Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

“स्व. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी”; आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाटील कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महान शिल्पकार बी. आर. खेडकर : कलेचा अमूल्य वारसा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शाहू समाधीचे दर्शन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

समृद्ध मातृत्व अभियानाच्या राष्ट्रीय उपक्रमाला कोल्हापुरातून दिशा; नवी दिल्ली येथे ५ व ६ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्तरावर झाली व्यापक चर्चा

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

समृद्ध मातृत्व अभियानाच्या राष्ट्रीय उपक्रमाला कोल्हापुरातून दिशा; नवी दिल्ली येथे ५ व ६ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्तरावर झाली व्यापक चर्चा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रविवारी जिल्हा दौरा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शिक्षणमहर्षी डॉ डी. वाय. पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शिक्षणविश्वावर शोककळा! पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

Tile List

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

अल्ट्राव्हायोलेटने कोल्हापूरमध्ये नवीन एक्स्पिरियन्स सेंटर सुरू करत महाराष्ट्रातील विस्ताराला दिली गती

अल्ट्राव्हायोलेटने कोल्हापूरमध्ये नवीन एक्स्पिरियन्स सेंटर सुरू करत महाराष्ट्रातील विस्ताराला दिली गती कोल्हापूर/प्रतिनिधी : अल्ट्राव्हायोलेटने आज कोल्हापूरमध्ये आपल्या नवीन यूव्ही स्पेस स्टेशनच्या उद्घाटनाची घोषणा केली असून…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

घरकुलांमुळे संपूर्ण कुटुंबाचेच जीवनमान आणि राहणीमान उंचावते : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही,मंत्री हसन मुश्रीफ यांची स्पष्टोक्ती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड

Tile Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना १८५ हून अधिक जॉब ऑफर्स

My Marathi महाराष्ट्र मुख्य मुंबई

राजापूर येथील ६५-७० वर्षीय कमालुलुद्दीन वाडकर बेपत्ता

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

खाद्य सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य का? नियम सर्वांना समान लागू करा! – हिंदु जनजागृती समिती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

श्री एकमुखी दत्त देवस्थान वतीने २७ ऑगस्ट रोजी भव्य कावड यात्रेचे आयोजन – जुन्या आध्यात्मिक परंपरेचा पुन प्रारंभ

List Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

‘राह-वीर’ नागरिकांना मिळणार २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक

‘राह-वीर’ नागरिकांना मिळणार २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक कोल्हापूर/प्रतिनिधी : रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTI) देशातील रस्ते अपघात आणि…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापूर मधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तारीख पे तारीख

कोल्हापूर मधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तारीख पे तारीख कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरमधील रस्त्यांच्या स्थितीबाबत कोणतेही समाधानकारक काम न करता आज प्रतिवादी महानगर…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गर्भलिंग निदान व अवैध गर्भपाताविरोधातील कारवाईत दोषसिद्धी वाढवा; प्रतिबंधात्मक यंत्रणा अधिक सक्षम करा : डॉ. नीलम गोऱ्हे

गर्भलिंग निदान व अवैध गर्भपाताविरोधातील कारवाईत दोषसिद्धी वाढवा; प्रतिबंधात्मक यंत्रणा अधिक सक्षम करा : डॉ. नीलम गोऱ्हे पीसीपीएनडीटी कायदा व…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मातेच्या चरणी नतमस्तक; विधानपरिषदेत पुन्हा संधी मिळाल्याबद्दल आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मानले देवीचे आभार

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मातेच्या चरणी नतमस्तक; विधानपरिषदेत पुन्हा संधी मिळाल्याबद्दल आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मानले देवीचे आभार कोल्हापूर/प्रतिनिधी…

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

समृद्ध मातृत्व अभियानाच्या राष्ट्रीय उपक्रमाला कोल्हापुरातून दिशा; नवी दिल्ली येथे ५ व ६ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्तरावर झाली व्यापक चर्चा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रविवारी जिल्हा दौरा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शिक्षणमहर्षी डॉ डी. वाय. पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कुस्तीगीरांना खाशाबांचे चरित्र पुस्तके भेट देवून क्रीडादिन साजरा

ऑलिपिकवीर खाशाबा चरित्र सर्वांना नेहमी प्रेरणादायी – पै . विष्णु जोशीलकर कुस्तीगीरांना खाशाबांचे चरित्र पुस्तके भेट देवून क्रीडादिन साजरा कोल्हापूर/प्रतिनिधी…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना १८५ हून अधिक जॉब ऑफर्स

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना १८५ हून अधिक जॉब ऑफर्स कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग…

My Marathi महाराष्ट्र मुख्य मुंबई

राजापूर येथील ६५-७० वर्षीय कमालुलुद्दीन वाडकर बेपत्ता

राजापूर येथील ६५-७० वर्षीय कमालुलुद्दीन वाडकर बेपत्ता कुटुंबीयांची घालमेल, शोधासाठी नागरिकांना पोलिसांचे आवाहन राजापूर/प्रतिनिधी : राजापूर, जि. रत्नागिरी : राजापूर…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

खाद्य सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य का? नियम सर्वांना समान लागू करा! – हिंदु जनजागृती समिती

खाद्य सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य का? नियम सर्वांना समान लागू करा! – हिंदु जनजागृती समिती आधी राज्याच्या मुख्यालयातील…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

श्री एकमुखी दत्त देवस्थान वतीने २७ ऑगस्ट रोजी भव्य कावड यात्रेचे आयोजन – जुन्या आध्यात्मिक परंपरेचा पुन प्रारंभ

श्री एकमुखी दत्त देवस्थान वतीने २७ ऑगस्ट रोजी भव्य कावड यात्रेचे आयोजन – जुन्या आध्यात्मिक परंपरेचा पुन प्रारंभ   ​कोल्हापूर/प्रतिनिधी…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

‘राह-वीर’ नागरिकांना मिळणार २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक

‘राह-वीर’ नागरिकांना मिळणार २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक कोल्हापूर/प्रतिनिधी : रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTI) देशातील रस्ते अपघात आणि…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापूर मधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तारीख पे तारीख

कोल्हापूर मधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तारीख पे तारीख कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरमधील रस्त्यांच्या स्थितीबाबत कोणतेही समाधानकारक काम न करता आज प्रतिवादी महानगर…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गर्भलिंग निदान व अवैध गर्भपाताविरोधातील कारवाईत दोषसिद्धी वाढवा; प्रतिबंधात्मक यंत्रणा अधिक सक्षम करा : डॉ. नीलम गोऱ्हे

गर्भलिंग निदान व अवैध गर्भपाताविरोधातील कारवाईत दोषसिद्धी वाढवा; प्रतिबंधात्मक यंत्रणा अधिक सक्षम करा : डॉ. नीलम गोऱ्हे पीसीपीएनडीटी कायदा व…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मातेच्या चरणी नतमस्तक; विधानपरिषदेत पुन्हा संधी मिळाल्याबद्दल आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मानले देवीचे आभार

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मातेच्या चरणी नतमस्तक; विधानपरिषदेत पुन्हा संधी मिळाल्याबद्दल आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मानले देवीचे आभार कोल्हापूर/प्रतिनिधी…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

“स्व. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी”; आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाटील कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट

“स्व. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी”; आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाटील कुटुंबीयांची घेतली…

कुस्तीगीरांना खाशाबांचे चरित्र पुस्तके भेट देवून क्रीडादिन साजरा

ऑलिपिकवीर खाशाबा चरित्र सर्वांना नेहमी प्रेरणादायी – पै . विष्णु जोशीलकर

कुस्तीगीरांना खाशाबांचे चरित्र पुस्तके भेट देवून क्रीडादिन साजरा

कोल्हापूर/प्रतिनिधी : फक्त खेळाडूच नव्हे तर जीवन संघर्ष करणाऱ्या प्रत्येकांना ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांचे चरित्र नेहमी प्रेरणादायी ठरेल असे मनोगत वस्ताद विष्णू जोशीलकर यांनी व्यक्त केले . ध्रुवतारा फाउंडेशनच्यावतीने
प्रा. संजय दुधाणे लिखित
ऑलिम्पिकवीर खाशाबा पुस्तक कुस्तीगीरांना भेट देऊन राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.जुन्या मोतीबाग तालमीत महाराष्ट्र केसरी विष्णु जोशीलकर व लेखक प्रा. संजय दुधाणे यांच्या हस्ते कुस्तीगीरांना पुस्तक देण्यात आले. याप्रसंगी
राजे साळुंखे चालुक्य राजवंश प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी साळुंखे, राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव अशोक पवार, कुस्ती संघटक बाबा महाडिक, क्रीडा संघटक दत्तात्रय वरूटे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रांरभी ज्येष्ठ वस्ताद बाळ गायकवाड यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली .
कुस्तीगीर खाशाबा जाधवांनी १९५२ हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक पदक जिंकण्याचा पराक्रम केला होता. या ऐतिहासिक कामगिरीला उजाळा देत खाशाबांचे चरित्र पुस्तक प्रकाशित केले आहे. खाशाबांच्या दुर्मिळ छायाचित्रांसह १६६ पानांनी पुस्तक सजले असून दिवगंत जेष्ठ लेखक य.दि. फडके यांनी पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली आहे. प्रा. संजय दुधाणे यांनी सखोल संशोधन करीत हे जीवन चरित्र शब्दचित्रित केले आहे.
महाराष्ट्रातील नामवंत तालमींना ऑलिंपिकवीर खाशाबा पुस्तक भेट देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कोल्हापूरातील राजे साळुंखे चालुक्य राजवंश प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी साळुंखे, धैयशील पुंगावकर यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. कोल्हापूर जिल्हा कुस्ती संघटनेचे अध्यक्ष रविंद्र पाटील, कुस्ती प्रशिक्षक दादासो लवटे, क्रीडा संघटक दत्तात्रय वरूटे यांनीही खेळाडूंसाठी पुस्तक भेट उपक्रम राबविणार आहेत.
खाशाबांनी जिंकलेल्या पदकाच्या कामगिरीला संजय दुधाणे यांनी उजाळा दिला. पदकाचे यंदा अमृतमहोत्सवी वर्ष असून या निमित्ताने हे पुस्तक नव्या रूपात वाचकांच्या हाती देताना आनंद होत असल्याचे लेखक दुधाणे यांनी सांगितले आहे. खाशाबा हे आम्हा कुस्तीगीरांचे दैवत असून लेखक संजय दुधाणे यांच्यामुळे खाशाबांची कामगिरी जगापुढे सर्वप्रथम आली याबद्दल त्यांचे कौतुक तेवढे कमी आहे असे महाराष्ट्र केसरी विष्णु जोशीलकर यांनी सांगितले.
खाशाबासारखे ऑलिम्पिकवीर कोल्हापुरातून घडविण्यासाठी हे पुस्तक प्रेरणादायी असल्याचे शिवाजी साळुंखे यांनी नमूद केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मकोटे यांनी केले तर आभार सागर ठाणेकर यांनी मानले. मोतीबाग तालमीतील पैलवान तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते .

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना १८५ हून अधिक जॉब ऑफर्स

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना १८५ हून अधिक जॉब ऑफर्स

कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कसबा बावडा येथील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांना विविध नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून १८५ हून अधिक जॉब ऑफर्स प्राप्त झाल्या आहेत. हेवलेट-पॅकार्ड (एच पी ) कंपनीमध्ये दोन विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांना ८.५ लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळाले आहे.लॉन्च्ड ग्लोबल या कंपनीने सर्वाधिक ४३ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. त्याखालोखाल अनलॉक्स अकॅडमीने २०, वॉलस्टार टेक्नॉलॉजीजने १९, इन्फोसिसने १३, टेस्टयंत्रा सॉफ्टवेअर सोल्युशन्सने १०, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ९, एज्यू व्हर्सिटी बंगळुरू ८, सायबर सक्सेस ६, आणि एक्सेलआरने ५ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज, फोक्सवॅगन इंडिया प्रा. लि., , फॉक्स सोल्युशन्स, मायक्रोलाइज आणि पेगासससह विविध कंपन्यांनीही विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली.
विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांकडून आकर्षक पॅकेज मिळाले असून एचपीमध्ये ८.५ लाख रुपये, टीसीएसमध्ये व लॉन्च्ड ग्लोबल ७ लाख, अनलॉक्स अकॅडमीमध्ये ६ लाख, पेगासस ५.५ लाख रुपये, फॉक्स सोल्युशन्समध्ये ५.४६ लाख, ४.८ लाख, हेक्सावेअरमध्ये ४ लाख, तर इन्फोसिसमध्ये ३.६ लाख रुपये पॅकेज ऑफर केले आहे.
महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार तांत्रिक प्रशिक्षण, कोडिंग प्रॅक्टिस, कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, मॉक इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन, करिअर काउन्सेलिंग तसेच प्लेसमेंटपूर्व विशेष प्रशिक्षण दिले जाते. उद्योगक्षेत्रातील बदलत्या गरजांनुसार विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासावर भर दिल्याने त्यांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या चांगल्या संधी मिळत आहेत.
नुकतेच महाविद्यालयाला वॉशिंग्टन अकॉर्डच्या निकषांनुसार नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन (NBA) मानांकन प्राप्त झाले असून, शिवाजी विद्यापीठाकडून अधिकारप्रदत्त स्वायत्त संस्थेचा दर्जाही मिळाला आहे. या मान्यतांमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक बळकटी मिळाली असून, भविष्यात नामांकित कंपन्यांकडून कॅम्पस प्लेसमेंटसाठी अधिक पसंती मिळण्यास मदत होणार आहे.
या निवडीसाठी अधिष्ठाता प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे, सीएसई विभागप्रमुख डॉ. राधिका ढणाल , प्लेसमेंट समन्वयक तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, सी.एच.आर.ओ. श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे आणि रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

राजापूर येथील ६५-७० वर्षीय कमालुलुद्दीन वाडकर बेपत्ता

राजापूर येथील ६५-७० वर्षीय कमालुलुद्दीन वाडकर बेपत्ता

कुटुंबीयांची घालमेल, शोधासाठी नागरिकांना पोलिसांचे आवाहन

राजापूर/प्रतिनिधी : राजापूर, जि. रत्नागिरी : राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २२ ऑगस्ट २०२६ रोजी कमालुलुद्दीन दाऊद वाडकर (वय अंदाजे ६५ ते ७० वर्षे) हे बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या बेपत्ता होण्याने परिसरात चिंता व्यक्त होत असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाडकर यांची उंची अंदाजे ५ फूट ४ इंच असून शरीरयष्टी सडपातळ आहे. रंग सावळा असून केस पांढरे व टकलाकडे आहेत. तसेच त्यांची मिशी पांढरी आहे. बेपत्ता होताना त्यांनी फिकट निळा/पांढरा शर्ट आणि गडद रंगाची पँट परिधान केली होती.
माहिती मिळताच तात्काळ संपर्क करा
कमालुलुद्दीन वाडकर हे कोणाला आढळून आल्यास किंवा त्यांच्या ठावठिकाणाबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास विलंब न करता खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सागर खंडागळे : 9270363328
अमित यादव : 9273926420
नागरिकांनी ही माहिती आपल्या परिसरातील नागरिक, मित्रमंडळी आणि विविध संपर्कगटांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. एका नागरिकाच्या सतर्कतेमुळे बेपत्ता व्यक्तीचा शोध लागण्यास मोठी मदत होऊ शकते.

खाद्य सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य का? नियम सर्वांना समान लागू करा! – हिंदु जनजागृती समिती

खाद्य सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य का? नियम सर्वांना समान लागू करा! – हिंदु जनजागृती समिती

आधी राज्याच्या मुख्यालयातील अन्नाचा दर्जा कधी सुधारणार ?

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गणेशोत्सव व आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षेचा बडगा दाखवताना, केवळ हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांतील ‘महाप्रसाद’ आणि ‘भंडारा’ यांचाच विशेष उल्लेख करून कारवाईचा इशारा दिला आहे. अन्न सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या धार्मिक परंपरांना परवाने, नोंदणी आणि नियमांच्या जंजाळात अडकवण्याचा हा प्रयत्न अत्यंत पक्षपाती व प्रशासकीय दुटप्पीपणाचे उत्तम उदाहरण आहे. बकरी ईद, रमझान ईद, इफ्तार पार्ट्या, नाताळ (ख्रिसमस) किंवा गुड फ्रायडे यांसारख्या इतर धर्मीयांच्या सणांच्या वेळी शिजवले जाणारे अन्न आणि होणारे सार्वजनिक अन्न वितरण एफडीएला दिसत नाही का? त्या वेळी अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन केले जाते का, याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने द्यावे. इतर धर्मीयांच्या सणांनाही हे नियम लागू करून त्यावर कारवाई केली जाणार का, हे एफडीएने जाहीर करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले आहे.तुकाराम मुंढे हे चांगले काम असले, तरी केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य करण्याची भूमिका अजिबात स्वीकारली जाणार नाही, असेही श्री. घनवट यांनी नमूद केले आहे.
श्री. घनवट पुढे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १४ नुसार कायदा सर्वांना समान लागू झाला पाहिजे, तसेच अनुच्छेद १५ अनुसार शासनाला धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. असे असताना केवळ हिंदूंच्या श्रद्धेशी जोडलेल्या अन्नदानावर आणि भंडाऱ्यांवरच कडक कारवाईची भाषा करणे हा पक्षपात आहे. जनतेला अन्नाच्या दर्जाचे धडे देणाऱ्या प्रशासनाला स्वतःच्या इमारतींमधील अस्वच्छता दिसत नाही, हे दुर्दैवी आहे. राज्याचे मुख्य केंद्र असलेल्या मंत्रालय, आमदार निवास आणि विधान भवन येथील कँटीनमधील अन्नाच्या निकृष्ट दर्जाबाबत खुद्द लोकप्रतिनिधींनीच वारंवार तक्रारी केल्या आहेत. कँटीन व्यवस्थापनाशी आमदारांचे हातघाईवर आल्याचे प्रसंगही महाराष्ट्राने पाहिले आहेत. शासकीय रुग्णालये आणि वसतिगृहांमध्ये रुग्ण व विद्यार्थ्यांना दिले जाणारे अन्न अत्यंत सुमार दर्जाचे असते. स्वतःच्या शासकीय व्यवस्थांमध्ये सुरक्षित अन्न पुरवू न शकणारे अधिकारी निष्काम सेवाभावाने तयार होणाऱ्या ‘महाप्रसादा’वर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, हा संतापजनक प्रकार आहे.
अन्न सुरक्षेचे नियम लागू करायचे असतील, तर ते सर्व धर्मीयांच्या सण-उत्सवांतील अन्न वितरणाला समान रीतीने लागू करावेत. एफडीएने सर्वप्रथम मंत्रालय, आमदार निवास आणि सर्व शासकीय कँटीन्सची झाडाझडती घेऊन तिथल्या अन्नाच्या दर्जाचा अहवाल सार्वजनिक करावा. हिंदूंची मंदिरे, गणेशोत्सव आणि नवरात्रीतील सार्वजनिक मंडळांना परवान्यांच्या नावाखाली त्रास देण्याचा प्रकार करू नये. तसेच अन्नदानाच्या सेवाभावी प्रक्रियेत बाधा निर्माण करू नये, असेही श्री. घनवट यांनी शेवटी म्हटले आहे.

श्री एकमुखी दत्त देवस्थान वतीने २७ ऑगस्ट रोजी भव्य कावड यात्रेचे आयोजन – जुन्या आध्यात्मिक परंपरेचा पुन प्रारंभ

श्री एकमुखी दत्त देवस्थान वतीने २७ ऑगस्ट रोजी भव्य कावड यात्रेचे आयोजन – जुन्या आध्यात्मिक परंपरेचा पुन प्रारंभ

 

​कोल्हापूर/प्रतिनिधी : ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या करवीर नगरीला (कोल्हापूर) शतकानुशतकांची उज्ज्वल आणि दैवी परंपरा लाभली आहे. याच परंपरेचा एक मुख्य भाग असलेल्या ‘कावड व जलाभिषेक परंपरेचे’ ऐतिहासिक, धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी येत्या २७ ऑगस्ट रोजी भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे . मंगळ वार पेठेतील श्री एक मुखी दत्त मंदिर यांच्यावतीने आयोजन करण्यात येत आहे अशी माहिती प्रमुख संयोजक संतोष गिरी गोसावी महाराज आणि पारस ओसवाल यांनी दिली.यावेळी किशोर घाटगे, महेश पाटील , संतोष गिरी गोसावी (माऊली ) उपस्थित होते.
२७ रोजी सकाळी नऊ वाजता पंचगंगा घाट येथे दत्तपादुकावर जलाभिषेक करून कावडीने पंचगंगा नदीची पाणी गंगावेस श्रीकृष्ण सरस्वती महाराज मठी छत्रपती शिवाजी महाराज मुजरा गुजरी जैन मंदिर श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिर महाद्वार रोड बिनकामी गेले मंदिर मार्गे एकमुखी दत्त मंदिर येथेही कावड यात्रा येणार आहे त्या ठिकाणी भव्य आरती आणि महाप्रसादाने याची सांगता होणार असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.कोल्हापूरच्या अध्यात्मिक परंपरेची नवी ओळख अधिक व्यापक अशी ही कावड यात्रा आसणार आहे . यांच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते अरुण गवळी, मिलिंद कुलकर्णी,राजेंद्र मकोटे, सागर ठाणेकर यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्ते सक्रियपणे कार्यरत आहेत.या कावड यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व युवकाना एक मुखी दत्त मंदिराच्या वतीने टी-शर्ट देण्यात येणार आहे . यासाठी नाव नोंदणी एकमुखी दत्त मंदिर मिरजकर तिकटी येथे सुरू आहे.या कावड यात्रेची आध्यात्मिकसह विविध पैलूची परंपरा अशी आहे छत्रपती घराण्याची कावड व जलाभिषेक परंपरा,​राजाश्रय आणि संस्कृती संवर्धन: महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर संस्थांनकाळात छत्रपती घराण्याने हिंदू धर्म, संस्कृती आणि प्राचीन परंपरांच्या संवर्धनाला नेहमीच राजाश्रय दिला.
​पंचगंगेचे पवित्र जल व मान-मरातब: श्रावण महिन्यात किंवा विशेष पर्वावर पंचगंगा नदीच्या पात्रातून पवित्र जल कलशात भरून अत्यंत मान-मरातबाने आणि वाजत-गाजत कावड आणली जात असे.​श्री अंबाबाई व जोतिबा मंदिरातील अभिषेक: मोहिमेवर जाण्यापूर्वी किंवा कोणत्याही मोठ्या कार्याची सुरुवात करण्यापूर्वी छत्रपती घराण्याकडून देवीला आणि स्थानिक देवस्थानांना जलाभिषेक केला जाई. श्रावणात विशेष कावडीद्वारे आणलेले जल श्री महालक्ष्मीच्या पिंडीवर आणि उपदेवतांना अर्पण करण्याची प्राचीन परंपरा होती.
​लोकसहभाग: ही राजघराण्याची परंपरा असल्याने कावड यात्रा हा केवळ वैयक्तिक विधी न राहता त्याला एका मोठ्या सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले.
​ प्राचीन करवीर नगरीतील कावड व जलाभिषेकाचे महत्त्व
​शैव आणि शाक्त पीठाचा संगम: करवीर हे क्षेत्र जसे आदिशक्ती श्री महालक्ष्मीचे (अंबाबाई) साडेतीन पीठांपैकी एक प्रमुख पीठ आहे, तसेच ते ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाणारे जागृत शिवक्षेत्रही आहे. कावडीच्या माध्यमातून शिव आणि शक्ती (हर आणि हरी) यांचा एकाच वेळी जलाभिषेकाने अद्वितीय समन्वय साधला जातो.
​नदी संगमाचे पवित्र जल: करवीर क्षेत्र हे पंचगंगा आणि इतर गुप्त प्रवाहांच्या संगमामुळे अत्यंत पवित्र मानले गेले आहे. येथील तीर्थातून जलग्रहण करून अनवाणी चालत जाऊन आराध्य देवतेला जल अर्पण करणे ही कठोर तपश्चर्या आणि आत्मशुद्धी मानली जाते.​भक्ती व संयमाचे प्रतीक: कावड यात्रा ही केवळ शारीरिक श्रम नसून, अत्यंत कठोर व्रतवैकल्ये, संयम आणि निसर्गातील पवित्र जल प्रवाहित करून देवतेप्रति वाहिलेली निस्सीम भक्ती आहे.
पौराणिक व संत परंपरेतील संदर्भ ​पौराणिक संदर्भ: स्कंद पुराण आणि ‘करवीर माहात्म्य’ या ग्रंथांमध्ये येथील तीर्थक्षेत्रांचे वर्णन आढळते. ऋषी-मुनींनी आणि देवतांनीसुद्धा या भूमीत येऊन श्री महालक्ष्मी व विविध शिवलिंगांवर जलाभिषेक केल्याचे उल्लेख धार्मिक ग्रंथांत आहेत.​दत्त संप्रदाय व नाथ पंथ: कोल्हापूर हे श्री दत्तगुरूंची भिक्षाभूमी आणि निवासस्थान मानले जाते. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी करवीर नगरीत वास्तव्य केले. संत ज्ञानेश्वर महाराज, स्वामी समर्थ यांसारख्या अनेक महात्म्यांनी करवीर नगरीत येऊन जलाभिषेक व पूजा केल्याचे दाखले मिळतात.कावड व जलाभिषेकाची ही परंपरा म्हणजे केवळ एक विधी नसून तो आपल्या श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि अध्यात्माचा अमूल्य वारसा आहे. या प्राचीन सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा वारसा जपणे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे.

‘राह-वीर’ नागरिकांना मिळणार २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक

राह-वीर’ नागरिकांना मिळणार २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक

कोल्हापूर/प्रतिनिधी : रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTI) देशातील रस्ते अपघात आणि मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘राह-वीर’ (पूर्वीची गुड समेरिटन योजना) योजनेची घोषणा केली आहे. अपघातातील गंभीर जखमींना पहिल्या महत्त्वाच्या तासात (गोल्डन अवर) तातडीने मदत करून त्यांचे प्राण वाचवणाऱ्या नागरिकांना या योजनेअंतर्गत आर्थिक प्रोत्साहन दिले जाणार आहे.या योजनेंतर्गत प्रत्येक पात्र ‘राह-वीर’ व्यक्तीला २५ हजार रुपये रोख पारितोषिक आणि प्रशंसा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. एकाच गंभीर अपघातात एकापेक्षा अधिक नागरिकांनी मिळून एखाद्याचा जीव वाचविल्यास २५ हजार रुपयांची रक्कम संबंधित मदतगारांमध्ये समान विभागली जाईल. एका व्यक्तीला एका वर्षात जास्तीत जास्त पाच वेळा या पारितोषिकाचा लाभ घेता येईल. वर्षभरात देशभरातून निवडलेल्या १० उत्कृष्ट ‘राह-वीर’ नागरिकांना प्रत्येकी १ लाख रुपये, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात येणार आहे.
मोटार वाहन अपघातातील गंभीर जखमी व्यक्तीला अपघातानंतरच्या पहिल्या एका तासाच्या आत जवळच्या रुग्णालयात किंवा ट्रॉमा केअर सेंटरमध्ये पोहोचवून आवश्यक वैद्यकीय उपचार मिळवून देणारी व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरू शकते. मोठी शस्त्रक्रिया करावी लागलेली व्यक्ती, किमान तीन दिवस रुग्णालयात दाखल असलेली व्यक्ती, मेंदू किंवा पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झालेली व्यक्ती किंवा उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या अपघातांचा गंभीर अपघातामध्ये समावेश होतो.
मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४A नुसार, मदत करणाऱ्या ‘राह-वीर’ नागरिकाला त्याच्या संमतीशिवाय पोलीस किंवा कायदेशीर चौकशीसाठी त्रास दिला जाऊ नये, यासाठी कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे. मदतगाराला त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तक्रार निवारण समितीकडे दाद मागता येईल. मदतगाराने दिलेली माहिती गोपनीय ठेवण्यात येणार असून, ती केवळ पारितोषिकाच्या प्रक्रियेसाठी वापरली जाईल.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस ठाणे किंवा संबंधित रुग्णालय मदत करणाऱ्या व्यक्तीची नोंद करून जिल्हास्तरीय समितीकडे प्रस्ताव पाठवेल. जिल्हाधिकारी अथवा जिल्हा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती प्रस्तावाची छाननी करून मंजुरी देईल. त्यानंतर पात्र मदतगाराच्या बँक खात्यात PFMS/DBT प्रणालीद्वारे पारितोषिकाची रक्कम थेट जमा करण्यात येईल.
रस्ते अपघाताच्या वेळी नागरिकांनी भीती न बाळगता मानवतेच्या भावनेतून पुढे येऊन जखमींना तातडीने मदत करावी आणि ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळवून देऊन त्यांचे प्राण वाचविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे.

कोल्हापूर मधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तारीख पे तारीख

कोल्हापूर मधील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तारीख पे तारीख

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरमधील रस्त्यांच्या स्थितीबाबत कोणतेही समाधानकारक काम न करता आज प्रतिवादी महानगर पालिका कोल्हापूर, जिल्हा परिषद कोल्हापूर, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कोल्हापूर, नगर विकास मंत्रालय यांनी पुन्हा त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी पुढील तारीख देण्याची विनंती न्यायालयाला केली आणि पुढील सुनावणीसाठी उच्च न्यायालयाने दिनांक ७ सप्टेंबर ही तारीख नक्की केली आहे. सामाजिक जाणीव असलेले विचारवंत उदय नारकर, डॉ. रसिया पडळकर, डॉ. अनिल माने, भारती पोवार, एड सुनीता जाधव, डॉ. तेजस्विनी देसाई यांनी ॲड. असीम सरोदे यांच्या मार्फत दाखल केलेल्या या जनहित याचिकेतून रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे समस्त कोल्हापूरकरांच्या शारीरिक त्रासाबाबत पुराव्यांसह मांडणी करण्यात आलेली आहे.
खरे तर उच्च न्यायालयातील या जनहित याचिकेमुळे प्रशासनाने कोल्हापुरातील रस्त्यांची कामे सुरु केलेली आहेत. मागील सहा महिन्यांपासून प्रतिवादींतर्फे न्यायालयाची दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे असा आरोप याचिकाकरते उदय नारकर यांनी केला.
कोल्हापूर शहरातील रस्ते गेली अनेक वर्षे खराब होत चाललेले आहेत परंतु रस्त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष केले जातेय असा आरोप करणाऱ्या या जनहित याचिकेवर कुणीच गंभीर विचार करताना आणि सकारात्मक पावले उचलतांना दिसत नाहीत. कोल्हापूरातील रस्ते पावसामुळे खराब झाल्याचे कारण प्रशासनातर्फे देण्यात येते हा बेजाबदारपणा आहे व रस्त्यांची अवस्था अत्यंत गंभीर आहे असे रसिका पडळकर म्हणाल्या.
सध्या अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने केली जाणारी कोल्हापूर शहरातील रस्त्यांची डागडुजी आक्षेपाहार्य आहे त्यामुळे न्यायालय पुढील तारखेला नक्कीच अधिक खोलवर जाऊन सुनावनी करेल असा विश्वास ॲड. असीम सरोदे यांनी व्यक्त केला. कोठेही, कशाही पद्धतीने रस्ते उकरायला दिली जाणारी परवानगी आणि विविध युटिलिटी च्या कामांसाठी उकरलेले रस्ते यामुळे कोल्हापूर शहर हे एखाद्या उध्वस्त झालेल्या शहरासारखे भासू लागलेले आहे. सामान्य माणसांना स्पॉडिलायसिस, सर्दी, डोळेदुखी असे आजार होत आहेत. उपननगरातील रस्त्यांबाबत तर यापेक्षा गंभीर परिस्थिती आहे. रस्त्यांच्या या अत्यंत दर्जाहीन परिस्थितीमुळे, मणक्याचे दुखणे, कमरेचे दुखणे, गाड्यांच्या देखभाल खर्चामध्ये प्रचंड वाढ आणि चिखल व धुळीमुळे हवेच्या प्रदूषणामध्ये कमालीची वाढ झालेली आहे. याशिवाय, खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली असून, वाहतूक कोंडी, त्यामुळे खर्च होणारे अधिकचे इंधन हे सर्व देखील आता नागरिकांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलेले आहे असे कोल्हापूरकरांचे दुःख याचिकेतून मांडण्यात आल्याचे ॲड. असीम सरोदे यांचे सहकारी वकील ॲड. श्रीया आवले, ॲड. सकलेन मुजावर म्हणाले.
या जनहित याचिकेतील आरोपांवर उत्तर देण्यासाठी आज महानगर पालिका कोल्हापूर, जिल्हा परिषद कोल्हापूर, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कोल्हापूर, नगर विकास मंत्रालय यांच्या तर्फे पुन्हा अवधी मागून घेतला त्यामुळे पुढील सुनावणी ९ सप्टेंबर ला ठेवण्यात आली.
याचिकेवरील सुनावणी मुद्दाम राखडविणाऱ्या महानगर पालिका कोल्हापूर, जिल्हा परिषद कोल्हापूर, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचा आज समस्त कोल्हापूरकरांच्या वतीने निषेध करण्यात आला. रस्ते कामाकडे प्रशासनाचे गुन्हेगारी स्वरूपाचे दुर्लक्ष होतेय, शहरातील रस्ते सुधारण्याबाबत उच्च न्यायालयातील पहिल्या सुनावणीपासून कमालीची बेपर्वाई दिसून येते आहे.उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या मा. न्यायाधीशांनी प्रशासनाला दर पंधरा दिवसांनी कामाच्या प्रगतीचे लेखी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता मात्र, आजतागायत त्या आदेशाची काडीचीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही असा उद्वेग आज याचिकाकर्त्यांनी व्यक्त केला.
तब्बल आठ महिने उलटून गेले तरी प्रशासनाने एका ओळीचाही अहवाल न्यायालयास सादर केलेला नाही. आता दि. १३ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांना हे अहवाल सादर करण्यासाठी ७ सप्टेंबर ही मुदत न्यायालयाने दिली आहे. याचिकेच्या सुनावणीची पुढील तारीख ९ सप्टेंबर आहे.
कोल्हापूरच्या रस्त्यांबाबत महापालिकेच्या बेफिकिरीचे धिंडवडे रोज वृत्तपत्रे आणि माध्यमांतून निघत आहेत. कोल्हापूरचे रस्ते उत्तम आहेत, अशा विधानावर प्रशासनाचा खरोखरच विश्वास बसत असेल, तर नागरिकांनी या प्रशासनास जाग आणण्यासाठी कृतिशील व्हावे, असे आवाहन आम्ही करत आहोत असे उदय नारकर म्हणाले. शहरातील रस्त्यांबाबत जनतेमध्ये कमालीचा असंतोष आहे. हे महापालिकेने गांभीर्याने घेत तातडीने सर्व रस्ते उत्तम दर्जाचे करण्याचे संविधानदत्त काम हाती घ्यावे. अन्यथा, न्यायालयाचा अवमान केल्याच्या कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा जाहीर इशारा आम्ही देत आहोत असे याचिकाकर्त्यांनी जाहीर केले आहे.

गर्भलिंग निदान व अवैध गर्भपाताविरोधातील कारवाईत दोषसिद्धी वाढवा; प्रतिबंधात्मक यंत्रणा अधिक सक्षम करा : डॉ. नीलम गोऱ्हे

गर्भलिंग निदान व अवैध गर्भपाताविरोधातील कारवाईत दोषसिद्धी वाढवा; प्रतिबंधात्मक यंत्रणा अधिक सक्षम करा : डॉ. नीलम गोऱ्हे

पीसीपीएनडीटी कायदा व विविध प्रकारे मुलींना गर्भातच नष्ट करण्याच्या विरोधातील केसेस साठी प्रत्येक जिल्ह्यात १ विशेष न्यायालयांची शिफारस

पुनरावृत्ती व संघटित गुन्ह्यांसाठी मोका कायद्याच्या धर्तीवर कठोर तरतुदींचा विचार करण्याची मागणी

कोल्हापूर/प्रतिनिधी : गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपाताच्या घटनांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठी केवळ कारवाई आणि अटकेपुरते मर्यादित न राहता दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढविणे, पुनरावृत्ती करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आणि कायद्यातील पळवाटा बंद करणे आवश्यक आहे, अशी भूमिका शिवसेना नेत्या, विधान परिषदेच्या माजी उपसभापती तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडली.
गर्भलिंग निदान व अवैध गर्भपाताविरोधातील कारवाईचा आढावा घेण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांच्या पुढाकाराने कोल्हापूर येथे विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी सातारा , सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापुर आरोग्य संचालक व पोलीस अधिक्षक आंतर जिल्हा स्तरावर समन्वयाने काम करून तपासाची गुणवत्ता आणि न्यायालयात सादर करण्यात येणारे पुरावे अधिक भक्कम करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.पोलीस महानिरीक्षक श्री. रंजनकुमार शर्मा यांनी या बैठकीचे संयोजक म्हणून काम केले . या बैठकीस आरोग्य उपसंचालक दिलीप माने, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, कोल्हापूरच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात, साताऱ्याचे डॉ. राहुल जाधव, डॉ. विक्रमसिंह कदम आणि डॉ. वर्षा डोईफोडे प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच अतिरिक्त आरोग्य संचालक डॉ. संदीप सांगळे, सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी, पुण्याचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्यासह संबंधित जिल्ह्यांतील पोलीस व आरोग्य विभागाचे अधिकारी ऑनलाइन माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते.
गर्भलिंग निदान रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, ज्या महिलेला पहिले अपत्य मुलगी आहे आणि ती दुसऱ्यांदा गर्भवती आहे, अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर तरतुदी व गोपनीयतेच्या नियमांचे काटेकोर पालन करून आरोग्य यंत्रणेमार्फत आवश्यक देखरेख व समुपदेशनाची व्यवस्था अधिक प्रभावी करता येईल का, याचा अभ्यास करण्यात यावा.
गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपाताचे प्रकार संघटित स्वरूपात करणाऱ्या तसेच वारंवार अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी होणाऱ्यांवर केवळ अटक व जामीन एवढ्यापुरती कारवाई मर्यादित राहू नये. पुनरावृत्ती करणाऱ्या आणि संघटित पद्धतीने हे गैरप्रकार करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईसाठी कायदेशीर पर्यायांचा अभ्यास करावा, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.गर्भलिंग निदान व स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी मोका कायद्याच्या धर्तीवर कठोर तरतुदी करता येतील का, याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर प्रत्येक दाखल गुन्ह्याचा गुणवत्तापूर्ण तपास, तांत्रिक व अन्य पुराव्यांची मजबूत साखळी आणि प्रभावी न्यायालयीन तातडीचे निर्णय होण्यास प्रत्येक जिल्ह्यात पीसीपिएनजीटी व अवैध गर्भपात तसेच आयव्हीएफ सेंटर्स मधुनही गुप्तपणे फक्त मुलगा होण्यास प्राधान्य देण्याची पद्धती या विषयांवर विशेष न्यायालय करण्यात यावे अशी गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली .

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मातेच्या चरणी नतमस्तक; विधानपरिषदेत पुन्हा संधी मिळाल्याबद्दल आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मानले देवीचे आभार

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मातेच्या चरणी नतमस्तक; विधानपरिषदेत पुन्हा संधी मिळाल्याबद्दल आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मानले देवीचे आभार

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्रावणातील पहिल्या गुरुवारनिमित्त शिवसेना नेत्या तथा माजी विधानपरिषद उपसभापती व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी आदिशक्तीचे श्रद्धापूर्वक दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवी मातेच्या चरणी विधीवत साडी, नैवेद्य व महाप्रसाद अर्पण करून मनोभावे प्रार्थना केली.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या निर्णयानुसार पुन्हा एकदा विधानपरिषदेत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी महालक्ष्मी मातेचे मनापासून आभार मानले. आजवरच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत आलेल्या विविध सुख-दुःखांच्या प्रसंगांचे स्मरण करत त्यांनी देवीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार तसेच राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना आणि उपक्रम राबविले जात आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेसह महिलांसाठी क्लस्टर, आरोग्यविषयक योजना आणि महिला सुरक्षिततेच्या प्रश्नावर सरकारकडून काम सुरू असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.महिला सुरक्षिततेच्या विषयावर आज बैठक घेण्यात येणार असून, या बैठकीस पोलीस महानिरीक्षक उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही यावेळी घेण्यात आली.
कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरात सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामाचा आढावाही डॉ. गोऱ्हे यांनी घेतला. मंदिरातील जीर्णोद्धाराचे काम लवकर सुरू होऊन ते वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी सरकारच्या वतीने आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
“श्रावणातील पहिल्या गुरुवारी महालक्ष्मी मातेचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. देवीच्या चरणी प्रार्थना करून मनामध्ये अत्यंत समाधान आणि कृतज्ञतेची भावना निर्माण झाली,” असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

“स्व. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी”; आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाटील कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट

“स्व. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी”; आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाटील कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट

कोल्हापूर/प्रतिनिधी : शिक्षण महर्षी स्व. डी. वाय. पाटील यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी शिवसेना नेत्या तथा माजी विधान परिषद उपसभापती व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज भेट देऊन पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी मा. श्रीमती शांताबाई पाटील , मोठ्या आईसाहेब, आ. सतेज पाटील , ऋतुराज पाटील , यांचे आ. नीलम गोर्हेंनी सांत्वन केले .
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्व. डी. वाय. पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या निधनाने शैक्षणिक, सामाजिक आणि विविध क्षेत्रांची मोठी हानी झाली असल्याचे सांगितले. शिक्षणाचा प्रसार आणि विद्यार्थ्यांसाठी त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत त्यांनी स्व. डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.स्व. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात उभे केलेले मोठे कार्य आणि त्यातून घडलेल्या असंख्य विद्यार्थ्यांचे भवितव्य हीच त्यांच्या कार्याची मोठी ओळख आहे. त्यांच्या निधनाचे दुःख मोठे असून, या दुःखाच्या प्रसंगी आपण पाटील कुटुंबीयांसोबत आहोत, अशी भावना आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.