Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

भाजप सांस्कृतिक आघाडीतर्फे आज ‘स्वर आशा’ गीत मैफिलीचे आयोजन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कोल्हापूरच्या शिवाय महेशवर शितोळे यास आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

भाई माधवराव बागल पुरस्कार डॉ. विजय चोरमारे यांना जाहीर

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

आरोग्य व्यवस्थेमध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्वाची – सौ.हसमत हवेरी

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

साईजीवन ऑइल शुद्धतेची हमी आरोग्याची नवी दिशा – उत्तम जाधव

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

विविध विकास प्रकल्पांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावा

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

अमृत १ व अमृत २ पाणीपुरवठा व मलनिस्सारण कामांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

उद्या गुरुवारी जीवन प्राधिकरण वर घागर मोर्चा १३ गावांचा पाण्यासाठी एल्गार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

टाटा मेमोरियल रुग्णालयात अत्याधुनिक निदान सुविधांना बळकटी देण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

My Marathi महाराष्ट्र माय मराठी

गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसात पूर्ण करा,सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

विनायक भोसले यांचा ‘लायन्स गौरव’ पुरस्काराने सन्मान

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कोल्हापूर शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा : ३० एप्रिलपासून होणार अंमलबजावणी

Tile List

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

शहर स्वच्छतेत सुधारणा न झाल्यास कारवाई : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

शहर स्वच्छतेत सुधारणा न झाल्यास कारवाई : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड   कोल्हापूर/प्रतिनिधी : शहरातील स्वच्छतेच्या कामकाजात कसूर झाल्यास संबंधित आरोग्य निरीक्षक व मुकादमांवर कारवाई…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कोल्हापूरात विनापरवाना बांधकामावर महापालिकेची कारवाई ; तळघरातील बाथरूम, टॉयलेट्स हटवले

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कृषी पणन मंडळामार्फत कोल्हापूर शहरात मिलेट व फळ महोत्सव २०२६ चे आयोजन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

देशातील पहिले निसर्गोपचार व योगा महाविद्यालय व रुग्णालय म्हणून उत्तूरचे नाव निरंतर राहील : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

Tile Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डॉ. शिवशंकर मारजक्के यांच्या नेतृत्वाखाली सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय ब्रेन बायपास कार्यशाळा संपन्न

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

ब्राह्मण सभा करवीर यांच्यातर्फे श्री राम कथा आणि श्री राम यज्ञाचे आयोजन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी जल्लोषात साजरा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कंत्राटदारांच्या  मागण्या व समस्या सोडवण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय कंत्राटदार यांचे राज्यस्तरीय महाअधिवेशन १४ जून रोजी कोल्हापूरमध्ये

List Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा   कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना भूमीहीन करुण त्यांना देशोधडीला लावणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कोल्हापूरला मेट्रो सिटी केल्यास कोल्हापूर जिल्ह्याचा  शहराचा दर्जा क वर्गातून अ अथवा ब वर्गात होईल राजू माने यांची आंदोलनाद्वारे मागणी

कोल्हापूरला मेट्रो सिटी केल्यास कोल्हापूर जिल्ह्याचा  शहराचा दर्जा क वर्गातून अ अथवा ब वर्गात होईल राजू माने यांची आंदोलनाद्वारे मागणी…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डीवायपी पॉलिटेक्निकच्या योगेश घुलेची ‘गुगल स्टुडन्ट अँबेसिडर ‘ म्हणून निवड

डीवायपी पॉलिटेक्निकच्या योगेश घुलेची 'गुगल स्टुडन्ट अँबेसिडर ' म्हणून निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकचा विद्यार्थी…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

भाजप सांस्कृतिक आघाडीतर्फे आज ‘स्वर आशा’ गीत मैफिलीचे आयोजन

भाजप सांस्कृतिक आघाडीतर्फे आज 'स्वर आशा' गीत मैफिलीचे आयोजन आशा भोसले यांना आदरांजली कोल्हापूरकरांना संगीताचा अनुभव घेण्याचे आवाहन कोल्हापूर/प्रतिनिधी :.भारतीय…

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

विविध विकास प्रकल्पांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

अमृत १ व अमृत २ पाणीपुरवठा व मलनिस्सारण कामांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

उद्या गुरुवारी जीवन प्राधिकरण वर घागर मोर्चा १३ गावांचा पाण्यासाठी एल्गार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

टाटा मेमोरियल रुग्णालयात अत्याधुनिक निदान सुविधांना बळकटी देण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

My Marathi महाराष्ट्र माय मराठी

गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसात पूर्ण करा,सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

विनायक भोसले यांचा ‘लायन्स गौरव’ पुरस्काराने सन्मान

My Marathi देश पुणे प्रीमियम महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कोल्हापूर जिल्ह्यातील चार सुसज्ज बसस्थानकांचे लोकार्पण

शासन राज्यभरात सुमारे ३ हजार ‘मार्गस्थ निवारे’ उभारणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कोल्हापूर जिल्ह्यातील चार सुसज्ज बसस्थानकांचे लोकार्पण कोल्हापूर…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

प्रभाग समिती सभापतीपदी वैभव कुंभार, अनुराधा खेडकर, संजय मोहिते, विशाल चव्हाण यांची बिनविरोध निवड

प्रभाग समिती सभापतीपदी वैभव कुंभार, अनुराधा खेडकर, संजय मोहिते, विशाल चव्हाण यांची बिनविरोध निवड   कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा जोतीराव फुले

सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा जोतीराव फुले   भारताच्या सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एका महापुरुषाच्या जन्माचा दिवस…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन कागलमधील गैबी चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण कागल/प्रतिनिधी : महात्मा…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

घोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यश

घोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यश   अतिग्रे: मुंबई सायन्स टिचर्स असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

संघटन सृजन अभियाना अंतर्गत काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात १३ एप्रिल ते १८ एप्रिल कालावधीत आढावा बैठका होणार

संघटन सृजन अभियाना अंतर्गत काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात १३ एप्रिल ते १८ एप्रिल कालावधीत आढावा बैठका होणार नवीन पदाधिकारी नेमणुकी संदर्भात काँग्रेस…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

सतेज पाटील यांचा उद्याचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा होणार,कार्यकर्त्यांकडून दहा लाख वह्या संकलनाचे उदिष्ट्य

सतेज पाटील यांचा उद्याचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा होणार,कार्यकर्त्यांकडून दहा लाख वह्या संकलनाचे उदिष्ट्य कोल्हापूर/प्रतिनिधी : काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

सी.पी.आर मध्ये बालरोगशास्त्र विभागात GBS झालेल्या रुग्णास जीवदान

सी.पी.आर मध्ये बालरोगशास्त्र विभागात GBS झालेल्या रुग्णास जीवदान कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे…

My Marathi माय मराठी

नुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी पदभार स्वीकारला

नुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी पदभार स्वीकारला   कोल्हापूर/प्रतिनिधी : डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा…

My Marathi

महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम’ (MRDP) राबविण्यास मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागर

‘महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम’ (MRDP) राबविण्यास मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागर आपत्ती व्यवस्थापनास बळकटी देण्याकरिता विविध उपाययोजना राबविण्यात…

कोल्हापूर जिल्ह्यातील चार सुसज्ज बसस्थानकांचे लोकार्पण

शासन राज्यभरात सुमारे ३ हजार ‘मार्गस्थ निवारे’ उभारणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

कोल्हापूर जिल्ह्यातील चार सुसज्ज बसस्थानकांचे लोकार्पण

कोल्हापूर विभागाला १२० नवीन बसेसची घोषणा

कोल्हापूर विभागात गेल्या दोन वर्षांत २३ पैकी १७ बस स्थानकांचे नूतनीकरण पूर्ण, उर्वरीत स्थानकांना मंजुरी

कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्यभरात सुमारे ३ हजार ‘मार्गस्थ निवारे’ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प शासनाने केला असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील संभाजीनगर, पेठवडगाव, वाठार आणि जयसिंगपूर येथील नूतनीकरण व विस्तारित बसस्थानकांचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ऊन, वारा, पाऊस सहन करत एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांसाठी हे निवारे म्हणजे जणू आधारवड ठरणार आहेत. हे निवारे केवळ उभे राहणार नाहीत, तर ते २४ तास देखभालीखाली, सुसज्ज आणि सजीव असतील. त्याठिकाणी छोटेखानी कॅन्टीनची सुविधा असेल. त्यामुळे महिला बचत गट आणि तरुणांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील.
आज झालेल्या उद्घाटन प्रसंगी ठिकठिकाणी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यात पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, राज्य परिवहन महामंडळाच्या (पुणे प्रदेश) प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, विभागीय वाहतूक परिवहन अधिकारी अनिल मेहत्तर, कोल्हापूर आरटीओ संजीव भोर, कार्यकारी अभियंता पुणे प्रदेश नागेश कुलकर्णी, विभाग नियंत्रक कोल्हापूर अभय देशमुख, विभागीय अभियंता कोल्हापूर सुरेश मोहिते यांच्यासह स्थानिक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना त्यांनी कोल्हापूर विभागासाठी १२० नवीन बसेस देण्याची घोषणा केली. यासह शासन आणि खाजगी संस्था यांनी एकत्र येऊन (PPP तत्त्वावर) जिल्ह्यातील सहा बसस्थानकांचा विकास केला जाणार आहे. जयसिंगपूर बसस्थानकाच्या पुढील विस्तारीकरणासाठी प्रवाशांच्या सोयीकरिता याच आर्थिक वर्षात निधी उपलब्ध करून देण्याचेही जाहीर केले.कोल्हापूर विभागात एकूण २३ बस स्थानके आहेत आणि त्यापैकी तब्बल १७ बस स्थानकांचे नूतनीकरण गेल्या दोन वर्षांत पूर्ण झाले. उर्वरित स्थानकांच्या आधुनिकीकरणालाही मंजुरी देण्यात आली आहे. भविष्यात सर्व बसस्थानके नव्याने उभारलेला, अत्याधुनिक कोल्हापूर हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरणार आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

पीपीपी मॉडेल कोल्हापूरमध्ये मध्यवर्ती बसस्थानकावर राबवावे- पालकमंत्री प्रकाश आबिटकर

जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी परिवहन मंत्र्यांच्या कार्यकाळात या विभागासाठी चांगले काम झाल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिक, महिलांना मोफत प्रवास हा चांगला निर्णय असल्याचे सांगितले. कर्मचारी, प्रवासी यांच्याबाबत चांगले निर्णय घेतले. त्यातून राज्यात एसटी फायद्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले. आता पीपीपी मॉडेल कोल्हापूरमध्ये मध्यवर्ती बसस्थानकावर राबवून बदल व्हावा, जिल्ह्याला नवीन गाड्या वाढवून मिळाव्यात, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे प्रश्न सुटावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. तर आमदार चंद्रदीप नरके यांनी ७ एकर जागेत असणाऱ्या संभाजीनगर बस स्थानकावर ११७ बसेस ये-जा करतात त्यामुळे या ठिकाणी अधिक महत्व प्राप्त झाले असल्याचे सांगितले.

संभाजीनगर येथील बसस्थानकाचे उपकामासह नवीन बांधकाम अत्याधुनिक संकल्पनेतून पूर्ण

या प्रकल्पास २३ डिसेंबर २०२० रोजी ९ कोटी ८० लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली होती, तर प्रत्यक्ष निविदा रक्कम ७ कोटी २० लाख इतकी आहे. एकूण २८,३०० चौ.मी. जागेपैकी १८१३ चौ.मी. क्षेत्रफळावर हे भव्य बसस्थानक साकारण्यात आले असून, प्रवाशांच्या सुलभतेसाठी येथे एकूण ११ फलाटांची सोय करण्यात आली आहे.या नूतन बसस्थानकामध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी विविध विभागांची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये वाहतूक नियंत्रण कक्ष, प्रशस्त प्रवासी प्रतीक्षालाय, स्थानक प्रमुख कार्यालय, पास व आरक्षण कक्ष आणि ४ दुकान गाळ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, मातांसाठी हिरकणी कक्ष आणि गरजूंसाठी स्वस्त दरात औषधे मिळण्यासाठी जनऔषधी केंद्राचीही तरतूद करण्यात आली आहे. त्यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलीस चौकी, उपाहारगृह, पार्सल कार्यालय आणि पिण्याच्या पाण्याची दर्जेदार व्यवस्था येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वाठार आणि पेठवडगाव येथे उत्साहात स्वागत

वाठार बसस्थानक येथे प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर यांनी मंत्री सरनाईक यांचे स्वागत केले. यावेळी आमदार अशोकराव माने, जिल्हा परिषद सभापती शितल यादव, सरपंच सचिन कांबळे यांच्या उपस्थितीत फीत कापून व कोनशिलेचे अनावरण करून बसस्थानकाचे उद्घाटन करण्यात आले. वाठार येथे ४ फलाट आणि ४०५ चौ.मी. क्षेत्रफळाचे आधुनिक केंद्र उभारण्यात आले आहे. त्यानंतर पेठवडगाव बसस्थानकावर नगराध्यक्ष विद्याताई पोळ यांनी मंत्र्यांचे स्वागत केले. १.४४ कोटी रुपये खर्चून साकारलेल्या या स्थानकात ५ सुसज्ज फलाट आणि ४७९ चौ.मी.चे प्रशस्त बांधकाम करण्यात आले असून, यामुळे स्थानिक प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.

जयसिंगपूर बसस्थानकासाठी अतिरिक्त निधीची घोषणा

जयसिंगपूर बसस्थानकाचे उद्घाटन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी आमदार यड्रावकर यांनी मंत्र्यांचे स्वागत केले. नागरिकांशी संवाद साधताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, या भागात विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. जयसिंगपूर बसस्थानकाच्या विस्तारीकरणाची मागणी लक्षात घेता, त्यांनी अतिरिक्त दोन मजल्यांच्या कामाला मंजुरी दिली. तसेच याच वर्षी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल असे आश्वासन दिले. जयसिंगपूरच्या दुसऱ्या टप्प्यातील कामात आता एकूण ८ फलाट, १७ दुकान गाळे आणि पोलीस चौकी अशी अद्ययावत व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य शासन भविष्यातील गरजा ओळखून सर्वच बसस्थानकांचे आधुनिकीकरण करत असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.या कार्यक्रमाला आमदार अशोकराव माने, नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, माजी आमदार उल्हास दादा पाटील, जिल्हा परिषद सभापती श्रद्धाताई गायकवाड यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रभाग समिती सभापतीपदी वैभव कुंभार, अनुराधा खेडकर, संजय मोहिते, विशाल चव्हाण यांची बिनविरोध निवड

प्रभाग समिती सभापतीपदी वैभव कुंभार, अनुराधा खेडकर, संजय मोहिते, विशाल चव्हाण यांची बिनविरोध निवड

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक १ ते ४ च्या सभापतीपदी अनुक्रमे वैभव अविनाश कुंभार, अनुराधा सचिन खेडकर, संजय मोहिते व विशाल शिवाजी चव्हाण यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. प्रभाग समिती क्रमांक १ गांधी मैदान, क्रमांक २ छत्रपती शिवाजी मार्केट, क्रमांक ३ राजारामपुरी जगदाळे हॉल आणि क्रमांक ४ छ. ताराराणी मार्केट या विभागीय कार्यालयांसाठी सभापती पदाकरिता प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता.
बैठकीच्या प्रारंभी विभागीय कार्यालयनिहाय सभा अध्यक्षांनी अर्जांची छाननी करून सर्व अर्ज वैध असल्याचे घोषित केले. त्यानंतर माघारीसाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला. मात्र, एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने सर्व चारही उमेदवारांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
निवडीनंतर उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, महापौर सौ. रुपाराणी निकम, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. कौसर बागवान, उपसभापती सौ. दिपा ठाणेकर, गटनेते मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते शारंगधर देशमुख, आदील फरास, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, नगरसचिव सुनिल बिद्रे तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविकांनी नवनिर्वाचित सभापतींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा जोतीराव फुले

सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा जोतीराव फुले

 

भारताच्या सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एका महापुरुषाच्या जन्माचा दिवस नाही, तर समता, शिक्षण आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरूवात करणारा दिवस आहे.महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांच्या जन्मामुळे भारतीय समाजव्यवस्थेला नवी दिशा मिळाली. सन १८२७ मध्ये जन्मलेल्या या युगपुरुषाच्या विचारांचा प्रकाश आजही समाजाच्या प्रत्येक स्तरावर जाणवतो. ११ एप्रिल पासून महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात द्विशताब्दी जयंती समिती स्थापन केली आहे.समाजातील समता, शिक्षण, स्त्री-सक्षमीकरणांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा राज्य सरकारने संकल्प केला आहे.त्यामुळे ११ एप्रिलचा दिवस भारताच्या सामाजिक समतेच्या तेजस्वी द्विशताब्दी पर्वाचा दिवस म्हणूनही देशात साजरा होत आहे.त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याचा पुनर्विचार करणे म्हणजे केवळ इतिहासाचे स्मरण नसून वर्तमानाला दिशा देण्याचे कार्य आहे.

मानवतेचा धर्म : समतेचा मूलाधार

महात्मा फुले यांच्या विचारविश्वाचा केंद्रबिंदू म्हणजे “मानव हा सर्वात मोठा धर्म आहे” ही भूमिका. त्यांनी धर्म, जात, पंथ यापलीकडे जाऊन माणुसकीचा विचार मांडला. त्यांच्या लेखनात आणि कृतीतून सतत दिसून येते की, समाजातील अन्याय आणि विषमता दूर केल्याशिवाय खरी प्रगती होऊ शकत नाही. त्यांनी मांडलेली समतेची संकल्पना ही केवळ तात्त्विक नव्हती, तर ती प्रत्यक्ष कृतीतून साकारलेली होती.

शिक्षणाची ज्योत : अज्ञानातून मुक्तीचा मार्ग

महात्मा फुले यांनी घेतलेला सर्वात क्रांतिकारी निर्णय म्हणजे शिक्षणाचा प्रसार. त्यांनी प्रथम स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केले आणि त्यानंतर १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. सावित्रीबाईंनीही समाजाच्या विरोधाला न जुमानता स्वतःला शिक्षणासाठी वाहून घेतले. शेण गोट्याचा मार सहन करत सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. जोतीबा आणि सावित्री या दांपत्याच्या त्या काळातील सामाजिक बंडामुळे शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली.त्या काळात स्त्रीशिक्षणाला तीव्र विरोध असतानाही त्यांनी मागे हटणे स्वीकारले नाही. शिक्षण हेच शोषणाविरुद्धचे सर्वात प्रभावी शस्त्र आहे, ही त्यांची धारणा होती. या कार्यातून त्यांनी समाजातील अज्ञानाची बेडी तोडण्याचा प्रयत्न केला.अविद्या हेच शोषणाचे मुख्य कारण आहे हे सांगताना त्यांनी समाजाला याबाबतचा कठोर संदेश दिला…

विद्येविना मती गेली
मतीविना नीती गेली
नितीविना गती गेली
गती विना वित्त गेले
वित्तविना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले…

अन्यायाविरुद्ध बंड

त्या काळातील समाज रुढी-परंपरांच्या कठोर बंधनात अडकलेला होता. बालविवाह, सतीप्रथा, स्त्रीदास्य आणि अस्पृश्यता यांसारख्या प्रथांनी समाजाला जखडून ठेवले होते. महात्मा फुले यांनी या सर्व प्रथांविरुद्ध उघडपणे आवाज उठवला. त्यांनी विधवांसाठी आश्रयस्थळे उभारली, विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले आणि स्त्रियांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. त्यांच्या कृतीतून समाजातील महिलांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा मिळाली.

सत्यशोधकांचा मार्ग : समतेची संघटित चळवळ

सन १८७३ मध्ये त्यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज हा भारतीय सामाजिक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जातीभेद,अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता यांविरुद्ध संघटित लढा उभारला. सत्यशोधक समाजाने समाजाला विचार करण्याची नवी दिशा दिली. ज्यामध्ये सत्य, समता आणि बंधुता यांना केंद्रस्थानी ठेवले आहे.सत्यशोधक समाजाच्या मार्फत त्यांनी एक समांतर विज्ञानवादी भूमिका समाजापुढे मांडली.तत्कालीन ब्राह्मण्यवादाला झुगारून नव्या चालीरीती समाजाला दिल्या.

शेतकऱ्यांचा आवाज : अन्यायाविरुद्धचा प्रहार

महात्मा फुले यांनी केवळ सामाजिकच नव्हे, तर आर्थिक विषमतेवरही भाष्य केले.त्यांच्या “शेतकऱ्यांचा आसूड” या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांच्या दुःखाचे अत्यंत वास्तव चित्रण केले आहे. महसूल व्यवस्थेतील अन्याय, सावकारशाहीचे शोषण आणि प्रशासनातील दुर्लक्ष यावर त्यांनी कठोर टीका केली. शेतकरी हा समाजाचा कणा असूनही त्याचे जीवन दारिद्रयात का अडकले आहे, हा प्रश्न त्यांनी समाजासमोर उभा केला.

विचारांची शस्त्रे : लेखनातून घडवलेले परिवर्तन

महात्मा फुले हे केवळ कृतीशील समाजसुधारक नव्हते, तर प्रभावी लेखकही होते. “गुलामगिरी” या ग्रंथातून त्यांनी जातीव्यवस्थेवर प्रखर प्रहार केला, तर “सार्वजनिक सत्यधर्म” मधून मानवतावादी धर्माची संकल्पना मांडली. त्यांच्या लेखनातून समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे कार्य झाले. यातून त्यांच्या विचारांची व्यापकता स्पष्ट होते.याशिवाय त्यांनी गुलामगिरी,शेतकऱ्यांचा आसूड,ब्राह्मणांचे कसब, तृतीय रत्न,सार्वजनिक सत्य धर्म,छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा लिहून शिवरायांच्या कार्यकर्तुत्वाची ओळख करून दिली.रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीची स्वच्छता केली.शिवाजी महाराजांच्या स्मृती पुनरुज्जीवनाच्या प्रारंभीच्या प्रयत्नांपैकी एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व त्यांना मानले जाते.

सार्वजनिक जीवनातील योगदान

महात्मा फुले यांनी सार्वजनिक जीवनातही सक्रिय सहभाग घेतला. पुणे महानगरपालिकेच्या कार्यातून त्यांनी नागरी प्रश्नांवर काम केले. पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे त्यांनी लक्ष दिले. त्यांनी ब्रिटिश प्रशासनाशी संवाद साधून सामाजिक प्रश्न मांडले आणि वंचित घटकांसाठी न्यायाची मागणी केली. शासन कोणतेही असो, ते न्याय्य आणि लोकहितकारी असले पाहिजे, ही त्यांची भूमिका होती.हंटर शिक्षण आयोगाकडे त्यांनी निवेदन सादर केले.सार्वत्रिक शिक्षणाचा पुरस्कार केला.

सामाजिक सुधारणा स्वीकारल्या

इंग्रजांच्या काही सामाजिक सुधारणांना स्वीकारताना त्यांनी इंग्रजांच्या अन्यायकारक नीतीवर सडकून टीका केली. एवढेच काय इंग्रजांना समजेल अशा भाषेत त्यांनी त्याची उत्तरे दिली. कोणताही पहिला प्रयोग स्वतःच्या घरी, स्वतःच्या कुटुंबावर करून ‘बोले तैसा चाले ,त्याची वंदावी पाऊले’, असा आदर्श त्यांनी समाजामध्ये निर्माण केला आहे. स्वतःच्या पत्नीला शिकवले. स्वतःची विहिर मागास वर्गीयांसाठी खुली केली. ब्राह्मण्यवादाचा आयुष्यभर विरोध करुनही त्यांनी एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला.त्या मुलाचे आंतरजातीय लग्न लावून देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. महात्मा जोतीबा फुले यांनी घेतलेले निर्णय अशा प्रकारे कायम प्रेरणादायी आहेत. महात्मा ज्योतिबा फुले हे स्वतःच्या मुलाचा आंतरजातीय विवाह करणारे पहिले पालक ठरले आहेत. काळाची पावले ओळखून नवनव्या प्रयोगाद्वारे सामाजिक सुधारणा करण्यात भारतातल्या सर्व सामाजिक सुधारणा करणाऱ्या थोर पुरुषांमध्ये त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले वेगळे ठरले आहेत.

यशस्वी व्यावसायिक

सामाजिक कार्य, संघटना सुरु ठेवण्यासाठी आर्थिक स्त्रोत मजबूत असणे आवश्यक असते. त्यासाठी अंगी व्यावसायिक कसब बाळगणे खूप गरजेचे असते. संघटना, चळवळी, सुधारणांचा डोलारा चालविण्यासाठी पैशाची गरज असते. त्यासाठी आदर्श पद्धतीने व्यवसाय करुन स्वयंपूर्ण होणे गरजेचे असल्याचे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सोदाहरणासह मांडून ठेवले. त्यांनी कंत्राटदार म्हणून अतिशय उत्तमपणे काम केले. आजही त्यांच्या सहभागात तयार झालेल्या वास्तू प्रेरक आहेत. पूल, धरणे, कालवे या बांधकामात कंत्राटदार म्हणून त्यांनी काम केले.

आजच्या काळातील विचारांची प्रासंगिकता

महात्मा फुले यांच्या कार्याला दीडशे वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी त्यांच्या विचारांची प्रासंगिकता आजही तितकीच आहे. शिक्षणातील विषमता, सामाजिक भेदभाव आणि स्त्रीसमानतेचे प्रश्न अद्यापही पूर्णतः संपलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या विचारांचा प्रसार आणि आचरण करणे ही काळाची गरज आहे. त्यांच्या कार्याचा अभ्यास केल्यास समाजपरिवर्तनासाठी आवश्यक असलेली दृष्टी मिळते.

ज्योतिराव परिवर्तनाची अखंड प्रेरणा

महात्मा ज्योतिराव फुले हे एक व्यक्तिमत्त्व नसून एक चळवळ, एक विचारधारा आणि एक प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्या कार्यातून राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रेरणा घेतली.त्यांच्या कार्यामुळेच महाराष्ट्राला फुले–शाहू–आंबेडकरांचा महाराष्ट्र ही ओळख प्राप्त झाली आहे. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण करणे म्हणजे केवळ आदर व्यक्त करणे नव्हे, तर त्या मूल्यांना आपल्या जीवनात रुजवण्याचा संकल्प करणे होय.

महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात विशेष समिती स्थापन केली असून वर्षभर महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनकार्याला साजेशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार करून सामाजिक समतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न ठरणार आहे.

प्रवीण टाके
उपसंचालक (माहिती)
विभागीय माहिती कार्यालय,कोल्हापूर
9702858777

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन

कागलमधील गैबी चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण

कागल/प्रतिनिधी : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याला मंत्री हसन मुश्रीफ यांनी अभिवादन केले. कागलमधील गैबी चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हे अभिवादन करण्यात आले.यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी ऐतिहासिक गैबी चौकातील महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या पुतळ्यानाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी कागल नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष विवेक लोटे, बच्चन कांबळे, रुपेश वाघमारे, अभिजित कांबळे, अंकुश कांबळे, सागर शिंदे यांच्यासह इतर मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

घोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यश

घोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यश

 

अतिग्रे: मुंबई सायन्स टिचर्स असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेमध्ये संजय घोडावत ऑलिम्पियाड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत, तब्बल १० पदके जिंकली. ज्यात ३ सुवर्ण, ५ रौप्य आणि २ कांस्य पदकांचा समावेश आहे.                                     आर्यन प्रसन्न पवार, आध्या पुशान चिकली, आदित्य अभिजीत जाधव यांनी सुवर्णपदक पटकावले. रौप्य पदक प्राप्त करणाऱ्यांमध्ये ऐशना श्रीराम कुलकर्णी, अर्जुन विनायक बरगाले, समृद्धी रामदास बडे, चिरायू उमेश माने, शार्दुल सुश्रुत कुलकर्णी यांचा तर कांस्यपदक प्राप्त करणाऱ्यांमध्ये साची सुहास वाडकर, रुद्रराज सुरेश जाधव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.                सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना या संस्थेचे झोनल हेड श्री प्रभु श्रीनिवास सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजित अभ्यासक्रमामुळेच हे यश प्राप्त होऊ शकले. या विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालक श्री वासू सर या प्रसंगी बोलताना ते म्हणाले कि सातत्य व सराव हीच यशाची गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता वाढीसाठी संजय घोडावत ओलंपियाड स्कूल ने सातत्य राखले आहे. चेअरमन संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्व मार्गदर्शक शिक्षक,गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

संघटन सृजन अभियाना अंतर्गत काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात १३ एप्रिल ते १८ एप्रिल कालावधीत आढावा बैठका होणार

संघटन सृजन अभियाना अंतर्गत काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यात १३ एप्रिल ते १८ एप्रिल कालावधीत आढावा बैठका होणार

नवीन पदाधिकारी नेमणुकी संदर्भात काँग्रेस पक्षाच्यावतीने आढावा बैठका घेण्यात येणार

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तसेच कोल्हापूर शहर आणि इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी मध्ये नवीन पदाधिकारी नेमणुकी संदर्भात काँग्रेस पक्षाच्यावतीने आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. संघटन सृजन अभियाना अंतर्गत या बैठका दिनांक १३ एप्रिल ते १८ एप्रिल या कालावधीत ज्या त्या तालुक्यात घेण्यात येणार आहेत. या अभियानात काँग्रेसचे सर्व तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह काँग्रेस पक्षासोबत जोडले जाण्याची इच्छा असणाऱ्या सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस समितीच्यावतीने संघटन सृजन अभियान राबवण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तसेच कोल्हापूर शहर आणि इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी मध्ये नवीन पदाधिकारी नेमणुकी संदर्भात काँग्रेस पक्षाच्यावतीने आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठका दिनांक १३ एप्रिल ते १८ एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
या आढावा बैठकांना पक्षातर्फे मुख्य निरीक्षक जय शंकर पाठक यांच्या समवेत कोल्हापूर ग्रामीण साठी सहनिरीक्षक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव नंदकुमार कुंभार, कोल्हापूर शहरसाठी राहुल गायकवाड, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सुनील मलके आणि राहुल वरदा उपस्थित राहणार आहेत.
या अभियानात काँग्रेसचे सर्व तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह काँग्रेस पक्षासोबत जोडले जाण्याची इच्छा असणाऱ्या सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले आहे.

सतेज पाटील यांचा उद्याचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा होणार,कार्यकर्त्यांकडून दहा लाख वह्या संकलनाचे उदिष्ट्य

सतेज पाटील यांचा उद्याचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा होणार,कार्यकर्त्यांकडून दहा लाख वह्या संकलनाचे उदिष्ट्य

कोल्हापूर/प्रतिनिधी : काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचा उद्या १२ एप्रिलला होणारा वाढदिवस विविध उपक्रम राबवून लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा संकल्प कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला आहे. या वाढदिवसानिमित्त दहा लाख वह्या संकलनाचे उदिष्ट कार्यकर्त्यांनी ठेवले आहे. पदाधिकाऱ्यांनी विविध उपक्रम राबवत सतेज पाटील यांच्या वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा मानस काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

देऊया गरजूंना साथ सतेज पाटील यांच्या वाढदिनी मदतीचा हात

देऊया गरजूंना साथ सतेज पाटील यांच्या वाढदिनी मदतीचा हात हे ब्रीद घेऊन जिल्ह्यातील अनेक संस्था, संघटना, आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, वृद्धाश्रम फळे वाटप, विद्यार्थ्यांच्या गुणवता वाढीसाठी विविध स्पर्धा, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, अपंग, निराधार मुलांना अल्पोपहार, गुणवंत कामगार संघटनेमार्फत काव्य संमेलनाचे आयोजन, जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये वृक्षारोपण, फुटबॉल, करवीर सतेज चषक स्पर्धा, लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा तसेच तालुका स्तरावरही विविध सामाजिक उपक्रम राबण्यात येणार आहेत.
आमदार सतेज पाटील यांनी वाढदिवसानिमित्त हारतुरे, पुष्पगुच्छ न स्वीकारता गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या भेट देण्याचा उपक्रम २००७ पासून सुरु आहे. या सामाजिक उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये झाली आहे. यंदाही कोल्हापूर महानगरपालिकेच्या ३८ नगरसेवकांच्या माध्यमातून आमदार पाटील यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त ५४ हजार वह्या देण्याचा संकल्प महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू लाटकर यांनी केला आहे. जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या १५ सदस्यांंच्या माध्यमातून ५४ हजार वह्या भेट देण्याचा संकल्प जाहीर केला. युवराज गवळी यांनी गवळी समाजाच्या माध्यमातून ११ हजार वह्या भेट देत पाचगावमध्ये म्हैस शर्यत स्पर्धा आयोजित करणार असल्याचे सांगितले, तसेच जिल्ह्यातील सर्वच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या ग्रामदैवताला अभिषेक घालून आमदार पाटील यांना दिर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. यंदा दहा लाख वह्यांचे उदिष्ठ ठेवण्यात आले आहे.
तसेच युथ काँग्रेसच्या माध्यमातून २५ हजार वह्या देण्यात येणार आहेत.आमदार सतेज पाटील हे वाढदिनी दुपारी ४ नंतर कसबा बावड्यातील त्यांच्या यशवंत निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
आमदार जयंत आसगावकर, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, जिल्हा परिषद काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील, महापालिका विरोधी पक्षनेते राजू लाटकर, काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे, गोकुळचे संचालक चेतन नरके, संचालक बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तायशेटे, शशिकांत खोत, माजी नगरसेवक भूपाल‌ शेटे, भारती पोवार, तौफिक मुल्लानी, युवराज गवळी, बाळासाहेब सरनाईक, अक्षय शेळके, भरत रसाळे, संपतराव पाटील, संजय पोवार – वाईकर, मंगल खुडे, सरलाताई पाटील, उज्ज्वला चौगले, हेमा पाटील, नगरसेवक संजय मोहिते, दुर्वास कदम, प्रवीण केसरकर, अर्जुन माने, अमर समर्थ, सुभाष बुचडे, विनायक कारंडे, अजित पोवार, सचिन चौगले, संतोष जरग, दिपाली घाटगे यांच्यासह आजी माजी नगरसेवक यांनी वह्या संकलनाचे उद्दिष्ट केले आहे.

सी.पी.आर मध्ये बालरोगशास्त्र विभागात GBS झालेल्या रुग्णास जीवदान

सी.पी.आर मध्ये बालरोगशास्त्र विभागात GBS झालेल्या रुग्णास जीवदान

कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथे बालरोगशास्त्र विभागात GBS हा गंभीर आजार झालेमुळे उपचारासाठी दाखल करण्यात आलेला रुग्ण कु.आर्यन भगवान म्हातूगडे वय वर्षे १२ रा.सावर्डे, ता. भुदरगड , जि.कोल्हापूर. या रुग्णास दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी बालरोगशास्त्र विभागात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. सदर रुग्ण गंभीर असल्यामुळे त्याला बालरोगशास्त्र विभागातील डॉक्टरांच्या पथकाने तात्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार सुरू केले.
सदर रुग्णावर IVIG इंजेक्शन सुरू करण्यात आली. बालरोगशास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ.संगीता कुंभोजकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर रुग्णावर यशस्वीरित्या उपचार सुरू करण्यात आले. सदर उपचारादरम्यान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सदानंद भिसे यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर रुग्णावर करण्यात आलेले सर्व उपचार हे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आले आहेत.यावेळी रुग्णाचे पालक श्री.भगवान म्हातुगडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना “माझ्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी बालरोगशास्त्र विभागातील सर्वच डॉक्टरांनी खूप परिश्रम घेतले तसेच अहोरात्र सर्व डॉक्टरांनी प्रयत्न करून माझ्या मुलाचे प्राण वाचवले असल्याचे सांगितले. बालरोगशास्त्र विभागातील सर्व स्टाफच्या या परिश्रमामुळेच माझ्या मुलाला मी आज सुखरूप घरी घेऊन जात असल्याबद्दलचा त्यांनी आनंद व्यक्त केला.
सदर रुग्णास दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ.संगीता कुंभोजकर, वैद्यकीय अधीक्षक, डॉ.भूषण मिरजे, सहयोगी प्राध्यापक डॉ.शिशिर मिरगुंडे, सहाय्यक प्राध्यापक डॉ.महेश्वरी जाधव, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, इन्चार्ज सिस्टर सौ.मीना पंडित, सौ.मीना डिसूजा तसेच विभागातील सर्व नर्सिंग स्टाफ समाजसेवा अधीक्षक श्री.अजित भास्कर रुग्णालयाकडून सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी पदभार स्वीकारला

नुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी पदभार स्वीकारला

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी माजी आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून सायंकाळी ४ वाजता कार्यभार स्वीकारला. कोल्हापूरात दुपारी आगमन झाल्यानंतर डॉ. रोजंद्र भारुड यांनी प्रथम अंबाबाई मंदिर येथे जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर महापालिकेत येऊन त्यांनी अधिकृतपणे आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला.
पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी महापौर रुपाराणी निकम यांची भेट घेऊन महापालिकेच्या विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव उपस्थित होते. त्यानंतर आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी आयुक्त कार्यालयातील मीटिंग हॉलमध्ये सर्व विभाग प्रमुखांसोबत बैठक घेऊन विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेतली.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ व शिल्पा दरेकर, उपआयुक्त परितोष कंकाळ व किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त उज्वला शिंदे व स्वाती दुधाणे, सहा. संचालक (नगररचना) प्रशांत भोसले, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, जल अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, लेखापाल संजय सरनाईक, प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार, उप-शहर रचनाकार एन.एस. पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते

महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम’ (MRDP) राबविण्यास मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागर

महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम’ (MRDP) राबविण्यास मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी : आमदार राजेश क्षीरसागर

आपत्ती व्यवस्थापनास बळकटी देण्याकरिता विविध उपाययोजना राबविण्यात येणार

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या साहाय्याने मित्र संस्थेच्या अंतर्गत महाराष्ट्र रिझीलन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (MRDP) हा प्रकल्प राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत अधिकृत मान्यता देण्यात आली. यासाठी २ हजार २४० कोटी अर्थसाहाय्य जागतिक बँकेकडून घेण्यात येणार आहे. एकूण ३ हजार २०० कोटींचा हा प्रकल्प असून, ९६० कोटी रुपये राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. त्यानुसार या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने ७ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या बैठकीत ‘महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम’ (MRDP) राबविण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. हा कार्यक्रम प्रामुख्याने आपत्ती व्यवस्थापन बळकट करण्यासाठी आणि पूरप्रवण क्षेत्रांमधील नागरिकांना दिलासा देण्यासाठी आखण्यात आला आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
यामध्ये पुढे म्हंटले आहे कि, मंत्रिमंडळाच्या झालेल्या निर्णयात महत्वाची बाब म्हणजे आपत्ती व्यवस्थापनात खाजगी भांडवलाच्या मदतीने वित्तपुरवठा उभारला जाणार आहे. यात जागतिक बँकेकडून १६५ कोटींचा अतिरिक्त निधी मिळणार आहे. या अर्थसहाय्यातून आपत्तीचा फटका बसलेल्या नागरिकांना गृह कर्जात सवलत दिली जाईल. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांसाठी (MSME) कर्जासाठी सवलत आणि विशेष विमा सुरक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे. कृष्णा नदीच्या खोऱ्यातील पुराचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधक आराखडे तयार केले जातील. कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी यांसारख्या शहरांमध्ये पुराच्या पाण्याचा वेगाने निचरा व्हावा यासाठी मास्टर प्लॅन आणि उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यासाठी राज्याची क्षमता वाढली जाणार असून, नागरिकांना आपत्कालीन स्थितीत दिलासा मिळणार आहे, अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.