Sunday, January 19, 2025
Home ताज्या ग्लोबल वॉर्मिंगचा धोका टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल गरजेचा -गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत

ग्लोबल वॉर्मिंगचा धोका टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल गरजेचा -गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत

ग्लोबल वॉर्मिंगचा धोका टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल गरजेचा -गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत

कॅन्सरचा विस्फोट टाळण्यासाठी सेंद्रिय शेती आवश्यक पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश सर्वदूर पोहोचवणार

कोल्हापूर/प्रतिनिधी : ग्लोबल वॉर्मिंगचा धोका टाळण्यासाठी पंचमहाभूतांचे संरक्षण अत्यावश्यक आहे. पृथ्वीला वाचवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.
कोल्हापूरच्या कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव’ अंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कर्नाटकच्या धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. यावेळी पाणी तज्ज्ञ राजेंद्रसिंह, आयआयटी बीएचयूचे प्रदीप मिश्रा, राजस्थानचे कृष्ण जाखड, लोकभारतीचे गोपाल उपाध्याय, डॉ. हर्षा हेगडे, पूर्णानंद स्वामी, प्रिया शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते. तसेच कणेरी मठ संस्थानचे काडसिद्धेश्वर स्वामीजी, आमदार विक्रम सावंत, आमदार शेखर निकम तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सेंद्रिय शेतीपद्धती तसेच पंचमहाभूत तत्वांच्या दालनांना व प्लॅस्टिक पुनर्निर्मिती प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.
राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, प्राचीन काळी पंचतत्त्वांच्या संरक्षणाचे संस्कार प्रत्येकाला दिले जात होते. परंतु, सध्या आपल्या भौतिक सुखासाठी मानव पर्यावरणाला हानी पोहोचवत आहे. हे काम कोणत्याही जीवजंतूकडून होत नसून ते केवळ मानवाकडून होत आहे. शेतीमध्ये रासायनिक खतांच्या अति वापराने कॅन्सर सारख्या भयानक रोगांना सामोरे जावे लागत असून येत्या दोन दशकात देशात कॅन्सरचा भयंकर विस्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर सेंद्रिय शेती हाच उपाय असून प्रत्येकाने आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये, जीवनशैलीमध्ये बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. हे काम केवळ शासकीय यंत्रणेने नव्हे तर प्रत्येक नागरिकाने करणे गरजेचे आहे. पंचमहाभूतांचे संरक्षण ही लोकचळवळ होणे गरजेचे असून हा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. या ठिकाणी राबवण्यात येत असलेले पर्यावरण रक्षणाचे विविध उपक्रम प्रेरणादायी आहेत. काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या लोकसहभागातून मानवतेच्या कल्याणाच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

पंचतत्त्वांच्या संरक्षणासाठी प्रत्येक महिलेने खारीचा वाटा उचलावा

कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, संस्कार, परंपरा, अध्यात्म यावर भर असणारा भारत देश आहे. फॅशनचे युग, वैज्ञानिक युग, कलियुग म्हणून आपण आपली संस्कृती, परंपरा विसरत चाललो आहोत. दुध, दह्याला बाजूला सारुन चॉकलेट, पिझ्झाकडे वळत आहोत. याचे दुष्परिणाम आपल्याला दुर्धर आजार आणि नैसर्गिक आपत्तींच्या माध्यमातून भोगावे लागत आहेत. यावर केवळ पर्यावरण रक्षण हाच उपाय आहे. हे काम महिला शक्ती करु शकते. महिलांना गौरव, सन्मानाची वागणूक दिली तर समाजात निश्चित चांगला बदल घडतो. पर्यावरण रक्षणाचे संस्कार प्रत्येक महिलेने आपल्या बाळाला देवून पंचतत्त्वांच्या संरक्षणासाठी खारीचा वाटा उचलावा. येत्या काळात पाण्याचा जपून वापर केला नाही तर पाण्यासाठी महायुद्ध होऊ शकते, यासाठी पाण्याचा जपून वापर करा. मातीचे संरक्षण करा.. पर्यावरणाचे रक्षण करा, असे सांगून आरोग्य, क्रीडा, सेंद्रिय शेती, शिक्षण आदी क्षेत्रात काडसिध्देश्वर स्वामीजींनी महत्त्वपूर्ण कार्य केले असून यादृष्टीने कणेरी मठात सुरु असलेला हा पर्यावरण रक्षणाचा लोकोस्तव महत्वपूर्ण आहे, असे मत मंत्री शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. पाणी तज्ज्ञ राजेंद्रसिंह म्हणाले, पूर्वीच्या काळी जल, अग्नी, पृथ्वी, वायू, आकाश या पंचमहाभूतांचे पूजन आणि रक्षण केले जात असे. परंतु सध्या पंचतत्त्वांना हानी पोहोचवली जात असून त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. नीर, नारी आणि नदीला महत्व मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे.
प्रदीप मिश्रा, गोपाल उपाध्याय यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश मार्गदर्शनातून दिला. आभार उदय सावंत यांनी मानले.दरम्यान श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव अंतर्गत घेण्यात आलेले विविध उपक्रम, सेंद्रीय शेती, पंचमहाभूत तत्वांची माहिती देणारी दालने, शासनाच्या विविध विभागांचे स्टॉल्स आदींबाबत माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कंदमुळे आणि औषधी वनस्पतींचे भव्य प्रदर्शन १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी

कंदमुळे आणि औषधी वनस्पतींचे भव्य प्रदर्शन १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी १०० हून अधिक कंदमुळे आणि १५० हून अधिक औषधी वनस्पती होणार प्रदर्शित   कोल्हापूर/प्रतिनिधी :...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डिप्लोमा अभियांत्रिकी, शॉर्ट-टर्म विभाग, आयटीआय सर्व शाखांच्या क्रीडा स्पर्धा २०२४-२५ इन्स्टिट्यूटचे...

ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स” या CBSE प्रशिक्षण कार्यक्रमाचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन

ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स" या CBSE प्रशिक्षण कार्यक्रमाचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन   कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे "ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स" या सीबीएसई...

सीमा लढ्याच्या खटल्यात महाराष्ट्र सरकारने अनास्था दूर करून मराठी भाषिकांना न्याय द्यावा ! – मनोहर किणेकर, महाराष्ट्र एकीकरण समिती

सीमा लढ्याच्या खटल्यात महाराष्ट्र सरकारने अनास्था दूर करून मराठी भाषिकांना न्याय द्यावा ! - मनोहर किणेकर, महाराष्ट्र एकीकरण समिती कोल्हापूर, १७ जानेवारी (वार्ता.) - महाराष्ट्र...

Recent Comments