Grid Posts

View All
माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

माय मराठी

शहरातील टायर विक्री आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या भव्य शोरूमचे कळंबा येथे उद्घाटन

माय मराठी

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन

माय मराठी

कोल्हापुरी चप्पलसह चर्मकला जतन आणि विकसित करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले संसदेत विधेयक

माय मराठी

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार

Thumbnail

View All
My Marathi

कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा पुरवठा; अफवांवर विश्वास ठेवून ‘पॅनिक बायिंग’ करू नका: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

ग्लोबल ताज्या देश प्रीमियम महाराष्ट्र माय मराठी

मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करूया: जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या बैठकीतील संकल्प

My Marathi

सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय हिंदू, शीख आणि बौद्धांनाच अनुसूचित जातीचा दर्जा

माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

माय मराठी

शहरातील टायर विक्री आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या भव्य शोरूमचे कळंबा येथे उद्घाटन

Tile List

View All
माय मराठी

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन कोल्हापूर (जिमाका) : शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासन कृषी…

माय मराठी

कोल्हापुरी चप्पलसह चर्मकला जतन आणि विकसित करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले संसदेत विधेयक

माय मराठी

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार

माय मराठी

येत्या वर्षात प्रत्येक घरात सौर प्रकल्प राबवून ‘शून्य वीज बिल’ करण्याचे उद्दिष्ट – मंत्री हसन मुश्रीफ

List Posts

View All
माय मराठी

भुये (ता. करवीर) च्या मानाच्या सासनकाठी क्रमांक ४० चा पर्यावरणपूरक उपक्रम गाजला; जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

भुये (ता. करवीर) च्या मानाच्या सासनकाठी क्रमांक ४० चा पर्यावरणपूरक उपक्रम गाजला; जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक भुये (ता. करवीर) : जोतिबा चैत्र…

My Marathi

दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळा पडला पार

दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळा पडला पार कोल्हापूर/प्रतिनिधी : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र…

My Marathi

जोतिबा भक्तांची श्रद्धा गायमुखावर: भक्तांच्या विधिवत पूजनाने अन्नछत्राचा मंगल प्रारंभ झाला!

जोतिबा भक्तांची श्रद्धा गायमुखावर: भक्तांच्या विधिवत पूजनाने अन्नछत्राचा मंगल प्रारंभ झाला! कोल्हापूर/प्रतिनिधी: गेली २५ वर्षे श्रद्धेचा आणि सेवेचा एक अखंड…

My Marathi

भक्तीची पाऊलवाट आणि माणुसकीची थाप: जोतिबाच्या चैत्र यात्रेतील बैलगाड्यांची परंपरा

भक्तीची पाऊलवाट आणि माणुसकीची थाप: जोतिबाच्या चैत्र यात्रेतील बैलगाड्यांची परंपरा कोल्हापूर/प्रमोद पाटील  : "चांगभलं" च्या गजराने अवघा जोतिबा डोंगर दुमदुमून…

Thumbnail

View All
My Marathi

अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीचा विवाह ; पतीसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा

My Marathi

कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा पुरवठा; अफवांवर विश्वास ठेवून ‘पॅनिक बायिंग’ करू नका: जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

ग्लोबल ताज्या देश प्रीमियम महाराष्ट्र माय मराठी

मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करूया: जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या बैठकीतील संकल्प

My Marathi

सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय हिंदू, शीख आणि बौद्धांनाच अनुसूचित जातीचा दर्जा

माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

माय मराठी

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे आज  जल्लोषी स्वागत

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे आज  जल्लोषी स्वागत कोल्हापूर/प्रतिनिधी : भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज…

माय मराठी

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये  ‘इनो क्वेस्ट २के २६’ नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये  ‘इनो क्वेस्ट २के २६’ नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये  “इनो…

माय मराठी

डॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकाला राजारामबापू पाटील साहित्य पुरस्कार

डॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकाला राजारामबापू पाटील साहित्य पुरस्कार कोल्हापूर/प्रतिनिधी : येथील शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी तथा लेखक डॉ. आलोक…

माय मराठी

कोल्हापूरात अनूसुचित ‘शॉर्टफिन डेव्हिल रे’ मासा विक्रीसाठी; वनविभागाची धडक कारवा

कोल्हापूरात अनूसुचित ‘शॉर्टफिन डेव्हिल रे’ मासा विक्रीसाठी; वनविभागाची धडक कारवाई कोल्हापूर/प्रतिनिधी : गोपनीय माहितीच्या आधारे करवीर वनपरिक्षेत्राने मंगळवारी फुलेवाडी येथील…

माय मराठी

तरुणांच्या श्रमशक्तीतूनच साकार होईल,समृद्ध गावाचे स्वप्न : सरपंच प्रियांका पाटील

तरुणांच्या श्रमशक्तीतूनच साकार होईल,समृद्ध गावाचे स्वप्न : सरपंच प्रियांका पाटील कोल्हापूर/प्रतिनिधी : पाचगाव येथे डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, स्कूल…

माय मराठी

कोल्हापूर महापालिका सभा पाणी प्रश्नावरून गाजली

कोल्हापूर महापालिका सभा पाणी प्रश्नावरून गाजली   कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिकेची सभा पाणी प्रश्नावरून चांगलीच गाजली.सुरुवातीला स्वर्गीय उपमुख्य मंत्री अजित…

माय मराठी

संजय घोडावत यांचा ‘द ज्वेल्स ऑफ इंडिया’ पुरस्काराने सन्मान

संजय घोडावत यांचा ‘द ज्वेल्स ऑफ इंडिया’ पुरस्काराने सन्मान कोल्हापूर/प्रतिनिधी : नवी दिल्ली येथे मनीष मिडिया यांच्या वतीने आयोजित करण्यात…

माय मराठी

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी स्पर्धांचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी स्पर्धांचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट ग्रीन कॅम्पस मध्ये स्वराज्याचे…

माय मराठी

संजय घोडावत आय. आय. टी . व मेडिकल अकॅडमीची जे.ई ई. मेन्स फेज – १ मध्ये ऐतिहासिक कामगिरी

संजय घोडावत आय. आय. टी . व मेडिकल अकॅडमीची जे.ई ई. मेन्स फेज – १ मध्ये ऐतिहासिक कामगिरी अतिग्रे/प्रतिनिधी :…

माय मराठी

शक्तीपीठ विरोधात आज २३ फेब्रुवारीला प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन

शक्तीपीठ विरोधात आज २३ फेब्रुवारीला प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन कोल्हापूर/प्रतिनिधी : शक्तीपीठ महामार्गाविरोधात येत्या २३ फेब्रुवारीला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्यात…

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे आज  जल्लोषी स्वागत

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे आज  जल्लोषी स्वागत

कोल्हापूर/प्रतिनिधी : भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे आज रविवारी १ मार्च रोजी कोल्हापुरात आगमन होत आहे. यानिमित्त त्यांचे करवीर नगरीत दुचाकी रॅलीने जल्लोषी स्वागत करण्याचा निर्धार आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी केला आहे. या संबंधी खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये २ हजार दुचाकी स्वारांची रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र कृष्णराज महाडिक हे गेल्या पाच वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची ओळख दूरवर पसरली आहे. यापुर्वी त्यांनी फॉर्म्युला थ्री या आंतरराष्ट्रीय कार रेसिंगमध्ये उज्वल कामगिरी करत देश-विदेशातील लाखो नागरिकांची मने जिंकली आहेत. सर्वच क्षेत्रात खर्‍या अर्थाने युथ आयकॉन ठरलेल्या कृष्णराज महाडिक यांचा योग्य सन्मान करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीवेळी सांगितले होते. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कृष्णराज महाडिक यांची युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदी निवड केली.                                                   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह सर्वच प्रमुख नेत्यांनी कृष्णराज महाडिक यांचा योग्य सन्मान ठेवत, त्यांना युवा मोर्चाचं प्रदेशाध्यक्षपद दिलं. या निवडीनंतर राज्यभरातील नागरिकांकडून कृष्णराज महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. तसेच राज्यभरातील पक्ष कार्यकर्ते, युवा वर्गात उत्साहाचं वातावरण आहे. युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे आज रविवार १ मार्च रोजी मुंबईहून कोल्हापुरात आगमन होत आहे. त्यांचे जल्लोषी स्वागत करण्याच्या दृष्टीने भाजपा कार्यालयात खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. कृष्णराज महाडिक यांची युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी निवड होणे हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय आहे. पक्षाने त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी ते आपल्या कार्यक्षमतेने योग्य पध्दतीने पार पाडतील, तसेच पक्षाची भूमिका पटवून देणे आणि विस्तार करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे. कोल्हापूरच्या परंपरेला साजेल असेच त्यांचे स्वागत व्हावे, अशी अपेक्षा देखील खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी स्वागत रॅलीसंबंधी माहिती दिली.            दुपारी ४ वाजता छत्रपती ताराराणी चौकातून कृष्णराज महाडिक यांच्या स्वागत रॅलीला सुरूवात होणार आहे. या रॅलीत २ हजार पेक्षा अधिक दुचाकी स्वारांचा समावेश आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसर्जित होईल. त्यानंतर सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कृष्णराज महाडिक पक्ष कार्यालयात शुभेच्छा स्वीकारणार आहेत. या कार्यक्रमात जनतेने उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले आहे. कृष्णराज महाडिक यांची निवड हा संपूर्ण कोल्हापूरचा सन्मान असल्याचेही विजय जाधव यांनी सांगितले. दरम्यान कोल्हापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसंच विविध समित्यांवर निवड झालेल्यांचा सत्कार खासदार महाडिक यांच्या हस्ते झाला. यामध्ये विजय जाधव, सुनील वाडकर, हेमंत आराध्ये, आप्पा लाड, प्रा. जयंत पाटील, प्रशांत मोरे, प्रसाद जाधव, तानाजी पाटील यांचा समावेश होता. यावेळी जिल्हा परिषद राजवर्धन नाईक-निंबाळकर, नाथाजी पाटील, गटनेते मुरलीधर जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये  ‘इनो क्वेस्ट २के २६’ नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये  ‘इनो क्वेस्ट २के २६’ नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये  “इनो क्वेस्ट २के२६” नाविन्यपूर्ण कल्पना, प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन सोमवार, २ मार्च २०२६ रोजी करण्यात आले आहे. संस्थेच्या ‘संस्थात्मक नवोपक्रम परिषदे’च्या (आयआयसी) पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना, संशोधनवृत्ती आणि तांत्रिक कौशल्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या प्रदर्शनात महाराष्ट्र राज्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी आपले अभिनव प्रकल्प आणि कल्पना सादर करणार आहेत. उद्योगाभिमुख विचारसरणी, नवउद्योजकता संस्कृती आणि नवोपक्रमांना चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. विराट गिरी यांनी सांगितले.
स्पर्धांमध्ये ‘इनोव्हाट्रिक्स’, ‘आयडीया पिचिंग स्पर्धा’, ‘टेक्नोव्हर्स टेक-पेस्ट’, ‘पोस्टर एक्स प्रो’ आणि ‘टेक रोबस्टा’ या प्रमुख विभागांचा समावेश आहे. ‘इनोव्हाट्रिक्स’ अंतर्गत ‘सर्किट्रिक्स’ आणि ‘इनोव्हेटर्स अरेना’ होणार असून, एक किंवा दोन सदस्यांच्या गटांना सहभाग घेता येणार आहे.
‘आयडीया पिचिंग’ स्पर्धेत समस्या मांडणी, प्रस्तावित उपाययोजना, लक्ष्यित बाजारपेठ, उत्पन्न मॉडेल तसेच नाविन्य आणि विस्तारक्षमता यांचा समावेश असलेले सादरीकरण अपेक्षित आहे. या स्पर्धेत कमाल चार सदस्यांच्या गटांना सहभाग देता येणार आहे.‘‘टेक्नोव्हर्स टेक-पेस्ट’ अंतर्गत ग्रँड प्रिक्स ऑफ कोड, ब्लाइंड कोडिंग अरेना, पिक्सेल फिक्स, स्क्विड हंट, ई-स्पोर्ट्स (बीएमआय), ई-स्पोर्ट्स   (फ्री फायर) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
पोस्टर एक्स प्रो’ मध्ये सस्टनेबल अँड ग्रीन कन्स्ट्रक्शन, इंडस्ट्री ४.० अँड ऑटोमेशन, ५जी  कमुनिकेशन  सिस्टीम, वायरलेस कम्युनिकेशन: फ्युचर नेटवर्क आर्किटेक्चर, आर्टिफिशियल इंटीजिलेन्स आणि स्मार्ट सिटी या विषयांवर सादरीकरण होणार आहे. ‘टेक रोबस्टा’ अंतर्गत वळणदार मार्ग, गतीरोधक, बोगदे आणि उतार असलेल्या मार्गावर यंत्रमानव शर्यत आयोजित करण्यात आली असून, दोन सदस्यांच्या गटांना सहभाग घेता येणार आहे.प्रत्येक स्पर्धेसाठी प्रति सहभागी नाममात्र प्रवेश शुल्क १०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. विजेत्यांना प्रायोजकाकडून आकर्षक पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संबंधित विद्यार्थी समन्वयकांशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमास संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

डॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकाला राजारामबापू पाटील साहित्य पुरस्कार

डॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकाला राजारामबापू पाटील साहित्य पुरस्कार

कोल्हापूर/प्रतिनिधी : येथील शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी तथा लेखक डॉ. आलोक जत्राटकर यांच्या ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ या ललित लेखसंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) यांच्या ईश्वरपूर शाखेच्या वतीने देण्यात येणारा लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाङ्मय-२०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. राजारामबापू पाटील ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, शाखेचे अध्यक्ष प्रा. दीपक स्वामी यांनी नुकतीच पुरस्कारांची घोषणा केली.
डॉ. जत्राटकर यांचा ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ हा ललित लेखसंग्रह कोल्हापूरच्या भाग्यश्री प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आला असून यामध्ये मानवतावादाच्या सूत्रामध्ये गुंफलेल्या निवडक ३० लेखांचा समावेश आहे. व्यापक जागतिक समुदायामध्ये मानवी मूल्यांच्या प्रतिष्ठापनेचा आग्रह या लेखनामागे आहे. ज्येष्ठ समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांची प्रस्तावना पुस्तकाला लाभली आहे.
डॉ. जत्राटकर यांची ‘निखळ: जागर संवेदनांचा’, ‘समाज आणि माध्यमं’ ही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. त्यांना दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर, शब्दांगण साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठ, मिरज आणि ध्यास फाऊंडेशन, पलूस आदी संस्थांचे प्रतिष्ठेचे पुरस्कारही लाभले आहेत.

कोल्हापूरात अनूसुचित ‘शॉर्टफिन डेव्हिल रे’ मासा विक्रीसाठी; वनविभागाची धडक कारवा

कोल्हापूरात अनूसुचित ‘शॉर्टफिन डेव्हिल रे’ मासा विक्रीसाठी; वनविभागाची धडक कारवा

कोल्हापूर/प्रतिनिधी : गोपनीय माहितीच्या आधारे करवीर वनपरिक्षेत्राने मंगळवारी फुलेवाडी येथील रिंगरोड परिसरातील फ्रेंडशिप फिश कंपनीवर छापा टाकून अनूसुचित वन्यजीव प्रकारातील मृत ‘शॉर्टफिन डेव्हिल रे’ (Mobula kuhlii) हा मासा जप्त केला. संबंधित मासा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती.वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार करवीर वनपरिक्षेत्रात दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेला मासा ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणी सुनील विनोद सातपुते (रा. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा, जि. सांगली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक, कोल्हापूर चैत्रिशाल पाटील तसेच सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वनपरिक्षेत्र अधिकारी करवीर नंदकुमार नलवडे, वनपाल सागर कोळी, वनरक्षक ओंकार भोसले, विकास घोलप, महादेव कुंभार, विदेश तांबारे, कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर आणि मानद वन्यजीव रक्षक रमण कुलकर्णी यांनी कारवाईत सहभाग घेतला.अनूसुचित वन्यजीवांची खरेदी-विक्री अथवा साठा आढळल्यास तात्काळ वन्यजीव कार्यालयाला माहिती द्यावी, असे आवाहन वनविभागाने नागरिकांना केले आहे.

तरुणांच्या श्रमशक्तीतूनच साकार होईल,समृद्ध गावाचे स्वप्न : सरपंच प्रियांका पाटील

तरुणांच्या श्रमशक्तीतूनच साकार होईल,समृद्ध गावाचे स्वप्न : सरपंच प्रियांका पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : पाचगाव येथे डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटचे श्रमसंस्कार शिबीर संपन्न झाले.विद्यार्थी दशेत मिळालेले श्रमसंस्कार हे आयुष्याची खरी शिदोरी असते. ‘नॉट मी बट यु’ या भावनेतून जेव्हा तरुण गावाच्या मातीत मिसळतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने ग्रामविकासाला गती मिळते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजलेली ही सामाजिक बांधिलकी भविष्यात सुसंस्कृत समाज घडवेल व त्यातूनच समृध्द गावाचे स्वप्न साकार होईल असे प्रतिपादन पाचगावच्या सरपंच सौ. प्रियांका संग्राम पाटील यांनी केले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट आणि मेडिकल कॉलेजच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान पाचगाव येथे हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले.
सरपंच पाटील म्हणाल्या, केवळ वर्गातील चार भिंतीमध्ये शिक्षण पूर्ण होत नाही. समाजातील अडीअडचणी समजून घेणे आणि त्यावर उपाय शोधणे हेच खरे शिक्षण आहे. या शिबिरातील स्वच्छता अभियान आणि ग्रामसंवादातून विद्यार्थ्यांनी श्रमदानाचे महत्त्व ओळखले आहे. ‘युवकांचा ध्यास – ग्राम शहर विकास’ हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणण्यासाठी पाचगावचे ग्रामस्थ आणि डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विद्यार्थी खांद्याला खांदा लावून काम करतील.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले म्हणाले, विद्यापीठाचे सर्व विद्यार्थी समाजसेवेला आपले आद्य कर्तव्य मानतात. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक ऐक्य जपण्यासाठी हे तरुण राष्ट्रसेवक म्हणून सदैव तत्पर राहतील.
मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा म्हणाले, ग्रामविकासासोबतच आरोग्य साक्षरता अत्यंत महत्त्वाची आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ग्रामीण भागात आरोग्यविषयक जागृती, स्वच्छतेबाबतच ग्रामस्थांचे प्रबोधन करून एक ‘आरोग्यसंपन्न गाव’ घडवण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाउल टाकले आहे.
स्कूल ऑफ इंजिनीअरिंगचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा वृद्धिंगत होत असल्याचे नमूद केले.
या विशेष शिबिरामध्ये श्रमसंस्कार, ग्रामविकास व सामाजिक बांधिलकी यांवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात आले. स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान, जनजागृती कार्यक्रम, ग्रामसंवाद तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये राबवले.
यावेळी उपसरपंच दिपाली प्रकाश गाडगीळ, केंद्र शाळा मुख्याध्यापक अशोक पाटील, विद्यामंदिर शांतीनगरच्या मुख्याध्यापिका मंगल देवठाणेकर, विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभाग संचालक डॉ. अद्वैत राठोड, मेडिकल कॉलेज अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, डॉ. रेणुका तुरंबेकर, डॉ. पुरुषोत्तम पेटारे, डॉ. जगन्नाथ शेटे, सर्व स्वयंसेवक, प्राध्यापक व ग्रामस्थ उपस्थित होते.
या शिबिरासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील व कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

कोल्हापूर महापालिका सभा पाणी प्रश्नावरून गाजली

कोल्हापूर महापालिका सभा पाणी प्रश्नावरून गाजली

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिकेची सभा पाणी प्रश्नावरून चांगलीच गाजली.सुरुवातीला स्वर्गीय उपमुख्य मंत्री अजित दादा पवार यांच्या स्मारकाला मंजुरी देण्यात आली.येत्या पंधरा दिवसात प्रशासनाने जागा मंजूर करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली .प्रशासनाची गती धीमी आहे .कोल्हापूर साठी लोकनेत्या न खूप काही केलं आहे त्यामुळे शिरोली जकात नाका जवळ किंवा बास्केट ब्रीज जवळील जागा याबाबत चर्चा करण्यात आली .त्याच्या कामाला दूरदृष्टीला कार्यकिरतीला साजेसा पुतळा व्हावा अशी मागणी करण्यात आली.सर्व पक्षांना एकत्र घेऊन जागा शोधूया आणि मागणीवर बोलतांना महापौर यांनी लवकरात लवकर बैठक घेऊन निर्णय घेऊ असे सांगितले.सभेत नगररचना विभागावर टीका राजेश लाटकर , शारंधर देशमुख ,आदिल फरास,रिंकू उर्फ विजय देसाई यांनी केली.
स्वच्छता आणि लाईट यांच्यामुळे शहरात असुरक्षितता आहे .करार केले पण त्यानंतर त्या सर्व गोष्टींवर दंड झाले आणि ते वसूल झाले का असा सवाल जयश्री चव्हाण यांनी केला .नवीन दिवे मेंटेनन्स ,२०२४ पासून १ कोटी रुपये दंड लावलेला आहे .संबंधित कंपनीला रमेश मस्कर शहर अभियंता कबुली. सोई सुविधा न बाबत सभागृहात मुरलीधर जाधवांचा आंधाराचा फायदा घ्यायला अधिकारी कोण सामील आहेत का असा सवाल करत शहर अभियंता मस्कर यांना धारेवर धरले. शासनाचा.महापालिका या सर्वावर काय निर्णय घेणार .दुर्वास कदम यांनी विचारणा केली.

(बैठक अहवाल वाचन – नगरसचिव सुनील बिदरे ) यांनी केले.
पाणीप्रश्न – नगरसेविका पूर्वा राणे , ऋतुराज क्षीरसागर , सुनिल शेंडे, सत्यजित जाधव, अभिजित खतकर ,विशाल शिरोळे यांनी आपली मते मांडली.यावर महापौर यांनी बोलताना पाण्याचा प्रश्न आज अखेचा असेल .प्रत्येक प्रभागासाठी एक माणूस .पाणी गळती .तीन हजार बोगस कनेक्शन . दंड लावण्याऐवजी ही कनेक्शन नियमितिकरण करा . मीटर रिडर ५०० रुपये जेवण बोगस पाणी कनेक्शन देतात. यावर महापौरांनी दोन महिन्यात पाणी प्रश्न सोडवा असे सांगून जल अभियंता हर्षजीत घाटगे – शासकीय कार्यालय १६ कोटी थकबाकी – ग्रामीण भाग – झोपडपट्टी ८ कोटी .
अमृत योजनेतील निधी उपलब्ध झाला तर पाणी ड्रेनेजसह काम पूर्ण होतील.महापौर – ड्रेनेज काम पूर्ण करा . मगच रस्ते करा अशा सूचना दिल्या.यावर आयुक्त के. मंजूलक्ष्मी १५० कोटी निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे .ज्यादा टँकरची उपलब्धता करणार .मागील बजेट ७०० कोटींच होतं आता ते वाढले असल्याचे स्पष्ट केले.उत्पन्न वाढीसाठी पाणीपट्टी वाढ करावी .मात्र आधी पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी नगरसेवकांनी मागणी सभेत केली.प्रत्येक विभागाची दर आठवड्याला मीटिंग आणि सर्व माहिती ह्या मीटिंग मध्ये हवेत .येत्या महिन्याभरात प्रत्येक कंपनीवर दंड वसूल करावेत .
कोल्हापुरात प्रकाश म्हणजे प्रकाश पडला पाहिजे .प्रत्येकाने रात्री पाहणी केली पाहिजे ज्याला ही जमणार नाही त्या अधिकाऱ्याने राजीनामा द्यावा असा इशारा अमर समर्थ यांनी दिला.

संजय घोडावत यांचा ‘द ज्वेल्स ऑफ इंडिया’ पुरस्काराने सन्मान

संजय घोडावत यांचा ‘द ज्वेल्स ऑफ इंडिया’ पुरस्काराने सन्मान

कोल्हापूर/प्रतिनिधी : नवी दिल्ली येथे मनीष मिडिया यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘द ज्वेलस ऑफ इंडिया – भारत की शान, भारत का अभिमान’ पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळा हॉटेल द अशोका येथे मोठ्या उत्साहात पार पडला. भारतीय कर्तृत्व, उद्योजकता आणि राष्ट्रीय अभिमान यांचा गौरव करणारा हा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा होता .
या सोहळ्यात संजय घोडावत समूहाचे संस्थापक व अध्यक्ष संजयजी दानचंदजी घोडावत यांचा विशेष सन्मान करण्यात आला. द ज्वेल्स ऑफ इंडिया हा पुरस्कार यावेळी संजयजींना प्राप्त झाला. या कार्यक्रमाला केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्याच हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी प्रकाशित करण्यात आलेल्या भारतातील प्रसिद्ध उद्योगपतींचा परिचय असणाऱ्या “मास्टर इन द आर्ट ऑफ स्टिम्युलस, रिस्पॉन्स अँड ग्रोथ” या पुस्तकात संजयजींच्या प्रेरणादायी प्रवासाचा समावेश करण्यात आला असून, भारतीय उद्योजकतेचे ज्वलंत उदाहरण म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
ग्रामीण पार्श्वभूमीतून जागतिक स्तरावर उद्योगसमूह उभारण्याचा संजयजींचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. संजय घोडावत ग्रुप महाराष्ट्रामध्ये औद्योगिक, शिक्षण, नागरी विमान, ऊर्जा, रिअल इस्टेट, दैनंदिन घरगुती वस्तू व रिटेल अशा सर्वच क्षेत्रात कार्यरत आहे. ११००० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना संजयजींनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तर वीस हजार पेक्षा अधिक विद्यार्थी संजय घोडावत शिक्षण समूहामध्ये शिक्षण घेत आहेत. सौ सुशीला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अंध मुलांसाठी शाळा, वृद्धाश्रम, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण कार्यक्रम होत असतात. संजयजी नेहमीच सामाजिक उपक्रमामध्ये अग्रेसर असतात. शून्यातून विश्व निर्माण करून, गगनभरारी घेणाऱ्या पण जमिनीवर पाय असणाऱ्या संजयजींच्या कार्याचा व कर्तुत्वाचा गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.
देशाच्या सांस्कृतिक आणि औद्योगिक प्रगतीत योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या कार्याचे शेखावत यांनी यावेळी कौतुक केले.
या सोहळ्याचे आयोजन मनीष कुमावत (संचालक, मनीश मीडिया) यांनी केले होते. तसेच ईश्वरजी (ब्रँडसवर्क टेकनॉलॉजिस) यांच्यासह अनेक उद्योग व तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली होती. दिवंगत श्री चंदमल कुमावत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
देश-विदेशातील उद्योगक्षेत्रातील दिग्गज उद्योजक, व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. संजयजी घोडावत यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल उद्योग व शिक्षण क्षेत्रात सर्वच ठिकाणी त्यांचे कौतुक होत आहे व त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी स्पर्धांचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी स्पर्धांचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट ग्रीन कॅम्पस मध्ये स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा केवळ उत्सव नसून विद्यार्थ्यांमधील शौर्य, नेतृत्वगुण, स्वाभिमान आणि कर्तृत्व जागवणारा प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे.
या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. वक्तृत्व, निबंधलेखन, चित्रकला, देशभक्तीपर गीतगायन अशा विविध स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांना आपले विचार, कौशल्ये आणि सर्जनशीलता सादर करण्याची संधी मिळणार आहे.महाराजांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्यातून प्रेरणा घेत प्रत्येक विद्यार्थ्याने उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख समन्वयक प्रा. सुहास पाटील, प्राध्यापिका भाग्यश्री भालकर यांच्याकडून करण्यात आले आहे. सहभागातून आत्मविश्वास वाढतो, स्पर्धेतून नेतृत्वगुण विकसित होतात आणि अशा उपक्रमांतूनच शिवरायांच्या विचारांची खरी जपणूक होते. सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिवजन्मोत्सवाचा उत्साह द्विगुणित करावा, असे आवाहन इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. विराट गिरी यांनी केले आहे. या प्रेरणादायी स्पर्धेत संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

संजय घोडावत आय. आय. टी . व मेडिकल अकॅडमीची जे.ई ई. मेन्स फेज – १ मध्ये ऐतिहासिक कामगिरी

संजय घोडावत आय. आय. टी . व मेडिकल अकॅडमीची जे.ई ई. मेन्स फेज – १ मध्ये ऐतिहासिक कामगिरी

अतिग्रे/प्रतिनिधी : जे.ई.ई. मेन्स फेज -१ मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला, यामध्ये संजय घोडावत आय. आय. टी व मेडिकल अकॅडमी च्या अथर्व खोत याने ९९.९४ पर्सेटाईल गुण मिळवून अभुतपुर्व यश संपादन केले.संस्थेच्या सहिम पटवेगार (९९.८१) उपेंद्र तेलसंग (९९.८०) विवेक तोडकरी (९९.७९) अथर्व निर्वाणे (९९.७८), तनय दागा (९९.७६) पर्सेटाईल गुण मिळवून विद्यार्थ्यानी उल्लेखनीय कामगिरी केली . सहिम पटवेगार या विद्यार्थ्याला फिजिक्स या विषयामध्ये १०० पर्सेटाईल गुण मिळाले.
संस्थेच्या २२ विद्यार्थ्यानी ९९ पर्सेटाईल च्या वरती गुण मिळवून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संचालक श्री वासू सर यांनी अभिनंदन केले आहे. या प्रसंगी बोलतात ते म्हणाले की, सातत्य म्हणजेच यशाची गुरुकिल्ली आहे. योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे हे यश मिळाले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे चेअरमन संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी अभिनंदन केले आहे.

शक्तीपीठ विरोधात आज २३ फेब्रुवारीला प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन

शक्तीपीठ विरोधात आज २३ फेब्रुवारीला प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन

कोल्हापूर/प्रतिनिधी : शक्तीपीठ महामार्गाविरोधात येत्या २३ फेब्रुवारीला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार असून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये गोलमेज परिषद घेण्यात येणार असल्याची घोषणा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघटनेच्या बैठकीत शनिवारी करण्यात आली. राज्यातील विविध जिल्ह्यांतील नेत्यांची ऑनलाईन झूम मीटिंग काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आज पार पडली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर राज्य सरकार शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प पुढे रेटण्यासाठी कृतिशील असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या पार्श्वभूमीवर बारा जिल्ह्यांतील शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. बैठकीत २३ फेब्रुवारी रोजी राज्यभर जिल्हास्तरीय आंदोलन छेडण्याचा आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबईत गोलमेज परिषद आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आमदार सतेज पाटील म्हणाले, गरज नसलेला शक्तीपीठ सरकारने करू नये, लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्प राबवणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही भूमिका बदलल्याचा आरोप त्यांनी केला. महामार्गासाठीचा निधी सध्याच्या खड्डेमय रस्त्यांवर खर्च करावा, मोजणीला विरोध करावा आणि ग्रामसभांचे ठराव करावेत, असे आवाहन त्यांनी केले . २३ फेब्रुवारीला राज्यभर आंदोलन छेडणार असून विधिमंडळातही आम्ही ठाम भूमिका मांडू, असा इशाराही त्यांनी दिला.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी परभणी आणि लातूरमधील घटनेचा निषेध केला. कोणतेही नेतृत्व नसताना शेतकरी रस्त्यावर उतरले, यावरून शक्तीपीठ महामार्गाला स्थानिकांचा विरोध स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. काही जण गैरसमज पसरवत असून प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होणार असल्याची भावना लोकांच्या मनात निर्माण झाली आहे, असा आरोप त्यांनी केला. महामार्ग खाजगीकरणातून राबवला जात असून स्थानिकांना त्याचा फायदा होणार नाही, उलट २०-२५ फुट भरावामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागेल असे ते म्हणाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबईत सर्व संघटनांची बैठक घेऊन विधानसभेत आणि बाहेरही जाब विचारण्याचा इशारा त्यांनी दिला. नाशिक ते अक्कलकोट दरम्यान प्रस्तावित महामार्गावर प्रचंड खर्च होणार असल्याचा आरोप करत, सरकारनं महामार्ग बंदचा निर्णय जाहीर करेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार कैलास पाटील यांनी बाधित प्रत्येक गावातून ठाम विरोध व्हायला हवा, असे सांगत आतापर्यंतची भूमिका कायम ठेवण्याचं आवाहन केले.माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग महायुती सरकार राबवत असल्याचा आरोप करत कडाडून विरोध केला. करवीर तालुक्यातील अनेक गावे या मार्गामुळे प्रभावित होणार आहेत. लोकांचा रोष सरकारने लक्षात घ्यावा. ताकदीने मोठं आंदोलन उभे करून सरकारला विरोध करण्याचे आवाहन त्यांनी केले.
माजी आमदार राजेश पाटील यांनी बीडमधील घटनेचा निषेध करून चंदगड तालुक्यातील १० गावांमधून मार्ग जात असल्याने सुमारे ५०० एकर शेतजमीन बाधित होणार असून इको-सेंसिटिव्ह झोनमधूनही मार्ग नेला जात असल्याचा त्यांनी आरोप केला. हा प्रकल्प उद्योगपतींच्या फायद्यासाठी राबवला जात असल्याचा आरोप करत, गडहिंग्लज परिसरातून कडाडून विरोध करण्याचा इशारा दिला. महामार्ग रद्द करण्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा पाठींबा राहील, असंही त्यांनी स्पष्ट केले.समितीचे समन्वयक गिरीष फोंडे यांनी परभणी येथील घटनेचा निषेध करत या शक्तीपीठ विरोधात मोठे आंदोलन उभारण्याची गरज असल्याचे सांगितले. २३ फेब्रुवारी रोजीच्या आंदोलनाची दिशा त्यांनी यावेळी स्पष्ट केली.
अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष राजन क्षीरसागर यांनी परभणीतील घटनेचा तीव्र निषेध केला. कोणतेही नेतृत्व नसताना महिला पुढं आल्या, हे महत्त्वाचं असल्याचं सांगत नोटीस दिल्याशिवाय शेतात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा दिला. यावेळी कॉम्रेड उमेश देशमुख,दिगंबर कांबळे,लातूरमधून अॅडव्होकेट गजेंद्र येळकर,बीडचे व्यंकटराव ढाकणे,नांदेडचे सुभाष मोरलवार व हिंगोलीचे बापूराव ढोरे यांनी सहभाग घेतला.धाराशिवचे संभाजी फरताडे यांनी आभार मानले.