Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

अमृत १ व अमृत २ पाणीपुरवठा व मलनिस्सारण कामांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

उद्या गुरुवारी जीवन प्राधिकरण वर घागर मोर्चा १३ गावांचा पाण्यासाठी एल्गार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

टाटा मेमोरियल रुग्णालयात अत्याधुनिक निदान सुविधांना बळकटी देण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

My Marathi महाराष्ट्र माय मराठी

गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसात पूर्ण करा,सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

विनायक भोसले यांचा ‘लायन्स गौरव’ पुरस्काराने सन्मान

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कोल्हापूर शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा : ३० एप्रिलपासून होणार अंमलबजावणी

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

शहर स्वच्छतेत सुधारणा न झाल्यास कारवाई : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कोल्हापूरात विनापरवाना बांधकामावर महापालिकेची कारवाई ; तळघरातील बाथरूम, टॉयलेट्स हटवले

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कृषी पणन मंडळामार्फत कोल्हापूर शहरात मिलेट व फळ महोत्सव २०२६ चे आयोजन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

देशातील पहिले निसर्गोपचार व योगा महाविद्यालय व रुग्णालय म्हणून उत्तूरचे नाव निरंतर राहील : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

खेळाचे मैदान रहिवास विभागात आणावे या प्रस्तावास विरोध दर्शवत सभेत नगरसेवकांनी हाणून पाडला

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

बालिंगा सबस्टेशन कडील उच्चदाब वाहिनीचे कामामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा सोमवारी बंद

Tile List

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

बालिंगा सबस्टेशन कडील उच्चदाब वाहिनीचे कामामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा सोमवारी बंद

बालिंगा सबस्टेशन कडील उच्चदाब वाहिनीचे कामामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा सोमवारी बंद   कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांच्याकडून बालिंगा…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

स्थायी समिती सभेत विरोधकांचा सभात्याग, ऐनवेळी विषय घुसविल्याबद्दल सभापतीं आणि प्रशासनाचा विरोधकांनी केला निषेध

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

स्थायी समिती सभेत विरोधकांचा सभात्याग, ऐनवेळी विषय घुसविल्याबद्दल सभापतीं आणि प्रशासनाचा विरोधकांनी केला निषेध

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कोल्हापुरात घोषणा

List Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

आरोग्य व्यवस्थेमध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्वाची – सौ.हसमत हवेरी

आरोग्य व्यवस्थेमध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्वाची – सौ.हसमत हवेरी डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिगमध्ये जागतिक परिचारिका दिन साजरा  …

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

साईजीवन ऑइल शुद्धतेची हमी आरोग्याची नवी दिशा – उत्तम जाधव

साईजीवन ऑइल शुद्धतेची हमी आरोग्याची नवी दिशा - उत्तम जाधव कोल्हापूर/प्रतिनिधी : आजच्या काळात बाजारात मिळणाऱ्या अनेक खाद्यतेलांमध्ये रिफायलिंग केमिकल…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

विविध विकास प्रकल्पांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावा

विविध विकास प्रकल्पांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावा कोल्हापूर/प्रतिनिधी  : महापालिकेच्यावतीने शहरात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा आयुक्त…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

अमृत १ व अमृत २ पाणीपुरवठा व मलनिस्सारण कामांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा

अमृत १ व अमृत २ पाणीपुरवठा व मलनिस्सारण कामांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा कामात दिरंगाई झाल्यास ठेकेदारांवर ब्लॅकलिस्ट कारवाईचा…

Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कृषी पणन मंडळामार्फत कोल्हापूर शहरात मिलेट व फळ महोत्सव २०२६ चे आयोजन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

देशातील पहिले निसर्गोपचार व योगा महाविद्यालय व रुग्णालय म्हणून उत्तूरचे नाव निरंतर राहील : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

खेळाचे मैदान रहिवास विभागात आणावे या प्रस्तावास विरोध दर्शवत सभेत नगरसेवकांनी हाणून पाडला

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

बालिंगा सबस्टेशन कडील उच्चदाब वाहिनीचे कामामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा सोमवारी बंद

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कोल्हापूर शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा : ३० एप्रिलपासून होणार अंमलबजावणी

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

शहर स्वच्छतेत सुधारणा न झाल्यास कारवाई : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कोल्हापूरात विनापरवाना बांधकामावर महापालिकेची कारवाई ; तळघरातील बाथरूम, टॉयलेट्स हटवले

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कृषी पणन मंडळामार्फत कोल्हापूर शहरात मिलेट व फळ महोत्सव २०२६ चे आयोजन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

देशातील पहिले निसर्गोपचार व योगा महाविद्यालय व रुग्णालय म्हणून उत्तूरचे नाव निरंतर राहील : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

खेळाचे मैदान रहिवास विभागात आणावे या प्रस्तावास विरोध दर्शवत सभेत नगरसेवकांनी हाणून पाडला

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कोल्हापूरला मेट्रो सिटी केल्यास कोल्हापूर जिल्ह्याचा  शहराचा दर्जा क वर्गातून अ अथवा ब वर्गात होईल राजू माने यांची आंदोलनाद्वारे मागणी

कोल्हापूरला मेट्रो सिटी केल्यास कोल्हापूर जिल्ह्याचा  शहराचा दर्जा क वर्गातून अ अथवा ब वर्गात होईल राजू माने यांची आंदोलनाद्वारे मागणी…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

डीवायपी पॉलिटेक्निकच्या योगेश घुलेची ‘गुगल स्टुडन्ट अँबेसिडर ‘ म्हणून निवड

डीवायपी पॉलिटेक्निकच्या योगेश घुलेची ‘गुगल स्टुडन्ट अँबेसिडर ‘ म्हणून निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकचा विद्यार्थी…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

भाजप सांस्कृतिक आघाडीतर्फे आज ‘स्वर आशा’ गीत मैफिलीचे आयोजन

भाजप सांस्कृतिक आघाडीतर्फे आज ‘स्वर आशा’ गीत मैफिलीचे आयोजन आशा भोसले यांना आदरांजली कोल्हापूरकरांना संगीताचा अनुभव घेण्याचे आवाहन कोल्हापूर/प्रतिनिधी :.भारतीय…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कोल्हापूरच्या शिवाय महेशवर शितोळे यास आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त

कोल्हापूरच्या शिवाय महेशवर शितोळे यास आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त   कोल्हापूर/प्रतिनिधी : नेपाळ, काठमांडू येथील बहुउद्देशीय ज्युडो स्टेडियम,…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

भाई माधवराव बागल पुरस्कार डॉ. विजय चोरमारे यांना जाहीर

भाई माधवराव बागल पुरस्कार डॉ. विजय चोरमारे यांना जाहीर कोल्हापूर/प्रतिनिधी : भाई माधवराव बागल पुरस्कार महाराष्ट्र दिनमानचे मुख्य संपादक, ज्येष्ठ…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

आरोग्य व्यवस्थेमध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्वाची – सौ.हसमत हवेरी

आरोग्य व्यवस्थेमध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्वाची – सौ.हसमत हवेरी डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिगमध्ये जागतिक परिचारिका दिन साजरा  …

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

साईजीवन ऑइल शुद्धतेची हमी आरोग्याची नवी दिशा – उत्तम जाधव

साईजीवन ऑइल शुद्धतेची हमी आरोग्याची नवी दिशा – उत्तम जाधव कोल्हापूर/प्रतिनिधी : आजच्या काळात बाजारात मिळणाऱ्या अनेक खाद्यतेलांमध्ये रिफायलिंग केमिकल…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

विविध विकास प्रकल्पांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावा

विविध विकास प्रकल्पांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावा कोल्हापूर/प्रतिनिधी  : महापालिकेच्यावतीने शहरात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा आयुक्त…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

अमृत १ व अमृत २ पाणीपुरवठा व मलनिस्सारण कामांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा

अमृत १ व अमृत २ पाणीपुरवठा व मलनिस्सारण कामांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा कामात दिरंगाई झाल्यास ठेकेदारांवर ब्लॅकलिस्ट कारवाईचा…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य

उद्या गुरुवारी जीवन प्राधिकरण वर घागर मोर्चा १३ गावांचा पाण्यासाठी एल्गार

उद्या गुरुवारी जीवन प्राधिकरण वर घागर मोर्चा १३ गावांचा पाण्यासाठी एल्गार आमदार सतेज पाटील व ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली धडक;…

कोल्हापूरला मेट्रो सिटी केल्यास कोल्हापूर जिल्ह्याचा  शहराचा दर्जा क वर्गातून अ अथवा ब वर्गात होईल राजू माने यांची आंदोलनाद्वारे मागणी

कोल्हापूरला मेट्रो सिटी केल्यास कोल्हापूर जिल्ह्याचा  शहराचा दर्जा क वर्गातून अ अथवा ब वर्गात होईल राजू माने यांची आंदोलनाद्वारे मागणी

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : ७४ व्या घटना दुरुस्तीनुसार महानगर प्रदेश अधिनियम १९७४ महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची मागणी करणे गरजेचे आहे. १९७५ च्या सुमारास देशातील चेन्नई. मुंबई, नागपूर, नाशिक प्रमूख शहरांची अवस्था कोल्हापूर. कलकत्ता इ. दिल्ली, कोल्हापूर प्रदेश विकास धरतीवर आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासा संदर्भात भविष्यातील सोई सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे. नगर रचना कायदा ४२ (ड) २१ व ४२ एफ १ व २ च्या नियमास अनुसरून संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा सुक्ष्म विकासाचा एक आराखडा तयार केला पाहिजे.अशी भूमिका घेत विविध मागण्यांसाठी श्री राजू उर्फ सुनील श्रीपती माने यांनी दसरा चौक येथे एक दिवसाचे लक्षणे उपोषण केले. या उपोषणामध्ये त्यांनी मागण्यासाठी शासनाचे लक्ष वेधले.
यामध्ये छत्रपती राजर्षी शाहु महाराज सर्वधर्मिय स्मशानभूमी १०० एकर मध्ये वैद्यकीय कॉलेज, शेंडापार्क परिसरात स्व. दिग्विजय खानविलकर यांचा प्रतिकात्मक पुतळा उभारणे बाबत, पुणे ते कोल्हापूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची उभारणी बाबत, शेती विकू नये यासाठी शेतकरी जनजागृती अभियान बाबत,कोल्हापूर जिल्ह्यातील भिकाऱ्यांसाठी मोफत निवारा केंद्र उभारणे बाबत,
म्हाडा व सिडको गृह प्रकल्पांची उभारणी बाबत आधी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राजू माने यांनी हे उपोषण केले शिवाय जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदन सादर केले सायंकाळी सात वाजता कॅन्डल मार्च करण्यात आले.
यावेळी केंद्र शासनाला ७४ वी घटनादुरुस्ती करावी लागली व घटनादरुस्तीचा मुख्य उद्देश अर्बन डेव्हलपमेंट शहरालगतच्या क्षेत्राचा सुनियोजित विकास करणे हा होता२०. किलोमीटर व १० लाख लोकसंख्या वरील संलग्र क्षेत्राची व्याख्या महानगर प्रदेश एक किंवा अधिक महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपरिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, छावण्या व इतर संमिश्र भाग असलेल्या नागरिकांच्या मागणीनुसार राज्यपालांनी सुचित केलेले महानगर प्रदेश क्षेत्र होय.
महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र जास्त आहे. करवीर (पूर्व भाग), हातकणंगले, पन्हाळा, शिरोळ, शाहुवाडी हे तालुके जिल्ह्याची उद्योग निर्मितीसाठी ग्रोथ सेंटर ठरतील. याठिकाणी रिंगरोड, कॉक्रीट रस्ते, क्रिडा विद्यापीठ, आयटी हब, ईलेक्ट्रानिक्स हब, पर्यटन हब असे उद्योग प्रकल्प उभा राहतील. तर इतर तालुक्यामध्ये कृषि हब तयार होईल.व कृषीसाठी ग्रोथ सेंटर तयार होईल. विकास आराखड्यामध्ये लोकांना रोजगार हवा असतो. त्यातुन त्यांचे अर्थजन होईल हे पहिले पाहिजे. दिवसेंदिवस नोक-या रोजगार कमी होत आहेत. सध्या याबाबत विचार करून त्यादृष्टीने जिल्ह्यात कोणते उद्योग व्यवसाय आले पाहिजेत ते टीकवले पाहिजेत. त्या दृष्टीने महत्वाचे शहर व व ग्रामीण भाग विकसीत झाले पाहिजेत. त्यासाठी (KMRDA) स्थापन होणे गरजेचे आहे. असे राजू माने यांचे म्हणणे आहे.
मेट्रो सिटी बद्दल काही माहिती वैशिष्ट्ये अशी आहेत आर्थिक केंद्र हे शहर उद्योग व्यापार आणि रोजगाराची मुख्य केंद्र असते वाहतूक व्यवस्था येथे जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत विकसित असते म्हणजे मोठ्या प्रमाणावर लोक प्रवास करू शकतात. आधुनिक सुविधा येथे उच्च दर्जा शैक्षणिक संस्था मोठी रुग्णालय शॉपिंग मॉल आणि आधुनिक राहणीमान असते. यात यात महाराष्ट्रातील प्रमुख मेट्रोसिटी भारताच्या अर्थव्यवस्थेत आणि विकासात महत्त्वाची भूमिका बदलणारे मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मेट्रो पॉलिटिक्स रीजन आहे या व्यतिरिक्त पुणे नागपूर यासारख्या मोठ्या शहरांचाही या प्रगत श्रेणीत समावेश होतो.
मेट्रोमुळे शहराला आर्थिक आणि सामाजिक विकास करता येतो कारण ते लोकांना विविध ठिकाणी सहजपणे फिरण्यास मदत करतात. मेट्रो सिटीचा विकास देशाच्या विकासाला अनेक प्रकारे मदत करतो. मेट्रोसिटीमुळे वाहतूक, रोजगाराच्या संधी आणि आर्थिक विकास वाढतो तसेच हे शहर पर्यावरण उपायोजनांवर लक्ष केंद्रित करतात. मेट्रोसिटीची मागणी शासनाने पूर्ण केल्यास कोल्हापूर जिल्ह्याचा व शहराचा दर्जा क वर्गातून अ अथवा ब वर्गात निश्चित होणार आहे तरी शासनाने या सर्व मागण्याचा सकारात्मक विचार करावा अशी मागणी राजू माने यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे.

डीवायपी पॉलिटेक्निकच्या योगेश घुलेची ‘गुगल स्टुडन्ट अँबेसिडर ‘ म्हणून निवड

डीवायपी पॉलिटेक्निकच्या योगेश घुलेची ‘गुगल स्टुडन्ट अँबेसिडर ‘ म्हणून निवड

कोल्हापूर/प्रतिनिधी : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकचा विद्यार्थी योगेश परमेश्वर घुले याची ‘गुगल स्टुडन्ट अँबेसिडर २०२६’ म्हणून निवड झाली आहे.विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पॅलिटेक्निकमधून असा बहुमान मिळवणारा तो पहिला विद्यार्थी ठरला आहे. डी.वाय.पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, प्राचार्य डॉ. महादेव नरके उपस्थित होते.
यावेळी विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण घेताना एवढ्या कमी वयात ‘गुगल स्टुडन्ट अँबेसिडर’ म्हणून योगेशने मिळवलेला सन्मान कौतुकास्पद असल्याचे सांगून योगेशच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ.गुप्ता यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह सर्वांगीण विकासासाठी डी वाय पाटील ग्रुप कटिबध्द असल्याचे नमूद केले.प्राचार्य डॉ.नरके यांनी हा सन्मान पॉलिटेक्निकसाठी अभिमानाचा क्षण असल्याची भावना व्यक्त केली.
योगेश हा मूळचा माळशिरस येथील असून सध्या पॉलिटेक्निकच्या कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे.त्याने गुगलकडे याबाबत ऑनलाईन रजिस्टर केले होते. ॲप्टिट्यूड टेस्ट, ऑनलाइन इंटरव्ह्यू, विषयाचे ऑनलाईन प्रेझेन्टेशन या सर्व गोष्टी त्याने यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. येणाऱ्या वर्षभरात तो इतर विद्यार्थ्यांना गुगल जेमिनी एआय बाबत ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करणार आहे.
आईवडिलांनी मोठ्या कष्टाने शिक्षण दिल्याने काहीतरी वेगळे करावे अशी इच्छा होती. यातूनच हे यश मिळाल्याचे योगेशने सांगितले.यावेळी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. प्रकाश शिंदे, कॉम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख शीतल साळोखे, सत्यजित रोकडे आदी उपस्थित होते.

भाजप सांस्कृतिक आघाडीतर्फे आज ‘स्वर आशा’ गीत मैफिलीचे आयोजन

भाजप सांस्कृतिक आघाडीतर्फे आज ‘स्वर आशा’ गीत मैफिलीचे आयोजन

आशा भोसले यांना आदरांजली कोल्हापूरकरांना संगीताचा अनुभव घेण्याचे आवाहन

कोल्हापूर/प्रतिनिधी :.भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडी, कोल्हापूर यांच्या वतीने स्वरसमराज्ञी स्वर्गीय आशा भोसले यांच्या अमर गीतांना अभिवादन करण्यासाठी ‘स्वर आशा’ या विशेष गीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. हा श्रद्धांजली कार्यक्रम आज शनिवार, दिनांक २३ मे रोजी सायंकाळी ५ वाजता भाजप जिल्हा कार्यालय, नागाळा पार्क येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमात भाजप सांस्कृतिक आघाडीचे पदाधिकारी आशा भोसले यांच्या अजरामर सुरांनी सजलेल्या गीतांचे सादरीकरण करतील. हा कार्यक्रम भारतीय संस्कृती आणि संगीताचा गौरव करणारा असून, सर्वसामान्यांना आपल्या समृद्ध वारशाशी जोडण्याचा एक प्रयत्न आहे. या कार्यक्रमाला भाजपचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
कोल्हापूर शहरातील सर्व संगीतप्रेमी रसिक श्रोत्यांना या अनोख्या मैफिलीचा आनंद घेण्यासाठी आणि महान गायिका आशा भोसले यांना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

कोल्हापूरच्या शिवाय महेशवर शितोळे यास आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त

कोल्हापूरच्या शिवाय महेशवर शितोळे यास आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : नेपाळ, काठमांडू येथील बहुउद्देशीय ज्युडो स्टेडियम, लॅनचोर येथे शनिवार दिनांक १५ व १६ मे २०२६ रोजी ११ वी ज्युनिअर आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा पार पडली.या स्पर्धेत कोल्हापूरचा शिवाय महेशवर शितोळे याने रौप्य पदक प्राप्त केले आहे. तसेच याची निवड श्रीलंका येथे होणाऱ्या कराटे स्पर्धेसाठी झाली आहे.सदर स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून टनेल डोजो कराटे असोसिएशन नेपाळचे चिफ, मा . नरेश श्रेष्ठ , बागमती प्रदेश पूर्व सामाजिक विकास मंत्री मा. हरी प्रभा सदगी, नेपाळ राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू संघ अध्यक्ष मा. दीपक श्रेष्ठ , शोतोकान कराटे डो असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष मा. सिहान रमेश पिसाळ अविनाश पाटील उपस्थीत होते .
यामध्ये नेपाळ ,भारत , भूतान , बांगलादेश सह इतर देशातील ६०० हून अधिक विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता.यामध्ये भारत देशातील ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.शिवाय शितोळे हा न्यु माॅडेल इंग्लिश स्कूल, कोल्हापूरचा दुसरीचा विद्यार्थी आणि शोतोकाॅन कराटे डो – असोसिएशनचा खेळाडू असून त्याला अध्यक्ष रमेश पिसाळ, सचिव सुषमा पिसाळ, आई डाॅ. अक्षरा शितोळे , वडील डाॅ.महेशवर शितोळे यांचे मार्गदर्शन लाभले .

भाई माधवराव बागल पुरस्कार डॉ. विजय चोरमारे यांना जाहीर

भाई माधवराव बागल पुरस्कार डॉ. विजय चोरमारे यांना जाहीर

कोल्हापूर/प्रतिनिधी : भाई माधवराव बागल पुरस्कार महाराष्ट्र दिनमानचे मुख्य संपादक, ज्येष्ठ विचारवंत, राजकीय समीक्षक व निर्भिड पत्रकार विजय चोरमारे यांना जाहीर झाला आहे. गुरुवारी २८ मे रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी साडेपाच वाजता शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शाल, फेटा, गौरवपत्र, स्मृती चिन्ह, रोख पाच हजार रुपये, माधवराव बागल चरित्र प्रत असे पुरस्काराचे स्वरुप आहे.भाई माधरावजी बागल विद्यापीठाचे अध्यक्ष ॲड अशोकराव साळुंखे, कार्याध्यक्ष टी.एस. पाटील यांनी पत्रकार परिषदेत पुरस्काराची माहिती दिली.
गुरुवारी २८ मे रोजी भाई माधवराव बागल यांची १३० वी जयंती आहे. शाहू मिल चौकातील भाई बागल यांच्या पुतळ्याला सकाळी साडेनऊ वाजता अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता भाई माधवराव बागल पुरस्काराचे वितरण होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. विजय चोरमारे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.डॉ. चोरमारे यांचा वृत्तपत्रसृष्टीतील प्रदीर्घ अनुभव असून ते चौफेर लिखान करत आहेत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक या विषयांवर त्यांनी सडेतोड लिखान केले आहे. दैनिक सकाळ, दैनिक लोकमत, दैनिक प्रहार, दैनिक महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात त्यांनी काम केले आहे. स्वतंत्र बाण्याचे महाराष्ट्र दिनमानचे ते संपादक आहेत. राजकीय, सामाजिक विषयावर ते निर्भिडपणे आपली मते व्यक्त करतात.
पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या मान्यवरांना १९९२ पासून दरवर्षी पुरस्काराचे वितरण केले जाते. यापूर्वी कॉ.संतराम पाटील, चित्रकार गणपतराव वडणगेकर, प्रा. एन.डी.पाटील, डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ.गोविंद पानसरे, कॉ. यशवंत चव्हाण, दलितमित्र बापूसाहेब पाटील, पद्मश्री कुमार केतकर, क्रांतीसिंह नागनाथअण्णा नायकवडी, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, डॉ. भालचंद्र मुणगेकर, निळू फुले, डॉ. आ.ह.साळुंखे, प्रा. डॉ. सुनीलकुमार लवटे, पद्मश्री लक्षण माने, आचार्य शांतराम गरुड, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, सुरेश शिपुरकर, उल्का महाजन, शमशुद्दीन मुश्रीफ, किशोर बेडकीहाळ, पुष्पा भावे, डॉ. भारत पाटणकर, कॉ. आनंद मेणसे, प्रसाद कुलकर्णी, लोकमतचे वसंत भोसले, निरंजन टकले,आनंदराव बहिर्जी पाटील यांना आजवर बागल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

*डॉ. विजय संभाजी चोरमारे यांच्याविषयी*

विजय चोरमारे हे गेली चार दशके पत्रकारितेमध्ये आहेत. केसरी, सकाळ, लोकमत, प्रहार, महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रांमधून वार्ताहरापासून संपादकापर्यंत विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. सध्या ते ‘महाराष्ट्र दिनमान’ या यू ट्यूब आणि वेब पोर्टलचे संपादक आहेत. राजकीय विश्लेषक म्हणून मराठी, हिंदीतील नामवंत वृत्तवाहिन्यांवरून आपली मते ठोसपणे व्यक्त करीत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात अनेक स्थित्यंतरे होत असताना पत्रकारितेमध्ये ठाम भूमिका घेऊन काम करणारे मोजके पत्रकार आहेत, त्यामध्ये विजय चोरमारे यांचा समावेश होतो. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेशी बांधिलकी मानून काम करणारे पत्रकार-साहित्यिक आणि कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. कोल्हापूरसह महाराष्ट्रातील तळागाळातील घटकांच्या, उपेक्षितांच्या लढयांना ते पाठबळ देण्यामध्ये अग्रेसर असतात. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या माध्यमातून गेली वीस वर्षे या परिसरातील साहित्य चळवळ पुरोगामी विचारधारेने प्रवाही ठेवण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
त्यांचे चार कवितासंग्रह प्रकाशित आहेत. भाई माधवराव बागल विद्यापीठासाठी त्यांनी ‘कोल्हापूरः आर्थिक प्रवाह’ ( नाना गद्रे स्मृतिग्रंथ) आणि ‘स्वातंत्र्योतर महाराष्ट्रातील परिवर्तन’ (बाबूराव धारवाडे गौरव ग्रंथ) या दोन ग्रंथांचे संपादन केले आहे. याशिवाय चार कवितासंग्रह, एक अनुवादित कवितासंग्रह प्रकाशित आहे. ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’, ‘महाराष्ट्राचे राजकारणः नवे प्रवाह’, ‘शरद पवार आणि महाराष्ट्र हे संपादित ग्रंथ आहेत. ‘संभ्रमित काळाच्या नोंदी’ हे मोदीकाळातील घटनांच्या विश्लेषणाचे पुस्तक प्रसिद्ध आहे. अभिनेते चंद्रकांत मांडरे, शाहीर पिराजीराव सरनाईक, डॉ. डी. वाय. पाटील आणि प्रा. एन. डी. पाटील यांच्या आत्मचरित्रांचे शब्दांकन करून महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक दस्तावेजीकरणाचे महत्त्वाचे काम केले आहे. ‘बाबूराव पेंटर यांचे भारतीय चित्रपटाच्या विकासातील योगदान’ या विषयावर त्यांना सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाची पीएच. डी. मिळाली आहे. पत्रकारितेसाठी तसेच कवितेसाठी त्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक प्रतिष्ठित पुरस्कार तसेच फेलोशिप मिळाल्या आहेत.

आरोग्य व्यवस्थेमध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्वाची – सौ.हसमत हवेरी

आरोग्य व्यवस्थेमध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्वाची – सौ.हसमत हवेरी

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिगमध्ये जागतिक परिचारिका दिन साजरा

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : आधुनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असून, रुग्णसेवा ही केवळ नोकरी नसून मानवतेची खरी सेवा आहे. परिचारिकांनी संवेदनशीलता, संयम आणि समर्पणाच्या भावनेतून कार्य करत समाजाच्या आरोग्यव्यवस्थेला बळ द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सौ.हसमत हवेरी यांनी केले.डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिग मध्ये मंगळवार, दि. १२ मे रोजी जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
सौ. हसमत हवेरी यांनी आधुनिक नर्सिंगच्या संस्थापिका मिस.फ्लोरेंस नाइटिंगेल यांच्या कार्याचा आढावा घेत परिचारिका क्षेत्रातील सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित केले. परिचारिका या रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा असतात. कोविडसारख्या संकट काळात परिचारिकांनी जीवाची पर्वा न करता दिलेली सेवा संपूर्ण समाज कधीही विसरू शकणार नाही, असे त्या म्हणाल्या.तसेच आजच्या काळात नर्सिंग क्षेत्रात जागतिक स्तरावर मोठ्या संधी उपलब्ध होत असून, विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, संवाद कौशल्य आणि व्यावसायिक मूल्ये आत्मसात करून स्वतःला सक्षम बनवावे, असे आवाहनही त्यांनी केले. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमधील सेवा-सुविधांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा यांनी विद्यार्थ्यांनी काळानुरूप बदल स्वीकारत आधुनिक ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले. नर्सेसशिवाय कोणतेही हॉस्पिटल प्रभावीपणे चालू शकत नाही. उपचार प्रक्रियेतील त्या अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत, असे त्यांनी नमूद केले.प्राचार्य डॉ. उमारणी जे म्हणाल्या, नर्सेस केवळ रुग्णालयात सेवा देत नाहीत, तर देशनिर्मितीतही त्यांचा मोठा वाटा आहे. रुग्णांना लवकर बरे होण्यासाठी परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आज नर्सिंग क्षेत्र हे ‘व्हॅल्युएबल इन्व्हेस्टमेंट’ म्हणून उदयास येत आहे, असे सांगितले.
उपप्राचार्या एम. बिजापूर यांनीही मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी रेड रिबीन उपक्रमांतर्गत आयोजित रॅली, रोल प्ले आणि पोस्टर स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. सुनील आवटे, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक तसेच नर्सिंग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साईजीवन ऑइल शुद्धतेची हमी आरोग्याची नवी दिशा – उत्तम जाधव

साईजीवन ऑइल शुद्धतेची हमी आरोग्याची नवी दिशा – उत्तम जाधव

कोल्हापूर/प्रतिनिधी : आजच्या काळात बाजारात मिळणाऱ्या अनेक खाद्यतेलांमध्ये रिफायलिंग केमिकल प्रोसेसिंग आणि भेसळी बाबत ग्राहकांमध्ये चिंता निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत संजीवनने ग्राहकांसाठी नैसर्गिक, शुद्ध आणि आरोग्यदायी पर्याय म्हणून आपले प्रीमियम कुकिंग सादर केले आहे. अशी माहिती साई जीवन ऑइलचे सर्वेसर्वा उत्तम जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रंजीत जाधव उपस्थित होते. यावेळी बोलताना उत्तम जाधव यांनी एक वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या आमच्या संजीवन मध्ये आम्ही नैसर्गिक पद्धतीने मोहरी, डाळिंब,तीळ, जवस, सूर्यफूल, करडई, शेंगदाणा, आणि खोबऱ्यापासून खोबरेल तेल अशा विविध पद्धतीचे तेल तयार करत आहोत यासाठी लागणाऱ्या सर्व मशनरी या ठिकाणी आम्ही उभ्या केल्या असल्याचे सांगितले.
साईजीवन ऑइल हे नैसर्गिक हायड्रोलिक कोल्ड- प्रेस्ड तंत्रज्ञाने तयार केले जाते ज्यामुळे तेलातील नैसर्गिक पोषक घटक चव आणि सुगंध कायम राहतो कोणतेही रसायन कृत्रिम मिश्रण किंवा अनावश्यक प्रोसेसिंग न करता तयार केलेले हे तेल आज आरोग्याबाबत जागरूक ग्राहकांची पहिली पसंती बनत असल्याचे उत्तम जाधव म्हणाले.
साईजीवन ऑईलची खास वैशिष्ट्ये म्हणजे यात कोणतीही भेसळ किंवा मिश्रण नाही कोणतेही केमिकल वापरलेले नाही इतर तेलांच्या तुलनेत कमी वापरात अधिक चव आहे. नैसर्गिक विटामिन ई मुफा आणि पूफासारखे पोषक घटक यामध्ये आहेत. शिवाय शुद्ध स्वाद नैसर्गिक सुगंध आणि उत्तम कुकिंग अनुभव यात आहे.
आज ग्राहक केवळ तेल विकत घेत नाही तर आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची निवड करत आहेत, साईजीवन ऑइल हे शुद्धता विश्वास आणि आरोग्य यांचे प्रतीक आहे.आमचे ध्येय प्रत्येक घरापर्यंत नैसर्गिक आणि सुरक्षित तेल पोहोचणे हेच असल्याचे उत्तम जाधव म्हणाले.साईजीवन ऑइल महाराष्ट्रातील ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळवत असून येत्या काळात संपूर्ण राज्यभर वितरण,विस्तार आणि नेटवर्क अधिक मजबूत करण्याचा कंपनीचा मानस असल्याचे उत्तम जाधव यांनी विश्वास व्यक्त केला.

विविध विकास प्रकल्पांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावा

विविध विकास प्रकल्पांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतला आढावा

कोल्हापूर/प्रतिनिधी  : महापालिकेच्यावतीने शहरात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज सकाळी घेतला. यामध्ये अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत सरस्वती टॉकीज येथील बहुमजली पार्किंग इमारत व भक्त निवास संकुल, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, हॉकी स्टेडियम, शाहू मिल येथील राजर्षी शाहू महाराज स्मारक तसेच गाडी अड्डा पार्किंग व्यवस्था या ठिकाणी सध्या सुरु असलेल्या कामाचा आढावा घेतला.
हॉकी स्टेडियम येथे रंगरंगोटीची शिल्लक राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच किरकोळ राहिलेली सर्व कामे दर्जेदार पद्धतीने व लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. अंबाबाई मंदिर परिसरात पार्किंगची कमतरता लक्षात घेता गाडी अड्डा येथे पर्यायी पार्किंग व्यवस्था सुरू करण्यासाठी मंजूर निधीतून संरक्षक भिंत, कंपाउंड, सोलर लाईट, स्वच्छतागृह, काँक्रीटीकरण, बॅरिकेट्स, दिशादर्शक फलक तसेच पार्किंग मार्किंगचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले. नागरिकांना दर्जेदार पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. शेंडा पार्क येथे महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी कोल्हापूरच्या ऐतिहासिक वास्तूंना साजेशी हेरिटेज लूक असलेली उत्कृष्ट इमारतीचे डिझाईन तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. इमारतीला दगडी वास्तूचा आकर्षक लुक देण्याच्या सूचनाही दिल्या.
महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम, नगररचना, प्रोजेक्ट व पाणीपुरवठा विभागासाठी मानधनावर घेण्यात येणारे अभियंते दर्जेदार घेतले जातील. या अभियंत्यांच्या भरती प्रक्रियेत गुणवत्ता व गुणवत्ता क्रमांकाच्या आधारेच निवड केली जाईल. यातील दर्जेदार अभियंते प्रकल्पांसाठी देऊ. शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी सर्व अभियंत्यांच्या वॉर्डनिहाय स्वतंत्र बैठका घेऊन आढावा घेतला जाणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
यावेळी शहर अभियंता रमेश मस्कर, सहाय्यक अभियंता सुरेश पाटील तसेच कनिष्ठ अभियंता अनुराधा वांडरे उपस्थित होते.

अमृत १ व अमृत २ पाणीपुरवठा व मलनिस्सारण कामांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा

अमृत १ व अमृत २ पाणीपुरवठा व मलनिस्सारण कामांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा

कामात दिरंगाई झाल्यास ठेकेदारांवर ब्लॅकलिस्ट कारवाईचा इशारा

कोल्हापूर/प्रतिनिधी : महानगरपालिकेच्या वतीने शहरात सुरू असलेल्या अमृत १ व अमृत २ अंतर्गत पाणीपुरवठा योजना तसेच मलनिस्सारण योजनेच्या कामांचा आढावा आज आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी घेतला. ही बैठक दुपारी आयुक्त कार्यालयात पार पडली.या बैठकीत आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी अमृत १ योजनेअंतर्गत उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना देण्यात आल्या. शहरातील १२ पाणीटाक्यांपैकी ९ टाक्यातून सध्या पाणीपुरवठा सुरू असून उर्वरित ३ टाक्यांचे टेस्टिंग सोमवारपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच क्रॉस कनेक्शन चेंबर, चेनलिंक फेन्सिंग, कळंबा फिल्टर हाऊस येथील संप दुरुस्ती, पाइपलाइन खुदाईनंतरचे रोड रिस्टोरेशन आदी अपूर्ण कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. ठेकेदारांनी मायक्रो प्लॅनिंग करून संभाव्य काम पूर्णत्वाच्या तारखांसह नियोजन सादर करावे, अन्यथा ब्लॅकलिस्टची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. टाक्यांच्या कंपाउंड वॉलच्या कामाचा लाईनआऊट सोमवारपर्यंत देण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक कामासाठी स्वतंत्र पथके वाढवून मनुष्यबळ व यंत्रसामग्री वाढवावी, अशा सूचना दिल्या. अमृत १ योजनेतील प्रलंबीत कामाबाबत प्रशासकांनी नाराजी व्यक्त करत सोमवारपासून सर्व कामे सुरू झाली पाहिजेत, असे स्पष्ट केले. याबाबत पुन्हा एका महिन्यानंतर आढावा घेतला जाणार आहे. जुन्या पाच टाक्यांपैकी चार टाक्यांची दुरुस्ती पूर्ण झाली असून एका टाकीचे काम अद्याप अपूर्ण आहे. ते तात्काळ पुर्ण करावे.
मलनिस्सारण योजनेअंतर्गत ७८ कि.मी. ड्रेनेज लाईन पैकी ६८ कि.मी. काम पूर्ण झाले आहे. ज्या ठिकाणी अडथळे नाहीत, तेथे तात्काळ कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. दोन्ही योजनांची मुदत २०२० अखेरपर्यंत होती, मात्र अद्याप कामे अपूर्ण असल्याने विलंबाची कारणे विचारण्यात आली. काही ठिकाणी कामाचे स्वरूप व डिझाईन बदलणे, विद्युत खांब स्थलांतर आणि खाजगी जागामालकांचा विरोध यामुळे विलंब झाल्याचे जल अभियंता हर्षजीत घाटगे यांनी सांगितले.यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, कनिष्ठ अभियंता संजय नागरगोजे, सुरेश पाटील, प्रज्ञा गायकवाड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता मुरलीधर भोसले, सहाय्यक अभियंता योगेश उलपे, दास ऑफ शोर लिमिटेड मुंबई चे प्रतिनिधी इनामदार, कुलकर्णी, नोबल कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रतिनिधी मदने व शेट्टी उपस्थित होते.

उद्या गुरुवारी जीवन प्राधिकरण वर घागर मोर्चा १३ गावांचा पाण्यासाठी एल्गार

उद्या गुरुवारी जीवन प्राधिकरण वर घागर मोर्चा १३ गावांचा पाण्यासाठी एल्गार

आमदार सतेज पाटील व ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली धडक; रखडलेल्या योजने विरोधात संताप

कोल्हापूर/प्रतिनिधी : जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या सुधार गांधीनगर प्रादेशिक १३ गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनेतील विलंब, निकृष्ट कामे आणि सतत खंडित होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ ७ मे रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय, कावळा नाका येथे भव्य धडक घागर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व आमदार सतेज पाटील व माजी आमदार ऋतुराज पाटील करणार असून तेरा गावांतील जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
कणेरी जलशुद्धीकरण केंद्र येथे नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना हाकलून लावल्यानंतर ग्रामस्थांचा रोष अधिकच तीव्र झाला आहे. चार वर्षांनंतरही केवळ सुमारे ५१ टक्केच काम पूर्ण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. उकरलेले रस्ते, वारंवार होणारी पाईपलाईन गळती आणि १०-११ दिवस पाणीपुरवठा बंद राहणे यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. दरम्यान, सध्या सुरू असलेली जुनी पाणीपुरवठा योजना देखील वारंवार बंद पडत असून गळती, मोटार पंप बिघाड आणि दुरुस्तीस विलंब होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे “नवीन योजना रखडली तरी चालेल; मात्र जुन्या योजनेतून तरी नियमित पाणीपुरवठा सुरू ठेवावा,” अशी ठाम मागणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

महिलांचा मोठा सहभाग

मोर्चात महिलांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती राहणार असून अधिकाऱ्यांना घेराव घालणे अथवा ताळेबंदी करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने तातडीने कामे पूर्ण करून सुरळीत पाणीपुरवठा न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.