आपल्या पतीला एकदा,दोनदा नव्हे तर तिसऱ्यांदा उभे करण्याची मनीषा या सावित्रीची धडपड
कोल्हापूर/श्रद्धा जोगळेकर : असे म्हंटले जाते की लग्नानंतर पतीने पत्नीला सांभाळायचे,कुटंबाचा गाडा ओढायचा,पती हाच घरचा कर्ता पुरुष आहे.मात्र अलीकडे महिलांनी हा समाजातील पसरलेला समज खोडून काढला आहे.आज महिला पुरुषांबरोबरच काय तर त्याच्याही पुढे गेल्या आहेत.याचे उदाहरण दिले तर जवाहर नगर येथील मनीषा पोळ यांचे देता येईल कारण २०१५ साली दहा वर्षांपूर्वी पती संतोष यांना कर्करोगाचे निदान झाले आणि ‘मनीषा’ यांच्या मनाला धक्काच बसला. आपल्या दोन मुलांसह पती यांच्यासोबत त्यांचा संसार सुखाचा सुरू होता. पण पतीच्या कर्करोग निदानानंतर त्या न खचता खंबीर राहुन आपल्या पतीची सेवा करत आहेत. कुटुंबाचा गाडा त्या चालवत आहेत.आणि आता तिसऱ्यांदा पतीला उभे करण्याची त्यांची धडपड चालू झाली आहे. खाजगी काम करून आपला संसार सांभाळणाऱ्या संतोष यांना २०१५ साली कर्करोग झाला हे समजले.डॉक्टरांनी यात जिभेची काळजी घेण्यास सांगितले.पथ्य पाणी करण्यास सांगितले.अशातच शस्त्रक्रिया झाली आणि जिभच काढून टाकण्यात आली.तरीही संतोष यांनी न खचता आपला संसार पत्नीच्या सहकार्य धीरातून चालू ठेवला होता. आणखी पुन्हा त्यांची जखम गालाला झाल्याचे समजले त्यावरही उपचार करण्यात आले. मुले लहान असल्याने मनीषा यांना सर्व सांभाळणे कठीण होते.पण त्यांनी शिलाई व्यवसाय करून आपले कुटुंब उभे केले आणि संसार चालवत आहेत.मात्र आता पुन्हा एकदा पती संतोष यांची जखम वाढली आहे.त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्यांना एकदा नव्हे,दुसऱ्यांदा नव्हे तर तिसऱ्यांदा आत्मविश्वासाने उभे करण्याची मनीषा संतोष पोळ यांची धडपड चालू झाली आहे.अशी ही सवित्री धीराने या सर्व प्रसंगाला सामोरे जात आहे,हीच खऱ्या अर्थाने वटपौर्णिमा आहे असे म्हणावे लागेल.
दहा वर्षापासून खूप कठीण प्रसंगाशी आम्ही तोंड देत आहोत.मात्र देवाच्या कृपेने आम्ही दोघांनीही एकमेकांना धीर देत सर्व परिस्थितीचा सामना करत आहोत आताही करू.
सौ.मनीषा पोळ.