Grid Posts

View All
माय मराठी

आज ३ एप्रिलला कोल्हापुरात होणार सहकार सम्राज्ञी पुरस्कार वितरण

माय मराठी

भुये (ता. करवीर) च्या मानाच्या सासनकाठी क्रमांक ४० चा पर्यावरणपूरक उपक्रम गाजला; जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

माय मराठी

देशभरातील दुर्मिळ कारागिरी ३१ मार्च ते ४ एप्रिल  सिद्धगिरी मठावर पाहायला मिळणार

महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन पंचगंगा घाटावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन शासकीय इतमामात पंचगंगा  घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार, इतिहासाचे समृद्ध पान अनंतात विलीन

माय मराठी

बिद्रीत गर्भलिंग तपासणीचा काळाबाजार; डॉक्टर-एजंट पकडले,साडे बारा लाखांसह फॉर्च्युन कार जप्त

Thumbnail

View All
My Marathi

धुरंधर द रिव्हेंज’सोबत थिएटरमध्ये येणार ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर

माय मराठी

आज ३ एप्रिलला कोल्हापुरात होणार सहकार सम्राज्ञी पुरस्कार वितरण

माय मराठी

भुये (ता. करवीर) च्या मानाच्या सासनकाठी क्रमांक ४० चा पर्यावरणपूरक उपक्रम गाजला; जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

My Marathi

दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळा पडला पार

My Marathi

जोतिबा भक्तांची श्रद्धा गायमुखावर: भक्तांच्या विधिवत पूजनाने अन्नछत्राचा मंगल प्रारंभ झाला!

My Marathi

भक्तीची पाऊलवाट आणि माणुसकीची थाप: जोतिबाच्या चैत्र यात्रेतील बैलगाड्यांची परंपरा

Tile List

View All
माय मराठी

देशभरातील दुर्मिळ कारागिरी ३१ मार्च ते ४ एप्रिल  सिद्धगिरी मठावर पाहायला मिळणार

देशभरातील दुर्मिळ कारागिरी ३१ मार्च ते ४ एप्रिल  सिद्धगिरी मठावर पाहायला मिळणार देशभरातील कारागिरांचा महाकुंभ पाच दिवस चालणार कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री सिध्दगिरी संस्थान मठ कणेरी,…

महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन पंचगंगा घाटावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन शासकीय इतमामात पंचगंगा  घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार, इतिहासाचे समृद्ध पान अनंतात विलीन

माय मराठी

बिद्रीत गर्भलिंग तपासणीचा काळाबाजार; डॉक्टर-एजंट पकडले,साडे बारा लाखांसह फॉर्च्युन कार जप्त

Tile Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

घोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यश

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

संघटन सृजन अभियाना अंतर्गत काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात १३ एप्रिल ते १८ एप्रिल कालावधीत आढावा बैठका होणार

संघटन सृजन अभियाना अंतर्गत काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात १३ एप्रिल ते १८ एप्रिल कालावधीत आढावा बैठका होणार नवीन पदाधिकारी नेमणुकी संदर्भात काँग्रेस…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

सतेज पाटील यांचा उद्याचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा होणार,कार्यकर्त्यांकडून दहा लाख वह्या संकलनाचे उदिष्ट्य

List Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

सी.पी.आर मध्ये बालरोगशास्त्र विभागात GBS झालेल्या रुग्णास जीवदान

सी.पी.आर मध्ये बालरोगशास्त्र विभागात GBS झालेल्या रुग्णास जीवदान कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे…

My Marathi माय मराठी

नुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी पदभार स्वीकारला

नुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी पदभार स्वीकारला   कोल्हापूर/प्रतिनिधी : डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा…

My Marathi

महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम’ (MRDP) राबविण्यास मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागर

'महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम' (MRDP) राबविण्यास मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागर आपत्ती व्यवस्थापनास बळकटी देण्याकरिता विविध उपाययोजना राबविण्यात…

My Marathi

बागल चौक ते बी.टी.काँलेज परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई

बागल चौक ते बी.टी.काँलेज परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई   कोल्हापूर/प्रतिनिधी : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रं.३ राजारामपुरी व अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत…

Thumbnail

View All
My Marathi

रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर डिजिटलवर; भव्य स्टारकास्टमुळे उत्सुकता शिगेला

My Marathi

धुरंधर द रिव्हेंज’सोबत थिएटरमध्ये येणार ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर

माय मराठी

आज ३ एप्रिलला कोल्हापुरात होणार सहकार सम्राज्ञी पुरस्कार वितरण

माय मराठी

भुये (ता. करवीर) च्या मानाच्या सासनकाठी क्रमांक ४० चा पर्यावरणपूरक उपक्रम गाजला; जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

My Marathi

दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळा पडला पार

My Marathi

जोतिबा भक्तांची श्रद्धा गायमुखावर: भक्तांच्या विधिवत पूजनाने अन्नछत्राचा मंगल प्रारंभ झाला!

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा जोतीराव फुले

सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा जोतीराव फुले   भारताच्या सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एका महापुरुषाच्या जन्माचा दिवस…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन कागलमधील गैबी चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण कागल/प्रतिनिधी : महात्मा…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

घोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यश

घोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यश   अतिग्रे: मुंबई सायन्स टिचर्स असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

संघटन सृजन अभियाना अंतर्गत काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात १३ एप्रिल ते १८ एप्रिल कालावधीत आढावा बैठका होणार

संघटन सृजन अभियाना अंतर्गत काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात १३ एप्रिल ते १८ एप्रिल कालावधीत आढावा बैठका होणार नवीन पदाधिकारी नेमणुकी संदर्भात काँग्रेस…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

सतेज पाटील यांचा उद्याचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा होणार,कार्यकर्त्यांकडून दहा लाख वह्या संकलनाचे उदिष्ट्य

सतेज पाटील यांचा उद्याचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा होणार,कार्यकर्त्यांकडून दहा लाख वह्या संकलनाचे उदिष्ट्य कोल्हापूर/प्रतिनिधी : काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

सी.पी.आर मध्ये बालरोगशास्त्र विभागात GBS झालेल्या रुग्णास जीवदान

सी.पी.आर मध्ये बालरोगशास्त्र विभागात GBS झालेल्या रुग्णास जीवदान कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे…

My Marathi माय मराठी

नुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी पदभार स्वीकारला

नुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी पदभार स्वीकारला   कोल्हापूर/प्रतिनिधी : डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा…

My Marathi

महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम’ (MRDP) राबविण्यास मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागर

‘महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम’ (MRDP) राबविण्यास मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागर आपत्ती व्यवस्थापनास बळकटी देण्याकरिता विविध उपाययोजना राबविण्यात…

My Marathi

बागल चौक ते बी.टी.काँलेज परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई

बागल चौक ते बी.टी.काँलेज परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई   कोल्हापूर/प्रतिनिधी : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रं.३ राजारामपुरी व अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत…

My Marathi

सीपीआर रुग्णालयातील दुरुस्ती कामांना प्रारंभ; गोदावरी प्रवेशद्वार तात्पुरते बंद

सीपीआर रुग्णालयातील दुरुस्ती कामांना प्रारंभ; गोदावरी प्रवेशद्वार तात्पुरते बंद कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीतील छत्रपती…

सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा जोतीराव फुले

सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा जोतीराव फुले

 

भारताच्या सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एका महापुरुषाच्या जन्माचा दिवस नाही, तर समता, शिक्षण आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरूवात करणारा दिवस आहे.महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांच्या जन्मामुळे भारतीय समाजव्यवस्थेला नवी दिशा मिळाली. सन १८२७ मध्ये जन्मलेल्या या युगपुरुषाच्या विचारांचा प्रकाश आजही समाजाच्या प्रत्येक स्तरावर जाणवतो. ११ एप्रिल पासून महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात द्विशताब्दी जयंती समिती स्थापन केली आहे.समाजातील समता, शिक्षण, स्त्री-सक्षमीकरणांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा राज्य सरकारने संकल्प केला आहे.त्यामुळे ११ एप्रिलचा दिवस भारताच्या सामाजिक समतेच्या तेजस्वी द्विशताब्दी पर्वाचा दिवस म्हणूनही देशात साजरा होत आहे.त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याचा पुनर्विचार करणे म्हणजे केवळ इतिहासाचे स्मरण नसून वर्तमानाला दिशा देण्याचे कार्य आहे.

मानवतेचा धर्म : समतेचा मूलाधार

महात्मा फुले यांच्या विचारविश्वाचा केंद्रबिंदू म्हणजे “मानव हा सर्वात मोठा धर्म आहे” ही भूमिका. त्यांनी धर्म, जात, पंथ यापलीकडे जाऊन माणुसकीचा विचार मांडला. त्यांच्या लेखनात आणि कृतीतून सतत दिसून येते की, समाजातील अन्याय आणि विषमता दूर केल्याशिवाय खरी प्रगती होऊ शकत नाही. त्यांनी मांडलेली समतेची संकल्पना ही केवळ तात्त्विक नव्हती, तर ती प्रत्यक्ष कृतीतून साकारलेली होती.

शिक्षणाची ज्योत : अज्ञानातून मुक्तीचा मार्ग

महात्मा फुले यांनी घेतलेला सर्वात क्रांतिकारी निर्णय म्हणजे शिक्षणाचा प्रसार. त्यांनी प्रथम स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केले आणि त्यानंतर १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. सावित्रीबाईंनीही समाजाच्या विरोधाला न जुमानता स्वतःला शिक्षणासाठी वाहून घेतले. शेण गोट्याचा मार सहन करत सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. जोतीबा आणि सावित्री या दांपत्याच्या त्या काळातील सामाजिक बंडामुळे शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली.त्या काळात स्त्रीशिक्षणाला तीव्र विरोध असतानाही त्यांनी मागे हटणे स्वीकारले नाही. शिक्षण हेच शोषणाविरुद्धचे सर्वात प्रभावी शस्त्र आहे, ही त्यांची धारणा होती. या कार्यातून त्यांनी समाजातील अज्ञानाची बेडी तोडण्याचा प्रयत्न केला.अविद्या हेच शोषणाचे मुख्य कारण आहे हे सांगताना त्यांनी समाजाला याबाबतचा कठोर संदेश दिला…

विद्येविना मती गेली
मतीविना नीती गेली
नितीविना गती गेली
गती विना वित्त गेले
वित्तविना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले…

अन्यायाविरुद्ध बंड

त्या काळातील समाज रुढी-परंपरांच्या कठोर बंधनात अडकलेला होता. बालविवाह, सतीप्रथा, स्त्रीदास्य आणि अस्पृश्यता यांसारख्या प्रथांनी समाजाला जखडून ठेवले होते. महात्मा फुले यांनी या सर्व प्रथांविरुद्ध उघडपणे आवाज उठवला. त्यांनी विधवांसाठी आश्रयस्थळे उभारली, विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले आणि स्त्रियांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. त्यांच्या कृतीतून समाजातील महिलांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा मिळाली.

सत्यशोधकांचा मार्ग : समतेची संघटित चळवळ

सन १८७३ मध्ये त्यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज हा भारतीय सामाजिक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जातीभेद,अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता यांविरुद्ध संघटित लढा उभारला. सत्यशोधक समाजाने समाजाला विचार करण्याची नवी दिशा दिली. ज्यामध्ये सत्य, समता आणि बंधुता यांना केंद्रस्थानी ठेवले आहे.सत्यशोधक समाजाच्या मार्फत त्यांनी एक समांतर विज्ञानवादी भूमिका समाजापुढे मांडली.तत्कालीन ब्राह्मण्यवादाला झुगारून नव्या चालीरीती समाजाला दिल्या.

शेतकऱ्यांचा आवाज : अन्यायाविरुद्धचा प्रहार

महात्मा फुले यांनी केवळ सामाजिकच नव्हे, तर आर्थिक विषमतेवरही भाष्य केले.त्यांच्या “शेतकऱ्यांचा आसूड” या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांच्या दुःखाचे अत्यंत वास्तव चित्रण केले आहे. महसूल व्यवस्थेतील अन्याय, सावकारशाहीचे शोषण आणि प्रशासनातील दुर्लक्ष यावर त्यांनी कठोर टीका केली. शेतकरी हा समाजाचा कणा असूनही त्याचे जीवन दारिद्रयात का अडकले आहे, हा प्रश्न त्यांनी समाजासमोर उभा केला.

विचारांची शस्त्रे : लेखनातून घडवलेले परिवर्तन

महात्मा फुले हे केवळ कृतीशील समाजसुधारक नव्हते, तर प्रभावी लेखकही होते. “गुलामगिरी” या ग्रंथातून त्यांनी जातीव्यवस्थेवर प्रखर प्रहार केला, तर “सार्वजनिक सत्यधर्म” मधून मानवतावादी धर्माची संकल्पना मांडली. त्यांच्या लेखनातून समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे कार्य झाले. यातून त्यांच्या विचारांची व्यापकता स्पष्ट होते.याशिवाय त्यांनी गुलामगिरी,शेतकऱ्यांचा आसूड,ब्राह्मणांचे कसब, तृतीय रत्न,सार्वजनिक सत्य धर्म,छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा लिहून शिवरायांच्या कार्यकर्तुत्वाची ओळख करून दिली.रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीची स्वच्छता केली.शिवाजी महाराजांच्या स्मृती पुनरुज्जीवनाच्या प्रारंभीच्या प्रयत्नांपैकी एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व त्यांना मानले जाते.

सार्वजनिक जीवनातील योगदान

महात्मा फुले यांनी सार्वजनिक जीवनातही सक्रिय सहभाग घेतला. पुणे महानगरपालिकेच्या कार्यातून त्यांनी नागरी प्रश्नांवर काम केले. पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे त्यांनी लक्ष दिले. त्यांनी ब्रिटिश प्रशासनाशी संवाद साधून सामाजिक प्रश्न मांडले आणि वंचित घटकांसाठी न्यायाची मागणी केली. शासन कोणतेही असो, ते न्याय्य आणि लोकहितकारी असले पाहिजे, ही त्यांची भूमिका होती.हंटर शिक्षण आयोगाकडे त्यांनी निवेदन सादर केले.सार्वत्रिक शिक्षणाचा पुरस्कार केला.

सामाजिक सुधारणा स्वीकारल्या

इंग्रजांच्या काही सामाजिक सुधारणांना स्वीकारताना त्यांनी इंग्रजांच्या अन्यायकारक नीतीवर सडकून टीका केली. एवढेच काय इंग्रजांना समजेल अशा भाषेत त्यांनी त्याची उत्तरे दिली. कोणताही पहिला प्रयोग स्वतःच्या घरी, स्वतःच्या कुटुंबावर करून ‘बोले तैसा चाले ,त्याची वंदावी पाऊले’, असा आदर्श त्यांनी समाजामध्ये निर्माण केला आहे. स्वतःच्या पत्नीला शिकवले. स्वतःची विहिर मागास वर्गीयांसाठी खुली केली. ब्राह्मण्यवादाचा आयुष्यभर विरोध करुनही त्यांनी एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला.त्या मुलाचे आंतरजातीय लग्न लावून देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. महात्मा जोतीबा फुले यांनी घेतलेले निर्णय अशा प्रकारे कायम प्रेरणादायी आहेत. महात्मा ज्योतिबा फुले हे स्वतःच्या मुलाचा आंतरजातीय विवाह करणारे पहिले पालक ठरले आहेत. काळाची पावले ओळखून नवनव्या प्रयोगाद्वारे सामाजिक सुधारणा करण्यात भारतातल्या सर्व सामाजिक सुधारणा करणाऱ्या थोर पुरुषांमध्ये त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले वेगळे ठरले आहेत.

यशस्वी व्यावसायिक

सामाजिक कार्य, संघटना सुरु ठेवण्यासाठी आर्थिक स्त्रोत मजबूत असणे आवश्यक असते. त्यासाठी अंगी व्यावसायिक कसब बाळगणे खूप गरजेचे असते. संघटना, चळवळी, सुधारणांचा डोलारा चालविण्यासाठी पैशाची गरज असते. त्यासाठी आदर्श पद्धतीने व्यवसाय करुन स्वयंपूर्ण होणे गरजेचे असल्याचे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सोदाहरणासह मांडून ठेवले. त्यांनी कंत्राटदार म्हणून अतिशय उत्तमपणे काम केले. आजही त्यांच्या सहभागात तयार झालेल्या वास्तू प्रेरक आहेत. पूल, धरणे, कालवे या बांधकामात कंत्राटदार म्हणून त्यांनी काम केले.

आजच्या काळातील विचारांची प्रासंगिकता

महात्मा फुले यांच्या कार्याला दीडशे वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी त्यांच्या विचारांची प्रासंगिकता आजही तितकीच आहे. शिक्षणातील विषमता, सामाजिक भेदभाव आणि स्त्रीसमानतेचे प्रश्न अद्यापही पूर्णतः संपलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या विचारांचा प्रसार आणि आचरण करणे ही काळाची गरज आहे. त्यांच्या कार्याचा अभ्यास केल्यास समाजपरिवर्तनासाठी आवश्यक असलेली दृष्टी मिळते.

ज्योतिराव परिवर्तनाची अखंड प्रेरणा

महात्मा ज्योतिराव फुले हे एक व्यक्तिमत्त्व नसून एक चळवळ, एक विचारधारा आणि एक प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्या कार्यातून राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रेरणा घेतली.त्यांच्या कार्यामुळेच महाराष्ट्राला फुले–शाहू–आंबेडकरांचा महाराष्ट्र ही ओळख प्राप्त झाली आहे. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण करणे म्हणजे केवळ आदर व्यक्त करणे नव्हे, तर त्या मूल्यांना आपल्या जीवनात रुजवण्याचा संकल्प करणे होय.

महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात विशेष समिती स्थापन केली असून वर्षभर महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनकार्याला साजेशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार करून सामाजिक समतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न ठरणार आहे.

प्रवीण टाके
उपसंचालक (माहिती)
विभागीय माहिती कार्यालय,कोल्हापूर
9702858777

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन

कागलमधील गैबी चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण

कागल/प्रतिनिधी : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याला मंत्री हसन मुश्रीफ यांनी अभिवादन केले. कागलमधील गैबी चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हे अभिवादन करण्यात आले.यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी ऐतिहासिक गैबी चौकातील महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या पुतळ्यानाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी कागल नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष विवेक लोटे, बच्चन कांबळे, रुपेश वाघमारे, अभिजित कांबळे, अंकुश कांबळे, सागर शिंदे यांच्यासह इतर मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

घोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यश

घोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यश

 

अतिग्रे: मुंबई सायन्स टिचर्स असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेमध्ये संजय घोडावत ऑलिम्पियाड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत, तब्बल १० पदके जिंकली. ज्यात ३ सुवर्ण, ५ रौप्य आणि २ कांस्य पदकांचा समावेश आहे.                                     आर्यन प्रसन्न पवार, आध्या पुशान चिकली, आदित्य अभिजीत जाधव यांनी सुवर्णपदक पटकावले. रौप्य पदक प्राप्त करणाऱ्यांमध्ये ऐशना श्रीराम कुलकर्णी, अर्जुन विनायक बरगाले, समृद्धी रामदास बडे, चिरायू उमेश माने, शार्दुल सुश्रुत कुलकर्णी यांचा तर कांस्यपदक प्राप्त करणाऱ्यांमध्ये साची सुहास वाडकर, रुद्रराज सुरेश जाधव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.                सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना या संस्थेचे झोनल हेड श्री प्रभु श्रीनिवास सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजित अभ्यासक्रमामुळेच हे यश प्राप्त होऊ शकले. या विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालक श्री वासू सर या प्रसंगी बोलताना ते म्हणाले कि सातत्य व सराव हीच यशाची गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता वाढीसाठी संजय घोडावत ओलंपियाड स्कूल ने सातत्य राखले आहे. चेअरमन संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्व मार्गदर्शक शिक्षक,गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

संघटन सृजन अभियाना अंतर्गत काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात १३ एप्रिल ते १८ एप्रिल कालावधीत आढावा बैठका होणार

संघटन सृजन अभियाना अंतर्गत काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात १३ एप्रिल ते १८ एप्रिल कालावधीत आढावा बैठका होणार

नवीन पदाधिकारी नेमणुकी संदर्भात काँग्रेस पक्षाच्यावतीने आढावा बैठका घेण्यात येणार

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तसेच कोल्हापूर शहर आणि इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी मध्ये नवीन पदाधिकारी नेमणुकी संदर्भात काँग्रेस पक्षाच्यावतीने आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. संघटन सृजन अभियाना अंतर्गत या बैठका दिनांक १३ एप्रिल ते १८ एप्रिल या कालावधीत ज्या त्या तालुक्यात घेण्यात येणार आहेत. या अभियानात काँग्रेसचे सर्व तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह काँग्रेस पक्षासोबत जोडले जाण्याची इच्छा असणाऱ्या सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस समितीच्यावतीने संघटन सृजन अभियान राबवण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तसेच कोल्हापूर शहर आणि इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी मध्ये नवीन पदाधिकारी नेमणुकी संदर्भात काँग्रेस पक्षाच्यावतीने आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठका दिनांक १३ एप्रिल ते १८ एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
या आढावा बैठकांना पक्षातर्फे मुख्य निरीक्षक जय शंकर पाठक यांच्या समवेत कोल्हापूर ग्रामीण साठी सहनिरीक्षक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव नंदकुमार कुंभार, कोल्हापूर शहरसाठी राहुल गायकवाड, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सुनील मलके आणि राहुल वरदा उपस्थित राहणार आहेत.
या अभियानात काँग्रेसचे सर्व तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह काँग्रेस पक्षासोबत जोडले जाण्याची इच्छा असणाऱ्या सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले आहे.

सतेज पाटील यांचा उद्याचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा होणार,कार्यकर्त्यांकडून दहा लाख वह्या संकलनाचे उदिष्ट्य

सतेज पाटील यांचा उद्याचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा होणार,कार्यकर्त्यांकडून दहा लाख वह्या संकलनाचे उदिष्ट्य

कोल्हापूर/प्रतिनिधी : काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचा उद्या १२ एप्रिलला होणारा वाढदिवस विविध उपक्रम राबवून लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा संकल्प कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला आहे. या वाढदिवसानिमित्त दहा लाख वह्या संकलनाचे उदिष्ट कार्यकर्त्यांनी ठेवले आहे. पदाधिकाऱ्यांनी विविध उपक्रम राबवत सतेज पाटील यांच्या वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा मानस काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

देऊया गरजूंना साथ सतेज पाटील यांच्या वाढदिनी मदतीचा हात

देऊया गरजूंना साथ सतेज पाटील यांच्या वाढदिनी मदतीचा हात हे ब्रीद घेऊन जिल्ह्यातील अनेक संस्था, संघटना, आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, वृद्धाश्रम फळे वाटप, विद्यार्थ्यांच्या गुणवता वाढीसाठी विविध स्पर्धा, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, अपंग, निराधार मुलांना अल्पोपहार, गुणवंत कामगार संघटनेमार्फत काव्य संमेलनाचे आयोजन, जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये वृक्षारोपण, फुटबॉल, करवीर सतेज चषक स्पर्धा, लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा तसेच तालुका स्तरावरही विविध सामाजिक उपक्रम राबण्यात येणार आहेत.
आमदार सतेज पाटील यांनी वाढदिवसानिमित्त हारतुरे, पुष्पगुच्छ न स्वीकारता गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या भेट देण्याचा उपक्रम २००७ पासून सुरु आहे. या सामाजिक उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये झाली आहे. यंदाही कोल्हापूर महानगरपालिकेच्या ३८ नगरसेवकांच्या माध्यमातून आमदार पाटील यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त ५४ हजार वह्या देण्याचा संकल्प महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू लाटकर यांनी केला आहे. जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या १५ सदस्यांंच्या माध्यमातून ५४ हजार वह्या भेट देण्याचा संकल्प जाहीर केला. युवराज गवळी यांनी गवळी समाजाच्या माध्यमातून ११ हजार वह्या भेट देत पाचगावमध्ये म्हैस शर्यत स्पर्धा आयोजित करणार असल्याचे सांगितले, तसेच जिल्ह्यातील सर्वच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या ग्रामदैवताला अभिषेक घालून आमदार पाटील यांना दिर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. यंदा दहा लाख वह्यांचे उदिष्ठ ठेवण्यात आले आहे.
तसेच युथ काँग्रेसच्या माध्यमातून २५ हजार वह्या देण्यात येणार आहेत.आमदार सतेज पाटील हे वाढदिनी दुपारी ४ नंतर कसबा बावड्यातील त्यांच्या यशवंत निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
आमदार जयंत आसगावकर, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, जिल्हा परिषद काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील, महापालिका विरोधी पक्षनेते राजू लाटकर, काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे, गोकुळचे संचालक चेतन नरके, संचालक बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तायशेटे, शशिकांत खोत, माजी नगरसेवक भूपाल‌ शेटे, भारती पोवार, तौफिक मुल्लानी, युवराज गवळी, बाळासाहेब सरनाईक, अक्षय शेळके, भरत रसाळे, संपतराव पाटील, संजय पोवार – वाईकर, मंगल खुडे, सरलाताई पाटील, उज्ज्वला चौगले, हेमा पाटील, नगरसेवक संजय मोहिते, दुर्वास कदम, प्रवीण केसरकर, अर्जुन माने, अमर समर्थ, सुभाष बुचडे, विनायक कारंडे, अजित पोवार, सचिन चौगले, संतोष जरग, दिपाली घाटगे यांच्यासह आजी माजी नगरसेवक यांनी वह्या संकलनाचे उद्दिष्ट केले आहे.

सी.पी.आर मध्ये बालरोगशास्त्र विभागात GBS झालेल्या रुग्णास जीवदान

सी.पी.आर मध्ये बालरोगशास्त्र विभागात GBS झालेल्या रुग्णास जीवदान

कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथे बालरोगशास्त्र विभागात GBS हा गंभीर आजार झालेमुळे उपचारासाठी दाखल करण्यात आलेला रुग्ण कु.आर्यन भगवान म्हातूगडे वय वर्षे १२ रा.सावर्डे, ता. भुदरगड , जि.कोल्हापूर. या रुग्णास दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी बालरोगशास्त्र विभागात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. सदर रुग्ण गंभीर असल्यामुळे त्याला बालरोगशास्त्र विभागातील डॉक्टरांच्या पथकाने तात्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार सुरू केले.
सदर रुग्णावर IVIG इंजेक्शन सुरू करण्यात आली. बालरोगशास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ.संगीता कुंभोजकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर रुग्णावर यशस्वीरित्या उपचार सुरू करण्यात आले. सदर उपचारादरम्यान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सदानंद भिसे यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर रुग्णावर करण्यात आलेले सर्व उपचार हे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आले आहेत.यावेळी रुग्णाचे पालक श्री.भगवान म्हातुगडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना “माझ्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी बालरोगशास्त्र विभागातील सर्वच डॉक्टरांनी खूप परिश्रम घेतले तसेच अहोरात्र सर्व डॉक्टरांनी प्रयत्न करून माझ्या मुलाचे प्राण वाचवले असल्याचे सांगितले. बालरोगशास्त्र विभागातील सर्व स्टाफच्या या परिश्रमामुळेच माझ्या मुलाला मी आज सुखरूप घरी घेऊन जात असल्याबद्दलचा त्यांनी आनंद व्यक्त केला.
सदर रुग्णास दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ.संगीता कुंभोजकर, वैद्यकीय अधीक्षक, डॉ.भूषण मिरजे, सहयोगी प्राध्यापक डॉ.शिशिर मिरगुंडे, सहाय्यक प्राध्यापक डॉ.महेश्वरी जाधव, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, इन्चार्ज सिस्टर सौ.मीना पंडित, सौ.मीना डिसूजा तसेच विभागातील सर्व नर्सिंग स्टाफ समाजसेवा अधीक्षक श्री.अजित भास्कर रुग्णालयाकडून सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी पदभार स्वीकारला

नुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी पदभार स्वीकारला

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी माजी आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून सायंकाळी ४ वाजता कार्यभार स्वीकारला. कोल्हापूरात दुपारी आगमन झाल्यानंतर डॉ. रोजंद्र भारुड यांनी प्रथम अंबाबाई मंदिर येथे जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर महापालिकेत येऊन त्यांनी अधिकृतपणे आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला.
पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी महापौर रुपाराणी निकम यांची भेट घेऊन महापालिकेच्या विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव उपस्थित होते. त्यानंतर आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी आयुक्त कार्यालयातील मीटिंग हॉलमध्ये सर्व विभाग प्रमुखांसोबत बैठक घेऊन विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेतली.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ व शिल्पा दरेकर, उपआयुक्त परितोष कंकाळ व किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त उज्वला शिंदे व स्वाती दुधाणे, सहा. संचालक (नगररचना) प्रशांत भोसले, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, जल अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, लेखापाल संजय सरनाईक, प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार, उप-शहर रचनाकार एन.एस. पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते

महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम’ (MRDP) राबविण्यास मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागर

महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम’ (MRDP) राबविण्यास मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागर

आपत्ती व्यवस्थापनास बळकटी देण्याकरिता विविध उपाययोजना राबविण्यात येणार

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या साहाय्याने मित्र संस्थेच्या अंतर्गत महाराष्ट्र रिझीलन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (MRDP) हा प्रकल्प राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत अधिकृत मान्यता देण्यात आली. यासाठी २ हजार २४० कोटी अर्थसाहाय्य जागतिक बँकेकडून घेण्यात येणार आहे. एकूण ३ हजार २०० कोटींचा हा प्रकल्प असून, ९६० कोटी रुपये राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. त्यानुसार या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने ७ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या बैठकीत ‘महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम’ (MRDP) राबविण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. हा कार्यक्रम प्रामुख्याने आपत्ती व्यवस्थापन बळकट करण्यासाठी आणि पूरप्रवण क्षेत्रांमधील नागरिकांना दिलासा देण्यासाठी आखण्यात आला आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
यामध्ये पुढे म्हंटले आहे कि, मंत्रिमंडळाच्या झालेल्या निर्णयात महत्वाची बाब म्हणजे आपत्ती व्यवस्थापनात खाजगी भांडवलाच्या मदतीने वित्तपुरवठा उभारला जाणार आहे. यात जागतिक बँकेकडून १६५ कोटींचा अतिरिक्त निधी मिळणार आहे. या अर्थसहाय्यातून आपत्तीचा फटका बसलेल्या नागरिकांना गृह कर्जात सवलत दिली जाईल. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांसाठी (MSME) कर्जासाठी सवलत आणि विशेष विमा सुरक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे. कृष्णा नदीच्या खोऱ्यातील पुराचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधक आराखडे तयार केले जातील. कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी यांसारख्या शहरांमध्ये पुराच्या पाण्याचा वेगाने निचरा व्हावा यासाठी मास्टर प्लॅन आणि उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यासाठी राज्याची क्षमता वाढली जाणार असून, नागरिकांना आपत्कालीन स्थितीत दिलासा मिळणार आहे, अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.

बागल चौक ते बी.टी.काँलेज परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई

बागल चौक ते बी.टी.काँलेज परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रं.३ राजारामपुरी व अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत आज बागल चौक ते बी.टी.काँलेज परिसर या ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी ३ शेड, ६ स्टँण्ड बोर्ड, ४ लाकडी व लोखंडी टेबल, ६ लोंखडी पार्किंग जाळी, ३२ शीट कव्हर मँट नग व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाई वेळी काही हातगाडया मालकांनी स्वता:हून काढून घेतल्या.
सोमवारी झालेल्या जनता दरबारमध्ये अतिक्रमणाबाबत तक्रार अर्ज दाखल झाला होता. या अर्जाच्या अनुषंगाने व महापौर सौ.रुपाराणी निकम यांनी दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागामार्फत हि कारवाई करण्यात आली.सदरची कारवाई महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्या आदेशाने, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली, उप-शहर अभियंता अरुण गुजर, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व विभागीय कार्यालय क्र.३ कडील कर्मचा-यांच्या पथकाकडून संयुक्तीक करण्यात आली.

सीपीआर रुग्णालयातील दुरुस्ती कामांना प्रारंभ; गोदावरी प्रवेशद्वार तात्पुरते बंद

सीपीआर रुग्णालयातील दुरुस्ती कामांना प्रारंभ; गोदावरी प्रवेशद्वार तात्पुरते बंद

कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीतील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती, ड्रेनेजची कामे, सर्व इमारतींचे अंतर्बाह्य सुशोभीकरण तसेच अनुषंगिक दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू करण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. या कामांच्या दरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून टप्प्याटप्प्याने कामे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
उद्या ७ एप्रिल २०२६ पासून रुग्णालयाच्या मुख्य कमानीचे काम सुरू करण्यात येणार असल्याने गोदावरी इमारतीजवळील प्रवेशद्वार तात्पुरते बंद करण्यात येत आहे. गोदावरी गेटचे काम पूर्ण होईपर्यंत अपघात विभागासमोरील गेट रुग्णालयात प्रवेशासाठी खुले ठेवण्यात येणार असून, बाहेर जाण्यासाठी कुंभी गेटचा वापर करण्यात येणार आहे.या कालावधीत रुग्णसेवेमध्ये कोणताही निष्काळजीपणा होणार नाही, याची प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जाणार असल्याची माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी दिली.