Tuesday, March 25, 2025
spot_img
Home Blog

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रा.सुदर्शन सुतार, प्रा. मकरंद काईगडे यांचा राज्यस्तरीय सन्मान

0

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रा.सुदर्शन सुतार, प्रा. मकरंद काईगडे यांचा राज्यस्तरीय सन्मान

कोल्हापूर/प्रतिनिधी : ट्रेनिंग अँड प्लेसमेंटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल राज्य संघटनेकडून गौरव.डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता (सीडी-सीआर) प्रा. सुदर्शन नारायण सुतार आणि टिपीओ प्रा. मकरंद काईंगडे यांनी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स संघटनेच्यावतीने दोघांचाही सन्मान करण्यात आला. प्रा. सुतार यांना ‘लीडरशिप अवार्ड’ने तर प्रा. काईगडे यांचा ‘यंग अचीव्हर अवार्ड’ने गौरविण्यात आले.
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स संघटनेच्यावतीने लोणावळा येथे एमए टीपीओ डेव्हलपमेंट प्रोग्राम- २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील ५०० हून अधिक महाविद्यालयांचे टीपीओ या संघटनेचे सभासद आहेत. या कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. लोणावळा नगरपरिषदेच्या अध्यक्षा सुरेखा जाधव, उपाध्यक्ष संजय घोणे, अभिनेत्री रुपाली भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध अधिकाऱ्याना सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांतीकुमार रवंदाळे आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
यामध्ये डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता (सीडी-सीआर) प्रा. सुदर्शन नारायण सुतार यांना‘लीडरशिप अवार्ड’ने तर महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे यांना ‘यंग अचीव्हर अवार्ड’ने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे यानी प्रा. सुतार आणि प्रा. काईंगडे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

मध्यप्रदेशमधील महू येथे झालेल्या इंडिया ओपन शुटींग स्पर्धेत पृथ्वीराज महाडिक यांनी पटकावले कांस्यपदक, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

0

मध्यप्रदेशमधील महू येथे झालेल्या इंडिया ओपन शुटींग स्पर्धेत पृथ्वीराज महाडिक यांनी पटकावले कांस्यपदक, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर/प्रतिनिधी : शुटींगच्या स्पर्धेत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धा जिंकलेले चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी आज आणखी एका स्पर्धेत कोल्हापूरचा झेंडा फडकवला. मध्यप्रदेशमधील महू जिल्हयात इंडिया ओपन शुटींग स्पर्धा झाली. या स्पर्धेत शॉटगन ट्रॅप या प्रकारात आपल्या लक्ष्याचा अचुक वेध घेत, पृथ्वीराज महाडिक यांनी कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेमुळे राष्ट्रीय शुटींग अजिंक्यपद स्पर्धेसाठी त्यांची निवड झालीय.
खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र आणि चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी नेमबाजीच्या स्पर्धेत आपला ठसा उमटवलाय. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये विविध बक्षिसे मिळवत, त्यांनी आपले कौशल्य सिध्द केलंय. हीच परंपरा कायम ठेवत आणखी एका स्पर्धेत त्यांनी बक्षिसावर नाव कोरले. मध्यप्रदेशमधील महू इथल्या आर्मी बेसमध्ये इंडिया ओपन ही प्री नॅशनल शुटींग स्पर्धा पार पडली. त्यामध्ये शॉटगन, रायफल, पिस्टल आणि एअर रायफल अशा विविध प्रकारात स्पर्धा झाल्या. त्यातील शॉटगन ट्रॅप विभागात सहभागी होवून पृथ्वीराज महाडिक यांनी कांस्यपदकाची कमाई केली. महाडिक यांनी अचुक नेम साधत, ५० पैकी ४२ गुण मिळवले. या यशामुळे राष्ट्रीय शुटींग अजिंक्यपद स्पर्धेसाठी पृथ्वीराज महाडिक यांची निवड झाले आहे. या खेळासाठी त्यांना खासदार धनंजय महाडिक, सौ. अरूंधती महाडिक यांचे मार्गदर्शन लाभले.

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘उमंग २के२५ महोत्सव उत्साहात संपन्न

0

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘उमंग २के२५ महोत्सव उत्साहात संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ उमंग २के२५ हा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव मोठ्या जल्लोषात संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त, विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट गिरी, सांस्कृतिक कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. सुहास पाटील, सौ. समता तेलंग सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व इव्हेंट समन्वयक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्वस्त विनायक भोसले मार्गदर्शन करताना म्हणाले विद्यार्थी मित्रांनो चौकटी बाहेर येऊन स्वतःला ओळखणं अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये स्वयंउस्फुर्त सहभाग नोंदवून आपले कौशल्य विकसित करून ऐच्छिक उद्देशा पर्यंत पोहोचण्यासाठी या विविध गोष्टींची आवश्यकता असते आणि ती संजय घोडावत शैक्षणिक संकुलनात सर्व विभागातून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न केला जातो. संचालक डॉ. विराट गिरी यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून विविध विभागांतर्गत उल्लेखनीय केलेल्या कार्याचे सादरीकरण केले.
उमंग २के२५ सहा दिवस चाललेल्या महोत्सव मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. राष्ट्रीय स्तरावरील “निंबस २के२५” स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. कार्यक्रमाचे समन्वयक, प्रा. प्रतिक आवटी प्रा. तृप्ती पुजारी, यांनी काम पहिले. नृत्य, गायन, नाटक, फॅशन शो, पारंपरिक दिवस, मराठी भाषा गौरव दिन, मेहंदी, वादविवाद, रांगोळी, नेल-आर्ट, हेअरस्टाईल स्पर्धा, काव्य वाचन, एक्सटेम्पोर, आणि कुकिंग विदाऊट फायर यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ‘उद्योग सुरक्षा आणि आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्याच्या महत्त्वावर मार्गदर्शन करण्यात आले. या सांस्कृतिक महोत्सवाचे प्रा. सुहास पाटील आणि सौ. समता तेलंग हे प्रमुख समन्वयक होते. त्यांनी अतिशय उत्तम नियोजन करत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली.
संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन, संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शना खाली ‘उमंग २के२५ महोत्सव आयोजन करण्यात आले होते.

उद्या २४ मार्च रोजी होणाऱ्या उद्योगपती आण्णासाहेब चकोते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

0

उद्या २४ मार्च रोजी होणाऱ्या उद्योगपती आण्णासाहेब चकोते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

नांदणी (ता. शिरोळ)/प्रतिनिधी : येथील चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज व गणेश बेकरी नांदणीचे संस्थापक, उद्योगपती आण्णासाहेब चकोते यांचा वाढदिवस सोमवार दि. २४ मार्च रोजी विविध सामजिक उपक्रमाने साजरा करणेत येणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, गतिमंद मुलांना दत्तक घेणे यासह विविध सामजिक उपक्रम राबविणेत येणार आहेत
चकोते ग्रुपच्या माध्यमातून उद्योगपती
आण्णासाहेब चकोते यांनी प्रयत्नांची शिकस्त, नाविन्याचा ध्यास, दुरदृष्टी या त्रिसुत्रीच्या बळावर उद्योग, कृषी व शैक्षणीक क्षेत्रात चकोते ग्रुपने भरारी घेतली आहे.देशभरातील अन्न प्रक्रिया उद्योगात एक अभ्यासू व्यक्तीमत्त्व म्हणूण त्यांनी आपली छाप सोडली आहे.बेकरी उद्योगातले मार्गदर्शक अशी प्रातिमा त्यांनी देशभरात निर्माण केली आहे. म्हणूणच त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेवून ऑल इंडीया ब्रेड मॅन्युफॅक्चरींग असोसिएशनच्या सिनियर व्हा. प्रेसिडेंट म्हणूण नुकतेच दिल्ली येथे सलग आठव्यांदा त्यांची निवड करणेत आली आहे.
उद्योग विश्वातील या उतुंग भरारी बरोबरच वाढदिवस हा एक निमीत्त ठेवून सामाजिक कार्याला बळ देऊन प्रतिवर्षी विविध सामाजिक उपक्रम जसे एकाच दिवशी ३५० बसस्थानकांची स्वच्छता व रंगकाम करून स्वच्छ भारत अभियान यशस्वी करून दाखविले आहे.म्हणूनच याची दखल घेवून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्दे नोंद करण्यात आली आहे.
त्याच बरोबर गेली पंधरा वर्षे रक्तदान शिबीराचे आयोजन केले जात आहे.कोरोना महामारीत काळाची गरज ओळखून आण्णासाहेब चकोते यांनी रक्तदानाचे आवाहन केले होते त्यांच्या हाकेला प्रतिसाद देवून या महारक्तदान शिबीरात तब्बल २०२५ लोकांनी स्वंयफुरतींने रक्तदान केले होते.याच बरोबर गतीमंद मुलांना दत्तक घेणे, वृद्धाश्रमांना मदत करणे, महापुर काळात पुरग्रस्तांना मदतकार्य करून त्यांना जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा, दृष्काळग्रस्त गावे दत्तक घेवून त्या ठिकाणी चारा व पाण्याची व्यवस्था करून एक विधायक पाऊल उचलले आहे. शिवाय आरोग्य शिबीर व वृक्षारोपण यासह विविध कार्यक्रम समाज उपयोगी ठरत आहेत. तर शैक्षणीक व वैचारिक प्रगतीसाठी नांदणीचे नवजीवन नगर वाचनालय व एबीसी स्कुलची निर्मीती करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
वाढदिवसानिमीत्त नांदणी येथे नांदणी भाजीपाला संघ (जयसिंगपूर रोड) नवजीवन नगर वाचनालय व महादेव मंदीर,गावभाग नांदणी येथे रक्तदान शिबीर आयोजीत केले आहे. सकाळी विविध ठिकाणी वृक्षारोपण अभियान आदी उपक्रम राबविणेत येणार आहेत. तसेच चकोते उद्योग समुहातील सर्व कामगारांच्या उपस्थितीत उद्योगपती आण्णासाहेब चकोते यांचा केक कापून वाढदिवस साजरा करणेत येणार आहे. त्यावेळी गतीमंद मुलांना दत्तक घेण्याचा उपक्रम होणार आहे. दिवसभर गणेश बेकरी नांदणी (ओल्ड प्लॅन्ट) येथे सर्वाच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी श्री चकोते उपस्थित असणार आहेत.

उद्योजक आण्णासाहेब चकोते यांच्या यशस्वीपणे वाटचालीत त्यांच्या गणेश बेकरीचा लौकिक नांदणी ते न्युयॉर्कपर्यंत

0

बेकरी व्यवसायात चकोते ग्रुपचे जागतिक बाजारपेठेत पदार्पण,
उद्योजक आण्णासाहेब चकोते यांची जागतिक पातळीवर झेप

उद्योजक आण्णासाहेब चकोते यांच्या यशस्वीपणे वाटचालीत त्यांच्या गणेश बेकरीचा लौकिक नांदणी ते न्युयॉर्कपर्यंत

एक यशस्वी उद्योजक कसा असावा याची ओळख द्यायची झाली तर कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील रहिवाशी असलेले उद्योजक आण्णासाहेब चकोते यांचे द्यावे लागेल.कारण त्यांनी अगदी शून्यातून आपला प्रवास करून यशस्वी वाटचाल ही आपल्या गणेश बेकरी चकोते ग्रुपच्या माध्यमातून केली आहे.आज या गणेश बेकरी च्या माध्यमातून त्यांचा लौकिक हा
नांदणी ते न्युयॉर्कपर्यंत पोहोचला आहे.१० *१० च्या खोलीतून सायकलवरून सुरू झालेल्या लघु उद्योगाला आंतरराष्ट्रीय ब्रँड श्री. अण्णासाहेब चकोते यांची कार्यतपस्वी, उद्योगमेरू, बेकरी किंग अशी वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. पारंपारिक उद्योगाचा विकास आणि त्याचे औद्योगी करणाचे याबाबतचे नवीन उच्चांक त्यांनी स्थापित केलेले आहेत. यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचून सुद्धा मातीचा ध्यास असणारे व्यक्तिमत्व म्हणजे अण्णासाहेब चकोते…
अण्णासाहेब चकोते यांच्याकडे पैसा व अनुभव नव्हता, होती ती फक्त जिद्द, स्वतःवरचा व व्यवसायाच्या भविष्यावरचा असणारा विश्वास. कष्ट घेण्याची तयारी, निपक्षपातीपणा, चिकाटी, पारदर्शकता, उत्कृष्टतेचा ध्यास, अविरतसेवा, गुणवत्तेवरचा विश्वास, बदलाची तयारी या मूल्यांचा भक्कम पायावरच चकोते कार्य करत आले आहेत. मूल्यांमध्ये तडजोड न करता, कोणती नियम न वाकवता, नैतिकतेने व्यवसायाला यशाच्या शिखरावर नेता येते हे अण्णासाहेबांनी दाखवून दिले आहे. हे यश टिकून राहण्यासाठी व्यवसायात सर्वच बाबतीत उच्च गुणवत्ता राखणे व अविरत सेवा देणे हे महत्त्वाचे हे ते ओळखून आहेत. म्हणूनच काटेकोरपणे अद्यावत प्रक्रियेद्वारे आपल्या उत्पादनाचे वेगळेपण, तोच पारंपारिक बेकरी आरोमा व कोल्हापुरी चव यांच्या माध्यमातून वेगळेपण त्यांनी जपले आहे.
आपण तयार केलेला प्रॉडक्ट ग्राहकांना पसंतीस उतरला पाहिजे यासाठी आण्णासाहेब चकोते यांचा आतील जातीवंत हाडाचा बेकर नेहमीच कार्यरत असतो, पदार्थांच्या मूळ रंग, पोत, माऊथ फिलिंग मध्ये तडजोड कधीच मान्य करत नाहीत त्यामुळे त्यासाठी लागणारे उच्चप्रतीचे FSSAI नियमांचे पालन करून फुड स्टॅंडर्ड प्रमाणेच रॉ मटेरियल ची चोखंदळ निवड केली जाते तसेच त्याची प्रोसेस यावर परीक्षण करून नियंत्रण केले जाते. ग्राहकांची आवड निवड लक्षात घेऊन प्रॉडक्ट बनवण्याच्या कलेत आण्णासाहेब चकोते हे पारंगत आहेत. एखाद्या सुगरणी प्रमाणे आपल्या प्रत्येक प्रॉडक्ट उत्तमच असला पाहिजे यासाठी ते आग्रही असतात त्यांची हीच आवड त्यांना त्यांच्या व्यवसायात यशस्वी बनवते. नवीन प्रकल्पामध्ये प्रॉडक्ट व मशिनरीचा मेळ घालत बेकरीचा खराखुरा अरोमा जो काळाच्या ओघात प्रिझर्व्हेटिव्हज् च्या अतिरिक्त वापरामुळे लुप्त होत आहे, तोच पारंपारिक भट्टीतून भाजलेल्या प्रॉडक्टचा अरोमा नवीन प्रगत टेक्नॉलॉजीद्वारे देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आणि ते यशस्वी सुद्धा झाले. तसेच महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असणारी पारंपरिक कोल्हापुरी शाही खाद्य संस्कृतीला जपणारी नमकीन उत्पादन देखील आपली ओळख निर्माण करतील या विश्वास आण्णासाहेब चकोते यांना आहे.
बाजारपेठेच्या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी कंपनीने लवचिक असणं ही अत्यावश्यक गरज त्यांनी ओळखलेली होती बदलत्या घडामोडींवर लक्ष देत पण सातत्याने त्यांनी आपल्या कंपनीला कॉर्पोरेटच्या या स्पर्धेत पुढे आणले क्षितिज खूप लांब आहे पण आपण नक्की तिथे पोहोचू शकतो हे त्यांना चांगलंच माहिती होतं परिपूर्णता हा मूळ स्वभाव असणाऱ्या चकोते यांनी झटपट पैसा मिळवण्यासाठी शॉर्टकट न घेता बाजारपेठेचे भान ठेवून भारतीय चवीला असणारी मागणी व त्यासाठी लागणारी जागतिक दर्जाची टेक्नॉलॉजी संपूर्ण स्वयंचलित उत्पादन सुविधा स्वच्छता आणि सुरक्षेची मानांकने आवश्यक हायटेक इन्फ्रास्ट्रक्चर तसेच अधिक उत्पादन क्षमतेच्या नवीन प्रकल्पाला त्यांनी पूर्णत्वास नेले.
या प्रकल्पाची उत्पादन क्षमता ब्रेड विभाग १,००,००० लोप्स, टोस्ट १८ टन, केक ५,७५,००० नग, बटर-बन ५,००,००० नग आणि नमकीन विभागांमध्ये पोटॅटो चिप्स १० टन, कुरकुरे व फ्राईम्स १० टन, मूग डाळ १० टन, भडंग १० टन, चिवडा व फरसाण ४० टन अशी संपूर्ण मिळून १५० टन प्रति दिन झाली आहे. या क्षमतेचा हा प्रकल्प १३ एकर जागेत २.५० लाख चौरस फूट सुपर बिल्टअप एरियामध्ये आकारास आला आहे. जागतिक दर्जाचे या प्रकल्प मध्ये ISO २२००० व HACCP ची तशीच USFDA , हलाल यासारख्या मानकांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सविस्तर नियोजन आणि त्याची अंमलबजावणी विविध स्तरावरील चाचण्या आणि क्वॉलिटी कंट्रोल चा पुरवठा,पाठपुरवठा आणि विश्लेषण इत्यादीचा समावेश असतो गुणवत्ता आणि उत्पादकता यासंबंधी कंपनी कडून ग्राहकांच्या असणाऱ्या अपेक्षा, रुपरेषा यांची एक नियमावली तयार करण्यात येते व त्याचा पाठपुरावा केला जातो. यामुळे सर्वोत्तम गुणवत्ता प्रणालीची अंमलबजावणी होते. या प्रकल्पातील स्वच्छता, सुरक्षा, प्रक्रिया व व्यवसाय व्यवस्थापन प्रणालीची उत्तम आणि विश्वासार्ह प्रक्रिया पाहण्यासाठी सर्वांसाठी व्हिजिटर गॅलरी देखील लवकरच सुरू होत आहे. या प्रकल्पाद्वारे उत्पादित होणारा प्रत्येक पदार्थ गुणवत्तेचा नवा बेंचमार्क सेट करत आहे .महाराष्ट्र, कर्नाटक,आंध्रप्रदेश मधील अगदी खेडोपाड्यात जिथे अजूनही एसटी देखील जात नाही अशा वाड्या वस्त्यांवर देखील चकोतेंचे प्रोडक्ट पोहोचले आहेत. यातूनच वितरक व रिटेलर विक्रेते यांचे एक भावनिक जाळे सुद्धा तयार झाले आहे. स्वतः व्यवसायाचे धडे गिरवत असताना आपल्या सहकाऱ्यांना घेऊन त्यांना देखील व्यवसायाचे प्रशिक्षण दिले आणि खऱ्या अर्थाने चकोते यांनी वितरण व्यवस्थेचे जाळे निर्माण केले. देशात प्रथमच बेकरी साठी वितरण व्यवस्था ही गणेश बेकरीतूनच चालू झाली आणि आता बेकरी सोबतच नमकीन या विभागासाठी सुद्धा स्वतंत्र वितरण व्यवस्था सुरू झालेली आहे. साधारण पणे ५०० पेक्षा जास्त वितरक ही उत्पादने लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी तत्पर असतात. तसेच कॅलिफोर्निया, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड,युके,नाॅर्वे, सिंगापूर, दुबई, आयर्लंड या ठिकाणी सुद्धां चकोते प्राॅडकटसनी स्थान मिळविले आहे.
स्वतःचे कुटुंब असो, त्यांचीच निर्मिती असणारे गणेश बेकरी कुटुंब असो किंवा समाज असो प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी, अनेकांच्या हितासाठी अनेकांच्या आनंदासाठी अनेकांच्या सुखासाठी कुटुंबप्रमुख म्हणून अण्णासाहेब स्वतः मनापासून झटताना दिसतात. आपल्यासारख्या तरुण-तरुणींनी झपाट्याने पुढे सरकावं परिस्थितीच्या रेट्यात न अडकता पुन्हा नव्याने उभे राहून स्वतःची सक्सेस स्टोरी निर्माण करावी अशी त्यांची मनापासून इच्छा असते. बदलत्या वेळेच्या कसोटीवर टिकून राहील अशी टीम तयार करण्यावरती त्यांचे लक्ष नेहमीच असते. संस्थेचे ध्येय आणि तिची कामाची शैली हा त्या संस्थेचा आत्मा असतो असे चकोते मानतात.आण्णासाहेब चकोते उद्योगशीलते बरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील संवेदनशीलतेने कार्य करताना दिसतात कोरोना काळात विशेषतः चकोते ग्रुपच्या माध्यमातून एका दिवसात २०२५ रक्तदात्यांनी विक्रमी रक्तदान केले. तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सलग दोन वर्ष ३५० बसस्थानके एकाच दिवशी एकावेळी स्वच्छ करून रंगकाम करण्यात आली आणि याचीच नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा झाली आहे.
केवळ विक्री, नफा, वितरण प्रणाली यावर, आघाडीवर न राहता ग्राहकांच्या बदलत्या गरजेनुसार उत्पादनांचा दर्जा, पॅकेजिंग,न्यूट्रिशनल व्हॅल्यूज, पॅकेजिंग, किंमत, जाहिराती, नवीन वितरणाच्या कल्पना यामध्ये आण्णासाहेब बदल करत आहे. हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या मराठी अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने यांना ब्रँड अँबेसिडर म्हणून ऑनबोर्ड केले. ब्रँड अँबेसिडर असणारी चकोते ही भारतातील पहिली ब्रेड कंपनी ठरली. अण्णासाहेब चकोते यांनी अशा प्रकारे पारंपारीक बेकरी व्यवसायाला आधुनिकीरण व औद्योगीकरणाचे स्वरूप दिले. भविष्यातील नवे उद्योजक तसेच अनेक पारंपरिक उद्योजकांना, आंत्रप्रिनीअर्सना हा प्रकल्प आण्णासाहेब चकोते यांची चिकाटी, कष्ट, अभ्यासुवृत्ती, सातत्य व नव्या संकल्पनाचा अवलंब या गोष्टी नक्कीच आदर्शवत ठरतील.क्रीडा, चित्रपट, कला, संस्कृती, बदलती जीवनशैली याबाबत सतर्क लक्ष ठेवत काळाचे थोडे पुढे जाऊन चौफेर विचारांमुळे आण्णासाहेब भविष्याची नेमकी चाहूल घेतात. कोणतीही गोष्ट राहून गेली म्हणून तुटपुटत न बसता प्रत्येक क्षण शिकत जगणं हाच अण्णासाहेबांचा खरा स्वभाव त्यासाठी कोणत्याही मर्यादेचे कुंपण न ठेवता सगळ्या चौकटी मोडून काढत जे हवं ते शिकायचं आणि जे आवडेल ते मनापासून जीव ओतून करायचं म्हणजेच त्यांच्याच भाषेत जगायचं आणि हे जगण्याचं गुपित त्यांना गवसलय. जी माणसं सज्ज असतात त्यांनाच संधीचा फायदा घेता येतो म्हणूनच त्यांना यश मिळत असतं, नशिबावर नाही तर परिश्रमावर विश्वास ठेवावा, या गोष्टींवर विश्वास ठेवणारे आशावादी, जीवन प्रवासी म्हणजे आण्णासाहेब….

सुप्रिया डांगे.
गणेश बेकरी
नांदणी.

कोल्हापूरमध्ये मराठी चेवर ऑफ कॉमर्स संस्थेच्या वतीने गृहोपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्री प्रदर्शनास प्रारंभ,२४ मार्च पर्यंत महाराष्ट्र व्यापारी पेठचे आयोजन

0

कोल्हापूरमध्ये मराठी चेवर ऑफ कॉमर्स संस्थेच्या वतीने गृहोपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्री प्रदर्शनास प्रारंभ

२४ मार्च पर्यंत महाराष्ट्र व्यापारी पेठचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठी चेंबर ऑफ कॉमर्स, मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्र व्यापारी पेठ हे गृहोपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र व्यापारी पेठ २०२५ आयोजित गृहोपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्री आजपासून व्ही.टी.पाटील सभागृह येथे सुरू झाले आहे.आज या प्रदर्शनाचे उद्घाटन मार्व्हलस इंजिनीअर्स प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर श्री संग्राम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कार्याध्यक्ष श्री.मनोहर पेडणेकर, कोल्हापूर शाखा अध्यक्ष श्री.राजन चौगुले, उपाध्यक्ष मोहन वाइंगडे, विदर्भ हेड शरद की, अलिबाग हेड विजय राणे,कोल्हापूर शाखा सचिव श्री बाबा खोडवे आदी उपस्थित होते.
मराठी चेवर ऑफ कॉमर्स’ ही संस्था गेली ४५ बर्ष मराठी उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या उत्कर्षासाठी निस्वार्य बुद्धीने अहोरात्र कार्य करत आहे.
‘महाराष्ट्र व्यापारी पेठ’ हा आमचा मराठी उद्योजक, लघु उद्योजकांसाठी विशेषतः महिला उद्योजकांसाठीचा एक विशेष उपक्रम आहे.’महाराष्ट्र व्यापारी पेठ’ द्वारे उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिलं गेलं आहे.कोल्हापुरात पहिल्यांदाच दिनांक २० मार्च ते २४ मार्च यादरम्यान राजारामपुरी येथील डॉक्टर व्हि.. टी. पाटील हॉलमध्ये सदर ‘महाराष्ट्र व्यापारी पेठचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रदर्शनामध्ये कोल्हापुरातील विविध वस्तूचा समावेश स्टॉलच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. यामध्ये कोल्हापुरी गुळ, काकवी, साडी ड्रेस मटेरियल, तर अत्तर अन्य खाद्यपदार्थ,अन्य वस्तू यांची विक्री या ठिकाणी केली जाणार आहे.
१९८९ सालापासून ‘महाराष्ट्र व्यापारी पेठ’चं आयोजन मराठी चेवर ऑफ कॉमर्स’ या संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. गेली ३५ वर्ष मुंबईमधील दादरच्या डिसिल्वा हायस्कूलमध्ये सलग ६८ दिवसांची व्यापारी पेठ आयोजित केली जात आहे.
यावर्षी कोल्हापूर मध्ये याचे आयोजन करण्यात आले असून २०२५ मध्ये राज्याच्या विविध महानगरांमध्ये, शहरांमध्ये आम्ही ‘महाराष्ट्र आापारी पेठचं आयोजन संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. कोल्हापूर मध्ये २० मार्च ते २४ मार्च यादरम्यान राजारामपुरी येथील डॉक्टर व्हि.. टी. पाटील हॉलमध्ये ही व्यापार पेठ होत आहे.याद्वारे कोल्हापूर मधील लघुउद्योजक, महिला उद्योजकांना त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी एक हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याच्या हा संस्थेचा एक छोटासा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले असून दररोज सकाळी ११:०० ते रात्री ८:३० ही प्रदर्शन सुरू राहणार असून याचा लाभ कोल्हापूरकरांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर संपन्न

0

सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या अंतर्गत, सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर यांचेकडून ग्रामपंचायत सरनोबतवाडी येथे २४ फेब्रुवारी २०२५ ते २ मार्च २०२५ या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ५० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. या शिबिराचा उद्देश स्वच्छता, आरोग्य तपासणी आणि आरोग्य जागरूकतेसाठी विविध उपक्रम राबविणे होता. शिबिरामध्ये स्वच्छता मोहिम, आरोग्य तपासणी शिबिर, आरोग्य जागरूकता रॅली, आरोग्य जागरूकतेसाठी घरं भेट असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना (NSS) चे कार्यक्रम अधिकारी श्री. उद्धव आतकीरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना सदस्य प्रा. किमाया जोशी, प्रा. प्रतीक्षा पाटील, प्रा. साक्षी माने यांनी देखील शिबिरात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या शिबिराने ग्रामीण भागात आरोग्य आणि स्वच्छतेसाठी मोठे योगदान दिले आहे आणि स्थानिक समाजातील नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली आहे.
या शिबिरासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेविका, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी यांचे सहकार्य लाभले आणि संस्थेच्या सेक्रेटरी मा. शोभा तावडे यांचे प्रोत्साहन मिळाले तसेच महाविद्यालयाचे संचालक डॉ. अनिलकुमार कुलकर्णी व प्राचार्य डॉ. राजकुमार बगली यांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.

स्वतःवर विश्वास ठेवून सकारात्मक वाटचाल करा -डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांचे आवाहन

0

स्वतःवर विश्वास ठेवून सकारात्मक वाटचाल करा
-डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांचे आवाहन

-डी. वाय. पाटील विद्यापीठाचा १३ वा दीक्षांत समारंभ उत्साहात

कोल्हापूर/वार्ताहर : विद्यार्थ्यांना पदवी मिळाली असली तरी शिक्षणसंपलेले नाही. त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवून सकारात्मक दृष्टिकोनाने वाटचाल करा. मोठी स्वप्ने बाळगा आणि ती परिश्रमपूर्वक पूर्ण करा. आपली स्वाक्षरी ही ‘ऑटोग्राफ’ बनेल इतके यश मिळवा असे आवाहन इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ ग्लोबल नेटवर्क फॉर मेडिकल हेल्थ प्रोफेशन्स अँड बायोथिक्स एज्युकेशनचे महासचिव आणि डॉ. बी. सी. रॉय अवार्डने सन्मानित डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले. डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाच्या १३ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी 690 विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर पदवी व डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले.
डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाच्या आवारात भव्य शोभायात्रेने दीक्षांत समारंभाला प्रारंभ झाला. कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाला कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, युजीसी प्रतिनिधी डॉ. उमराणी, माजी कुलगुरू डॉ. शिरीष पाटील यांच्यासह एक्झिक्युटिव्ह कौन्सिल आणि अकॅडमीक कौन्सिलचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी १९ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले. डॉ. रणजीत निकम या विद्यार्थ्याला संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले. तर डॉ. सागर गोयल यास ‘बेस्ट आउट गोइंग स्टुडंट’ म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी १७ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पीएच. डी. प्रदान करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. मिश्रा म्हणाले, डी.वाय. पाटील विद्यापीठासारख्या प्रथितयश शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपण नक्कीच यशस्वी व्यावसायिक व्हाल. पण केवळ व्यवसाय किंवा नोकरी हे ध्येय न बाळगता उत्तम माणूस बनण्याचा प्रयत्न करा. स्वतःला सतत अपडेट ठेवा. कुशल आणि सुजाण मनुष्यबळ बळच देशाची ताकद वाढवते. त्यामुळे आपण मिळवलेल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा उपयोग देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी करा, असे आवाहनही डॉ. मिश्रा यांनी यावेळी केले.
कुलगरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. त्यांनी यावेळी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा मांडला. विद्यापीठ व प्राध्यापकांना मिळालेले विविध पुरस्कार, यश याबाबतची माहिती देऊन पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीपाद धरणगुत्ती, सीएचआरओ श्रीलेखा साटम, प्रोजेक्ट हेड सदानंद सबनीस, आयक्यूएसी संचालक डॉ. शिंपा शर्मा, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, प्राचार्य डॉ. उमाराणी जे., प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे, प्राचार्य अमृतकुंवर रायजादे, प्राचार्य रुधिर बारदेस्कर, डॉ आर. एस. पाटील, प्रा. डॉ. अजित पाटील, वैदयकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, उपप्राचार्य डॉ. आशालता पाटील, उप कुलसचिव संजय जाधव, कृष्णात निर्मळ, सहाय्यक कुलसचिव तेजशील इंगळे, यांच्यासह डी. वाय. पाटील ग्रुपच्या विविध संस्थामधील प्राचार्य, प्राध्यापक, पदवीप्राप्त विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. देवव्रत हर्षे, डॉ.अमित बुरांडे, प्रा. रेणुका तुरंबेकर यांनी सूत्रसंचालन केले.

६९० विद्यार्थ्याना पदवी प्रदान
यावेळी १७ विद्यार्थ्यांना पीएच.डी,१५३ विद्यर्थ्याना एमबीबीएस पदवी,४७ जणांना एमडी, ३५ एम.एस.१ विद्यार्थी एम.एस (मेडिकल बायोकेमिस्ट्री), ६ विद्यार्थ्यांना फेलोशिप, ९६ बी.एस्सी नर्सिंग, ११ पोस्ट बेसिक बी.एस्सी नर्सिंग, २० एमएससी नर्सिंग, ७ एम.एस्सी. (स्टेमसेल अँड रिजनरेटीव्ह मेडिसिन), २० एम.एस्सी (मेडीकल फिजिक्स), ५ एम.एस्सी. (मेडिकल बायोटेक्नॉलॉजी), ४३ फिजीओथेरपी पदवी, १२ फिजीओथेरपी पदव्युत्तर पदवी, ३८ पीजीडीएमएलटी, ३५ ओटी टेक्निशियन, 3 डायलेसीस असिस्टंट, ३४ बी.एससी हॉस्पिटॅलिटी, ९ बी. ऑप्थोमेट्री,३४ बी.एससी एमआरआयटी, २१ बी.एससी एमएलटी, ४ बी.एससी ओटीटी तर ३९ विद्यार्थ्यांना डी. फार्मसी पदवी यावेळी प्रदान करण्यात आल्या.

१९ जणांना सुवर्ण पदक
प्रभाकरन उन्नती एमबीबीएस), श्वेता पाटील (बी.एस्सी नर्सिंग), श्रद्धा ताईगडे (पी.बी. बी.एस्सी नर्सिंग), योगेश्वरी (एम.डी.), वत्सल पटेल (एम.एस.), श्रद्धा मुताळ, लीना पिंगुळकर (एम.एस. नर्सिंग), प्रिया वाडकर (एम.एस्सी. स्टेमसेल अँड रिजनरेटीव्ह मेडिसिन), आदिती साळुंखे (बॅचरल ऑफ फिजीओथेरपी) , नम्रता निलकर (मास्टर ऑफ फिजीओथेरपी), साद शेख (बी.एससी हॉस्पिटॅलिटी), सृष्टी तांबडे (बी.एससी एमएलटी) यांना डी. वाय. पाटील पाटील विद्यापीठ सुवर्ण पदकाने तर अक्षय चीन्तोजू (एम.डी-मेडिसिन) यांना रामनाथ विठ्ठल वाघ सुवर्ण पदक, एमबीबीएस तृतीयच्या कौमुदी कुलकर्णी यांना डॉ. पी. बी. जागीरदार एक्सलन्स अवार्डने, अमीर मेस्त्री, आणि स्वाती प्रकाश यांना मालन मधुकर सबनीस स्मृती अवार्डने, मोहित प्रसाद बोनंथे यांना हेमलता रामनाथ वाघ सुवर्णपदकाने गौरवण्यात आले. डॉ. सागर गोयल यांचा (एमबीबीएस) यानाचा ‘बेस्ट आउट गोइंग स्टुडंट’ म्हणून तर रणजित निकम (पीएच.डी.) यांचा ‘एक्सलन्स इन रिसर्च’ अवार्डने सन्मान करण्यात आला.

कोल्हापूरमध्ये मराठी चेवर ऑफ कॉमर्स संस्थेच्या वतीने २० मार्च ते २४ मार्च महाराष्ट्र लापारी पेठचे आयोजन

0

कोल्हापूरमध्ये मराठी चेवर ऑफ कॉमर्स संस्थेच्या वतीने २० मार्च ते २४ मार्च महाराष्ट्र लापारी पेठचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठी चेवर ऑफ कॉमर्स’ ही संस्था गेली ४५ बर्ष मराठी उद्योजक आणि व्यापात्यांच्या उत्कर्षासाठी निस्वार्य बुद्धीने अहोरात्र कार्य करत आहे.
‘महाराष्ट्र आपारी पेठ’ हा आमचा मराठी उद्योजक, लघु उद्योजकांसाठी विशेषतः महिला उद्योजकांसाठीचा एक विशेष उपक्रम आहे.’महाराष्ट्र व्यापारी पेठ’ द्वारे उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिलं गेलं आहे.कोल्हापुरात पहिल्यांदाच दिनांक २० मार्च ते २४ मार्च यादरम्यान राजारामपुरी येथील डॉक्टर व्हि.. टी. पाटील हॉलमध्ये सदर ‘महाराष्ट्र लापारी पेठचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्री.बाबा खोडवे आणि कार्याध्यक्ष श्री.मनोहर पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१९८९ सालापासून ‘महाराष्ट्र व्यापारी पेठ’चं आयोजन मराठी चेवर ऑफ कॉमर्स’ या संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. गेली ३५ वर्ष मुंबईमधील दादरच्या डिसिल्वा हायस्कूलमध्ये सलग ६८ दिवसांची व्यापारी पेठ आयोजित केली जात आहे.
२०२५ मध्ये राज्याच्या विविध महानगरांमध्ये, शहरांमध्ये आम्ही ‘महाराष्ट्र आापारी पेठ’चं आयोजन करणार आहोत. कोल्हापूर मध्ये २० मार्च ते २४ मार्च यादरम्यान राजारामपुरी येथील डॉक्टर व्हि.. टी. पाटील हॉलमध्ये ही व्यापार पेठ होत आहे.याद्वारे कोल्हापूर मधील लघुउद्योजक, महिला उद्योजकांना त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी एक हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याच्या हा आमचा एक छोटासा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.

आरडी’ चित्रपटाचा दमदार टीजर लॉन्च चित्रपट येतोय २१ मार्चला

0

“आरडी”तून उलगडणार एका चुकीचे नाट्यमय परिणाम

आरडी’ चित्रपटाचा दमदार टीजर लॉन्च चित्रपट येतोय २१ मार्चला

कोल्हापूर/प्रतिनिधी : आयुष्यात एखादी चूक घडते. पण ती चूक किती मोठी त्यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात. अशाच एका तरूणाच्या चुकीमुळे घडणाऱ्या नाट्यमय परिणामांची थरारक कहाणी “आरडी” या आगामी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येणार आहे. २१ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा रंजक टीजर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. साद एंटरटेन्मेंट, कमल एंटरप्रायझेस यांनी झेब्रा पिक्चर्स आणि हेलिक्स प्रॉडक्शन्स यांच्या सहाय्याने आरडी चित्रपटाची निर्मिती केली आहे. आदित्य नाईक, साहिल वढवेकर, हंसराज भक्तावाला, इस्तेखार अहमद शेख हे चित्रपटाचे निर्माते तर ऋग्वेद डेंगळे, शिवराज पवार, गणेश शिंदे हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन गणेश शिंदे यांनी केलं आहे. बी. आप्पासाहेब यांनी सहलेखन आणि सहदिग्दर्शन, हर्षवर्धन जाधव आणि मयूर सातपुते यांनी संकलन, तन्मय ढोक यांनी छायांकन, सुरेश पंडित, वरूण लिखाते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात गणेश शिंदे, अवंतिका कवठेकर, राहुल फलटणकर, बुशरा शेख, केतन पवार, सानवी वाळके यांच्या प्रमुख भूमिका आहे.
तारुण्याच्या काळात आकर्षण आणि उत्साहाच्या भरात काहीवेळा हातून चूका घडतात. पण त्या चुका लक्षात घेऊन, माफी मागून वागणुकीत बदल करायचा असतो. चुकीबद्दल माफी न मागितल्यास भविष्यात त्याचे विचित्र परिणामही होऊ शकतात. अशाच परिणामांची थरारक गोष्ट आरडी या चित्रपटातून उलगडल्याचं टीजरमधून दिसतं आहे. नव्या दमाच्या टीमचा आश्वासक प्रयोग टीजरमधून स्पष्ट होत आहे. सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे याच्या दमदार आवाजातील “वढ पाचची…”  हे धमाल पार्टी गीतही साध्य सगळीकडे चांगलेच व्हायरल झाले आहे.एकंदरीतच ॲक्शन, थ्रिलर अशा प्रकारातला हा चित्रपट असल्यामुळे प्रेक्षकांना नक्कीच पुरेपूर मनोरंजन अनुभवता येणार आहे यात शंका नाही.