Thursday, June 26, 2025
spot_img
Home Blog Page 3

शंभूराजे चेमर्दानी खेळांचे १० दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

0

शंभूराजे चेमर्दानी खेळांचे १० दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : येथील शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच यांच्या वतीने वस्ताद कै. सुरज ढोली यांनी सुरु केलेली परंपरा कायम राखत आयोजित करण्यात आलेले शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळांचे १० दिवसीय प्रशिक्षण शिबिर नुकतेच उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात मुला-मुलींसोबत महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
शिबिरामध्ये लाठी-काठी, तलवार, दांडपट्टा यांसारख्या पारंपरिक शस्त्रांचे प्रशिक्षण तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यासोबतच, सहभागींना नेमबाजी, मेडिटेशन, प्राणायाम आणि विविध साहसी खेळांचेही प्रशिक्षण मिळाले, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना मिळाली.त्याच बरोबर शिवकालीन युद्धकलेचे महत्व त्याचा प्रचार व प्रसार करण्याचे मुख्य काम शिबिरामुळे करण्यात आली
शिबिराच्या समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून विजय देवणे शिवसेना सहसंपर्क प्रमुख, अँड प्रसन्न मालेकर मुर्ति व मंदिर अभ्यासक, विनय पाटील ऑलमपिंक शुटिंग रेंज, विनोद कांबोज ज्येष्ठ गिर्यारोहक, अनिकेत जुगदार निर्यारोहक व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती त्यांनी मर्दानी खेळांच्या महत्त्वाची माहिती दिली आणि सहभागींचे कौतुक केले.सर्व पाहुण्याचे स्वागत अध्यक्षाच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले
या शिबिरामुळे युवा पिढीला आपल्या गौरवशाली इतिहासाची आणि मर्दानी खेळांच्या परंपरेची माहिती मिळाली, तसेच शारीरिक तंदुरुस्ती आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली,याच उद्देशानी या शिबिरांचे आम्ही संस्थेच्या वतिने गेली १५ वर्षे आयोजन करीत आहोत असे अध्यक्षा शितल सुरज ढोली यांनी सांगितले.सुत्रसंचालन धनाजी उपारे यांनी केले व शिबिरा विषयी माहिती व आभार ज्योती जाधव यांनी मानले.
संस्थेच्या सर्व प्रशिक्षकांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले

केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्या वतीने आज प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया संदर्भात मोफत मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन

0

केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्या वतीने आज प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया संदर्भात मोफत मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालय ४२ वर्षाची दर्जात्मक शिक्षणाची उज्ज्वल परंपरा असणारे महाविद्यालय आहे.एन.बी.ए.,नॅक या बरोबरच ‘एम्पॉवर्ड ऑटोनॉमी’ चा दर्जा प्राप्त असलेले शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील कॉलेज आहे. केआयटी कॉलेजच्या वतीने आज रविवार दि. ८ जून २०२५ रोजी ‘अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअर च्या संधी व प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया-२०२५ ’ या विषयावरती मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम कोल्हापूर येथील आनंद भवन, सायबर कॉलेज,येथे दु.४ वा.संपन्न होणार आहे अशी माहिती संस्थेचे संचालक मोहन वनरोट्टी यांनी पत्रकार परिषदे मध्ये दिली.
यावेळी बोलताना त्यांनी सुरवातीलाच केआयटी चे बदलते स्वरूप, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेले विविध प्रयत्न, नवीन शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अभ्यासक्रमांमध्ये सुरू असलेले अमुलाग्र बदल याबाबतीत संस्थेचे संचालक मोहन वनरोट्टी यांनी माहिती दिली. अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया ही थोडी गुंतागुंतीची आहे. प्रवेश प्रक्रियेत असणाऱ्या एकूण टप्प्यांवरती एखादी झालेली छोटी चूक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भवितव्याचे नुकसान ठरू शकते. याचे गांभीर्य ओळखूनच केआयटी विद्यार्थी व पालकांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन प्रतिवर्ष करीत असते.या कार्यक्रमात अभियांत्रिकीच्या विविध विभागातील करिअरच्या संधी,अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील टप्पे, महत्त्वाची कागदपत्रे, शिष्यवृत्ती,आरक्षण,शासकीय नियम,विद्यार्थिनीसाठीच्या शासकीय सवलती याबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे अधिष्ठाता, अँडमिशन डॉ.महेश शिंदे यांनी सांगितले.त्यानंतर पत्रकार परिषदे मध्ये झालेल्या प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये संस्थेचे सचिव श्री दीपक चौगुले यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांचे निराकरण केले तसेच केआयटीच्या भविष्यातील योजनांची माहिती दिली.आज
रविवार दि. ८ जून २०२५ रोजी होणारा प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शनाचा हा कार्यक्रम सर्व पालक, विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः विनामूल्य आहे व हा कार्यक्रम आपल्या सर्व संबंधित शंकांचे नक्कीच निरसन करेल असा विश्वास महाविद्यालयाचे प्रवेश प्रक्रिया प्रमुख डॉ.महेश शिंदे यांनी व्यक्त केला आहे. सदर कार्यक्रमाची माहिती प्रसार माध्यमांनी आपल्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी केले.

कै. श्री. रामराव नागेशकर, श्री. सुरेश गुळवणी,श्री. शंकर पाटील व श्री. संजय चव्हाण,श्री उज्वल नागेशकर व श्री अशोक रोकडे (व्हाईट आर्मी) यांचा होणार सन्मान

0

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया राष्ट्रीय पातळीवरील बांधकाम व्यावसायिकांच्या कोल्हापूर सेंटरच्या वतीने पदग्रहण समारंभ व उत्कृष्ठ कार्य करणाऱ्यांचा होणार आज ८ जून रोजी सन्मान

कै. श्री. रामराव नागेशकर, श्री. सुरेश गुळवणी,श्री. शंकर पाटील व श्री. संजय चव्हाण,श्री उज्वल नागेशकर व श्री अशोक रोकडे (व्हाईट आर्मी) यांचा होणार सन्मान

कोल्हापूर/प्रतिनिधी : बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या कोल्हापूर सेंटरच्या वतीने नव्याने निवडण्यात आलेल्या पदाधिकारी व कार्यकारीणी सदस्यांचा पदग्रहणसमारंभ तसेच कोल्हापुरातील जेष्ठ बांधकाम व्यावसायिकांना जीवन गौरव पुरस्कार अर्पण आणि उत्कृष्ठ वास्तू निर्मिती पुरस्कार प्रदान समारंभ येत्या रविवारी दि. ०८.०६.२०२५ रोजी सायंकाळी ५.०० वा. रेसिडेन्सी क्लब, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला असून समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मा.ना. श्री. प्रकाश आबिटकर, पालकमंत्री कोल्हापूर आणि मा.खा.श्री. धनंजय महाडिक उपस्थित राहणार आहेत. शिवाय कार्यक्रमास बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अविनाश पाटील, स्टेट चेअरमन श्री.जगनाथ जाधव व क्रीडाई उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री. विद्यानंद बेडेकर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर सेंटरचे माजी चेअरमन श्री.राजीव लिंग्रस यांनी पत्रकार परिषदेत दिली.बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर सेंटरचे नूतन चेअरमन श्री. विजय कोंडेकर,व्हाइस चेअरमन श्री अमोल कुलकर्णी,जी,सी,मेंबर श्री.प्रताप बापू कोंडेकर, माजी चेअरमन श्री.मदन भंडारी आदी उपस्थित होते.
या नव्या पदाधिकारी व कार्यकारणीच्या पदग्रहन समारंभाबरोबरच बांधकाम क्षेत्रात आपल्या अतुलनीय कर्तुत्वाने नावलौकिक कमवलेले व कोल्हापूर शहराच्या जडणघडणीचे पहिले शाहूकालीन आर्कीटेक्ट कै. श्री. रामराव नागेशकर ज्यांनी राधानगरी धरण, शालिनी पॅलेस, संपूर्ण राजारामपुरीची रचना व बऱ्याच महत्वाच्या वास्तूंचे रचनाकार म्हणून केलेल्या कार्याबद्दल त्यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच बांधकाम क्षेत्राशी निघडीत व आधुनिक बांधकाम साहित्य चे शिल्पकार श्री. सुरेश गुळवणी (खतेन्द्र वितरक) यांना जीवनगौरव पुरस्कार त्याचबरोबर उत्कृष्ट वास्तुनिर्मिती पुरस्कार श्री. शंकर पाटील व श्री. संजय चव्हाण यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूर चे भूषण असणारे श्री उज्वल नागेशकर व श्री अशोक रोकडे (व्हाईट आर्मी) यांना “जीवन-दूत” हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याचबरोबर बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर सेंटर चे नूतन चेअरमन श्री. विजय कोंडेकर व त्यांच्या कार्यकारणी पदग्रहण समारंभ पार पडणार आहे. पुरस्काराचे यावर्षीचे हे १० व वर्ष आहे.
संघटनेची कोल्हापूर शाखेची १४ वर्षापूर्वी स्थापना करण्यात आली असून बांधकाम व्यावसायिकांच्या समस्यांची बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून शासन दरबारी उकल करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. आगामी काळात या संघटनेच्या माध्यमातून नवनवीन प्रकल्पांची उभारणी करणे. विविध संघटनात्मक उपक्रम राबविण्याची कोल्हापूर शाखेचे उद्दिष्टे आहेत, तसेच बांधकाम व्यवसायाला शासनाकडून इंडस्ट्रीचा दर्जा मिळवण्यासाठी कोल्हापूर सेंटर सातत्याने अग्रेसर आहे.यावेळी पत्रकार परिषदेला

*बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेची आजवरची कार्ये*

• केंद्र अथवा राज्य सरकारच्यावतीने केल्या जाणाऱ्या कोणत्याही बांधकामाच्या दरावर आणि वस्तूच्या किंमतीवर संस्थेचे नियंत्रण असते.
• नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट रिसर्च सेंटर्सची (NICMAR) तीन केंद्रे पुणे, मुंबई व हैद्राबाद येथे सुरू केली. या केंद्रांना लवकरच मुक्त विद्यापीठांचा दर्जा प्राप्त होणार आहे.
• प्रोजेक्ट एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सील ऑफ इंडिया (PEPCI) या संस्थेची उभारणी करून त्याद्वारे केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने देशातील बांधकाम क्षेत्रातील कारागीरांना परदेशात कामासाठी पाठविले जाते.
• कंत्राटदारांच्या कंत्राट कामावर सरकारने लागू केलेल्या भरमसाठ विक्रीकराती त्रुटी शोधून त्यांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊन त्यात योग्य त्या दुरुस्त्या करवून घेतल्या.
• बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीच्या तरतुदी संबंधी जाचक अटी, नियम, त्रुटी शोधून त्या विषयी केंद्र सरकार आणि भविष्य निर्वाह निधी केंद्रीय आयुक्तांशी चर्चा करून त्यांच्या नजरेस आणून त्याची दखल घेण्यास भाग पाडले.
• बांधकाम व्यावसायिकांच्या व्हॅट, एंट्री, सेवा, कामगार कल्याण आदी करासंबंधी विविध राज्यातील उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरा करून या जाचक करातून दिलासा मिळवून दिला.
• बांधकामाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या किंमती अधून-मधून गगणाला भिडतात. त्यावेळी बांधकाम व्यावसायिकांच्या बाजूने आवाज उठविण्य संस्था अग्रभागी राहते.
• बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था कॉन्फीडरेशन ऑफ इंटरनॅशनल कॉन्ट्रक्टर असोसिएशन (CICA) या जागतिक बांधकाम संघटनेशी संलघ्न आहे.
• आशियाई विकास बँकेच्या वार्षिक सर्वसाधरण सभेला बिल्डर्स असो. ऑफ इंडियाचा एक पदाधिकारी प्रतिनिधीस निरिक्षक म्हणून आमंत्रित केले जाते.
• केंद्र व राज्य सरकारच्या विविध कर, कामगार आणि पर्यावरण विषयक कायद्याच्या संबंधी धोरणात्मक निर्णय घेण्याच्या बैठकांना संस्थेच्या प्रतिनिधीला आमंत्रित केले जाते.
• केंद्र सरकारच्या नियोजन समितीची बिल्डर्स असो. ऑफ इंडिया ही संस्था संस्थापक (फाऊंडर मेंबर) सदस्य आहे.
• भारतीय बांधकाम कौशल्य विकास केंद्र (CSDA) या महत्त्वपूर्ण संस्थेचा बिल्डर्स असो. ऑफ इंडिया ही एक प्रवर्तक संस्था म्हणून मानली जाते.
• भारताच्या पंतप्रधान कार्यालयाने नव्याने निर्माण केलेल्या राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या सहकार्याने संस्था बांधकाम व्यावसायात नव्या तरुणांना प्रशिक्षण देऊन कुशल कारागीर निर्माण करते.

संस्थेची ध्येय/ उद्दीष्ट्ये :
 विविध कंत्राटदारांना एकत्र करून त्यांच्यात एकता, सलोखा, समन्व्य, विश्वास निर्माण करणे.
 बांधकाम व्यावसायिक कंत्राटदार, माल पुरवठादार, ग्राहक, शासकीय अधिकारी यांच्यात सलोखा, स्नेह निर्माण करताना कटूता कमी करण्यासाठी प्रयत्न करणे.
 सार्वजनिक बांधकाम विभाग, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमध्ये काळानुरूप आधुनिक बदल करणे संबंधी संस्थेच्या वतीने कांही मौलीक सूचना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
 बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षिततेसंबंधी जागृतता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेणे.
चेंबर ऑफ कॉमर्स, फेडरेशन, व्यापारी असोसिएशनशी सतत संपर्कात राहून त्यांच्या स्थानिक समस्यांची उकल करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उत्सव पुनर्चक्रीकरणाचा उपक्रमाचे ५ ते ८ जून चार दिवस आयोजन

0

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उत्सव पुनर्चक्रीकरणाचा उपक्रमाचे ५ ते ८ जून चार दिवस आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : ५ जून हा दिवस संपूर्ण जगात पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त सर्वत्र पर्यावरणाच्या प्रक्रियेत समाविष्ट घटकाबाबत विविध उपक्रम घेतले जातात.याचाच एक भाग म्हणून पुनर्चक्रीकरणांमध्ये वैज्ञानिक प्रक्रियेसाठी कचरा विलगीकरण केंद्र स्थापन करून त्यात विभागानुसार कचऱ्याचे वर्गीकरण होणे कायद्यानुसार अपेक्षित आहे परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.त्यामुळे पुनर्चक्रीकरण योग्य होत नाही. कचरा ही रस्त्यावर तसेच डम्पिंग ग्राउंड वर सहज नष्ट होत आहे. पुनरचक्रीकरण करण्यात प्रत्येक वस्तूला विशिष्ट किंमत व मूल्य आहे. ती जबाबदारी फक्त कचरा वेचकांची नसून सर्व नागरिकांची आहे याची जाणीव जागृती व्हावी म्हणून अवनि संस्था व किर्लोस्कर ऑइल इंजिन्स पुढाकाराने तसेच इतर सामाजिक संस्थेच्या सहभागातून उत्सव पुनर्चक्रीकरणाचा चार दिवस ५ जून ते ८ जून साजरा करण्यात येणार आहे..अशी माहिती अवनीच्या अनुराधा भोसले आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचे
शरद आजगेकर,अनिल चौगुले यांनी पत्रकार बैठकीत दिली.
त्यात कचरावेचक बचत गट सामाजिक संस्था यांचा सहभाग पुनर्चक्रीकरण उत्सवा मध्ये होणाऱ्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री शाहू स्मारक भवनच्या कलादालनामध्ये असणार आहे यातून बचत गटाने पुनर्चक्रीकरणाच्या वस्तू निर्मिती व विक्रीची संधी उपलब्ध होणार आहे त्यात कागदी फुले,पिशव्या औषधी वनस्पती,बॉटल आर्ट घोंगडी,गोधड्या यांचे प्रदर्शन व विक्री केली जाईल.यातून स्थानिक कचरावेचकांना रोजगार मिळणार आहे. किमान ३५ बचत गट सहभागी होणार आहेत. पहिल्या दिवशी म्हणजेच ५ जून रोजी सकाळी ११.०० वाजता ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. जय सामंत डॉ. मधुकर बाचुळकर डॉ.मंजुळा पिशवीकर यांचे
पुनर्चक्रीकरणाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन होईल. तसेच आंतरराष्ट्रीय कचरावेचक आघाडीच्या उपाध्यक्ष सुशीला साबळे यांच्या उपस्थितीत पुनर्चक्रीकरणांमध्ये उत्सवाचे उद्घाटन केले जाईल. दिनांक ५ ते ८ जून दरम्यान शाहू स्मारकाच्या बाहेरील बाजूस पुनर्चक्रीकरण होऊ शकणाऱ्या वस्तूंची भिंत उभारली जाईल . नागरिकांनी येताना सोबत घरातील रिसायकलिंग होणाऱ्या योग्य वस्तू त्या देणगी म्हणून द्याव्यात असे आवाहन करण्यात येणार आहे. चार दिवस चालणाऱ्या पुनर्चक्रीकरण उत्सवात किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, निसर्ग मित्र, गार्डन्स क्लब, संग्राम संस्था, स्त्रीमुक्ती संघटना सेंटर फोर रेनॉसा,जीवन मुक्ती सेवा संस्था, वसुधा कचरावेचक संघटना, अर्थ वॉरियर्स, इशरे कोल्हापूर चॅप्टर, इकोस्वास्थ्य, स्त्री मुक्ती संघटना, डॉ.व्ही टी.पाटील फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, महिला दक्षता समिती, जाणीव संस्था शिवाजी विद्यापीठ पर्यावरण विभाग,रोटरी क्लब ऑफ गार्गीज, वर्ल्ड फॉर नेचर,
संपूर्णअर्थ लाईव्हलिवुड फाउंडेशन,कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ अशा विविध संस्था संघटना सहभागी असणार आहेत तसेच चार दिवस दररोज सायंकाळी ३ ते ६ या वेळेत टेरेस वरील परसबाग, घरातील ओल्या कचऱ्यापासून खत तयार करणे,पर्यावरण पत्रावळी रानभाज्याचे महत्व, टाकाऊ नैसर्गिक पदार्थ पासून बायो एंजाइन्स बनविणे यांचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
अवनि संस्था गेले पंधरा वर्षे कचरा वेचकांच्या प्रश्नावर कार्यरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १२३०कचरा वेचकांचे संघटन करण्यात आले आहे. तर सांगली येथे ४२० व सातारा जिल्ह्यात ५५० कचरा वेचकांचे संघटन करण्यात आले आहे. कचरा वेचक भगिनी ह्या उदरनिर्वाहसाठी विक्री योग्य प्लास्टिक व लोखंड रस्त्यावरून फिरून गोळा करतात व विक्री करून कुटुंब चालवतात. त्याच्या या कामाचा फायदा त्याच्यापेक्षा जास्त पर्यावरणाला होतो.
रस्त्यावरून तसेच कोंढाळ्यातून कचरा गोळा करताना फक्त पुनर्चक्रीकरण होणारा व योग्यच कचरा उचलला जातो.
कोल्हापूर जिल्ह्यातील कचरावेचक त्यांच्या रोजच्या कामातून रोजचे किमान ८ टन प्लास्टिक डम्पिंग ग्राउंड वर जाण्यापासून वाचविले जाते.
त्यांना यातून जमतेम रोजी रोटी मिळते परंतु यातून जमा झालेल्या वस्तूचे शंभर टक्के पुनर्चक्रीकरण होते. त्यामुळे कचरा वेचकांचे पुनर्चक्रीकरणांमध्ये योगदान असल्यामुळे सरकारने २०१६ च्या घनकचरा व्यवस्थापन कायद्यात त्यांचा समावेश केला आहे. त्यांना ओळखपत्र म.न.पा व जिल्हा परिषदेने दिले पाहिजे. त्यांना कचरा वर्गीकरणाच्या कामात सामावून घेतले पाहिजे.तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना स्पष्ट निर्देश आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी न झाल्याने आपले शहर आणि संपूर्ण जिल्हाभर कचऱ्याचे ढीग आढळतात. तसेच नागरिकांनी घंटागाडी कडे ओला सुका कचरा वेगळा करून द्यायचा आहे परंतु तेही होताना दिसून येत नाही.
पत्रकार बैठकीस अनुराधा भोसले, शरद आजगेकर, रघुनाथ पाटील, अनिल चौगुले , शिवानी गजबर, वनिता कांबळे,साताप्पा मोहिते, भारती कोळी अक्काताई गोसावी,सारिका भोरे, संगीता लोंढे यांची उपस्थिती होती.

निस्पृह वैद्यकीय सेवेबद्द सिद्धगिरी जननीच्या डॉ. वर्षा पाटील यांचा सन्मान

0

निस्पृह वैद्यकीय सेवेबद्द सिद्धगिरी जननीच्या डॉ. वर्षा पाटील यांचा सन्मान

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : शिवसेना वैद्यकीय कक्ष, खासदार श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी पश्चिम महाराष्ट्र येथील वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर व वैद्यकीय संस्था (हॉस्पीटल) यांचा सन्मान सोहळा लोटस कार्यालय, मार्केट यार्ड, कोल्हापूर येथे संपन्न झाला.
यावेळी वंध्यत्व निवारणासाठी परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनानुसार अमूल्य व भरीव असे कार्य कोणतेही मानधन न घेता करणाऱ्या सिद्धगिरी जननी आय व्ही एफ टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या संचालिका व विभाग प्रमुख डॉ. वर्षा विवेकराव पाटील यांचा सन्मान आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सुहास बाबर, रानू महाराज वास्कर, मा. आमदार सुजित मिणचेकर, डॉ ज्योति वाघमारे, सुजित चव्हाण यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. वंध्यत्व निवारणासाठी त्यांनी स्वामीजींच्या प्रेरणेने भारतातील पहिले ट्रस्ट श्रेणीतील आय व्ही एफ टेस्ट ट्युब बेबी सेंटर कार्यान्वित केल्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे वात्सल्य सुखा पासून वंचित राहू नये यासाठी डॉ. वर्षा पाटील ह्या विशेष परिश्रम घेत आहेत. अत्यंत माफक दरात त्या अत्यंत उच्च दर्जाच्या सुविधा देत आहेत. महाराष्ट्र व कर्नाटकातील असंख्य नागरिक या सुविधेचा लाभ घेत आहेत. डॉ. वर्षा पाटील यांनी दिलेल्या विनामोबदला सेवेबद्दल त्यांचा हा सन्मान वैद्यकीय क्षेत्रासाठी एक आदर्श ठरला आहे.
या कार्यक्रमास मंगेश चिवटे, प्रशांत साळुंखे, रामहरी राऊत व पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी , कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील नामांकित डॉक्टर व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत कागल तालुक्यातील व्हन्नाळी इथल्या विकसित कृषि संकल्प अभियानाला सुरूवात

0

विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी शेतकर्‍यांचे योगदान महत्वपूर्ण

खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत कागल तालुक्यातील व्हन्नाळी इथल्या विकसित कृषि संकल्प अभियानाला सुरूवात

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेती देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, मोदी सरकार शेतकर्‍यांच्या विकासासाठी अनेक योजना आणत आहेत. २०४७ पर्यंत विकसित भारत निर्माण करायचा आहे. त्यासाठी शेतीमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा, शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. कागल तालुक्यातील व्हन्नाळी इथल्या विकसित कृषि संकल्प अभियान कार्यक्रमात ते बोलत होते.
कागल तालुक्यातील व्हन्नाळी येथे विकसित कृषि संकल्प अभियानाचा कार्यक्रम झाला. त्यासाठी खासदार धनंजय महाडिक प्रमुख उपस्थित होते. पूर्वी शासनाच्या योजना पंचतारांकीत हॉटेलमध्ये जाहीर व्हायच्या आणि ५-१० वर्ष उलटली तरी, खर्‍या लाभार्थ्यांना योजनेबद्दल माहितीच असायची नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळया राज्यात जाऊन, जनतेच्या समोर सरकारच्या योजना सुरू करतात. त्यामुळे लोकांना शासनाच्या योजनांची माहिती मिळते, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. कोणत्या जमिनीत कोणत्या वातावरणात कुठले पिक घेता येईल, याबद्दलची माहिती या अभियानातून मिळणार आहे. तसेच शेतकर्‍यांच्या शंका आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होईल. परिणामी शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढेल, असा विश्‍वास खासदार महाडिक यांनी बोलून दाखवला. आजही भारत देश कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. उत्पादन वाढीसाठी शासनाने आणलेल्या योजना आणि नवतंत्रज्ञान याचा शेतकर्‍यांनी वापर करावा, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले. पुढील १५ दिवसांत २० हजार शास्त्रज्ञ, देशभरातील शेतकर्‍यांना भेटणार आहेत. कोल्हापूर जिल्हयातील ६ तालुक्यातील ९० गावात हे अभियान राबवणार असल्याचे डॉ.रविंद्र सिंह यांनी सांगितले. यावेळी आत्माच्या रक्षा शिंदे, डॉ.प्रशांत कवर, डॉ.विद्यासागर गोडाम, डॉ.राजेंद्र वावरे, तालुका कृषि अधिकारी शेखर थोरात, के.बी.वाडकर, डॉ. पुष्पनाथ चौगुले यांनी मनोगतं व्यक्त केली. तसेच शेतकर्‍यांच्या कृषी विषयक शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाला धनराज घाटगे, ऍड. अमर पाटील, सरपंच दिजीप कडवे, डॉ.नरेंद्र गजभिये, डॉ.राहूल यादव, एम.टी.पोवार, सुरेश मर्दाने, संजय वाडकर, दिपक हातकर, डॉ. पांडूरंग काळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

किसान काँग्रेसच्या अध्यक्षपदी सागर कोंडेकर

0

किसान काँग्रेसच्या अध्यक्षपदी सागर कोंडेकर

कोल्हापूर/प्रतिनिधी : अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी कागल तालूक्यातील सागर शंकर कोंडेकर यांची निवड करण्यात आली. किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पाष्टे यांनी त्यांची नियुक्ती केली असून खासदार शाहू छत्रपती व काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते कोंडेकर यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी कोंडेकर यांचे अभिनंदन करत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न किसान काँग्रेसच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आपण अहोरात्र कार्यरत रहा, अशा सूचना दिल्या. अखिल भारतीय किसान काँग्रेसला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापूर्वी स्थापन झालेल्या किसान काँग्रेसने देशातील शेतकरी आणि शेतमजुरांसाठी लाखो लढे लढत त्यांना न्याय मिळवून दिला आहे. सागर कोंडेकर यांचा शेतकरी प्रश्नांवर चांगला अभ्यास आहे, त्यामुळे ते या पदाला न्याय देतील असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

कार्यकर्त्यांनी बैलगाडी शर्यतीचे मैदान मारलय, आता येणाऱ्या निवडणुकीच मैदान मारण्यासाठी सज्ज रहावे; आमदार सतेज पाटील यांचं कार्यकर्त्यांना आवाहन

0

सरपंच राजा आणि आर एक्स बैज्या बैलजोडी, सतेज – ऋतु बैलगाडी शर्यत स्पर्धेची मानकरी

आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील कार्यकर्त्यांच्या प्रेमाने गेले भारावून

कार्यकर्त्यांनी बैलगाडी शर्यतीचे मैदान मारलय, आता येणाऱ्या निवडणुकीच मैदान मारण्यासाठी सज्ज रहावे; आमदार सतेज पाटील यांचं कार्यकर्त्यांना आवाहन

कोल्हापूर/प्रतिनिधी : हूर म्हणताच वाऱ्याच्या वेगाने धावणारी बैल… एका पेक्षा एक सहभागी झालेल्या बैल जोड्या..
आणि डोळ्याचे पारणे फेडणारी अशी
सतेज ऋतू भव्य बैलगाडी शर्यत लाखो शौकिनांच्या उपस्थितीत आज रविवारी पार पडली. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या बैलगाडी शर्यत नेर्ली येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.
माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोल्हापूर दक्षिण शर्यत शौकीनच्यावतीने नेर्ली येथे, पश्चिम महाराष्ट्रातील सतेज -ऋतू भव्य बैलगाडी स्पर्धा, आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांचा यावेळी भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. या बैलगाडी शर्यतीत सर्जा, राजा, बुलट छब्या, सांगोला राज्या अशी अनेक बैल जोड्या सहभागी झाल्या होत्या. बैलं मालकांनी हुर्र…. म्हणताच वाऱ्याच्या वेगाने धावणारी बैल आणि तितकाच बैलगाडी शर्यत शौकिनांचा प्रतिसाद अशा अभूतपूर्व आणि थरारक उत्साहात या बैलगाडी शर्यती पार पडल्या. या बैलगाडी शर्यतीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील २ लाखांहून अधिक बैलगाडी शर्यत प्रेमींनी हजेरी लावली होती. पाचगाव येथील संभाजी गाडगीळ यांच्या आरएक्स बैज्या आणि युवराज शिंदे यांच्या सरपंच राजा बैलजोडी सतेज – ऋतु बैलगाडी शर्यत स्पर्धेची मानकरी ठरली. या बैलजोडीने या स्पर्धेचा प्रथम क्रमांक पटकावत एक लाख रुपयांचे बक्षीस जिंकले. तर महेश बोंद्रे यांच्या बुलेट छब्या आणि शिवाजी मेटकरी यांच्या सांगोला राजा बैलजोडी द्वितीय तर पाटील डेअरी यांच्या फुल्या आणि अमोल घागरे यांच्या कॅडबरी ही बैल जोडी तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, बैलगाडी शर्यत ही, ग्रामीण भागाची परपंर आहे. ही परंपरा टिकवायच कामं, अशा शर्यतीच्या माध्यमातून होत आहे त्याचा मनस्वी आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षी या स्पर्धा आणखी भव्य स्वरूपात घ्यावात, त्यासाठी प्रथम क्रमांकासाठी ट्रॅक्टर बक्षीस देण्याचे आमदार सतेज पाटील यांनी जाहिर केले. याशिवाय अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात झालेल्या स्पर्धा मुळ भारावून गेलो. असे उद्गारही त्यांनी काढले. बैलगाडी शर्यतीचे हे मैदान मारलय, आता भविष्यात ज्या- ज्यां निवडणूका येतील त्याच मैदान मारण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे. असे आवाहनही त्यांनी केले.
माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी, महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारी अशी ऐतिहासिक स्पर्धा संपन्न झाली. शेतकरी आपल्या जिवापेक्षाही बैलांना जास्त जपतो.. शिवाय ग्रामीण भागाची परंपरा आणि बाज कायम ठेवण्यासाठी, पुढील वर्षीही अशा स्पर्धा भव्य स्वरूपात घेऊया. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करू अशी ग्वाही आ. पाटील यांनी दिली.यावेळी गोकुळचे संचालक
प्रकाश पाटील, शशिकांत पाटील चुयेकर, बाबासो चौगले, बयाजी शेळके, बाजार समिती संचालक सुयोग वाडकर, उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, गोकुळ शिरगाव सरपंच चंद्रकांत डावरे, सांगवडेवाडी सरपंच सुदर्शन खोत, कणेरी सरपंच निशांत पाटील, पाचगाव चे माजी सरपंच संग्राम पाटील, माजी सरपंच शशिकांत खवरे, नेर्ली उपसरपंच निखिल पाटील बिद्री कारखान्याचे संचालक आर एस कांबळे, नारायण गाडगिळ, सागर पाटील, गजानन पाटील यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते.

कार्यकर्त्यांनी बैलगाडी शर्यतीचे मैदान मारलय, आता येणाऱ्या निवडणुकीच मैदान मारण्यासाठी सज्ज रहावे; आमदार सतेज पाटील यांचं कार्यकर्त्यांना आवाहन

0

सरपंच राजा आणि आर एक्स बैज्या बैलजोडी, सतेज – ऋतु बैलगाडी शर्यत स्पर्धेची मानकरी

आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील कार्यकर्त्यांच्या प्रेमाने गेले भारावून

कार्यकर्त्यांनी बैलगाडी शर्यतीचे मैदान मारलय, आता येणाऱ्या निवडणुकीच मैदान मारण्यासाठी सज्ज रहावे; आमदार सतेज पाटील यांचं कार्यकर्त्यांना आवाहन

कोल्हापूर/प्रतिनिधी : हूर म्हणताच वाऱ्याच्या वेगाने धावणारी बैल… एका पेक्षा एक सहभागी झालेल्या बैल जोड्या..
आणि डोळ्याचे पारणे फेडणारी अशी
सतेज ऋतू भव्य बैलगाडी शर्यत लाखो शौकिनांच्या उपस्थितीत आज रविवारी पार पडली. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या बैलगाडी शर्यत नेर्ली येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.
माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोल्हापूर दक्षिण शर्यत शौकीनच्यावतीने नेर्ली येथे, पश्चिम महाराष्ट्रातील सतेज -ऋतू भव्य बैलगाडी स्पर्धा, आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांचा यावेळी भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. या बैलगाडी शर्यतीत सर्जा, राजा, बुलट छब्या, सांगोला राज्या अशी अनेक बैल जोड्या सहभागी झाल्या होत्या. बैलं मालकांनी हुर्र…. म्हणताच वाऱ्याच्या वेगाने धावणारी बैल आणि तितकाच बैलगाडी शर्यत शौकिनांचा प्रतिसाद अशा अभूतपूर्व आणि थरारक उत्साहात या बैलगाडी शर्यती पार पडल्या. या बैलगाडी शर्यतीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील २ लाखांहून अधिक बैलगाडी शर्यत प्रेमींनी हजेरी लावली होती. पाचगाव येथील संभाजी गाडगीळ यांच्या आरएक्स बैज्या आणि युवराज शिंदे यांच्या सरपंच राजा बैलजोडी सतेज – ऋतु बैलगाडी शर्यत स्पर्धेची मानकरी ठरली. या बैलजोडीने या स्पर्धेचा प्रथम क्रमांक पटकावत एक लाख रुपयांचे बक्षीस जिंकले. तर महेश बोंद्रे यांच्या बुलेट छब्या आणि शिवाजी मेटकरी यांच्या सांगोला राजा बैलजोडी द्वितीय तर पाटील डेअरी यांच्या फुल्या आणि अमोल घागरे यांच्या कॅडबरी ही बैल जोडी तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, बैलगाडी शर्यत ही, ग्रामीण भागाची परपंर आहे. ही परंपरा टिकवायच कामं, अशा शर्यतीच्या माध्यमातून होत आहे त्याचा मनस्वी आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षी या स्पर्धा आणखी भव्य स्वरूपात घ्यावात, त्यासाठी प्रथम क्रमांकासाठी ट्रॅक्टर बक्षीस देण्याचे आमदार सतेज पाटील यांनी जाहिर केले. याशिवाय अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात झालेल्या स्पर्धा मुळ भारावून गेलो. असे उद्गारही त्यांनी काढले. बैलगाडी शर्यतीचे हे मैदान मारलय, आता भविष्यात ज्या- ज्यां निवडणूका येतील त्याच मैदान मारण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे. असे आवाहनही त्यांनी केले.
माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी, महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारी अशी ऐतिहासिक स्पर्धा संपन्न झाली. शेतकरी आपल्या जिवापेक्षाही बैलांना जास्त जपतो.. शिवाय ग्रामीण भागाची परंपरा आणि बाज कायम ठेवण्यासाठी, पुढील वर्षीही अशा स्पर्धा भव्य स्वरूपात घेऊया. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करू अशी ग्वाही आ. पाटील यांनी दिली.यावेळी गोकुळचे संचालक
प्रकाश पाटील, शशिकांत पाटील चुयेकर, बाबासो चौगले, बयाजी शेळके, बाजार समिती संचालक सुयोग वाडकर, उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, गोकुळ शिरगाव सरपंच चंद्रकांत डावरे, सांगवडेवाडी सरपंच सुदर्शन खोत, कणेरी सरपंच निशांत पाटील, पाचगाव चे माजी सरपंच संग्राम पाटील, माजी सरपंच शशिकांत खवरे, नेर्ली उपसरपंच निखिल पाटील बिद्री कारखान्याचे संचालक आर एस कांबळे, नारायण गाडगिळ, सागर पाटील, गजानन पाटील यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते.

गोकुळ संघाची चौफेर प्रगती मागील चार वर्षांत गुंतवणूक, दूध दर व संकलनामध्ये अभूतपूर्व वाढ – डॉ. योगेश गोडबोले

0

गोकुळ संघाची चौफेर प्रगती मागील चार वर्षांत गुंतवणूक, दूध दर व संकलनामध्ये अभूतपूर्व वाढ
– डॉ. योगेश गोडबोले

कोल्हापूर/प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाने मागील चार वर्षांमध्ये पारदर्शक व उत्पादकाभिमुख धोरणांमुळे आर्थिक, प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रात ठोस प्रगती साधली आहे. हे यश विश्वासार्ह व परिणामकारक कार्यपद्धतीचे प्रतिक आहे. मुद्द्यांतून गोकुळ संघाची गेल्या चार वर्षांतील कार्यक्षमता, दूध उत्पादकांविषयी असलेली बांधिलकी आणि आर्थिक प्रगती सुस्पष्ट होते असे गोकुळ दूध संघचे कार्यकारी संचालक, डॉ. योगेश गोडबोले यांनी स्पष्ट केले.

गुंतवणुकीत लक्षणीय वाढ –

विश्वासाचे प्रतीक: दि. ३१ मार्च २०२१ अखेर गोकुळ संघाकडे एकूण गुंतवणूक / ठेवी रु. ३२२ कोटी इतक्या होत्या. मागील चार वर्षांत संघाने विविध धोरणात्मक निर्णय, पारदर्शक कारभार व उत्पादकाभिमुख कार्यपद्धती यामुळे रु. १९० कोटींची वाढ साधली असून, दि. ३१ मार्च २०२५ अखेर ही रक्कम रु. ५१२ कोटींवर पोहोचली आहे. ही वाढ ही केवळ आर्थिक यशाची नव्हे, तर हजारो दूध उत्पादक व संस्थांचा संघावर असलेला विश्वास व निष्ठा दर्शवते.

वास दूधावर न्याय निर्णय

उत्पादकांसोबत असलेली बांधिलकी : केंद्र शासनाच्या फूड सेफ्टी स्टँडर्ड कायद्यानुसार वासाचे अथवा भेसळयुक्त दूध हे बाजारात विक्रीस पुन्हा येऊ नये म्हणून नष्ट करणे बंधनकारक आहे. तथापि, गोकुळ संघाने केवळ कायदा बघितला नाही, तर उत्पादकांचे आर्थिक हित केंद्रस्थानी ठेवले. वासाच्या गायीच्या दुधाला प्रति लिटर २ रुपये व वासाच्या म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ३ रुपये दरवाढ देऊन, योग्य मोबदला दिला गेला. या धोरणाचा मुख्य उद्देश म्हणजे उत्पादकांचे नुकसान टाळणे आणि त्यांना संघाकडे स्थिर राहण्यासाठी प्रोत्साहित करणे. येणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यावर आणखी चर्चा करून दरवाढ करण्याचाही विचार केला जाणार आहे. संघाने नेहमीच स्वच्छ, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण दूध संकलनासाठी कार्य केले असून, भविष्यातही यावर भर राहील.

दूध दरवाढ

उत्पादकांसाठी अभूतपूर्व दिलासा : गेल्या चार वर्षांत गोकुळ संघाने उत्पादकांना उच्चांकी दूध दर तसेच अंतिम दूध दरफरक दिले असून गतसाली प्रतिदिनी १८.५० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण केला. संघाच्या म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमामुळे उच्चांकी म्हैस दूध संकलन या साली झाले. विशेषतः म्हैस दूधाच्या दरामध्ये सरासरी १२ रुपये प्रति लिटर वाढ तर गाय दूधाच्या दरामध्ये सरासरी ९ रुपये प्रति लिटर वाढ दिली आहे, गाय दुधाचे उत्पादन वाढल्यामुळे तसेच गाय दूध पावडर व लोण्याचे दर कमी झाल्यामुळे गाय दूध खरेदी कमी झाले होते त्यावेळी गोकुळच्या गाय दूध उत्पादकांना रुपये ३३ अधिक शासनाचे अनुदान रुपये ७ असे एकूण ४० रुपये इतका उच्चांकी दर हि काही कालावधीत मिळाला आहे. हि दरवाढ म्हणजे गोकुळ संघाने उत्पादकांना बाजाराच्या स्पर्धात्मक दरातही न्याय दिला आहे. यामुळे सद्या एप्रिल- मे या लीन कालावधीत संघाचे सरासरी दूध संकलन १५ लाख ५० हजार इतके राहिले आहे ते गतसालच्या संकलनाच्या तुलनेत जास्त आहे. प्रतिस्पर्धी दूध संघांनी दूध विक्री दरात वाढ केल्यानंतर संघालाही विक्री दरात वाढ करावी लागते. या दरवाढीसाठी व्यवसायिक दृष्टीकोन ठेऊन दुधाच्या खरेदी व विक्री दरातही वाढ होत असते.

दूध संकलन व सहकारी संस्थांचा वाढता सहभाग

गोकुळ संघास दुधाचा पुरवठा करणाऱ्या संस्था सहकारी संस्था कायद्यानुसार नोंदणी करून सभासद होतात. सन् २०२०-२१ मध्ये गोकुळ संघाचे दैनंदिन सरासरी दूध संकलन १२.२२ लाख लिटर होते. मागील चार वर्षांत हे संकलन ३.७२ लाख लिटरने वाढून १५.९४ लाख लिटर इतके झाले आहे. जुन्या संस्था संघाच्या पायाभूत रचनेचा भाग आहेत आणि आजही त्या संघाच्या यशात मोठा वाटा उचलत आहेत. नवीन संस्थांचा समावेश हा वाढती मागणी, दूध प्रक्रिया क्षमता आणि शेतकरी हित लक्षात घेऊनच केला जातो. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश दूध संस्थांचा गोकुळ वर दृढ विश्वास अल्यामुळे त्या गोकुळकडेच दूध संकलन करतात.
यामुळे गतवर्षीच्या तुलनेत सर्व क्षेत्रात गुंतवणूक, दूध दर व संकलन, विक्री मध्ये अभूतपूर्व वाढ झाली असून हजारो सभासद, संस्था, लाखो दूध उत्पादक आणि गोकुळचे लाखो ग्राहक हे संघाच्या कार्यशैलीवर व नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेऊन आहेत, दूध उत्पादक, ग्राहक हीच गोकुळची खरी ताकद आहे.