Wednesday, June 25, 2025
spot_img
Homeताज्याविनाशकारी शक्ती पीठ विरोधात श्रमिक शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

विनाशकारी शक्ती पीठ विरोधात श्रमिक शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

विनाशकारी शक्ती पीठ विरोधात श्रमिक शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

कोल्हापूर/प्रतिनिधी : देवस्थानांना जोडण्याचा तथाकथत हेतूने केला जात असलेल्या शक्तीपीठ महामार्ग हा प्रत्यक्षात गावांचा विनाश करणारा मार्ग असून भांडवलदार कंत्राटदार यांना मालामाल करण्याचा खरा हेतू यातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे हा शक्तीपीठ महामार्ग होऊ नये तो हाणून पाडण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटना व महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ यांच्या वतीने मोर्चाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार आज कोल्हापुरातील दसरा चौक येथून सर्वपक्षीय मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी मोर्चात खासदार शाहू छत्रपती महाराज,संभाजीराजे छत्रपती, आमदार सतेज पाटील,आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव,आमदार राजुबाबा आवळे.भारत पाटणकर, संजय बाबा घाडगे,शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय पवार, विजय देवणे,रामराजे कुपेकर, गिरीश फोंडे, आर. के. पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी,शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.यावेळी शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशी मागणी करण्यात आली.
शक्तीपीठ मार्ग प्रवेश नियंत्रित मार्ग असल्यामुळे त्याचा स्थानिक जनतेला काहीही उपयोग होणार नाही. स्थानिक वाहने रिक्षा, ट्रॅक्टर, मोटार सायकल,बैलगाडी आदी वाहने या मार्गावर नेने किंवा थांबवणे धोकादायक असल्यामुळे त्याचा स्थानिकांना उपयोग नाही. त्यामुळे हा मार्ग स्थानिक जनतेला निरुपयोगी आहे अशा मार्गावर जाणारी वाहने ५० ते १०० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पेट्रोल पंप व फूड मॉल येथे थांबतात रस्त्यावर अन्य ठिकाणी थांबण्यास परवानगी नसते. त्यामुळे या रस्त्याच्या बाजूला कोणताही रोजगार स्थानिकांना उपलब्ध होणार नाही आणि कोणतेही व्यवसाय चालवितात येणार नाही.
अशा रस्त्यावर वेग वाढवण्यासाठी तो एका पातळीवर करण्यासाठी खुदाई भराव केला जातो या रस्त्यामुळे गावाच्या शिवाराचे रानाचे माळाचे दोन भाग होतात ज्याच्या शिवाराचे रानाची माळाचे दोन भाग होतील त्याला एका बाजूने दुसऱ्या बाजूला जायचे तर मोठा फेरा काढावा लागतो. किंवा आपली जमीन कोणाला तरी कमी भावाने विकून टाकावी लागते या रस्त्याला सम पातळीत आणण्यासाठी जे भराव केले जातील त्याला ओढ्या व ओघळातील पाणी तटून रानात शिवारात शिरेल व आजूबाजूच्या शेतकऱ्यांची पिके धोक्यात येतील आणि मोठा पाऊस पडला तर पाणी साचून राहणार आहे त्यामुळे हा शक्तीपीठ महामार्ग आमच्यासाठी उपयोगाचा नाही अशी शेतकऱ्यांनी भूमिका मांडली आहे.त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा मार्ग शासनाने होऊ देऊ नये अशी मागणी या मोर्चाद्वारे शेतकऱ्यांनी संघटनेच्या नेतृत्वाखाली केली आहे. आजच्या मोर्चामध्ये १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.
हा शक्तिपीठ महामार्ग अनेक जंगलातील भागातून जाणार आहे. येथे गावाच्या जंगलाचे दोन भाग होणार आहेत आणि अनेक चौरस किलोमीटर जंगल तोडल्यामुळे जनावरे बेहाल होणार आहेत. जनावरांचे पाण्याला जाण्याच्या फिरण्याचे मार्ग तुटणार आहेत.जनावरांचे गावात शिरण्याचे प्रमाण ही वाढणार आहे. अनेक धोका यामुळे निर्माण होणार असेल तर हा मार्ग थांबविणे आवश्यक आहे. देवाच्या नावाने भांडवलदारांचे आणि कंत्राटदाराचे गाव असे या रस्त्याचे नियोजन असून हा रस्ता बड्या दलाल व्यापारी भांडवलदारांच्या मालवाहतुकीसाठी व बंदरातून आयात निर्यात करण्यासाठी होणार आहे हेच व्यापारी आयात निर्यात करून शेतमालाचे भाव पाडतात हे आता जनतेला माहीत झाले असून जनता कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही,येत्या १२ जूलै पर्यंत सरकारने निर्णय दिला नाही तर मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी मोर्चाद्वारे आमदार सतेज पाटील यांनी दिला आहे.
हा जादाचा रस्ता नितीन रस्ते बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी बांधला जात आहे. त्यामुळे या रस्त्याला विरोध म्हणून आज हा विराट मोर्चा कोल्हापूर मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर काढून शक्तीपिठ महामार्गला विरोध करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments