Wednesday, October 22, 2025
spot_img
Home Blog Page 3

इंजिनीअर्स डे निमित्त बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर सेंटरच्या वतीने वाढतं कोल्हापूर बांधकाम क्षेत्र महारेरा शिवाय विकास अपूर्ण कार्यक्रमाचे आज आयोजन

0

इंजिनीअर्स डे निमित्त बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर सेंटरच्या वतीने वाढतं कोल्हापूर बांधकाम क्षेत्र महारेरा शिवाय विकास अपूर्ण कार्यक्रमाचे आज आयोजन

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : इंजिनीअर्स डे निमित्त बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया कोल्हापूर सेंटरच्या वतीने वाढतं कोल्हापूर बांधकाम क्षेत्र महारेरा शिवाय विकास अपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन उद्या सोमवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता रेसिडेन्सी क्लब येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर यावेळी आमदार अमल महाडिक, बिल्डर्स असोसिएशन इंडिया हाउसिंग रेरा कमिटीच्या चेअरमन ज्योती चौगुले यांची उपस्थिती असणार आहे.यावेळी त्या बांधकाम व्यावसायिकांना मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमांमध्ये निवृत्त प्रधान सचिव जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य मा. श्री एकनाथ पाटील, निवृत्त मुख्य अभियंता श्री एस. एल. पाटील, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, एस.आर. पाटील,श्री. डी. डी. शिंदे,श्री. अशोक पवार,सौ. स्मिता माने, निवृत्त कार्यकारी अभियंता श्री. जी. के. शिंदे, श्री अण्णासो माळी, श्री रवींद्र. कागलकर, श्री डी. वाय. कदम, श्री. शिवाजीराव चव्हाण, श्री. बारदेशकर, श्री. व्ही. एस.पाटील, कार्यकारी अभियंता जलसंधारण श्री. स्वप्नील पाटील, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद कोल्हापूर श्री. मानसिंग पाटील आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्व बांधकाम व्यवसायिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन बिल्डर्स असोसिएशन ऑफ कोल्हापूर इंडिया कोल्हापूर सेंटरचे चेअरमन श्री. विजय कोंडेकर, सेक्रेटरी उमेश शेठ, ट्रेझरर रणजीत पाटील यांनी केले आहे.

इंग्लिश मीडियम स्कूल्स असोसिएशनतर्फे आज ८ सप्टेंबर रोजी शिक्षकांच्या कार्याचा गौरव होणार

0

इंग्लिश मीडियम स्कूल्स असोसिएशनतर्फे आज ८ सप्टेंबर रोजी शिक्षकांच्या कार्याचा गौरव होणार

कोल्हापूर /प्रतिनिधी : शिक्षक दिनाचे औचित्य साधून इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन कोल्हापूर तर्फे दरवर्षी मुख्याध्यापक शिक्षक यांचा सत्कार आयोजित केला जातो.याही वर्षी येत्या ८ सप्टेंबर रोजी हॉटेल सयाजी येथे दुपारी ४ वाजता हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे अशी माहिती इंग्लिश मीडियम स्कूल्स असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष गणेश नायकुडे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष के. डी.पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राच्या फर्स्ट लेडी सौ. अमृता देवेंद्र फडणवीस तर म्हणून महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. प्रकाश आबिटकर उपस्थित राहणार आहेत. तसेच लोढा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. मंजू लोढा जिल्हाधिकारी अमोल येडगे प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ. सुवर्णा सावंत प्रमुख पाहुणे म्हणून या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
यावेळी ७ मुख्याध्यापक १८ माध्यमिक व प्राथमिक शिक्षक प्राचार्य ५ कला व क्रीडा शिक्षक ११ पूर्व प्राथमिक शिक्षक यांचा सत्कार सोहळा होणार आहे.मुख्याध्यापक मध्ये शकुंतला कृष्णा पाटील, लक्ष्मी गणेश, स्वप्नील संदीप पाटील, भाग्यश्री सुरज मगदूम, रूपा राजेश पाष्टे, निले रीमा महेश, राजश्री युवराज पाटील आदींचा समावेश आहे.
तर शिक्षकांमध्ये कृपाल रामचंद्र यादव, सविता भीमराव काटकर, सुगंधा कपिल माळकरी, आरती राकेश दुर्गुळे, मीना प्रताप डाके, मधुरा मकरंद देशपांडे, अश्विनी प्रशांत सादळे, स्नेहलता जनगोंडा घाट, सुप्रिया प्रकाश किरवेकर, अनुराधा सुधीर कुकडे, सुमय्या इरफान बागवान, अश्विनी रामचंद्र पाटील, वर्षा. पी. कोतेकर, अपर्णा दिलीप मुंगार्डेकर, माहेश्वरी बाबासो पाटील, नेहा उल्हास खानाज, आशाराणी बबनराव भंडारी, सुभाष जयराम कांबळे, रूपाली संजय पाटील, मेघा विष्णू पाटील अरिफा सुलेमान फरास गौसिया साजिद नवाब,धनश्री अरविंद जाधव, प्रियांका सागर गुरव, तृप्ती विजय गोंधळी, मंजू संजय जालिंदरे, विशाखा अनिल खाडे, अबोली सागर देशपांडे, मनाली अनुप गणपते, राजाराम भाऊ पाटील, पद्मजा विकास भोसले,किशोर बाळासाहेब मानकापुरे, रियाज अब्दुल शेख, ज्ञानेश्वरी अमितकुमार स्वामी आदी शिक्षकांचा सन्मान केला जाणार आहे.
सोहळ्याचे यावर्षीचे हे चौथे वर्ष असून इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन तर्फे घेण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश शिक्षकांचे शैक्षणिक कार्य समाजातील योगदान व विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत असलेले महत्त्व अधोरेखित करणे हा आहे.यावेळी इंग्लिश मीडियम स्कूल्स असोसिएशन कोल्हापूरचे शहराध्यक्ष अमर सरनाईक सचिव सेक्रेटरी नितीन पाटील मुख्य समन्वयक सुहेल बाणदार उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय रंगवलीकार महेश पोतदार यांनी रेखाटली ऑपरेशन सिंदूर या विषयावरील भव्य रांगोळी

0

आंतरराष्ट्रीय रंगवलीकार महेश पोतदार यांनी रेखाटली ऑपरेशन सिंदूर या विषयावरील भव्य रांगोळी

 

कोहापूर/प्रतिनिधी : दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग कोल्हापूर गणेशोत्सव २०२५ निमित्त ऑपरेशन सिंदूर या विषयावरील भव्य रांगोळी प्रदर्शन
१२ फूट आहे ३६ फूट आकारात पहेलगाम येथील भ्याड हल्ल्या चा बदला म्हणून यशस्वी झालेल्या ऑपरेशन सिंदूर या विषयावरील रांगोळी प्रदर्शन शिक्षण समाज बोर्डिंग येथे भरलेले आहे १२ फूट बाय ३६ फूट आकारातील ही रांगोळी प्रदर्शनात पहेलगाम काश्मीर येथे झालेल्या हल्ल्यांतील पर्यटक, त्यांचे कुटुंबियांना झालेले दुःख, भारतीय सैन्य, राफेल विमान ब्रह्मोस अस्त्र रॉकेट्स, यौमिका सिंह ,सोफिया कुरेशी, भारतीय ध्वज ,अशोक चक्र, भारताचा नकाशा या अन्य चित्रांचा यामध्ये समावेश आहे.
१२ फूट बाय ३६ फूट आकारात रेखाटलेली रांगोळी आंतरराष्ट्रीय रंगवलीकार महेश चंद्रकांत पोतदार यांनी रेखाटलेली आहे, यांना सहाय्यक म्हणून जे. डी. मोरे चंद्रालेखा वेल्हाळ यांनी सहकार्य केले,

आंतरराष्ट्रीय रंगवलीकार महेश पोतदार यांनी रेखाटली ऑपरेशन सिंधू या विषयावरील भव्य रांगोळी

0

आंतरराष्ट्रीय रंगवलीकार महेश पोतदार यांनी रेखाटली ऑपरेशन सिंधू या विषयावरील भव्य रांगोळी

 

कोहापूर/प्रतिनिधी : दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग कोल्हापूर गणेशोत्सव २०२५ निमित्त ऑपरेशन सिंधू या विषयावरील भव्य रांगोळी प्रदर्शन
१२ फूट आहे ३६ फूट आकारात पहेलगाम येथील भ्याड हल्ल्या चा बदला म्हणून यशस्वी झालेल्या ऑपरेशन सिंदूर या विषयावरील रांगोळी प्रदर्शन शिक्षण समाज बोर्डिंग येथे भरलेले आहे १२ फूट बाय ३६ फूट आकारातील ही रांगोळी प्रदर्शनात पहेलगाम काश्मीर येथे झालेल्या हल्ल्यांतील पर्यटक, त्यांचे कुटुंबियांना झालेले दुःख, भारतीय सैन्य, राफेल विमान ब्रह्मोस अस्त्र रॉकेट्स, यौमिका सिंह ,सोफिया कुरेशी, भारतीय ध्वज ,अशोक चक्र, भारताचा नकाशा या अन्य चित्रांचा यामध्ये समावेश आहे.
१२ फूट बाय ३६ फूट आकारात रेखाटलेली रांगोळी आंतरराष्ट्रीय रंगवलीकार महेश चंद्रकांत पोतदार यांनी रेखाटलेली आहे, यांना सहाय्यक म्हणून जे. डी. मोरे चंद्रालेखा वेल्हाळ यांनी सहकार्य केले,

गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयात चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते गणेश मूर्ती प्रतिष्ठापना

0

गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयात चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते गणेश मूर्ती प्रतिष्ठापना

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) च्या ताराबाई पार्क कार्यालयात यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. संघाचे चेअरमन मा. नविद मुश्रीफ यांच्या शुभहस्ते श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना पार पडली. प्रतिष्ठापनेनंतर पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा व आरती करून श्रींचे आशीर्वाद घेतले गेले.
यावेळी चेअरमन नविद मुश्रीफ यांनी गोकुळचे दूध उत्पादक, ग्राहक, कर्मचारी, अधिकारी व संघाचे हितचिंतक यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, गोकुळ परिवारातील सर्व घटकांच्या सहकार्यामुळे संस्थेची वाटचाल प्रगतीपथावर आहे. उत्सवाच्या माध्यमातून संघातील सदस्यांमध्ये एकता, स्नेह व उत्साह निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
गोकुळ संघाच्या कार्यालयात गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा दरवर्षीप्रमाणे यंदाही पुढे चालू राहणार असून, ही प्रतिष्ठापना संघाच्या सर्व सदस्यांसाठी श्रद्धा आणि प्रेरणादायी ठरणार आहे. यावेळी संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष गोरे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अशोक पुणेकर, तसेच अशोक पाटील, बाजीराव पाटील, विनोद वानखेडे , सुभाष नाळे, बाळासो वायदंडे, कृष्णात पाटील, प्रथमेश पाटील, नितीन तोडकर, राहुल थोरवडे तसेच गणेशोत्सव समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.

डॉ. संजय पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा मंत्री राणें- सरनाईक यांच्याकडून ‘महाराष्ट्र गौरव’ ने सन्मान

0

डॉ. संजय पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा मंत्री राणें- सरनाईक यांच्याकडून ‘महाराष्ट्र गौरव’ ने सन्मान

नवभारत महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव्हमध्ये गौरव

कोल्हापूर/प्रतिनिधी : उच्चशिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याहस्ते ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘नवभारत’तर्फे आयोजित महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव्हमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील ताज प्रेसिडेंट येथे ‘महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव्ह’ आयोजित करण्यात आली होती. यावेळी ‘नवभारत’चे व्यवस्थापकीय संचालक वैभव माहेश्वरी, डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.या परिषदेत संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र भारतात अग्रस्थानी आहे. मात्र, राज्यातील शिक्षण क्षेत्राचा अजूनही वेगवान विकास होणे गरजेचे आहे. उच्च शिक्षणासाठी भारताबाहेर जाणारे विद्यार्थी राज्यातच शिकतील अशा प्रकारचे शिक्षण राज्यातच उपलब्ध यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यावर आमचा भर राहील. त्याचबरोबर पॉलिसी बेस्ट इंडस्ट्रीलायझेशन करण्यावरही सरकारचा भर राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
विविध क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण कल्पना राबवून त्या कृतीत उतरणारे व त्यायोगे राज्याच्या सर्वांगीण विकासात योगदान देणाऱ्या मान्यवरांना यावेळी ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र आणि उच्च शिक्षणातील अतुलनीय योगदानाबद्दल डॉ. संजय डी. पाटील यांचा यावेळी विशेष पुरस्कार देऊन मंत्री प्रताप सरनाईक व मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर, डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे (कोल्हापूर) आणि डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, आकुर्डी (पुणे) या तीन विद्यापीठांचे कुलपती आणि डी. वाय. पाटील समुहाचे अध्यक्ष म्हणून डॉ. संजय डी. पाटील कार्यरत आहेत. डॉ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली के.जी. ते पी.जी. पर्यंत शिक्षण देणाऱ्या ४८ संस्था ज्ञानदानाचे काम करत आहेत. या संस्थांमध्ये ४३ हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
समूहाच्या विविध संस्थांमार्फत मेडिकल, अभियांत्रिकी, आर्कीटेक्चर, पॉलिटेक्निक, नर्सिंग, फार्मसी, कृषी, कृषी अभियांत्रिकी, व्यवस्थापन, हेल्थ सायन्स, हॉस्पिटलिटी अशा विविध क्षेत्रात उच्च शिक्षण दिले जाते. शिक्षित पिढी घडवून राज्याच्या विकासात दिलेल्या असीम योगदानाबद्दल डॉ. संजय डी. पाटील यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला.

कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘क्यूएस आय-गेज’ संचालकांकडून गौरव

0

कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा
‘क्यूएस आय-गेज’ संचालकांकडून गौरव

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला डायमंड प्रमाणपत्र प्रदान

कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने पहिल्याच प्रयत्नात ‘क्यूएस आय-गेज’ डायमंड श्रेणी प्राप्त केल्याबद्दल ‘क्यूएस आय-गेज’चे व्यवस्थापकीय संचालक रविन नायर व सहाय्यक संचालक सुबिन राज यांनी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांना सन्मानित केले. नायर यांनी विद्यापीठाच्या सर्वोत्तम कामगिरीचा गौरव करत डॉ. पाटील यांच्याकडे ‘क्यूएस आय-गेज’ प्रमाणपत्र प्रदान केले.
कदमवाडी येथील डी. वाय. पाटील कॉलेज सभागृहात हा गौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी बेंगळुरहून ‘क्यूएस आय-गेज’ चे व्यवस्थापकीय संचालक रविन नायर व सहाय्यक संचालक सुबिन राज उपस्थित होते. विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, आय. क्यू. ए. सी. संचालक डॉ. शिंपा शर्मा आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी डॉ. संजय डी. पाटील यांना मानाचा कोल्हापुरी फेटा बांधून विद्यापीठाच्यावतीने कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी सन्मानित केले.रवीन नायर म्हणाले, डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाने पहिल्याच प्रयत्नात ‘क्यूएस आय-गेज’ डायमंड मानांकन मिळवणे हे अतिशय कौतुकास्पद आहे. यामुळे विद्यापीठाची विविध पातळीवर असलेली गुणवत्ता सिद्ध होते. विद्यापीठाना बळकटी देण्यासाठी आमची एजन्सी काम करते. ‘क्यूएस आय-गेज’ संस्था विद्यापीठाकडून देण्यात येणाऱ्या कॉलिटी एज्युकेशनचे परीक्षण करते व विविध निकषांवर मानांकन देते. या मानांकनामुळे जागतिक पातळीवर नवे यश संपादन करण्यासाठी विद्यापिठाच्या प्रयत्नांना गती मिळेल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक्रम सुरू होतील आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कुलगुरू डॉ. शर्मा म्हणाले, कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने प्रगतीचे नव -नवीन टप्पे गाठले आहे. हे मानांकन विद्यापीठाला आणखी वेगाने प्रगती करण्याची प्रेरणा देईल. येत्या काळात विद्यापीठाला नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित प्रयत्न करू.आय क्यू ए.सी. डायरेक्टर डॉ. शिंपा शर्मा यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. त्यांनी ‘क्यूएस आय-गेज’ मानांकन मिळण्यामागील प्रवास विषद करून या प्रवासातील सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. तत्पूर्वी रविन नायर व सुबीन राज यांनी डी वाय पाटील हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, सिम्युलेशन लॅब सह विविध विभागांना भेट दिली. त्यानंतर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून गुणवत्ता हमी व पुढील प्रगतीबद्दल मार्गदर्शन केले.
या गौरव सोहळ्याला डी. वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, अजय डोईजड, सोहन शिरगावकर, ॲड. रवी शिराळकर, सायबर कॉलेजचे डॉ. सर्मा, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, डॉ. आर. बी. नेरली यांच्यासह डी. वाय पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे प्राचार्य, रजिस्ट्रार, विभाग प्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी आदी उपस्थित होते.व डॉ. मान्या मिध्धा व डॉ.ओमसिंग शेखावत यांनी सूत्रसंचालन केले तर आभार डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी मानले.

डीवायपी साळोखेनगर अभियंत्रिकीच्या २० विद्यार्थ्यांची ‘क्यू स्पायडर्स’ मध्ये निवड

0

डीवायपी साळोखेनगर अभियंत्रिकीच्या २० विद्यार्थ्यांची ‘क्यू स्पायडर्स’ मध्ये निवड

साळोखेनगर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग साळोखेनगर येथील २० विद्यार्थ्यांची “क्यू स्पयडर टेस्ट यात्रा सॉफ्टवेअर सोल्यूशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड” या नामवंत बहुराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना ४ लाख ते ६ लाख रुपये वार्षिक पॅकेज ऑफर मिळाली आहे. “क्यू स्पायडर टेस्ट यात्रा सॉफ्टवेअर सोल्यूशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड” ही आयटी क्षेत्रातील प्रतिष्ठित आणि आघाडीची कंपनी आहे. या कंपनीच्यावतीने महाविद्यालयात झालेल्या प्लेसमेंट ड्राइव्हच्या माध्यमातून या सर्व विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.यामध्ये संगणक विभागाच्या १० विद्यार्थ्यांची सॉफ्टवेअर इंजिनीअर पदावर तर डाटा सायनाच्या १० विद्यार्थ्यांची पॉवर बीआयसह डेटा अनालिसिस्ट म्हणून निवड झाली आहे.
यावेळी बोलताना कॅम्पसचे संचालक डॉ. अभिजीत माने म्हणाले, विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून उत्कृष्ट शिक्षणाबरोबरच आणि सॉफ्ट स्किल्स, प्रात्यक्षिक, मुलाखतीचे प्रशिक्षण यावर भर दिला जातो. याचा चांगला फायदा विद्यार्थ्यांना झाला. या मोठ्या कंपनीमध्ये विद्यार्थ्यांची झालेली निवड संस्थेसाठी व विद्यार्थ्यांसाठी गौरवाची बाब आहे. प्राचार्य डॉ. सुरेश माने म्हणाले, विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सातत्याने करिअर विषयक मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी आणि ध्येय निश्चित करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असले पाहिजे.
यशस्वी निवदिसती कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने, प्राचार्य डॉ. सुरेश माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील, कॉम्प्युटर विभाग प्रमुख डॉ. शिवानी काळे, डाटा सायन्स विभाग प्रमुख रोहीत राऊत, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. प्रीती भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

डीवायपी साळोखेनगर अभियंत्रिकीच्या २० विद्यार्थ्यांची ‘क्यू स्पायडर्स’ मध्ये निवड

0

डीवायपी साळोखेनगर अभियंत्रिकीच्या २० विद्यार्थ्यांची ‘क्यू स्पायडर्स’ मध्ये निवड

साळोखेनगर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग साळोखेनगर येथील २० विद्यार्थ्यांची “क्यू स्पयडर टेस्ट यात्रा सॉफ्टवेअर सोल्यूशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड” या नामवंत बहुराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना ४ लाख ते ६ लाख रुपये वार्षिक पॅकेज ऑफर मिळाली आहे. “क्यू स्पायडर टेस्ट यात्रा सॉफ्टवेअर सोल्यूशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड” ही आयटी क्षेत्रातील प्रतिष्ठित आणि आघाडीची कंपनी आहे. या कंपनीच्यावतीने महाविद्यालयात झालेल्या प्लेसमेंट ड्राइव्हच्या माध्यमातून या सर्व विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.यामध्ये संगणक विभागाच्या १० विद्यार्थ्यांची सॉफ्टवेअर इंजिनीअर पदावर तर डाटा सायनाच्या १० विद्यार्थ्यांची पॉवर बीआयसह डेटा अनालिसिस्ट म्हणून निवड झाली आहे.
यावेळी बोलताना कॅम्पसचे संचालक डॉ. अभिजीत माने म्हणाले, विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून उत्कृष्ट शिक्षणाबरोबरच आणि सॉफ्ट स्किल्स, प्रात्यक्षिक, मुलाखतीचे प्रशिक्षण यावर भर दिला जातो. याचा चांगला फायदा विद्यार्थ्यांना झाला. या मोठ्या कंपनीमध्ये विद्यार्थ्यांची झालेली निवड संस्थेसाठी व विद्यार्थ्यांसाठी गौरवाची बाब आहे. प्राचार्य डॉ. सुरेश माने म्हणाले, विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सातत्याने करिअर विषयक मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी आणि ध्येय निश्चित करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असले पाहिजे.
यशस्वी निवदिसती कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने, प्राचार्य डॉ. सुरेश माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील, कॉम्प्युटर विभाग प्रमुख डॉ. शिवानी काळे, डाटा सायन्स विभाग प्रमुख रोहीत राऊत, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. प्रीती भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

महायुती म्हणून आपापल्या लक्ष्मणरेषा आखुया मंत्री हसन मुश्रीफ यांचे वक्तव्य

0

महायुती म्हणून आपापल्या लक्ष्मणरेषा आखुया मंत्री हसन मुश्रीफ यांचे वक्तव्य

कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत मंत्री हसन मुश्रीफ यांची विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे

कोल्हापूर/प्रतिनिधी : दहीहंडीच्या कार्यक्रमात माजी खासदार धनंजय महाडिक म्हणालेत की, बरं झालं मंत्री हसन मुश्रीफ यांना चार वर्षांनी गोकुळ दूध संघामध्ये वासाचे दूध दिसलं. त्यानंतर लगेचच तुम्ही आलात. हे टायमिंग साधून आलात की काय? या प्रश्नावर वासाचे दुधाबाबत मंत्री मुश्रीफ म्हणाले, त्यादिवशी खासदार श्री महाडिक यांचे भाषण झाल्यानंतर मी वेळाने आलो दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये मला त्यांचे ते वक्तव्य समजलं. आता गोकुळ दूध संघामध्ये महायुतीचा अध्यक्ष झाला आहे, हे सर्वश्रुत आहे. वासाच्या दुधाबद्दल बामणीच्या कागल तालुका संपर्क मेळाव्यात मी असं म्हणालो होतो की, वासाच्या दुधाबाबत दूध उत्पादकांच्या मनातील शंकांचे निरसन झाले पाहिजे. यामध्ये उत्पादक म्हणतात की, आमचे दूध आम्हाला परत द्या. संघाचे म्हणणे असे आहे की, कायद्याप्रमाणे एकदा दूध घेतले की ते परत देता येत नाही, ते वासाचे निघाल्यास नाश केले पाहिजे. वासाच्या दुधाचे दर संघाने दुप्पट केलेले आहेत. त्यांना मी अशा सूचना दिल्या आहेत की, याबाबतचे तंत्रज्ञान आता प्रगत झाले आहे. दुधात नेमके संस्थेकडून साखर, प्रोटीन, युरिया, पाणी असे पदार्थ मिसळले जातात की, सभासदाकडूनच खराब दूध घातले जाते याची माहिती घेणे गरजेचे आहे यासाठी आता नव्याने विकसित झालेल्या टेक्नॉलॉजीचा आधार घेणे गरजेचे आहे. जेणेकरून सभासदांच्या मनातील शंका दूर होतील.असे मंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापूर मध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे.
सीपीआर औषध व यंत्रसामुग्री खरेदीतील आरोपीसमवेत सी. पी. आर. चे अधिष्ठाता डॉ. एस एस मोरे चहा पीत बसले होते. याबद्दल काय कारवाई करणार….?
या प्रश्नावर मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, हे प्रकरण सन २०२२- २३ सालातील आहे. त्यावेळी जिल्हा नियोजन मंडळातून सर्जिकल साहित्य खरेदीसाठी दहा कोटी रुपये सी. पी. आर. ला दिले होते व सन २०२२- २३ मध्येच बोगस दरपत्रक सादर करून ही खरेदी झाली होती. त्या पहिल्या चौकशीत कंपनीला ब्लॅकलिस्ट करून फौजदारी दाखल केली आणि दुसऱ्या चौकशीतही तेच झाले. यामध्ये ज्या जबाबदाऱ्या शासनाच्या होत्या, त्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. आता पोलिसांची जबाबदारी आहे की, पुढील कारवाई करण्याची. दरम्यान; विद्यमान अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे हे फेब्रुवारी 2024 मध्ये रुजू झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नाही. त्यांच्या हातात काहीही नाही. त्यांनी एखाद्याला वाचवतो म्हटले तरी ते शक्य नाही. कारण; शासनाने याआधीच चौकशी करून त्याचा अहवालही प्राप्त झालेला आहे.
गोकुळ दूध संघाच्या टेस्ट ऑडिटच्या संदर्भात उच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. तसेच; गोकुळ दूध संघाच्या जागम आणि घड्याळ खरेदी बाबत. तसेच; संचालक मंडळाच्या गोवा सहलीबाबतही जोरदार चर्चा आहेत.या प्रश्नावर मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, टेस्ट ऑडिटमध्ये काहीही निष्पन्न झाली नाही. जे सर्किट बँक पुढे गेलेले त्यांना याची कल्पना नसावी कदाचित. ज्यावेळी नोटीस मिळेल त्यावेळी संघ याचे उत्तर देईल. संघाची संचालक गोवा सहलीला स्वखर्चाने गेले होते. पुढच्या महिन्यात आम्ही केडीसीसी बँकेचे संचालक मंडळ स्वखर्चाने परदेश दौऱ्यावर जात आहोत. याची कोणीही चौकशी करावी. तसेच गोकुळ दूध संघाची जाजम खरेदी योग्य प्रकारे केली असल्याचे संघाने स्पष्टीकरण केल्याचेही त्यांनी सांगितले. गोकुळ दूध संघ कोल्हापूर जिल्ह्याचे वैभव आहे. तो राज्यातील ब्रँड बनत आहे. त्याला कोणी अपशकुन करू नये.
गोकुळ दूध संघात संचालिका सौ. शौमिका महाडिक गेली चार वर्षे विरोधात होत्या. आपण अशी अपेक्षा व्यक्त केली की, या वेळेला त्या घोषणा देणार नाहीत, फलक घेऊन येणार नाहीत आणि व्यासपीठावर येतील. त्याचवेळी त्या म्हणाल्या आहेत की, अजून आपल्याला उत्तर मिळालेली नाहीत त्यामुळे मी ठरवीन.या प्रश्नावर मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, महायुतीचा अध्यक्ष झाल्यानंतर आपण स्वतःला काहीतरी आचारसंहिता घालून घेतली पाहिजे. अन्यथा; विनाकारण मतभेद तयार होतील. आता त्यांच्या मनात काय शंका आहेत. आमच्या मनात काय शंका होत्या, हेच जर बोलत बसलो तर मतभेद वाढतच राहतील. अर्थात; त्यांच्या मनातील शंका, प्रश्न निरसन करण्याची जबाबदारी अध्यक्ष, संचालक मंडळ व अधिकाऱ्यांची आहे. ते त्या दूर करतील. महायुती म्हणून आपण सर्व मतभेद बाजूला ठेवून लक्ष्मणरेषा घालून घ्यायला हवी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके आणि आपण होतो. यावेळी चेअरमन निवडीचा निर्णय झाला आहे. त्याचवेळी मी सांगितले होते की, तीन-चार तालुक्यातील जागा रिक्त आहेत, त्या कायद्याप्रमाणे वाढविता येतात. त्या वाढविल्या पाहिजेत. गेल्यावेळची निवडणूक आणि येणारी निवडणूक यामध्ये फार मोठा फरक आहे. त्या निवडणुकीत साडेतीन हजार सभासद होते, या निवडणुकीत साडेपाच हजार सभासद आहेत. एकूणच ही निवडणूक संस्था सभासदांच्या हातामध्ये गेलेली आहे. त्यामुळे महायुती म्हणून सुद्धा व्यवस्थितपणे आपण निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे.
महायुती म्हणून काम करीत असताना सर्वांनीच एक लक्ष्मण रेखा आखून घेतली पाहिजे. संयमाने घेतले पाहिजे. नाहीतर महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकल्यासारखे होईल, असे सूचक वक्तव्य श्री. मुश्रीफ यांनी केले.
राहुल पाटील व राजेश पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला. आता हातकणंगले तालुक्यातील काँग्रेसचा एक नेता राष्ट्रवादीमध्ये येणार असल्याचे चर्चा आहेत.या प्रश्नावर मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, दिवंगत आमदार कै. पी. एन. पाटील यांचा फार मोठा गट करवीर तालुक्यामध्ये आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांची दोन्हीही मुले राहुल पाटील आणि राजेश पाटील यांनी सर्वच कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. हातकणंगले हा एक मोठा तालुका आहे. तिथून पक्षात कोणी येणार असेल तर त्यांचे स्वागतच करू. त्यांची इच्छा असेल तर अजितदादा पवार यांनाही आणू.
गोकुळ दूध संघाच्या कारभाराबाबत विचारले असता ते म्हणाले, कारभारामध्ये निश्चितच सुधारणा झाली आहे. आम्ही दोन रुपये दूध दरवाढ देण्याचे आश्वासन दिले होते. त्यापोटी म्हशीच्या दुधाला लिटरला १२ रुपये आणि गाईच्या दुधाला लिटरला सहा रुपये दूध दरवाढ दिली. संघाला मुंबईमध्ये जागा घेतली, विजेचा प्रकल्प उभारला. असे असले तरी मी असं म्हणणार नाही की, सगळं १०० टक्के दुरुस्त झाले आहे. काही प्रमाणात लोकांच्या तक्रारी शंका आहेत. परंतु; ९० टक्के तरी दुरुस्ती झालेली आहे.

जरांगे- पाटील यांना विनंती.

मराठा आरक्षणाबाबत नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष श्री. विखे – पाटील व सदस उदय सामंत हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या मनातील शंका निश्चितपणे दूर केल्या जातील. तसेच; सध्या गणेशोत्सवाचा आणि सणासुदीचा काळ आहे. त्यामुळे, श्री. जरांगे- पाटील हे सुद्धा समजून घेतील. माझीही त्यांना विनंती आहे की, गणेशोत्सवाचा आणि सणावारांचा काळ आहे. त्यांनीही संयम राखावा. शासन मराठा आरक्षणाबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. तुम्ही आता महायुतीमध्ये आहात. मग नेमकं विरोधक कोण आहे? या प्रश्नावर मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत. विरोधक कोण आहेत, हे तुम्हालाही माहित आहे. आज त्यांचे नाव घेण्याची गरज नाही.
तुमच्यात व आमदार सतेज पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असल्याचे विचारले असता ते म्हणाले, असे शाब्दिक युद्ध वगैरे काहीही नाही. राहुल पाटील व राजेश पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या निर्णयानंतर आमदार श्री. पाटील यांनी त्यांना डिवचणारी वक्तव्य केली. त्यानंतर मी फक्त त्यांना एवढाच सल्ला दिला की, इतकं हळवं होण्याची गरज नाही.

दररोज पाणी मिळणे हा हक्कच

कोल्हापूर शहराच्या पाणी टंचाईकडे लक्ष वेधले असता श्री. मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूरवासीयांना चार चार दिवस पाणी न मिळणे ही दुर्देवीच बाब आहे. काळम्मावाडी थेट पाईप लाईनमध्ये असणाऱ्या ञुटी दुर करुन शाश्वत पाणी पुरवठा कसा होईल.याकडे लक्ष देण्याच्या सुचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. यासाठी कितीही लागेल तो निधी उपलब्ध करु असे आश्वासनही त्यांनी दिले असल्याचे मंञी मुश्रीफ यांनी सांगितले.