Grid Posts

View All
माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

माय मराठी

शहरातील टायर विक्री आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या भव्य शोरूमचे कळंबा येथे उद्घाटन

माय मराठी

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन

माय मराठी

कोल्हापुरी चप्पलसह चर्मकला जतन आणि विकसित करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले संसदेत विधेयक

माय मराठी

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार

Thumbnail

View All
My Marathi

कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा पुरवठा; अफवांवर विश्वास ठेवून ‘पॅनिक बायिंग’ करू नका: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

ग्लोबल ताज्या देश प्रीमियम महाराष्ट्र माय मराठी

मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करूया: जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या बैठकीतील संकल्प

My Marathi

सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय हिंदू, शीख आणि बौद्धांनाच अनुसूचित जातीचा दर्जा

माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

माय मराठी

शहरातील टायर विक्री आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या भव्य शोरूमचे कळंबा येथे उद्घाटन

Tile List

View All
माय मराठी

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन कोल्हापूर (जिमाका) : शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासन कृषी…

माय मराठी

कोल्हापुरी चप्पलसह चर्मकला जतन आणि विकसित करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले संसदेत विधेयक

माय मराठी

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार

माय मराठी

येत्या वर्षात प्रत्येक घरात सौर प्रकल्प राबवून ‘शून्य वीज बिल’ करण्याचे उद्दिष्ट – मंत्री हसन मुश्रीफ

List Posts

View All
माय मराठी

भुये (ता. करवीर) च्या मानाच्या सासनकाठी क्रमांक ४० चा पर्यावरणपूरक उपक्रम गाजला; जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

भुये (ता. करवीर) च्या मानाच्या सासनकाठी क्रमांक ४० चा पर्यावरणपूरक उपक्रम गाजला; जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक भुये (ता. करवीर) : जोतिबा चैत्र…

My Marathi

दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळा पडला पार

दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळा पडला पार कोल्हापूर/प्रतिनिधी : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र…

My Marathi

जोतिबा भक्तांची श्रद्धा गायमुखावर: भक्तांच्या विधिवत पूजनाने अन्नछत्राचा मंगल प्रारंभ झाला!

जोतिबा भक्तांची श्रद्धा गायमुखावर: भक्तांच्या विधिवत पूजनाने अन्नछत्राचा मंगल प्रारंभ झाला! कोल्हापूर/प्रतिनिधी: गेली २५ वर्षे श्रद्धेचा आणि सेवेचा एक अखंड…

My Marathi

भक्तीची पाऊलवाट आणि माणुसकीची थाप: जोतिबाच्या चैत्र यात्रेतील बैलगाड्यांची परंपरा

भक्तीची पाऊलवाट आणि माणुसकीची थाप: जोतिबाच्या चैत्र यात्रेतील बैलगाड्यांची परंपरा कोल्हापूर/प्रमोद पाटील  : "चांगभलं" च्या गजराने अवघा जोतिबा डोंगर दुमदुमून…

Thumbnail

View All
My Marathi

अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीचा विवाह ; पतीसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा

My Marathi

कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा पुरवठा; अफवांवर विश्वास ठेवून ‘पॅनिक बायिंग’ करू नका: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

ग्लोबल ताज्या देश प्रीमियम महाराष्ट्र माय मराठी

मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करूया: जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या बैठकीतील संकल्प

My Marathi

सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय हिंदू, शीख आणि बौद्धांनाच अनुसूचित जातीचा दर्जा

माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

माय मराठी

भीमा कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी तिसऱ्या दिवशी मेरी वेदर मैदानावर  अफलातून गर्दीचा महापूर,तीन दिवसात सुमारे १२ कोटींची उलाढाल*

*आज होणार समारोप,प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस शेतकऱ्यांनी भेट देण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन * *एकाच मैदानावर  तेरा वेळा रेकॉर्ड केलेला…

माय मराठी

पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा “भीमा कृषी प्रदर्शनाच्या शनिवारच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांसह नागरिकांची ,शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तुफान गर्दी

  पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा “भीमा कृषी प्रदर्शनाच्या शनिवारच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांसह नागरिकांची ,शालेय  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तुफान गर्दी कागल येथील…

माय मराठी

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटला सुवर्णपदक राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धा, श्रेयस माने-निकिता कोळेकरचे यश

कसबा बावडा/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीतर्फे आयोजित ‘महाराष्ट्र स्टेट स्किल्स कॉम्पिटिशन २०२६’ या राज्यस्तरीय स्पर्धेत डी. वाय. पाटील…

माय मराठी

कुंभोज येथील सरस्वती साधना केंद्र व ग्रंथालय  प्राचीन संस्कृती रक्षणासाठी महत्वपूर्ण : ललित गांधी

आठ लिपीमधील ग्रंथ संपदेसाठी राज्य सरकारतर्फे मदत करणार कुंभोजगिरी – कुंभोज येथे उभारण्यात आलेले सरस्वती साधना केंद्र व याठीकाणी उभारलेले…

माय मराठी

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘SGAiRC’ “एआय संशोधन केंद्राचे उद्घाटन” आणि ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’चे यशस्वी आयोजन

कोल्हापूर : अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत संजय घोडावत एआय संशोधन केंद्र (SGAiRC)…

माय मराठी

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भिमा कृषी व पशू प्रदर्शनाचे आज होणार पालकमंत्री ना.प्रकाशजी आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन

१३ ते १६ फेब्रुवारी चार दिवस मेरी वेदर मैदान येथे प्रदर्शन आयोजित चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात शेतीविषयक नामांकित कंपन्यांचा सहभाग,…

माय मराठी

इंडियन सुपर फायटर्स असोसिएशन आयोजित एमएमए स्पर्धेत कोल्हापूरचे खेळाडू चमकले

कोल्हापूर/प्रतिनिधी : मुंबई येथे नुकत्याच झालेल्या इंडियन सुपर फायटर्स असोसिएशन आयोजित एमएमए या राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंग स्पर्धेत कोल्हापूरचे खेळाडू चमकले.संपूर्ण…

माय मराठी

वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमामुळे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनला मिळाले तब्बल १५ पुरस्कार, रोटरीच्या माजी अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांची माहिती

  कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ही समाजातील विविध गरजू घटकांसाठी भरीव उपक्रम राबवणारी आंतरराष्ट्रीय पातळीवरची संघटना आहे. या संघटनेच्या अनेक शाखा…

माय मराठी

5 फेब्रुवारी रात्री 10 पासून जमावबंदी – प्रचार संपुष्टात येणार

5 फेब्रुवारी रात्री 10 पासून जमावबंदी – प्रचार संपुष्टात येणार कोल्हापूर, दि. 4 (जिमाका): जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक…

माय मराठी

वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमामुळे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनला मिळाले तब्बल १५ पुरस्कार

वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमामुळे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनला मिळाले तब्बल १५ पुरस्कार रोटरीच्या माजी अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांची…

भीमा कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी तिसऱ्या दिवशी मेरी वेदर मैदानावर  अफलातून गर्दीचा महापूर,तीन दिवसात सुमारे १२ कोटींची उलाढाल*

*आज होणार समारोप,प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस शेतकऱ्यांनी भेट देण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन

*

*एकाच मैदानावर  तेरा वेळा रेकॉर्ड केलेला हिंदकेसरी हरण्या बैल,अन्य जनावरे पाहण्यासाठी लोकांची अफलातून गर्दी*
*३५० किलोचे डुक्कर १२० आणि ९० किलो वजनाचे बोकड,३३ इंचाचा घोडा,एक टनाचा लाल कंधारी बैल,मुरा रेडे प्रदर्शनाचे आकर्षण*
*१० डझनाचा केळी घड,११ किलोचा भोपळा,१० किलोचा कोहळा आकर्षण*
कोल्हापूर/प्रतिनिधी : मेरी वेदर मैदानावर भरविण्यात आलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी लहान मुलांसह आबालवृद्धांनी आणि शेतकऱ्यांनी तोबा गर्दी केली होती.पाच फूट सरडा आणि एकाच मैदानावर  तेरा वेळा रेकॉर्ड केलेला हिंदकेसरी हरण्या बैल,अन्य जनावरे पाहण्यासाठी लोकांची अफलातून गर्दी,महापूर मेरी वेदर मैदानावर लोटला होता.याचबरोबर शतकवीर हिंदकेसरी शर्यतीमधील हरण्याबैल, तीन वर्षाची राधा गाय,मारवाडी जातीचा स्टेलियन गब्बर नावाचा काळा रंगाचा घोडा,३५० किलोचे डुक्कर १२० आणि ९० किलो वजनाचे बोकड,३३ इंचाचा घोडा,एक टनाचा लाल कंधारी बैल,मुरा रेडे,१० डझनाचा केळी घड,११ किलोचा भोपळा,१० किलोचा कोहळा प्रदर्शनाचे ठरत आहेत आकर्षण.
कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून दरवर्षी आम्हा शेतकऱ्यांना नवनवीन कृषी विषयक माहिती.शासनाच्या वतीने वेगवेगळ्या शेतीसाठी उपयुक्त असलेल्या प्रकल्पांची माहिती मिळते.शिवाय विविध शेती तज्ञ यांनी शेतीविषयक मार्गदर्शन केले ज्याद्वारे आम्हाला शेतीची माहिती मिळाली असल्याचे भेट देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.तीन दिवसात शेती साठी आवश्यक साहित्याची नोंदणी झाली आहे.याचबरोबर शेती साहित्य,बी.बियाणे यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली गेली आहे.
आज तिसऱ्या दिवशी सुमारे १२  कोटींची उलाढाल ही झाली आहे.आज १६ फेब्रुवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्याने  दुपारी ४ वाजता सांगता समारंभ व पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.
आज कृषी प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी प्रदर्शन पाहण्यासाठी कोल्हापूर तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावे असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.
*चौकट*
भीमा कृषी प्रदर्शनात रिंगन सोहळा आयोजित पार पडला. ज्यामध्ये गोमाता पूजन माजी खासदार अण्णासाहेब जोले,खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी परीक्षक डॉ.सुनील काटकर, डॉ.शिंदे,किरण रणदिवे,इंद्रजीत जाधव आदी उपस्थित होते.
आज प्रदर्शनस्थळी खासदार धनंजय महाडिक,युथ आयकॉन कृष्णराज महाडिक,सी चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक,भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक,भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्ष सौ.अरुंधती महाडिक,माजी खासदार अण्णासाहेब जोले यांनी भेट दिली.आजही शेतकऱ्यांना भागीरथी महिला संस्थेच्या वतीने पाच हजार शेतकऱ्यांना मोफत झुणका भाकरीचे वाटप करण्यात आले.
आज १५ रोजी नृत्य मल्हार हा कार्यक्रम झाला.तर १६ फेब्रुवारी रोजी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे.
*शतक वीर हिंदकेसरी हरण्या बाई पाहण्यासाठी गर्दी*
*शतक वीर हिंदकेसरी शर्यतीमधील *हरण्याबैल* कृषी *प्रदर्शनात दाखल झाला असून त्याला पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी मेरी वेदर मैदानावर प्रचंड अफलातून गर्दी केली आहे. लोकांची भिंत म्हणून संबोधला जाणारा हा बैल जुना बुधवार पेठ येथील संदीप विश्वास पाटील यांचा आहे.तो अकरा वर्षाचा असून त्याने शंभर वेळा एक नंबरची बक्षीस मिळवली आहेत. १३९ शर्यतीमध्ये भाग घेतलेला आहे.१७ वेळा दोन नंबरचा मानकरी ठरला आहे. तो रोज पाच लिटर दूध पितो व भरडा हिरवी वैरण खातो. वजनाने ६०० किलोचा असून त्याची शिंगे साडेतीन फूट आहेत. तर लांबी ७ फुट आहे. याच्याशिवाय दुसरा बैल शर्यतीत कोणताच नाही महाराष्ट्रात आणि कर्नाटकात ज्यावेळी मोठी शर्यत असते त्यावेळी त्याचा सहभाग असतो. दोन ट्रॅक्टर आणि पाच  मोटरसायकल त्याने जिंकल्या आहेत.एकसंभा येथे १७ लाखाचे बक्षीस मिळविलेले आहे. एकाच मैदानावर त्याने  तेरा वेळा रेकॉर्ड केलेला आहे.*
*तीन वर्षाची राधा गाय आकर्षण*
सचिन शिवकुमार हिरेमठ यांची तीन वर्षाची राधा गाय प्रदर्शनाची आकर्षण ठरत असून या गाईचे दूध तिरुपती देवाच्या अभिषेकासाठी वापरले जाते. आतापर्यंत तीन वेळा भीमा कृषी प्रदर्शनाची आकर्षण ठरली आहे. चेतक नावाचा तीन वर्षाचा घोडा  भीमा कृषी प्रदर्शनात चॅम्पियन ठरला आहे.चार वर्षे सहा महिने वयाचा पंजाबी काठेवाडी गुलाबी  नूखरा जातीचा आहे.
*मारवाडी जातीचा स्टेलियन गब्बर* नावाचा काळा रंगाचा  घोडा चार वर्षाचा असून त्याची उंची ६२ इंच आहे. तर ७ फूट लांबी आहे. त्याच्या तोंडावर पंचकल्यांनी पांढरा नाम असून अमोल भास्कर हे त्याचे मालक आहेत.त्यांच्याकडे तो तीन वर्षापासून आहे. हरभरा उडीद डाळ, चार लिटर दूध सकाळी संध्याकाळी पितो त्याची किंमत दीड लाख रुपये इतकी आहे. अकलूज मध्ये चॅम्पियन ठरला असून वेगवेगळ्या शेती प्रदर्शनामध्ये त्याचा सहभाग असतो.
*खास आकर्षण जनावरे पाहण्यासाठी लोकांची गर्दी*
*भारतातील सर्वात मोठा  अमेरिकन सरडा प्रदर्शनाचे खास आकर्षण चंदगड  येथील ७५ हजार  रुपये किंमतीचे ३५० किलो वजनाचे ब्रीड लार्ज व्हाईट मेल आणि फिमेल(पिग डुक्कर) पन्हाळा येथील ९० किलोचा बोकड भादोले येथील १२० किलो वजनाचा बिटल बोकड,७५० किलो वजनाचा एचएफ अडीच वर्षाचा कागल चिमगाव येथील सचिन लाड यांचा रेडा, साडेसात लाख रुपये किंमत असलेला चॉकलेटी रंगाचा अडीच वर्षाचा एक टन लाल कंधारी बैल प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे.आजरा दरडेवाडी येथील पाच वर्षाचा सर्जा काळा बैल,दहा महिन्याचा गीर बैल,१४ महिन्याचे ब्ल्यू गोल्ड मकाऊ पोपट (पॅरोट) हरियाणाचा मुरा जातीचा युवराज रेडा,साडेचार वर्षाचा २८ महिन्याचा गडहिंग्लजचा सुलतान रेडा, हसुर बुद्रुक येथील २८ महिन्याचा एक टन वजनाचा मुरहा रेडा, १४७० किलो वजनाचा ४ वर्षाचा गोलू मुरा रेडा,८०० किलो वजनाचा जाफराराबादी पंढरपूर रेडा, खास आकर्षण आहेत.याचबरोबर चार फूट लांब शिंगाचा पाच वर्षाचा पंढरपूर जातीचा भैरु रेडा, राशीवडे बुद्रुक येथील काँकरेज वळू,नरेंद येथील २ वर्षे १ महिना २ दाती स्टूलवर उभा राहणारा मुरा रेडा खास आकर्षण*
*देशी विदेशी भाजीपाला,फळे व फुलांचा समावेश*
*स्थानिक भाज्यासह विदेशी भाजीपाला पहावयास मिळत आहे.भाज्यांमध्ये  फळ,वांगी,टोमॅटो,शेंग,मिरची,दुधी भोपळा,मोठा भोपळा,हळद,धान्य,लसूण, शिरोळ कोंडीग्रे येथील हिरवी कारली, शिरोळ कुटवाड येथील काजल काकडी, ऑर्किड फुले, झेंडू फुले, गलांडा, शामली फुले, बालिंगा येथील जरबेरा आदींचा समावेश आहे. तर शंभर रुपये एक ऊस असलेला देशी शिवकालीन काळा ऊस  प्रदर्शनात विक्री होत आहे.*
*तर भाज्यांमध्ये सुळकुड येथील मुलगोंडा पाटील यांचा अकरा किलोचा वजनाचा भोपळ, हालोंडी येथील पाच किलो वजनाचा (पपनस ईडलिंबू), शिरोळ येथील १५ किलो वजनाची हळद गठ्ठा,२५ किलो वजनाचा दहा डझनाचा देशी केळीचा घड, एवढे येथील वळीवडे येथील  अर्धा किलोची कांदा पात, भोगमवाडी येथील यांच्या शेतातील एक फुटाचे रताळ, मांजरी गेळा येथील एक किलोचे वांगे, महाकवे  येथील दीड किलो वजनाचे रताळ, हुपरी येथील प्रकाश अण्णा माळी यांचा अकरा किलोचा भोपळा, जंगलात उगवणारी रानकेळी प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.*
*प्रदर्शनात अशी आहेत जनावरे,पक्षी*
प्रदर्शनामध्ये अमेरिकन शेळ्या,  बोकड, असे खास आकर्षण  आहेत तर खास सांगोला, दहिवडीवरुन जातिवंत खिल्लार खोंड व खिल्लार गायी सहभागी झाल्या आहेत.  परभणी, नांदेड, लातूर येथून लालकंधारी व देवणी, एच एफ जर्शी, साहिवाल, गिर इत्यादी जातीची खोंड, गाई आल्या आहेत, तसेच पंढरपुरी मुह्रा, मेहसाना, जाफराबादी म्हैस, रेडे सहभागी  आहेत. तर जातिवंत घोडे, शेळ्या, मेंढ्या, वराह,  विविध जातीच्या कोंबड्या तसेच  विविध जातीचे  पक्षी आले आहेत.शिवाय कागल मधील हैदर अली यांचा ब्रँड ब्रिडिंग फार्म मांडण्यात आली आहे.
ज्यात अमेरिकन बेंटम बोकड  पांढरे रंगीबेरंगी पक्षी, कबुतरे, ब्लॅक ऍस्ट्रोलॉक कोंबडी, जापनीज बेन्टेस कोंबडी, कडकनाथ चिनी कोंबडी, कोलंबियन ब्रम्हा कोंबडा, पर्शियन मांजर, रनर बदक, मरकवी बदक, घुस, हेडलॉक  पांढरे उंदीर,  हंगस्टर पक्षी, राजहंस,लवबर्ड,पोपट कागल येथील अमेरीकन १८ इंचाची बिल्टन बोकडे, टर्की कोंबडी बदक व्हाईट पीकॅन बदक, हेमस्टर जातीचे पांढरे उंदीर,हेज टॉग  पांढरा उंदीर,टर्की कोंबडा,प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे. एक टनाचा  कानाच्या पुढे वळलेल्या शिंगांचा जाफराबादि सुलतान रेडा आदी जनावरे प्रदर्शनात आली आहेत. ती आकर्षण ठरत आहेत.
*आज १६ फेब्रुवारी रोजी होणार समारोप*
प्रदर्शनाचा भीमा कृषी प्रदर्शनाचा आज सोमवार १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता सांगता व बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. यासाठी विशेष अतिथी म्हणून इचलकरंजी महानगरपालिकेचे महापौर श्री. उदय धांतुडे ,उपमहापौर अनिल डाळ्या यांची उपस्थिती असणार आहे. तर महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आ. राजेंद्र पाटील यड्रावकर, आ. चंद्रदीप नरके, आ.अशोकराव माने,आ. शिवाजीराव पाटील, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाडगे, माजी आ. संजयबाबा घाडगे, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ.शौमिका महाडिक, बी न्यूज चे कार्यकारी संचालक पृथ्वीराज महाडिक, भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक आदींची  प्रमुख उपस्थिती असणार आहे
*आज झालेली व्याख्याने*
आज १५ फेब्रुवारी रोजी प्रा.ऋतुराज सयाजीराव चव्हाण तज्ञ व तांत्रिक सल्लागार यांनी सेंद्रिय शेतीसाठी अचूक निविष्ठांचा वापर काळाची गरज विषयावर विचार मांडताना
शेण खताविना शेती पिकेना
माती मायेची सुपीकता जाईना
दहा गाड्यांच्या एवजी एकही ना
तुका म्हणे जमिनीचा कस जाईना
अशी तुकाराम महाराजांची ओवी सांगत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध निविष्ठा त्याचबरोबर नैसर्गिक दृष्ट्या उपलब्ध होणाऱ्या व कमी खर्च असणाऱ्या तसेच रासायनिक खतांवरील खर्च कमी करणाऱ्या सेंद्रिय निविष्ठां संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.तसेच शेतीकडे व्यापारी दृष्टिकोन शाश्वत पर्यावरणाशी निगडीत उत्पादनविषयी मार्गदर्शन केले.
माजी मृदा शास्त्रज्ञ व प्रमुख प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र कोल्हापूरचे प्रा. डॉ जे.पी.पाटील यांनी सध्या बिघडलेल्या जमिनीचे आरोग्य सुस्थितीत आणण्यासाठी जमीन व्यवस्थापन विशेष करून सेंद्रिय घटकांचा वापर पिकांची फेरपालट व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाविषयी सखोल मार्गदर्शन केले.
डॉ. श्री. सॅम लुद्रिक (पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र शासन) यांनी दुधाळ जनावरांची निगा व संगोपन या विषयावर विचार मांडताना शेतीशी निगडीत दुय्यम दुग्ध व्यवसाय विषयी मार्गदर्शन करताना दुधाळ जनावरांची निगा  निवड व खाद्य व्यवस्थापन तसेच लसीकरण याविषयी सखोल मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असून लंपीची लस शासनाच्या मार्फत तयार करण्यात आली आहे.तिचा उपयोग आपल्या जनावरांसाठी करावा असे आवाहन शेतकऱ्यांना केले.यावेळी युवा प्रगतशील शेतकरी युवराज तुकाराम माने राहणार कोपार्डे यांचा सन्मान करण्यात आला.
*उद्या १६ रोजी  होणारी व्याख्याने*
       १६ फेब्रुवारी रोजी भाजीपाला सुधारित लागवड व परदेशी भाजीपाला लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉ. श्री. भरत तुकाराम पाटील भाजीपाला पैदासकर व प्रमुख फलोद्यान विभाग महात्मा फुले विद्यापीठ राहुरी, जि. अहिल्यानगर हे विचार व्यक्त करणार आहेत. तर कृषी विभागाच्या विकासात्मक योजना व वापर या विषयावर तालुका कृषी अधिकारी करवीरचे श्री. युवराज पाटील मार्गदर्शन करणार आहेत आणि तालुका कृषी अधिकारी कागलचे श्री. शेखर थोरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
*कृषी विभागाची माहिती*
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्माच्या वतीने शेती उपयुक्त डेमो या ठिकाणी सादर करण्यात आले आहेत.ज्यामध्ये सुपर केन नर्सरी, क्षारपड जमीन सुधारणा मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, आत्माच्या वतीने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान या अंतर्गत योजनेची उद्दिष्टे योजना काय आहे याचा प्रकल्प या ठिकाणी सादर करण्यात आला आहे. गोशाळा कशी असावी याची प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या अंतर्गत ठिबक सिंचन, आंबा लागवड,गांडूळ युनिट दाखविण्यात आले आहेत. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, कीटकनाशके फवारताना काय करू नये याबाबत माहिती देण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजना यामध्ये महाडीबीटी अर्ज एक योजना अनेक काय आहेत हे मांडण्यात आले आहे. त्याचबरोबर मातीचा नमुना कसा घ्यावा अन्नपौष्टिक तृणधान्य याबाबत माहिती मांडण्यात आली आहे.ड्रोन माध्यमातून शेती कशी करावी याचीही माहिती दिली जात आहे.कीटकनाशके फवारताना कामगंध सापळा पक्षी थांबे रोपांत द्वारे ऊस लागवड, पौष्टिक तृणधान्याच्या पासून तसेच प्रदर्शनात पाचट व्यवस्थापन ए आय तंत्रज्ञानचा वापर करून स्मार्ट शेती उपयोग, ड्रोनद्वारे फवारणी सेंसरचा वापर कृत्रिम रेतन ए.आय किटचा वापर याबाबत प्रदर्शनात मार्गदर्शन होत आहे.
भिमा कृषी प्रदर्शनास कृषी विभाग व किसान कल्याण मंत्रालय, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग, आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर,  वृंदावन फाउंडेशन आणि कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. आज शेवटचा दिवस प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.प्रदर्शनासाठी या प्रदर्शनासाठी प्रा. जे.पी.पाटील, डॉ. अजित शिंदे, डॉ.सुनील काटकर, सर्जेराव धनवडेदादा, अशोक सिधनेर्ले,दिलीप दळवी,सुजित चव्हाण ,किरण रणदिवे, डॉ.निवृत्ती पाटील, डॉ.सुखदेव साबळे, डॉ.अंकुश काळे,. डॉ.अजय कुरणे,डॉ.किरण उनउणे,प्रा.ऋतुराज चव्हाण, डॉ.मंगलसिंग जाधव,डॉ. वर्षा मिंड कृषी विभागाची टीम आदी परिश्रम घेत आहेत.
भीमा कृषि प्रदर्शनात धान्य महोत्सव दालनात दोन दिवसात विक्री झालेला शेतमाल :
१) सेंद्रीय गूळ : एक किलोचे एक पंधराशे रवे
२) इंद्रायणी तांदूळ : ४१०० kg
३) आजरा घनसाळ : २५०० kg
४) इंद्रायणी कणी : १७००  kg
५)  रत्नागिरी २४ :  ४६००  kg
६) सेंद्रीय हळद : ६०० kg
७) नाचणी : ९०० kg
८)हात सडीचा काळा तांदूळ १२०० kg

पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा “भीमा कृषी प्रदर्शनाच्या शनिवारच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांसह नागरिकांची ,शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तुफान गर्दी

 

पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा “भीमा कृषी प्रदर्शनाच्या शनिवारच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांसह नागरिकांची ,शालेय  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तुफान गर्दी

कागल येथील हैदर भाई फार्म अमेरीकन १८ इंचाचे बोकड,  एक टनाचा  कानाच्या पुढे वळलेल्या शिंगांचा जाफराबादि सुलतान रेडा,नाचणारा सरकार घोडा,३३ इंचाचा तीन वर्षाचा ७० हजार किंमत असलेला घोडा

११ किलोचा भोपळा १० किलो

चा कोहळा सुरण, भीमा कृषी प्रदर्शनात १ किलोचे वांगे एक फुटाचे रताळ, सुळकुड येथील अकरा किलोचा भोपळा, तीन फूट दुधी भोपळा येथील पेरले येथील आदर्श चौगुले यांचा दहा किलो वजनाचा देशी कोहळा,२५ किलोचा वाकरे येथील देशी केळी घड आकर्षण शिरोळ येथील १५ किलो वजनाची हळद गठ्ठा

चंदगड  येथील ७५ हजार  रुपये किंमतीचे ३५० किलो वजनाचे ब्रीड लार्ज व्हाईट मेल आणि फिमेल(पिग डुक्कर) पन्हाळा येथील ९० किलोचा बोकड भादोले येथील १२० किलो वजनाचा बिटल बोकड,७५० किलो वजनाचा एचएफ अडीच वर्षाचा कागल चिमगाव येथील सचिन लाड यांचा रेडा, साडेसात लाख रुपये किंमत असलेला चॉकलेटी रंगाचा अडीच वर्षाचा एक टन लाल कंधारी बैल प्रदर्शनाचे खास आकर्षण

३५० किलो वजनाचे ब्रीड लार्ज व्हाईट मेल आणि फिमेल(पिग डुक्कर) खास आकर्षण

आज येणार हिंद केसरी हरण्या बैल

दोन दिवस असणाऱ्या भीमा कृषी पशू प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी आवर्जून भेट देण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन

भारतातील सर्वात मोठा  पाच फुटाचा  इग्वाना (सरडा) कृषी प्रदर्शनाचे ठरत आहे खास आकर्षण पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी गर्दी

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने  आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी या भव्य कृषी व पशूप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.खासदार धनंजय महाडिक यांनी आयोजित केलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा “भीमा कृषी व पशू २०२६” प्रदर्शनास शेतकऱ्यांनी आज दुसऱ्या दिवशी शनिवारी मेरी वेदर मैदानावर  गर्दी केली होती. दोनशे हून अधिक महिला बचत गटाचे स्टॉल, २५० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग,अन्य पशुपक्षी विविध, शेतीला लागणारी विविध अवजारे, बी बियाणे, खते, आयुर्वेदिक औषधे यांचा समावेश आहे. खासदार ध १७ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य असे भीमा कृषी व पशु पक्षी प्रदर्शन पाहण्यासाठी  शेतकऱ्यांसह लोकांनी मेरी वेदर मैदानावर तुफान गर्दी झाली आहे.दोन दिवसात उच्चांकी  तांदूळाची विक्री झाली आहे.आणि बचत गटाच्या स्टॉलच्या माध्यमातून मोठी विक्री झाली आहे.प्रदर्शन पाहण्यासाठी आणि खाद्य पदार्थांवर ताव मारण्यासाठी कोल्हापूरकर मेरी वेदर मैदानावर  गर्दी करत आहेत.

प्रदर्शनात  शेतकऱ्यानी पिकविलेला विविध प्रकारचा तांदूळ,

११ किलोचा भोपळा १० किलोचा कोहळा सुरण, भीमा कृषी प्रदर्शनात १ किलोचे वांगे एक फुटाचे रताळ, सुळकुड येथील अकरा किलोचा भोपळा, तीन फूट दुधी भोपळा येथील पेरले येथील आदर्श चौगुले यांचा दहा किलो वजनाचा देशी कोहळा २५ किलोचा वाकरे येथील देशी केळी घड,चंदगड  येथील ७५ हजार  रुपये किंमतीचे ३५० किलो वजनाचे ब्रीड लार्ज व्हाईट मेल आणि फिमेल(पिग डुक्कर) पन्हाळा येथील ९० किलोचा बोकड भादोले येथील १२० किलो वजनाचा बिटल बोकड,७५० किलो वजनाचा एचएफ अडीच वर्षाचा कागल चिमगाव येथील सचिन लाड यांचा रेडा, साडेसात लाख रुपये किंमत असलेला चॉकलेटी रंगाचा अडीच वर्षाचा एक टन लाल कंधारी बैल प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे. आजरा दरडेवाडी येथील पाच वर्षाचा सर्जा काळा बैल,दहा महिन्याचा गीर बैल,१४ महिन्याचे ब्ल्यू गोल्ड मकाऊ पोपट (पॅरोट) हरियाणाचा मुरा जातीचा युवराज रेडा,साडेचार वर्षाचा २८ महिन्याचा गडहिंग्लजचा सुलतान रेडा, हसुर बुद्रुक येथील २८ महिन्याचा एक टन वजनाचा मुरहा रेडा, ८०० किलो वजनाचा जाफराराबादी पंढरपूर रेडा, खास आकर्षण आहेत.याचबरोबर चार फूट लांब शिंगाचा पाच वर्षाचा पंढरपुरी जातीचा भैरु रेडा ठरत आहे खास आकर्षण.

कोल्हापूर जिल्ह्यात पिकविण्यात आलेला देशी भाजीपाला,विदेशी भाजीपाला,फुले,जिल्ह्यातील विविध तालुक्यातील कृषी विभागाने तयार केलेली शेतीविषयक डेमो पाहण्याची संधी आदींचा समावेश असून हे प्रदर्शन पाहण्यासाठी व शेती साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी तपोवन मैदानावर तुफान गर्दी केली आहे.याचबरोबर भागीरथी महिला संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत झुणका भाकरीचे वाटप करण्यात आले.आज प्रदर्शनस्थळी खासदार धनंजय महाडिक,युथ आयकॉन कृष्णराज महाडिक,सी चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक,भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक,भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्ष सौ.अरुंधती महाडिक यांनी भेट दिली.

भारतातील सर्वात मोठा  अमेरिकन सरडा प्रदर्शनाचे खास आकर्षण

भारतातील सर्वात मोठा  अमेरिकन आठ वर्षाचा साडेपाच फुटाचा  इग्वाना (सरडा,चार वर्षाचा आणि पाच महिन्याचा सरडा आकर्षण आहे.  हे तीन सरडे प्रदर्शनात आणण्यात आला असून हे तीन सरडे प्रदर्शनाचे खास आकर्षण आहेत. पहिल्याच दिवशी सरडा पाहण्यासाठी लोकांनी, शेतकऱ्यांनी  गर्दी केली होती. प्रदर्शनात आलेला हिरवा सरडा चार महिन्याचा असून  त्याची लांबी दोन फूट आहे चार वर्षानंतर तो चार फुटाचा आणि आठ वर्षानंतर तो सहा फुटाचा होतो. यात पाच महिन्याचा सरडा पाव किलो वजनाचा आहे.चार वर्षाचा सरडा चार फुटाचा ९ किलो वजनाचा आहे. तर आठ वर्षाचा सरडा पाच फुटाचा असून त्याचे वजन २२ किलो आहे. हे पूर्ण शाकाहारी असून भोपळा, कोथिंबीर, मेथीची भाजी, आणि अन्य भाजीपाला खातात. दिवसातून दोन वेळा सकाळी दहा वाजता आणि रात्री आठ वाजता त्यांना खाद्य पदार्थ द्यावे कोल्हापूर मधील किशोर वसंत चव्हाण सध्या मुंबईत राहत असून त्यांनी मुंबई येथे हे सरडे लहानपणापासून पाळले आहेत. या सरड्यांना मालकाची बोलीभाषा समजते हे सरडे विषारी नसून ते वर्षातून दोन वेळा ३५  अंडी घालतात. यांचे रक्त थंड असल्याने त्यांना उष्णतेची गरज असते.

अबब खास आकर्षण जनावरे

चंदगड  येथील ७५ हजार  रुपये किंमतीचे ३५० किलो वजनाचे ब्रीड लार्ज व्हाईट मेल आणि फिमेल(पिग डुक्कर) पन्हाळा येथील ९० किलोचा बोकड भादोले येथील १२० किलो वजनाचा बिटल बोकड,७५० किलो वजनाचा एचएफ अडीच वर्षाचा कागल चिमगाव येथील सचिन लाड यांचा रेडा, साडेसात लाख रुपये किंमत असलेला चॉकलेटी रंगाचा अडीच वर्षाचा एक टन लाल कंधारी बैल प्रदर्शनाचे खास आकर्षण*७५० किलो वजनाचा एचएफ अडीच वर्षाचा कागल चिमगाव येथील सचिन लाड यांचा रेडा, साडेसात लाख रुपये किंमत असलेला चॉकलेटी रंगाचा अडीच वर्षाचा एक टन लाल कंधारी बैल प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे. आजरा दरडेवाडी येथील पाच वर्षाचा सर्जा काळा बैल,दहा महिन्याचा गीर बैल,१४ महिन्याचे ब्ल्यू गोल्ड मकाऊ पोपट (पॅरोट) हरियाणाचा मुरा जातीचा युवराज रेडा,साडेचार वर्षाचा २८ महिन्याचा गडहिंग्लजचा सुलतान रेडा, हसुर बुद्रुक येथील २८ महिन्याचा एक टन वजनाचा मुरहा रेडा, १४७० किलो वजनाचा ४ वर्षाचा गोलू मुरा रेडा,८०० किलो वजनाचा जाफराराबादी पंढरपूर रेडा, खास आकर्षण आहेत.याचबरोबर चार फूट लांब शिंगाचा पाच वर्षाचा पंढरपूर जातीचा भैरु रेडा,राढीवडे राशीवडे बुद्रुक येथील काँकरेज वळू,नरेंद येथील २ वर्षे १ महिना २ दाती स्टूलवर उभा राहणारा मुरा रेडा

देशी विदेशी भाजीपाला,फळे व फुलांचा समावेश

स्थानिक भाज्यासह विदेशी भाजीपाला पहावयास मिळत आहे.भाज्यांमध्ये  फळ,वांगी,टोमॅटो,शेंग,मिरची,दुधी भोपळा,मोठा भोपळा,हळद,धान्य,लसूण, शिरोळ कोंडीग्रे येथील हिरवी कारली, शिरोळ कुटवाड येथील काजल काकडी, ऑर्किड फुले, झेंडू फुले, गलांडा, शामली फुले, बालिंगा येथील जरबेरा आदींचा समावेश आहे. तर शंभर रुपये एक ऊस असलेला देशी शिवकालीन काळा ऊस  प्रदर्शनात विक्री होत आहे.

तर भाज्यांमध्ये सुळकुड येथील मुलगोंडा पाटील यांचा अकरा किलोचा वजनाचा भोपळ, हालोंडी येथील पाच किलो वजनाचा (पपनस ईडलिंबू), शिरोळ येथील १५ किलो वजनाची हळद गठ्ठा,२५ किलो वजनाचा दहा डझनाचा देशी केळीचा घड, एवढे येथील वळीवडे येथील  अर्धा किलोची कांदा पात, भोगमवाडी येथील यांच्या शेतातील एक फुटाचे रताळ, मांजरी गेळा येथील एक किलोचे वांगे, महाकवे  येथील दीड किलो वजनाचे रताळ, हुपरी येथील प्रकाश अण्णा माळी यांचा अकरा किलोचा भोपळा, जंगलात उगवणारी रानकेळी प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.

धान्य मध्ये नाचणी,इंद्रायणी भात,दौलत जातीची नाचणी, काळा जिरगा,सुवासिक ब्लॅक राईस, काळा वाटाणा,भुईमुग शेंग

प्रदर्शनात अशी आहेत जनावरे,पक्षीप्रदर्शनामध्ये अमेरिकन शेळ्या,  बोकड, असे खास आकर्षण  आहेत तर खास सांगोला, दहिवडीवरुन जातिवंत खिल्लार खोंड व खिल्लार गायी सहभागी झाल्या आहेत.  परभणी, नांदेड, लातूर येथून लालकंधारी व देवणी, एच एफ जर्शी, साहिवाल, गिर इत्यादी जातीची खोंड, गाई आल्या आहेत, तसेच पंढरपुरी मुह्रा, मेहसाना, जाफराबादी म्हैस, रेडे सहभागी  आहेत. तर जातिवंत घोडे, शेळ्या, मेंढ्या, वराह,  विविध जातीच्या कोंबड्या तसेच  विविध जातीचे  पक्षी आले आहेत.शिवाय कागल मधील हैदर अली यांचा ब्रँड ब्रिडिंग फार्म मांडण्यात आली आहे.ज्यात अमेरिकन बेंटम बोकड  पांढरे रंगीबेरंगी पक्षी, कबुतरे, ब्लॅक ऍस्ट्रोलॉक कोंबडी, जापनीज बेन्टेस कोंबडी, कडकनाथ चिनी कोंबडी, कोलंबियन ब्रम्हा कोंबडा, पर्शियन मांजर, रनर बदक, मरकवी बदक, घुस, हेडलॉक  पांढरे उंदीर,  हंगस्टर पक्षी, राजहंस,लवबर्ड,पोपट कागल येथील अमेरीकन १८ इंचाची बिल्टन बोकडे, टर्की कोंबडी बदक व्हाईट पीकॅन बदक, हेमस्टर जातीचे पांढरे उंदीर,हेज टॉग  पांढरा उंदीर,

टर्की कोंबडा,प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे. एक टनाचा  कानाच्या पुढे वळलेल्या शिंगांचा जाफराबादि सुलतान रेडा आदी जनावरे प्रदर्शनात आली आहेत. ब्ल्यू गोल्ड मकाऊ एक वर्षाचा आहे  जो प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.

विविध कंपन्या व उत्पादनांचा सहभाग

या प्रदर्शनामध्ये देश-विदेशातील विविध कृषी साहित्य असणाऱ्या नामांकित कंपन्यांचा सहभाग प्रदर्शनात आहे. यामध्ये प्रॉम्प्ट इक्विपमेंट प्रा. लि., कर्नाटका सोप ॲन्ड डिटर्जंट लि., डेक्कन फार्फ ईक्विपमेंट प्रा. लि, टाटा सोलर, ग्रीन प्लॅनेट बायो प्रॉडक्ट्स, लक्ष्मी पंप्स प्रा. लि.,  शेरखान लिमिटेड,  चितळे उद्योग समूह,  राजाराम बापू सहकारी दूध संघ,  सावंत ऑरगॅनिक फार्म,  डीजे कोकोनट फॉर्म प्रा. लिमिटेड,विविध प्रकारचे मसाले,सावंत यांची विविध उत्पादने,शेतीसाठी लागणारे पंप,अवजारे,ट्रॅक्टर,खोडवा छाटणी यंत्र,आपौषद फवारणी यंत्र, कडबा कुट्टी,पेरणी यंत्र, भांगलणी यंत्र,भात मळणी यंत्र,म्हैस दूध काढणी यंत्र,आणि विविध भरपूर नामांकित कंपन्या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. तसेच कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांनी देखील या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांना  विविध  कंपन्यांची  उत्पादने  पाहावयास  व  खरेदी  करता  येत आहेत.शेतीची अवजारे, खते औषधे,आदी कंपन्या सहभागी झाल्या आहेत.शिवाय शेतीची नवीन माहिती व अन्य नवनवीन औजारे पहावयास मिळत आहेत.खरेदी केली जात आहे.

प्रदर्शनात  तांदूळ  महोत्सव अंतर्गत विविध प्रकारचा तांदूळ उपलब्ध करण्यात आला आहे.  यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी चोवीस, भोगावती, इंद्रायणी तसेच बाजरी, नाचणी, संद्रिय गुळ, हळद आदींची उपलब्धता करण्यात आली आहे.ज्याची दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात विक्री ही झाली आहे.विविध प्रकारचा स्थानिक आणि विदेशी भाजीपाला, ऊस, बी-बियाणे पाहावयास मिळत आहे. तरी शेतकऱ्यासाठी परिपूर्ण असणारे हे भीमा कृषी व पशू प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.

भागीरथी महिला संस्थेच्या वतीने  मा. सौ.  अरुंधती  महाडिक यांच्या नेतृत्वाखाली महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना दरवर्षी भिमा कृषी प्रदर्शनात संधी मिळते,यावर्षीही  दोनशे बचत गट आपली विविध प्रकारची उत्पादने  या स्टॉलद्वारे लावली आहेत. महिलांनी बनविलेल्या उत्पादनाला भिमा  कृषी  प्रदर्शनाच्या  माध्यमातून थेट  बाजारपेठ  मिळवून  दिली गेली आहे.ज्यात महिला कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा,थालीपीठ,वडा कोंबडा,चिकन ६५,दम बिर्याणी,चिकन बिर्याणी,मसाले भात वेगवेगळी थाळी आणि विविध खाद्य पदार्थ विक्री केली जात आहे.खाद्य महोत्सव अंतर्गत विविध खाद्य पदार्थांवर शेतकरी व नागरिक ताव मारत आहेत.

याचबरोबर  प्रदर्शनामध्ये  शेतकऱ्यांना  तज्ञ व्यक्तींकडून शेतीविषयक  माहिती  दिली  जात  आहे  आणि  वेगवेगळे  सांस्कृतिक  कार्यक्रम  आयोजित करण्यात आले आहेत. ज्याद्वारे स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळत आहे.  आज गंध महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.तर उद्या १५ फेब्रुवारी रोजी नृत्य मल्हार हा कार्यक्रम होणार आहे.

प्रदर्शनात आज झालेली व्याख्याने

प्रदर्शनामध्ये  आज  क्षारपड जमिनीची एकात्मिक सुधारणा नवी दिशा या विषयावर प्रा.डॉ. संग्राम धर्माजी काळे  यांनी बोलताना जमीन खराब होण्याची कारणे तसेच क्षारयुक्त जमिनी, क्षारयुक्त चोपन जमीनि व चोपण जमिनी याचा पीक उत्पादनावर होणारा परिणाम व उपाय यावर सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये हिरवळीच्या खतांचा वापर विविध भू सुधारकांचा वापर तसेच जैविक खतांचा वापर व वरील जमिनीसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन केले. प्राध्यापक, मृदा, शास्त्र ,कृषी संशोधन केंद्र, कसबा डिग्रज, जि.सांगली यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे. आणि आंबा लागवड व काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावर डॉ. केशव हरी पुजारी माजी प्रमुख फलोद्यान सहयोगी अधिष्ठाता यांनी आंबा लागवड कशी करावी त्याची निगा कशी राखावी,आंबा मोहर येत असताना कोणती काळजी घ्यावी आणि आंबा लागेपर्यंत काय करावे याविषयी मार्गदर्शन केले.

याचबरोबर प्रति हेक्टर ४०० ते ५०० आंबा झाडे लावून कमीत कमी जागेत जास्त उत्पन्न मिळू शकते. अडीच ते पाच टन उत्पन्नासाठी खतांचा वापर योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे.यात पालापाचोळा शेणखत याचा वापर करायचा आहे अशी माहिती दिली. आंब्याच्या एकूण १५०० जाती आहेत. मात्र त्यातील केवळ वीस जाती व्यावसायिक आहेत असे सांगितले त्या वेगवेगळ्या ठिकाणी पिकविल्या जातात त्याची माहिती दिली.याचबरोबर त्यांनी आंबा लागवडीनंतरचे व्यवस्थापन या विषयावरही मार्गदर्शन केले.

उद्या होणारी व्याख्याने

रविवारी १५ फेब्रुवारी रोजी प्रा.ऋतुराज सयाजीराव चव्हाण तज्ञ व तांत्रिक सल्लागार हे सेंद्रिय शेतीसाठी अचूक निविष्ठांचा वापर काळाची गरज विषयावर विचार मांडणार आहेत. डॉ. श्री. सॅम लुद्रिक (पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र शासन) हे दुधाळ जनावरांची निगा व संगोपन या विषयावर विचार व्यक्त करणार आहेत.

कृषी विभागाची माहिती

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्माच्या वतीने शेती उपयुक्त डेमो या ठिकाणी सादर करण्यात आले आहेत.ज्यामध्ये सुपर केन नर्सरी, क्षारपड जमीन सुधारणा मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, आत्माच्या वतीने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान या अंतर्गत योजनेची उद्दिष्टे योजना काय आहे याचा प्रकल्प या ठिकाणी सादर करण्यात आला आहे. गोशाळा कशी असावी याची प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या अंतर्गत ठिबक सिंचन, आंबा लागवड,गांडूळ युनिट दाखविण्यात आले आहेत. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, कीटकनाशके फवारताना काय करू नये याबाबत माहिती देण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजना यामध्ये महाडीबीटी अर्ज एक योजना अनेक काय आहेत हे मांडण्यात आले आहे. त्याचबरोबर मातीचा नमुना कसा घ्यावा अन्नपौष्टिक तृणधान्य याबाबत माहिती मांडण्यात आली आहे.ड्रोन माध्यमातून शेती कशी करावी याचीही माहिती दिली जात आहे.कीटकनाशके फवारताना कामगंध सापळा पक्षी थांबे रोपांत द्वारे ऊस लागवड, पौष्टिक तृणधान्याच्या पासून तसेच प्रदर्शनात पाचट व्यवस्थापन ए आय तंत्रज्ञानचा वापर करून स्मार्ट शेती उपयोग, ड्रोनद्वारे फवारणी सेंसरचा वापर कृत्रिम रेतन ए.आय किटचा वापर याबाबत प्रदर्शनात मार्गदर्शन होत आहे.

विशेष सहकार्य असणाऱ्या वृंदावन फाउंडेशनविषयी

वृंदावन फाउंडेशनमार्फत महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न, ग्रामीण भागातील गरीब होतकरू शेतकन्यांकरीता अवजारे खरेदी करणेसाठी प्रयत्न व मदत, गरीब व होतकरू नवीन तरुण उद्योजकांसाठी व्यवसायासाठी प्रयत्न व मदत, भटक्या जनावरांसाठी  अन्नदान व उपचार करीता प्रयत्न व मदत, अनाथ मुलांसाठी  शिक्षणाकरिता मदत, ग्रामीण विकासासाठी प्रयत्न, सांस्कृतीक व आर्थिक विकास, स्वयंसेवी संस्थाना मदत, पर्यावरण  प्रयत्न, समाजातील वंचित घटकांना उच्चाटनासाठी विविध कार्यक्रम राबवणे, आरोग्यविषयक सुवीधा पुरवणे तसेच शिबिरे आयोजीत करणे असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.  वृंदावन फाउंडेशनची याच वर्षी नोंदणी झाली आहे. अशी माहिती वृंदावन फाउंडेशनच्या संचालिका सौ. गौरी सुजित चव्हाण व संचालिका जाई संजय भोसले यांच्या वतीने सुजित चव्हाण यांनी दिली.

प्रदर्शनाचे २०२६ हे १८ वे वर्ष असून  या प्रदर्शनामध्ये शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, २५० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग, १५० पेक्षा अधिक पशु-पक्षांचा सहभाग, शेती विषयक तज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र, विविध शेती अवजारे, बी-बीयाणे खते आदींची माहिती, फुलांचे प्रदर्शन व विक्री (पुष्पप्रदर्शन) विविध  बचत गटांचे मोफत स्टॉल,

यावर्षीच्या भिमा कृषी प्रदर्शनास कृषी विभाग व किसान कल्याण मंत्रालय, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग, आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर,  वृंदावन फाउंडेशन आणि कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. प्रदर्शन चार दिवस सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.याचबरोबर लाईव्ह डेमॉस्ट्रेशन पहाण्यास मिळत आहे.

चार दिवस आयोजित करण्यात आलेल्या या कृषी व पशू प्रदर्शनाचा कोल्हापूर तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे

प्रदर्शनासाठी या प्रदर्शनासाठी प्रा. जे.पी.पाटील, डॉ. अजित शिंदे, डॉ.सुनील काटकर, सर्जेराव धनवडे, दादा, अशोक सिधनेर्ले,दिलीप दळवी,सुजित चव्हाण ,किरण रणदिवे,प्रमोद खोपडे,सचिन पाटील कृषी विभागाची टीम आदी परिश्रम घेत आहेत.

आत्माच्या वतीने शेतकरी गट कंपन्यांची माहिती दिली जात आहे शिवाय प्रदर्शनामध्ये तांदूळ महोत्सव हेही आकर्षण  आहे. ज्यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी २४,भोगावती, इंद्रायणी  आदि नमुनांचे तांदूळ  आहे आज पहिल्याच दिवशी तांदळाची  तसेच नाचणी सेंद्रिय गूळ,हळद यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

विविध प्रकारचा स्थानिक आणि विदेशी भाजीपाला, ऊस, बी – बियाणे पाहाव्यास मिळत आहेत.

याचबरोबर प्रदर्शनामध्ये लाल कंधारी गाई, पंढरपूर मधील गायी, संकरित गायी म्हैशी, वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळ्या जातीचे घोडे, विविध जनावरांच्या जाती  पहावयास मिळत आहेत. आज सायंकाळी प्रदर्शन स्थळी प्रचंड गर्दी लोकांनी,शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी  केली होती.आता दोन दिवस प्रदर्शन उरले असून  शेतकऱ्यांनी भेट देण्याचे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.

प्रदर्शनास हाऊस ऑफ इव्हेंट, असोसिएशन संस्थेने कृषी प्रदर्शनाला सहकार्य केले आहे. व आपला सहभाग नोंदवला आहे. कृषी व किसन कल्याण मंत्रालय,शेती विभाग  महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग,आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर,एचसीपीएसी यांचे सहकार्य लाभले आहे. प्रदर्शन अजून दोन दिवस सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.याचबरोबर लाईव्ह डेमिस्ट्रेशन  पहाण्यास मिळत आहे.

भीमा कृषि प्रदर्शनात धान्य महोत्सव दालनात दोन दिवसात विक्री झालेला शेतमाल :

१) सेंद्रीय गूळ : एक किलोचे एक हजार रवे

२) इंद्रायणी तांदूळ : ३२०० kg

३) आजरा घनसाळ : २१०० kg

४) इंद्रायणी कणी : १५००  kg

५)  रत्नागिरी २४ :  ४०००  kg

६) सेंद्रीय हळद : ५०० kg

७) नाचणी : ८०० kg

८)हात सडीचा काळा तांदूळ १००० kg

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटला सुवर्णपदक राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धा, श्रेयस माने-निकिता कोळेकरचे यश

कसबा बावडा/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीतर्फे आयोजित ‘महाराष्ट्र स्टेट स्किल्स कॉम्पिटिशन २०२६’ या राज्यस्तरीय स्पर्धेत डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी दिमाखदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.महाविद्यालयाच्या संगणक शास्त्र व अभियांत्रिकी विभागातील श्रेयस माने आणि निकिता कोळेकर यांनी ‘लँडस्केप गार्डनिंग’ या कौशल्य प्रकारात उत्कृष्ट सादरीकरण करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. या यशाबद्दल त्यांना २५,००० रुपये रोख पारितोषिक, सुवर्णपदक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
युवकांमधील तांत्रिक व व्यावसायिक कौशल्यांना चालना देऊन त्यांना जागतिक स्तरावर सक्षम करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. संगणक अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी ‘लँडस्केप गार्डनिंग’सारख्या वेगळ्या व आव्हानात्मक कौशल्य प्रकारात सुवर्णपदक मिळवणे ही विशेष उल्लेखनीय बाब मानली जात आहे. त्यांच्या या यशामुळे प्रादेशिक फेरी तसेच विशेष बूटकॅम्प प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली आहे.
या यशाबद्दल डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, रजिस्ट्रार डॉ. व्ही. व्ही. भोसले आणि डॉ. अजित पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील, विभागप्रमुख डॉ. जी. व्ही. ओतारी, प्रा. सतीश रणभिसे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कुंभोज येथील सरस्वती साधना केंद्र व ग्रंथालय  प्राचीन संस्कृती रक्षणासाठी महत्वपूर्ण : ललित गांधी

आठ लिपीमधील ग्रंथ संपदेसाठी राज्य सरकारतर्फे मदत करणार
कुंभोजगिरी – कुंभोज येथे उभारण्यात आलेले सरस्वती साधना केंद्र व याठीकाणी उभारलेले दुर्मिळ ग्रंथ संपदेचे ग्रंथालय हे प्राचीन भारतीय संस्कृती जपण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण उपक्रम असल्याचे प्रतिपादन जैन विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले.
सरस्वती साधना केंद्राचे उद्घाटक व मुख्य मार्गदर्शक या नात्याने बोलताना ललित गांधी यांनी सदर साधना केंद्रामध्ये भारतातील अति प्राचीन अशा ब्राम्ही, शारदा, कुटील, देवनागरी, मल्याळी, कन्नड अशा लिपीमध्ये दुर्मिळ ग्रंथांच्या पुनर्लेखनासाठी राज्य सरकारतर्फे विशेष सहकार्य केले जाईल असे सांगितले.
आचार्य रैवतसुरीजी, साध्वी शीलवतीश्रीजी, साध्वीजी प्रज्ञाभारती सरस्वतीश्रीजी, साध्वीजी उदयप्रभाश्रीजी आदि अनेक साधु-साध्वींच्या प्रमुख उपस्थितीत आनंद स्मृति ट्रस्ट चे अध्यक्ष राजेंद्र बोहरा (पूणे), अरूण ललवाणी, नरेंद्र जैन, मोहनलाल ओसवाल, अभय गांधी, सुभाष शहा, चंपकभाई शहा, अमृतभाई शहा, माणकचंद लालवाणी आदि विविध समाज अग्रणींसह उपजिल्हाधिकारी जीनल पालरेचा यांच्यासह देशभरातुन आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साध्वीजी प्रज्ञाभारती सरस्वतीश्रीजी यांच्या विशेष प्रेरणा व मार्गदर्शनाने स्थापित या साधना केंद्रामध्ये साध्वीजी सरस्वतीश्रीजी यांनी स्वतः आठ लिपीमध्ये लिहीलेली दुर्मिळ ग्रंथ संपदा यानिमित्ताने प्रदर्शित करण्यात आली आहे.
साधना केंद्रामध्ये नवनिर्मित सरस्वती मंदीरामध्ये सरस्वतीच्या प्राचीन ग्रंथात वर्णवलेल्या नऊ वेगवेगळ्या मुद्रांमधील सरस्वती मुर्तींची प्रतिष्ठापना शुक्रवार दि. 13 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न होणार आहे.
पाच दिवस चालणार्‍या या महोत्सवासाठी देशाच्या विविध भागातुन साधु-साध्वी-संत, जैन समाज अग्रणी मोठ्या संख्येने कुंभोजगिरी तिर्थावर दाखल झाले आहेत.
उद्घाटनानिमित्त ट्रस्ट मंडळातर्फे जैन महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री) नाम. ललित गांधी यांचा नऊ लिपित लिहिलेल्या नवकार महामंत्राची प्रतिमा देऊन विशेष सत्कार करणेत आला.
महाराष्ट्रात अशा प्रकारचे हे पहिलेच सरस्वती साधना केंद्र बनले असुन भाविकांनी, ज्ञान साधकांनी व प्राचीन संस्कृती अभ्यासकांनी याठीकाणी अवश्य भेट द्यावी असे आवाहनही ललित गांधी यांनी याप्रसंगी केले.

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘SGAiRC’ “एआय संशोधन केंद्राचे उद्घाटन” आणि ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’चे यशस्वी आयोजन

कोल्हापूर : अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत संजय घोडावत एआय संशोधन केंद्र (SGAiRC) चे उद्घाटन मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता सी-ब्लॉक येथील सेमिनार सभागृहात संपन्न झाले. या उद्घाटन समारंभास संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

याच दिवशी “इंडिया एआय अभियान” सर्वांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या संकल्पनेवर आधारित पूर्व संमेलन कार्यक्रम ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ चे ही उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नामवंत कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना कृत्रिम बुद्धिमत्ता, नवसंकल्पना, संशोधनाच्या संधी तसेच भारतातील एआयचे भवितव्य याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. श्रुती पाटील संचालिका, सिम्बायोसिस कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था, पुणे, श्री. हर्षवर्धन सालुंखे उपाध्यक्ष, व्हीसी टेक्नॉलॉजीज, कोल्हापूर, अनुप कारेकर संशोधन प्रमुख अवकाश व प्रगत संशोधन, व्यापारीकरण व तंत्रज्ञान प्रा. लि.; आंतरराष्ट्रीय खगोल व अंतराळ संघटनेचे राजदूत, तसेच आशुतोष पवार वरिष्ठ संगणक प्रणाली अभियंता, रिव्होल्युशन आयटी सोल्युशन्स यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. विराट व्ही. गिरी, कॉम्पुटर विज्ञान व अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. सागर चव्हाण उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विराट गिरी यांनी केले. “एआय संशोधन केंद्राचे महत्वाचे कार्य कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व, भविष्यातील संशोधन संधी आणि आवश्यक कौशल्यांवर सविस्तर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात विश्वस्त विनायक भोसले यांनी संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये भविष्यातील शास्त्रज्ञ आणि संशोधक घडविण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार शिक्षण व संशोधन अत्यंत आवश्यक असून हे कार्य संस्था प्रभावीपणे करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनाच्या नव्या युगाची सुरुवात करणारे SGAiRC संशोधन केंद्र आणि ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ हे दोन्ही उपक्रम विद्यार्थी, संशोधक व तंत्रज्ञान क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरणारे असून उपस्थितांना कृत्रिम बुद्धिमत्ता क्रांतीचा भाग होण्याचे आह्वान त्यांनी केले.

हा संपूर्ण कार्यक्रम इन्स्टिट्यूटच्या कॉम्पुटर विज्ञान व अभियांत्रिकी विभागांतर्गत आयोजित करण्यात आला होता. विभागप्रमुख प्रा. सागर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी सिद्धी जोशी हिने केले, तर प्रा. सागर चव्हाण यांनी आभारप्रदर्शन केले. संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भिमा कृषी व पशू प्रदर्शनाचे आज होणार पालकमंत्री ना.प्रकाशजी आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन

१३ ते १६ फेब्रुवारी चार दिवस मेरी वेदर मैदान येथे प्रदर्शन आयोजित

चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात शेतीविषयक नामांकित कंपन्यांचा सहभाग, शेतकऱ्यांनी प्रदर्शनास भेट देण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन

कोल्हापूरमध्ये प्रथमच पाच फुटाचा इग्वाना (सरडा), बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध हरण्या बैल,
१२ लाखाचा खिल्लार खौंड, १४०० किलोचा मुरा रेडा, ३० लिटर दुध देणारी एच एफ गाय असणार खास आकर्षण

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून १७ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य असे भिमा कृषी व पशु प्रदर्शन १३ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी १८ वे भव्य कृषी व पशूप्रदर्शन मेरी वेदर मैदानावर भरविण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर पालकमंत्री ना.श्री. प्रकाशजी आबिटकर यांच्या हस्ते आज शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे.यावेळी अध्यक्षस्थानी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री सांगली ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांची उपस्थिती असणार आहे.
या प्रदर्शनात खास आकर्षण कोल्हापूरमध्ये प्रथमच पाच फुटाचा इग्वाना (सरडा), बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध हरण्या बैल, १२ लाखाचा खिल्लार खौंड, १४०० किलोचा मुरा रेडा, ३० लिटर दुध देणारी एच एफ गाय, अमेरिकन शेळ्या, बोकड, असे खास आकर्षण असणार आहेत तर खास सांगोला, दहिवडीवरुन जातिवंत खिल्लार खोंड व खिल्लार गायी सहभागी होणार आहेत. परभणी, नांदेड, लातूर येथून लालकंधारी व देवणी, एच एफ जर्शी, साहिवाल, गिर इत्यादी जातीची खोंड, गाई येणार आहेत, तसेच पंढरपुरी मुह्रा, मेहसाना, जाफराबादी म्हैस, रेडे सहभागी होणार आहेत. तर जातिवंत घोडे, शेळ्या, मेंढ्या, वराह, विविध जातीच्या कोंबड्या तसेच विविध जातीचे पक्षी असणार आहेत.
उद्घाटनप्रसंगी वैद्यकीय शिक्षणमंत्री मा. ना. श्री. हसन मुश्रीफसो, माजी आमदार महादेवरावजी महाडिक यांच्या हस्ते विविध पुरस्कार वितरण होणार आहेत.उद्घाटनप्रसंगी विशेष अतिथी म्हणून महापौर सौ. रूपाराणी निकम,उपमहापौर श्री अक्षय जरग यांची उपस्थिती असणार आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष ना.श्री.राजेश क्षीरसागर,मा. खासदार श्री. धैयशील माने,
मा. आ. श्री. विनय कोरे, आ.राहुल आवाडे,मा. जिल्हाधिकारी, कोल्हापूर श्री. अमोल येडगे,पोलिस अधीक्षक श्री .योगेशकुमार गुप्ता,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री, एस.कार्तिकेयन,मा. आयुक्त श्रीमती के. मंजूलक्ष्मी,भाजपा जिल्हाध्यक्ष मा. श्री. विजय जाधव,भाजपा प्रदेश सचिव श्री.महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष मा. श्री. नाथाजी पाटील,भाजपा जिल्हाध्यक्ष पूर्व मा. श्री. राजवर्धन निंबाळकर पूर्व, आणि मा. श्री. विजय पाटील अध्यक्ष, कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन श्री.विजय पाटील,भगिरथी महिला संस्था अध्यक्षा मा. सौ. अरुंधती महाडिक आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

याचबरोबर प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना चार दिवस तज्ञ व्यक्तींकडून शेतीविषयक माहिती दिली जाणार आहे आणि वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत ज्याद्वारे स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
या प्रदर्शनामध्ये देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग प्रदर्शनात आहे यामध्ये प्रॉम्प्ट इक्विपमेंट प्रा. लि., कर्नाटका सोप ॲन्ड डिटर्जंट लि., डेक्कन फार्फ ईक्विपमेंट प्रा. लि, टाटा सोलर, ग्रीन प्लॅनेट बायो प्रॉडक्ट्स, लक्ष्मी पंप्स प्रा. लि., शेरखान लिमिटेड, चितळे उद्योग समूह, राजाराम बापू सहकारी दूध संघ, सावंत ऑरगॅनिक फार्म, डीजे कोकोनट फॉर्म प्रा. लिमिटेड अश्या भरपूर नामांकित कंपन्या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत तसेच कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांनी देखील या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध कंपन्यांची उत्पादने पाहावयास व खरेदी करता येणार आहेत.
प्रदर्शनात तांदूळ महोत्सव देखील आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी चोवीस, भोगावती, इंद्रायणी तसेच बाजरी, नाचणी, संद्रिय गुळ, हळद विक्रीसाठी असणार आहे.शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती,मत्स्यपालन कसे करावे याची प्रात्यक्षिके, ए आय तंत्रज्ञान याची
माहिती मिळणार आहे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती याठिकाणी दिली जाणार आहे. विविध प्रकारचा स्थानिक आणि विदेशी भाजीपाला, ऊस, बी-बियाणे पाहावयास मिळणार आहेत असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मा. सौ. अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना दरवर्षी भिमा कृषी प्रदर्शनात संधी मिळते, यामध्ये दोनशे बचत गट आपली विविध प्रकारची उत्पादने या स्टॉलद्वारे लावतात. महिलांनी बनविलेल्या उत्पादनाला भिमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून थेट बाजारपेठ मिळवून दिली जाते. शिवाय चार दिवस भागीरथी महिला संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत झुणका-भाकरी दिली जाते.
याचबरोबर कृषीविषयक आधारित २०० हून अधिक स्टॉल याठिकाणी आहेत.

प्रदर्शनामध्ये कृषी तज्ञांची व्याख्याने चार दिवस दुपारी १२ ते ४ या वेळेत होणार आहेत. यात १४ फेब्रुवारी रोजी क्षारपड जमिनीची एकात्मिक सुधारणा नवी दिशा या विषयावर डॉ. संग्राम धर्माजी काळे सह प्राध्यापक, मृदा, शास्त्र ,कृषी संशोधन केंद्र, कसबा डिग्रज, जि.सांगली यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे. त्याचदिवशी आंबा लागवड व काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावर डॉ. केशव हरी पुजारी माजी प्रमुख फलोद्यान सहयोगी अधिष्ठाता डॉ.बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ दापोली हे मार्गदर्शन करणार आहेत.
१५ फेब्रुवारी रोजी प्रा.ऋतुराज सयाजीराव चव्हाण तज्ञ व तांत्रिक सल्लागार हे सेंद्रिय शेतीसाठी अचूक निविष्ठांचा वापर काळाची गरज विषयावर विचार मांडणार आहेत. डॉ. श्री. सॅम लुद्रिक (पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र शासन) हे दुधाळ जनावरांची निगा व संगोपन या विषयावर विचार व्यक्त करणार आहेत.
१६ फेब्रुवारी रोजी भाजीपाला सुधारित लागवड व परदेशी भाजीपाला लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉ. श्री. भरत तुकाराम पाटील भाजीपाला पैदासकर व प्रमुख फलोद्यान विभाग महात्मा फुले विद्यापीठ राहुरी, जि. अहिल्यानगर हे विचार व्यक्त करणार आहेत. तर कृषी विभागाच्या विकासात्मक योजना व वापर या विषयावर तालुका कृषी अधिकारी करवीरचे श्री. युवराज पाटील मार्गदर्शन करणार आहेत आणि तालुका कृषी अधिकारी कागलचे श्री. शेखर थोरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
भिमा कृषी प्रदर्शनामध्ये शेतीभूषण ५ पुरस्कार तर शेतीनिष्ठ शेतकरी १०, जिजामाता ५ पुरस्कार, तर युवा शेतकरी ५, आदर्श शेतकरी ५ आणि शेती तंत्रज्ञ पुरस्कार ५ दिले जाणार आहेत आणि कृषी विभागाच्या वतीने ही उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा, पीक स्पर्धा, जनावरे यांच्या स्पर्धांना बक्षीसे दिली जाणार आहेत.
दररोज सायंकाळी ६ वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम तीन दिवस या ठिकाणी होणार आहेत. यात १३ फेब्रुवारी रोजी कराओके गीत गायन स्पर्धा,
१४ फेब्रुवारी रोजी राधानगरी येथील गंध महाराष्ट्राचा हा कार्यक्रम होणार आहे. तर १५ रोजी नृत्य मल्हार हा कार्यक्रम होणार आहेत. १६ फेब्रुवारी रोजी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. तर १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता सांगता समारंभ व पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.

विशेष सहकार्य असणाऱ्या वृंदावन फाउंडेशनविषयी

वृंदावन फाउंडेशनमार्फत महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न, ग्रामीण भागातील गरीब होतकरू शेतकन्यांकरीता अवजारे खरेदी करणेसाठी प्रयत्न व मदत, गरीब व होतकरू नवीन तरुण उद्योजकांसाठी व्यवसायासाठी प्रयत्न व मदत, भटक्या जनावरांसाठी अन्नदान व उपचार करीता प्रयत्न व मदत, अनाथ मुलांसाठी शिक्षणाकरिता मदत, ग्रामीण विकासासाठी प्रयत्न, सांस्कृतीक व आर्थिक विकास, स्वयंसेवी संस्थाना मदत, पर्यावरण प्रयत्न, समाजातील वंचित घटकांना उच्चाटनासाठी विविध कार्यक्रम राबवणे, आरोग्यविषयक सुवीधा पुरवणे तसेच शिबिरे आयोजीत करणे असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. वृंदावन फाउंडेशनची याच वर्षी नोंदणी झाली आहे. अशी माहिती वृंदावन फाउंडेशनच्या संचालिका सौ. गौरी सुजित चव्हाण व संचालिका जाई संजय भोसले यांच्या वतीने सुजित चव्हाण यांनी दिली.
यावर्षीच्या भिमा कृषी प्रदर्शनास कृषी विभाग व किसान कल्याण मंत्रालय, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग, आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर, वृंदावन फाउंडेशन आणि कोल्हापूर ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
चार दिवस आयोजित करण्यात आलेल्या या कृषी व पशू प्रदर्शनाचा कोल्हापूर तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे

इंडियन सुपर फायटर्स असोसिएशन आयोजित एमएमए स्पर्धेत कोल्हापूरचे खेळाडू चमकले

कोल्हापूर/प्रतिनिधी : मुंबई येथे नुकत्याच झालेल्या इंडियन सुपर फायटर्स असोसिएशन आयोजित एमएमए या राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंग स्पर्धेत कोल्हापूरचे खेळाडू चमकले.संपूर्ण भारतातून या स्पर्धेत विविध राज्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत वायएमसीए या क्लब कडून चार स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये ८० किलो गटात कोल्हापूरच्या राज कोरगावकर यांनी मुंबईच्या अली बशीर याला अवघ्या १४ सेकंदात पराजित करत सर्वात जलद नॉक आउट ची नोंद केली.तसेच ६५ किलो गटात प्रथमेश पाटील याने १ मी २२ सेकंद मध्ये प्रतिस्पर्ध्यावर मात केली. तसेच ७० किलो गटात अथर्व तिवडे यांनी देखील स्पर्धेत सहभाग घेतला. या सर्व खेळाडूना प्रशिक्षक स्टवन सोरटे यांचे मार्गदर्शन लाभले.

खेळाची पंढरी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरातुन अनेक जागतिक स्तरावरील खेळाडू घडले असून या वेगळ्या आणि साहसी प्रकाराकडे देखील खेळाडू आता आकर्षित होऊन कोल्हापूरचे नाव उज्वल करत आहेत. या यशामागे खेळाडूंची मेहनत, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि क्रीडाप्रेमींचा पाठिंबा कारणीभूत ठरला आहे. कोल्हापूरने बॉक्सिंग क्षेत्रात आपली परंपरा कायम राखत पुन्हा एकदा राज्यभर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व विजयी खेळाडू, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कोल्हापूरच्या या कामगिरीमुळे आगामी स्पर्धांसाठी नव्या खेळाडूंना प्रेरणा मिळणार आहे.

वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमामुळे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनला मिळाले तब्बल १५ पुरस्कार, रोटरीच्या माजी अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांची माहिती

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ही समाजातील विविध गरजू घटकांसाठी भरीव उपक्रम राबवणारी आंतरराष्ट्रीय पातळीवरची संघटना आहे. या संघटनेच्या अनेक शाखा असून, त्यापैकी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं गेल्या काही वर्षात कोल्हापूरसह परिसरातील विविध जिल्हयांमध्ये शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवले आहेत. विशेषत: २०२४ ते २०२५ या कालावधीत रोटरी क्लब मिडटाऊनने अनेक लक्षवेधी आणि समाजहिताचे प्रकल्प राबवले. त्याची दखल घेवून यावर्षी रोटरी मिडटाऊनला तब्बल १५ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या माजी अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी ११ जुलै २०२४ रोजी सौ. अरूंधती धनंजय महाडिक यांची निवड झाली. निवडीनंतर त्यांनी राबवलेल्या विविध नियोजनबध्द कार्यक्रमाचा समाजातील अनेक घटकांना मोठा फायदा झाला. त्यामध्ये विकासवाडी आणि फाईव्ह स्टार एमआयडीसी मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजुला केलेले वृक्षारोपण, रोटरीच्या वतीने प्रथमच राबवलेला आषाढी वारीचा आणि प्रसाद वाटपाचा उपक्रम, कारगील विजय दिवस साजरा करून शहीदांच्या कुटूंबियांचा केलेला सन्मान, बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन, कळंबा जेल मधील कैद्यांसाठी राबवलेला रक्षाबंधनाचा कार्यक्रम, प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच वृध्दाश्रमातील निराधारांसाठी आरोग्य तपासणी शिबीर, सांस्कृतिक स्पर्धा, गाण्यांचा कार्यक्रम, जिल्हयातील नवोदित फोटोग्राफर्सना मार्गदर्शन करण्यासाठी ३ दिवसांची प्रशिक्षण कार्यशाळा, वयात येणार्‍या मुलींना आरोग्यासह परिपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी कळी उमलताना या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे जिल्हयातील सुमारे १५ हून अधिक शाळांमध्ये आयोजन, तसेच विद्यार्थीनींसाठी सॅनिटरी नॅपकीन वेंडींग मशिनचे वितरण, शालेय वयात स्पर्धा परीक्षेबाबत आवड निमर्ाण व्हावी, यासाठी केटीएस स्पर्धेचे जिल्हयातील सर्वच शाळांमध्ये आयोजन, त्यामध्ये १६०० मुलांचा सहभाग, त्यातून प्रथम आलेल्या २०० मुलांना स्कॉलरशिपसह बक्षिसं, ६० गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण, त्याचप्रमाणे पुण्याच्या सुप्रसिध्द आंतरराष्ट्रीय ऍक्युपेंचर तज्ञ डॉ. सुनिता सातारकर, अच्युत गोडबोले, तसेच आदिवासी आणि जंगली भागात राहणार्‍या महिलांना उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी बनवणार्‍या अनघा पुरंदरे आणि पर्यावरणप्रेमी, पक्षी मित्र किरण पुरंदरे तसेच सीमेवरील युध्दात जखमी होवूनही जोरदार पुनरागमन करत, जलतरण स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ४७६ मेडल्स मिळवलेल्या चंदू चॅम्पियन फेम अर्जुन पुरस्कार विजेते मुरलीधर पेटकर यांच्यासह विविध नामवंत आणि तज्ञ व्यक्तींची व्याख्याने आणि शिबीराचे आयोजन, शिक्षक दिनानिमित्त जिल्हयातील गुणवंत शिक्षकांचा सत्कार, रोटरी क्लबच्यावतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून, प्रथमच महिला संघाचा सहभाग, आंतर शालेय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करून विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसं, महिलांमधील वाढत्या कॅन्सरचे प्रमाण रोखण्यासाठी मॅमोग्राफी तपासणी शिबीराचे आयोजन, त्यामध्ये सुमारे ६० महिलांची तपासणी, तसेच गरजू महिलांना सवलतीच्या दरात कॅन्सर तपासणी करता यावी, यासाठी रोटरीच्या ग्लोबल ग्रँट अंतर्गत कोल्हापूर कॅन्सर सेंटरला मॅमोग्राफी मशिन प्रदान, निगवे खालसा गावात स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी वॉटर एटीएम, रक्तदान शिबीराचे आयोजन, महिलांवरील अत्याचाराबाबत प्रतिबंधात्मक कायद्याचे मार्गदर्शन, त्यामध्ये पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, स्थानिक गुन्हेअन्वेषण शाखेचे रवींद्र कळमकर, निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती यादव यांचे मार्गदर्शन, रोटरी मिडटाऊनला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल क्लबच्या माजी प्रेसिडेन्स यांचा सत्कार, दिव्यांगांना व्हिलचेअर आणि सायकलीसह विविध दिव्यांग सहाय्यक साधनांचे वाटप, हेल्मेट वापरण्यासाठी जनजागृती मोहिम, वर्षभराच्या कालावधीत सुमारे १५० पेक्षा अधिक आरोग्य आणि वैद्यकीय शिबीरांचे आयोजन, रोटरी इंटरनॅशनलकडून विविध प्रकल्प राबवण्यासाठी भरीव निधी खेचून आणण्यात यश, रोटरीसाठी डॉ. रेश्मा आणि डॉ. सुरज पवार, खासदार धनंजय महाडिक आणि सौ. अरूंधती महाडिक तसेच पृथ्वीराज महाडिक आणि भारती आणि करूणाकर नायक यांच्याकडून मोठा निधी प्रदान, दिव्यांगासाठी कदमवाडी मध्ये जयपूर फुटचे वितरण, जिल्हयातील गाेरगरीब आणि गरजू १०० महिलांना मोफत शिलाई मशिन वाटप, असंडोली गावामध्ये मुलींसाठी शौचालये बांधून देण्याच्या कामासाठी मदत, प्रयास या उपक्रमांतर्गत समाजात तंटा, वाद, मतभेद संपुष्टात येवून एकोपा निर्माण व्हावा, यासाठी तंटामुक्ती केंद्राची स्थापना असे अनेक उपक्रम राबवण्यात आले. विशेषत: १ कोटी १३ लाख रूपयांच्या ग्लोबल गॅ्रंट करण्यात क्लबला यश आले. सौ. अरूंधती महाडिक यांच्या अध्यक्षपदाच्या वर्षभराच्या कालावधीत असे अनेक उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांची दखल घेवून रोटरी मिडटाऊनला तब्बल १५ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये बेस्ट प्रेसिडेंट म्हणून रोटेरियन अरूंधती महाडिक, हायेस्ट कॉंट्रीब्युशन इन टोटल गिव्हींग, बेस्ट इन अर्बन रूरल रिलेशन, बेस्ट इन मेंबरशिप रिटेंशन, आऊट स्टँडींग कम्युनिटी सर्व्हीस प्रोजेक्ट, बेस्ट इन युथ सर्व्हीस, मेजर डोनरचे ४ पुरस्कार, २ ग्लोबल ग्रँड प्रोजेक्टचे पुरस्कार, द मॅजिक ऑफ रोटरी फौंडेशन लिगसी ऍवॉर्ड, बेस्ट क्लब बुलेटिन मंथली आणि बेस्ट ऍवॉर्ड फॉर आऊटस्टँडींग कम्युनिटी सर्व्हीस प्रोजेक्ट अशा १५ पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्कारामुळे वर्षभर अतिशय नियोजनबध्द रितीने आणि पूर्ण समर्पित वृत्तीने केलेल्या कामाचे चिज झाले आहे, अशी प्रतिक्रिया माजी अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी व्यक्त केली. रोटरीच्या पदाधिकार्‍यांसह तत्कालीन सहकार्‍यांची साथ आणि सहकार्य मिळाल्यानेच एवढ्या मोठ्या संख्येने उपक्रम राबवणे शक्य झाल्याचेही सौ. महाडिक यांनी नमुद केले. पत्रकार परिषदेला रोटरीच

5 फेब्रुवारी रात्री 10 पासून जमावबंदी – प्रचार संपुष्टात येणार

5 फेब्रुवारी रात्री 10 पासून जमावबंदी – प्रचार संपुष्टात येणार

कोल्हापूर, दि. 4 (जिमाका): जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी विनिर्दिष्ट ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या मतदारसंघासाठी शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर म्हणजेच 5 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजल्यानंतर प्रचार करता येणार नाही किंवा सभा घेता येणार नाही.

त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघ कार्यक्षेत्रात 5 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते मतदानादिवशी 7 फेब्रुवारी रोजी मतदान संपेपर्यंत बेकायदेशीर जमाव जमवणे, सार्वजनिक सभा, बैठका घेणे तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येणे अशी कृत्ये करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघ क्षेत्रात मतदान संपेपर्यंत खालील कृती करण्यास मनाई केली आहे.

बेकायदेशीर जमाव जमविणे आणि सार्वजनिक सभा, बैठका घेणे अगर निवडणूक प्रचार करणे. तसेच पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येणे. (पूर्व नियोजित सामाजिक व धार्मिक कार्यक्रम वगळून व राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व निवडणूक कामाशी निगडित कर्मचारी वगळून.) या आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास, ती व्यक्ती भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

 

वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमामुळे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनला मिळाले तब्बल १५ पुरस्कार

वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमामुळे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनला मिळाले तब्बल १५ पुरस्कार रोटरीच्या माजी अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांची माहिती

कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ही समाजातील विविध गरजू घटकांसाठी भरीव उपक्रम राबवणारी आंतरराष्ट्रीय पातळीवरची संघटना आहे. या संघटनेच्या अनेक शाखा असून, त्यापैकी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं गेल्या काही वर्षात कोल्हापूरसह परिसरातील विविध जिल्हयांमध्ये शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवले आहेत. विशेषत: २०२४ ते २०२५ या कालावधीत रोटरी क्लब मिडटाऊनने अनेक लक्षवेधी आणि समाजहिताचे प्रकल्प राबवले. त्याची दखल घेवून यावर्षी रोटरी मिडटाऊनला तब्बल १५ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या माजी अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी ११ जुलै २०२४ रोजी सौ. अरूंधती धनंजय महाडिक यांची निवड झाली. निवडीनंतर त्यांनी राबवलेल्या विविध नियोजनबध्द कार्यक्रमाचा समाजातील अनेक घटकांना मोठा फायदा झाला. त्यामध्ये विकासवाडी आणि फाईव्ह स्टार एमआयडीसी मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजुला केलेले वृक्षारोपण, रोटरीच्या वतीने प्रथमच राबवलेला आषाढी वारीचा आणि प्रसाद वाटपाचा उपक्रम, कारगील विजय दिवस साजरा करून शहीदांच्या कुटूंबियांचा केलेला सन्मान, बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन, कळंबा जेल मधील कैद्यांसाठी राबवलेला रक्षाबंधनाचा कार्यक्रम, प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच वृध्दाश्रमातील निराधारांसाठी आरोग्य तपासणी शिबीर, सांस्कृतिक स्पर्धा, गाण्यांचा कार्यक्रम, जिल्हयातील नवोदित फोटोग्राफर्सना मार्गदर्शन करण्यासाठी ३ दिवसांची प्रशिक्षण कार्यशाळा, वयात येणार्‍या मुलींना आरोग्यासह परिपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी कळी उमलताना या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे जिल्हयातील सुमारे १५ हून अधिक शाळांमध्ये आयोजन, तसेच विद्यार्थीनींसाठी सॅनिटरी नॅपकीन वेंडींग मशिनचे वितरण, शालेय वयात स्पर्धा परीक्षेबाबत आवड निमर्ाण व्हावी, यासाठी केटीएस स्पर्धेचे जिल्हयातील सर्वच शाळांमध्ये आयोजन, त्यामध्ये १६०० मुलांचा सहभाग, त्यातून प्रथम आलेल्या २०० मुलांना स्कॉलरशिपसह बक्षिसं, ६० गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण, त्याचप्रमाणे पुण्याच्या सुप्रसिध्द आंतरराष्ट्रीय ऍक्युपेंचर तज्ञ डॉ. सुनिता सातारकर, अच्युत गोडबोले, तसेच आदिवासी आणि जंगली भागात राहणार्‍या महिलांना उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी बनवणार्‍या अनघा पुरंदरे आणि पर्यावरणप्रेमी, पक्षी मित्र किरण पुरंदरे तसेच सीमेवरील युध्दात जखमी होवूनही जोरदार पुनरागमन करत, जलतरण स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ४७६ मेडल्स मिळवलेल्या चंदू चॅम्पियन फेम अर्जुन पुरस्कार विजेते मुरलीधर पेटकर यांच्यासह विविध नामवंत आणि तज्ञ व्यक्तींची व्याख्याने आणि शिबीराचे आयोजन, शिक्षक दिनानिमित्त जिल्हयातील गुणवंत शिक्षकांचा सत्कार, रोटरी क्लबच्यावतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून, प्रथमच महिला संघाचा सहभाग, आंतर शालेय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करून विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसं, महिलांमधील वाढत्या कॅन्सरचे प्रमाण रोखण्यासाठी मॅमोग्राफी तपासणी शिबीराचे आयोजन, त्यामध्ये सुमारे ६० महिलांची तपासणी, तसेच गरजू महिलांना सवलतीच्या दरात कॅन्सर तपासणी करता यावी, यासाठी रोटरीच्या ग्लोबल ग्रँट अंतर्गत कोल्हापूर कॅन्सर सेंटरला मॅमोग्राफी मशिन प्रदान, निगवे खालसा गावात स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी वॉटर एटीएम, रक्तदान शिबीराचे आयोजन, महिलांवरील अत्याचाराबाबत प्रतिबंधात्मक कायद्याचे मार्गदर्शन, त्यामध्ये पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, स्थानिक गुन्हेअन्वेषण शाखेचे रवींद्र कळमकर, निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती यादव यांचे मार्गदर्शन, रोटरी मिडटाऊनला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल क्लबच्या माजी प्रेसिडेन्स यांचा सत्कार, दिव्यांगांना व्हिलचेअर आणि सायकलीसह विविध दिव्यांग सहाय्यक साधनांचे वाटप, हेल्मेट वापरण्यासाठी जनजागृती मोहिम, वर्षभराच्या कालावधीत सुमारे १५० पेक्षा अधिक आरोग्य आणि वैद्यकीय शिबीरांचे आयोजन, रोटरी इंटरनॅशनलकडून विविध प्रकल्प राबवण्यासाठी भरीव निधी खेचून आणण्यात यश, रोटरीसाठी डॉ. रेश्मा आणि डॉ. सुरज पवार, खासदार धनंजय महाडिक आणि सौ. अरूंधती महाडिक तसेच पृथ्वीराज महाडिक आणि भारती आणि करूणाकर नायक यांच्याकडून मोठा निधी प्रदान, दिव्यांगासाठी कदमवाडी मध्ये जयपूर फुटचे वितरण, जिल्हयातील गाेरगरीब आणि गरजू १०० महिलांना मोफत शिलाई मशिन वाटप, असंडोली गावामध्ये मुलींसाठी शौचालये बांधून देण्याच्या कामासाठी मदत, प्रयास या उपक्रमांतर्गत समाजात तंटा, वाद, मतभेद संपुष्टात येवून एकोपा निर्माण व्हावा, यासाठी तंटामुक्ती केंद्राची स्थापना असे अनेक उपक्रम राबवण्यात आले. विशेषत: १ कोटी १३ लाख रूपयांच्या ग्लोबल गॅ्रंट करण्यात क्लबला यश आले. सौ. अरूंधती महाडिक यांच्या अध्यक्षपदाच्या वर्षभराच्या कालावधीत असे अनेक उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांची दखल घेवून रोटरी मिडटाऊनला तब्बल १५ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये बेस्ट प्रेसिडेंट म्हणून रोटेरियन अरूंधती महाडिक, हायेस्ट कॉंट्रीब्युशन इन टोटल गिव्हींग, बेस्ट इन अर्बन रूरल रिलेशन, बेस्ट इन मेंबरशिप रिटेंशन, आऊट स्टँडींग कम्युनिटी सर्व्हीस प्रोजेक्ट, बेस्ट इन युथ सर्व्हीस, मेजर डोनरचे ४ पुरस्कार, २ ग्लोबल ग्रँड प्रोजेक्टचे पुरस्कार, द मॅजिक ऑफ रोटरी फौंडेशन लिगसी ऍवॉर्ड, बेस्ट क्लब बुलेटिन मंथली आणि बेस्ट ऍवॉर्ड फॉर आऊटस्टँडींग कम्युनिटी सर्व्हीस प्रोजेक्ट अशा १५ पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्कारामुळे वर्षभर अतिशय नियोजनबध्द रितीने आणि पूर्ण समर्पित वृत्तीने केलेल्या कामाचे चिज झाले आहे, अशी प्रतिक्रिया माजी अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी व्यक्त केली. रोटरीच्या पदाधिकार्‍यांसह तत्कालीन सहकार्‍यांची साथ आणि सहकार्य मिळाल्यानेच एवढ्या मोठ्या संख्येने उपक्रम राबवणे शक्य झाल्याचेही सौ. महाडिक यांनी नमुद केले. पत्रकार परिषदेला रोटरीचे सचिव विकास राऊत, बी एस शिंपुकडे, अनिरूध्द तगारे, ऍड. अनिल देशपांडे, भारती नायक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.