कृषी कायद्याबाबत चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार,महाविकास आघाडी सरकारने पुकारलेले भारत बंदचे आंदोलन अयशस्वी ठरले – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
कोल्हापूर/प्रतिनिधी : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ ही मोठी आहे ज्या लोकांनी ही चळवळ मोठी केली त्यातील काही कार्यकर्त्यांचे कोरोनाच्या कालावधीत निधन झाले त्यांना माझी आदरांजली असून आता कोणाचा काळ कमी झालेला आहे मात्र महाराष्ट्र हा कोरणा च्या बाबतीत एक नंबर वर आहे मुख्यमंत्र्यांनी चांगले प्रयत्न केले मात्र तरीही महाराष्ट्रात कोणाचे आकडेवारी सर्वाधिक असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मी जगभरात कोरोनाचा गो कोरोनाचा नारा होता याला चांगला प्रतिसाद मिळाला मलाही कोरोना झाला मात्र कोरोना माझ्यापाशी जास्त काळ टिकला नाही कोरोनाला माझा राग आला असावा असे उदगार त्यांनी काढले.
या कोरोनातून मी बारा झालेलो आहे या कोणाच्या कालावधीत ज्या ज्या लोकांनी गोरगरिबांना मदतीचा हात दिला त्या सर्वांचे आठवले यांनी आभार मानले भारत सरकारने आत्मनिर्भर भारतची घोषणा केली आहे त्यातून शेतकऱ्यांसाठी काही मदत केलेली आहे.
केंद्र सरकारने केलेल्या शेतकऱ्यांच्या कायद्याविरोधात शेतकऱ्याने जे काय आंदोलन पुकारले आहे ते आंदोलन अयशस्वी झाले आहे शेतकऱ्यांचा या आंदोलनाला विरोध असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात उतरले नसल्याचे आठवले यांनी सांगितले शिवाय केंद्रसरकार चर्चेला तयार आहे चर्चा करून यातून मार्ग काढणे आवश्यक आहे पूर्ण कायदा रद्द करणे हे चुकीचे आहे त्यामध्ये बदल करावा अशी मागणी केली असती तर चर्चा करून यावर निर्णय घेता आला असता असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण याबाबत माझा पाठिंबा आहे २०२१ ची जनगणना ही जात निहाय होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. आरक्षण हे जातीच्या आधारावर असणे आवश्यक आहे भटक्या-विमुक्तांना ही वेगळे आरक्षण देण्याची मागणी मी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.