Grid Posts

View All
माय मराठी

बिद्रीत गर्भलिंग तपासणीचा काळाबाजार; डॉक्टर-एजंट पकडले,साडे बारा लाखांसह फॉर्च्युन कार जप्त

ग्लोबल ताज्या देश प्रीमियम महाराष्ट्र माय मराठी

मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करूया: जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या बैठकीतील संकल्प

माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

माय मराठी

शहरातील टायर विक्री आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या भव्य शोरूमचे कळंबा येथे उद्घाटन

माय मराठी

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन

Thumbnail

View All
My Marathi

भक्तीची पाऊलवाट आणि माणुसकीची थाप: जोतिबाच्या चैत्र यात्रेतील बैलगाड्यांची परंपरा

माय मराठी

देशभरातील दुर्मिळ कारागिरी ३१ मार्च ते ४ एप्रिल  सिद्धगिरी मठावर पाहायला मिळणार

महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन पंचगंगा घाटावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन शासकीय इतमामात पंचगंगा  घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार, इतिहासाचे समृद्ध पान अनंतात विलीन

माय मराठी

बिद्रीत गर्भलिंग तपासणीचा काळाबाजार; डॉक्टर-एजंट पकडले,साडे बारा लाखांसह फॉर्च्युन कार जप्त

My Marathi

अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीचा विवाह ; पतीसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा

Tile List

View All
My Marathi

कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा पुरवठा; अफवांवर विश्वास ठेवून ‘पॅनिक बायिंग’ करू नका: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा पुरवठा; अफवांवर विश्वास ठेवून 'पॅनिक बायिंग' करू नका: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन   कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात आयओसीएल, एचपीसीएल आणि बीपीसीएल…

ग्लोबल ताज्या देश प्रीमियम महाराष्ट्र माय मराठी

मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करूया: जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या बैठकीतील संकल्प

My Marathi

सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय हिंदू, शीख आणि बौद्धांनाच अनुसूचित जातीचा दर्जा

माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

Tile Posts

View All
My Marathi माय मराठी

नुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी पदभार स्वीकारला

My Marathi

महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम’ (MRDP) राबविण्यास मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागर

'महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम' (MRDP) राबविण्यास मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागर आपत्ती व्यवस्थापनास बळकटी देण्याकरिता विविध उपाययोजना राबविण्यात…

My Marathi

बागल चौक ते बी.टी.काँलेज परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई

My Marathi

सीपीआर रुग्णालयातील दुरुस्ती कामांना प्रारंभ; गोदावरी प्रवेशद्वार तात्पुरते बंद

सीपीआर रुग्णालयातील दुरुस्ती कामांना प्रारंभ; गोदावरी प्रवेशद्वार तात्पुरते बंद कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीतील छत्रपती…

List Posts

View All
My Marathi

‘गोकुळ’चे शिल्‍पकार माजी चेअरमन स्‍व. आनंदराव पाटील-चुयेकर यांची ८८ वी जयंती गोकुळमध्‍ये साजरी

'गोकुळ’चे शिल्‍पकार माजी चेअरमन स्‍व. आनंदराव पाटील-चुयेकर यांची ८८ वी जयंती गोकुळमध्‍ये साजरी   कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुंबई

रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच; विद्रुपीकरण होवू देणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर

रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच; विद्रुपीकरण होवू देणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर   कोल्हापूर/प्रतिनिधी : गेल्या काही वर्षात…

My Marathi

गोकुळ’मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी

‘गोकुळ’मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संघ (गोकुळ) च्या वतीने ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारातील…

My Marathi

रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर डिजिटलवर; भव्य स्टारकास्टमुळे उत्सुकता शिगेला

रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर डिजिटलवर; भव्य स्टारकास्टमुळे उत्सुकता शिगेला कोल्हापूर/प्रतिनिधी : जिओ स्टुडिओज आणि मुंबई…

Thumbnail

View All
My Marathi

जोतिबा भक्तांची श्रद्धा गायमुखावर: भक्तांच्या विधिवत पूजनाने अन्नछत्राचा मंगल प्रारंभ झाला!

My Marathi

भक्तीची पाऊलवाट आणि माणुसकीची थाप: जोतिबाच्या चैत्र यात्रेतील बैलगाड्यांची परंपरा

माय मराठी

देशभरातील दुर्मिळ कारागिरी ३१ मार्च ते ४ एप्रिल  सिद्धगिरी मठावर पाहायला मिळणार

महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन पंचगंगा घाटावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन शासकीय इतमामात पंचगंगा  घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार, इतिहासाचे समृद्ध पान अनंतात विलीन

माय मराठी

बिद्रीत गर्भलिंग तपासणीचा काळाबाजार; डॉक्टर-एजंट पकडले,साडे बारा लाखांसह फॉर्च्युन कार जप्त

माय मराठी

राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग प्रा. लि. तर्फे, शिरोली (कोल्हापूर), येथे अत्याधुनिक दागिने उत्पादन कारखाना चे भव्य उद्घाटन

राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग प्रा. लि. तर्फे, शिरोली (कोल्हापूर), येथे अत्याधुनिक दागिने उत्पादन कारखाना चे भव्य उद्घाटन …. कोल्हापूर/प्रतिनिधी : गुजरीच्या…

माय मराठी

पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील…

माय मराठी

एनआयटीमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

एनआयटीमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण कोल्हापूर/प्रतिनिधी : उंचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या (आधीचे न्यू पॉलिटेक्निक) ऑटोमोबाईलच्या १९९१ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी…

माय मराठी

एनआयटीमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

एनआयटीमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण कोल्हापूर/प्रतिनिधी : उंचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या (आधीचे न्यू पॉलिटेक्निक) ऑटोमोबाईलच्या १९९१ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी…

माय मराठी

पतसंस्थांमधील एक लाख रुपये पर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देण्याचा विचार; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

पतसंस्थांमधील एक लाख रुपये पर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देण्याचा विचार; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील सहकारी पतसंस्थांच्या समस्या’ या विषयावर आरोग्यमंत्री प्रकाश…

माय मराठी

दिवाळी सुट्टीत सीपीआरचा बाह्यरुग्ण विभाग सुरु

दिवाळी सुट्टीत सीपीआरचा बाह्यरुग्ण विभाग सुरु कोल्हापूर/प्रतिनिधी : २० ते २३ ऑक्टोबर या कालावधीत दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. या कालावधीत…

माय मराठी

पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्याबाबत समितीने अभ्यास करून प्रस्ताव द्यावा – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ

पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्याबाबत समितीने अभ्यास करून प्रस्ताव द्यावा – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ मुंबई/प्रतिनिधी : राज्यातील पत्रकारांना कॅशलेस…

माय मराठी

थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र’ अंतर्गत सिने अभिनेते जॅकी श्रॉफ करणार सहकार्य

‘थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र’ अंतर्गत सिने अभिनेते जॅकी श्रॉफ करणार सहकार्य आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची सदिच्छा भेट मुंबई/कोल्हापूर/प्रतिनिधी : हिंदी…

माय मराठी

नियोजनबद्ध शेतीतून उत्पादकता वाढ शक्य – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

नियोजनबद्ध शेतीतून उत्पादकता वाढ शक्य – पालकमंत्री प्रकाश आबिटकर जिल्ह्यात कृषी समृद्धी योजनेचा शानदार शुभारंभ; तेलबिया उत्पादन प्रशिक्षण सत्राचे आयोजन…

माय मराठी

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी यशराज पाटील याचा एनडीए २०२५ परीक्षेत भारतात १८ वा क्रमांक

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी यशराज पाटील याचा एनडीए २०२५ परीक्षेत भारतात १८ वा क्रमांक कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल…

राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग प्रा. लि. तर्फे, शिरोली (कोल्हापूर), येथे अत्याधुनिक दागिने उत्पादन कारखाना चे भव्य उद्घाटन

राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग प्रा. लि. तर्फे, शिरोली (कोल्हापूर), येथे अत्याधुनिक दागिने उत्पादन कारखाना चे भव्य उद्घाटन ….

कोल्हापूर/प्रतिनिधी : गुजरीच्या गल्लीत एका छोट्याशा दुकानातून सुरू झालेला प्रवास आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला असून राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग प्रा. लि., या नामांकित दागिन्यांच्या कंपनीने आपल्या अत्याधुनिक दागिन्यांच्या निर्मिती युनिटचे भव्य उद्घाटन शिरोली (कोल्हापूर) येथे करण्यात आले.

राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींगची स्थापना सन १९७३ मध्ये श्री. हंजारीमलजी राठोड यांच्या पुढाकाराने झाली होती. व्यवसायाची सुरुवात राठोड परिवाराचे कुटुंबप्रमुख श्री. हंजारीमलजी राठोड यांनी गुजरी येथून एका छोट्या दुकानातून केली, पुढे जाऊन प्रतिभा नगर मध्ये दागिने मॅन्युफॅक्चरिंग करिता एक छोटा कारखाना सुरू केला, त्यापुढे चंद्रकांत राठोड यांनी शिरोली येथे एका छोट्या युनिटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग चे काम वाढवत सुरू ठेवले, आणि त्यापुढे जयपुर मध्ये (राजस्थान) येथे त्यांनी अजून एक अत्याधुनिक जयपूरची राजस्थानी ट्रेडिशनल ज्वेलरी बनवण्याचा कारखाना देखील सुरू केला आहे.गेल्या पाच दशकांपासून उत्कृष्ट गुणवत्ता, विश्वासार्हता आणि नवकल्पनांमुळे राठोड ज्वेलर्स हे नाव दागिन्यांच्या जगतात अग्रस्थानी राहिले आहे.                                                                                              राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग ही नवी अत्याधुनिक उत्पादन सुविधा कंपनीच्या उद्योजकीय वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा आहे. कंपनी आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुवर्ण ज्वेलरी ब्रँड्सना मोठ्या प्रमाणावर दागिन्यांचा पुरवठा करते. उपलब्ध माहितीनुसार, राठोड ज्वेलर्स मॅन्युफॅक्चरींग प्रा. लि. उच्च प्रतीचे सोन्याचे दागिने (उदा. अँटिक गोल्ड, अनकट डायमंड, पोलकी चे हार, कुंदन व जडाऊ दागिने, कष्टमाइज्ड डिझाइनर ज्वेलरी) असे विविध प्रकारचे दागिने उत्पादन करण्यासाठी ओळखली जाते.

नवीन ज्वेलरी उत्पादन कारखान्याच्या उद्घाटन सोहळ्यास जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. प्रकाश आबिटकर , खासदार श्री. धनंजय म्हाडीक , खासदार श्री. धैर्यशील माने , आमदार श्री. सतेज पाटिल , आमदार श्री. राहुल अवाडे , माजी खासदार श्री. संजय मंडलिक, सुपरिटेंडेंट ऑफ़ पुलिस श्री. योगेशजी गुप्ता, मालाबार गोल्डचे व्हॉइस प्रेसिडेंट श्री. के. पी. अब्दुलसलाम, जॉयलुकासचे श्री. सुरेशभाई जैन, विविध मान्यवर, स्थानिक उद्योगपती तसेच राठोड परिवार आणि त्यांच्या जिवलग मित्रमंडळींची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी राठोड ज्वेलर्सच्या यशस्वी प्रवासाचे कौतुक करत, या नव्या अत्याधुनिक युनिटमुळे (कारखाना) कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक विकास आणि स्थानिक रोजगार निर्मितीस चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आणि कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे उदगार काढले.

मान्यवरांनी यावेळी राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. चंद्रकांत राठोड आणि त्यांच्या कुटुंबाचे (पत्नी रूपाली , कन्या रीवा , चिरंजीव हीद्रय ) अभिनंदन केले. गुजरीमधील छोट्या दागिन्यांच्या कारखान्यापासून ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरवठादार कंपनीपर्यंतच्या या यशस्वी वाटचालीवर मान्यवरांनी प्रकाश टाकला आणि कोल्हापूरच्या पारंपरिक सुवर्ण कारागिरीला आधुनिकतेची जोड देऊन जागतिक स्तरावर नेल्याबद्दल कौतुक केले.

यावेळी बोलताना मा. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राठोड यांनी छोट्याशा दुकानातून सुरू केलेला व्यवसाय हा आता नवीन कारखान्याच्या रूपाने पुढे आला आहे, अथक परिश्रमातून राठोड कुटुंबियांनी आपला व्यवसाय वृद्धिगत केला आहे असे सांगून त्यांच्या या दागिने उद्योग क्षेत्राबरोबर आता कोल्हापूरमध्ये राठोड कुटुंब यांनी दागिन्यांची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी उभा करून कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून याद्वारे कोल्हापूरची ओळख सर्व दूर होणार असून दागिने बनविण्याचा कारखाना सुरू करून कोल्हापूरमध्ये एक अभिमानास्पद काम केले आहेत असे सांगितले.

यापुढे बोलताना खासदार मा. धैर्यशील माने यांनी राठोड कुटुंबाची उतुंग भरारी ही कोल्हापूरसाठी अत्यंत महत्त्वाची बाब असून पश्चिम महाराष्ट्रात यामुळे कोल्हापूरचे नाव सर्व दूर पोहोचलेले आहे कोल्हापूर मधील हुपरी हे गाव चांदी व्यवसायासाठी परिचित आहे तसेच राठोड कुटुंबाचे नाव या दागिने व्यवसायामध्ये सर्वदूर पोहोचणार आहे. राठोड मॅन्युफॅक्चरिंग कारखान्या मुळे कोल्हापूरच्या दागिन्यांची ओळख आता सर्व दूर पोहोचणार असल्याचे सांगितले.

त्यानंतर बोलताना खासदार मा. धनंजय महाडिक यांनी चंद्रकांत राठोड यांचे कोल्हापूर मध्ये नवीन अत्याधुनिक मशिनरी सह दागिने बनवण्याचा मॉर्डन कारखानासुरू एक मोठे युनिट आज पासून सुरू होत असून, असा भव्य दिव्य कारखाना कोल्हापूर मध्ये आता राठोड यांच्यामुळे पहावयास मिळणार आहे ही कोल्हापूरच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची गोष्ट आहे असे सांगितले.

यावेळी बोलताना आमदार मा. सतेज पाटील यांनी कोल्हापूरचे नाव अनेक क्षेत्रात पुढे आहे तसेच आता दागिन्याच्या बाबतही राठोड यांच्यामुळे आणखी पुढे येणार असून राठोड यांनी कला दाखविण्याची एक संधी उपलब्ध करून दिली आहे.राठोड कुटुंबातील तिसरी पिढी रीवा आणि ह्रदय यांनी आपल्या कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उत्तुंग भरारी घेतली असल्याचे नमूद केले.

यावेळी बोलताना मलाबार गोल्ड चे व्हॉइस प्रेसिडेंट श्री.. के.पी अब्दुल सलाम यांनी बोलताना राठोड कुटुंबाचे अभिनंदन केले.या अत्याधुनिक उत्पादन युनिटमध्ये नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च दर्जाचे सोन्या-चांदीचे दागिने तयार केले जाणार आहेत. जागतिक दर्जाची गुणवत्ता, कुशल कारागीर आणि नाविन्यपूर्ण डिझाईन्स यांच्या माध्यमातून ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देणे हे राठोड ज्वेलर्सचे ध्येय आहे.

राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि. नेहमीप्रमाणे ग्राहकांचा विश्वास, उत्कृष्टता आणि परंपरेचा वारसा पुढे नेत भारतीय दागिन्यांच्या उद्योगात नवे मानदंड प्रस्थापित करण्यास कटिबद्ध आहे.राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग च्या नव्या युनिटमुळे कोल्हापूरच्या सुवर्ण उद्योगाला नवी दिशा मिळेल, तसेच या क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.राठोड परिवार तर्फे चंद्रकांत राठोड यानी सर्व उपस्थिताचे आभार मानले.

पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी वाय पाटील (दादासाहेब) यांचा ९० वा वाढदिवस बुधवारी कौटुंबिक वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील निवासस्थानी कुटुंबीयांनी औक्षण करून त्यांना दीर्घायुष्यसाठी शुभेच्छा दिल्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी दादासाहेबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी १९८४ साली कसबा बावडा येथे पहिले अभियांत्रिकी महविद्यालय सुरू केले. त्यानंतर कोल्हापूर, मुंबई व पुणे येथे डी.वाय’ पाटील ग्रुपचा विस्तार करत अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, व्यवस्थापन, आर्किटेक्चर, हॉस्पीटल, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था सुरू केल्या. दादासाहेबांच्या दूरदृष्टी नेतृत्वातून आज ८ विद्यापीठे, १७ अभियांत्रिकी महाविद्यालये, १८२ संस्था, २२ हजाराहून अधिक कर्मचारी, सव्वा चार लाखाहून अधिक माजी विद्यार्थी असा संस्थेचा मोठा विस्तार झाला आहे.
शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या दादासाहेबांनी बुधवारी ९१व्या वर्षात पदार्पण केले. कुटुंबीयांनी औक्षण करून दादासाहेबांना निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत आशीर्वाद घेतले. दादासाहेबाच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी सौ. शांतादेवी डी. पाटील, डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज डी. पाटील, सौ. राजश्री काकडे, डॉ. प्रिया चोलेरा, सौ. वैजयंती संजय पाटील, श्री. मेघराज काकडे, डॉ. प्रदीप पालशेतकर, पृथ्वीराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील, करण काकडे,सौ. चैत्राली काकडे, यांच्यासह सुना, जावई, नातसुना-जावई, नातवंडे- पणतवंडे यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी फोनद्वारे दादासाहेबाना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. खासदार शाहू महाराज छत्रपती,डी वाय पाटील विद्यापीठ, पुणेचे कुलपति डॉ पी डी पाटील, पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार के पी पाटील, मानसिंगराव खोराटे, दिनमानचे संपादक विजय चोरमारे लोकमतचे संपादक सचिन जवळकोटे, मकरंद देशपांडे, माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे, डॉ बी पी साबळे, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सतिश पावसकर, चिमणराव डांगे, धैर्यशील पाटील ( इस्लामपूर) जयंत प्रदीप पाटील, डी आर मोरे, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, शशिकांत पाटील चुयेकर, किसन चौगले, यांच्यासह यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य,पत्रकारितेसह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच डी. वाय. पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष भेटून दादासाहेबांना शुभेच्छा दिल्या.

एनआयटीमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

एनआयटीमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

कोल्हापूर/प्रतिनिधी : उंचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या (आधीचे न्यू पॉलिटेक्निक) ऑटोमोबाईलच्या १९९१ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी काॅलेज परिसरात ५० देशी वृक्षांचे रोपण केले. यासाठी सुहास वायंगणकर व वृक्षमित्र मधुकर यवलुजे यांचा तज्ञ सल्ला घेतला. काॅलेजच्या उत्कर्षासाठी माजी विद्यार्थी हातभार लावत आहेत, ही इथल्या शिक्षणाची खरी पोचपावती असल्याचे संचालक डॉ. संजय दाभोळे यांनी यावेळी नमुद केले. या उपक्रमासाठी ऑटोमोबाईल विभागप्रमुख प्रा. सुहासचंद्र देशमुख यांनी पुढाकार घेतला. याप्रसंगी अधिष्ठाता प्रा. बाजीराव राजिगरे, प्रशासकीय अधिकारी संदीप पंडे, विभागप्रमुख, शिक्षक, कर्मचारी आणि सुरजितसिंग रजपूत, सुजित सूर्यवंशी, प्रशांत चव्हाण, बलराज निकम, रणधीर मोरे, आसिफ मोमीन, प्रदीप जगताप, उमेश परमेकर, महेश जामसांडेकर, अतुल संकपाळ, राजेश रांगोळकर, निलेश नार्वेकर, संतोष पाध्ये आदी माजी विद्यार्थी उपस्‍थित होते.

एनआयटीमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

एनआयटीमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

कोल्हापूर/प्रतिनिधी : उंचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या (आधीचे न्यू पॉलिटेक्निक) ऑटोमोबाईलच्या १९९१ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी काॅलेज परिसरात ५० देशी वृक्षांचे रोपण केले. यासाठी सुहास वायंगणकर व वृक्षमित्र मधुकर यवलुजे यांचा तज्ञ सल्ला घेतला. काॅलेजच्या उत्कर्षासाठी माजी विद्यार्थी हातभार लावत आहेत, ही इथल्या शिक्षणाची खरी पोचपावती असल्याचे संचालक डॉ. संजय दाभोळे यांनी यावेळी नमुद केले. या उपक्रमासाठी ऑटोमोबाईल विभागप्रमुख प्रा. सुहासचंद्र देशमुख यांनी पुढाकार घेतला. याप्रसंगी अधिष्ठाता प्रा. बाजीराव राजिगरे, प्रशासकीय अधिकारी संदीप पंडे, विभागप्रमुख, शिक्षक, कर्मचारी आणि सुरजितसिंग रजपूत, सुजित सूर्यवंशी, प्रशांत चव्हाण, बलराज निकम, रणधीर मोरे, आसिफ मोमीन, प्रदीप जगताप, उमेश परमेकर, महेश जामसांडेकर, अतुल संकपाळ, राजेश रांगोळकर, निलेश नार्वेकर, संतोष पाध्ये आदी माजी विद्यार्थी उपस्‍थित होते.

पतसंस्थांमधील एक लाख रुपये पर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देण्याचा विचार; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

पतसंस्थांमधील एक लाख रुपये पर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देण्याचा विचार; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

सहकारी पतसंस्थांच्या समस्या’ या विषयावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक

मुंबई/प्रतिनिधी : राज्यातील सहकारी पतसंस्थांमधील एक लाख रुपये पर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. यासंदर्भात खासगी आणि सरकारी विमा कंपन्यांकडून प्रस्ताव मागवून योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
‘सहकारी पतसंस्थांच्या समस्या’ या विषयावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी, आमदार सत्यजित तांबे आणि आमदार काशिनाथ दाते उपस्थित होते. सहकार चळवळीत पतसंस्था हा महत्त्वाचा घटक असून, सर्वसामान्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी या संस्थांमध्ये आहेत. त्यामुळे ठेवीदारांचे हितसंरक्षण आणि संस्थांना शिस्त लावण्यासाठी एक लाख रुपये पर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देण्याची गरज असल्याचे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी नमूद केले.
सहकारमंत्र्यांनी पतसंस्थांशी संबंधित काही महत्त्वाच्या मागण्यांवरही निर्णय घेतले. ठेव, सोने गहाण किंवा कर्ज प्रकरणांसाठी ‘ब’ वर्ग सभासद होणे बंधनकारक न करता ऐच्छिक करण्याचा आणि जिल्हा बँकांप्रमाणे पतसंस्थांना ठेवी स्वीकारण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव दुरुस्तीसाठी पाठवण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासारख्या सरकारी योजनांमध्ये पतसंस्थांना सहभागी करून घेण्याबाबतही प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय, कोल्हापूर पतसंस्था फेडरेशनच्या मागणीनुसार प्रशिक्षण आयोजित करण्याचेही निर्देश देण्यात आले.
सहकार चळवळीतील पतसंस्था सर्वसामान्यांचा आर्थिक कणा असल्याचे सांगत, त्यांचे योग्य व्यवस्थापन आणि मॉनिटरिंग व्हावे, तसेच चुकीच्या बाबींवर कारवाई व्हावी, असे मत आरोग्यमंत्री आबिटकर यांनी व्यक्त केले. सहकारी पतसंस्थांची सुरक्षितता आणि विश्वासार्हता कायम राखणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दिवाळी सुट्टीत सीपीआरचा बाह्यरुग्ण विभाग सुरु

दिवाळी सुट्टीत सीपीआरचा बाह्यरुग्ण विभाग सुरु

कोल्हापूर/प्रतिनिधी : २० ते २३ ऑक्टोबर या कालावधीत दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. या कालावधीत छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सोमवार, २० व बुधवार २२ ऑक्टोबर रोजी सुरु तर मंगळवार २१ व गुरुवार, २३ ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहे. या कालावधीत अपघात विभाग नेहमीप्रमाणे पूर्ण वेळ (२४X७) सुरु राहील.
जिल्ह्यातील सर्व नागरीक तसेच रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. भूषण मिरजे यांनी केले.

पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्याबाबत समितीने अभ्यास करून प्रस्ताव द्यावा – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ

पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्याबाबत समितीने अभ्यास करून प्रस्ताव द्यावा – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ

मुंबई/प्रतिनिधी : राज्यातील पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी समिती स्थापन करावी. या समितीने महात्मा फुले जन आरोग्य योजना, केंद्र शासन आणि मध्यप्रदेश सरकारच्या योजनांचा अभ्यास करून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. पत्रकारांसाठी वर्षातून दोन वेळा विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. पत्रकारांच्या आरोग्य समस्यांबाबत मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, आरोग्य सेवा आयुक्त कादंबरी बलकवडे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त डॉ. अनिल भंडारी, माहिती व जनसंपर्क संचालक किशोर गांगुर्डे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्ष यदु जोशी, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, मुंबई विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष दीपक कैतके, राज्य अधिस्वीकृती समिती सदस्य विनोद जगदाळे, नेहा पुरव, संजय मलमे, संजय पितळे, जयेश सामंत उपस्थित होते.
मध्य प्रदेश मधील पत्रकारांसाठीच्या कॅशलेस आरोग्य सेवा योजनेचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्त, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे राज्य समन्वयक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि पत्रकार यांची समिती स्थापन करावी असे सांगून वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ म्हणाले की, या समितीने राज्य शासनाच्या आरोग्य योजना, केंद्राच्या आरोग्य योजना यांचाही अभ्यास करून सविस्तर सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करावा. त्यामध्ये ‘सीएसआर’चाही विचार करावा. मोठ्या शहरांमध्ये पत्रकारांना कशा प्रकारे कॅशलेस आरोग्य सेवा देता येतील याचा त्यात प्रामुख्याने विचार व्हावा, असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
पत्रकारांसाठी वर्षातून दोन वेळा विशेष आरोग्य शिबिर – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरसार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर घेताना महिला पत्रकारांसाठीही विशेष शिबिर घ्यावे, महात्मा फुले जन आरोग्य योजना पत्रकारांनाही लागू आहे. त्याच्या कार्डचे पत्रकारांना वाटप व्हावे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सध्या अस्तित्वात असलेली शंकरराव चव्हाण पत्रकार सन्मान निधी योजना आणखी व्यापक करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा असेही सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर यांनी सांगितले.
यावेळी आरोग्य सचिव निपुण विनायक यांनी सध्या अस्तित्वात असणाऱ्या आणि पत्रकारांनाही लागू असणाऱ्या आरोग्य योजनांची सविस्तर माहिती दिली. तर पत्रकार संघाचे अध्यक्ष यदु जोशी यांनी पत्रकारांची भूमिका मांडली.

थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र’ अंतर्गत सिने अभिनेते जॅकी श्रॉफ करणार सहकार्य

थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र’ अंतर्गत सिने अभिनेते जॅकी श्रॉफ करणार सहकार्य

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची सदिच्छा भेट

मुंबई/कोल्हापूर/प्रतिनिधी : हिंदी सिनेमा सृष्टीतील नामवंत कलाकार जॅकी श्रॉफ यांनी आज आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची सदिच्छा भेट घेतली. थॅलेसिमिया या रक्ताच्या अनुवंशिक असलेल्या गंभीर आजाराविषयी जॅकी श्रॉफ हे संवेदनशील असून त्याबाबत समाजा मध्ये प्रबोधन करण्याच्या कामात शासनास सहकार्य करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अभिनेते जॅकी श्रॉफ मागिल काही वर्षांपासून विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून थॅलेसेमिया विषयावर सातत्याने काम करत आहेत. या आजारावर मात करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी, सेवाभावी संस्थां, संघटनांनी, प्रतिष्ठित नागरिकांनी व डॉक्टर्सनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र शासनाच्या ‘थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र’ या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी शासनास सहकार्य करण्याबाबत यावेळी अनौपचारिक चर्चा झाली. या आजाराविषयी अधिक चांगली जनजागृती आणि या उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरूप यावे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.या भेटीवेळी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी राज्य रक्त संक्रमण परिषदेचे डॉ. पुरुषोत्तम पुरी, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, गजेन्द्रराज पुरोहित आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

नियोजनबद्ध शेतीतून उत्पादकता वाढ शक्य – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

नियोजनबद्ध शेतीतून उत्पादकता वाढ शक्य – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

जिल्ह्यात कृषी समृद्धी योजनेचा शानदार शुभारंभ; तेलबिया उत्पादन प्रशिक्षण सत्राचे आयोजन

कोल्हापूर/नरतवडे/प्रतिनिधी: नियोजनबद्ध शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी आपली उत्पादकता वाढवू शकतात, असे ठाम मत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले. नरतवडे येथील जय भवानी हॉल येथे कृषी समृद्धी योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया) अंतर्गत आयोजित प्रशिक्षण सत्रात ते शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. या मेळाव्यात प्रगतशील शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पालकमंत्री आबिटकर यांनी शेतकऱ्यांना जमिनीचा आणि भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पीक निवड करण्याचे आवाहन केले. केंद्र आणि राज्य शासन शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, सिंचन आणि सेंद्रिय शेतीसाठी अनुदान देत आहे. तेलबिया अभियानातून सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल यांसारख्या पिकांचे उत्पादन वाढवून देशाला खाद्यतेलात स्वयंपूर्ण करण्याचा मानस आहे. या उद्देशाने आयोजित मेळाव्यात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रक्रिया उद्योगातील संधींची माहिती देण्यात आली. प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच योजनेची माहिती देणाऱ्या घडीपत्रिका व पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.
आबिटकर यांनी जिल्ह्यातील अनुभवी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन शेतीला प्रगतीपथावर नेण्याचे आवाहन कृषी विभागाला केले. शेत पिकांचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांपासून संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात आणि खरेदी-विक्री केंद्रांना चालना देऊन शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांपेक्षा जास्त दर मिळवून द्यावेत, असे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे पारदर्शकपणे करून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कृषी तंत्रज्ञान, यंत्रे आणि प्रक्रिया उद्योगाशी संबंधित पदार्थांचे स्टॉल्स मेळाव्याचे आकर्षण ठरले. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीच्या दिशेने वाटचाल करण्याची संधी मिळाली असून, तेलबिया अभियानामुळे देशाच्या खाद्यतेल स्वयंपूर्णतेचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास या मेळाव्यातून व्यक्त झाला.
विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, अरुण भिंगरदिवे उपस्थित होते. मेळाव्यात अविनाश सोळंके यांनी शेतीचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण या विषयावर व्याख्यान दिले, तर भालचंद्र मुंढे यांनी फळप्रक्रिया व विक्री व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. आयुर्वेदिक वनस्पती संशोधन आणि प्रक्रिया या विषयावर अरुण डोईफोडे यांनी उपयुक्त माहिती दिली. कृषी भूषण नाथराव कराड यांनी भविष्यातील शेतीचा वेध घेत शेतकऱ्यांना आधुनिक कृषी व्यवस्थेकडे वळण्याचे आवाहन केले. भुईमुगाच्या सुधारित जातींबाबत डॉ. सुनिल कराड यांनी शास्त्रीय माहिती दिली, तर जयवंत जगताप यांनी तेलबिया लागवड तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले.

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी यशराज पाटील याचा एनडीए २०२५ परीक्षेत भारतात १८ वा क्रमांक

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी यशराज पाटील याचा एनडीए २०२५ परीक्षेत भारतात १८ वा क्रमांक

कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी यशराज पाटील याने राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) परीक्षा २०२५ मध्ये संपूर्ण भारताच्या क्रमवारीत १८ वा क्रमांक मिळवत शाळेची आणि कोल्हापूरची मान उंचावली.ही परीक्षा युपीएससीतर्फे १३ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आली होती. संपूर्ण भारतातून दोन लाख पन्नास हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. इयत्ता बारावी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचे आयोजन केले जाते. लेखी परीक्षेत यशस्वी होत यशराजची मुलाखतीसाठी निवड झाली. त्यानंतर एसएसबी मुलाखत प्रयागराज येथे झाली. देशभरातील हजारो विद्यार्थ्यांमधून यशराजने लेखी परीक्षा व मुलाखतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत देशात १८ वा क्रमांक प्राप्त केला.
यशराज हा संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला विद्यार्थी असून, इयत्ता ११ वीमध्ये असताना त्याला अमेरिकन सरकारच्या YES स्कॉलरशिप कार्यक्रमातून एक वर्ष अमेरिकेत शिक्षण घेण्याची संधी मिळाली होती. लहानपणापासूनच त्याने एनडीएमध्ये जाण्याचे स्वप्न पाहिले होते.
राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे ही भारतीय सैन्य, नौदल आणि वायुसेना या तिन्ही दलांसाठी संयुक्त प्रशिक्षण संस्था आहे. येथे प्रवेश मिळवणे हे देशातील अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठेचे मानले जाणारे यश आहे. हे यश यशराजने कोणतेही क्लास अथवा अकॅडमीमध्ये न जाता स्वतः अभ्यास करून प्राप्त केले.
यावेळी बोलताना यशराज म्हणाला, “लहानपणापासून पाहिलेले माझे भारतीय सैन्यात जाण्याचे स्वप्न आज सत्यात उतरले. यासाठी कष्ट, अभ्यास, खेळाची आवड तसेच सर्व सहशालेय उपक्रमात सहभाग ह्या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या ठरल्या. माझ्या या यशात माझी आई अर्चना पाटील हीचा मोलाचा वाटा आहे. तिचे मार्गदर्शन व प्रेरणा यामुळेच मला हे शक्य झाले.”
यावेळी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका सास्मिता मोहंती म्हणाल्या, “यशराजने सातत्य, कष्ट आणि समर्पणाच्या बळावर हे यश प्राप्त केले आहे. तो शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारा ठरणारा आहे.” संस्थापक संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती, बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ एच. एम नवीन, डे बोर्डिंग विभागाचे प्राचार्य अस्कर अली, ज्यु कॉलेजचे प्राचार्य नितेश नाडे व सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी यशराजचे अभिनंदन केले व सत्कार केला. या यशामुळे यशराजचे सर्व ठिकाणी कौतुक होत आहे.