Friday, October 25, 2024
Home ताज्या स्नेहाचे नाते अधिक घट्ट करणारा दीपावली सण"

स्नेहाचे नाते अधिक घट्ट करणारा दीपावली सण”

स्नेहाचे नाते अधिक घट्ट करणारा दीपावली सण”

कोल्हापूर/(शब्दांकन श्रद्धा जोगळेकर)
दीपावली हा संस्कृत शब्द आहे. ह्याचा अर्थ ‘दिव्यांच्या ओळी’. भारतीय कॅलेंडर नुसार हा सण कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो. हा सण ज्ञानाचा (प्रकाश) अज्ञानावर(अंधकार) विजय म्हणून प्रतित होतो.पू म्हणजे पूर्णता, आणि जा म्हणजे पूर्णतेतून जन्माला आलेले. म्हणूनचं पूजा म्हणजे पूर्णतेतून जन्माला आलेली ती पूजा. आणि पूजा केल्याने परिपूर्णता व संतुष्टी प्राप्त होते. पूजा केल्याने वातावरणात सकारात्मकता वाढविणाऱ्या सूक्ष्म लहरी तयार होतात.म्हणूनच दीपावली दिवशी पूजा केली जाते.
फटाक्यांची आतषबाजी केली जाते दारात रांगोळीचा सडा मानला जातो घर विद्युत रोषणाई करून घर सजविले जाते. घराभोवती आकाश कंदील लावला जातो दीपमाळ लावून दार घराचे अंगण सजविले जाते. नवीन कपडे पोशाख परिधान केला जातो एकमेकांना फराळाचे वाटप करत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या जातात.
दीपावली म्हणजे धनत्रयोदशी,
नरक चतुर्दशी​,
लक्ष्मी पूजन,
गोवर्धन पूजा (बलि प्रतिपदा),
भाऊबीज​.असे पाच दिवस साजरी होते.

धनत्रयोदशी”…….
दिवाळी उत्सवाच्या पहिल्या दिवशी घर व कार्यालयीन परिसराला साफसफाई करुन सजविले जाते. धन व ऐश्वर्या ची प्रतीक असलेल्या देवी लक्ष्मीचे दारात रांगोळी व पारंपरिक चिन्हांनी सुशोभित करून स्वागत केले जाते. तिचे दीर्घ प्रतिक्षे नंतर चे आगमन दर्शविण्यासाठी घरात तांदळाचे पीठ व कुंकवाने छोटे छोटे पदचिन्ह काढल्या जातात. रात्रभर दिव्यांची आरास केल्या जाते. हा दिवस अतिशय शुभ मानला जात असल्याने, ह्या दिवशी गृहिणी सोनं वा चांदीची भांडी खरेदी करतात. भारतात कुठे कुठे पशु धनाची ही पूजा केली जाते. हा दिवस धन्वंतरी (आयुर्वेदाची देवता अथवा देवांचे वैद्य) चा जन्मदिन म्हणून ही साजरा केला जातो. ह्या दिवशी मृत्यू देवता यमाचे पूजन करण्यासाठी रात्रभर दिवे जाळले जातात. म्हणूनचं ह्याला यमदीपदान असे सुद्धा जाणले जाते. आकस्मिक मृत्यू चे भय दूर करण्यासाठी हे पूजन केले जाते.
दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. भगवान बुद्धाने म्हटले आहे, “आपो दीपो भवः”, म्हणजे तुम्ही स्वतःचं प्रकाश रूप व्हा. सगळे वेद व उपनिषद हेच सांगतात, की तुम्ही सारेच प्रकाशमान आहात. तुमच्यापैकी कोणी प्रकाशित झाला आहात तर कोणी अद्याप व्हायचे आहेत. पण सर्वांमध्ये प्रकाश देण्याची क्षमता आहे. दिवाळीच्या दिवशी आपण सारे अंधकाराला दूर सारतो. अंधकार मिटविण्यासाठी केवळ एक तिरीप पुरेशी नाही. त्यासाठी पूर्ण समाजाला प्रकाशित व्हावे लागेल. परिवारातील केवळ एक सदस्य प्रसन्न असेल तेवढे पुरेसे नाही, प्रत्येक सदस्याला प्रसन्नचित्त  व्हावे लागेल. जर एकसुद्धा नाराज राहिला, तर बाकी सगळे प्रसन्न राहू शकत नाही. म्हणून प्रत्येक घराला प्रकाशमान व्हावे लागेल. दुसरी गोष्ट आपल्या सर्वांच्या आयुष्यात आचरावी लागेल ते म्हणजे माधुर्य. इतरांना केवळ मिठाई वाटू नका, तर सगळ्यांना तो गोडवा वाटा. दिवाळीचा सण आम्हाला हेच सांगतो की जर कुणाबद्दल मनात काही अढी, ताण असेल तर फटाक्यासारखे त्याला उडवून लावा आणि आयुष्याची परत नव्याने सुरुवात करून, उत्सव साजरा करा.

नरक चतुर्दशी​”…….
दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. ह्या दिवशी भल्या पहाटे उठून, सूर्योदया अगोदरच स्नानादी कार्ये आटोपून तयार होण्याची परंपरा आहे. ह्या सणाची एक पुरातन कथा आहे. असुरांचा राजा नरकासुर प्रागज्योतीसपूर( नेपाळचा दक्षिण प्रांत) येथे राज्य करीत होता. एका युद्धात इंद्रावर विजय प्राप्त केल्यावर, देवांची माता अदिती हिची सुंदर कर्णकुंडल त्याने हिसकावून घेतली व देव आणि संतांच्या सोळा हजार कन्यांना आपल्या अंतःपुरात कैदेत ठेवले.
नरक चतुर्दशी च्या दिवशी भगवान श्रीकृष्णा ने ह्या दानवाचा वध करून, त्या सर्व कन्यांची मुक्तता केली व अदितीची मौल्यवान कर्णकुंडलं परत प्राप्त केलीत. त्या महिलांनी सुगंधी तेलाने मर्दन करून आणि स्नान करून स्वतःला शुचिर्भूत करून घेतले. म्हणून प्रातःस्नानाची ही परंपरा वाईट प्रवृत्ती वर दिव्यतेच्या विजयाचे प्रतीक आहे. ह्या दिवशी शुभ संकल्प घेण्याची रीत आहे

लक्ष्मी पूजन”……
दिवाळीचा तिसरा दिवस, सर्वात महत्वाचा, लक्ष्मी पूजन. ह्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो. अमावस्या असूनही ह्या दिवसाला अतिशय शुभ मानल्या जाते.छोट्या छोट्या दिव्यांनी सारे शहर उजळून टाकले जाते आणि रात्रीचा गहिरा काळोख हळूहळू दूर सारल्या जातो. लक्ष्मी देवी ह्या दिवशी पृथ्वीतलावर भ्रमण करून भरभराट व समृद्धी च्या आशिर्वादाची लूट करते असे मानल्या जाते. सायंकाळी लक्ष्मी पूजन केल्या जाते आणि घरी बनविलेल्या मिठाई चे सर्वांना वितरण केले जाते.
हा अतिशय शुभ दिन मानल्या जातो, कारण ह्या दिवशी बऱ्याच संतांनी व महात्म्यांनी समाधी घेऊन आपल्या नश्वर देहाचा त्याग केला होता. ह्या महान संतांमध्ये भगवान श्रीकृष्ण व भगवान महावीरांचा समावेश आहे. ह्याच दिवशी प्रभू रामचंद्र, सीतामाई व लक्ष्मणा सोबत, १४ वर्षांचा वनवास सोसून अयोध्येत घरी परतले होते.
दिवाळीच्या ह्या दिवसाबद्दल एका रोचक कथेचा कटोपनिषद मध्ये उल्लेख आहे. नचिकेत नावाचा एक छोटा मुलगा होता. त्याला असे वाटायचे की मृत्यू देवता यम हे रूपाने अमावस्येच्या काळरात्री सारखे भयाण असावेत. पण तो प्रत्यक्ष जेव्हा त्यांना भेटला तेव्हा त्यांचा शांत चेहरा व सामान्य रूप बघून आश्चर्यचकित झाला. यमाने नचिकेताला समजावून सांगितले की केवळ मृत्यू ची काळोखी गुहा पार केल्या नंतरच मनुष्य श्रेष्ठ ज्ञानाचा प्रकाश बघू शकतो.आणि त्याचा आत्मा परमात्म्यासोबत एकरूप होण्यासाठी देहाचा त्याग करतो. तेव्हाच नचिकेताला सांसारिक आयुष्य आणि मृत्यूच्या महत्वाची जाणीव झाली व तो आपल्या साऱ्या शंकां दूर सारून दिवाळीच्या उत्सवात सहभागी झाला.
अमावस्येच्या रात्री दिवाळी साजरी करतात आणि त्या दिवशी देवी लक्ष्मी ची पूजा करतात. आम्हाला समृध्द करणारी दिव्यता, ही देवी लक्ष्मीचेच रूप आहे. भारतात ईश्वराला केवळ पुरुष रूपातच नव्हे तर स्त्री रुपात सुध्दा पुजले जाते. ज्या प्रमाणे पांढऱ्या प्रकाशात सप्तरंग अंतर्भूत असतात, त्याप्रमाणे दिव्यतेची वेगवेगळी रूपे असतात. म्हणून आजच्या दिवशी आपण ऋग्वेदातील काही प्राचीन मंत्रांद्वारे देवी लक्ष्मी ची आराधना करू या आणि त्या द्वारे सकारात्मक लहरी व समृद्धी प्राप्त करू या. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. प्राचीन काळी लोकं ह्या दिवशी आपले सारे धन देवासमोर आणून ठेवीत. सामान्यतः आपले धन बँकेत किंवा लॉकर मध्ये सुरक्षित ठेवल्या जाते. पण प्राचीन काळी लोकं आपले सारे धन समोर पसरवून ठेवत आणि समृद्धी चा आनंद घेत होते. केवळ सोनं, चांदी हेच धन नव्हे तर आपले ज्ञान हे सुद्धा एक धनच आहे. तर ह्या प्रकारे उत्सव साजरा केला जात असे. तुम्हाला आपल्या ज्ञानाचे नीट जतन करायला हवे व त्याबद्दल समृद्धीची भावना हवी. धनत्रयोदशी हा आयुर्वेदाचा  दिवस आहे, कारण आपली जडी बुटी व त्या वनस्पती सुद्धा एक प्रकार चे धन आहे. असे म्हणतात की ह्याच दिवशी मानवतेला अमृताची देण मिळाली होती.तर आजच्या दिवशी तुम्ही खूप सौभाग्यशाली आहात असे मानावे आणि तृप्तीचा अनुभव घ्यावा. जेव्हा जेव्हा आपण स्वतःला खूप भाग्यशाली समजतो तेव्हा आयुष्यात बरेच काही प्राप्त होते. बायबल मध्ये लिहिले आहे की “ज्यांच्या जवळ आहे त्यांना अजून दिल्या जाईल आणि ज्यांच्याकडे काही नाही त्यांच्या कडून जे काही थोडं फार आहे तेही हिसकावून घेतल्या जाईल”. प्राचीन काळापासून हीच शिकवण आहे की मनात सतत समृद्धी चा भाव जागता ठेवावा. समृद्धी आपल्या आतून सुरु होते व मग ती बाहेर अभिव्यक्त होते. तुम्हाला खूप आशीर्वादाचे पाठबळ आहे, ह्याच भावनेने आज परत जावे.

 

गोवर्धन पूजा”……
दिवाळीचा चौथा दिवस हा वर्ष प्रतिपदा म्हणून जाणला जातो. ह्या दिवशी राजा विक्रम सिंहासनावर आरूढ झाला होता. ह्याच दिवशी श्रीकृष्णाने इंद्र देवाच्या कोपाने झालेल्या अतिवृष्टी पासून गोकुळातल्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता.

भाऊबीज”……
भाऊ व बहिणीतील अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. भाऊ आपल्या बहिणींना त्यांच्या प्रेमाखातर सुंदरशी भेटवस्तू देतात.भाऊ व बहिणीतील अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. भाऊ आपल्या बहिणींना त्यांच्या प्रेमाखातर सुंदरशी भेटवस्तू देतात.अशा पद्धतीने पाच दिवस दीपावली सण आनंदी वातावरणात उत्साह साजरा केला जातो दीपावली कृषी निमित्ताने घरामध्ये बुंदी लाडु,चिवडा, चकली, अनारसा, शंकरपाळी, बेसन लाडू,रवा लाडू, गोडधोड मिठाई असा फराळ केला जातो व त्याचा लक्ष्मीपूजन दिवशी नैवेद्य दाखवला जातो. तुलसी विवाह तुलसी पूजनाने या दीपावली ची सांगता होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे...

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना ‘वेल्डींग, सीएनसी कोर्स’ व ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना 'वेल्डींग, सीएनसी कोर्स' व 'अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या' प्रशिक्षणाची सुवर्णसंधी शिरोली एमआयडीसी/प्रतिनिधी : केंद्रशासना मार्फत व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधी...

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

Recent Comments