Thursday, June 26, 2025
spot_img
Home Blog Page 5

शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलाची दिशा बुधवारी ठरणार

0

शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलाची दिशा बुधवारी ठरणार

कोल्हापूर/प्रतिनिधी : नागपूर -गोवा प्रस्तावित शक्तीपीठ
महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असून या राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या बुधवारी सायंकाळी ६ वाजता राज्यभरातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शक्तीपीठबाधित शेतकऱ्यांची बैठक शुक्रवारी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत अजिंक्यतारा कार्यालयात झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. १२ जिल्ह्यातील बाधीत शेतकरी या बैठकीत सहभागी होणार असून आहेत. शक्तीपीठ महामार्गाविरोधातील हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी शासनाकडून पोलीस यंत्रणेमार्फत वारंवार दबाव सुरु आहे. याला तीव्र विरोध करण्याचा निर्धारही शेतकऱ्यांनी यावेळी केला. यावेळी उद्धवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, गोकुळ दुध संघाचे संचालक बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, भुदरगड कॉंग्रेस नेते राहूल देसाई, सम्राट मोरे (गारगोटी) , सुयोग वाडकर, कृष्णात पाटील (साजणी), संपत देसाई, युवराज शेटे (माणगाव), शिवाजी पाटील ( खेबवडे), आनंदा पाटील ( एंकोडी), युवराज पाटील ( कणेरी), तानाजी भोसले (कणेरीवाडी) , शिवाजी कांबळे( निमशिरगाव) , एस. एन. पाटील, संग्राम पडोणकर आदी उपस्थित होते.

शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलाची दिशा बुधवारी ठरणार

0

शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलाची दिशा बुधवारी ठरणार

कोल्हापूर/प्रतिनिधी : नागपूर -गोवा प्रस्तावित शक्तीपीठ
महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असून या राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या बुधवारी सायंकाळी ६ वाजता राज्यभरातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शक्तीपीठबाधित शेतकऱ्यांची बैठक शुक्रवारी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत अजिंक्यतारा कार्यालयात झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. १२ जिल्ह्यातील बाधीत शेतकरी या बैठकीत सहभागी होणार असून आहेत. शक्तीपीठ महामार्गाविरोधातील हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी शासनाकडून पोलीस यंत्रणेमार्फत वारंवार दबाव सुरु आहे. याला तीव्र विरोध करण्याचा निर्धारही शेतकऱ्यांनी यावेळी केला. यावेळी उद्धवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, गोकुळ दुध संघाचे संचालक बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, भुदरगड कॉंग्रेस नेते राहूल देसाई, सम्राट मोरे (गारगोटी) , सुयोग वाडकर, कृष्णात पाटील (साजणी), संपत देसाई, युवराज शेटे (माणगाव), शिवाजी पाटील ( खेबवडे), आनंदा पाटील ( एंकोडी), युवराज पाटील ( कणेरी), तानाजी भोसले (कणेरीवाडी) , शिवाजी कांबळे( निमशिरगाव) , एस. एन. पाटील, संग्राम पडोणकर आदी उपस्थित होते.

संशोधक घडवताना: डॉ. जिरगे यांचे संपादकीय आणि वैज्ञानिक नेतृत्व – अँसपायर २०२५ सिंगापूरमध्ये भारताची प्रेरणादायी उपस्थिती

0

संशोधक घडवताना: डॉ. जिरगे यांचे संपादकीय आणि वैज्ञानिक नेतृत्व – अँसपायर २०२५ सिंगापूरमध्ये भारताची प्रेरणादायी उपस्थिती

सिंगापूर /प्रतिनिधी : प्रजनन विज्ञानाच्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताचा दबदबा अधिक बळकट करत, अँसपायर संस्थेच्या अधिकृत शास्त्रीय जर्नल Fertility and Reproduction च्या कार्यवाह संपादक डॉ. पद्मा रेखा जिरगे यांचा अँसपायर २०२५ या वार्षिक परिषदेत मानाचा सहभाग असून, ही परिषद १ ते ५ मे २०२५ दरम्यान सिंगापूरमध्ये होत आहे.
ही परिषद महिला आणि पुरुष वंध्यत्वाच्या विविध पैलूंवर केंद्रित असून, उपचार प्रक्रियेत वैद्यकीय तसंच भावनिक व सामाजिक अडचणींचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. या अडचणींवर मात करण्यासाठी नविन संशोधन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नैतिक दृष्टिकोन कसा उपयोगी पडतो, यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होईल.
या परिषदेत डॉ. जिरगे एक विशेष कार्यशाळा घेणार असून, ती शास्त्रीय लेखनातील गुणवत्ता सुधारणा आणि संशोधन जर्नल्ससाठी सक्षम समिक्षक (peer reviewers) घडवण्यावर लक्ष केंद्रित करेल. या उपक्रमामुळे आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील संशोधक आणि नवोदित लेखकांना व्यावहारिक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळणार आहे.
तसेच डॉ. जिरगे दोन महत्त्वपूर्ण वैज्ञानिक सत्रांचे अध्यक्षस्थान भूषवणार असून, ‘Young Awardees’ या विशेष सत्राचेही संचालन करतील. या सत्रातून उदयोन्मुख संशोधकांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या संशोधनाचे सादरीकरण करण्याची संधी मिळेल.डॉ. जिरगे यांची भूमिका केवळ संपादकीय नेतृत्वापुरती मर्यादित नसून, प्रजनन शास्त्र क्षेत्राला वैज्ञानिक आणि नैतिक दृष्टिकोनातून दिशा देणारी ठरत आहे

सकल ब्राह्मण समाजाच्या वतिने श्री भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

0

सकल ब्राह्मण समाजाच्या वतिने श्री भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

कोल्हापूर/प्रतिनिधी : सकल ब्राह्मण समाजाच्या वतिने मंगळवारी श्री भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमीत्त शहरातील प्रमुख मार्गावरुन पालखी सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये समामाजील बंधु-भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थीत होते. दरम्यान मंगलधाम येथे सायंकाळी ७ वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळाही धार्मिक वातावरणात पार पडला.
ब्राह्मण सभा करवीर (मंगळधाम), कोल्हापूर चित्पावन संघ, कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या वतिने दरवर्षी साजरा होणारा भगवान परशुराम जन्मोत्सव व शिवजयंती सोहळा यंदा मात्र काश्मिर हल्याच्या पार्श्वभुमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला. प्रथेनुसार बिनखांबी गणेश मंदिर येथे फुलांनी सजवलेल्या पालखीत श्री परशुरामाच्या पादुका, शिवछत्रपती आणि महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा ठेवण्यात आली. यावेळी जेष्ठ डॉ. नंदकुमार जोशी आणि डॉ. राधिका जोशी यांच्याहस्ते पालखी पुजन करण्यात आले. मंत्रोपचारात, आणि धार्मिक वातावरणात पालखी महाद्वार रोड, ताराबाई रोड, तटाकडील तालीम, निवृत्ती चौक ,कोठीशाळा मार्गे परत मंगलधाम येथे पोहोचली. यानंतर श्रींचा जन्मकाळ सोहळा महिलांच्या उपस्थीतीत पार पडला. त्यानंतर प्रसादाचे वाटप भक्तांना करण्यात आले. दरम्यान सकाळी कत्यायनी येथील श्री परशुराम मंदिर येथे सर्व समाज बांधव भगिनींच्या उपस्थितीत पंचामृत अभिषेक पूजा करण्यात आली.

पाकिस्तानचा निषेध

गेल्या मंगळवारी काश्मिर पेहेलगाम येथे दहशतवादी हल्यान २७ निरपराध लोकांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे यंदा सकल ब्राह्मण समाजाने परशुराम जन्मोत्सव व शिवजयंती साधेपणाने साजरी केली. पण धार्मिक पालखी सोहळ्यात मात्र दहशतवादी तसेच पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा तरुण कार्यकर्त्यांनी दिल्या. तसेच निषेधाचे फलकही लावण्यात आले होते.

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम

0

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम

प्रदूषण नियंत्रण मंडळ व डी वाय पाटील ग्रुपकडून ‘पर्यावरणीय अर्थशास्त्र आणि संधी’ परिषद संपन्न

कोल्हापूर/ प्रतिनिधी : वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे, त्यासाठी स्वत:पासून सुरुवात करावी. पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा पुढाकार आणि सहभाग महत्वाचा असून प्रदूषण नियंत्रणासाठी रिसायकल आणि रियुजवर भर देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी केले.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभाग आणि डी. वाय पाटील ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘पर्यावरणीय अर्थशास्त्र आणि संधी’ या विषयावरील एक दिवसीय परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. हॉटेल सयाजी येथे झालेल्या या परिषदेत ‘टेक, मेक, डिस्पोजल आणि पुन्हा मेक’ हा विचार मांडण्यात आला.
यावेळी बोलताना सिद्धेश कदम म्हणाले, आजची युवा पिढी पर्यावरणासंदर्भातील समस्यांची जाणीव ठेवून नवकल्पनांद्वारे प्रदूषण नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यासाठी कचऱ्याचे पुनर्वापरायोग्य रूपांतरण करून नव्या वस्तू तयार करण्यावर भर दिला पाहिजे. पर्यावरणाचे रक्षण करताना आपण दोन पैसे वाचवू शकतो का? याचा विचार गरजेचा आहे. प्रत्येक गोष्टीचा पुनर्वापर होऊ शकतो. त्यामुळे केवळ खरेदी करा वापरा आणि टाका इतकाच मर्यादित विचार न करता यापुढे
कचऱ्यात टाकलेल्या वस्तूचा देखील पुनर्वापर करा. ‘टेक, मेक, डिस्पोजल आणि पुन्हा मेक’ अशा पद्धतीने काम केले तरच प्रदूषणाला काही प्रमाणात आळा बसू शकेल.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात २१ साखर कारखाने आहेत,हजारो लहान मोठे उद्योग आहेत. इचलकरंजीसारखी कपड्याची बाजारपेठ आहे आणि हा जिल्हा पर्यटनासाठी देखील प्रसिद्ध आहे. मोठ्या प्रमाणावर तयार होणाऱ्या कचऱ्याच्या ९० टक्के रिसायकलिंग होत आहे. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी जिल्ह्यातील विविध घटक काम करत आहे.१४० एमएलडी सांडपाण्यापैकी ११० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा वापरात आणले जाते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने सहकार्य केल्यास भविष्यात कोल्हापूर १०० टक्के प्रदूषण मुक्त शहर म्हणून राज्यात नावलौकिक मिळवेल असा विश्वास ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तांत्रिक सल्लागार नंदकुमार गुरव म्हणाले, प्रत्येक टाकाऊ वस्तूचा पुनर्वापर केला पाहिजे. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणमंडळाच्या वतीने आयोजित परिषदेसाठी डी. वाय. पाटील ग्रुप ने विशेष सहकार्य केल्याबद्दल सिद्धेश कदम यांच्या हस्ते माजी आमदार ऋतुराज पाटील यांचा सन्मान देखील करण्यात आला.
या एकदिवसीय परिषदेत ‘फंडामेंटल ऑफ एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट : हेअर अँड सॉलिड वेस्ट’ आणि ‘फंडामेंटल ऑफ वेस्ट वॉटर मॅनेजमेंट’ या दोन विषयांवर आयआयटी बॉम्बेचे टेक्निकल हेड इंद्रकांत झा यांनी विचार मांडले. ‘एन्व्हायरमेंटल इकॉनोमी :अ रिसायकलर्स जर्नी चॅलेंजेस अँड सक्सेस स्टोरी’ या विषयावर टेक्नो वेस्ट मॅनेजमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण कापसे यांनी तर ‘स्ट्रॅटेजी टू कॉम्बॅक्ट क्लायमेट चेंजेस इन महाराष्ट्र’ या विषयावर वातावरणीय बदल विभागाचे संचालक अभिजीत घोरपडे यांनी मार्गदर्शन केले. डी. वाय. पाटील अभिवादन विद्यापीठाच्या आयक्यूएसी डायरेक्टर डॉ. शिंपा शर्मा यांनी ‘एन्व्हायरमेंटल सस्टनेबिलिटी’ बाबत विचार मांडले. ‘टेक्नोग्रीन सोल्युशन्स’ चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय ओझा यांनी पर्यावरण क्षेत्रातील संधी बाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी प्रास्ताविकामध्ये परिषद आयोजित करण्यामागील भूमिका विषद केली.
यावेळी विविध औद्योगिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, पर्यावरणवादी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी जयवंत हजारे, सहसंचालक रवींद्र आंधळे, सांगलीचे उपविभागीय अधिकारी व्ही. व्ही. किल्लेदार, कोल्हापूरचे उपविभागीय अधिकारी पी.आर. माने, चिपळूणचे उपविभागीय अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, उदय गायकवाड, डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के प्रथापन, सीएचआरओ श्रीलेखा साटम, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. जे ए खोत, डॉ. अजित पाटील यांच्यासह डी. वाय. पाटील ग्रुपमधील विविध संस्थांचे प्राचार्य, प्रमुख अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुरेश भुस्कुटे यांनी सूत्रसंचालन केले तर प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी आभार मानले.

.

कोल्हापुरातील माउंटन एडवेंचर ग्रुप तर्फे तरुण गिर्यारोहकांनी केली पन्हाळा गडाची स्वच्छता

0

कोल्हापुरातील माउंटन एडवेंचर ग्रुप तर्फे तरुण गिर्यारोहकांनी केली पन्हाळा गडाची स्वच्छता

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र दिन आणि दुर्ग दिनानिमित्त कोल्हापुरातील माउंटन एडवेंचर या गिर्यारोही ग्रुप तर्फे पन्हाळा गडावरील अंधारबाव परिसर आणि ऐतिहासिक तटबंदीची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तटबंदीवर वाढलेली झाडे-झुडपे आणि वेली काढून टाकत ऐतिहासिक बांधकामाची स्वच्छता तसेच पर्यटकांनी तटबंदी वरून खाली फेकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि कचरा अशी स्वच्छता केली. अंधारबाव परिसराची स्वच्छता मोहीम अत्यंत अवघड अशा उंचीवर करायची असल्याने गिर्यारोहणासाठी लागणाऱ्या तंत्राचा व साहित्याचा वापर करून, उंचीवरील ही स्वच्छता मोहीम करण्यात आली. ऐतिहासिक वस्तूला धोका निर्माण करणाऱ्या वनस्पती मुळासाहित काढण्यात आल्या. तटबंडीच्या स्वच्छतेमुळे ऐतिहासिक वास्तू उजळल्या आहेत.
यावेळी गिर्यारोहक अनिकेत जुगदार, निखिल यादव, बाबासाहेब जाधव, शिवतेज पाटील, रोहन भंडारी, तुषार पाटील, सुमित बिरमबुले, सार्थक पाटील, प्रशांत पाटील, अखिलेश जाधव, रजत घाटगे, छायाचित्रकार शादाब शेख, प्रेरणा जाधव, श्रीराज गायकवाड, आकाश साळोखे,स्वप्नील माने, सुरज साळुंखे, सचिन स्वखिंडे, सौरभ काकडे, सुरज अडगणी, श्रीवर्धन जाधव, स्नेहा जाधव, या तरुणांनी विशेष परिश्रम घेतले. या मोहिमेत प्रमोद पाटील, विनोद कंबोज, रायडर्स फाउंडेशन, समिट एडवेंचर, सफरनामा ट्रेकिंग, रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन फिनिक्स यांचे सहकार्य लाभले.

गोकुळ’ मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा

0

‘गोकुळ’ मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा

कोल्‍हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कामगार संघटना आणि संघ व्‍यवस्‍थापन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने गोकुळ प्रकल्‍प, गोकुळ शिरगाव येथे १ मे कामगार दिन व महाराष्‍ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे युवा साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते कॉ.उमेश सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी बोलताना कॉम्रेड उमेश सूर्यवंशी म्हणाले कि, महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या स्‍थापनेत व मुंबई शहराच्‍या जडण-घडणीमध्‍ये कामगारांनी अतुलनिय योगदान दिले आहे. गोकुळ दूध संघाने सामाजिक बांधिलकी जपली असून या सगळ्याचे श्रेय गोकुळ दूध संघाशी संलग्न असणारे दूध उत्पादक शेतकरी, दूध संस्था, वाहतूकदार व सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोकुळचा कर्मचारी वर्गाचे आहे. कामगारांनी त्यांचे कर्तव्य प्रामणिकपणे पार पाडून संस्था वाढीसाठी प्रयन्न करावे असे मत युवा साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते कॉ.उमेश सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले यांच्या हस्ते युवा साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते कॉ.उमेश सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कॉ.संदेश पाटील यांनी केले तर आभार कॉ. शाहीर सदाशिव निकम यांनी मानले.
यावेळी कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, महाव्यवस्थापक (डेअरी) अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, व्यवस्थापक (खरेदी) मोळक, विभाग प्रमुख (स्टोअर) सुनिल कारंडे, संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ.सदाशिव निकम, अध्यक्ष कॉ.मल्हार पाटील, कॉ.व्ही.डी.पाटील, कॉ.लक्ष्मण पाटील, कॉ.अशोक पुणेकर, कॉ.दत्ता बच्चे, कॉ.संदेश पाटील, कॉ.संभाजी शेलार, कॉ.लक्ष्मण आढाव, कॉ.योगेश चौगुले, कॉ.कृष्णा चौगुले व संघटनेचे अधिकारी पदाधिकारी, कर्मचारी आदि उपस्थित होते.

क्रिकेट मैदान विकसित करण्यास महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे आर्थिक व तांत्रीक सहाय्य

0

कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिग हाऊस संचलीत न्यु इन्स्टीटयुट ऑफ टेक्नाॅलाॅजी कॉलेज चे क्रिकेट मैदान विकसित करण्यास महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे आर्थिक व तांत्रीक सहाय्य

कोल्हापूर येथे किक्रेट मैदान विकसीत होणार

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र क्रिकेट असोसएशनचे (एमसीए) अध्यक्ष आमदार श्री. रोहितदादा पवार, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसएशनचे (केडीसीए) अध्यक्ष माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिग हाऊसचे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांच्या संयुक्तीक प्रयत्नामुळे कोल्हापूर येथे किक्रेट मैदान विकसीत होणार आहे
आज दि २८ एप्रिल २०२५ रोजी हाॅटेल सयाजी येथे झालेल्या संयुक्तीक समारंभा मध्ये कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसएशनचे (केडीसीए) अध्यक्ष माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिग हाऊसचे चेअरमन मा डॉ. के. जी. पाटील यांच्या उपस्थिती मध्ये मैदानाच्या विकासाबाबतचा समझोता (MoU) करारा वर स्वाक्षरी करण्यात आल्या.
एमसीएने राज्यभर क्रिकेटसाठी मैदाने विकसित करण्याचे नवीन धोरण निश्चित केले आहे| याच धोरणांतर्गत, कोल्हापूरातील न्यु इन्स्टीटयुट ऑफ टेक्नाॅलाॅजी काॅलेज, उंचगाव येथील मैदानाच्या विकासासाठी रू ७५ लाखा पर्यतचे आर्थीक सहाय्य व मैदाना साठी लागणारी तांत्रीक मशनरी मुख्यत्वे खेळपटृटी साठीचा रोलर, ग्रास कटर, लाॅन मुव्हर इत्यादी साहीत्य पुरवण्याचे मान्य केले आहे एमसीएचे सेक्रेटरी ॲड श्री.कमलेश पिसाळ, न्यु इन्स्टीटयुट ऑफ टेक्नाॅलाॅजी काॅलेजचे डायरेक्टर डॉ संजय दाभोळे आणि केडीसीएचे माजी अध्यक्ष श्री आर ए (बाळ) पाटणकर यांच्या प्रयत्नामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात येत आहे
या मैदाना मुळे राज्यस्तरीय निमंत्रीत क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करणे सुलभ होईल तसेच खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध होतील त्यामुळे कोल्हापुरातील पुरूष आणि महिला खेळाडूंना विशेषत: ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जात्मक प्रगती साधता येईल या समझोता (MoU) करारा प्रसंगी केडीसीएचे उपाध्यक्ष मा.अभिजीत भोसले सेक्रेटरी मा शीतल भोसले सह सेक्रेटरी मा मदन शेळके व संचालक मंडळ उपस्थितीत होते
हे मैदान विकसीत झाल्यानंतर केडीसीएच्या अंतर्गत तसेच एमसीएच्या निमंत्रित व इतर विविध स्पर्धा आयोजन प्रभावीपणे करता येणार आहे या प्रकल्पाला केडीसीएचे माजी अध्यक्ष श्री. ऋतुराज इंगळे, माजी सेक्रेटरी श्री केदार गयावळ व ज्येष्ठ खेळाडू रमेश हजारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे रोटरी व्होकेशनल सर्विस अवॉर्ड कार्यक्रम उत्साहात

0

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे रोटरी व्होकेशनल सर्विस अवॉर्ड कार्यक्रम उत्साहात

कोल्हापूर/प्रतिनिधी : सचोटीने वागा ; जग तुमची किंमत करेल, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी केले. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे आयोजित रोटरी व्होकेशनल सर्विस अवॉर्ड कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी संपत खिलारी उपस्थित होते.
डॉ.लवटे पुढे म्हणाले , समाजासाठी प्रामाणिकपणे योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सत्कार करून रोटरी सेंट्रलने समाजातील चांगुलपणाला बळ दिले आहे. रोटरी सेंट्रलची कौतुकाची थाप ही नव्या उमेदीने या सर्वांना काम करण्यासाठी प्रेरणा देईल, असेही त्यांनी सांगितले.उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांनी सांगितले की, पुरस्कार विजेत्यांचे कार्य आणि वय यांचे वैविध्य साधून रोटरी सेंट्रलने सामाजिक कार्य करणाऱ्यांचा जणू स्नेह मेळावा आयोजित केला आहे . प्रशासकीय सेवेतील बऱ्याच वर्षात काळात असा परिपूर्ण कार्यक्रम अनुभवता आल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात तेज कुरिअरच्या सौ. साधना घाटगे,रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून कार्यरत असणारे डॉ.विजय करंडे, सचोटीने व्यवसाय करून लोकांना सेवा देणाऱ्या श्रीमती मालन सोलप, ब्लड प्लेटलेट डोनर श्री. सागर पोतनीस, वृक्ष संवर्धनासाठी कार्यरत वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी तत्पर बावडा रेस्क्यू फोर्स, स्त्रीभ्रूणहत्या आणि बोगस डॉक्टर या विरोधात खमकी भूमिका घेणाऱ्या गीता हसूरकर, वीटभट्टी आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत उमेद फाउंडेशन, पर्यावरण ,आरोग्य, रस्ता सुरक्षा यासाठी काम करणाऱ्या मुलींची ड्रीम टीम फाउंडेशन , अंध मुलांना प्रशिक्षण देऊन टुरिस्ट गाईड बनविणारे वसीम सरकवास यांना गौरवण्यात आले.
प्रास्ताविक क्लब कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले.क्लब प्रेसिडेंट संजय भगत यांनी रोटरी सेंट्रलच्या वर्षभरातील उपक्रमांची माहिती दिली.यावेळी सेक्रेटरी रवींद्र खोत यांच्यासह अवॉर्ड कमिटी मेंबर राजेश आडके, संजय कदम, संग्राम सरनोबत, रोटरॅक्ट सेंट्रलचे प्रेसिडेंट अनिकेत सावंत,चैत्राली शिंदे यांच्यासह रोटरी सेंट्रलचे सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले तर आभार भूमी मोळे हिने मानले.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्यावतीने ‘डब्ल्यूसी अँम्पिकॉन’ आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

0

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्यावतीने
‘डब्ल्यूसी अँम्पिकॉन’ आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लनरी रिसर्चच्या वैद्यकीय भौतिकशास्त्र विभागाच्यावतीने असोसिएशन ऑफ मेडिकल फिजिसिस्ट्स ऑफ इंडियाच्या सहकार्याने ‘डब्ल्यूसी अँम्पिकॉन २०२५’ ही आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न झाली. या परिषदेत देशभरातील २५० हून अधिक वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, अणुऊर्जा नियामक मंडळ, भाभा अणुसंशोधन केंद्र यांचे तज्ज्ञ आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.
हॉटेल सयाजी येथे २६ आणि २७ एप्रिल रोजी रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेचे उद्घाटन इंदिरा गांधी सेंटर फॉर अँटोमिक रिसर्च, कल्पकमचे माजी संचालक आणि प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांच्या हस्ते झाले. डॉ. भोजे यांनी खाणकाम क्षेत्रातील कामगारांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका आणि अत्याधुनिक किरणोत्सर्ग उपचार पद्धती याबाबत मार्गदर्शन केले.
वैद्यकीय भौतिकशास्त्र क्षेत्रात नवीन संशोधन आणि तंत्रज्ञान याबाबत या परिषदेत मार्गदर्शन करण्यात आले. परिषदेमध्ये ड्युअल एनर्जी सिटी, एमार लीनॅक, इमेज सिंथेसिस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर संशोधन सादर करण्यात आले. तसेच पीएसक्यूए, टोटल बॉडी ईरॅडीएशन (टीबीआय) आणि टोटल मॅरो अँड लिम्फोईड ईरॅडीएशन (टीएमएलआय) या विषयांवर पॅनेल चर्चासत्र आयोजित करण्यात आले. २७ एप्रिल रोजी कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे टीबीआय आणि टीएमएलआय विषयावर विशेष कार्यशाळा पार पडली. यावेळीसंयोजक श्री. थिरुनवुक्करासू मणि यांनी प्रत्यक्ष हाताळणीसह प्रशिक्षण दिले.
कोल्हापूर कॅन्सर सेंटर, श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल, अँस्टर आधार हॉस्पिटल, होरायझन हॉस्पिटल आणि शिव कॅन्सर इन्स्टिट्यूट हे परिषदेचे सहप्रायोजक होते. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.