Friday, June 27, 2025
spot_img
Home Blog Page 11

भारतीय इतिहास संकलन समितिचे इतिहास परिषद संपन्न

0

भारतीय इतिहास संकलन समितिचे इतिहास परिषद संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेच्या माध्यमातून भारताच्या विविध प्रांतातील इतिहासाचे वस्तुनिष्ठ पुनलेखन करण्याची संकल्पना अंमलात आणली जाते. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक प्रांतात एक स्वतंत्र संघटन तयार करण्यात आले, आणि त्याला इतिहास संकलन समिती असे संबोधन देण्यात आले. कोल्हापूरच्या इतिहासाचा व्यापक अभ्यास करण्यासाठी इतिहास संकलन समिती कोल्हापूरची स्थापना दिनांक २३ डिसेबर २००८ रोजी मा. हरिभाऊ वझे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. अर्थात यापूर्वीपासूनच या दिशेने कोल्हापूरात काम सुरु झालेले होतेच. ज्येष्ठ प्रचारक के राजाभाउ भोसले यांच्या पुढाकारातून आणि श्री भा. शि. इंदुलकर, श्री जगदीश धर्माधिकारी, सी पेठे, विद्याधर कुलकर्णी या ज्येष्ठ मंडळींनी या कार्याची मुहुर्तमेढ तीन चार वर्षापूर्वीच रोवली होती थी राजाभाउंच्या निधनानंतर कार्याची गती मंदावली. डॉ. आनंद दामले यांच्याकडे कोल्हापूर समितीच्या पुनर्गठनायी जबाबदारी सोपविण्यात आली. वामले सरांनी कुशलतापूर्वक अनेक नवीन कार्यकर्ते एकत्र केले आणि काही बैठका झाल्यानंतर अधिकृतपणे समिती स्थापन झाली.

अध्यक्ष प्रि अमरसिंह राणे सर, उपाध्यक्ष डॉ. बी.डी. खणे, सचिव डॉ. आनंद दामले. सहसचिव उमाकांत राणिगा, सहसचिव प्रसन्न मालेकर या प्रमुख कार्यकारिणी बरोबरच डॉ. आरेन हर्डीकर. प्रा. लक्ष्मणराव खोत, श्री अ.व. करवीरकर, डॉ. अमर आडके, प्रा.अ.रा. जयतीर्थ, श्री शशीकांत सोळांकुरकर अशी सर्व क्षेत्रातील मंडळी समितीत येत गेली. महिला वर्गातूनपण चांगला प्रतिसाद मिळाला. डॉ. सुप्रिया जोशी, श्रीमती अरुणा देशपांडे. डॉ. नीला जोशी, सी वैशाली गोखले अशा मान्यवर विदुषी समितीला जोडल्या गेल्या. एक उत्तम संघटन तयार झाले.

पैठण आणि नासिक या प्राचीन शहरांच्या इतिहासाचा अभ्यास, चर्चासत्र, संपादन आणि ग्रंथप्रकाशन या क्रमाने अखिल भारतीय पातळीवरील संकल्पानुसार काम झालेले होते. आता कोल्हापूच्या इतिहासग्रंथाची सिद्धता करण्याची जबाबदारी कोल्हापूर समितीने स्वीकारली. विषय निश्चिती. त्या त्या विषयावरील तज्ञ अभ्यासकांचा शोध घेणे, आर्थिक नियोजन, चर्चासत्राची रचना व पूर्वतयारी या सर्व बाबी समितीने समर्थपणे पेलल्या, कोल्हापुरातील भालजी पेंढारकर सांस्कृतिक भवन या ठिकाणी आदरणीय डॉ. गो.वं देगलूरकर सरांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवसाचे राज्य पातळीवरील चर्चासत्र यशस्वीपणे संपन्न झाले. दि.९.१०, व ११ ऑक्टोबर २००९ या तीन दिवस चाललेल्या चर्चासत्राला अभूतपूर्व यश मिळाले. सोबतच कोल्हापूरातील ज्येष्ठ चित्रकार रविंद्र मेस्त्री यांनी चितारलेल्या छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर आधारित चित्रकृतीचे आणि श्री शशिकांत सोळांकुरकर याच्या संग्रहातील दुर्मिळ प्राचीन नाण्यांचे प्रदर्शनही मांडण्यात आले.

चर्चासत्राच्या यशानंतर ग्रंथसिद्धतेची तयारी जोरात सुरु झाली. चर्चासत्राच्या निमित्ताने अनेक मान्यवर अभ्यासक आणि विद्वान मंडळी समितीशी जोडली गेली. सर्वाच्या अथक परिश्रमातून ‘युगयुगीन करवीर, इतिहासदर्शन’ हा ग्रंथ दि.३१ ऑक्टोबर २०१० या दिवशी मोठ्या दिमाखात प्रकाशित झाला. प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षपदी करवीरचे छत्रपती श्रीमंत शाहु महाराज आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एन.जे. पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या समारंभासाठीडॉ. देगलूरकर सर, डॉ. चिं. ना. परचुरे, श्री विजय कुवळेकर यासारख्या मान्यवरांचा सहभाग कार्यक्रमाची उंची वाढविणारा ठरला. सुमारे ४०० पृष्ठसंख्या असलेल्या या संदर्भग्रंथाचे प्रकाशनपूर्व नोंदणीमुल्य रु /१०० इतके नाममात्र ठेवल्यामुळे अल्पावधीतच सर्व आवृतीचे वितरण पूर्ण झाले. इतिहासप्रेमींच्या उदंड प्रतिसादामुळे या संथाची दुसरी आवृती प्रकाशित करण्याचा योग आला. त्यावेळी काही नवीन विषयांवरील लेखांचा समावेश करून दि.८ फेब्रुवारी २०१४ या दिवशी श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांच्याच अध्यक्षतेखाली महामहीम पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (राज्यपाल, बिहार) यांच्या शुभहस्ते आणि डॉ.बी.एम. हिंडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दुसरी आवृती प्रकाशित झाली. अल्पावधीतच या आवृत्तीच्या १००० प्रतीपण संपल्या. समितीच्या एकजुटीचे आणि परिश्रमाचे हे उत्तम उदाहरण ठरले. इतकेच नव्हे तर हा ग्रंथ अनेक ठिकाणी संदर्भग्रंथ म्हणून उपयोगात आणला गेला, या यशामुळे समितीचा आत्मविश्वास वाढण्यास मोठीच मदत झाली.

याबरोबरच समितीच्या वतीने इतिहासाशी संबंधित व्याख्यानांचे पण वेळोवेळी नियोजन करण्यात आले. दि १२ एप्रिल या दिवशी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वसंतराव मोरे सरांचे ‘पानपतचा रणसंग्राम, एक तेजस्वी शौर्यगाथा’ या विषयावर व्याख्यान झाले. मान. श्री हरिभाउ वझे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. आपल्या समितीचे

अनॆक फेस्टिवलमध्ये गाजलेला “फॉलोअर” २१ मार्चला चित्रपटगृहात

0

अनॆक फेस्टिवलमध्ये गाजलेला “फॉलोअर” २१ मार्चला चित्रपटगृहात

“बेळगाव सीमा वादावर प्रकाश टाकणारी तीन मित्रांची रंजक कथा सांगणार “फॉलोअर”

“फॉलोअर” मध्ये  मराठी, कन्नडा आणि हिंदी भाषेचे अनोखे मिश्रण

कोल्हापूर/प्रतिनिधी : आजवर अनेक फिल्म फेस्टिवल आणि प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियर झालेला “फॉलोअर” हा चित्रपट येत्या २१ मार्चला प्रदर्शित होणार आहे.  नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर हे सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. मराठी, कन्नडा आणि हिंदी या तिन्ही भाषेचे मिश्रण आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात तसेच बेळगाव, बंगलोर येथेही एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे.  
‘फॉलोअर’ची निर्मिती ऑरेंजपिक्सेल स्टुडिओज आणि व्हिस्का फिल्म्स यांनी हमारा मीडिया लॅब्स आणि कॉजॅलिटी फिल्म्स प्रोडक्शन यांच्या सहकार्याने केली आहे. विनय मिश्रा, प्रीती अली, प्रतीक मोइत्रो, अनुभव केआर, पल्लवी रोहतगी, मौलिक शर्मा, चारुलता मैत्र, हर्षद नलावडे  हे या चित्रपटाचे निर्माते असून राघवन भारद्वाज. चरण सुवर्णा आणि अभिषेक गौतम हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन हर्षद नलावडे यांचे असून मुख्य भूमिका ही त्यांनीच निभावली असून रघु बसरीमारद, डोना मुन्शी यांच्यासह प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे. साकेत ग्यानी यांनी छायाचित्रण, मौलिक शर्मा संकलक, सम्यक सिंग यांनी लिहिलेल्या गीतांना सम्यक सिंग आणि अभिज्ञान अरोरा यांचे संगीत लाभले असून ही गाणी सम्यक सिंग यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आली आहेत.अनेक दशकांपासून प्रादेशिक आणि भाषिक तणावाच्या केंद्रस्थानी असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील दीर्घकालीन आणि गुंतागुंतीच्या बेळगाव सीमा वादावर प्रकाश टाकतो.

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ” फार्मइनव्हेन्शीया २०२५ नॅशनल लेव्हल मॉडेल प्रेझेन्टेशन” स्पर्धा संपन्न

0

“भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ” फार्मइनव्हेन्शीया २०२५ नॅशनल लेव्हल मॉडेल प्रेझेन्टेशन” स्पर्धा संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल, कोल्हापूर येथे गुरूवार दि. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिलच्या अंतगर्त डिप्लोमा व बी. फार्म विद्यार्थ्यांच्यासाठी “फार्मइनव्हेन्शीया २०२५ नॅशनल लेव्हल मॉडेल प्रेझेन्टेशन” स्पर्धे चे आयोजन करण्यात आले, ही स्पर्धा विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मॉडेल्सवर आधारित होती.
या स्पर्धेचे उदद्याटन महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे सर, उपप्राचार्य डॉ. एम. एस. भाटीया सर, आयसीसी प्रेसिडेन्ट प्रा. डॉ. प्रफुल्ल चौधरी, प्रा. विशिन पाटील, प्रा. पुजा केनवडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
डॉ. एच. एन मोरे सर यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्व सांगीतले की, विज्ञानाच्या फायद्यांबददल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी विज्ञान दिवस साजरा केला जातो. ही स्पर्धा रिसर्चसाठी व कौशल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्त्याचा विद्यार्थी आणि शिक्षक यांनी उपयोग करावा. एकविसावे शतक हे डिजिटलायझेशन आणि संशोधनावर भर देणारे आहे.
या स्पर्धेसाठी ११० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यकमाचे परिक्षक म्हणून डॉ. राहुल अडनाईक उपप्राचार्य, आनंदी कॉलेज कळे, डॉ. अभिनंदन पाटील असोसिएट प्रोपेसर, डॉ. डि. वाय. पाटील कॉलेज कोल्हापूर यांनी काम पाहीले फार्मइनव्हेन्शीया २०२५ नॅशनल लेव्हल मॉडेल प्रेझेन्टेशन स्पर्धेच्या डिप्लोमा विभागातून प्रथम कमांकाच्या मानकरी कु. राजनंदिनी पाटील आनंदी कॉलेज कोल्हापूर व कु. निकीता नाले काळंबे ट्रर्फ कळे व डिप्लोमा व्दीतीय विजेती कु. श्रेया पवार व दिक्षा पाटील भारती विद्यापीठ डिप्लोमा कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर शाखेच्या विद्यार्थीनी तर बी. फार्म स्पर्धेच्या प्रथम कमांकाची विजेती कु. सानिका जाधव आप्पासाहेव बिरनाळे कॉलेज सांगली, व्दीतीय विजेती कु. साक्षी सुर्यवंशी भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी पलुस, उत्तेजनार्थ कु सुप्रीया तळकर भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर शाखेची विद्यार्थीनी.
कार्यकमाचे मुख्य समन्वयक म्हणून प्राध्यापक सौ विशिन पाटील व कार्यकमाचे सह समन्वयक म्हणून प्रा.पी.बी. केनवडे यांनी काम पाहीले, कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे सर, उपप्राचार्य डॉ. एम. एस. भाटीया, प्रा. आर. जे. जरग, प्रा.डॉ. डी. ए. भागवत, डॉ. एफ.ए. तांबोळी, प्रा.पी. पी. चौधरी, प्रा. विशिन पाटील, कार्यलयीन अधिक्षक श्री. सचिन पाटील, श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, श्री. किशोर हराळे, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जीवनात सेवा करण्याची संधी सोडू नका : डॉ. बी एम हिर्डेकर डी. वाय.पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या विद्यार्थ्यांचे निगवे खालसा येथे श्रमसंस्कार शिबीर संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या सामजिक जाणीवा समृद्ध होतील. या माध्यमातून आपल्याला सेवा भावाची शिकवण मिळत असून आपली जडण घडण ज्या समाजात होते त्या समाजाची सेवा करण्याची संधी कधीही सोडू नका, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी एम हिर्डेकर यानी केले. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या विद्यार्थ्यांचे निवासी श्रम संस्कार शिबीर निगवे खालसा (ता. करवीर) येथे संपत्र झाले. या शिबिराच्या समारोपावेळी डॉ. हिर्डेकर यानी सेवेचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य रुधीर बारदेस्कर व एनएसएस विभाग प्रमुख रुबेन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निगवे खालसा गावात स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, योग प्रात्यक्षिके, प्रबोधनात्मक व्याख्याने आदी उपक्रम पार पडले. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, विद्यार्थी कल्याण विभाग संचालक अद्वैत राठोड , प्राचार्य रुधीर बारदेसकर, सरपंच ज्योती दीपक कांबळे , उपसरपंच शिवाजी गणपत पाटील, शाळेचे मुख्याध्यापक बी. जी. खोत, बिद्री साखर कारखाना संचालक आर. एस. कांबळे व एस. आर. पाटील यांच्या उपस्थित या शिबिराचे उद्घाटन झाले. या शिबिर कालावधीत गावामध्ये स्वछता अभियान, आरोग्य तपासणी, विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, प्रथमोपचार, पोषण आहार याबाबत मार्गदर्शन, डी वाय पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून रक्तदान शिबीर, फ़िजिओथेरपि शिबीराचे आयोजन करण्यात आले. एनएसएस विद्यार्थ्यांनी महिलांसाठी पाककला, बेकरी पदार्थ प्रशिक्षण घेतले. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध स्पर्धाही घेण्यात आली. शिबीर काळात विविध प्रबोधनात्मक व्याख्याने, करियर संधी यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ युवराज मोटे यांनी भौगालिक पर्यावरणाचे बदलते स्वरूप, डॉ राम पवार यांचे व्यायाम योगाभ्यास व आत्म संरक्षण, डॉ सयाजीराव गायकवाड यांचे वाचन संस्कृती, अर्थ साक्षरता, डॉ. आर एस पाटील यांचे राष्ट्रीय सेवा उपक्रम महत्व या विषयी व्याख्यान झाले. प्राचार्य रुधीर बारदेस्कर, प्रा. रुबेन काळे, सुरज यादव, रोहन हवालदार, स्वप्नील सरदेसाई यांनी शिबिर यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. या उपक्रमासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव व्ही व्ही भोसले, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. अद्वैत राठोड यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

0

जीवनात सेवा करण्याची संधी सोडू नका : डॉ. बी एम हिर्डेकर

डी. वाय.पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या विद्यार्थ्यांचे निगवे खालसा येथे श्रमसंस्कार शिबीर संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या सामजिक जाणीवा समृद्ध होतील. या माध्यमातून आपल्याला सेवा भावाची शिकवण मिळत असून आपली जडण घडण ज्या समाजात होते त्या समाजाची सेवा करण्याची संधी कधीही सोडू नका, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी एम हिर्डेकर यानी केले. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या विद्यार्थ्यांचे निवासी श्रम संस्कार शिबीर निगवे खालसा (ता. करवीर) येथे संपत्र झाले. या शिबिराच्या समारोपावेळी डॉ. हिर्डेकर यानी सेवेचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य रुधीर बारदेस्कर व एनएसएस विभाग प्रमुख रुबेन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निगवे खालसा गावात स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, योग प्रात्यक्षिके, प्रबोधनात्मक व्याख्याने आदी उपक्रम पार पडले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, विद्यार्थी कल्याण विभाग संचालक अद्वैत राठोड , प्राचार्य रुधीर बारदेसकर, सरपंच ज्योती दीपक कांबळे , उपसरपंच शिवाजी गणपत पाटील, शाळेचे मुख्याध्यापक बी. जी. खोत, बिद्री साखर कारखाना संचालक आर. एस. कांबळे व एस. आर. पाटील यांच्या उपस्थित या शिबिराचे उद्घाटन झाले. या शिबिर कालावधीत गावामध्ये स्वछता अभियान, आरोग्य तपासणी, विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, प्रथमोपचार, पोषण आहार याबाबत मार्गदर्शन, डी वाय पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून रक्तदान शिबीर, फ़िजिओथेरपि शिबीराचे आयोजन करण्यात आले. एनएसएस विद्यार्थ्यांनी महिलांसाठी पाककला, बेकरी पदार्थ प्रशिक्षण घेतले. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध स्पर्धाही घेण्यात आली. शिबीर काळात विविध प्रबोधनात्मक व्याख्याने, करियर संधी यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ युवराज मोटे यांनी भौगालिक पर्यावरणाचे बदलते स्वरूप, डॉ राम पवार यांचे व्यायाम योगाभ्यास व आत्म संरक्षण, डॉ सयाजीराव गायकवाड यांचे वाचन संस्कृती, अर्थ साक्षरता, डॉ. आर एस पाटील यांचे राष्ट्रीय सेवा उपक्रम महत्व या विषयी व्याख्यान झाले.
प्राचार्य रुधीर बारदेस्कर, प्रा. रुबेन काळे, सुरज यादव, रोहन हवालदार, स्वप्नील सरदेसाई यांनी शिबिर यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. या उपक्रमासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव व्ही व्ही भोसले, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. अद्वैत राठोड यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

डी. वाय.पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या विद्यार्थ्यांचे निगवे खालसा येथे श्रमसंस्कार शिबीर संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या सामजिक जाणीवा समृद्ध होतील. या माध्यमातून आपल्याला सेवा भावाची शिकवण मिळत असून आपली जडण घडण ज्या समाजात होते त्या समाजाची सेवा करण्याची संधी कधीही सोडू नका, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी एम हिर्डेकर यानी केले. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या विद्यार्थ्यांचे निवासी श्रम संस्कार शिबीर निगवे खालसा (ता. करवीर) येथे संपत्र झाले. या शिबिराच्या समारोपावेळी डॉ. हिर्डेकर यानी सेवेचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य रुधीर बारदेस्कर व एनएसएस विभाग प्रमुख रुबेन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निगवे खालसा गावात स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, योग प्रात्यक्षिके, प्रबोधनात्मक व्याख्याने आदी उपक्रम पार पडले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, विद्यार्थी कल्याण विभाग संचालक अद्वैत राठोड , प्राचार्य रुधीर बारदेसकर, सरपंच ज्योती दीपक कांबळे , उपसरपंच शिवाजी गणपत पाटील, शाळेचे मुख्याध्यापक बी. जी. खोत, बिद्री साखर कारखाना संचालक आर. एस. कांबळे व एस. आर. पाटील यांच्या उपस्थित या शिबिराचे उद्घाटन झाले. या शिबिर कालावधीत गावामध्ये स्वछता अभियान, आरोग्य तपासणी, विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, प्रथमोपचार, पोषण आहार याबाबत मार्गदर्शन, डी वाय पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून रक्तदान शिबीर, फ़िजिओथेरपि शिबीराचे आयोजन करण्यात आले. एनएसएस विद्यार्थ्यांनी महिलांसाठी पाककला, बेकरी पदार्थ प्रशिक्षण घेतले. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध स्पर्धाही घेण्यात आली. शिबीर काळात विविध प्रबोधनात्मक व्याख्याने, करियर संधी यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ युवराज मोटे यांनी भौगालिक पर्यावरणाचे बदलते स्वरूप, डॉ राम पवार यांचे व्यायाम योगाभ्यास व आत्म संरक्षण, डॉ सयाजीराव गायकवाड यांचे वाचन संस्कृती, अर्थ साक्षरता, डॉ. आर एस पाटील यांचे राष्ट्रीय सेवा उपक्रम महत्व या विषयी व्याख्यान झाले.
प्राचार्य रुधीर बारदेस्कर, प्रा. रुबेन काळे, सुरज यादव, रोहन हवालदार, स्वप्नील सरदेसाई यांनी शिबिर यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. या उपक्रमासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव व्ही व्ही भोसले, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. अद्वैत राठोड यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

विन्सच्या सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नूतन इमारतीचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू यांची माहिती

0

विन्सच्या सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नूतन इमारतीचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन
सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू यांची माहिती

कोल्हापूर / प्रतिनिधी: गेली ६५ वर्षे वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर असणारे आणि अखंडितपणे रुग्णसेवा देणारे विन्स हॉस्पिटल आता अधिक सुसज्ज आणि विस्तारित मल्टीस्पेशालिटी सुविधांसह तयार आहे. या नव्या सुसज्ज इमारतीचे उद्घाटन सोहळा येत्या गुरुवारी, ६ मार्च २०२५ रोजी, सायंकाळी ४:०० वाजता महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व इतर मान्यवर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
या नव्या इमारतीत २२० सर्व सोयींनीयुक्त बेड्स असलेले अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. येथे आंतररुग्ण चिकित्सा,क्रिटिकल केअर, अॅडव्हान्स अॅक्सिडेंट आणि ट्रॉमा केअर, इमर्जन्सी मेडिसिन ट्रामा, हृदयरोग आणि हृदयरोग शस्त्रक्रिया, त्वचारोग, प्लास्टिक, एस्थेटिक आणि पुनर्रचना शस्त्रक्रिया,एन्डोस्कोपिक स्पाइन सर्जरी, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, न्यूरोसर्जरी, जनरल आणि लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, किडनी विकार, मूत्र विकार, प्रसूती व स्त्रीरोगशास्त्र, ऑर्थोपेडिक्स, बालरोग, कॅन्सरसह जोखमीच्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अशा विविध विभागांसह तज्ञ डॉक्टरांची पूर्णवेळ उपलब्धता असणार आहे. एकाच छताखाली जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सेवा आणि सुविधा पुरवणारे हे हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेसाठी सुसज्ज आहे. अशी माहिती विन्स हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू आणि डॉ. सुजाता प्रभू यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या रुग्णालयाचे व्यवस्थापन डॉ.व्यकंट होळसंबरे (ग्रुप सीईओ), श्री. संदीप वनमाळी (सीईओ) आणि त्यांच्या टीमकडे सोपवण्यात आले आहे. या टीमला भारतातील प्रसिद्ध कॉर्पोरेट रुग्णालयांच्या व्यवस्थापनाचा सुमारे २६ वर्षांचा अनुभव आहे.
डॉ.प्रभू पुढे म्हणाले , ६ मार्च रोजी होणाऱ्या उद्घाटन समारंभात तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आ. अमल महाडिक, आ. सतेज पाटील, आ. राजेश क्षीरसागर, आ. अशोकराव माने, आ. राजेंद्र पाटील यड्रावकर, आ. विनय कोरे, आ. चंद्रदीप नरके, आ. राहुल आवाडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
कोल्हापूरात उभारण्यात आलेल्या या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध विकारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची तपासणी, निदान आणि अत्याधुनिक उपचारांसह एआय टेलिमेडिसीन व भविष्यकाळात रोबोटिक शस्त्रक्रिया, अवयव प्रत्यारोपन शस्त्रक्रिया यांसारख्या आधुनिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. विन्स हॉस्पिटलने वैद्यकीय क्षेत्रात हे एक पुढचे पाऊल उचलले असून, पश्चिम महाराष्ष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.
पत्रकार परिषदेस न्यूरोसर्जन डॉ. आकाश प्रभू, डॉ. डीओना प्रभू,डॉ. संदीप पाटील, व्यंकट होळसंबे, संदीप वनमाळी, चिन्मय ठक्कर, दामोदर घोलकर ,आदी उपस्थित होते.

सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मेसीचे अश्वमेध- वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

0

सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मेसीचे अश्वमेध- वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : आर. एल. तावडे फाउंडेशनचे, सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मेसीचे अश्वमेध- वार्षिक स्नेहसंमेलन जय पॅलेस कळंबा, येथे उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथींनी संस्थेचे दिवंगत अध्यक्ष कै. किशोर तावडे यांच्या प्र्तीमेला हार घालून अभिवादन केले व दीपप्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन केले.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. मंगेश पाटील अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मौर्या ग्रूप कोल्हापूर व सन्माननीय अतिथी म्हणून मा. चंद्रशेखर सिंघ सिनियर सहसंचालक हस्तकला वस्त्रोद्योग विभाग, भारत सरकार हे उपस्थित होते. यावेळी बोलताना मा. मंगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करणारे विचार व व्यवसायाच्या अनेक संधी बद्दल मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी श्री. चंद्रशेखर सिंघ यांनी विद्यार्थ्यांना कष्टाचे महत्त्व, शिस्त व यशाचे मार्ग याचे महत्व सांगितले. महाविद्यालयाच्या सचिव मा. शोभा तावडे यांनी विद्यार्थ्यांना ” योग्य वेळी आपल्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ मिळते असे संबोधन केले.” यावेळी प्राचार्य डॉ. राजकुमार बगली यांनी सर्व प्रमुख अतिथींचे स्वागत केले आणि महाविद्यालयाच्या वार्षिक अहवालाचा आढावा घेतला आणि नमूद केले कि, “महाविद्यालयाच्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न चालू आहेत.” महाविद्यालयाचे संचालक डॉ. ए . आर. कुलकर्णी यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील प्रगतीबद्दल आनंद व्यक्त केला. सदर स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, नाटक, आणि काव्यवाचन या विविध क्षेत्रात आपल्या कला कौशल्यांची प्रचिती दिली. सदर कार्यक्रमासाठी परिक्षक म्हणून सौ. अनुजा मजली- गायन, सौ. केतकी पाटील- नृत्य, आणि प्राध्यापिका सौ. ज्योती हिरेमठ- फॅशन शो साठी परीक्षक म्हणून लाभले. विशेष अतिथि डॉ. आर आर हिरेमठ, प्राचार्य के. डी. सी. ए. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मेसी, कोल्हापूर यांची उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांनी परिपूर्ण विकासासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावे असे नमूद केले व विविध पारितोषिकांचे वितरण केले. सदरचे स्नेहसंमेलन यशस्वी करण्याकरीता सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. उद्धव अतकिरे, प्रा. साक्षी माने, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्र संचालन प्रा. अमोल दीक्षित आणि प्रा. निशिता वाणी यानी केले. प्रा. साक्षी माने यानी सर्वांचे आभार मानले.

८ मार्च जागतिक महिला दिनी कोल्हापुरात परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज येणार

0

८ मार्च जागतिक महिला दिनी कोल्हापुरात परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज येणार

गांधी मैदान येथे महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र तर्फे राज्यस्तरीय महासंमेलनाचे आयोजन,पार पडणार कुंकूमार्चन सोहळा

कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय महिला दिनी शनिवार दिनांक ८ मार्च २०२५ रोजी महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्रातील माता भगिनींसाठी राज्यस्तरीय महासंमेलनाचे आयोजन गांधी मैदान येथे करण्यात आले आहे या संमेलनासाठी योगऋषी परम पूज्य श्रद्धेय रामदेव स्वामीजी महाराज तसेच मातृ शक्तीच्या प्रेरणास्थान महिला मुख्य केंद्रीय प्रभारी साध्वी देवप्रियाजी उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला वरिष्ठ महिला राज्य प्रभारी सुधा अळळीमोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी भागीरथी महिला संस्था अध्यक्ष सौ.अरुंधती महाडिक , सन्मती मिरजे, पतंजली योग समिती महाराष्ट्र राज्याचे राज्य प्रभारी चंद्रशेखर खापणे कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष छाया पाटील,प्रमोद पाटील अध्यक्ष, हिल रायडर्स आदी उपस्थित होते.करवीर नगरीमध्ये करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी या राज्यस्तरीय महासंमेलनाची सुरुवात कुंकूमार्चनाने सकाळी ९ वाजता होणार आहे. यानंतर गांधी मैदान येथे योगऋषी परमपूज्य श्रद्धेय स्वामीजी रामदेव महाराज
आजच्या धकाधकीच्या काळात महिलांच्या अनेक समस्या आहेत. महिला याच मुख्य मातृशक्ती आहेत. परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज व पूज्य साध्वी देवप्रियाजी, या भारतीय संस्कृती, भारतीय शिक्षण पद्धती, आरोग्य निरोगी राहण्यासाठी योग अशा विविध गोष्टीवर मार्गदर्शन करणार आहेत.
स्वामीजींनी योग आयुर्वेद स्वदेशीकांतील स्वदेशी क्रांती, स्वदेशी शिक्षा, गुरुकुल शिक्षण, स्वदेशी चिकित्सा, शिक्षणप्रसार १४५ कोटी भारत वासिंना तसेच जगातील दोनशे देशातील करोडो कोकांना स्वस्त, समृद्ध, आध्यात्मिक जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे. हेच मार्गदर्शन स्वामीजी कोल्हापूर या महासंमेलनामध्ये करणार आहेत.
कुंकू मार्चना बरोबर सांकृतिक कार्यक्रम, महिलांच्या रणरागिणी, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा, संस्थांचा सत्कार अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.संपूर्ण महाराष्ट्रातून दहा हजार महिला सहभागी होतील असा अंदाज आहे. सदर कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महिला योग समितीच्या १०० योगशिक्षिका स्वयंसेवक म्हणून कार्यरत राहणार आहेत.सदरचा कार्यक्रम योग शिक्षका बरोबर सर्व माता भगिनींसाठी खुला असून महिलांसाठी भोजनाची ही व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांसह सर्वांनी या महासंमेलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रभारी सुधा अळळीमोरे यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन महिलांनीच मिळून केलेले आहे.हे महासंमेलन सर्वांसाठी मोफत आहे. यावेळी पत्रकार परिषदेला दीप्ती कदम, मंगल वैद्य,अनिल जोशी, अनिता जोशी, स्नेहल कुलकर्णी,अनुपमा गोरे,नीता राजपूत, कल्पना ठोकळ आदी महिला संयोजिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

संजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा मान्यवरांना ‘एस.जी.यू आयकॉन’ प्रदान

0

संजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
मान्यवरांना ‘एस.जी.यू आयकॉन’ प्रदान

अतिग्रे/प्रतिनिधी : उद्योगपती संजय घोडावत यांचा ६० वा वाढदिवस घोडावत विद्यापीठात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे, क्रीडापटू स्वप्निल कुसाळे, ईएनटी सर्जन, डॉ. अशोक पुरोहित, शिक्षण तज्ञ डॉ. अनिल पाटील व महाबळ ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांना ‘एस.जी.यू आयकॉन’ प्रदान करण्यात आले. याप्रसंगी बॉलीवूड अभिनेता अंशुमन खुराना उपस्थित होते.तसेच संजय घोडावत यांच्या पत्नी नीता घोडावत, श्रेणिक घोडावत, सलोनी घोडावत, श्रेया घोडावत, विजयचंदजी, जयचंदजी, राजेशजी, व राकेशजी घोडावत, आणि कुटुंबीय उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला घोडावत विद्यापीठाच्या ‘उमंग’ या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर संजय घोडावत ग्लोबल एज्युकेशन कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी एम.डी श्रेणिक घोडावत यांनी संजय घोडावत ग्रुपच्या उद्योगांची माहिती देऊन ‘२०३० व्हिजन आणि मिशन’ बद्दलच्या भविष्यकालीन योजना सांगितल्या.
आयुष्यमान खुरानाने संजय घोडावत यांनी उद्योग क्षेत्रात आणि शिक्षण क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे व योगदानाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याबद्दल शुभेच्छा दिल्या.यावेळी संजय घोडावत यांच्या कर्तुत्वावर आधारित संजय आवटे यांनी संपादित केलेल्या ‘माझा अभिमान’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘एस. जी. यु आयकॉन’ पुरस्काराचे वाचन डॉ. विराट गिरी यांनी केले. सूत्रसंचालन सोहन तिवडे तर प्रा. डिसोजा यांनी आभार मानले. याप्रसंगी विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे तसेच सामाजिक, राजकीय, आर्थिक व उद्योग क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

*चौकट*
अभिनेता अंशुमन खुराणाच्या गायन नृत्याने उपस्थितांनी ठेका धरला. त्याने पानी दा, रंग देखवे हे गाणे गायले तसेच नृत्य देखील केले यावर सर्वांनी जल्लोष केला.

स्वर्गीय. कै. अभिजित कदम यांच्या जयंतीनिमित्त भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल, कोल्हापूर वतीने विनम्र अभिवादन “

0

“स्वर्गीय. कै. अभिजित कदम यांच्या जयंतीनिमित्त भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल, कोल्हापूर वतीने विनम्र अभिवादन ”

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल, कोल्हापूर येथे गुरूवार दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी स्वर्गीय कै. अभिजित कदम (दादा) यांच्या जयंतीनिमित्त भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीचे, प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे, उपप्रचार्य डॉ. एम. एस. भाटीया, प्रा. आर. जे. जरग यांच्या हस्ते कै. अभिजित कदम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या जयंतीच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे सरांनी कै अभिजित दादांच्या आठवणींना उजाळा दिला, राज्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री, भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती मा. डॉ. पतंगरावजी कदमसाहेब यांना तीन मुले त्यामध्ये सर्वात ज्येष्ठ कै. अभिजित कदम, डॉ. अस्मिता जगताप संचालक, भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सेस, डॉ. विश्वजीत कदम भारती विद्यापीठाचे कार्यवाह, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू. भारती विद्यापीठाच्या सुरूवातीच्या कालखंडामध्ये कै. अभिजित कदम यांच्या रूपाने भारती विद्यापीठास उच्चशिक्षित विनयशील नेत्तृव लाभले, त्यांनी भारती विद्यापीठाच्या विकासाची धुरा समर्थपणे पेलली होती. भारती विद्यापीठाची कालानुसार पुननिर्मिती करण्याचे कार्य केले. आधुनिक शिक्षण प्रणाली, तंत्रज्ञान, संगणीकरणाव्दारे या रोपट्याचे जाळे वटवृक्षात केले आहे. परंतु नियतिने त्यांना अल्पआयुष्य दिले. कै. अभिजित दादांच्या जाण्याने विद्यापीठामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली.परंतु त्यांची शिकवण, विचारधारा आणि कार्यपद्धती आपणा सर्वासाठी प्रेरणादायी ठरतील हीच दादांना खरी आदरांजली…!
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच.एन.मोरे, उपप्राचार्य डॉ. एम. एस. भाटीया, प्रा. डॉ. एन. एम. भाटीया, प्रा. आर. जे. जरग, प्रा. डॉ. ए. जे. शिंदे, प्रा. डॉ. डी. ए. भागवत, प्रा. डॉ. एफ. ए. तांबोळी, प्रा.पी. पी. चौधरी, प्रा. डी. व्ही. माऊली, प्रा. आशा जाधव, प्रा. विशिन पाटील, प्रा. एस. एम. रजपूत, श्री. किशोर हराळे तसेच शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बोंद्रेनगरातील ७७ जणांच्या घराचे स्वप्न पूर्णत्वाकडे सतेज पाटील यांच्याकडून पाहणी: अपूर्ण कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना

0

बोंद्रेनगरातील ७७ जणांच्या घराचे स्वप्न पूर्णत्वाकडे
सतेज पाटील यांच्याकडून पाहणी: अपूर्ण कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना

कोल्हापूर/प्रतिनिधी : महिपतराव बोंद्रे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या महानगरपालिका प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांची विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी पाहणी केली. सर्व लाभार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. यातील जी कामे अपूर्ण आहेत ती लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.फुलेवाडीमधील महिपतराव बोंद्रेनगर येथील महिपतराव बोंद्रे सहकारी गृहनिर्माण संस्थेची महानगरपालिका प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण ७७ घरे बांधण्यात आली आहेत. या घरांचे मागील तीन वर्षापासून काम सुरु होते, ते पूर्ण झाले आहे. यासाठी आमदार सतेज पाटील व माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सात्यत्याने पुढाकार घेऊन या ७७ कुटुंबांचे घरांचे स्वप्न पूर्ण केले. यासाठी लागणाऱ्या कर्जासाठीही आमदार पाटील यांनी सर्वांना मदत केली होती. या घरांची त्यांनी पाहणी करून सर्व लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी लाईट मीटर, नळ कनेक्शन अशा काही अपूर्ण कामाबद्दल संबंधित अधिकाऱ्याशी संवाद साधत तात्काळ कामे मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या कामासाठी शेल्टर असोसिएशनच्या अध्यक्षा प्रतिभा जोशी, ऋतुजा भराटे, मेघा लोंढे, महादेव कांबळे, मनोज्ञा कुलकर्णी आदींची सुद्धा मदत झाली. तर कम्युनिटी हॉलसाठी शिरीष बेरी यांनी मदत केली.यावेळी माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, धनंजय भोंगळे, अभिजित देठे, प्रकाश भोपळे, प्रकाश शिंदे, बाबुराव बोडके, ठेकेदार राजेंद्र दिवसे, कै. महिपतराव बोंद्रे सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष अशोक देगावे, सचिव भिकाजी वायदंडे,राणी खंडागळे सचिन शिंदे, संभाजी भोरे, भीमराव आवळे, सुरेश भोरे, संजय गोसावी, शिवाजी मोरे, सीताबाई पोवार, हिंदुराव गडकर, बबन गोसावी यांच्यासह सर्व लाभार्थी उपस्थित होते.