Wednesday, June 25, 2025
spot_img
Home Blog

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे पहिला दक्षिणद्वार सोहळा पार पडला

0

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे पहिला दक्षिणद्वार सोहळा पार पडला !

 

नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) :प्रतिनिधी : श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात २५ जून या दिवशी दुपारी १ वाजता पहिला दक्षिणद्वार सोहळा पार पडला. ज्येष्ठ अमावास्येला झालेल्या या सोहळ्याची परिसरातील शेकडो भक्तगण कालपासून वाट पहात होते. या सर्वांनी कृष्णा नदीत स्नान करून याचा लाभ घेतला. या प्रसंगी ‘दिगंबरा-दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’, अशा नामघोषात भक्तांनी मंदिराची प्रदक्षिणा केली.
* दक्षिणद्वार सोहळा म्हणजे काय ?
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून दत्त मंदिरासमोर वाहणारी कृष्णा नदी उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे वहाते. जेव्हा कृष्णा नदीचे पाणी वाढते तेव्हा हे पाणी मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून मुख्य गाभार्‍यात प्रवेश करून श्रींच्या मनोहर पादुकांना स्पर्श करून मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडते. यालाच दक्षिणद्वार सोहळा असे म्हणतात. श्रींच्या चरणांवरून येणार्‍या कृष्णा प्रवाहात स्नान केल्याने पापांचा र्‍हास होऊन पुण्याची प्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने भाविकांनी या सोहळ्यासाठी गर्दी केली होती.

राजर्षी शाहू महाराज यांची अनेक दुर्मिळ छायाचित्रे आणि माहिती असणाऱ्या पुस्तकांचे एकूण अत्यंत दुर्मिळ असे सात खंड झाले उपलब्ध :इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची माहिती

0

राजर्षी शाहू महाराज यांची अनेक दुर्मिळ छायाचित्रे आणि माहिती असणाऱ्या पुस्तकांचे एकूण अत्यंत दुर्मिळ असे सात खंड झाले उपलब्ध :इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची माहिती

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : रयतेचा राजा राजर्षी शाहू महाराज यांची अनेक दुर्मिळ छायाचित्रे आणि माहिती असणाऱ्या पुस्तकांचे एकूण अत्यंत दुर्मिळ असे सात खंड उपलब्ध झाले आहेत. १९११ मध्ये प्रकाशित झालेले हे खंड अत्यंत दुर्मिळ असून भारतामध्ये याच्या हाताच्या बोटावर मोजण्या इतपत कॉपीज शिल्लक आहेत. यातील मिंट कंडिशनच्या या ग्रंथांच्या सातही खंडांच्या प्रति कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या संग्रहात दाखल झाल्या आहेत.
भावनगरचे भावसिंहजी महाराज हे शाहू महाराजांचे परममित्र, जिवाभावाचे स्नेही होत. राजकोट अध्यासन कालापासूनचे ते सहाध्यायी. पुढे शाहूंनी त्यांचे कायम स्मरण व्हावे म्हणून कोल्हापुरातील जुना राजवाडा ते नवीन राजवाडा या राजमार्गाला भावसिंहजी रोड असे नाव दिले. भावसिंहजी यांनीही महुआ येथे बांधलेल्या राजवाड्यास शाहू पॅलेस असे नाव दिले. 1896 ला भावनगरच्या गादीवर आलेल्या भाऊसिंहजींनी आपल्या संस्थांनच्या कारभारात वैयक्तिक व कर्तव्य निष्ठेने लक्ष घालून राज्य चालवले. ते पुरोगामी राज्यकर्ते होते. अनेक लोकोपयोगी कामे आणि शिक्षण प्रसार यासाठी पुष्कळ पैसा खर्च केला. वैयक्तिक त्याग आणि गरिबांबद्दल त्यांना वाटणारी कणव यामुळे त्यांची कारकीर्द लोकप्रिय झाली होती. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे सुसंस्कृत व कलाप्रिय होते. ते अनेक कवींचे व गायकांचे आश्रयदाते असून स्वतः ते बी. टी. या नावाने कवी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना तीन मुलगे व एक कन्या होती. त्यांच्या पश्चात त्यांच्या इच्छेप्रमाणे शाहूंनी त्यांच्या मुलांच्या संबंधातील आपली कर्तव्य शेवटपर्यंत पार पाडली.
या भावसिंहजी महाराजांनी आपल्या राजकोट येथील राजकुमार कॉलेजवर फोर्टी इयर्स ऑफ द राजकुमार कॉलेज हा सात खंडात्मक ग्रंथ लिहिला. यासातही खंडांचे प्रकाशन सन १९११ मध्ये झाले. यातून भावसिंहजी महाराजांची प्रचंड विद्वत्ता जशी दिसते तशीच आपल्या कॉलेज बद्दलची आस्थाही दिसते. १८७० सालापासूनचा या कॉलेजचा प्रवास यामध्ये दिलेला आहे. छत्रपती शाहू महाराजांचे दत्तक वडील छत्रपती शिवाजी महाराज चौथे यांचे शिक्षण ही येथेच झाले होते. त्यांचेही अनेक दुर्मिळ असे फोटो या ग्रंथात दिले आहेत. आपल्या शाहू महाराजांचे आणि भावसिंहजी महाराजांचे मैत्र संबंध तर सर्वांना ज्ञात आहेतच. या राजकोट कॉलेजमध्ये सन १८८५ ते १८८९ पर्यंत शाहू महाराजांचे वास्तव्य होते. महाराजांनी या ठिकाणी शालेय शिक्षणाबरोबर कवायत, तालीम, घोडेस्वारी, नेमबाजी या मर्दानी खेळासह क्रिकेट, फुटबॉल यासारख्या मैदानी खेळाचे ही प्रशिक्षण घेतले.
सन १९११ पर्यंतचा या कॉलेजचा इतिहासच या सात खंडातून भाऊसिंहजी महाराजांनी प्रकाशित केला होता. बॉम्बे प्रेसिडेन्सी मधील सर्व संस्थानातील राजकुमार येथे शिक्षण घेत. सन १८७० ते १९११ या काळात येथे शिक्षण घेत असणाऱ्या सर्व संस्थानातील राजकुमारांचे अनेक दुर्मिळ फोटो, त्या काळातील शिक्षण पद्धती, खेळ, गॅदरिंगचे फोटो, नकाशे यामध्ये उपलब्ध आहेत. शाहू महाराज यांचे आजपर्यंत माहित नसणारे, अनेक दुर्मिळ फोटो यामध्ये उपलब्ध आहेत.सुमारे २०/२२ किलो वजनाचे, पृष्ठाचे, हार्ड बायडिंगचे, अत्यंत सुस्थितीतील अत्यंत दुर्मिळ सहा ग्रंथ संग्रह आहे.

कैलास गडची स्वारी मंदिर विकासाच्या वाटचालीतील आधारस्तंभ हरपला

0

कैलास गडची स्वारी मंदिर विकासाच्या वाटचालीतील आधारस्तंभ हरपला

कोल्हापूर/प्रतिनिधी : मंगळवार पेठ, कोल्हापूर येथील प्रसिद्ध कैलास गडची स्वारी मंदिराचे अध्यक्ष बबेराव शंकरराव जाधव (वय ९५) यांचे निधन झाले आणि कैलास गडची स्वारी मंदिराच्या विकासाच्या वाटचालीतील आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. माजी आमदार व शिवसेनेच्या उपनेत्या जयश्री चंद्रकांत जाधव यांचे ते सासरे होत. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरूवार दि. २६ जून २०२५ रोजी सकाळी ९.०० वा. पंचगंगा स्मशानभूमी कोल्हापूर येथे आहे.
बबेराव जाधव हे शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावान व जुने कार्यकर्ते होते. ते केवळ राजकीयच नव्हे तर धार्मिक व सामाजिक क्षेत्रातही सक्रिय योगदान देणारे व्यक्तिमत्व आहे. कोल्हापूरचे माजी नगराध्यक्ष एम. के. जाधव यांच्या पश्चात कैलास गडची स्वारी मंदिराच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे स्वीकारली आणि नवनिर्माणाच्या दिशेने मंदिराच्या विकासाची वाटचाल भक्कम केली. त्यांच्या कार्यकाळात मंदिराच्या जडणघडणीचे सोनेरी पर्व पाहायला मिळाले. स्थापत्यविषयक कामांपासून ते भाविकांच्या सोयीसुविधांपर्यंत अनेक उपक्रम राबवले गेले. मंदिराच्या वर्धापन दिनी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहत असून, महाप्रसादाची ख्याती गावोगावी पोहोचलेली आहे. त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी पारायण, गणेशोत्सव, शिवजयंती व शिवपुण्यतिथी यासारखे कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने आणि शिस्तबद्धतेने पार पडत. प्रत्येक कार्यक्रम भाविकांना अध्यात्मिक उन्नतीचा अनुभव देणारा ठरत होता. त्यांच्या सुसंस्कृत नेतृत्वामुळे मंदिर केवळ उपासनेसाठीचे केंद्र न राहता, संघटन, श्रद्धा आणि समाजाभिमुखतेचे प्रतीक ठरले आहे.

ओडिशाच्या सहकार विभागांच्या अधिकाऱ्यांची केडीसीसीला अभ्यास भेट*

0

*ओडिशाच्या सहकार विभागांच्या अधिकाऱ्यांची केडीसीसीला अभ्यास भेट*

*अभ्यास सहकाराचा: बँकेच्या आर्थिक मापदंड व डिजिटल बँकिंग प्रणालीचे केले विशेष कौतुक*

*पुणेच्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेचे आयोजन……*

*ओडिशा सहकार लेखा परीक्षण संचालनालयाचा उपक्रम*

कोल्हापूर/प्रतिनिधी : ओडिशा सरकारच्या सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अभ्यास भेट दिली. पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेच्यावतीने या अभ्यासभेटीचे आयोजन करण्यात आले होते. ओडिशा सरकारच्या सहकार लेखापरीक्षण व सहकार संचालनालयाच्या २५ अधिकाऱ्यांचा सहभाग होता.

या अभ्यास मंडळात ओडिशा सरकारच्या सहकार विभागाचे ऑडिट जनरल ऑफ को-ऑपरेटिव्ह सोसायटीजचे उपसंचालक अक्षय कुमार दलेल, संतोष कुमार जाली, भवानी शंकर पुष्पलक, निहार रंजन स्वेन, अनिल कुमार पालो, सुजित कुमार त्रिपाठी, श्रीमती शांतीलता भुयान, श्रीमती शुभश्री प्रियदर्शनी प्रधान, श्रीमती श्रद्धांजली बारीक, मृत्युंजय सत्पती, नरेश पानी, हरप्रसाद मोहंती, विश्वजीत साहू, संतोष कुमार साहू, विश्वकिशन बिस्वाल, अनिल कुमार नायक, रंकनिधी बेहरा, शिशिर कन्हार, दिलीप कुमार पृष्टी, अशोक कुमार पुहन, सुधांशू शेखर राऊत, वेणुधर लेंका, अविनाश बेहरा, एस. छायाकांता पात्रो यांचा समावेश होता.

या अभ्यास भेटीत बँकेच्या केंद्र कार्यालयासह शाखांमधील कर्मचारी संख्या, गुंतवणुकीचे धोरण, बचतगटांना केल्या जाणाऱ्या वित्तपुरवठ्याची सुरक्षा, किसान क्रेडिट कार्डविषयीची सविस्तर माहिती, व्याज परतावा, शेती कर्जाविषयी सविस्तर माहिती,
केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या विकास सेवा संस्थांच्या संगणकीकरण अभियानाची माहिती, साखर कारखान्यांना बँकेकडून होत असलेल्या वित्त पुरवठ्याची सविस्तर माहिती जाणून घेतली.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे यांनी बँकेच्या कामकाजाविषयी विभागनिहाय सविस्तर माहिती दिली. श्री. दलेन म्हणाले, सहकाराच्या माध्यमातून कृषी- औद्योगिक क्षेत्रात बँकेचे मोठे योगदान आहे. २००० साली एटीएम सुरू करणारी केडीसीसी ही देशातील पहिली जिल्हा सहकारी बँक आहे. त्यापाठोपाठ एटीएम, सीईआरएम, मायक्रो एटीएम सेवा, मोबाईल बँकिंग, मोबाईल व्हॅन, स्वतःचे डाटा सेंटर, स्वतःचे सॉफ्टवेअर  ही वाटचाल क्रांतिकारक आहे. गाव पातळीवर मायक्रो एटीएममार्फत बँकिंग व्यवहार या बाबी विशेष कौतुकास्पद आहेत. कुशल व्यवस्थापन व पारदर्शी कारभार याच्या जोरावरच अडचणीच्या परिस्थितीतून फिनिक्स पक्षाप्रमाणे वाटचाल केलेल्या या बँकेचा आम्हा सर्वांना व सहकार क्षेत्राला अभिमान आहे.  भारतातील सहकार चळवळ मजबूत आहे. विशेषता: पश्चिम महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्ह्यात सहकाराचे जाळे अधिक मजबूत आहे. केडीसीसी बँकेला भेट दिल्यानंतर याची प्रचिती आली. बँकेच्या माध्यमातून येथे शिक्षण संस्था, पर्यटन संस्था, क्रीडा संस्था, हॉटेल व्यवस्थापन आदी अभिनव उपक्रमांसाठी वित्त पुरवठा होत आहे. बँकेची ९२ टक्के कर्ज वसुली ही सहकार क्षेत्राला फारच अभिमानास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

उपसंचालक अक्षय कुमार दलेल म्हणाले, केडीसीसी बँकेने आय. पी. डी. आय. बॉण्ड ही अभिनव योजना राबविली. अशी योजना महाराष्ट्रसह देशातील कोणत्याही बँकेत नसल्याचे कौतुकही त्यांनी केले.

चौकट …………
म्हणूनच प्रगतीपथावर……….
वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेचे प्रकल्प संचालक बी. किशोर म्हणाले, बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली बँकेने गरुडझेप घेतली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही काटकसरीचा, पारदर्शी कारभार या जोरावर बँकेने साधलेली प्रगती नेत्रदीपक आहे. बँकिंगमधील दैनंदिन व्यवहारात उपयोगी  तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आणि कृषी क्षेत्रात ए. आय. तंत्रज्ञानासाठी फंड उभा केल्याबद्दल तसेच शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत पिक कर्ज बिनव्याजी धोरण सर्वच बँकांना स्फूर्तिदायक आहे, असेही ते म्हणाले.स्वागत सौ. श्वेता मांडवकर यांनी केले. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी सविस्तर माहिती दिली. प्रशासन विभागाच्या अधिकारी सौ. स्वाती रवींद्र कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. करवीर पूर्वचे विभागीय अधिकारी शिवराज मगदूम यांनी आभार मानले.

.

स्वर्गीय अरूण सरनाईक यांच्या जीवनावर आधारीत “पप्पा सांगा कुणाचे” माहितीपटाचा प्रीमिअर शो रविवारी कोल्हापुरात होणार

0

स्वर्गीय अरूण सरनाईक यांच्या जीवनावर आधारीत “पप्पा सांगा कुणाचे” माहितीपटाचा प्रीमिअर शो रविवारी कोल्हापुरात होणार

कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टी गाजवलेल्या स्वर्गीय अरूण सरनाईक यांच्या जीवनावर आधारीत ” पप्पा सांगा कुणाचे” हा माहितीपट त्यांची मुलगी डॉ.सौ.सविता सरनाईक नाईकनवरे यांनी बनविला आहे. या माहितीपटाचा प्रीमिअर शो रविवार दि. २२ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता कोल्हापुरातील देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात होणार आहे.अशी माहिती डॉ .सौ.सविता सरनाईक नाईकनवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित राहणार आहेत. तर खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. शिवाय राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ, पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर, खा. धनंजय महाडिक, आ. सतेज पाटील यांचीही या प्रीमिअर शो साठी उपस्थिती असेल असेही सौ सविता सरनाईक नाईकनवरे यांनी सांगितले.
कोल्हापूर ही अरूण सरनाईक यांची जन्म आणि कर्मभूमी होती. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अजरामर कलाकृतींमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. ४ ऑक्टोबर १९३५ रोजी जन्मलेल्या अरूण सरनाईक यांचा २१ जून १९८४ रोजी दुर्दैवी अकाली मृत्यू झाला. ७० च्या दशकात रंगभूमी आणि सिनेसृष्टीला एक देखणा चेहरा मिळाला तो, अरूण सरनाईक यांच्या रूपाने,व्यावसायिक रंगभूमीवरून अभिनय क्षेत्रात आलेल्या अरूण सरनाईक यांनी शाहीर परशूराम या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. मुंबईचा जावई, एक गाव बारा भानगडी, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, सिंहासन हे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजले. नाटकात काम करताना त्यांचा अभिनय हा अभिनय नसून त्यात जिवंतपणा वाटायचा. तबला, ढोलकी, पेटी, तंबोर्याची साथ अशा वाद्यांमध्ये ते निष्णात होते. गाणं उपजत अंगात असल्यामुळे कोणतही गाणं किंवा अभंग त्यांना सहजपणे गाता यायचे.
२१ जून १९८४ रोजी एका अपघातात अरूण सरनाईक यांचा मृत्यू झाला. तर त्याच अपघातात अरूण सरनाईक यांच्या पत्नी आणि मुलगा हे सुध्दा मृत्यूमुखी पडले. मराठी कलाविश्वासाठी तो एक फार मोठा आघात होता. दरम्यान कै. अरूण सरनाईक यांची कन्या डॉ. सविता सरनाईक-नाईकनवरे यांनी पुढाकार घेवून, हा माहितीपट बनवला आहे. चतुरस्र अभिनेते स्वर्गीय अरूण सरनाईक यांच्या आयुष्याचा, कला आणि जीवन प्रवासाचा वेध घेणारा हा माहितीपट आहे.हा माहितीपट डॉ. संतोष पाठारे यांनी दिग्दर्शित केला आहे. तर याची संकल्पना विशाखा तुंगारे-देशपांडे यांची आहे. डॉ. सविता सरनाईक-नाईकनवरे यांची निर्मिती असलेल्या, पप्पा सांगा कुणाचे, या माहितीपटाचा कालावधी ७५ मिनिटांचा आहे. अरूण सरनाईक यांच्या आठवणी, त्यांच्याबद्दलच्या प्रतिक्रिया या माहितीपटामध्ये पाहता येतील. रविवारी सकाळी साडेदहा वाजता देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात या माहितीपटाचा प्रीमिअर शो होणार आहे. त्यासाठी सर्वांना मोफत प्रवेश असून सरनाईक परिवाराशी कोल्हापुरातील अनेकांचा स्रेह टिकून आहे. स्वर्गीय अरूण सरनाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनावरील माहितीपटाच्या प्रीमिअर शो साठी कोल्हापुरकरांनी आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहन श्री रणजित नाईकनवरे आणि डॉ. सौ. सविता सरनाईक-नाईकनवरे यांनी केले आहे.यावेळी स्वर्गीय अरूण सरनाईक यांचा नातू श्री.नील नाईकनवरे उपस्थित होता.

कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाला नवे दिशा—पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून उद्योग, पर्यटन आणि स्मारक विकासाला गती देण्याचे आश्वासन

0

कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाला नवे दिशा—पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून उद्योग, पर्यटन आणि स्मारक विकासाला गती देण्याचे आश्वासन

कोल्हापूर /प्रतिनिधी जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत, औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्यापक स्वरूपात बैठक घेण्यात येईल, असे ठोस आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. कोल्हापूर शहराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळखीचा भाग असलेल्या शाहू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शाहू महाराज स्मारक उभारण्याच्या दिशेनेही शासनाकडून कटिबद्ध राहू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. या प्रसंगी पालकमंत्री आबिटकर यांनी माजी आमदार व शिवसेना उपनेते जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव उपस्थित होते. या भेटीत शहराच्या विविध विकास कामांबाबत सविस्तर चर्चा झाली.

शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव यांच्या नेतृत्वात सादर झालेले महत्त्वाचे प्रस्ताव

जयश्री जाधव यांनी आमदारकीच्या काळात कोल्हापूर शहराच्या पायाभूत सुविधा, रस्ते विकास, उद्यान, क्रीडा संकुल, सांडपाणी व्यवस्थापन, पर्यटन आराखडे व महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास या बाबत शासन दरबारी अनेक प्रस्ताव सादर केले होते, परंतु सध्या हे प्रस्ताव प्रलंबित आहेत.या प्रस्तावांना तातडीने गती मिळावी, त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद व्हावी व ह्या प्रकल्पांचे प्रत्यक्षात रूपांतर व्हावे,” अशी ठाम मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत आबिटकर यांनी शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

शाहू स्मारकासाठी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे योगदान

जयश्री जाधव यांनी यावेळी नमूद केले की, दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी ‘शाहू मिल पर्यटन विकास आराखडा’ स्वखर्चाने तयार करून शासनाकडे सादर केला होता. हा आराखडा कोल्हापूर शहराच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि पर्यटन विकासासाठी मोलाचा ठरणार आहे. या आराखड्याला मान्यता मिळून शाहू मिलच्या जागेवर भव्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शाहू महाराज स्मारक उभारावे, अशी मागणीही त्यांनी केली.

उद्योग क्षेत्रासाठी लवकरच निर्णायक बैठक

युवा उद्योजक सत्यजित जाधव यांनी जिल्ह्यातील उद्योजक व लघुउद्योगांवरील अडथळे, परवानग्यांची प्रक्रियात होणाऱ्या विलंबासंदर्भात स्पष्टपणे मांडणी केली. यावर पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले की, “उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून लवकरच औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर निर्णय घेण्यासाठी विशेष बैठक आयोजित केली जाईल.”

कोल्हापूर महापालिका व शहर विकासाच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा

यावेळी पुढील कोल्हापूर महापालिका निवडणूक, महापालिकेची हद्दवाढ, रंकाळा तलावाचे सुशोभीकरण, गार्डन्सचा विकास, क्रीडा व फुटबॉल खेळाडूंसाठी सुविधा, शहर पर्यटनाला चालना देणारे प्रकल्प, तसेच महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास योजनेला गती देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.या बैठकीतून कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाला नवे गतीमान स्वरूप मिळेल. शाहू महाराजांचा इतिहास, कोल्हापूरचा सांस्कृतिक ठसा आणि आधुनिकतेचा समतोल साधत कोल्हापूरला भविष्यात एक मॉडेल शहर म्हणून उभारण्यासाठी ही बैठक निर्णायक ठरेल असा विश्वास माजी आमदार जयश्री जाधव यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नविन रस्त्याला लागून पाण्याचे उमाळे

0

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नविन रस्त्याला लागून पाण्याचे उमाळे

कोल्हापूर महानगरपालिकेला गळती काढण्यात पुन्हा अपयश

कोल्हापूर/प्रतिनिधी : गगनबावडा महामार्गावर फुलेवाडी जकात नाका परिसरातील खांडसरी फाटा येथे सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे रस्त्याच्या एका बाजूचे काम सुरू आहे त्यातच नवीन केलेल्या सिमेंट रस्त्याला लागून असलेल्या एका व्होलमधून पाण्याचे उमाळे सुटू लागल्याने रस्त्याच्या केलेल्या कामाबाबत संभ्रावस्था निर्माण झाली आहे.फुलेवाडी जकात नाका येथे गगनबावडा महामार्गावर एक वर्षांपासून कोल्हापूर महानगरपालिकेकडून जलवाहिनीची गळती काढण्याचे काम सुरू होते. हि गळती शोधण्यात पालिकेला अपयश आल्याने पालिका प्रशासनाकडून नवीन जलवाहिनी बसविण्यात आली. ज्या ठिकाणी जलवाहिनी बसविण्यात आली त्या ठिकाणापासून काही अंतरावर खांडसरी नजिक श्लोक हॉटेलच्या समोर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवीन बनविलेल्या सिमेंट रस्त्याला लागून एका व्होल मधून काही दिवसांपासून पाण्याचे उमाळे सुटू लागले आहेत. यामुळे हे पाणी नेमके कोठून येत आहे असा सवाल परिसरातील नागरिकांना पडला आहे. यामुळे महापालिकेला खरंच गळती काढण्यात यश आले का ? याबद्दल शंका व्यक्त होत आहे यासोबतच महापालिकेकडून फुलेवाडी भगवा चौक परिसरात ११०० एमएमचा ‘स्लुईस व्हॉल्व’ बसविण्यात आला आहे. त्या व्हॉल्व्ह च्या बाजूच्या एका छोट्या पाईप मधून देखील पाण्याचा मोठा कारंजा उडत असल्याने परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनाने गगनबावडा महामार्ग घाई – गडबडीत उरकण्याच्या नादात गळतीकडे कानाडोळा केल्याचे उघड झाले आहे. रस्ता पूर्ण करण्यापेक्षा छिद्रातून येणारे पाणी गळतीचे आहे की आणखी कोणते आहे याचा शोध घेणे पहिले गरजेचे आहे, अन्यथा रस्त्याच्या मध्यावर गळती राहिली तर काँक्रीट रस्ता फोडून पुन्हा नवीन कामाला सुरुवात करावी लागणार आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महानगरपालिका प्रशासनाचा बोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
खांडसरी फाटा येथे श्लोक हॉटेल समोर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ने नवीन बनविलेल्या रस्त्याला लागून असलेल्या एका छिद्रातून गेले कित्येक दिवस पाण्याचे उमाळे उमटू लागले आहेत. फुलेवाडी भगवा चौक नजिक जलवाहिनीवर बसविण्यात आलेल्या ‘स्लुईस व्हॉल्व’ च्या बाजूला असलेल्या एका छोट्या पाईप मधून मोठया प्रमाणात कारंजा उडत असल्याचे दिसत आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नविन रस्त्याला लागून पाण्याचे उमाळे

0

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नविन रस्त्याला लागून पाण्याचे उमाळे

कोल्हापूर महानगरपालिकेला गळती काढण्यात पुन्हा अपयश

कोल्हापूर/प्रतिनिधी : गगनबावडा महामार्गावर फुलेवाडी जकात नाका परिसरातील खांडसरी फाटा येथे सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे रस्त्याच्या एका बाजूचे काम सुरू आहे त्यातच नवीन केलेल्या सिमेंट रस्त्याला लागून असलेल्या एका व्होलमधून पाण्याचे उमाळे सुटू लागल्याने रस्त्याच्या केलेल्या कामाबाबत संभ्रावस्था निर्माण झाली आहे.फुलेवाडी जकात नाका येथे गगनबावडा महामार्गावर एक वर्षांपासून कोल्हापूर महानगरपालिकेकडून जलवाहिनीची गळती काढण्याचे काम सुरू होते. हि गळती शोधण्यात पालिकेला अपयश आल्याने पालिका प्रशासनाकडून नवीन जलवाहिनी बसविण्यात आली. ज्या ठिकाणी जलवाहिनी बसविण्यात आली त्या ठिकाणापासून काही अंतरावर खांडसरी नजिक श्लोक हॉटेलच्या समोर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवीन बनविलेल्या सिमेंट रस्त्याला लागून एका व्होल मधून काही दिवसांपासून पाण्याचे उमाळे सुटू लागले आहेत. यामुळे हे पाणी नेमके कोठून येत आहे असा सवाल परिसरातील नागरिकांना पडला आहे. यामुळे महापालिकेला खरंच गळती काढण्यात यश आले का ? याबद्दल शंका व्यक्त होत आहे यासोबतच महापालिकेकडून फुलेवाडी भगवा चौक परिसरात ११०० एमएमचा ‘स्लुईस व्हॉल्व’ बसविण्यात आला आहे. त्या व्हॉल्व्ह च्या बाजूच्या एका छोट्या पाईप मधून देखील पाण्याचा मोठा कारंजा उडत असल्याने परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनाने गगनबावडा महामार्ग घाई – गडबडीत उरकण्याच्या नादात गळतीकडे कानाडोळा केल्याचे उघड झाले आहे. रस्ता पूर्ण करण्यापेक्षा छिद्रातून येणारे पाणी गळतीचे आहे की आणखी कोणते आहे याचा शोध घेणे पहिले गरजेचे आहे, अन्यथा रस्त्याच्या मध्यावर गळती राहिली तर काँक्रीट रस्ता फोडून पुन्हा नवीन कामाला सुरुवात करावी लागणार आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महानगरपालिका प्रशासनाचा बोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
खांडसरी फाटा येथे श्लोक हॉटेल समोर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ने नवीन बनविलेल्या रस्त्याला लागून असलेल्या एका छिद्रातून गेले कित्येक दिवस पाण्याचे उमाळे उमटू लागले आहेत. फुलेवाडी भगवा चौक नजिक जलवाहिनीवर बसविण्यात आलेल्या ‘स्लुईस व्हॉल्व’ च्या बाजूला असलेल्या एका छोट्या पाईप मधून मोठया प्रमाणात कारंजा उडत असल्याचे दिसत आहे.

आजाराला कंटाळून विहिरीत उडी मारून वृध्दांची आत्महत्या

0

आजाराला कंटाळून विहिरीत उडी मारून वृध्दांची आत्महत्या

कोल्हापूर/प्रतिनिधी : करवीर तालुक्यातील वडणगे येथील खंडेराव हिंदुराव पाटील (वय 81) यांनी वडणगे येथील बाबासाहेब पाटील यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.हा प्रकार शनिवार दि.२१ जून रोजी उघडकीस आला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
खंडेराव पाटील हे शेतकरी असून ते वयोवृध्द असल्याने त्यांना औषध चालू होती.शुक्रवार दि.२० जून रोजी रहात्या घरातून कोणासही न सांगता निघून गेले होते.ते घरी परत न आल्याने नातेवाईकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ते मिळून आले नाहीत.आज परत त्यांचा बाबासाहेब पाटील यांच्या शेतातील विहिरीत शोध घेत असताना ते विहिरीत मयत अवस्थेत मिळाल्याने विहिरी बाहेर काढून सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वी मृत्यु झाला.त्यांच्या पश्च्यात पत्नी ,मुले ,मुली, सूना आणि नातंवडे असा परिवार आहे.

कुंरुदवाड येथील ” उदय भाऊ ” टोळीवर हद्दपारीची कारवाई दोघां सख्या भावांचा समावेश

0

कुंरुदवाड येथील ” उदय भाऊ ” टोळीवर हद्दपारीची कारवाई दोघां सख्या भावांचा समावेश

कोल्हापूर/प्रतिनिधी : शिरोळ तालुक्यातील कुंरुदवाड येथील “उदय भाऊ” टोळीच्या उदय काकासो पाटील ,रविंद्र काकासो पाटील या दोघां सख्या भावासह विशाल रामचंद्र कांबळे ,सुनिल कुमार मगदूम आणि प्रशांत आण्णासो पाटील (सर्व रा.पाटील गल्ली ,दत्तवाड.ता.शिरोळ) यांच्यावर कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या प्रभारींना गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांचा प्रस्ताव तयार करून पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या.वरिष्ठांच्या सुचने प्रमाणे कुंरुदवाड पोलिसांनी” उदय भाऊ”टोळीचा प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता.या प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी म्हणुन शाहुवाडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांची नेमणूक केली होती.त्यांनी या प्रस्तावाची चौकशी करून त्याचा अहवाल पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केला.या टोळीच्या माध्यमातून टोळीच्या अवैद्य गुन्हेगारी कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि समाजात दहशत माजवून सामाजिक स्वास्थ बाधा निर्माण केल्याचे निष्पन्न झाले.सदर टोळीच्या वाढ़त्या गुन्हेगारीस आळा बसावा ,सार्वजनिक शांतता,सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दि.२० जून रोजी “उदय टोळी ” च्या दोघां सख्या भावासह पाच जणांवर कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपारीचा आदेश दिल्याने सहा.पोलिस निरिक्षक यांनी अंमलबजावणी केली.या हद्दपार केलेल्या टोळीवर जुगाराचे १४ आणि मारामारीचा एक गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल आहे.सदरचे हद्दपार झालेले इसम कोल्हापूर जिल्ह्यात आढ़ळल्यास त्याची माहिती जवळच्या पोलिस ठाण्यात देण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक यांनी केले आहे.