“स्टॉप टेरेरिझम” चा संदेश देत विश्वविक्रमवीर डॉ.अथर्व गोंधळीने २६/११ या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना सायकल रॅली काढून वाहिली श्रद्धांजली
कोल्हापूर/प्रतिनिधी : २६ नोव्हेंबर २००८ साली मुंबई हॉटेल ताज वर हल्ला करण्यात आला होता या हल्ल्यात अशोक कामटे,विजय साळसकर,हेमंत करकरे,तुकाराम होमबाळे,संदीप उनिकृष्णन आदींनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती.देशासाठी हे सर्व धारातीर्थी पडले होते.या शहीद झालेल्या जवानांना मानवंदना देण्यासाठी विश्व विक्रमवीर डॉक्टर अथर्व गोंधळी यांनी “स्टॉप टेरेरिझम” असा संदेश टोप संभापूर ते जवाहरनगर अशी सायकल रॅली काढून आदरांजली वाहिली.
याच बरोबर बहिरेवाडी येथील जवान हृषीकेश जोंधळे व निगवे खालसा येथील जवान संग्राम पाटील यांना पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात वीरमरण आले होते त्यांनाही अथर्वने यावेळी श्रद्धांजली वाहिली.
टोप संभापूर येथील प्रतिष्ठित व्यक्ती प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते झेंडा दाखवून या सायकल रॅलीस सुरुवात झाली.टोप संभापूर शिरोली हायवे,तावडे हॉटेल मार्गे जवाहरनगर असा मार्ग होता.याठिकाणी आल्यावर डॉ. अथर्वचे तायक्वांदो फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णात जंगम,आशिष कदम यांनी भारताचे संविधान उद्देशिका देऊन स्वागत केले.यावेळी २६/११ च्या घटनेत शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना बहुजनरत्न रामदास आठवले प्रतिष्ठानच्या वतीने कँडल लावून आदरांजली वाहण्यात आली व प्रतिष्ठानचे सचिव अनिल माळवी यांनी प्रशस्तीपत्र देऊन डॉ अथर्वचा सत्कार केला.यावेळी माळवी यांनी डॉ अथर्व चा परिचय करून दिला व लहान वयात अथर्व करत असलेल्या या कार्याचे कौतुक केले. यावेळी डी.वाय. एस. पी स्वाती गायकवाड,विजय साळुंखे,बहुजनरत्न रामदास आठवले प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र शिर्के आदी उपस्थित होते.