सर्वसामान्य जनतेचा, युवकांचा हक्काचा आमदार राजुबाबा
जनतेचे प्रश्न,समस्या असोत अथवा विद्यार्थ्यांच्या समस्या असोत त्यांच्या मदतीला धाऊन जाणारा,समस्या सोडविणारा आमदार म्हणून आमदार राजूबाबा आवळे यांची ओळख आहे.एखादे काम घेवून लोकप्रतिनिधींकडे गेले की त्यांना द्यावा लागणार रिस्पेक्ट, प्रोटोकॉल यामुळेच २०१९ च्या निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात जरा वेगळा निर्णय घेतला गेला व काँग्रेसच्या राजूबाबा आवळे यांना आमदार म्हणून संधी देण्यात आली. आज पाच वर्षानंतर त्यावेळी घेतलेला निर्णय योग्यच होता याची खातरजमा झाली आहे. सर्वसामान्य जनतेचा, युवकांचा हक्काचा आमदार म्हणून राजूबाबा आवळे यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. आमदारांना कधीही फोन करा, कधीही बिनधास्त भेटायला जावा, आपल्या मित्राप्रमाणे त्यांच्याशी संवाद साधा. जनता आणि आमदार यांच्यामध्ये कोणताही आडपडदा न ठेवता सर्वसामान्यांचा नेता म्हणून राजूबाबा आज मतदारसंघात प्रसिद्ध आहेत.आमदार असावा तर असा अशी बहुतांश जनतेची भावना आहे.
पाच वर्षातील राजूबाबांची कामगिरी समाधानकारक अशीच आहे. आमदार झाल्याबरोबर आलेले कोरोनाचे मोठे संकट असो की महापुराचा फटका प्रत्येकवेळी राजूबाबा सर्वांसोबत कामाला पुढे राहिले आहेत. कोरोना काळात जेव्हा इतर लोकप्रतिनिधी बाहेर पडण्यास टाळाटाळ करत होते तेव्हा राजूबाबा तत्कालिन पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत रुग्णालय, कोरोना सेंटर, तात्पुरते निवारा केंद्रांना भेट देत होते. कोरोना काळात त्यांच्या दररोजच्या धावपळीमुळे त्यांना कोरोनाची लागण झाली, अतिदक्षता विभागात ठेवण्याची वेळ आली. तरी देखील बाबांनी आपल्या कामाची पद्धत काही सोडली नाही. कोरोनातून बरे होताच पुन्हा मतदारसंघात त्यांनी ठिकठिकाणी भेटी देवून काम केले. आमदार फंडातून ५० लाखांपेक्षा जास्त फंड वैद्यकीय साहित्य खरेदीला दिला. असे काम करणारे ते राज्यातील पहिले आमदार ठरले आहेत.
विकासकामाच्या पातळीवर तर राजूबाबा गेल्या चार वर्षापासून जिल्ह्यात सर्वाधिक विकासनिधी खर्च करणारे आमदार ठरले आहेत. वडगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी पहिला निधी देत सुरू केलेली विकासकामांची घौडदोड आजही कायम आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना राजूबाबा आवळे यांनी मतदारसंघात अनेक गावात कोट्यावधी रुपयांची कामे केली आहेत. गावातील गटतट न पाहता त्यांनी सढळ हस्ते निधी दिला. किणी येथील ग्रामीण रुग्णालय, वडगाव, वाठार बसस्थानकाला निधी, ४८ गावांमध्ये जलजीवनच्या कामांना मंजुरी, अमृतनगर हातकणगले रस्ता, हुपरी परिसरातील रस्ते अशी त्याची उल्लेखनीय कामे आहेत. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर कामाचा वेग थोडा कमी झाला, मात्र आमदार निधीतून त्यांना अनेक गावांमध्ये कामे सुरूच ठेवली आहेत.
वादळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देणे असो किंवा महामार्गाच्या कामाचा प्रश्न मांडणे असो, विधानसभेत स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना त्यांनी वडगाव नगरपालिकेच्या इमारतीसाठी निधी देखील आणला. मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात तापलेला असताना त्यांनी आरक्षित मतदारसंघातील आमदार असताना देखील मराठा समाजाच्या मागणीला पाठिंबा दिला. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली.
मतदारसंघातील कोणत्याही गट, तट, सर्वच जाती धर्मातील व्यक्ती, युवक हक्काने राजूबाबा यांच्याकडे जावू शकतो. तसेच तो अगदी अधिकारवाणीने तो आपली कामे सांगू शकतो. राजूबाबा आवळे म्हणजे आपला हक्काचा आमदार अशी युवकांची भावना असल्याने त्याच्या मध्ये नेते कार्यकर्ते असे संबंध नाहीत. तर एखाद्या मित्राप्रमाणे त्यांचे तरुण कार्यकर्त्यांसोबत संबंध आहेत. ज्येष्ठ कार्यकर्त्यांना आदर व तरुण कार्यकर्त्यांना सोबत मान देण्याची औदार्य राजूबाबा यांच्याकडेच आहे. अशा आपल्या हक्काच्या आमदाराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आगामी विधानसभेत त्यांना मोठा विजय मिळो आणि मतदारसंघाला पुन्हा लालदिवा मिळो हीच सदिच्छा.
मुकुंद पाटील.
टोप.