक्लेश आंदोलन करणार -डॉ. युवराज येडूरे यांची माहिती कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हयातील तमाम शेतकरी परिवाराची आर्थिक सह सर्वागीण प्रगतीसाठी मोलाचे योगदान देत असलेल्या गोकुळची निवडणुक पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या बदनामी संदर्भात शेतकरी बंधू भगिनींसह आपण येत्या बुधवारी ८ जुलै रोजी आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ . युवराज येडुरे यांनी.पत्रकार परिषदेत सांगितले . यावेळी त्यांनी मांडलेली भूमिका अशी – लहानपणापासून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती आणि पशुपालनावर होत आहे. घरच्या जनावरांच्या दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आमचा संसार चालला. त्याच दुधाच्या पैशातून माझे प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण आणि आयुष्याची वाटचाल घडली. माझ्यासारख्या असंख्य सामान्य शेतकरी कुटुंबांना गोकुळने आधार दिला आहे. दर दहा दिवसांनी मिळणाऱ्या दुधाच्या बिलावर लाखो कुटुंबांचे घर चालले, मुलांचे शिक्षण झाले, मुलींची लग्ने झाली आणि अनेकांची स्वप्ने पूर्ण झाली. ग्रामीण भागातील अनेकांनी सकाळ-संध्याकाळ जनावरे सांभाळत शिक्षण घेत आहेत. आज तोच ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून शहरात नोकरी किंवा व्यवसायासाठी जातो आणि आपल्या दैनंदिन गरजेसाठी गोकुळचेच दूध विकत घेतो. कारण त्याला माहीत असते की, हेच दूध त्याच्या आई-वडिलांनी, भावंडांनी किंवा गावातील शेतकऱ्यांनी संघाला दिलेले आहे.म्हणूनच गोकुळ हा आमच्यासाठी केवळ एक ब्रँड नाही, तर भावना, विश्वास आणि अस्मिता आहे. गोकुळ ही कोल्हापूरच्या सहकार चळवळीची ओळख असून लाखो दूध उत्पादकांच्या कष्टांचे प्रतीक आहे.गोकुळचे संस्थापक स्वर्गीय एन. टी. सरनाईक, गोकुळच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे आनंदराव पाटील चुयेकर साहेब तसेच आजपर्यंत गोकुळच्या उभारणीत योगदान देणारे सर्व माजी व विद्यमान संचालक, अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक, वितरक आणि ग्राहक यांच्याप्रती मी एक दूध उत्पादक म्हणून मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.आमची इच्छा एकच आहे—गोकुळ आणखी मोठे व्हावे. देशातील आणि जगातील नामांकित दुग्धसंघांच्या बरोबरीने गोकुळची उत्पादने प्रत्येक राज्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचावीत. गोकुळ हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक सक्षम ब्रँड बनावा, हे प्रत्येक दूध उत्पादकाचे स्वप्न आहे. परंतु अलीकडच्या काळात गोकुळ दूध संघाभोवती सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, राजकीय संघर्ष, बदनामीची मोहीम आणि स्वार्थी राजकारण यामुळे संघाची प्रतिमा मलिन होत आहे. याचा सर्वाधिक फटका कोणाला बसतो, तर तो लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना. गोकुळ ही कोणत्याही एका व्यक्तीची किंवा राजकीय गटाची मालमत्ता नाही. ही लाखो दूध उत्पादकांची सामूहिक संपत्ती आहे. अल्पभूधारक, भूमिहीन, लहान शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा हा कणा आहे. त्यामुळे या संस्थेची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि स्वायत्तता कायम राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. याच पार्श्वभूमीवर, मी एक सामान्य दूध उत्पादक, सभासद आणि या संस्थेचा हितचिंतक म्हणून गोकुळच्या अस्तित्वाचे, प्रतिष्ठेचे आणि हिताचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे असे डॉ . युवराज येडुरे यावेळी म्हणाले. हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा संघटनेविरोधात नाही. हे आंदोलन केवळ गोकुळच्या हितासाठी, दूध उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि सहकाराची ही महान परंपरा जपण्यासाठी आहे.मी सर्व दूध उत्पादक, ग्राहक, सहकारप्रेमी आणि जनतेला विनम्र आवाहन करतो की, गोकुळला राजकारणापलीकडे जाऊन सहकाराच्या दृष्टीने पाहावे आणि या संस्थेची प्रतिष्ठा जपण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी. या विचाराला पाठींबा देण्यासाठी गोकुळ वर प्रेम करणाऱ्या दूध उत्पादक, दूध संस्था प्रतिनिधी, वाहतूकदार, वितरक, ग्राहक कर्मचारी यांच्या सह संस्था आणि संघटनांनी आपला सहभाग बुधवार दिनांक ८ जुलै रोजी गोकुळ शिरगांव येथे दिवसभर आत्मक्लेश आंदोलनात सहभागी व्हावे असे आहवान ही डॉ.येडुरे यांनी केले आहे.

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

हॅप्पी मेडिकर थेरपी सेंटर, कोल्हापूरतर्फे गरजू विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांचा वारसा मोदी सरकारने पुढे नेला; राष्ट्रहितासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सज्ज व्हावे – किरीट सोमय्या

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा आयआयएम तिरुचिरापल्ली येथे डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम संपन्न

माय मराठी

गोकुळ निवडणूकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी ९१ व्या दिवशी याचिका दाखल करणार ​

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला ‘एक्सलंट’ श्रेणी

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समवेत आत्मक्लेश आंदोलन करणार -डॉ. युवराज येडूरे यांची माहिती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समवेत आत्मक्लेश आंदोलन करणार -डॉ. युवराज येडूरे यांची माहिती कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हयातील तमाम शेतकरी परिवाराची आर्थिक सह सर्वागीण प्रगतीसाठी मोलाचे योगदान देत असलेल्या गोकुळची निवडणुक पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या बदनामी संदर्भात शेतकरी बंधू भगिनींसह आपण येत्या बुधवारी ८ जुलै रोजी आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ . युवराज येडुरे यांनी.पत्रकार परिषदेत सांगितले . यावेळी त्यांनी मांडलेली भूमिका अशी – लहानपणापासून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती आणि पशुपालनावर होत आहे. घरच्या जनावरांच्या दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आमचा संसार चालला. त्याच दुधाच्या पैशातून माझे प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण आणि आयुष्याची वाटचाल घडली. माझ्यासारख्या असंख्य सामान्य शेतकरी कुटुंबांना गोकुळने आधार दिला आहे. दर दहा दिवसांनी मिळणाऱ्या दुधाच्या बिलावर लाखो कुटुंबांचे घर चालले, मुलांचे शिक्षण झाले, मुलींची लग्ने झाली आणि अनेकांची स्वप्ने पूर्ण झाली. ग्रामीण भागातील अनेकांनी सकाळ-संध्याकाळ जनावरे सांभाळत शिक्षण घेत आहेत. आज तोच ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून शहरात नोकरी किंवा व्यवसायासाठी जातो आणि आपल्या दैनंदिन गरजेसाठी गोकुळचेच दूध विकत घेतो. कारण त्याला माहीत असते की, हेच दूध त्याच्या आई-वडिलांनी, भावंडांनी किंवा गावातील शेतकऱ्यांनी संघाला दिलेले आहे.म्हणूनच गोकुळ हा आमच्यासाठी केवळ एक ब्रँड नाही, तर भावना, विश्वास आणि अस्मिता आहे. गोकुळ ही कोल्हापूरच्या सहकार चळवळीची ओळख असून लाखो दूध उत्पादकांच्या कष्टांचे प्रतीक आहे.गोकुळचे संस्थापक स्वर्गीय एन. टी. सरनाईक, गोकुळच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे आनंदराव पाटील चुयेकर साहेब तसेच आजपर्यंत गोकुळच्या उभारणीत योगदान देणारे सर्व माजी व विद्यमान संचालक, अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक, वितरक आणि ग्राहक यांच्याप्रती मी एक दूध उत्पादक म्हणून मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.आमची इच्छा एकच आहे—गोकुळ आणखी मोठे व्हावे. देशातील आणि जगातील नामांकित दुग्धसंघांच्या बरोबरीने गोकुळची उत्पादने प्रत्येक राज्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचावीत. गोकुळ हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक सक्षम ब्रँड बनावा, हे प्रत्येक दूध उत्पादकाचे स्वप्न आहे. परंतु अलीकडच्या काळात गोकुळ दूध संघाभोवती सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, राजकीय संघर्ष, बदनामीची मोहीम आणि स्वार्थी राजकारण यामुळे संघाची प्रतिमा मलिन होत आहे. याचा सर्वाधिक फटका कोणाला बसतो, तर तो लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना. गोकुळ ही कोणत्याही एका व्यक्तीची किंवा राजकीय गटाची मालमत्ता नाही. ही लाखो दूध उत्पादकांची सामूहिक संपत्ती आहे. अल्पभूधारक, भूमिहीन, लहान शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा हा कणा आहे. त्यामुळे या संस्थेची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि स्वायत्तता कायम राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. याच पार्श्वभूमीवर, मी एक सामान्य दूध उत्पादक, सभासद आणि या संस्थेचा हितचिंतक म्हणून गोकुळच्या अस्तित्वाचे, प्रतिष्ठेचे आणि हिताचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे असे डॉ . युवराज येडुरे यावेळी म्हणाले. हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा संघटनेविरोधात नाही. हे आंदोलन केवळ गोकुळच्या हितासाठी, दूध उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि सहकाराची ही महान परंपरा जपण्यासाठी आहे.मी सर्व दूध उत्पादक, ग्राहक, सहकारप्रेमी आणि जनतेला विनम्र आवाहन करतो की, गोकुळला राजकारणापलीकडे जाऊन सहकाराच्या दृष्टीने पाहावे आणि या संस्थेची प्रतिष्ठा जपण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी. या विचाराला पाठींबा देण्यासाठी गोकुळ वर प्रेम करणाऱ्या दूध उत्पादक, दूध संस्था प्रतिनिधी, वाहतूकदार, वितरक, ग्राहक कर्मचारी यांच्या सह संस्था आणि संघटनांनी आपला सहभाग बुधवार दिनांक ८ जुलै रोजी गोकुळ शिरगांव येथे दिवसभर आत्मक्लेश आंदोलनात सहभागी व्हावे असे आहवान ही डॉ.येडुरे यांनी केले आहे.

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

हॅप्पी मेडिकर थेरपी सेंटर, कोल्हापूरतर्फे गरजू विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आरोग्यवर्धिनी समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवांवर थेट देखरेख — आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आरोग्यवर्धिनी समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवांवर थेट देखरेख — आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्ह्यात “एकात्मिक आरोग्यवर्धिनी…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पशुवैद्यकीय महाविद्यालय कणेरी, कोल्हापूर येथे स्थापनेसाठी केंद्र सरकारची मंजूरी

पशुवैद्यकीय महाविद्यालय कणेरी, कोल्हापूर येथे स्थापनेसाठी केंद्र सरकारची मंजूरी कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय पशु चिकीत्सा परिषद (VCI)) आणि केंद्र सरकारच्या मंत्स्यपालन,…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे ४० दिवसात दूध विक्रीत सुमारे एक ते दीड लाख लिटरची वाढ

‘गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे ४० दिवसात दूध विक्रीत सुमारे एक ते…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान पुणे/प्रतिनिधी : संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान पुणे/प्रतिनिधी : संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती…

माय मराठी

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्र सुरु

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्र सुरु   कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त एनआयटी कोल्हापूर येथे ‘विद्युत सुरक्षा’ विषयावर कार्यशाळा

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त एनआयटी कोल्हापूर येथे ‘विद्युत सुरक्षा’ विषयावर कार्यशाळा कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह २०२६ निमित्त एनआयटी,…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग व…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास कोल्हापूर/प्रतिनिधी : अल्पवयीन विद्यार्थिंनीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करत फूस…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती २३०० हून अधिक जागांची वाढ…

मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आरोग्यवर्धिनी समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवांवर थेट देखरेख — आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आरोग्यवर्धिनी समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवांवर थेट देखरेख — आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्ह्यात “एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती”ची पहिली बैठक संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य सेवा अधिक परिणामकारक व लोकाभिमुख करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या राधानगरी- भुदरगड- आजरा विधानसभा मतदारसंघाची तिमाही आढावा बैठक सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री, कोल्हापूर नामदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीमध्ये राधानगरी, भुदरगड आणि आजरा तालुक्यातील आयुष्मान आरोग्य मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि इतर आरोग्य संस्थांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मनुष्यबळाची उपलब्धता, रिक्त पदे, औषधसाठा, वैद्यकीय उपकरणे, प्रयोगशाळा सुविधा, १०८ रुग्णवाहिका सेवा, रेफरल व्यवस्था, पायाभूत सुविधा तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, “आपला दवाखाना” तसेच इतर सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस, अतिसार यांसारख्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावाही घेण्यात आला.सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आरोग्य सेवा ही शासनाची सर्वात महत्त्वाची लोककल्याणकारी सेवा असून प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सेवा मिळणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. शासनाच्या सर्व आरोग्य योजनांची माहिती गावागावातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात यावी. कोणताही पात्र लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी आणि आरोग्य विभाग यांनी समन्वयाने काम करावे.
एमजेपीजेएवाय योजनेचे काम प्रभावीपणे राबवावे, शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूतींची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, कॅन्सरवरील तपासणीकरिता शिबिरांचे आयोजन करावे असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.
जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती आणि सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील आरोग्यविषयक प्रश्न प्रभावीपणे मांडून शासनाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यासाठी पुढाकार घ्यावा. बैठकीत लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांनुसार संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करावा,
जिल्ह्यात स्मार्ट पीएचसी अंतर्गत करण्यात आलेल्या कामांचे संकलन करून अहवाल देण्याचे निर्देश त्यांनी दिले. ग्राम पातळी तसेच इतर सर्व समिती यांचे कामकाज प्रभावीपणे करावे. हा उपक्रम आम्ही सर्वत्र महाराष्ट्रभर राबवत असून १ ऑगस्ट रोजी मा. मुख्यमंत्री महोदय यांचे समवेत याचा भव्य शुभारंभ देखील आम्ही करता आहोत. आरोग्य मंत्री म्हणून मी स्वतः या कमिट्यांच्या ग्राम पातली ते उपकेंद्र, पीएचसी, आरएच, एसएचडी पाहणी व भेटी देणार असून यामध्ये आरोग्य सेवा सर्व योजनांचा लाभ ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना सुलभ पद्धतीने मिळाव्यात हाच यामागील उद्देश आहे. मा. स्थानिक आमदार महोदय यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या समितींच्या बैठका दर तीन महिन्यांनी घ्याव्यात. त्याचा अहवाल पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखालील समितीसमोर आढावा होईल. त्यानंतर स्वतः आरोग्य मंत्री म्हणून मी सचिव, आयुक्त, संचालक यांचे स्तरावर बैठक होणार असून सुचविण्यात आलेल्या सर्व प्रस्ताव/ सूचना यावर कार्यवाही होणार आहे. त्यामुळे सर्वांनी अत्यंत सक्रियपणे कामकाज करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. तसेच सुरु असलेल्या सर्व आरोग्य संस्थांच्या बांधकामाबाबत देखील आढावा घेण्यात यावा.
आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे लवकर निदान व्हावे यासाठी विशेष तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना तसेच इतर आरोग्य विमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना विनाअडथळा उपचाराचा लाभ मिळेल याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक रुग्णाला सन्मानाने, संवेदनशीलतेने आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देणे हे आरोग्य विभागाचे सर्वोच्च कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवाभावी वृत्तीने काम करून नागरिकांच्या तक्रारींना वाव राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता, औषधांची उपलब्धता, वेळेवर उपचार, रुग्णांशी सुसंवाद आणि पारदर्शक सेवा यावर विशेष भर द्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी आपल्या क्षेत्रातील विविध आरोग्यविषयक समस्या, इ संजीवनी, टेली मेडिसिन,पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि आरोग्य सेवांबाबत सूचना मांडल्या. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. बैठकीतील निर्णयांची कालबद्ध अंमलबजावणी करून त्याचा सविस्तर अनुपालन अहवाल पुढील तिमाही बैठकीत सादर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेली “एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती”ची ही बैठक आरोग्य सेवा अधिक सक्षम, लोकाभिमुख, उत्तरदायी आणि परिणामकारक करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
बैठकीच्या प्रारंभी तालुका आरोग्य अधिकारी, राधानगरी डॉ. शेटे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख, उत्तरदायी आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने “एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती” स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या समितीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्यविषयक प्रश्नांचे जलद निराकरण होण्यास मदत होईल. कोल्हापूर जिल्ह्यातील ही पहिली बैठक असून आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले.बैठकीस या सभेस जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समिती सभापती सौ सारिका नांदेकर, राधानगरी भुदरगड आजरा पंचायत समिती सभापती सर्व, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तसेच तहसीलदार,गटविकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा शल्य चिकित्सक,ग्रामीण रुग्णालय अधीक्षक,सर्व तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.समितीचे सदस्य, राज्यस्तरीय वरिष्ठ अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, विविध विभागांचे अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. आजरा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी उपस्थित यांचे आभार मानले..

पशुवैद्यकीय महाविद्यालय कणेरी, कोल्हापूर येथे स्थापनेसाठी केंद्र सरकारची मंजूरी

पशुवैद्यकीय महाविद्यालय कणेरी, कोल्हापूर येथे स्थापनेसाठी केंद्र सरकारची मंजूरी

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय पशु चिकीत्सा परिषद (VCI)) आणि केंद्र सरकारच्या मंत्स्यपालन, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय, मंत्रालयाचा पक्षू संवर्धन विभागाच्या अंतर्गत श्री सिद्धगिरी संस्थान मठ कणेरी, कोल्हापूर यांना नुकतीच पशुवैद्यकीय महाविद्यालय २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून अधिकृत परवानगी मिळाली आहे.
केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार राज्यात प्रथमच खाजगी तत्वावरील पशुवैद्यकीय महाविद्यालय चालवली जाणार आहेत. एकूण ५ खाजगी तत्वावरील पशुवैद्यकीय महाविद्यालायापैकी एक पशुवैद्यकीय महाविद्यालय कणेरी, कोल्हापूर येथे केंद्र सरकारच्या मंत्स्यपालन, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्रालय विभागाच्या दिनांक २५ जून २०२६ च्या आदेशान्वये (Letter of Permission) मंजूर करण्यात आलेले आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव, गोवा या भागातील विद्यार्थ्यांना ‘पशु वैद्यक’ बनण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.
सदर पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये एकूण ८० प्रवेश क्षमता असून नीट परीक्षेमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याना गुणवतेनुसार प्रवेश देण्यात येईल. एकूण प्रवेश क्षमतेच्या पैकी ४० जागा व्यवस्थापन वर्गवारीत असतील. सदर पशूवैद्यकीय अभ्यास क्रमाचा कालावधी साडेपाच वर्षाचा राहील. श्री सिद्धगिरी संस्थान मठ कणेरी, कोल्हापूर येथे पशुवैद्यकीय शिक्षणासाठी अनुकूल वातावरण आहे. १२०० संख्येच्या वर असलेली प्रशस्त देशी प्रजातीमधील गोशाळा, जनावरांचे वंधत्व निवारण केंद्र, श्वान संगोपन केंद्र, अश्वशाळा, वराहपालन, कुकुटपालन, महाविद्यालयाची भव्य आकर्षक इमारत, सुसज्ज प्रयोग शाळा, प्रशस्त गोठे, जनावरांचे अद्यावत पशु चिकित्सालय, तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग, इत्यादि या महाविद्यालयाची ठळक वैशिष्ठे आहेत. पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजुरीसाठी मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा, मंत्री. पशु संवर्धन मंत्रालय महाराष्ट्र सरकार, भारतीय पशु चिकित्सा परिषद (VCI) आणि मंत्स्यपालन, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्रालय, भारत सरकार, महाराष्ट्र पशु व मंत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांचे पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे. प. पू, अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रेरनेतून व मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय महाविद्यालय पुढील महिन्यात २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून सुरु होत आहे.

गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे ४० दिवसात दूध विक्रीत सुमारे एक ते दीड लाख लिटरची वाढ

गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे ४० दिवसात दूध विक्रीत सुमारे एक ते दीड लाख लिटरची वाढ

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थांना ग्राहकांकडून दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून, त्याचा सकारात्मक परिणाम दूध विक्रीवर होत आहे. सध्या गोकुळकडून पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सांगली तसेच कोकण विभागात दररोज सुमारे १६ ते १६.५० लाख लिटर दूध विक्री होत आहे. गेल्या सुमारे ४० दिवसांत दैनिक दूध विक्रीत सुमारे एक ते दीड लाख लिटरची वाढ झाली असून, ग्राहकांचा वाढता विश्वास हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे दिसून येत आहे.
गुणवत्ता म्हणजेच गोकुळ, अशी ओळख ग्राहकांच्या मनात निर्माण झाली आहे. दूध संकलनापासून प्रक्रिया, पॅकिंग आणि ग्राहकांपर्यंत वितरणाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता व शुद्धतेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. त्यामुळे गोकुळचे दूध तसेच तूप, लोणी, पनीर, दही, ताक, श्रीखंड, चीज, बासुंदी, गुलाबजाम, आईस्क्रीम आदी दुग्धजन्य पदार्थांना बाजारपेठेत सातत्याने चांगली मागणी आहे.
गोकुळचे मार्केटिंग विभागाचे व्यवस्थापक हणमंत पाटील म्हणाले, “गुणवत्ता हीच गोकुळची सर्वात मोठी ताकद आहे. ग्राहकांना शुद्ध, सुरक्षित आणि दर्जेदार दूध व दुग्धजन्य उत्पादने योग्य दरात उपलब्ध करून देण्यावर आमचा कायम भर असतो. दूध उत्पादकांनी विश्वासाने पुरविलेल्या दर्जेदार दुधावर अत्याधुनिक पद्धतीने प्रक्रिया करून त्याची गुणवत्ता व शुद्धता कायम ठेवत सातत्यपूर्ण सेवेद्वारे ते ग्राहकांपर्यंत पोहोचविले जाते. त्यामुळे ग्राहकांचा गोकुळवरील विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. याच विश्वासामुळे गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी सातत्याने वाढत असून, भविष्यातही गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करता ग्राहकांना सर्वोत्तम उत्पादने देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
दूध उत्पादकांचा विश्वास, कर्मचारी, वितरक, केंद्र चालक, वाहतूकदार व हितचिंतक यांचे मोलाचे सहकार्य आणि ग्राहकांची पसंती यामुळे गोकुळच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. गुणवत्ता हीच खरी ओळख जपत अधिकाधिक ग्राहकांपर्यंत गोकुळची उत्पादने पोहोचविण्याचे काम पुढेही अधिक वेगाने सुरू राहणार आहे.

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

पुणे/प्रतिनिधी : संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे. हा पुरस्कार मेडीजैन कम्युनिटीच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. वैद्यकीय सेवेच्या पलीकडे जाऊन समाजावर अर्थपूर्ण व दीर्घकालीन प्रभाव निर्माण करणाऱ्या डॉक्टरांचा गौरव करण्यासाठी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.नुकतेच झालेल्या राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त याअंतर्गत पहिल्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत पहिला पुरस्कार फिजिशियन डॉ. कल्याण मोतीलालजी गंगवाल यांना प्रदान करण्यात आला. डॉ.कल्याण गंगवाल हे प्रतिष्ठित वैद्यकीय तज्ञ असून कॅरियम हॉस्पिटल, पुना हॉस्पिटल आणि ससून हॉस्पिटल यांसारख्या नामांकित संस्थांशी त्यांची कारकीर्द जोडलेली आहे.
या पुरस्कार सोहळ्याला दर्शन आय केअर सेंटरचे संस्थापक व वरिष्ठ नेत्रशल्यचिकित्सक आणि मेडिजैनचे आश्रयदाता डॉ.जिग्नेश तसवाला, संचेती ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स चे अध्यक्ष डॉ. पराग के.संचेती, मेडिजैनचे आश्रयदाता व फॅमिली फिजिशियन डॉ.पराग जैन, मानद अध्यक्ष आणि कॉस्मेटोलॉजिस्ट व त्वचारोगतज्ञ डॉ.ज्योती संघवी, मानद सचिव व फॅमिली फिजिशियन डॉ.सोनल पालरेचा, मानद खजिनदार व वरिष्ठ दंतचिकित्सक आणि कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ.आरती भटेवरा आणि संचेती हॉस्पिटलच्या होम हेल्थकेअर व संपर्क विभागाच्या संचालिका रूपल संचेती,अर्चना संचेती, संचेती ॲडव्हान्स्ड आर्थोकेअर हॉस्पिटलचे प्रमुख यशवंत शिवण्णा तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्ती आदी मान्यवर उपस्थित होते.
संचेती ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स चे अध्यक्ष डॉ. पराग के.संचेती म्हणाले की,माझ्या वडिलांनी संचेती हॉस्पिटलची स्थापना हीरुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या एका साध्या पण मोलाच्या विचारावर केली. त्यांनी आम्हाला नेहमीच हे शिकवले की, डॉक्टरांचे कर्तव्य हे केवळ रुग्णालयाच्या दारापर्यंत मर्यादित नसते.आजही ते रूग्णालयात येतात तेव्हा त्यांचे मोलाचे मार्गदर्शन सर्वांना करत असतात. ज्यांचे कार्य केवळ उपचारांपुरते मर्यादित नसून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणारे आहे, अशा डॉक्टरांचा डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराने गौरव केला जातो. डॉ. कल्याण गंगवाल यांनी आपल्या कार्यातून उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. या पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून डॉ. कल्याण गंगवाल हे योग्य व्यक्ती आहेत,असा आमचा ठाम विश्वास आहे.
यावेळी मेडीजैनच्या अध्यक्ष डॉ. ज्योती संघवी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. वैद्यकीय सेवेच्या पलीकडे जाऊन समाजावर सकारात्मक प्रभाव निर्माण करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांचा सन्मान होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची सुरूवात करून, समाजसेवा, करुणा आणि समर्पणातून वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण समाजाला प्रेरणा देणाऱ्या डॉक्टरांचा गौरव करण्याची प्रेरणादायी परंपरा निर्माण करण्याचा संचेती हॉस्पिटलचा उद्देश आहे.उत्कृष्ट वैद्यकीय सेवेसोबतच डॉ. गंगवाल यांनी अनेक दशकांपासून शाकाहार, अहिंसा, प्राणी कल्याण, व्यसनमुक्ती जनजागृती आणि निरोगी जीवनशैली या मूल्यांचा प्रसार केला आहे.सार्वजनिक व्याख्याने, पुस्तके, प्रदर्शने आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी असंख्य लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडला असून समाजसेवेप्रती असलेल्या त्यांच्या आजीवन बांधिलकीमुळे ते आजही समाजाला प्रेरणा देत आहेत.
प्रत्येक संस्थेची एक कहाणी असते. पद्मविभूषण डॉ.के.एच.संचेती यांच्या अथक कार्यातून संचेती हॉस्पिटलची कहाणी सुरू झाली. अस्थिरोग शास्त्रातील उत्कृष्ट सेवा, वैद्यकीय शिक्षण आणि करुणामय आरोग्यसेवा याबाबत त्यांच्या अविरत योगदानामुळे भारतातील अत्यंत प्रतिष्ठित अस्थिरोग उपचार संस्थांपैकी एक अशी या संस्थेची ओळख निर्माण झाली.अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक सन्मानांनी गौरविलेला त्यांचा प्रेरणादायी प्रवास आरोग्यसेवा क्षेत्रातील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे. आजही तरूणांशी संवाद साधत ते नवीन पिढीला प्रेरणा देत आहेत.

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

पुणे/प्रतिनिधी : संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे. हा पुरस्कार मेडीजैन कम्युनिटीच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. वैद्यकीय सेवेच्या पलीकडे जाऊन समाजावर अर्थपूर्ण व दीर्घकालीन प्रभाव निर्माण करणाऱ्या डॉक्टरांचा गौरव करण्यासाठी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.नुकतेच झालेल्या राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त याअंतर्गत पहिल्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत पहिला पुरस्कार फिजिशियन डॉ. कल्याण मोतीलालजी गंगवाल यांना प्रदान करण्यात आला. डॉ.कल्याण गंगवाल हे प्रतिष्ठित वैद्यकीय तज्ञ असून कॅरियम हॉस्पिटल, पुना हॉस्पिटल आणि ससून हॉस्पिटल यांसारख्या नामांकित संस्थांशी त्यांची कारकीर्द जोडलेली आहे.
या पुरस्कार सोहळ्याला दर्शन आय केअर सेंटरचे संस्थापक व वरिष्ठ नेत्रशल्यचिकित्सक आणि मेडिजैनचे आश्रयदाता डॉ.जिग्नेश तसवाला, संचेती ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स चे अध्यक्ष डॉ. पराग के.संचेती, मेडिजैनचे आश्रयदाता व फॅमिली फिजिशियन डॉ.पराग जैन, मानद अध्यक्ष आणि कॉस्मेटोलॉजिस्ट व त्वचारोगतज्ञ डॉ.ज्योती संघवी, मानद सचिव व फॅमिली फिजिशियन डॉ.सोनल पालरेचा, मानद खजिनदार व वरिष्ठ दंतचिकित्सक आणि कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ.आरती भटेवरा आणि संचेती हॉस्पिटलच्या होम हेल्थकेअर व संपर्क विभागाच्या संचालिका रूपल संचेती,अर्चना संचेती, संचेती ॲडव्हान्स्ड आर्थोकेअर हॉस्पिटलचे प्रमुख यशवंत शिवण्णा तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्ती आदी मान्यवर उपस्थित होते.
संचेती ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स चे अध्यक्ष डॉ. पराग के.संचेती म्हणाले की,माझ्या वडिलांनी संचेती हॉस्पिटलची स्थापना हीरुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या एका साध्या पण मोलाच्या विचारावर केली. त्यांनी आम्हाला नेहमीच हे शिकवले की, डॉक्टरांचे कर्तव्य हे केवळ रुग्णालयाच्या दारापर्यंत मर्यादित नसते.आजही ते रूग्णालयात येतात तेव्हा त्यांचे मोलाचे मार्गदर्शन सर्वांना करत असतात. ज्यांचे कार्य केवळ उपचारांपुरते मर्यादित नसून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणारे आहे, अशा डॉक्टरांचा डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराने गौरव केला जातो. डॉ. कल्याण गंगवाल यांनी आपल्या कार्यातून उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. या पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून डॉ. कल्याण गंगवाल हे योग्य व्यक्ती आहेत,असा आमचा ठाम विश्वास आहे.
यावेळी मेडीजैनच्या अध्यक्ष डॉ. ज्योती संघवी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. वैद्यकीय सेवेच्या पलीकडे जाऊन समाजावर सकारात्मक प्रभाव निर्माण करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांचा सन्मान होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची सुरूवात करून, समाजसेवा, करुणा आणि समर्पणातून वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण समाजाला प्रेरणा देणाऱ्या डॉक्टरांचा गौरव करण्याची प्रेरणादायी परंपरा निर्माण करण्याचा संचेती हॉस्पिटलचा उद्देश आहे.उत्कृष्ट वैद्यकीय सेवेसोबतच डॉ. गंगवाल यांनी अनेक दशकांपासून शाकाहार, अहिंसा, प्राणी कल्याण, व्यसनमुक्ती जनजागृती आणि निरोगी जीवनशैली या मूल्यांचा प्रसार केला आहे.सार्वजनिक व्याख्याने, पुस्तके, प्रदर्शने आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी असंख्य लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडला असून समाजसेवेप्रती असलेल्या त्यांच्या आजीवन बांधिलकीमुळे ते आजही समाजाला प्रेरणा देत आहेत.
प्रत्येक संस्थेची एक कहाणी असते. पद्मविभूषण डॉ.के.एच.संचेती यांच्या अथक कार्यातून संचेती हॉस्पिटलची कहाणी सुरू झाली. अस्थिरोग शास्त्रातील उत्कृष्ट सेवा, वैद्यकीय शिक्षण आणि करुणामय आरोग्यसेवा याबाबत त्यांच्या अविरत योगदानामुळे भारतातील अत्यंत प्रतिष्ठित अस्थिरोग उपचार संस्थांपैकी एक अशी या संस्थेची ओळख निर्माण झाली.अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक सन्मानांनी गौरविलेला त्यांचा प्रेरणादायी प्रवास आरोग्यसेवा क्षेत्रातील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे. आजही तरूणांशी संवाद साधत ते नवीन पिढीला प्रेरणा देत आहेत.

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्र सुरु

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्र सुरु

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उचगाव येथील न्यू कॉलेज ऑफ फार्मसी व शिवाजी पेठ येथील न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डिप्लोमा इन फार्मसी प्रवेश प्रक्रियेसाठी अधिकृत सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन ऑनलाईन अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, तसेच प्रवेश संदर्भातील सर्व मदत विद्यार्थ्यांना केली जाणार आहे. ही सुविधा पूर्णपणे निःशुल्क असून प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी उपलब्ध आहे. सोबत प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे मिळविण्यासाठी देखील मार्गदर्शन व मदत उपलब्ध केलेली आहे.
डिप्लोमा इन फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत आहे. विद्यार्थ्यांच्या अर्ज, कागदपत्रे पडताळणी व पुष्टीकरणाची प्रक्रियाही अधिकृत सुविधा केंद्रावर केली जाणार आहे. दि. १७ जुलै रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी व १८ ते २० जुलै पर्यंत हरकती नोंदवणे व २१ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे.प्रवेश प्रक्रियेबाबत तांत्रिक अडचणी, प्रवेश फेऱ्यांबाबत सर्व माहिती मार्गदर्शन येथे केले जाणार आहे.
प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, योग्य मार्गदर्शन व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी सहज उपलब्ध होणे हा सुविधा केंद्राचा मुख्य उद्देश आहे. डी फार्मसी प्रवेशासाठी प्रवेशइच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील, विकास अधिकारी डॉ. संजय दाभोळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र कुंभार यांनी केले आहे.

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त एनआयटी कोल्हापूर येथे ‘विद्युत सुरक्षा’ विषयावर कार्यशाळा

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त एनआयटी कोल्हापूर येथे ‘विद्युत सुरक्षा’ विषयावर कार्यशाळा

कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह २०२६ निमित्त एनआयटी, कोल्हापूरच्या इलेक्ट्रिकल विभागात विद्यार्थ्यांसाठी “विद्युत सुरक्षा” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत महावितरण, हुपरी उपविभागाचे डेप्युटी एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर श्री. रोहित कुलकर्णी यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षिततेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत श्री. कुलकर्णी यांनी प्रत्येक भारतीय नागरिकाला विजेच्या सुरक्षित वापराबाबत मूलभूत ज्ञान असणे आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांकडून विद्युत सुरक्षा शपथ घेण्यात आली तसेच महावितरणतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेले माहितीपत्रक व सादरीकरण समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी कोल्हापूर व परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजेचा शॉक लागून घडलेल्या दुर्दैवी घटनांचा आढावा घेण्यात आला. अशा घटना घडण्यामागील कारणे, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच विजेचा शॉक लागल्यानंतर तातडीने द्यावयाचे प्राथमिक उपचार याविषयी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती देण्यात आली.
औद्योगिक तसेच घरगुती विद्युत वायरिंग, मीटर तपासणी, अर्थिंग यांची नियमित तपासणी करून घेण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. याशिवाय वीज चोरी, वीज गळती, शॉर्टसर्किट टाळण्यासाठी आवश्यक काळजी, तसेच ऊर्जा बचतीच्या विविध उपाययोजनांची माहितीही देण्यात आली.महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांमधील पदविका व पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या विविध सौरऊर्जा योजनांची माहिती देऊन सौरऊर्जा उपकरणांचे उत्पादन, वितरण आणि उद्योजकतेच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यात आले.
ही कार्यशाळा महावितरण व एनआयटी, कोल्हापूर यांच्यातील शैक्षणिक करारांतर्गत आयोजित करण्यात आली. यावेळी महावितरणचे सहाय्यक अभियंता प्रकाश काकडे सहाय्यक अभियंता संदीप काकडे आणि सहाय्यक अभियंता सचिन दळवी (उंचगाव, हुपरी उपविभाग) उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी इलेक्ट्रिकल विभागप्रमुख प्रा. बाजीराव राजिगरे यांनी तज्ज्ञांचा परिचय करून दिला. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. स्वप्निल पाटील,श्री. ओमकार खोत, श्री. दिग्विजय शिंदे आणि श्री. मयूर पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमास संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील, प्राचार्य डॉ. संजय दाभोळे तसेच अधिष्ठाता श्री. संदीप पंडे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग व डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस विभागाच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी संजय घोडावत विद्यापीठाच्या फुटबॉल मैदान परिसरात विद्यार्थी, प्राध्यापक, गार्डन विभागाचे प्रमुख तात्या देसाई आणि त्यांची टीम यांच्या सहकार्याने ३०० हून अधिक देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. भविष्यात हरित, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त परिसर घडविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी डॉ. विराट गिरी बोलताना म्हणाले, “पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संवर्धन करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आणि प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा. हीच भावी पिढीला दिलेली सर्वात मौल्यवान भेट ठरेल.”या उपक्रमाचे आयोजक प्रा. अजय कोंगे, इन्स्टिट्यूटच्या सर्व विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सागर चव्हाण, प्रा.रईसा मुल्ला, प्रा. वंदना शहा, प्रा. नितीन पाटील, प्रा. प्रशांत पाटील, प्रा. स्वप्निल थिकने, प्रा. धीरज पाटील, प्रा. रणजीत शिरोडकर, प्रा. प्रतीक आवटी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
पर्यावरण संरक्षण, सामाजिक उत्तरदायित्व आणि हरित भारताच्या निर्मितीसाठी संजय घोडावत इन्स्टिट्यूटने राबविलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणारा आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. या सामाजिक उपक्रमास संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

कोल्हापूर/प्रतिनिधी : अल्पवयीन विद्यार्थिंनीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करत फूस लावून अपहरण केल्याप्रकरणी
विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश
ए.एस.आय.पेरमपल्ली यांनी आरोपी विशाल मारुती कांबळे (वय २४.रा.मळगे ब्रु.ता.कागल) याला ७ वर्षे सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
दि.२९ मार्च २०२२ रोजी कागल तालुक्यातील मळगे ब्रु.येथील विद्यालयात जात असताना आरोपीने विद्यार्थिंनीचा पाठलाग केला.तिच्या वडीलांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्याशी अश्लिल वर्तन केले आणि पळवून नेल्याचा आरोप न्यायालयात सिध्द झाला.
तपासादरम्यान पीडित मुलगी व आरोपी सातारा जिल्ह्यातील भुईंज येथे आढ़ळले.मुरगूड पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले.सरकार पक्षातर्फे ॲड.एस.एस.इंगळे यांनी प्रभावी युक्तीवाद केला.
त्यांना या कामी मुरगूड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आर.ए.वाघमारे व पैरवी युवराज पाटील यांनी मदत केली.

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

२३०० हून अधिक जागांची वाढ
आठ जी. एन. एम. पदविका कॉलेजचे श्रेणीवर्धन बी. एस्सी. नर्सिंग महाविद्यालयात

पाच बी. एस्सी नर्सिंग महाविद्यालयांची क्षमता प्रत्येकी ५० वरून १००

मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातील आरोग्यसेवेला बळकट करण्यासाठी आणि तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. या ऐतिहासिक निर्णयानुसार राज्यातील नर्सिंग क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार असून, तब्बल २,३०० हून अधिक नवीन नर्सिंग जागांची वाढ होणार आहे. राज्यातील वैद्यकीय पायाभूत सुविधांना अधिक बळकट करण्यासाठी आणि आरोग्य सेवेतील प्रशिक्षित परिचारिकांची कमतरता भरून काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ७ जुलै २०२६ रोजी एक क्रांतिकारी शासन निर्णय जारी केला आहे. या अंतर्गत राज्यात १० नवीन शासकीय नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. आठ जी. एन. एम. पदविका कॉलेजेसचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे आणि पाच कार्यरत महाविद्यालयांची प्रवेश क्षमता दुप्पट केली जाणार आहे.
​वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली.
या संपूर्ण प्रकल्पासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तब्बल ५५८.७१ कोटी रुपयांच्या अनावर्ती खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.शासन निर्णयातील तीन सर्वात मोठे बदल असे आहेत.यात दहा जिल्ह्यांत होणार नवीन शासकीय बी.एस्सी. नर्सिंग कॉलेजेस- राज्यातील दुर्गम आणि महत्त्वाच्या अशा चंद्रपूर, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अलिबाग (रायगड), रत्नागिरी, अमरावती, धाराशीव, गडचिरोली, पालघर आणि अहिल्यानगर या दहा जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेची नवीन शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालये स्थापन केली जातील. या नवीन १० कॉलेजेसमुळे राज्यात थेट १,००० नवीन जागा उपलब्ध होतील.आठ ‘जी.एन.एम. पदविका’ कॉलेजचे ‘बी. एस्सी. नर्सिंग महाविद्यालया’ मध्ये रुपांतर- राज्यात सध्या सुरू असलेल्या आठ शासकीय जी. एन. एम. नर्सिंग शाळांचे श्रेणीवर्धन करून त्या ठिकाणी प्रत्येकी १०० जागांची भव्य बी. एस्सी. नर्सिंग महाविद्यालये सुरू केली जातील. यामध्ये जी. टी. रुग्णालय – मुंबई, सेंट जॉर्जेस रुग्णालय- मुंबई, धुळे, सोलापूर, अंबाजोगाई, अकोला, नागपूर आणि सांगली या शहरांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या विशेष योजनेअंतर्गत यासाठी प्रति महाविद्यालय सात कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.
पाच मोठ्या शहरांतील कॉलेजेसची क्षमता दुप्पट- मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नांदेड येथील सध्याच्या शासकीय बी. एस्सी. नर्सिंग महाविद्यालयांची विद्यार्थी प्रवेश क्षमता ५० वरून थेट १०० करण्यात आली आहे. म्हणजेच; येथे अतिरिक्त २५० जागा वाढणार आहेत. भव्य पायाभूत सुविधा आणि ५५८ कोटींचा निधी- या सर्व महाविद्यालयांमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. ‘इंडियन नर्सिंग कौन्सिल’च्या (INC) निकषांनुसार आधुनिक प्रयोगशाळा (Computer, Nutrition, Pre-Clinical Labs), सुसज्ज ग्रंथालय, मल्टिपर्पज हॉल आणि विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक वसतिगृहांचे बांधकाम केले जाईल. यासाठी शासनाने एकूण ५५८.७१ कोटी रुपयांचा निधी टप्प्याटप्प्याने खर्च करण्यास मान्यता दिली आहे.
रोजगाराची सुवर्णसंधी- नर्सिंग कॉलेजेस वाढल्यामुळे केवळ विद्यार्थ्यांनाच फायदा होणार नाही, तर मोठ्या प्रमाणावर रोजगाराची निर्मिती होणार आहे. प्रत्येक नवीन महाविद्यालयासाठी प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, ट्युटर, ग्रंथपाल यांच्यापासून ते कार्यालयीन कर्मचारी, स्वयंपाकी आणि सुरक्षा रक्षक अशा वर्ग १ ते वर्ग ४ मधील प्रत्येकी ८६ पदांच्या निर्मितीला अशा एकूण ८६० हून अधिक पदांना मंजुरी देण्यात आली आहे. ही पदे उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने कंत्राटी आणि बाह्यस्त्रोतांद्वारे भरली जातील.