भाजप सरकारने लादलेले कृषी विरोधी काळे कायदे रद्द करावेत मागणीसाठी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला मिळाला कोल्हापूरमध्ये प्रतिसाद
कोल्हापूर/प्रतिनिधी : भाजप सरकारने लादलेले कृषी विरोधी काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी आज ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली होती. कोल्हापूर सांगली जिल्ह्यात या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. बिंदू चौक मध्ये विविध संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले शिवसेनेच्या वतीने रॅली काढण्यात आली तावडे हॉटेल येथे रास्ता रोको करण्यात आला. शहरातील व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय बंद ठेवून भारत बंदच्या हाकेला प्रतिसाद दिला रिक्षा व्यवसायी आज बंद होता कोल्हापूर जिल्ह्यात व सांगली जिल्ह्यात बंदला प्रतिसाद मिळाला आज बंदच्या पार्श्वभूमीवर तुरळक प्रमाणात रस्त्यावर वाहने फिरली या आंदोलनामध्ये सहभाग घेण्यासाठीं व या कायद्यांना विरोध करण्यासाठीं आज अजिंक्यतारा कार्यालयात ‘काळा झेंडा’ उभारण्यात आला होता.
कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. त्यामुळे देश अशांत झाल्याशिवाय राहणार नाही आणि एकदा देश अशांत झाला तर कोणालाही कारभार करता येणे अवघड होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज कोल्हापूरमध्ये दिला आहे.
कोल्हापुरातील बिंदू चौक येथे अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले या ठिकाणी शेट्टी यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.
कोणीही प्रतिष्ठा पणाला लावली तरी शेतकऱ्यांपेक्षा कोणी मोठा नाही. हा देश कृषीप्रधान आहे आणि शेतकऱ्यांच्या मुळेच हा देश चालला आहे. त्यामुळे त्यांच्यापेक्षा कोणी मोठा असूच शकत नाही, असे शेट्टींनी यावेळी म्हणाले आहेत.
केंद्र सरकारने मनाचा मोठेपणा दाखवावा. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय आणि त्यांना मान्य नसलेले जे कायदे आहेत, ते मागे घ्यावे. हमीभाव कायदेशीर करावा, हाच यावरचा पर्याय आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीमध्ये हे लादलेले कायदे मागे घेतले नाहीत तर, देश अशांत झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी यावेळी दिला आहे.
शिवाय केंद्र सरकार वारंवार शेतकऱ्यांच्या भल्याचे कायदे असल्याचे सांगत आहे. मात्र, हे कायदे शेतकऱ्यांच्या भल्याचे असते तर, आजच्या भारत बंदमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले नसते असेही राजू शेट्टी यावेळी म्हणाले.