Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्याकोल्हापूर उत्तर मधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मधुरीमाराजे यांची माघार

कोल्हापूर उत्तर मधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मधुरीमाराजे यांची माघार

कोल्हापूर उत्तर मधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मधुरीमाराजे यांची माघार

कोल्हापूर / प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर मध्ये आता मोठा भूकंप झाला असून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार असलेल्या मधुरीमाराजे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघारी घेतली आहे. अपक्ष अर्ज भरलेले राजेश लाटकर यांनी उमेदवारी बाबत आग्रह धरला होता त्यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र काँग्रेसच्या नगरसेवकांचा याला विरोध होता हा विरोध लक्षात घेऊन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मधुरिमा राजे यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये अधिकृत काँग्रेसची उमेदवारी दिली होती आणि या अधिकृत काँग्रेसच्या उमेदवार असलेल्या मधुरीमाराजे यांनी आपला अर्ज दाखल केला होता मात्र अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी राजेश लाटकर यांनी आपला मोबाईल फोन स्विच ऑफ करून ठेवल्याने नॉट रिचेबल मोबाईल लागला. दिवसभर त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न सर्वच पातळीवर केला गेला शिवाय खासदार छत्रपती शाहू महाराज यांनीही राजेश लाटकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी राजेश लाटकर माघारीसाठी आलेच नाहीत म्हणून मधुरीमाराजे यांनी माघार घेतली असल्याचे खासदार शाहू महाराज यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
सुरुवातीला मला अर्ज भरण्यास सांगण्यात आले मी अर्ज भरला आणि मला पुन्हा उमेदवारी मागे घेण्याची विन विनंती केली गेली असा आरोप राजेश लाटकर यांनी केला होता यावर पक्षांनी विचार केला आणि मधुरिमाराजे यांना उमेदवारी दिली गेली होती.पण माघारीच्या दिवशीच राजेश लाटकर यांचा मोबाईल नॉट रीचेबल लागला त्यामुळे त्यांची माघारी होणार नाही म्हणूनच मधुरीमाराजे यांनी माघार घेतली आहे.असे खासदार शाहू महाराज यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या महाविकास आघाडीला मधुरीमा राजे यांनी माघार घेतल्याने धक्का बसला आहे.उत्तरेत काँग्रेसचा अधिकृत उमेदवारच आता निवडणुकीच्या रिंगणात नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments