Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्याआई अंबाबाई नवरात्र उत्सव, साक्षात शक्ती देवता

आई अंबाबाई नवरात्र उत्सव, साक्षात शक्ती देवता

आई अंबाबाई नवरात्र उत्सव, साक्षात शक्ती देवता

 

कोल्हापूर/श्रद्धा जोगळेकर : करवीर निवासिनी आई अंबाबाईचा नवरात्रोत्सव म्हणजे करवीर काशीचा उत्सव ६३४ साली चालुक्य राजा कर्णदेव याने अंबाबाई मंदिर बांधले आहे. मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झाले. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते. महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, कोल्हापूर हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. देवीच्या माथ्यावर मातृलिंग आहे. वरच्या गाभाऱ्यात मातृलिंग आहे. बाहेर श्री काळभैरव आहे. काशी विश्वेश्वरचे मंदिर सहीत बारा ज्योतिर्लिंग ही आहेत. त्यामुळे हे मुळ आदिमाया सर्वस्याद्या त्रिगुणात्मक स्वरूपिनी भगवती महालक्ष्मीचे मंदिर आहे.                                          आजही कोल्हापूरकर अंबाबाईचे मंदिर असाच उल्लेख करतात.मंदिरावर व्यवस्थित नजर टाकली तर जैन मुर्ती आढळून येतात.पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. हे मंदिर इ.स. ६३४ साली चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले आहे. मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झाले.कधी काळी मुघलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजाऱ्याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती असे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील मातुलिंगामुळे देवी अनेकांच्या मते जगदंबाचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्रा आहे. अकराव्या शतकातील शिलालेखात ​’लिंगशैषाघौषहारिणी’ असा देवीचा उल्लेख आहे. देवीच्या संस्कृत आरतीमध्येही तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते. करवीर माहात्म्य ग्रंथात १३ व्या अध्यायातील सातव्या श्लोकात असे म्हणले आहे की, पन्नागांकित मस्तकाम म्हणजे नागांनी आपला फणा देवीच्या मस्तकावर पाहिला आहे असा उल्लेख आहे. हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणेता हेमाद्री यांनी रचलेल्या हेमाद्री वीरचित चतुर्वर्गचिंतामणी या व्रतखंडात मस्तकावर नाग असे वर्णन असलेली मूर्ती करवीरनिवासिनीच आहे असे नमूद केले आहे. नाग, लिंगयोनी, पानपात्र आणि म्हाळुंग अशी महत्त्वाची चिन्हे हीच ज्या देवीची महत्त्वाची ओळख आहे.देवळाचे शिखर आणि घुमट संकेश्‍वर मठाचे अधिपती शंकराचार्य यांनी बांधले असे म्हणतात.                 हे देवालय आकाराने एखाद्या फुलीसारखे आहे. प्रसिद्ध हेमाडपंती स्थापत्यशैली वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी, दरजा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठया चौकोनी किंवा आयताकॄती दगडात करण्यात आलेली आहे. देऊळ पश्‍चिमाभिमुख असून मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. पश्‍चिमेला असलेल्या मुख्य दरवाजाशिवाय उत्तर, पूर्व आणि दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत. उत्तर दरवाजाला एक मोठी घंटा असून दिवसातून पाच वेळा ती वाजविली जाते. या दरवाजाला घाटी दरवाजा असे म्हणतात. देवळात वारा येण्याला कोठेही गवाक्षे नाहीत. पूर्वेकडे असलेल्या मोठया घुमटाखाली महालक्ष्मीची मूर्ती आहे व उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या दोन छोटया घुमटांखाली महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्ती आहेत. महालक्ष्मीची मूर्ती १.२२ मीटर उंच असून ती एका ०.९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथऱ्यावर उभी करण्यात आलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर जो मंडप लागतो त्या मंडपाला प्रवेश मंडप किंवा गरूड मंडप असे म्हणतात. आश्‍विन नवरात्रोत्सवात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथऱ्यावर ठेवून तिची पूजा करतात.दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीत आणि नोव्हेंबर्मध्ये सूर्यास्ताच्या वेळी मंदिरात किरणोत्सव होतो. ३१ जानेवारी (आणि ९ नोव्हेंबर) : सूर्याची किरणे दरवाज्यातून प्रवेश करून थेट महालक्ष्मी मूर्तीच्या पायांवर पडतात. १ फेब्रुवारी (आणि १० नोव्हेंबर) : सूर्याची किरणे देवीच्या छातीपर्यंत पोचतात. २ फेब्रुवारी (आणि ११ नोव्हेंबर) : मावळतीच्या सूर्याची किरणे देवीच्या पूर्ण अंगावर पडतात.या सोहळ्याला महालक्ष्मीचा किरणोत्सव म्हणतात. हा उत्सव खूप मोठ्या उत्साहात पार पडला जातो.  शक्तीची उपासना माणसाला बळ देणारी, प्रेरणा देणारी ठरते. नवरात्र उत्सव ही याठिकाणी पार पडतो लाखो भाविक मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येतात.देवीचा जागर ही घातला जातो देवीच्या वेगवेगळ्या रूपांचे, सुंदर प्रतिमांचे दर्शन या निमित्ताने घडते. महाराष्ट्रात अशाच वेगवेगळ्या रूपांमध्ये देवीची उपासना केली जाते. कोल्हापूर, माहूर, तुळजापूर सोबतच गावोगावी मातृ दैवतांची आराधना करण्याचा परंपरा आहे. स्थान महात्म्याच्या दृष्टीने साडेतीन शक्तीपीठे अतिशय महत्त्वाची आहेत. कोल्हापूरची श्री महालक्ष्मी, माहूरची श्री रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी ही तीन; तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे शक्तीपीठ आहे, असे मानले जाते.पौराणिक कथेनुसार राजा दक्षाच्या यज्ञात देवी सतीने आत्मसमर्पण केले. त्यानंतर भगवान शिव तिचे शव हातात घेऊन विमनस्क अवस्थेत तिन्ही लोकी संचार करत होते. तेव्हा सर्व देवांच्या विनंतीनुसार भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने देवी सतीच्या कलेवराचे तुकडे केले. पृथ्वीवर ज्या ठिकाणी हे तुकडे पडले तिथे शक्तिपीठांची निर्मिती झाली.शक्ती पूजेच्या मुख्य केंद्रांपैकी एक पूर्ण पीठ म्हणजे, करवीरनिवासिनी महालक्ष्मी. कोल्हापूर किंवा करवीर हे प्राचीन काळापासून पवित्र ठिकाण मानले गेले आहे. करवीर आणि महालक्ष्मी देवी यांचा राष्ट्रकुट काळातल्या ताम्रपटामध्ये उल्लेख सापडतो. त्यानंतरच्या अनेक राजवंशांनी करवीरनिवासिनी महालक्ष्मीची आराधना केल्याचे उल्लेख सापडतात. मराठी राजसत्तेच्या काळात या देवस्थानला वैभव प्राप्त झाले.’आई अंबाबाई ‘म्हणून कोल्हापूरची देवी भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. करवीर महात्म्यच्या रचनाकारांनी म्हटले आहे, करवीर नगर हे शक्तीच्या आगमनामुळे ‘शक्तीयुक्त’ झाले आहे. मनुष्यांना भुक्ती आणि मुक्ती दोन्ही प्रदान करणारे हे करवीर क्षेत्र वाराणसीहून अधिक श्रेष्ठ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments