Grid Posts

View All
माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

माय मराठी

शहरातील टायर विक्री आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या भव्य शोरूमचे कळंबा येथे उद्घाटन

माय मराठी

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन

माय मराठी

कोल्हापुरी चप्पलसह चर्मकला जतन आणि विकसित करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले संसदेत विधेयक

माय मराठी

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार

Thumbnail

View All
My Marathi

कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा पुरवठा; अफवांवर विश्वास ठेवून ‘पॅनिक बायिंग’ करू नका: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

ग्लोबल ताज्या देश प्रीमियम महाराष्ट्र माय मराठी

मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करूया: जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या बैठकीतील संकल्प

My Marathi

सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय हिंदू, शीख आणि बौद्धांनाच अनुसूचित जातीचा दर्जा

माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

माय मराठी

शहरातील टायर विक्री आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या भव्य शोरूमचे कळंबा येथे उद्घाटन

Tile List

View All
माय मराठी

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन कोल्हापूर (जिमाका) : शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासन कृषी…

माय मराठी

कोल्हापुरी चप्पलसह चर्मकला जतन आणि विकसित करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले संसदेत विधेयक

माय मराठी

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार

माय मराठी

येत्या वर्षात प्रत्येक घरात सौर प्रकल्प राबवून ‘शून्य वीज बिल’ करण्याचे उद्दिष्ट – मंत्री हसन मुश्रीफ

List Posts

View All
माय मराठी

भुये (ता. करवीर) च्या मानाच्या सासनकाठी क्रमांक ४० चा पर्यावरणपूरक उपक्रम गाजला; जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

भुये (ता. करवीर) च्या मानाच्या सासनकाठी क्रमांक ४० चा पर्यावरणपूरक उपक्रम गाजला; जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक भुये (ता. करवीर) : जोतिबा चैत्र…

My Marathi

दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळा पडला पार

दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळा पडला पार कोल्हापूर/प्रतिनिधी : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र…

My Marathi

जोतिबा भक्तांची श्रद्धा गायमुखावर: भक्तांच्या विधिवत पूजनाने अन्नछत्राचा मंगल प्रारंभ झाला!

जोतिबा भक्तांची श्रद्धा गायमुखावर: भक्तांच्या विधिवत पूजनाने अन्नछत्राचा मंगल प्रारंभ झाला! कोल्हापूर/प्रतिनिधी: गेली २५ वर्षे श्रद्धेचा आणि सेवेचा एक अखंड…

My Marathi

भक्तीची पाऊलवाट आणि माणुसकीची थाप: जोतिबाच्या चैत्र यात्रेतील बैलगाड्यांची परंपरा

भक्तीची पाऊलवाट आणि माणुसकीची थाप: जोतिबाच्या चैत्र यात्रेतील बैलगाड्यांची परंपरा कोल्हापूर/प्रमोद पाटील  : "चांगभलं" च्या गजराने अवघा जोतिबा डोंगर दुमदुमून…

Thumbnail

View All
My Marathi

अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीचा विवाह ; पतीसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा

My Marathi

कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा पुरवठा; अफवांवर विश्वास ठेवून ‘पॅनिक बायिंग’ करू नका: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

ग्लोबल ताज्या देश प्रीमियम महाराष्ट्र माय मराठी

मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करूया: जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या बैठकीतील संकल्प

My Marathi

सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय हिंदू, शीख आणि बौद्धांनाच अनुसूचित जातीचा दर्जा

माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

माय मराठी

८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारणाचे सूत्र अवलंबून जनसेवेच्या कामातून प्रभागाच्या विकासात योगदान द्या : आमदार राजेश क्षीरसागर

शिवसेनेच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार; गट स्थापनेच्या प्रक्रियेला सुरवात कोल्हापूर दि.२३ : पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने ऐतिहासिक यश मिळवीत इतिहास…

माय मराठी

शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार होणार… शिवसेनेचा महापौर होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही : आमदार राजेश क्षीरसागर

शिवसेनाप्रमुखांच्या १०० व्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त अभिवादन कोल्हापूर /प्रतिनिधी : या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवीत शिवसेनेने घवघवीत यश संपादित केले आहे.…

माय मराठी

सेंद्रिय गुळापासून जिलेबीप्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सेंद्रीय गुळाच्या जिलेबीच्या स्टॉलचा शुभारंभ

कोल्हापूर/प्रतिनिधी : चव, रंग आणि गोडी यामुळे जगप्रसिध्दी मिळालेल्या कोल्हापुरी गुळापासून आता जिलेबी तयार करण्याची युक्ती शेतकऱ्यांनी लढवली आहे. निमित्त…

माय मराठी

कोल्हापूर जिल्ह्याला “पर्यटन हब” म्हणून अधिकृत दर्जा द्यावा : आमदार राजेश क्षीरसागर यांची मागणी

राष्ट्रीय पर्यटन दिनी ई – मेल द्वारे केले मागणीचे निवेदन सादर कोल्हापूर/प्रतिनिधी : देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी पर्यटनाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि…

माय मराठी

छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस मराठी ६’चा डंका !

रितेश भाऊंच्या ‘लयभारी’ स्वॅगने बहरला ग्रँड प्रीमियर! कोल्हापूर/प्रतिनिधी: “शेकडो दारं, अनेक सदस्य… आणि एकच बॉस!” असं म्हणत सुरू झालेल्या ‘बिग…

माय मराठी

बँकांचे खाजगीकरण हे कर्मचाऱ्यांसमोरील मोठे आव्हान : राष्ट्रीय सरचिटणीस सी.एच.वेंकटाचलम

महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या त्रैवार्षिक अधिवेशनास कोल्हापुरात प्रारंभ कोल्हापूर/प्रतिनिधी : खाजगीकरण हे बँक कर्मचाऱ्यांसमोर सध्या मोठे आव्हान आहे. सर्वात…

माय मराठी

महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेचे “त्रैवार्षिक अधिवेशन” येत्या २४ आणि २५ जानेवारी रोजी कोल्हापुरात

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेचे (महाराष्ट्र स्टेट बैंक एम्प्लॉइज फेडरेशन) त्रैवार्षिक राज्यस्तरीय अधिवेशन” येत्या शनिवारी आणि रविवारी दि. २४…

माय मराठी

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “रस्ता सुरक्षा” अभियानांतर्गत जाणीव जागृती मार्गदर्शन कार्यक्रम

कोल्हापूर, अतिग्रे : रस्ता अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी व तरुण पिढीत रस्ता सुरक्षेबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने संजय घोडावत इन्स्टिट्यूट,…

माय मराठी

शेतामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरणारे दोन चोरटे जेरबंद

शेतामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरणारे दोन चोरटे जेरबंद एकुण २,७०,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण…

मानवतावादी साहित्य संमेलन माणसाला माणूस बनवण्याची प्रक्रिया पार पाडेल : संमेलनाध्यक्ष अ‍ॅड. डॉ. रमेश विवेकीडॉ. सुनीलकुमार लवटे, अ‍ॅड. जयंत जायभावे ‘मानवतावादी’ जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित

कोल्हापूर/प्रतिनिधी : सद्य परिस्थितीमध्ये भारत जात, धर्म, वर्ग, वर्ण यामध्ये विभागला गेला आहे माणूस देखील कप्पे बंद झाला आहे. संस्कृतीच्या नावाखाली माणसं दुरावली जातील यासाठी धार्मिक राजकारण उभे केले जात आहे अशा काळात साहित्यिकांनी भूमिका घेत मानवतावादी विचारांची प्रेरणी करणे गरजेचे आहे. माणूस जगला तर देश जगेल. देश महासत्ता बनायचा असेल तर माणूस समृद्ध झाला पाहिजे. माणसाच्या विकासाची नवी परिभाषा निर्माण केली पाहिजे. धर्मांध राजकारण झुगारून मानवतावादी संस्कृती निर्माण करण्याची गरज आहे. मानवतावादी साहित्य संमेलन माणसाला माणूस बनवण्याची प्रक्रिया पार पाडेल असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, दिग्दर्शक आणि निर्माते आणि संमेलनाध्यक्ष अ‍ॅड. डॉ. रमेश विवेकी यांनी प्रतिपादन केले.
ते लोकराजे राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत मानवतावाद जोपासण्याच्या दृष्टिकोनातून मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आयोजित अखिल भारतीय मानवतावादी साहित्य संमेलनात बोलत होते.
यावेळी कोल्हापूरचे ज्येष्ठ मानवतावादी साहित्यिक व विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे आणि नाशिकचे भारतीय संविधानाचे अभ्यासक, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रा अँड गोव्याचे मा. चेअरमन अ‍ॅड. जयंत जायभावे यांना अ‍ॅड. विवेक घाटगे यांच्या हस्ते ‘मानवतावादी’ जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.अ‍ॅड. जयंत जायभावे म्हणाले, संविधानाने सर्वांना समान अधिकार दिला असून लोकशाहीमध्ये अल्प असणारा विरोधी पक्षाला सन्मान देण्याची भूमिका अधोरेखित केली असताना सध्याच्या बहुमत असणारे लोक हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहेत. लोकशाही मोडीत काढून हुकूमशाहीकडे वाटचाल देशासाठी व संविधानासाठी घातक आहे. त्यामुळे मानवतावादी लोकांनी एकत्र येऊन याचा प्रतिरोध करणे गरजेचे आहे.
डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले, माणसांनी माणसांशी माणसाप्रमाणे वागावे. यासाठी मानवतावादी विचारांचा जागर होणे गरजेचे आहे. सत्यासोबत उभे राहणे माणसाला मानवीमूल्य प्राप्त करून देणे, त्याच्या अभिव्यक्तीला अबाधित ठेवण्यासाठीची भूमिका साहित्यिक विचारवंतांनी घेतली पाहिजे. मानवतावाद मानवी विकासाला मदत करणारा आशावाद आहे.
स्वागताध्यक्ष डॉ. राजेखान शानेदिवाण, संस्थापक अध्यक्ष अनिल म्हमाने, डॉ. मिलिंद आवाड, अ‍ॅड. विवेक घाटगे, डॉ. शोभा चाळके, निमंत्रक अंतिमा कोल्हापूरकर, भरत लाटकर यांनी मनोगते व्यक्त केली. तत्पूर्वी मानवतावादी गाणं म्हणून शाहीर शीतल साठे व शाहीर सचिन माळी संमेलनाच उद्घाटन केले.
आदित्य म्हमाने आणि दूर्वा राजहंस लिखित आम्हाला जगायचे आहे! या बाल लेखकाच्या पुस्तकावर विशेष चर्चा करण्यात आली. भविष्यातील मुलं जगायची आहेत म्हणतात हा आशावाद येणाऱ्या पिढीसाठी खूपच खूपच सुखद आहे अशी प्रतिक्रिया संमेलनातील विविध मान्यवरांनी अधोरेखित केली. संमेलनात आम्हाला जगायचे आहे! या पुस्तकाच्या पंचवीस हजार प्रतींची वाचकांनी विक्रमी खरेदी केली.
दुपारच्या सत्रात मानवतावाद या विषयावर डॉ. कपिल राजहंस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात अ‍ॅड. कृष्णा पाटील, अ‍ॅड. करुणा विमल, प्राचार्य सुरेश कांबळे यांनी मानवतावादावर भाष्य केले. कवी व पत्रकार ताज मुल्लाणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कवी संमेलनास डॉ. किरण भिंगारदिवे, डॉ. वसंत भागवत, तानाजीराव जाधव, डॉ. सागर भजनावळे यांच्यासह शंभरहून अधिक कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
व्यंकाप्पा भोसले, भरत लाटकर, लालासाहेब नाईक, सुरेश केसरकर, कृष्णात पाटील, मधुकर शिर्के, प्रमोद कांबळे, सुनील जाधव यांच्यासह महाराष्ट्रातील विविध भागातून मोठ्या संख्येने साहित्यिक आणि विचारवंत उपस्थित होते.
मानवतावादी संमेलनात एकाच वेळी मानवतावादी ऐशी पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
निमंत्रक अंतिमा कोल्हापूरकर, अर्हंत मिणचेकर, गंगाधर म्हमाने, सिद्धार्थ तामगावे, निवेदक अभिजीत मासुर्लीकर, बालनिमंत्रक आदित्य म्हमाने, अमिरत्न मिणचेकर, दुर्वा राजहंस यांनी संमेलनाचे आयोजन होते.

८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारणाचे सूत्र अवलंबून जनसेवेच्या कामातून प्रभागाच्या विकासात योगदान द्या : आमदार राजेश क्षीरसागर

शिवसेनेच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार; गट स्थापनेच्या प्रक्रियेला सुरवात

कोल्हापूर दि.२३ : पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने ऐतिहासिक यश मिळवीत इतिहास रचला आहे. १९८६ सालच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या स्थापनेपासून अपेक्षित यश मिळाले न्हवते परंतु या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे १५ शिलेदार निवडून आले आहेत. आज शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची १०० वी जन्मशताब्दी जयंती असून, शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा सर्वांनी संकल्प करावा. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे सूत्र अवलंबून जनसेवेच्या कामातून प्रभागाच्या विकासात मोलाचे योगदान द्या, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनेच्या नवनियुक्त नगरसेवकांना दिल्या.नूतन नगरसेवकांच्या विजयानंतर आता महापालिकेत अधिकृत गट स्थापन करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने शिवालय शिवसेना जिल्हा कार्यालय शनिवार पेठ कोल्हापूर येथे शिवसेनेच्या नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावतीने नूतन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. तसेच गट स्थापनेसाठी आवश्यक कागदपत्रे तात्काळ जमा करण्याच्या सूचनाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिल्या. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले कि, निवडून आल्यानंतर केवळ पदाचा उपभोग न घेता, प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या अडीअडचणीला धावून जा. ‘नगरसेवक’ ही केवळ एक पदवी आहे, पण लोकांच्या मनात ‘जनसेवक’ म्हणून जागा मिळवणे हेच खऱ्या लोकप्रतिनिधीचे यश आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला हा मूळ मंत्र अमलात आणून प्रभागाचा कायापालट करण्यासाठी झटून काम करा. राजकारण केवळ निवडणुकीपुरते मर्यादित ठेवून उर्वरित काळ समाजाच्या हितासाठी, प्रभागाच्या विकासासाठीच ठेवा. मतदारांशी सतत संवाद ठेवा. निवडणुकीत ज्या विश्वासाने त्यांनी मतदान केले, तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी कायम उपलब्ध रहा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.यावेळी माजी महापौर सुनील कदम, माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर, जिल्हा समन्वयक सत्यजित उर्फ नाना कदम, नगरसेवक शारंगधर देशमुख, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेवक अजय इंगवले, नगरसेवक आस्कीन आजरेकर, नगरसेवक सत्यजित जाधव, नगरसेवक वैभव माने, नगरसेवक स्वरूप कदम, नगरसेवक अभिजित खतकर, नगरसेविका मंगल साळोखे, नगरसेविका अर्चना पागर, नगरसेविका प्राजक्ता जाधव, नगरसेविका शिला सोनुले, नगरसेविका अनुराधा खेडकर, नगरसेविका संगीता सावंत, नगरसेविका कौसर बागवान उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार होणार… शिवसेनेचा महापौर होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही : आमदार राजेश क्षीरसागर

शिवसेनाप्रमुखांच्या १०० व्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त अभिवादन

कोल्हापूर /प्रतिनिधी : या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवीत शिवसेनेने घवघवीत यश संपादित केले आहे. कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर व्हावा, हे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. त्यांचे विचार घेवूनच शिवसेनेचे शिलेदार काम करत असून, या कामाच्या रूपानेच जनतेने शिवसेनेवर विश्वास दाखविला. नॅचरल जस्टीस प्रमाणे शिवसेनेचा महापौर होणार हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नसल्याचे सांगत कोल्हापूरवासियांनी वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल आभार व्यक्त करीत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
आज शिवसेनाप्रमुखांच्या १०० व्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. यावेळी “अमर रहे अमर रहे शिवसेनाप्रमुख अमर रहे” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले कि, महाराष्ट्रात एकमेव कोल्हापुरातच महायुती म्हणून आम्ही निवडणुकीस सामोरे गेलो आहे. निवडणुकीच्या सुरवातीपासूनच वरिष्ठ नेत्यांसोबत महायुती होण्याकडे आम्ही वाटचाल केली. महायुतीमध्ये कोणताही वाद होऊ नये यासाठी शिवसेनेने जागा वाटपात एक पाऊल मागे घेतले. या त्यागाचा मोबदला म्हणून महापौर पद शिवसेनेला मिळणे हा आमचा ‘नैसर्गिक हक्क’ आहे. महायुतीचे संख्याबळ ४६ हे सत्तास्थापने साठी पूरक आहे. त्यामुळे महायुतीत कोणताही वाद होईल अशी कोणाचीच भूमिका राहणार नाही. गेल्या काही वर्षातील महानगरपालिकेतील पदांच्या वाटपाचा लेखाजोखा करून सर्वच पक्षांना न्याय मिळेल अशा पद्धतीने पदांचे वाटप केले जाणार आहे. स्वीकृत नगरसेवकांची पदे कायद्याची अंमलबजावणी करून निवड केली जातील. देशात, राज्यात आणि महापालिकेत महायुतीचे सरकार असल्याने विकासकामांना कोणताही निधी कमी पडणार नाही. शहरातील प्रमुख प्रलंबित प्रश्नही लवकरच मार्गी लावू. नागरिकांना सेवा पुरविण्यात शिवसेना आणि महायुतीचे नगरसेवक कमी पडणार नाहीत. शहरातील प्रश्न सोडवून सुसज्ज आणि आधुनिक कोल्हापूरची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी माजी महापौर सुनील कदम, माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर, जिल्हा समन्वयक सत्यजित उर्फ नाना कदम, नगरसेवक शारंगधर देशमुख, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेवक अजय इंगवले, नगरसेवक आस्कीन आजरेकर, नगरसेवक सत्यजित जाधव, नगरसेवक वैभव माने, नगरसेवक स्वरूप कदम, नगरसेवक अभिजित खतकर, नगरसेविका मंगल साळोखे, नगरसेविका अर्चना पागर, नगरसेविका प्राजक्ता जाधव, नगरसेविका शिला सोनुले, नगरसेविका अनुराधा खेडकर, नगरसेविका संगीता सावंत, नगरसेविका कौसर बागवान, शहरप्रमुख रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, रमेश खाडे, उदय भोसले, राहुल चव्हाण, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, अरविंद मेढे, विजय जाधव, दादा माने, महिला आघाडीच्या पूजा भोर, अमरजा पाटील, पूजा कामते, सुनिता भोपळे, पूजा आरदांडे आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेंद्रिय गुळापासून जिलेबीप्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सेंद्रीय गुळाच्या जिलेबीच्या स्टॉलचा शुभारंभ

कोल्हापूर/प्रतिनिधी : चव, रंग आणि गोडी यामुळे जगप्रसिध्दी मिळालेल्या कोल्हापुरी गुळापासून आता जिलेबी तयार करण्याची युक्ती शेतकऱ्यांनी लढवली आहे. निमित्त आहे. प्रजासत्ताक दिनाचे. प्रा. अशोक पाटील यांच्या संकल्पनेतून गूळ उत्पादक शेतकरी राजेंद्र करंबे यांनी त्यांच्या शेतात उत्पादित झालेल्या उसाच्या रसापासून हा गूळ तयार करण्यात आला आहे. त्याच गुळाच्या पाकातून जिलेबी तयार केली आहे. मिरजकर तिकटी येथे सुरु करण्यात आलेल्या जिलेबी स्टॉलचा शुभारंभ जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या हस्ते झाला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, नगरसेवक विशाल शिराळे, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे, कृषीअभ्यास डी.बी.चव्हाण, माजी नगरसेवक किरण शिराळे, बाबा पार्टे, सीपीआरचे डॉ. शिरीष मुरगुंडे, शिक्षक नेते पी.के.पाटील, डॉ. नरेंद्र पाटील, जयाकुमार शिंदे, एसएससी बोर्डाचे अधिकारी रणजित देसाई आदी उपस्थित होते.
कोल्हापूरकर नेहमीच वेगळे कांही शोधत असतात, त्यातून साखरेच्या पाकापासून तयार केलेल्या जिलेबीबरोबर कोल्हापुरीतील गुळापासुन तयार केलेल्या जिलेबीचा स्टॉल सर्वानाच आवडेल, असा विश्वास जिल्हा पोलिस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक प्रा. अशोक पाटील यांनी केले. पुढारीचे संपादक डॉ. प्रतापसिहं जाधव यांच्या प्ररेणेने गुळाच्या जिलेबीचा स्टॉल सुरु केला आहे. या जिलेबीसाठी संपूर्णपणे सेंद्रीय गुळाचा वापर केला आहे. त्यामुळे कोल्हापूरशहर वासियांच्याबरोबर भाविक, पर्यंटक यांना ही जिलेबी आवडेल, असेही प्रा. पाटील यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्याला “पर्यटन हब” म्हणून अधिकृत दर्जा द्यावा : आमदार राजेश क्षीरसागर यांची मागणी

राष्ट्रीय पर्यटन दिनी ई – मेल द्वारे केले मागणीचे निवेदन सादर

कोल्हापूर/प्रतिनिधी : देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी पर्यटनाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि जागतिक समुदायामध्ये भारतीय पर्यटनाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय पर्यटन दिन आज २५ जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. कोल्हापूर जिल्हा हा ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक, सांस्कृतिक पर्यटनासह उद्योजक आणि व्यापार पर्यटनाची मोठी क्षमता असणारा जिल्हा आहे. गेल्या अनेक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात देशविदेशातील पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला “पर्यटन हब” म्हणून अधिकृत दर्जा द्यावा, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे कडे केली आहे. मागणीचे निवेदन त्यांनी आज ई- मेल द्वारे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.
या निवेदना पुढे म्हंटले आहे कि, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा धार्मिक सणांसह साप्ताहिक, वार्षिक सुट्ट्यांच्या दिवशीही कोल्हापुरात पर्यटकांची प्रचंड गर्दी पहायला मिळते. एकंदरीत कोल्हापूर जिल्हा एकप्रकारे “पर्यटन हब” च्या दृष्टीने वाटचाल करत आहे. कोल्हापूर जिल्ह्याला “पर्यटन हब” म्हणून अधिकृत दर्जा मिळाल्यास कोल्हापूर हे पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठे आर्थिक केंद्र म्हणून उदयाला येऊ शकते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला “पर्यटन हब” म्हणून अधिकृत दर्जा देणेबाबतची मागणी समस्त कोल्हापूरवासियांकडून केली जात आहे.
कोल्हापूरमध्ये ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनाची मोठी क्षमता असून, यासाठी खालील मुद्दे महत्त्वपूर्ण ठरतात.

धार्मिक वारसा :

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर: हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असून येथे दरवर्षी कोट्यवधी भाविक येतात. यासह खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर, श्री जोतीबा मंदिर, श्री नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर, आदमापूर येथील श्री बाळूमामा मंदिर, पट्टणकोडोली येथील श्री बिरदेव मंदिर, श्री बाहुबली ब्रम्हचर्य आश्रम, श्री कणेरी मठ असा धार्मिक श्रद्धास्थाने कोल्हापूरमध्ये वसली आहेत.

ऐतिहासिक वारसा :

कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत, ज्यांनी मराठा साम्राज्याच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे किल्ले केवळ लष्करी तळ नव्हते, तर त्या काळातील स्थापत्यकलेचे उत्तम नमुने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावनझालेला किल्ले पन्हाळा गड, किल्ले विशाळगड, वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाची साक्ष देणारी पवित्र पावनखिंड, गगनगिरी गड, भुदरगड, रांगणा किल्ला, सामानगड येथील सात दरवाजांची विहीर, यासह न्यू पॅलेस, शालिनी पॅलेस, भवानी मंडप हे कोल्हापूरच्या राजघराण्याचा इतिहास आणि वास्तुकलेचा हा एक उत्तम नमुना आहे.

नैसर्गिक सौंदर्य आणि वन्यजीव :

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्य: गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे अभयारण्य निसर्गप्रेमींना आकर्षित करते. दाजीपूर जंगल: ट्रेकिंग आणि जंगल सफारीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. त्याचबरोबर आंबा घाट हा सह्याद्री वाघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. ‘विशाळगड संवर्धन राखीव क्षेत्रात’ पर्यकांसाठी जंगल सफारी उपलब्ध आहे. कोकण किनारपट्टीशी जवळीक: कोल्हापूर हे गोवा, कोकण तसेच कर्नाटक राज्यात जाणाऱ्या पर्यटकांचे महत्त्वाचे ठिकाण आहे. यासह कोल्हापुरातील ऐतिहासिक रंकाळा तलाव सद्या पर्यटकांचा आकर्षकबिंदू ठरत आहे. यासह जिल्ह्यात उपलब्ध असणारे राधानगरी सह इतर धरणे, नैसर्गिक धबधबे, सनसेट पाँइंट, सह्याद्री पर्वतरांगा, घाट कोल्हापूरच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालत आहेत.

सांस्कृतिक व औद्योगिक ओळख :

कोल्हापूरी खाद्यसंस्कृती: तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ-पाव, गुळ, साखर जगभरात प्रसिद्ध आहे. कोल्हापूरी चप्पल, साज दागिने, चांदीचे दागिने, वस्त्रोद्योग, कास्टिंग, मशिनिंग आणि फाऊंड्री उद्योगांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या औद्योगिक वसाहती, साखर कारखाने, पारंपारिक हस्तकला उद्योग हे कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्र राज्यातील एक प्रगत औद्योगिक जिल्हा बनवत आहेत. यासह नुकत्याच मंजूर झालेल्या सर्किट बेंच, आय.टी. पार्क मुळे कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसागणिक वाढत जाणार आहे.

कला, क्रीडा, शिक्षण, वैद्यकीय नगरी :

राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण, विशेषतः गरीब आणि मागास विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा पाया रचला, ज्यामुळे कोल्हापूरमध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण झाले.  येथे विविध अभ्यासक्रमांसाठी अनेक महाविद्यालये आहेत. शिवाजी विद्यापीठ या विद्यापीठाच्या अखत्यारीत कोल्हापूर, सांगली आणि सातारा हे तीन जिल्हे येतात. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याने शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

राजर्षी शाहू महाराजांच्या काळात संगीत, नाटक, चित्रकला आणि हस्तकला यांसारख्या कलांना राजाश्रय मिळाला, ज्यामुळे अनेक कलाकारांना प्रोत्साहन मिळाले. मराठी चित्रपटसृष्टीची सुरुवात आणि सुवर्णकाळात कोल्हापूरचे मोठे योगदान आहे. या सर्व कलात्मक आणि सांस्कृतिक वारशामुळे कोल्हापूरला खऱ्या अर्थाने ‘कलानगरी’ म्हटले जाते.
राजर्षी शाहू महाराजांनी या नगरीत खेळांचा पाया रचला, जो आजही तितक्याच उत्साहाने जपला जात आहे. कोल्हापूरला “क्रीडानगरी” किंवा “क्रीडापंढरी” म्हणून ओळखले जाते, कारण येथील रक्तातच कुस्ती आणि फुटबॉलसारख्या खेळांची आवड भिनलेली आहे. कोल्हापूर ही कुस्तीगिरांची खाण आहे. येथील खासबाग मैदान हे भारतातील एकमेव गोलाकार कुस्ती मैदान असून, शहरात आणि जिल्ह्यात अनेक “तालीम” (आखाडे) आहेत, जिथे देशविदेशातील मल्ल आजही मातीच्या कुस्तीचे धडे गिरवतात. त्यामुळे कोल्हापूर हे खऱ्या अर्थान कुस्तीचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. कोल्हापूरला ‘महाराष्ट्राचे फुटबॉल हब’ म्हटले जाते. येथे स्थानिक क्लबच्या सामन्यांनाही ६०,००० हून अधिक प्रेक्षक गर्दी करतात. कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक नामवंत फुटबॉल खेळाडूंनी राज्याच्या आणि देशाच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. भारताला पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव याच मातीतील होते. तसेच नेमबाजीमध्ये राही सरनोबत, तेजस्विनी सावंत आणि पोहण्यामध्ये वीरधवल खाडे यांसारख्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचा डंका वाजवला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याने आरोग्यसेवेत मोठी प्रगती केली असून, अत्याधुनिक सुविधा, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आणि वैद्यकीय महाविद्यालयांमुळे गोवा, कोकण आणि कर्नाटकच्या सीमेवरील रुग्णांसाठी कोल्हापूर हे सोयीस्कर ठिकाण आहे, ज्यामुळे येथे वैद्यकीय पर्यटनाला चालना मिळाली आहे.

पायाभूत सुविधा, दळणवळण :

कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि कोकण- गोवा राज्यांना जोडणारा महत्वाचा केंद्रबिंदू आहे. नुकतेच कोल्हापूर विमानतळाचा झालेला विस्तार, प्रस्तावित कोल्हापूर - कोकण रेल्वेमार्ग, शक्तीपीठ महामार्ग, सोलापूर - रत्नागिरी महामार्ग यामुळे वाहतुकीची कनेक्टीव्हिटी वाढणार आहे. यासह आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर, पूरनियंत्रण प्रकल्प, यामुळे पायाभूत सुविधांचाही विकास होणार आहे. 

वरील सर्व बाबींचा विचार होवून कोल्हापूरला अधिकृत ‘पर्यटन हब’ चा दर्जा देणेबाबत शासन स्तरावर सकारात्मक निर्णय व्हावा, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी निवेदनातून केली आहे.

छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस मराठी ६’चा डंका !

रितेश भाऊंच्या ‘लयभारी’ स्वॅगने बहरला ग्रँड प्रीमियर!

कोल्हापूर/प्रतिनिधी: “शेकडो दारं, अनेक सदस्य… आणि एकच बॉस!” असं म्हणत सुरू झालेल्या ‘बिग बॉस मराठी ६’ च्या अभूतपूर्व यशाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. या सिझनच्या पहिल्याच आठवड्यात रितेश भाऊंने सर्वांचं मन जिंकलं आहे. रितेश भाऊंचा तोच कडक अंदाज, त्यांचा जबरदस्त स्वॅग आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्याची त्यांची खास शैली यामुळे हा सिझन घराघरांत पोहोचला आहे. रितेश भाऊंच्या जादूने यंदा केवळ टीव्हीच नाही, तर डिजिटल जगतावरही अधिराज्य गाजवलं असून, खऱ्या अर्थाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली मोहोर उमटवली आहे. कलर्स मराठी आणि JioHotstar वर एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या या सिझनने लोकप्रियतेचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत.
कलर्स मराठीवर, ग्रँड प्रीमियर आणि दैनंदिन भागांना जोरदार सुरुवात मिळाली असून, लाँचिंगच्या पहिल्याच आठवड्यात ३३ लाखांहून अधिक प्रेक्षकांनी हा कार्यक्रम पाहिला. ‘बिग बॉस मराठी’च्या आगमनामुळे मराठी जनरल एंटरटेनमेंट चॅनेलच्या (GEC) प्रेक्षकसंख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ दिसून आली आहे; ३४ GRPs वरून ७७ GRPs पर्यंत झालेली ही २.३ पट वाढ या शोची जनमानसातील पकड अधोरेखित करते. जिओ स्टार पहिल्या भागाच्या ‘रीच’मध्ये ५ व्या सीझनच्या प्रीमियरच्या तुलनेत २.२ पट आणि ‘वॉच-टाइम’मध्ये ६.५ पट वाढ नोंदवण्यात आली. पहिल्या आठवड्यात जिओ स्टारवर देखील हा वेग कायम राहिला; गेल्या सीझनच्या तुलनेत व्हिडिओ व्ह्यूजमध्ये १.८ पट आणि वॉच-टाइममध्ये १.३ पट वाढ झाली असून, हे प्रेक्षकांचा वाढता कल आणि वारंवार पाहिल्या जाणाऱ्या संख्येचे निदर्शक आहे..
या अभूतपूर्व यशाचे मोठे श्रेय जाते ते म्हणजे महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार आणि शोचा होस्ट रितेश देशमुख यांना. प्रोमो रिलीज झाल्यापासूनच रितेश भाऊंच्या कडक डायलॉग्स नी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. “मागचा सिझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय… आहात ना तय्यार!” या त्यांच्या वाक्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली होती. ग्रँड प्रीमियर च्या दिवशी रितेश भाऊंचा तो अस्सल महाराष्ट्रीयन स्वॅग, ‘लार्जर-दॅन-लाईफ’ परफॉर्मन्स आणि त्यांच्या एन्ट्री ने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. त्यांचं प्रभावी सूत्रसंचालन, आणि त्यांच्या शब्दांमधली धार यामुळे ग्रँड प्रीमियर ची रंगत अजूनच वाढली. या सगळ्यामुळेच सिझन ६ चा ग्रँड प्रीमियर हा विक्रमी टीआरपी मिळवणारा कार्यक्रम ठरला आहे. बिग बॉस मराठीच्या घरात १७ सदस्यांनी मोठ्या दिमाखात एंट्री घेतली, आणि संपूर्ण आठवडा प्रेक्षकांना राडा, भांडणं, मैत्री, याने खिळवून ठेवले.

बँकांचे खाजगीकरण हे कर्मचाऱ्यांसमोरील मोठे आव्हान : राष्ट्रीय सरचिटणीस सी.एच.वेंकटाचलम

महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या त्रैवार्षिक अधिवेशनास कोल्हापुरात प्रारंभ

कोल्हापूर/प्रतिनिधी : खाजगीकरण हे बँक कर्मचाऱ्यांसमोर सध्या मोठे आव्हान आहे. सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशात बँकांच्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी सध्या राष्ट्रीय संघर्षाला सुरुवात झालेली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात होणारे हे कर्मचाऱ्यांचे अधिवेशन महत्त्वाचे आहे. संघटनेमुळे कर्मचाऱ्यांना धैर्य मिळते. आपल्या हक्कासाठी लढण्याचे बळ मिळते. आज बँकांमध्ये जनतेचे २.२५ लाख कोटी आहेत. त्याचे संपूर्ण संरक्षण करण्याची जबाबदारी ही बँक कर्मचाऱ्यांवर आहे.नवीन आर्थिक धोरण, उदारीकरण या नावाखाली सरकारने खाजगीकरणाचा घाट घातला आहे. बँकेतील ठेवीमुळे देशाला भांडवल मिळते. पण जर खाजगी बँका अस्तित्वात आल्या तर त्याच्यावर सरकारचे नियंत्रण राहणार नाही.आणि कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ येईल. याला जबाबदार कोण असेल? असा सवाल ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे सरचिटणीस कॉम. सी. एच वेंकटाचलम यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना केला.
महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या त्रैवार्षिक अधिवेशन कोल्हापुरातील सायबर कॉलेज येथील आनंद भवन येथे होत आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, मोठ्या बँकांच्या तुलनेत लहान बँकांची गुणवत्ता ही जास्त चांगली आहे. तरीही सरकारकडून छोट्या बँकांचे विलीनीकरण सुरू आहे.गेल्या दहा वर्षांपूर्वी बँक कर्मचारी संख्या कमी झाली असून अधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने ग्राहकाला सेवा कशी देणार? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.सध्या दोन लाख जागा रिक्त असून कर्मचाऱ्यांना कंत्राट बेसिसवर घेण्याच धोरण आखले जात आहे.बँकेचे कर्ज हे गरजू आणि विकसनशील क्षेत्राला मिळणे आवश्यक आहे.बँका नफेखोरीसाठी कार्यरत आहेत.बँक कर्जाचे बुडीत प्रमाण वाढलं आणि अनेक कर्जे माफ केली गेली. हे पैसे सर्वसामान्य लोकांचे आहेत. याविरुद्ध लढा देण्यासाठी संघटना आणि एकात्मतेच्या जोरावरच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे भवितव्य ठरणार आहे.असे देखील सी.एच वेंकटाचलम म्हणाले.

        सर्वांनी एकत्र येऊन संघटितपणे काम केल्याशिवाय आपल्याला न्याय मिळत नाही. बँक कर्मचारी हे सर्वसामान्यांसाठी काम करतात. त्यांच्या पैशांचे संरक्षण करतात. आज जवळजवळ सगळेच लोक हे बँकांवर अवलंबून आहेत. आज जर बँक कर्मचारी अडचणीत  असतील तर त्यांनी एकत्रितपणे आपल्या हक्कासाठी लढल्याशिवाय त्यांना न्याय मिळणार नाही. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी दिली.

        बँकांचे विलीनीकरण करून अगदी मोजक्याच बँका देशांमध्ये चालवायच्या. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण करायचे. याला महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज संघटनेचा तीव्र विरोध आहे. तसेच खाजगी बँकांमध्ये विदेशी भांडवल आणून या देशाचे आर्थिक स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व धोक्यात येईल. ग्रामीण बँकांचेही खाजगीकरण झाले तर सहकार तत्त्वावर चाललेल्या बँका तसेच ग्रामीण पतपेढ्या यांचे अस्तित्व संपेल. ही धोक्याची घंटा आहे. महाराष्ट्रामधील मुंबई हे एक मोठे भांडवल देणारे आणि सर्व बँकांची मुख्यालय असणारे शहर आहे. त्यामुळे तेथील बँक कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक भूमिका घ्यावे लागेल. आणि संघर्षाची प्रतिमा आपल्याला पुढे न्यायची आहे. अशी भूमिका संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम. देविदास तुळजापूरकर यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात मांडली.

            बँकांचे खाजगीकरण हा मुद्दा फक्त आर्थिक धोरणानुसार नसून हा आंतरराष्ट्रीय विषय आहे. विदेशी लोक भारतात येऊन गुंतवणूक करणार आणि सरकारच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर आज भारतात बँक कर्मचारी संघर्ष करत आहेत. हा विरोधाभास आहे. पण अमेरिकेने भारतावर जो आर्थिक बोजा टाकलेला आहे त्याला सरकार कोणतेही प्रत्युत्तर देत नाही. कारण भारताचे राजकारण हे, जसे अमेरिकेला हवे आहे तसेच सुरू आहे . आंतरराष्ट्रीय व्यापक राजकारणाचा एक भाग म्हणजे बँकांचे खाजगीकरण करणे असा आहे.असे मत माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी व्यक्त केले. नोटाबंदीची कल्पना खुद्द अर्थमंत्र्यांना आणि अर्थ सल्लागारांना देखील नव्हती. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना बँक राष्ट्रीयकरणामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा झाली. आणि एक नवीन मध्यमवर्ग निर्माण झाला. आर्थिक चलनवलन वाढले. पण आता खाजगीकरणामुळे बँक कर्मचाऱ्यांवर मोठे संकट येणार आहे. यासाठी एकत्रितपणे याला विरोध केला पाहिजे. अशी अपेक्षा पत्रकार कुमार केतकर यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमास कॉम.देविदास तुळजापूरकर,कॉम.ललिता जोशी, कॉम.एन.शंकर,कॉम.जयराम,कॉम महेन्द्र प्रभुलकर, कॉम.अक्षय स्वामी, महिंद्र ताटे,मकरंद करंदीकर उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेचे “त्रैवार्षिक अधिवेशन” येत्या २४ आणि २५ जानेवारी रोजी कोल्हापुरात

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेचे (महाराष्ट्र स्टेट बैंक एम्प्लॉइज फेडरेशन) त्रैवार्षिक राज्यस्तरीय अधिवेशन” येत्या शनिवारी आणि रविवारी दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी कोल्हापूर येथे होत आहे. या अधिवेशनास विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील सुमारे ५०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होत असून, ते बँक कर्मचारी चळवळीचे प्रतिनिधित्व करणार आहेत. हे दोन दिवसीय अधिवेशन सायबर कॉलेज येथील आनंद भवन येथे होणार आहे,अशी माहिती संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम.देविदास तुळजापूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

या अधिवेशनात सार्वजनिक क्षेत्रातील बँका, जुन्या खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी सहकारी बँका तसेच विदेशी बँकांमधील कर्मचारी प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

या अधिवेशनाचे उद्घाटन ऑल इंडिया बैंक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) चे अखिल भारतीय जनरल सेक्रेटरी कॉ. सी. एच. वेंकटाचलम यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभेचे माजी खासदार कुमार केतकर तसेच कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

हा उद्घाटन सोहळा शनिवार दि. २४ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वाजता होणार आहे.
या अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वागत समितीचे अध्यक्ष सतेज (बंटी) पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यातील बैंक कर्मचारी संघटनांचे कार्यकर्ते जोमाने तयारी करत आहेत.
याच दिवशी सायंकाळी ५:०० वाजता, त्याच ठिकाणी तरुण सिने दिग्दर्शक, लोकसत्ता दैनिकाचा ‘तरुण तेजांकित’ पुरस्कारप्राप्त वरुण सुखराज यांच्या निर्मितीतील “दि
ग्रेट बैंकिंग इल्यूजन” या माहितीपटाचा प्रीमियर शो आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास वरुण सुखराज स्वतः उपस्थित राहणार आहेत.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी दि. २५ जानेवारी रोजी सकाळी १०:०० वाजता, त्याच ठिकाणी नवीन कामगार कायदे या अत्यंत महत्वाच्या विषयावर
निवृत्त प्रादेशिक कामगार आयुक्त
धनराज एस. जाधव यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
सध्या केंद्र सरकारकडून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांबाबत पुन्हा एकदा एकत्रीकरण व खाजगीकरणाची धोरणे राबवण्याची भाषा केली जात आहे. संघटनेचा या धोरणांना ठाम विरोध असून, यामुळे सामान्य नागरिकांच्या ठेवी असुरक्षित होण्याचा धोका निर्माण होतो. शेतकरी, छोटे व्यापारी व लघुउद्योग पुन्हा एकदा बँकिंग व्यवस्थेच्या बाहेर फेकले जाण्याची शक्यता आहे, कारण खाजगी बँका प्रामुख्याने नफ्यावर आधारित कार्य करतात.
संघटनेची अशी ठाम भूमिका आहे की, बँकिंग सेवा ही मूलभूत हक्क म्हणून घोषित झाली पाहिजे. तसेच सामान्य बचत खातेदारांकडून कोणतेही सेवा शुल्क आकारले जाऊ नये. याशिवाय कॉर्पोरेट थकबाकीदारांकडून कोणतीही सवलत न देता संपूर्ण थकबाकी वसूल केली जावी. अशी संघटनेची ठाम मागणी आहे.
या अधिवेशनात बँकिंग उद्योगाशी संबंधित असंघटित कर्मचारी बैंक मित्र, आऊटसोर्ड व कंत्राटी कर्मचारी – यांना संघटित करण्यासाठी विशेष पुढाकार घेण्यात येणार आहे. तसेच पुरेशी नोकरभरती, पाच दिवसांचा आठवडा लागू करणे आदी महत्त्वाच्या मागण्यांवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे.
या अधिवेशनाच्या निमित्ताने बैंकिंग उद्योग आणि बँक कर्मचारी चळवळीसमोरील सर्व महत्वाच्या प्रश्नांवर सखोल आणि व्यापक चर्चा घडून येईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. पत्रकार परिषदेस कॉम.जयराम,कॉम महेन्द्र प्रभुलकर, कॉम.अक्षय स्वामी, कॉम एन शंकर, महिंद्र ताटे,मकरंद करंदीकर, उपस्थित होते.

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “रस्ता सुरक्षा” अभियानांतर्गत जाणीव जागृती मार्गदर्शन कार्यक्रम

कोल्हापूर, अतिग्रे : रस्ता अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी व तरुण पिढीत रस्ता सुरक्षेबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत जाणीव जागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इचलकरंजी परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. विजय इंगवले, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अंकिता वांडेकर, सहाय्यक निरीक्षक श्री. अजिंक्य डुबल, सहाय्यक निरीक्षक अनुसया माळी, निरीक्षक. कुलकर्णी इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, विद्यार्थी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी इंगवले यांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व अत्यंत उदाहरणासह अधोरेखित केले. ते म्हणाले, “रस्ता सुरक्षा नियमांचे पालन केल्याने केवळ शासकीय दंड टळत नाही, तर स्वतःच्या व इतरांच्या अमूल्य प्राणांचेही संरक्षण होते.” विद्यार्थ्यांकडे देशाच्या भवितव्याची धुरा असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, “आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. त्यांनी वाहतूक नियम काटेकोरपणे पाळले, तर अपघातांचे प्रमाण निश्चितच घटेल. सुरक्षित वाहतूक संस्कृतीमुळे देश, राज्य आणि गावाचा सर्वांगीण विकास साध्य होईल.” रस्ता सुरक्षा ही केवळ नियमांची अंमलबजावणी नसून, ती सामाजिक जबाबदारी आणि संवेदनशीलतेची जाणीव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नवीन रुजू झालेले सहाय्यक निरीक्षक अजिंक्य डुबल यांनी विद्यार्थ्यांना रस्त्यावरील नियमावली, वाहन चालवताना पाळावयाची शिस्त, हेल्मेट व सीट बेल्टचे महत्त्व, वेगमर्यादा, सिग्नलचे पालन आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेचे नियम समजावून सांगत सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व पटवून दिले.

या मार्गदर्शन कार्यक्रमास संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन श्री. संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.

शेतामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरणारे दोन चोरटे जेरबंद

शेतामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरणारे दोन चोरटे जेरबंद

एकुण २,७०,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कामगिरी

कोल्हापूर/प्रतिनिधी : दिनांक ०७/१२/२०२५ रोजी दुपारी १२.१५ वा. चे सुमारास खळखळीचा माळ नावाचे शेतात आदमापूर, ता. भुदरगड येथे फिर्यादी लक्ष्मीबाई सर्जेराव भोसले व.व.६७, रा. आदमापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर ह्या व त्यांचे सोबत लक्ष्मी दिनकर पाटील रा. आदमापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर अश्या दोघीजण शेतात काम करीत असताना दोन अज्ञात इसम तेथे येवुन लक्ष्मीबाई यांचेकडून पिण्यासाठी पाणी मागून घेवुन पाणी पिवुन परत जाण्याचा बहाणा करून फिर्यादी व लक्ष्मी यांचे पाठीमागून येवून त्यापैकी एका इसमाने लक्ष्मीबाई भोसले यांचे गळ्यातील सोन्याचे प‌ट्टीमध्ये असलेले मंगळसूत्र व दुसऱ्या इसमाने लक्ष्मी पाटील यांचे गळ्धातील सोन्याची एकसर माळ जबरदस्तीने हिसडा मारून हिसकावून घेवून तेथून पळुन गेलेबाबत फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरून भुदरगड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३१६/२०२६ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०४, ३(५) प्रमाणे दिनांक ०७/१२/२०२५ रोजी २२.३६ वा. गुन्हा नोंद आहे.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून मा. पोलीस अधीक्षक, श्री. योगेश कुमार साो यांनी गुन्हा उघडकीस आणणेच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. मा. पोलीस अधीक्षक सो यांनी दिले सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक, श्री. सुशांत चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांचे तपास पथक तयार करून त्यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टिने मार्गदर्शन करून तपास सुरू केला. सदर तपास पथकामार्फत अज्ञात आरोपीचा सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदारामार्फत माहीती काढून शोध घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार राजु कोरे, योगेश गोसावी व अमित सर्जे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, भुदरगड पोलीस ठाणे गु.र.नं. ३१६/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०४, ३(५) प्रमाणे दाखल गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार राम केंद्रे रा पुणे याने त्याचे साथीदारासह मिळून केला असून तो व त्याचा साथीदार असे किणी, ता. हातकणंगले गावचे हद्दीतील पुणे ते बेंगलोर जाणारे रोडवरील माऊली पान शॉप जवळ येणार आहेत. मिळाले माहितीचे अनुषंगाने तपास पथकाने किणी, ता. हातकणंगले गावचे हद्दीतील पुणे ते बेंगलोर जाणारे रोडवरील माऊली पान शॉप जवळ सापळा लावून आरोपी नामे राम ज्ञानोबा केंद्रे व.व. २७, रा. मौजे खोकलेवाडी, ता. गंगाखेड, जि. परभणी, सध्या रा. शिवाजी चौक, साखरेवस्ती, हिंजवडी, ता. मुळशी, जि. पुणे, मनोज शिवाजी लंगडे व.व. ३४, रा. तगरखेडा, पोष्ट औराद शहाजनी, ता.निलंगा, जि. लातूर, सध्या रा. नेऊर फाटा, सोलापूर रोड, पुणे यांना ताब्यात घेवून त्यांचे कब्जातून गुन्ह्यातील जबरदस्तीने चोरलेले १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पट्टीमध्ये तुटलेले मणीमंगळसुत्र व अंदाजे ०५ ग्रॅम वजनाचे सोन्याची एकसर माळ असा एकुण २,७०,०००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली असून जप्त मुद्देमालासह आरोपीना पुढील कायदेशीर कारवाईकामी भुदरगड पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले आहे.
आरोपी राम ज्ञानोबा केंद्रे यांच्यावर यापुर्वी देखील पुणे, रायगड, लातुर जिल्ह्यातील पोलीस ठाणेमध्ये चोरीचे एकुण १२ गुन्हे व आरोपी,मनोज शिवाजी लंगडे याचेवर कोंडवा पोलीस ठाणे, पुणे येथे चोरीचा ०१ गुन्हा नोंद आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार , मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. डॉ. बी. धीरजकुमार बच्चु यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अतिश म्हेत्रे, अनिल जाधव पोलीस अंमलदार संजय देसाई, राजु कोरे, योगेश गोसावी, समीर कांबळे, रोहीत मर्दाने, अमित सर्जे, अमित मर्दाने, सतिश सुर्यवंशी, राजेंद्र ताटे, अमर वासुदेव यांनी केली आहे.