कोल्हापूर महापालिका सभा पाणी प्रश्नावरून गाजली

कोल्हापूर महापालिका सभा पाणी प्रश्नावरून गाजली

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिकेची सभा पाणी प्रश्नावरून चांगलीच गाजली.सुरुवातीला स्वर्गीय उपमुख्य मंत्री अजित दादा पवार यांच्या स्मारकाला मंजुरी देण्यात आली.येत्या पंधरा दिवसात प्रशासनाने जागा मंजूर करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली .प्रशासनाची गती धीमी आहे .कोल्हापूर साठी लोकनेत्या न खूप काही केलं आहे त्यामुळे शिरोली जकात नाका जवळ किंवा बास्केट ब्रीज जवळील जागा याबाबत चर्चा करण्यात आली .त्याच्या कामाला दूरदृष्टीला कार्यकिरतीला साजेसा पुतळा व्हावा अशी मागणी करण्यात आली.सर्व पक्षांना एकत्र घेऊन जागा शोधूया आणि मागणीवर बोलतांना महापौर यांनी लवकरात लवकर बैठक घेऊन निर्णय घेऊ असे सांगितले.सभेत नगररचना विभागावर टीका राजेश लाटकर , शारंधर देशमुख ,आदिल फरास,रिंकू उर्फ विजय देसाई यांनी केली.
स्वच्छता आणि लाईट यांच्यामुळे शहरात असुरक्षितता आहे .करार केले पण त्यानंतर त्या सर्व गोष्टींवर दंड झाले आणि ते वसूल झाले का असा सवाल जयश्री चव्हाण यांनी केला .नवीन दिवे मेंटेनन्स ,२०२४ पासून १ कोटी रुपये दंड लावलेला आहे .संबंधित कंपनीला रमेश मस्कर शहर अभियंता कबुली. सोई सुविधा न बाबत सभागृहात मुरलीधर जाधवांचा आंधाराचा फायदा घ्यायला अधिकारी कोण सामील आहेत का असा सवाल करत शहर अभियंता मस्कर यांना धारेवर धरले. शासनाचा.महापालिका या सर्वावर काय निर्णय घेणार .दुर्वास कदम यांनी विचारणा केली.

(बैठक अहवाल वाचन – नगरसचिव सुनील बिदरे ) यांनी केले.
पाणीप्रश्न – नगरसेविका पूर्वा राणे , ऋतुराज क्षीरसागर , सुनिल शेंडे, सत्यजित जाधव, अभिजित खतकर ,विशाल शिरोळे यांनी आपली मते मांडली.यावर महापौर यांनी बोलताना पाण्याचा प्रश्न आज अखेचा असेल .प्रत्येक प्रभागासाठी एक माणूस .पाणी गळती .तीन हजार बोगस कनेक्शन . दंड लावण्याऐवजी ही कनेक्शन नियमितिकरण करा . मीटर रिडर ५०० रुपये जेवण बोगस पाणी कनेक्शन देतात. यावर महापौरांनी दोन महिन्यात पाणी प्रश्न सोडवा असे सांगून जल अभियंता हर्षजीत घाटगे – शासकीय कार्यालय १६ कोटी थकबाकी – ग्रामीण भाग – झोपडपट्टी ८ कोटी .
अमृत योजनेतील निधी उपलब्ध झाला तर पाणी ड्रेनेजसह काम पूर्ण होतील.महापौर – ड्रेनेज काम पूर्ण करा . मगच रस्ते करा अशा सूचना दिल्या.यावर आयुक्त के. मंजूलक्ष्मी १५० कोटी निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे .ज्यादा टँकरची उपलब्धता करणार .मागील बजेट ७०० कोटींच होतं आता ते वाढले असल्याचे स्पष्ट केले.उत्पन्न वाढीसाठी पाणीपट्टी वाढ करावी .मात्र आधी पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी नगरसेवकांनी मागणी सभेत केली.प्रत्येक विभागाची दर आठवड्याला मीटिंग आणि सर्व माहिती ह्या मीटिंग मध्ये हवेत .येत्या महिन्याभरात प्रत्येक कंपनीवर दंड वसूल करावेत .
कोल्हापुरात प्रकाश म्हणजे प्रकाश पडला पाहिजे .प्रत्येकाने रात्री पाहणी केली पाहिजे ज्याला ही जमणार नाही त्या अधिकाऱ्याने राजीनामा द्यावा असा इशारा अमर समर्थ यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *