Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शिक्षणविश्वावर शोककळा! पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

अल्ट्राव्हायोलेटने कोल्हापूरमध्ये नवीन एक्स्पिरियन्स सेंटर सुरू करत महाराष्ट्रातील विस्ताराला दिली गती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

घरकुलांमुळे संपूर्ण कुटुंबाचेच जीवनमान आणि राहणीमान उंचावते : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही,मंत्री हसन मुश्रीफ यांची स्पष्टोक्ती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पेपरफुटी विरोधात शनिवारी काँग्रेसची धरणे आंदोलन व कॅन्डल मार्च,राजारामपुरीतून सायबर कॉलेजपर्यंत निघणार मार्च

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून लाखो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देवू : आ.राजेश क्षीरसागर

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना मिळावी विठुरायाला १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सद्बुद्धी दिंडीने साकडे

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नवी दिल्ली येथे 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी सहभागी होणाऱ्या कलाकारांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

अजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया! – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आरोग्यवर्धिनी समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवांवर थेट देखरेख — आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

Tile List

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पशुवैद्यकीय महाविद्यालय कणेरी, कोल्हापूर येथे स्थापनेसाठी केंद्र सरकारची मंजूरी

पशुवैद्यकीय महाविद्यालय कणेरी, कोल्हापूर येथे स्थापनेसाठी केंद्र सरकारची मंजूरी कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय पशु चिकीत्सा परिषद (VCI)) आणि केंद्र सरकारच्या मंत्स्यपालन, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय,…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे ४० दिवसात दूध विक्रीत सुमारे एक ते दीड लाख लिटरची वाढ

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

Tile Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

समृद्ध मातृत्व अभियानाच्या राष्ट्रीय उपक्रमाला कोल्हापुरातून दिशा; नवी दिल्ली येथे ५ व ६ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्तरावर झाली व्यापक चर्चा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रविवारी जिल्हा दौरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रविवारी जिल्हा दौरा कोल्हापूर/जिमाका : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे…

List Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार

पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार लाडक्या लोकनेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला कोल्हापूर/ (जिमाका): अनेकांना जगण्याच बळ देणाऱ्या,…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शिक्षणमहर्षी डॉ डी. वाय. पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) समाजकारण- राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला शिक्षणमहर्षी डॉ डी. वाय. पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया भावपूर्ण श्रद्धांजली..! डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शिक्षणविश्वावर शोककळा! पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

शिक्षणविश्वावर शोककळा! पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; वयाच्या ९०व्या वर्षी काळाचा पडदा कोल्हापूर/ प्रतिनिधी : शिक्षण, आरोग्य आणि…

Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना मिळावी विठुरायाला १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सद्बुद्धी दिंडीने साकडे

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नवी दिल्ली येथे 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी सहभागी होणाऱ्या कलाकारांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

अजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया! – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आरोग्यवर्धिनी समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवांवर थेट देखरेख — आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पेपरफुटी विरोधात शनिवारी काँग्रेसची धरणे आंदोलन व कॅन्डल मार्च,राजारामपुरीतून सायबर कॉलेजपर्यंत निघणार मार्च

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून लाखो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देवू : आ.राजेश क्षीरसागर

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना मिळावी विठुरायाला १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सद्बुद्धी दिंडीने साकडे

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नवी दिल्ली येथे 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी सहभागी होणाऱ्या कलाकारांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

अजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया! – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शाहू समाधीचे दर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शाहू समाधीचे दर्शन कोल्हापूर, दि. ९: राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या नर्सरीबाग येथील समाधीस्थळी मुख्यमंत्री…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार

लवकरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज; थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक,…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते १८५० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संगीतसूर्य…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

समृद्ध मातृत्व अभियानाच्या राष्ट्रीय उपक्रमाला कोल्हापुरातून दिशा; नवी दिल्ली येथे ५ व ६ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्तरावर झाली व्यापक चर्चा

घटता जन्मदर, वाढते वंध्यत्व आणि बदलती लोकसंख्या रचना यावर भारतात गांभीर्याने विचार होणे आवश्यक – समृद्ध मातृत्व अभियान समृद्ध मातृत्व…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रविवारी जिल्हा दौरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रविवारी जिल्हा दौरा कोल्हापूर/जिमाका : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार

पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार लाडक्या लोकनेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला कोल्हापूर/ (जिमाका): अनेकांना जगण्याच बळ देणाऱ्या,…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शिक्षणमहर्षी डॉ डी. वाय. पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) समाजकारण- राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला शिक्षणमहर्षी डॉ डी. वाय. पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया भावपूर्ण श्रद्धांजली..! डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शिक्षणविश्वावर शोककळा! पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

शिक्षणविश्वावर शोककळा! पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; वयाच्या ९०व्या वर्षी काळाचा पडदा कोल्हापूर/ प्रतिनिधी : शिक्षण, आरोग्य आणि…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

अल्ट्राव्हायोलेटने कोल्हापूरमध्ये नवीन एक्स्पिरियन्स सेंटर सुरू करत महाराष्ट्रातील विस्ताराला दिली गती

अल्ट्राव्हायोलेटने कोल्हापूरमध्ये नवीन एक्स्पिरियन्स सेंटर सुरू करत महाराष्ट्रातील विस्ताराला दिली गती कोल्हापूर/प्रतिनिधी : अल्ट्राव्हायोलेटने आज कोल्हापूरमध्ये आपल्या नवीन यूव्ही स्पेस…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शाहू समाधीचे दर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शाहू समाधीचे दर्शन

कोल्हापूर, दि. ९: राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या नर्सरीबाग येथील समाधीस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.यावेळी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सह पालकमंत्री तथा राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, अशोकराव माने, राहूल आवाडे, महापौर रूपाराणी निकम, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल आदी उपस्थित होते.यावेळी समाधीस्थळाअंतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचेही उद्घाटन करण्यात आले. शाहू समाधीस्थळ विकसित करण्याअंतर्गत नियोजित कामे व पूर्ण करण्यात आलेल्या कामांची माहिती आयुक्त डॉ. भारुड यांनी यावेळी दिली.

देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार

लवकरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज; थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली

देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार

राजर्षी शाहू महाराजांनी शेतकरी हितासाठी केलेले कार्य आधुनिक काळातही प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

कोल्हापूर/कागल/ (जिमाका): शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करत राज्य शासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी दिली असून, यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी सौर कृषी वाहिनी योजनेला गती देण्यात आली असून, सध्या ७४ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. यावर्षाअखेर ९० टक्के आणि पुढील वर्षी १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कागल नगरीत विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी कागल नगरपरिषदेच्या वतीने हिंदूराव घाटगे विद्यालयाच्या जीर्णोद्धार कामाचा लोकार्पण सोहळा तसेच लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार होत्या.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्रांतीच्या माध्यमातून बहुजन समाजासाठी शिक्षण आणि रोजगाराची दारे खुली केली. १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या क्रांतिकारी पर्वाच्या स्मरणदिनी अशा थोर समाजसुधारकाच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य मिळणे ही आपल्यासाठी विशेष बाब आहे. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या काळातील चुकीची सामाजिक व्यवस्था झुगारून नवी सामाजिक व्यवस्था निर्माण केली. त्यांनी आरक्षणाचा क्रांतिकारी निर्णय घेतला, मोफत शिक्षण सुरू केले, वंचितांसाठी विविध आनुषंगिक योजना राबवल्या आणि अस्पृश्यतेला गुन्हा मानून त्यावर बंदी घातली, असे त्यांनी नमूद केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला वारसा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आणि राजर्षी शाहू महाराजांनी दिलेले विचार या त्रिसूत्रीच्या आधारावर राज्य शासन काम करीत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. राधानगरी धरण हा राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि अभियांत्रिकी कौशल्याचा अविष्कार असून, त्यांनी निर्माण केलेल्या जलसाठ्यांमुळे आजही जनतेला त्याचा लाभ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करून आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी देण्यात आली असून, ५६ हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी शासन दरवर्षी २५ हजार कोटी रुपये खर्च करीत असून, ५८ हजार कोटी रुपयांची थकबाकीही शासनाने दिली आहे. आता प्रत्येक शेतकऱ्याला थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी इथेनॉल धोरण महत्त्वाचे असून, इथेनॉलशिवाय साखर कारखानदारी टिकवणे अवघड आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत असल्या तरी, त्याबाबत पेट्रोलियम किंवा वाहन उत्पादक कंपन्यांकडे कोणताही अधिकृत पुरावा उपलब्ध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इथेनॉल धोरणामुळे साखर कारखानदारी टिकून राहिली असून, ऊस उत्पादकांना एफआरपी देणे शक्य झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एफआरपीचे नवे उच्चांक गाठले गेले असून, त्याचा लाभ ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि शेतकऱ्यांना झाला आहे.
साखर कारखानदारी अधिक सक्षम करण्यासाठी ‘झिरो वेस्ट’ संकल्पनेतून स्पेंट वॉश आणि प्रेस मडपासून सीबीजी व सीएनजी निर्मिती करण्यात येणार आहे. या उपउत्पादनातून मिळणारा अतिरिक्त निधी कारखान्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासह शेतकऱ्यांच्या एफआरपीसाठी उपयोगात आणला जाणार आहे. देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

राजर्षी शाहू महाराजांनी शेतकरी हितासाठी केलेले कार्य आधुनिक काळातही प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

राजर्षी शाहू महाराजांनी शेतकरी हितासाठी केलेले कार्य आधुनिक काळातही अत्यंत प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीनंतर आता पुढील टप्प्यातील कल्याणकारी कामांना सुरुवात झाली असून, महाराष्ट्र विकासाच्या दिशेने अधिक वेगाने वाटचाल करत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, राजर्षींच्या या पावन भूमीत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी कटिबद्ध होण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजर्षी शाहू महाराजांचे विचार, कर्तृत्व आणि कागल तालुक्याशी संबंधित विविध विकासकामांचा आढावा घेतला. तसेच, शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची सविस्तर माहिती त्यांनी या वेळी विशद केली.
समरजितसिंह घाटगे यांनी आपल्या मनोगतात शेतकरी कर्जमुक्तीच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तसेच, राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी कागल तालुक्यात अत्यंत यशस्वीपणे सुरू असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा विशेष सत्कार करण्यात आला.कागल नगरपरिषदेच्या वतीनेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा देऊन भव्य सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक कागल नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सविता माने यांनी केले, तर आभार उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांनी मानले.
कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक, खासदार शाहू महाराज छत्रपती, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, आमदार डॉ. विनय कोरे-सावकर, राहुल आवाडे, शिवाजीराव पाटील,
आमदार अशोकराव माने, कोल्हापूर महापालिका महापौर रूपराणी निकम, राजे समरजितसिंह घाटगे, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, कागल नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण आणि मुख्याधिकारी अजय पाटणकर उपस्थित होते.

कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते १८५० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन

कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह संपूर्ण महाराष्ट्राचा मानबिंदू

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या आद्ययावतीकरणामुळे आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावेल

कोल्हापूर दि.९ ऑगस्ट (जिमाका): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते कोल्हापूर शहरातील १८५० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न झाले. कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ करणे गरजेचे असून त्यादृष्टीने हद्दीबाहेरील लोकांच्या अडीअडचणी शंभर टक्के सोडविण्यात येतील, असे सांगून कोल्हापूर शहराला अधिक सुनियोजित करण्यासाठी टप्प्या-टप्प्याने आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.वैद्यकीय शिक्षण विभाग, कोल्हापूर महानगरपालिका व महाराष्ट्र पोलीस यांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम प्रायव्हेट हायस्कूलच्या पटांगणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, आरोग्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, नगरविकास राज्यमंत्री व कोल्हापूरच्या सह पालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, राहुल आवाडे, शिवाजी पाटील, अशोकराव माने, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव धीरजकुमार, वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी, जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन, पोलीस अधीक्षक निलोत्पाल, उपमहापौर अक्षय जरग उपस्थित होते.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे संपूर्ण महाराष्ट्राचा मानबिंदू आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या देदिप्यमान नाट्य परंपरेमध्ये या नाट्यगृहाचा फार मोठा इतिहास आहे. १४ ऑगस्ट १९१५ रोजी छत्रपती राजाराम महाराज यांच्याहस्ते त्याचे उद्घाटन झाले. पूर्वी ‘पॅलेस थिएटर’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या नाट्यगृहाला १९५७ पासून ‘संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह’ म्हणून ओळखले जाऊ लागले. दुर्दैवाने दोन वर्षांपूर्वी या नाट्यगृहाला लागलेल्या आगीप्रसंगी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तात्काळ भेट देऊन पाहणी केली आणि कोल्हापूरचे वैभव असलेल्या आणि कोल्हापूरकरांचे प्रचंड प्रेम असलेल्या या नाट्यगृहाच्या पुनर्निर्माणासाठी राज्य सरकारने २५ कोटी रुपये तात्काळ दिले. या नाट्यगृहाचे पुनर्निर्माण आधीचेच बाह्यस्वरुप जतन करत वारसामूल्य जपून अत्यंत चांगल्या प्रकारे करण्यात आले आहे.
कोल्हापूरमध्ये खऱ्या अर्थाने संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे योगदान कोणी विसरू शकत नाही, असे सांगून श्री. फडणवीस म्हणाले, संगीत मानापमान या नाटकामधील बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांच्यातली जुगलबंदी ही मराठी संगीत नाटकाच्या इतिहासातील एक मर्मबंधाची ठेव आहे. संगीतसूर्य भोसले यांच्या नावाच्या नाट्यगृहाने संगीत, शास्त्रीय संगीत, लोकनाट्य, लावणी, पोवाडा, तमाशा, दशावतार अशा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असलेल्या बाबी पाहिल्या आहेत. या नाट्यगृहाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक त्या बाबी करण्यात येतील. नाट्य चळवळ, रंगभूमी असो किंवा चित्रपट या सर्व बाबींमध्ये कोल्हापूरचे मोठे योगदान नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाबुराव पेंटर, भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम यांनी कोल्हापूरला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. पंडित विष्णू पलुसकर, दिगंबर पलुसकर, सुधीर उर्फ बाबुजी फडके, सुरेश वाडकर, वामनराव सडोलीकर असे अनेक दिग्गज गायक हे कोल्हापुरातले. पिराजीराव सरनाईक, अरुण सरनाईक, रमेश देव हे कलावंत याच कोल्हापुरातले. भारताला पहिल्यांदा ऑस्कर मिळवून देणाऱ्या वेशभूषाकार भानू अथय्या यांचीही कर्मभूमी कोल्हापूर शहर राहिली आहे, असे सांगून संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या नावाने असलेल्या या नाट्यगृहाचे पुन्हा एकदा नवनिर्मित रूपात उद्घाटन होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
आई महालक्ष्मी अंबाबाईंच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. या मंदीर परिसराच्या विकासाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले असून निश्चित वेळेत ते काम पूर्ण करण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच आले असून त्यासाठी शेंडा पार्क येथे ७५ एकर जागा दिली आहे. या न्यायालयामुळे शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक येणार आहेत. शेंडा पार्क येथे आयटी पार्क, कन्व्हेन्शन सेंटर ठिकाणी करतो आहोत या सर्व बाबींमुळे कोल्हापूरच्या विकासाला गती मिळणार असून त्यासाठी शहराच्या हद्दवाढीची गरज आहे. नव्याने हद्दवाढी मध्ये समावेशित कराव्या लागणाऱ्या नागरिकांच्या सर्व अडचणी शंभर टक्के सोडविण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.सीपीआर म्हणजेच छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे वारसा स्वरुप जतन करून चांगल्या प्रकारे पुनुरूज्जीवन करण्यात आले आहे, असे सांगून ते म्हणाले, येथे ८ मॉड्युलर थिएटर्स असलेल्या ऑपरेशन थिएटर्सचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. चांगला मॉड्युलर बर्न वॉर्ड तयार झालेला आहे. ३० मॉड्युलर बेडचा अपघात विभाग, डायलिसिसची सुविधा आदी अनेक गोष्टींमुळे कोल्हापूरच्या आरोग्य सेवेमध्ये गुणात्मक बदल होत आहे. आता शेंडा पार्कमध्ये देखील ६०० बेड सर्वोपचार रुग्णालय करण्यात येणार असून २५० बेड कर्करोग रुग्णालय आणि २५० बेडच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा यात समावेश आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये ज्याप्रमाणे सर्वात चांगली आरोग्याची व्यवस्था ही कोल्हापूरला उभी झाली होती, त्याचकडे आता पुन्हा कोल्हापूरने वाटचाल सुरू केलेली आहे, असेही त्यांनी सांगितले.
आपल्यासाठी २४ तास काम करणाऱ्या पोलीसांसाठी चांगल्या प्रकारची घरे असावित ही भूमिका घेऊन राज्य सरकार काम करत असून महाराष्ट्रामध्ये पोलिसांकरता ५० हजार घरांचे नियोजन केले आहे. कोल्हापूर येथील पोलीसांसाठी घराची १७ मजली सुंदर इमारत तयार झाली आहे. जवळपास २०४ सदनिका महाराणी ताराराणी पोलीस गृहसंकुलात तर इचलकरंजीमध्ये २१० सदनिका अशा जवळपास ४१४ सदनिका पोलिसांकरता आज या जिल्ह्यामध्ये आपण उपलब्ध करून दिल्या आहेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, कोल्हापूर हे कुस्तीचे माहेरघर आहे. मात्र, फुटबॉल, हॉकी आणि क्रिकेट खेळाचे प्रेमीही येथे आहेत. त्यामुळे केंद्र शासनाच्या खेलो इंडिया योजनेतून व महानगरपालिकेच्या निधीतून ६ कोटी ९६ लाख रुपयातून मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऍस्ट्रोटर्फ मैदान विकसित केले आहे. राज्य व आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील हॉकीच्या स्पर्धा कोल्हापुरात घेता येईल. तसेच कोल्हापूरला क्रिकेटचे स्टेडियम बांधण्याकरता जागा उपलब्ध करून दिली आहे. स्टेडियमसाठी बीसीसीआयला विनंती केली असून त्या माध्यमातून देशातील आधुनिक अशा प्रकारचे उत्तम दर्जाचे क्रिकेट स्टेडियम बांधण्यात येईल. फुटबॉल खेळासाठीही आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील.
कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलेल्या पुरामुळे लोकांचा आक्रोश आणि नुकसान आम्ही पाहिला असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यावर मात करण्यासाठी जागतिक बँकेच्या साह्याने पुराच्या पाण्यावर उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र रेझिलिएन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (एमआरडीपी) तयार केला. यापूर्वी रखडलेल्या या प्रकल्पाला पुन्हा या सरकारने ‘मित्रा’च्या (महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन) माध्यमातून मान्यता मिळवली असून केवळ कोल्हापूर आणि सांगली शहरच नव्हे तर या भागातील संपूर्ण पाणलोट क्षेत्रावर पूरनियंत्रणाच्या दृष्टीने काम करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत पुराचे वाहून जाणारे अतिरिक्त पाण्यापैकी सुमारे ३५ ते ४० टीएमसी पाणी आता डायव्हर्शन कॅनलने पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांना आणि पुढे उजनी धरणात आणि पुढे मराठवाड्यामध्ये नेण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांचे समाधी स्थळ, मेजर ध्यानचंद स्टेडियमवर एस्ट्रोटर्फ, रंकाळा तलावतील संगीत कारंजे, अंबाबाई मंदिर परिसरात बहुमजली पार्किंग, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प एमआरडीपी अंतर्गत ४८४ कोटींचे रस्ते व नागरी सुविधा, मेकॅनिकल पार्किंग यासह विविध कामांचे लोकार्पणही या कार्यक्रमांमध्ये झाले.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या उद्घाटनातून जिल्ह्याला नवी दिशा व सांस्कृतिक, क्रीडा, पर्यटन व नागरिक सुविधांना बळकटी मिळेल. सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि कला वैभवाची समृद्ध परंपरा असलेल्या करवीर नगरीतील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणीमुळे अमूल्य सांस्कृतिक ठेव्याचे नव्याने जतन संवर्धन आणि पुनरुज्जीवन होत आहे. हा क्षण सर्वांसाठी अभिमानाचा आणि समाधानाचा आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले १३६ व्या जयंतीनिमित्त हे नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभे राहिले आहे. हा क्षण केवळ पुनर्बांधणीचाच क्षण नाही तर हा महाराष्ट्र आणि कोल्हापूरच्या समृद्धीचा पुनर्जन्म सोहळा आहे. उपमुख्यमंत्री म्हणाल्या, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कला, क्रीडा आणि सांस्कृतिक प्रेमी दूरदृष्टीचे हे नाट्यगृह मूर्तिमंत प्रतीक आहे. नाट्यगृह पूर्वीच्या दिमाखदार ऐतिहासिक स्वरूपात जपणे, या वैभवाची निगा राखणे तसेच याचे सौंदर्य अबाधित ठेवणे, हे कोल्हापूर वासियांसाची सामाजिक जबाबदारी आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी मराठी संगीत नाट्यपरंपरेसाठी दिलेले योगदान अनमोल आहे त्यांच्या नावाने ओळखले जाणारे हे नाट्यगृह पुढील अनेक पिढ्यांसाठी कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेचे प्रेरणास्थान राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने पुढाकार घेतल्याचे सांगून त्या म्हणाल्या, नाट्यगृहासोबतच राजर्षी शाहू महाराज खासबाग मैदानाच्या नूतनीकरणाचे काम होत असून ही बाब आपल्यासाठी आनंदाची आहे. कोल्हापूरचा सांस्कृतिक, क्रीडा, आणि पर्यटन विकास अधिक वेगाने व्हावा, यासाठी राज्य शासन कटिबध्द आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, कोल्हापूर बदलत आहे. अनेक वर्षांची स्वप्न साकार करणारे एकापेक्षा एक चांगले निर्णय होत आहेत. दीड- दोन महिन्यापूर्वी महालक्ष्मीच्या आराखड्याला मान्यता मिळाली आणि त्यानंतरच्या कामाचा शुभारंभ झाला. या शुभारंभाच्या बरोबर अनेक विकासकामांच्या उद्घाटनाची सुरुवातही झाली आहे. सीपीआरच्या माध्यमातून लोकांना आरोग्याच्या दर्जेदार वैद्यकीय सेवांबरोबरच वैद्यकीय शिक्षणामध्ये सुद्धा कोल्हापूरचे नाव महाराष्ट्रात अग्रेसर राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भस्मस्थानी पडल्यानंतर निधीसाठी सातत्याने पाठपुरवा केल्याचे सांगून लवकरच डीपी आणि ट्रान्सफॉर्मर कामांसाठीही निधी उपलब्ध होईल असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, कन्व्हेन्शन सेंटर कोल्हापूरची नवी ओळख बनत आहे. आयटी सेंटरसाठी ८० एकर जागा उपलब्ध करुन दिल्यामुळे नवीन पिढीसाठी प्रचंड मोठे काम उभे राहत आहे. कोल्हापूरच्या विकासाची खूप मोठी गरज, खूप मोठी आवश्यकता आणि खूप मोठी भूक आम्हा सगळ्यांची आहे. सन १९३९ ला आणखी कुठे नव्हते त्यावेळेला राजाराम महाराजांनी विमानतळाची सुरुवात इथे केली. पण आज पुणे फार पुढे गेले आहे. बेळगावला सुद्धा कोल्हापूरपेक्षा चांगल्या पद्धतीचे फ्लाईट्स आहेत. कोल्हापूर येथे आता मोठे एअरबस यायला हवेत. १७०० मीटरचा रनवे २३०० मीटरचा करण्यासाठी आवश्यक परवानगी द्यावी. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या निमित्ताने व सर्कीट बेंचच्या निमित्ताने भविष्यकाळामध्ये येणाऱ्या आयटी सेंटरच्या माध्यमातून कोल्हापूरची गरज, कोल्हापूरची ओळख आणि कोल्हापूरचे महत्व वाढणार आहे. या ठिकाणी हजारो लोक दररोज येणार आहेत. फ्लोटिंग पॉप्युलेशन वाढत जाणार आहे. त्यासाठी रस्ते व अन्य दळणवळण्याच्या सुविधा दर्जेदार असणे आवश्यक आहे, असे सांगून प्रलंबित प्रश्नांना न्याय देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयामध्ये सर्व अद्ययावत वैद्यकीय सुविधा आणलेल्या आहेत. शेंडा पार्कमध्ये अमेरिकेच्या ‘ह्यूस्टन’ शहराच्या धर्तीवर मेडिकल हब बनविण्यात येत आहे. एक-दोन वर्षांनी कोल्हापूर शहर, कर्नाटक आणि आपल्या कोकणातील कुठल्याही माणसाला वैद्यकीय उपचारांसाठी मुंबई आणि पुण्याला जावे लागणार नाही, अशी व्यवस्था उभारण्यात येईल. यासाठी जवळपास ४७३ कोटी रुपयांचा निधी शासनाने दिला आहे. शेंडा पार्कमध्ये ६०० बेडचे सामान्य, २५० बेडचे कॅन्सर आणि २५० बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल साकारत आहे. आगीत भस्मसात झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची इमारत दोनच वर्षांमध्ये त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने रंगकर्मींमध्ये सादर करत असताना कोल्हापूर महानगरपालिकेसह आम्हा सर्वांना मनापासूनचा आनंद होत आहे. अत्यंत दिमाखदार असे केशवराव भोसले नाट्यगृह उभे केलेले आहे, असे सांगून ते म्हणाले, कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय कोल्हापूर शहराची प्रगती होणार नाही. यासाठी आमदार चंद्रदीप नरके व आमदार अमल महाडिक यांनी सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, सीपीआर इमारतीप्रमाणे ७४ हेरिटेज इमारती कोल्हापूरमध्ये आहेत. तसेच अनेक मोठे तलाव यामध्ये रंकाळा, कळंबा, राजाराम तलाव, कोटितीर्थ, हनुमान तलाव असे अनेक तलाव छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी दिलेले आहेत. शासनाच्या वतीने या सर्व गोष्टींचे जतन व संवर्धन करत, पर्यटन वाढीसाठी कोल्हापूरला ‘हेरिटेज सिटी’ घोषित करावी. ‘हेरिटेज संवर्धन प्लॅन’ (Heritage Conservation Plan) अंतर्गत भरीव निधीची तरतूद करून देशामध्ये कोल्हापूरचा एक नाव लौकिक वाढवावा, अशी विनंती केली. कोल्हापूरची रस्त्याची परिस्थिती अत्यंत खराब आहे. कोल्हापूरमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकची समस्या आहे. कोल्हापूरमध्ये अंडरपास, ओव्हरब्रिज, त्याचबरोबर सिमेंट काँक्रीटचे रोड, कोल्हापूरची हद्दवाढ—या गोष्टी अत्यंत होणे गरजेचे आहे. कोल्हापूरमध्ये आज ५० लाख भाविक येत असताना प्रचंड मोठी वाहतुकीची कोंडी आहे, असे सांगून शहराच्या हद्दवाढीची आवश्यकता व्यक्त केली.श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा करत असताना जर आपण ते १० मीटरवर ॲक्वीझिशन आणले तर ६०० कोटी रुपये वाचतील. तसेच शिवाजी स्टेडियमपर्यंत अंडरग्राउंड रस्ता, शिवाजी स्टेडियमपासून शाहू मिलपर्यंत अंडरग्राउंड रस्ता आणि शाहू मिलपासून ओव्हरब्रिजने युनिव्हर्सिटी जवळ ब्रिज काढल्यास शहरातलं ट्रॅफिक पूर्ण संपून जाईल आणि कोल्हापूर शहर हे या महाराष्ट्रातील एक चांगलं शहर म्हणून उदयास येईल.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापौर रुपाराणी निकम यांनी केले आभार महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी मानले. यावेळी माजी खासदार संजय मंडलिक, कृष्णराज महाडिक, जयंत पाटील, विशाल शिराळे, समित कदम, विजय जाधव, यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समृद्ध मातृत्व अभियानाच्या राष्ट्रीय उपक्रमाला कोल्हापुरातून दिशा; नवी दिल्ली येथे ५ व ६ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्तरावर झाली व्यापक चर्चा

घटता जन्मदर, वाढते वंध्यत्व आणि बदलती लोकसंख्या रचना यावर भारतात गांभीर्याने विचार होणे आवश्यक – समृद्ध मातृत्व अभियान

समृद्ध मातृत्व अभियानाच्या राष्ट्रीय उपक्रमाला कोल्हापुरातून दिशा; नवी दिल्ली येथे ५ व ६ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्तरावर झाली व्यापक चर्चा

नवी दिल्ली : भारतातील घटता एकूण प्रजनन दर (TFR), वाढती वंध्यत्वाची समस्या आणि त्यातून भविष्यात निर्माण होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांवर व्यापक आणि दीर्घकालीन विचार करण्याच्या उद्देशाने समृद्ध मातृत्व अभियानाच्या वतीने ५ व ६ ऑगस्ट २०२६ रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावरील विचारमंथन आयोजित करण्यात आले होते.
भारताचा एकूण प्रजनन दर १.८ पर्यंत घसरला असून, लोकसंख्येच्या स्थिर पुनरुत्पादनासाठी आवश्यक असलेल्या २.१ या प्रतिस्थापन पातळीपेक्षा तो कमी आहे. महाराष्ट्राचा प्रजनन दर तर १.४ इतका खाली आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह कमी प्रजनन दर असलेल्या राज्यांमध्ये भविष्यातील कार्यक्षम वयोगटातील लोकसंख्या, वृद्धांची वाढती संख्या, आरोग्य व्यवस्था, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक विकास यावर होणाऱ्या परिणामांचा वेळीच अभ्यास करण्याची गरज आहे.
भारताची तरुण लोकसंख्या ही देशाची मोठी ताकद आहे. कृषी, उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, संरक्षण, नवोपक्रम आणि आर्थिक विकास या सर्व क्षेत्रांसाठी सक्षम मनुष्यबळ अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे बदलती लोकसंख्या रचना हा केवळ लोकसंख्येचा विषय नसून देशाच्या दीर्घकालीन आर्थिक, सामाजिक, आरोग्यविषयक आणि राष्ट्रीय क्षमतेशी संबंधित आहे.
घटत्या प्रजनन दरासोबतच वंध्यत्वाची समस्या देखील गंभीरपणे समोर येत आहे. वाढते वय, शहरीकरण, बदलती जीवनशैली, ताणतणाव, लठ्ठपणा, मधुमेह, महिलांमधील PCOS व एंडोमेट्रिओसिस, पुरुष प्रजनन क्षमता तसेच पर्यावरणीय प्रदूषण, कीटकनाशके आणि इतर रासायनिक घटकांचा प्रजनन आरोग्यावर होणारा परिणाम यांचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. यावर या ठिकाणी चर्चा करण्यात आली.
वंध्यत्वाच्या समस्येकडे केवळ वैयक्तिक किंवा कौटुंबिक समस्या म्हणून न पाहता सार्वजनिक आरोग्याचा महत्त्वाचा विषय म्हणून पाहण्याची गरज आहे. वेळेवर तपासणी, योग्य समुपदेशन, परवडणारे उपचार आणि जनजागृतीच्या माध्यमातून अधिकाधिक दाम्पत्यांना मदत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रासह अनेक राज्यात विशेष नियोजनाची गरज आहे. तसेच महाराष्ट्रातील कमी झालेला प्रजनन दर लक्षात घेता, भविष्यात कार्यक्षम वयोगटातील लोकसंख्या कमी होणे आणि वृद्ध लोकसंख्येचे प्रमाण वाढणे यासारख्या परिस्थितींचा राज्याला सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आरोग्यसेवा, सामाजिक सुरक्षा, वृद्धांची काळजी, मनुष्यबळ नियोजन आणि आर्थिक विकास याबाबत राज्याने दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक आहे.
समृद्ध मातृत्व अभियानाच्या वतीने प्रजनन आरोग्य आणि वंध्यत्व उपचार अधिक सुलभ, परवडणारे आणि गुणवत्तापूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालये व जिल्हा रुग्णालयांमध्ये टप्प्याटप्प्याने IVF, IUI आणि इतर प्रजनन उपचार सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या दुर्बल दाम्पत्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा विचार व्हावा, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली आहे.
तसेच राष्ट्रीय प्रजनन आरोग्य व प्रजनन क्षमता मिशन, National Fertility & Infertility Registry, प्रत्येक राज्यात Centre of Excellence for Reproductive Medicine, राष्ट्रीय लोकसंख्याशास्त्रीय व प्रजनन आरोग्य धोरण आणि भारताच्या भविष्यातील लोकसंख्या, मनुष्यबळ व वृद्ध लोकसंख्येचा दीर्घकालीन अभ्यास करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
समृद्ध मातृत्व अभियानाचे मत आहे की हा विषय राजकीय वादाचा नसून वैज्ञानिक अभ्यास, विश्वसनीय आकडेवारी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि राष्ट्रीय सहमतीच्या आधारे दीर्घकालीन धोरण ठरविण्याचा विषय आहे.यावेळी बोलताना डॉ. वर्षा पाटील यांनी म्हणाल्या की, भारताची तरुण लोकसंख्या ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. बदलत्या लोकसंख्याशास्त्रीय परिस्थितीकडे भीती किंवा चिंतेच्या दृष्टीने न पाहता, भविष्यासाठी योग्य नियोजन करण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे. वैज्ञानिक संशोधन, विश्वसनीय आकडेवारी, व्यापक जनसंवाद आणि दूरदृष्टीपूर्ण धोरणांच्या माध्यमातून भारत आपली लोकसंख्याशास्त्रीय ताकद पुढील अनेक दशकांपर्यंत टिकवून ठेवू शकतो.                       या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी, केंद्रीय आयुष मंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संबंधित मंत्री श्री. प्रतापराव जाधवजी,केंद्रीय आरोग्य मंत्री श्री. जे. पी. नड्डा यांच्या धर्मपत्नी व भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्षा डॉ. मल्लिका नड्डाजी, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार श्री. जगदीश शेट्टर,बिहारचे खासदार श्री. सुधाकर सिंह,पश्चिम बंगालचे खासदार डॉ. जयंत रॉय, राज्यसभा सदस्य खासदार श्री. धनंजय महाडिक ,राज्यसभा सदस्य खासदार डॉ. अजित गोपचडे,श्री. अण्णासाहेब जोल्ले,खासदार श्री. प्रदीप गांधी ,खासदार श्री. सदानंद तानवडे , खासदार डॉ. अनिल बोंडे,माजी केंद्रीय मंत्री श्री. संजय पासवान , कर्नाटकच्या आमदार श्रीमती शशिकला जोल्ले,श्री. पी. सी. गाडीगौडर,श्री. रमेश जिगजिणगी,सांगलीचे खासदार श्री. विशाल पाटील,हातकणंगलेचे खासदार श्री. धैर्यशील माने, शिराळ्याचे आमदार श्री. सत्यजित देशमुख, अयोध्याचे खासदार श्री. अवधेश प्रसाद,दिल्लीच्या आरोग्य विभागाच्या सचिव डॉ. रश्मी सिंह,ICMRचे डॉ. विक्रमसिंह तसेच समृद्ध मातृत्व अभियानाच्या प्रमुख डॉ. वर्षा पाटीलजी देशभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, धोरणकर्ते, प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ज्ञ तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच देशभरातून ३०० हून अधिक सामाजिक सेवा संस्था व विविध क्षेत्रांतील प्रमुख संस्थांचे प्रतिनिधी तसेच ५० हून अधिक धोरणकर्ते (Policy Makers) आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.
देशातील प्रजनन आरोग्य, घटता प्रजनन दर, वंध्यत्व आणि भविष्यातील लोकसंख्याशास्त्रीय आव्हाने या विषयांवर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या निमित्ताने विचारमंथन केले. विविध राज्यांतील लोकप्रतिनिधी, धोरणकर्ते, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि सामाजिक संस्थांच्या सहभागामुळे या अभियानाला व्यापक राष्ट्रीय व्यासपीठ प्राप्त झाले आहे.समृद्ध मातृत्व अभियानाच्या प्रमुख डॉ. वर्षा पाटीलजी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमातून प्रजनन आरोग्य आणि बदलती लोकसंख्या रचना या विषयांकडे राष्ट्रीय पातळीवर गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.समृद्ध मातृत्व अभियानाचा संदेश स्पष्ट आहे — मातृत्व, प्रजनन आरोग्य, वंध्यत्व आणि बदलती लोकसंख्या रचना हे केवळ आजचे प्रश्न नसून महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या भावी पिढ्यांशी आणि राष्ट्रीय भविष्याशी संबंधित विषय आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रविवारी जिल्हा दौरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रविवारी जिल्हा दौरा

कोल्हापूर/जिमाका : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.रविवार, दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.५५ वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. सकाळी १०.०५ वाजता मोटारीने आष्टा, ता. वाळवा, जि. सांगलीकडे प्रयाण.
दुपारी १२.५० वाजता मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी १.२० वाजता यशवंत निवास, कसबा बावडा, कोल्हापूर येथे आगमन व आमदार सतेज पाटील यांच्या निवासस्थानी भेट. दुपारी १.३५ वाजता मोटारीने छत्रपती ताराराणी पोलीस गृह संकुल, पोलीस मुख्यालय, कसबा बावडा कोल्हापूर कडे प्रयाण. दुपारी १.४० वाजता छत्रपती ताराराणी पोलीस गृह संकुल, पोलीस मुख्यालय, कसबा बावडा कोल्हापूर येथे आगमन. दुपारी १.४५ वाजता छत्रपती ताराराणी पोलीस गृह संकुल येथील नूतन निवासी इमारतींचा उद्घाटन समारंभ. दुपारी २ वाजता मोटारीने छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी २.१० वाजता छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, येथे आगमन. दुपारी २.१५ वाजता छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या नुतनीकृत इमारतीचा लोकार्पण सोहळा. दुपारी २.३० वाजता मोटारीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळाकडे प्रयाण. दुपारी २.३५ वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ येथे आगमन व दर्शन. दुपारी २.४५ वाजता मोटारीने संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी २.५० वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, येथे आगमन व संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा. दुपारी ३.०५ वाजता प्रायव्हेट हायस्कूल मैदान येथे आगमन व कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा. दुपारी ४.२५ वाजता मोटारीने बॅ. खर्डेकर चौक, कागल जि. कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी ४.५० वाजता मोटारीने बॅ. खर्डेकर चौक, कागल येथे आगमन. सायंकाळी ५ वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पृर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व हिंदूराव घाटगे विद्यामंदीर नुतनीकृत शाळेचा लोकार्पण सोहळा ( सभास्थळ- छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसर, निपाणी वेस, कागल). सायंकाळी ६.१५ वाजता मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण. सायंकाळी ६.४० वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. रात्री ८.५० वाजता विमानाने नवीन मुंबईकडे प्रयाण.

पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार

पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार

लाडक्या लोकनेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला

कोल्हापूर/ (जिमाका): अनेकांना जगण्याच बळ देणाऱ्या, अनेक कुटुबांना आधार देणाऱ्या, लाखोंचे जीवन फुलविण्याऱ्या, देशाच्या शिक्षण क्षेत्राला दिशा देणा-या शिक्षण महर्षी लोकनेता, ज्ञानतपस्वी पद्मश्री डॉ. डी. वाय.पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला. पॅव्हेलियन मैदान येथे पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तिरंग्यात लपटलेल्या पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाला पोलीस पथकाने बंदुकीच्या फेरी झाडून मानवंदना दिली.कसबा बावडा येथील यशवंत निवासस्थानाहून फुलांनी सजविलेल्या वाहनामध्ये पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. मेडिकल कॉलेज – लाईन बाजार- भगवा चौक – कसबा बावडा- मेन रोड – श्रीराम सोसायटी रस्ता – गवत मंडई – फायर स्टेशन मार्गे त्यांची अंत्ययात्रा पॅव्हेलियन मैदान आली. यावेळी आपल्या लाडक्या लोकनेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.
याप्रसंगी विविध मान्यवर आणि प्रशासन यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकात दादा पाटील, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पुढारी वृत्तपत्र समुहाचे प्रमुख पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी अर्थमंत्री आ. जयंत पाटील, आ. अंबादास दानवे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यावतीने आ. अंबादास दानवे, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आ. अमित देशमुख, आ. विश्वजित कदम, सर्वश्री आमदार डॉ. विनय कोरे, चंद्रदीप नरके, शिवाजी पाटील, प्राजक्त तनपुरे, हेमंत ओगले, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार राजु शेट्टी, संजय मंडलीक, विनेदिता माने, श्रीमंत छत्रपती संभाजी राजे, माजी आमदार सर्वश्री के.पी. पाटील, राजू जयवंतराव आवळे, राजीव किसन आवळे, सत्यजित पाटील, भगवानराव साळुंखे, कोल्हापूर मनपा उपमहापौर अक्षय जरग यांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदराजंली वाहिली.
तर प्रशासनाच्यावतीने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन, पोलीस अधीक्षक निलोत्पल, इचलकरंजी महानगरपालिका महापौर उदय धातुंडे, पुढारी माध्यम समुहाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, अरुणभाई बुधवाळकर, सांगली मिरज कुपवाड मनपा विरोधी पक्षनेता मंगेश चव्हाण, उद्योजक डॉ. संजय घोडावत, पुणे महानगरपालिकेच्या वतीने माजी महापौर नवीन कोशी यांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदराजंली वाहिली.यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज डी. पाटील, डॉ. विजय डी पाटील, डॉ.अजिंक्य डी पाटील, डॉ. श्री. उद्धव पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, डॉ. पी. डी. पाटील, डॉ. भाग्यश्री पी. पाटील यांच्यासह कुटुबांतील अन्य सन्माननीय सदस्य उपस्थित होते. आमदार जयंत आसगावकर यांच्यासह यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
अमर रहे, अमर रहे डी.वाय दादा अमर रहे च्या घोषणांनी वातावरण अधिकच भावूक केले. अत्यंत विद्यवान, कर्तृत्वान, अजातशत्रू व्यक्तिमत्वाला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. सर्वांचे लाडके डी. वाय दादा अर्थात पद्मश्री डी. वाय. पाटील अनंतात विलिन होत असताना लाखो उपस्थितांनी त्यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला.

शिक्षणमहर्षी डॉ डी. वाय. पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)

समाजकारण- राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला

शिक्षणमहर्षी डॉ डी. वाय. पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई, दि.४:- शिक्षण, सहकार क्षेत्रातील कार्याने समाजकारण, राजकारणात भरीव योगदान देणारे आणि या क्षेत्रातील अनेक संस्थांचे आधारवड ठरलेले कार्यतपस्वी नेतृत्व पद्मश्री डॉ डी. वाय पाटील यांच्या निधनाने काळाने हिरावून नेले आहे, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहार, पश्चिम बंगाल, त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. डॉ. पाटील यांच्या निधनामुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले आहे.                                                            शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, डॉ. पाटील यांनी ज्ञानदेव या आपल्या नावाप्रमाणेच ज्ञानाची आराधना केली. शिक्षण क्षेत्रालाच आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. एका छोट्याशा शाळेपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. सुमारे दोनशे संस्था, विविध प्रकारची आठ विद्यापीठे आणि हजारो विद्यार्थी, असा त्यांच्या कार्याचा विस्तार झाला. विशेषत: वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, आर्किटेक्चर अशा वैविध्यपूर्ण अभ्यासक्रमांची महाविद्यालये आणि आधुनिक सुविधांच्या उभारणीतून त्यांनी आपल्या शैक्षणिक समुहासोबतच महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावला. या महाविद्यालयांच्या माध्यमातून वैद्यकीय सोयी सुविधा आणि आरोग्य सेवेचे जाळे विस्तारले. राजकारणातही त्यांनी काम केले. ते दोनदा विधानसभा सदस्य होते. पण डॉ. पाटील रमले शिक्षण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात. यातून त्यांनी अनेक भव्य दिव्य अशी शैक्षणिक संकुले, डॉ डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय स्टेडियमसारखे प्रकल्पही साकारले. डॉ. पाटील हे सहकार, शिक्षण, सांस्कृतिक – साहित्यिक आणि सामाजिक चळवळीचे आधारवड होते. त्यांनी आयुष्यभर शिक्षण, सेवा आणि विनम्रतेची मूल्ये जपली. ‘अहंकार म्हणजे जीवनाचा मृत्यू; तर अहंकाराचा मृत्यू म्हणजेच खरे जीवन’ हा त्यांचा विचार त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याचे प्रतिबिंब होता. आज त्यांचे पार्थिव अस्तित्व आपल्यात नसले, तरी त्यांनी रुजवलेली शिक्षणसेवेची परंपरा, विनम्रतेचा आदर्श आणि समाजहिताची मूल्ये कायम प्रेरणादायी राहतील. त्यांच्या जाण्याने एका दूरदर्शी शिक्षणमहर्षीचा अंत झाला असला, तरी त्यांचे विचार आणि कार्य पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करत राहतील. डॉ डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे त्यांच्याशी निगडित अनेक समुह, संस्थांवर शोकमग्न झाल्या आहेत. डॉ. पाटील यांच्या परिवारावर दुःखाचा आघात झाला आहे, या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या सर्वांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळावी, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो, असे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षणमहर्षी डॉ डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

भावपूर्ण श्रद्धांजली..!

डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील (डॉ. डी. वाय. पाटील) यांच्या दुःखद निधनाने शिक्षण, आरोग्य आणि समाजकारण क्षेत्रातील एक युगपुरुष हरपला आहे. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

डॉ. डी. वाय. पाटील यांनी महाराष्ट्रासह देशभरात अनेक शैक्षणिक व वैद्यकीय संस्थांची उभारणी करून ज्ञान, शिक्षण आणि आरोग्यसेवेची दारे लाखो विद्यार्थ्यांसाठी व नागरिकांसाठी खुली केली. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे असंख्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, रोजगार आणि समाजसेवेच्या संधी उपलब्ध झाल्या.

शैक्षणिक, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री या प्रतिष्ठित नागरी सन्मानाने गौरविले. अभ्यासू, दूरदर्शी, कर्तृत्ववान आणि समाजहिताची अखंड जाणीव असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या विकासात अमूल्य योगदान दिले. त्यांनी उभारलेल्या संस्था आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि पाटील कुटुंबीयांना तसेच त्यांच्या असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

शिक्षणविश्वावर शोककळा! पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

शिक्षणविश्वावर शोककळा! पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; वयाच्या ९०व्या वर्षी काळाचा पडदा

कोल्हापूर/ प्रतिनिधी : शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे, बिहारचे माजी राज्यपाल, पद्मश्री सन्मानाने गौरविण्यात आलेले ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. डी. वाय. पाटील यांचे आज कोल्हापूर येथे वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षणविश्वासह सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.उच्च शिक्षणाची दारे सर्वसामान्यांसाठी खुली करण्याचे ध्येय उराशी बाळगत डॉ. पाटील यांनी देशभरात अनेक शैक्षणिक संस्था, वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, विद्यापीठे आणि रुग्णालयांची उभारणी केली. त्यांच्या कार्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झाली.
कोल्हापूरच्या मातीतून उभे राहून राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवणाऱ्या डॉ. पाटील यांनी बिहारचे राज्यपाल म्हणूनही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले होते.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. “दूरदृष्टी असलेले शिक्षणमहर्षी हरपले,” अशा भावना व्यक्त होत असून, त्यांच्या कार्याचा वारसा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.शिक्षण क्षेत्रात उभारलेला त्यांचा भव्य वारसा आणि समाजसेवेची परंपरा कायम स्मरणात राहील.

अल्ट्राव्हायोलेटने कोल्हापूरमध्ये नवीन एक्स्पिरियन्स सेंटर सुरू करत महाराष्ट्रातील विस्ताराला दिली गती

अल्ट्राव्हायोलेटने कोल्हापूरमध्ये नवीन एक्स्पिरियन्स सेंटर सुरू करत महाराष्ट्रातील विस्ताराला दिली गती

कोल्हापूर/प्रतिनिधी : अल्ट्राव्हायोलेटने आज कोल्हापूरमध्ये आपल्या नवीन यूव्ही स्पेस स्टेशनच्या उद्घाटनाची घोषणा केली असून देशभरातील आपल्या रिटेल आणि सेवा नेटवर्कच्या विस्तारात महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे. हा विस्तार कंपनीने अलीकडेच साध्य केलेल्या अनेक महत्त्वाच्या टप्प्यांनंतर करण्यात आला आहे. यामध्ये देशभरात इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेला ‘किल द पेट्रोल बिल’ हा कार्यक्रम, भारतभरातील टाईप ६ चार्जिंग नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी Bolt.Earth सोबतच्या सहकार्याची घोषणा आणि ‘Battery Flex’ (BaaS) कार्यक्रम यांचा समावेश आहे. या सर्व उपक्रमांमधून अल्ट्राव्हायोलेटचा सर्वसमावेशक इलेक्ट्रिक दळणवळण परिसंस्था उभारण्यावरील भर दिसून येतो. या नवीन एक्स्पिरियन्स सेंटरमुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना कंपनीच्या उच्च-कार्यक्षमता असलेल्या इलेक्ट्रिक मोटरसायकल्स अधिक सुलभपणे उपलब्ध होतील आणि देशभरातील कंपनीचे वाढते स्थान आणखी मजबूत होईल.
डीलर एम/एस. आहुजा मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या भागीदारीत स्थापन करण्यात आलेले हे नवीन यूव्ही स्पेस स्टेशन ग्राहकांना अल्ट्राव्हायोलेटच्या उच्च-कार्यक्षमता असलेल्या X-47 क्रॉसओव्हर आणि F77s या मोटरसायकलींचा सर्वसमावेशक अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून देईल. यूव्ही स्पेस स्टेशन हे 3S सुविधाकेंद्र असून ग्राहकांना टेस्ट राईडपासून विक्री, सेवा, विविध मोटरसायकल ॲक्सेसरीज आणि मर्चेंडाइजपर्यंतचा समृद्ध अनुभव देण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. या उत्पादनांमध्ये 40.2 hp क्षमतेचे पॉवरट्रेन आणि 100 Nm टॉर्क असून, ती केवळ 2.8 सेकंदांत 0 ते 60 kph वेग गाठू शकतात. 10.3 kWh क्षमतेच्या बॅटरीने सुसज्ज असलेल्या या मोटरसायकली एका चार्जमध्ये 323 किमी इतकी IDC रेंज देतात.
या उद्घाटनाबाबत बोलताना अल्ट्राव्हायोलेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक नारायण सुब्रमण्यम म्हणाले, “कोल्हापूरची ओळख नेहमीच अभियांत्रिकीतील उत्कृष्टता, उत्पादन क्षमता आणि समृद्ध ऑटोमोटिव्ह संस्कृतीशी जोडलेली राहिली आहे. भारतातील महत्त्वाच्या ऑटो कॉम्पोनंट (वाहनांसाठी लागणारे घटक) उत्पादन केंद्रांपैकी एक असलेले हे शहर नाविन्यपूर्णतेचा आग्रह धरते. अल्ट्राव्हायोलेटच्या तत्त्वज्ञानाशी हे अत्यंत सुसंगत आहे. आमच्या नवीन यूव्ही स्पेस स्टेशनच्या उद्घाटनाद्वारे आम्ही कोल्हापूरमध्ये अल्ट्राव्हायोलेटचा संपूर्ण स्वतःच्या मालकीची गाडी असण्याचा हक्काचा अनुभव घेऊन येत आहोत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, उच्च-कार्यक्षमता असलेल्या मोटरसायकलींची श्रेणी आणि सर्वसमावेशक विक्रीपश्चात सेवा सहाय्य हे सर्व एका ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत. कोल्हापूरच्या ऑटोमोटिव्ह क्षेत्राचा भाग बनण्यास आणि येथील मोटरसायकलप्रेमींचे अल्ट्राव्हायोलेट परिवारात स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
प्रगत इलेक्ट्रिक दळणवळण सुविधा अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या अल्ट्राव्हायोलेटच्या बांधिलकीनुसार, कंपनीने अलीकडेच ‘किल द पेट्रोल बिल’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत, अल्ट्राव्हायोलेट F77 किंवा X-47 खरेदीसाठी अपग्रेड करणाऱ्या कोणत्याही ग्राहकाला त्यांच्या मागील दुचाकीवर गेल्या 2 वर्षांत केलेल्या किलोमीटर प्रवासाच्या समतुल्य कॅशबॅक मिळेल. या योजनेअंतर्गत, ग्राहक त्यांच्या रायडिंग इतिहास आणि वाहनाच्या वापराच्या आधारे अल्ट्राव्हायोलेट मोटरसायकल खरेदीवर 30,000 रु. पर्यंतचे लाभ मिळवू शकतात. आधीपासूनच पेट्रोलवर केलेल्या प्रवासातील किलोमीटरचे रूपांतर मालकी हक्काशी संबंधित लाभांमध्ये करून अल्ट्राव्हायोलेट इलेक्ट्रिक मोबिलिटीचा एक अत्यंत महत्त्वाचा फायदा अधोरेखित करत आहे. म्हणजेच कार्यक्षमता, तंत्रज्ञान, विश्वासार्हता किंवा रायडिंग अनुभवाशी कोणतीही तडजोड न करता इंधनावरील वारंवार होणाऱ्या खर्चापासून मिळणारे स्वातंत्र्य ते अनुभवायला देत आहेत.महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील यूव्ही स्पेस स CTS. No. 453, B/6, द फर्न हॉटेल शेजारी, स्टेशन रोड, श्री शाहू मार्केट यार्डसमोर, कोल्हापूर येथे सुरू झाले आहे.