Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

अजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया! – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आरोग्यवर्धिनी समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवांवर थेट देखरेख — आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पशुवैद्यकीय महाविद्यालय कणेरी, कोल्हापूर येथे स्थापनेसाठी केंद्र सरकारची मंजूरी

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे ४० दिवसात दूध विक्रीत सुमारे एक ते दीड लाख लिटरची वाढ

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

Thumbnail

View All
माय मराठी

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्र सुरु

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त एनआयटी कोल्हापूर येथे ‘विद्युत सुरक्षा’ विषयावर कार्यशाळा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापुरात ड्रग्ज माफियांना जबर धक्का! तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा ,एमडी आणि चरस आगीत खाक

Tile List

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात डॉ. युवराज येडूरे यांच्या आत्मक्लेश आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकरी महिला सहभागी

गोकुळच्या बदनामी विरोधात डॉ. युवराज येडूरे यांच्या आत्मक्लेश आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकरी महिला सहभागी कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्हयातील शेतकरी परिवाराची आर्थिक सह सर्वागीण प्रगती साठी मोलाचे योगदान…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

द इंडिया स्टोरी’च्या नव्या पोस्टरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा लोकांच्या रोषाशी सामना

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा आयआयएम तिरुचिरापल्ली येथे डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम संपन्न

माय मराठी

गोकुळ निवडणूकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी ९१ व्या दिवशी याचिका दाखल करणार ​

Tile Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही,मंत्री हसन मुश्रीफ यांची स्पष्टोक्ती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पेपरफुटी विरोधात शनिवारी काँग्रेसची धरणे आंदोलन व कॅन्डल मार्च,राजारामपुरीतून सायबर कॉलेजपर्यंत निघणार मार्च

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार

List Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून लाखो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देवू : आ.राजेश क्षीरसागर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून लाखो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देवू : आ.राजेश क्षीरसागर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना मिळावी विठुरायाला १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सद्बुद्धी दिंडीने साकडे

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना मिळावी विठुरायाला १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सद्बुद्धी दिंडीने साकडे   कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्यभरातून जोरदार विरोध…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नवी दिल्ली येथे 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी सहभागी होणाऱ्या कलाकारांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार

१५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात होणार्‍या कार्यक्रमात, कोल्हापुरातील श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनचे कलाकार सहभागी होणार, खासदार धनंजय महाडिक यांच्या…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

अजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया! – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

अजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया! - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन ​ अजित पवार यांची जयंती…

Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापुरात ड्रग्ज माफियांना जबर धक्का! तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा ,एमडी आणि चरस आगीत खाक

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

माय मराठी

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्र सुरु

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त एनआयटी कोल्हापूर येथे ‘विद्युत सुरक्षा’ विषयावर कार्यशाळा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

घरकुलांमुळे संपूर्ण कुटुंबाचेच जीवनमान आणि राहणीमान उंचावते : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

घरकुलांमुळे संपूर्ण कुटुंबाचेच जीवनमान आणि राहणीमान उंचावते : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन शहरातील सर्वच बेघरांना घरकुले देण्यासाठी आम्ही कट्टीबद्ध…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही,मंत्री हसन मुश्रीफ यांची स्पष्टोक्ती

मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही,मंत्री हसन मुश्रीफ यांची स्पष्टोक्ती बांधकाम कामगार योजनेतील दोन हजार लाभार्थ्यांना पावणेतीन कोटींचे वाटप कागल/प्रतिनिधी :…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड प्लेसमेंटचा नवा विक्रम ६.३ लाख रुपये सरासरी पॅकेज कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पेपरफुटी विरोधात शनिवारी काँग्रेसची धरणे आंदोलन व कॅन्डल मार्च,राजारामपुरीतून सायबर कॉलेजपर्यंत निघणार मार्च

पेपरफुटी विरोधात शनिवारी काँग्रेसची धरणे आंदोलन व कॅन्डल मार्च,राजारामपुरीतून सायबर कॉलेजपर्यंत निघणार मार्च   कोल्हापूर/प्रतिनिधी : देशभरात सातत्याने होणाऱ्या परीक्षांच्या…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार कोल्हापूरमध्ये खेळाडूंना जागतिक दर्जाच्या…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून लाखो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देवू : आ.राजेश क्षीरसागर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून लाखो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देवू : आ.राजेश क्षीरसागर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना मिळावी विठुरायाला १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सद्बुद्धी दिंडीने साकडे

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना मिळावी विठुरायाला १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सद्बुद्धी दिंडीने साकडे   कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्यभरातून जोरदार विरोध…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नवी दिल्ली येथे 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी सहभागी होणाऱ्या कलाकारांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार

१५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात होणार्‍या कार्यक्रमात, कोल्हापुरातील श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनचे कलाकार सहभागी होणार, खासदार धनंजय महाडिक यांच्या…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

अजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया! – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

अजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया! – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन ​ अजित पवार यांची जयंती…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आरोग्यवर्धिनी समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवांवर थेट देखरेख — आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आरोग्यवर्धिनी समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवांवर थेट देखरेख — आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्ह्यात “एकात्मिक आरोग्यवर्धिनी…

घरकुलांमुळे संपूर्ण कुटुंबाचेच जीवनमान आणि राहणीमान उंचावते : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

घरकुलांमुळे संपूर्ण कुटुंबाचेच जीवनमान आणि राहणीमान उंचावते : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

शहरातील सर्वच बेघरांना घरकुले देण्यासाठी आम्ही कट्टीबद्ध : राजे समरजितसिंह घाटगे यांची ग्वाही

कागल/प्रतिनिधी : बेघराना मिळालेल्या घरकुलामुळे त्या कुटुंबांचे केवळ एक घर होत नाही. तो परिसर स्वच्छ राहतो, मुलांवर चांगले संस्कार होतात. एकूणच त्या कुटुंबाचे जीवनमान आणि राहणीमानही उंचावते, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागल शहरातील सर्वच गरजू बेघरांना हक्काची घरकुले देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही शाहू सहकार समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.
कागल शहरातील वड्डवाडी येथे बेघरांना ७० घरकुले प्रदान कार्यक्रमात श्री. मुश्रीफ व श्री. घाटगे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमापूर्वी कागल नगरपालिकेच्या नव्याने बांधलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे ‘स्वर्गीय अजितदादा पवार जलशुद्धीकरण केंद्र’ असा नामकरण समारंभ झाला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत फिल्टर हाऊस ते बोटिंग क्लब परिसर व कागल शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपणाचा सोहळा संपन्न झाला. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आमदार निधीतून रु. २५ लाख खर्चाच्या ६० सोलर दिव्यांचे उद्घाटन, असे कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते झाले.
मंत्री श्री मुश्रीफ भाषणात पुढे म्हणाले, नगरपालिकेने सर्वे करून अजूनही किती लोकांना घरांची गरज आहे, याचा अहवाल तयार करावा. मी आणि समरजितसिंह घाटगे मिळून प्रयत्न आणि पाठपुरावा करून पुन्हा नव्याने ३००० घरकुले बांधू. त्यासाठी पाच एकर जागा आरक्षित आहे आणि त्याचा आराखडाही तयार केलेला आहे. अशा घरकुलांमधून त्या कुटुंबांचा संसार सुखाचा व्हावा, त्यांची मुलं-बाळं मोठी व्हावीत, त्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी यावी, अशी प्रार्थना मी पांडुरंगाच्या चरणी करतो. श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, प्रतिष्ठापना केलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार येणार आहेत. त्यावेळी न भूतो न भविष्यती असा दिमाखदार कार्यक्रम करूया.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, २०१२ मध्ये स्वर्गीय राजेसाहेब व श्री. मुश्रीफसाहेब यांची युती होती. स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या उपस्थितीत पहिला घरकुलचा कार्यक्रम झाला होता . त्यानंतर आज १४ वर्षांनी आम्ही एकत्र आलो आहोत आणि या घरकुलांच्या चौथ्या टप्प्याचे वाटप या ठिकाणी होत आहे. गरजू लोकांना घरकुल मिळाले पाहिजे . भाड्याने अथवा या घरकुलाची विक्री करू नये. दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही दोघेही कटिबद्ध आहोत .

विकासातूनच उत्तर……!
राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, मी व मुश्रीफसाहेब एकत्र आल्यानंतर बऱ्याच लोकांनी टीका केली. मात्र; आम्ही त्यांना उत्तर दिले नाही. पण, आम्ही दोघे एकत्र आल्यामुळे जी विकासकामे होत आहेत, यातूनच जे टीका करत होते त्यांना उत्तर मिळत आहे .

*मुहूर्त बघत बसू नका……!*
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही जिल्ह्याची आहे. ती कोणाची खाजगी मालमत्ता नाही. दहा वर्षांपूर्वी आम्ही संचालक मंडळात गेलो, त्यावेळी या बँकेच्या ठेवी २,००० कोटी, तोटा १०० कोटी, एनपीएही भरपूर होता. आजघडीला रू. १३,००० कोटी ठेवी, रू. ३०० कोटी नफा व एनपीए शून्य टक्के आहे. असे सगळे मापदंड चांगले आहेत. असे असताना आमदार शिवाजीराव पाटील लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी बोलतानासुद्धा आपली भाषा आवरावी. त्यांनी म्हटले आहे की, कागदपत्रे माझ्याकडे आहेत, सगळी कागदपत्रे मी उघड करणार आहे. आमदार श्री. पाटीलसाहेबांना या निमित्ताने मी विनंती करतो, की मुहूर्त बघू नका. जिल्हा बँकेचे तुम्हाला चुकीचे काय वाटत असेल ते दाखवण्याचे काम तुम्हाला करावे लागेल. उगाच लोकांची दिशाभूल करण्याची भूमिका घेवू नका. श्री भैय्या माने पुढे म्हणाले, त्यांना मी असेही आवाहन करतो, गडहिंग्लज साखर कारखाना बंद पडलेला होता. हजारो लोक बेरोजगार झाली. शेतकऱ्यांचा ऊस जाईना. आजरा साखर कारखाना बंद पडायला आलेला होता. त्यावेळी तुम्ही गेला होता?

जनतेवर माझा विश्वास……!
श्री. माने यांच्या आमदार श्री. पाटील यांच्या संदर्भातील वक्तव्याचा धागा पकडत मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, वास्तविक भैय्या माने यांनी अशा व्यक्तीची दखल घेण्याची आवश्यकताच नाही. त्यांना बेदखलच केले पाहिजे. कारण; जनता सब जानती है. लोक हे सगळं अत्यंत बारकाईने बघत असतात. लोकांना खरं काय आणि खोटं काय, हे कळत असतं. जनतेवर माझा विश्वास आहे.
कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ. सविता प्रताप माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, प्रताप ऊर्फ भैय्या माने, प्रकाशराव गाडेकर, चंद्रकांत गवळी, सौरभ पाटील, दीक मगर, अरुण गुरव, संजय चितारी, अजितसिंह घाटगे, मारुती मदारे, नगरसेविका सारिका बारड, नवाज मुश्रीफ, मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्यासह सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते .
स्वागत गटनेते सतीश घाडगे यांनी केले. प्रास्ताविक आरोग्य सभापती प्रवीण काळबर यांनी केले. आभार नगरसेविका सारिका बारड यांनी मानले .

मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही,मंत्री हसन मुश्रीफ यांची स्पष्टोक्ती

मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही,मंत्री हसन मुश्रीफ यांची स्पष्टोक्ती

बांधकाम कामगार योजनेतील दोन हजार लाभार्थ्यांना पावणेतीन कोटींचे वाटप

कागल/प्रतिनिधी : आजच्या एका वर्तमानपत्रांमध्ये मी गोकुळ दूध संघाची निवडणूक लढवून गोकुळ दूध संघाचा अध्यक्ष होणार, अशी बातमी आलेली आहे. परंतु; मी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी उभा राहणार नाही, अशी स्पष्टोक्ती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवा सप्ताह अंतर्गत आयोजित कागल विधानसभा मतदारसंघातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किट वाटप, शिष्यवृत्ती मंजुरी पत्रे वाटप, घरकुल मंजुरीपत्रे वाटप अशा संयुक्त कार्यक्रमात श्री. मुश्रीफ बोलत होते. शाहू समूहाचे प्रमुख राजे समरजितसिंह घाटगे यांची प्रमुख उपस्थित होती.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, बांधकाम कामगार समितीने बांधकाम कामगारांचे नूतनीकरण दरवर्षी होईल यासाठी सजग राहिले पाहिजे. आपण वर्षाला नूतनीकरण केले नाही तर त्याचा लाभ मिळत नाही. नोंदणीसाठी व नूतनीकरणासाठी त्यांच्या मोबाईलवर कसा मेसेज जाईल, त्याला कसा समजेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तरच समितीचे काम शंभर टक्के यशस्वी होईल. आम्हा सर्वांचीच अपेक्षा असते की, सर्व लाभ घेऊन बांधकाम कामगारांचे राहणीमान, जीवनमान उंचावले पाहिजे. त्यांची मुले दर्जेदार व गुणवत्त शिक्षण घेऊन डॉक्टर्स, इंजिनियर्स, आयएएस, आयपीएस बनली पाहिजेत.
ते पुढे म्हणाले, बांधकाम कामगार विभागाच्या काही योजनांना कामगार संघटनांचा विरोध आहे, त्याचा अभ्यास करू. त्या पूर्ववत कशा सुरू राहतील, यासाठी मी आणि समरजीतसिंह घाटगे मिळून प्रयत्न करू. शाहू सहकार समूहाचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे म्हणाले, संजय गांधी निराधार योजना समिती व बांधकाम कामगार समिती या योजनांचे लाभार्थी करण्यामध्ये कागल तालुका जिल्हासह राज्यात आघाडीवर आहे. यामध्ये मंत्री श्री. मुश्रीफसाहेबांचे सहकार्य मोठे आहे. आम्हाला जेव्हापासून ही योजना समजली, आम्हीही मोठ्या प्रमाणामध्ये ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवायचं काम केलेलं आहे.संजयबाबांनीही काम केलेलं आहे आणि महायुतीच्या माध्यमातून ही सगळी कामं चालू आहेत. आज शैक्षणिक सहाय्य योजनेमध्ये २०७३, सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत ५७ , आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत नऊ आणि आरोग्यविषयक २५, असे एकूण २१६४ लाभार्थ्यांना तीन कोटी, ६५ लाख, ७९ हजारांचे आज वाटप आज होत आहे. श्री. घाटगे म्हणाले, बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीचे सात हजार प्रस्ताव प्रलंबित आहेत. या प्रश्नी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ व आपण मिळून काम करूया. तसेच; केडीसीसी बँक व राजे विक्रमसिंह घाटगे कागल सहकारी बँकेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज सुविधा देण्यासाठीही प्रयत्नशील राहूया.
श्री. घाटगे म्हणाले, मंत्री श्री.मुश्रीफ, माजी आमदार श्री. घाटगे व मी, आम्ही महायुती म्हणून काम करीत आहोत. आज केंद्रामध्ये, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. प्रत्येक घटकाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून प्रत्येक घटकापर्यंत लाभ पोहोचवायचं काम आज आपलं सरकार करीत आहे. कर्जमाफी असेल, वीजबिल माफी असेल, दारिद्र्यरेषेखालील जनतेला धान्याचा विषय असेल, आयुष्मान कार्डच्या माध्यमातून आरोग्याचा विषय असेल, लाडक्या बहिणींचा विषय असेल, शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सन्मान निधीचा विषय असेल. समाजातील सर्वच घटकांपर्यंत पोहोचायचं काम करीत आहोत.
स्वागत प्रविण काळबर यांनी केले. प्रास्ताविक कामगार उपायुक्त संतोष अहिरे यांनी केले. जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती सौ. सुवर्णा पाटील उपसभापती इंद्रजित पाटील, बाजार समितीचे सभापती नाना कांबळे, जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा कांबळे, कागल नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण पंचायत समिती सदस्या सौ. रूपाली आंगज, सुवर्णा जाधव, तेजस्विनी भोरे, पंचायत समिती सदस्य दीपक आंगज, दत्तात्रय दंडवते, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, विस्तार अधिकारी ,श्रीमती सुरेखा शिफूरकर संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सौरभ पाटील, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रकाश गाडेकर, अस्लम मुजावर, प्रवीण काळबर, अमित पिष्टे, उमेश सावंत, सुशांत कालेकर, अर्जुन नाईक, आनंदा पसारे, नवाज मुश्रीफ, युवराज पाटील, रणजित कांबळे, कुमार पिष्टे, बंडा बारड, बांधकाम कामगार समितीचे अध्यक्ष अशोक वडर, संतोष गायकवाड व सर्व कमिटी आदीप्रमुख उपस्थित होते.

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड

प्लेसमेंटचा नवा विक्रम ६.३ लाख रुपये सरासरी पॅकेज

कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या अधिकार प्रदत्त स्वायत्त संस्थेने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये तब्बल ६३८ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. महाविद्यालयाकडून गुणवत्तापूर्ण शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, सर्वांगीण विकासावर दिलेला भर आणि सक्षम प्लेसमेंट व्यवस्था यामुळे यावर्षीही विक्रमी संख्येने विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळवून देता आल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील यांनी सांगितले.
यावर्षी एच.पी., मोव्हेट, टीई कनेक्टिव्हिटी, टीसीएस, जॉन्सन कंट्रोल्स, डिलॉईट, ब्रिटिश पेट्रोलियम, हेक्सावेअर, अमेझॉन, टेक महिंद्रा, इन्फोसिस, फोर्स मोटर्स, भारत फोर्ज, शेफलर इंडिया, लुकास टीव्हीएस, सोलर ग्रुप, सागर डिफेन्स, टेक्निमाँट, हार्मनी ऑर्गॅनिक्स, प्लेटेक्स इंडिया, गोदरेज प्रॉपर्टीज, बेलराईज इंडस्ट्रीज यांसह विविध कंपन्यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड केली.
निवड झालेल्या या विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, सी. एच. आर. ओ. श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे आणि रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे यांच्यासह अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राचार्य उपस्थित होते.यावर्षीच्या प्लेसमेंट मध्ये सरासरी ६.३ लाख रुपये पॅकेज मिळाले असून, २०० हून अधिक विद्यार्थ्यांना ६ लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक पगाराच्या ऑफर्स प्राप्त झाल्या आहेत. मोव्हेटमध्ये ९ लाख रुपये, एचपी ८.५ लाख रुपये, टीई कनेक्टिव्हिटीमध्ये ८ लाख रुपये, टीसीएसमध्ये ७ लाख रुपये, जॉन्सन कंट्रोल्समध्ये ५.६ लाख रुपये, सोलर ग्रुप व पेगाससमध्ये ५.५ लाख रुपये, जीएचके हॉस्पिटॅलिटी अँड इन्फ्रा लिमिटेडमध्ये ५.२५ लाख रुपये तसेच डिलॉईट आणि ब्रिटिश पेट्रोलियममध्ये ४.५ लाख रुपये वार्षिक पॅकेजवर विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
विश्वस्त ऋतुराज पाटील म्हणाले, नुकतेच महाविद्यालयाला वॉशिंग्टन अकॉर्डच्या निकषांनुसार एनबीए मानांकन प्राप्त झाले असून, शिवाजी विद्यापीठाकडून अधिकार प्रदत्त स्वायत्त संस्थेचा दर्जाही प्राप्त झाला आहे. यामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक बळकटी मिळाली असून भविष्यात अधिक जास्त संख्येने मोठ्या पॅकेजच्या संधी निश्चितच मिळतील.विश्वस्त पृथ्वीराज पाटील म्हणाले, प्लेसमेंटमधील हे यश विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि संस्थेच्या सक्षम शैक्षणिक व्यवस्थेचे प्रतीक आहे. आगामी काळातही रोजगारक्षम शिक्षणाला प्राधान्य दिले जाईल.
कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार तांत्रिक प्रशिक्षण, कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, व्यक्तिमत्त्व विकास, मॉक इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन, कोडिंग प्रॅक्टिस, करिअर काउन्सेलिंग, इंटर्नशिप तसेच प्लेसमेंटपूर्व विशेष प्रशिक्षण दिले जाते. उद्योग–महाविद्यालय सहकार्य, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, अत्याधुनिक प्रयोगशाळा, इनोव्हेशन आणि संशोधनाला दिले जाणारे प्रोत्साहन यामुळे विद्यार्थ्यांना देशातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये करिअरच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध झाल्या.अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे, सर्व विभागप्रमुख, प्लेसमेंट समन्वयक तसेच प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व योगदान लाभले.

पेपरफुटी विरोधात शनिवारी काँग्रेसची धरणे आंदोलन व कॅन्डल मार्च,राजारामपुरीतून सायबर कॉलेजपर्यंत निघणार मार्च

पेपरफुटी विरोधात शनिवारी काँग्रेसची धरणे आंदोलन व कॅन्डल मार्च,राजारामपुरीतून सायबर कॉलेजपर्यंत निघणार मार्च

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : देशभरात सातत्याने होणाऱ्या परीक्षांच्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थी व पालकांचे भविष्य टांगणीला लागले आहे. या गंभीर प्रश्नावर केंद्र सरकारच्या दुर्लक्षा विरोधात आणि पीडित विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज शनिवारी (२५ जुलै) कोल्हापुरात भव्य धरणे आंदोलन व कँडल मार्च आयोजित करण्यात आला आहे. ​अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार हे राज्यव्यापी आंदोलन छेडले जात आहे. ​कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरामध्ये राजाराम गार्डन जनता बाझार चौक राजारामपुरी येथे सायंकाळी ५:०० ते ७:०० या वेळेत हे आंदोलन होणार आहे. ​​सायंकाळी ५ ते ६ या दरम्यान राजाराम गार्डन जनता बाझार चौक राजारामपुरी येथे तीव्र धरणे आंदोलन करण्यात येईल.                                                                                     सायंकाळी ६ ते ७ या वेळेत राजाराम गार्डन येथून ‘आईचा पुतळा’ मार्गे सायबर कॉलेज पर्यंत कँडल मार्च काढण्यात येईल. या आंदोलनात खासदार शाहू छत्रपति, काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, गणपतराव पाटील, सुर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, शशांक बावचकर, संजय कांबळे, तौफिक मुल्लाण्णी, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, इंद्रजीत बोंद्रे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, तालुकाध्यक्ष, जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते, महिला, कार्यकर्ते, युवक काँग्रेस, एनएसयूआयचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या सरकारला जागा करण्यासाठी कोल्हापुरातील सर्व नागरिक, विद्यार्थी, तरुण आणि पालकांनी या धरणे आंदोलन व कँडल मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शहराध्यक्ष प्रविण केसरकर यांनी केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार

कोल्हापूरमध्ये खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार

मुंबई/प्रतिनिधी : कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा क्रिकेट असोसिएशन, कोल्हापूर आणि क्रीडा विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारामुळे भविष्यातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.                                     यावेळी उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, क्रीडा विभागाचे उप सचिव आबासाहेब कवळे, क्रीडा व युवक सेवा सहसंचालक सुधीर मोरे तसेच जिल्हा क्रिकेट असोसीएशनचे कार्यकारिणी सदस्य रामचंद्र पाटणकर व पदाधिकारी ऋतुराज इंगळे, अभिजीत भोसले, मदन शेळके उपस्थित होते.          जागतिक दर्जाच्या सुविधा ही संकल्पना केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता मल्टी स्पोर्ट्स हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे. येथे बॉक्सिंग, ज्युडो, आर्चरी, कुस्ती, जलतरण, टेबल टेनिस, फेन्सिंग आदी खेळांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यात येतील. तसेच क्रिकेट म्युझियम उभारण्यात येणार असून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होणार आहेत.करवीर तालुक्यातील मौजे विकासवाडी येथील १२.७६ हेक्टर (३१.९० एकर) शासकीय जागा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (KDCA) यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम व संबंधित क्रीडा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सामंजस्य कराराअंतर्गत हस्तांतरित करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे व कोल्हापूर येथील क्रीडा व युवक सेवा उपसंचालक सुहास पाटील यांनी भाडेपट्टा करारनामा हस्तांतरणावर स्वाक्षरी केली.            बीसीसीआय (BCCI) आणि आयसीसी (ICC)च्या निकषांनुसार सुमारे ३५ हजार प्रेक्षक क्षमतेचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात आधुनिक पॅव्हेलियन, सराव मैदाने, इनडोअर प्रशिक्षण केंद्र, स्पोर्ट्स सायन्स सेंटर, क्लब हाऊस, फ्लडलाइट व्यवस्था, क्रिकेट म्युझियम, खेळाडू व अधिकाऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी वाहनतळ, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, सौर ऊर्जा प्रकल्प तसेच अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्थाही उभारण्यात येईल.राज्यात जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उभारण्याच्या शासनाच्या संकल्पाला या प्रकल्पामुळे बळ मिळणार असून, कोल्हापूरच्या समृद्ध क्रीडा परंपरेला नवी दिशा मिळेल. या स्टेडियममुळे जिल्ह्यातील क्रिकेटला चालना मिळण्याबरोबरच ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होतील. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून क्रीडा पर्यटनाला प्रोत्साहन मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
0000

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून लाखो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देवू : आ.राजेश क्षीरसागर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून लाखो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देवू : आ.राजेश क्षीरसागर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त दि. २२ रोजी महासैनिक दरबार हॉल येथे शिबिराचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती याचे औचित्य साधून कोल्हापुरात दि.२२ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.या अभियानाच्या पूर्वतयारीच्या नियोजनासाठी शासकीय विश्रामगृह येथे महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली.
यावेळी बोलताना आमदार क्षीरसागर यांनी २०२२ च्या घडामोडीनंतर राज्याचे नेतृत्व स्वीकारत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकांची शासन स्तरावरील कामे सहज व्हावी या हेतूने शासन आपल्या दारी ही अभिनव संकल्पना राबवली, त्या वेळी कोल्हापूरात देखील शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्यात आला, त्याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.त्याच धर्तीवर लोकांपर्यंत अधिकाधिक सेवांचा लाभ पोहोचावा या हेतूने येत्या २२ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिन आणि स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले असून सर्वसामान्य माणूस विविध योजनांपासून बाजूला राहू नये, यासाठी राज्यातील सर्वच २८८ मतदार संघात हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
कोल्हापुरात देखील महासैनिक दरबार हॉल येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात सर्वच शासकीय योजनांचा लाभ एका छताखाली मिळणार असून महायुतीच्या सर्व पदाधिकारी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी, आणि लोकांना विविध योजनांचा लाभ तसेच त्यांची प्रलंबित कामे पूर्ण करून देऊन शिबिर यशस्वी करावे असे आवाहन केले.
यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी शासकीय स्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या शिबिरा बाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले, तसेच शहरासोबत ग्रामीण भागात देखील हे शिबीर तसेच २२ व २३ रोजी महारक्तदान शिबीर राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. बैठकीला महापौर सौ. रूपाराणी निकम, शिवसेना उपनेत्या माजी आमदार जयश्री जाधव,भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव,शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव,उपमहापौर अक्षय जरग, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नगरसेवक आदिल फरास, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. कौसर बागवान, प्राथमिक शिक्षण समिती सभापती सौ. शिला सोनुले, राहुल चिकोडे, महानगर अध्यक्ष शिवाजीराव जाधव, शहरप्रमुख रणजित जाधव, यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना मिळावी विठुरायाला १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सद्बुद्धी दिंडीने साकडे

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना मिळावी विठुरायाला १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सद्बुद्धी दिंडीने साकडे

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्यभरातून जोरदार विरोध होत असलेल्या प्रस्तावित ‘नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गा’विरोधात १३ जिल्ह्यांतील बाधित शेतकरी आता अधिकच आक्रमक झाले आहेत. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री पंढरपुरात येणार असल्याने, त्यांना हा शेतकरी विरोधी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची विठुरायाकडून सद्बुद्धी मिळावी, या मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांनी भर पावसात पंढरपुरात सद्बुद्धी दिंडी काढून नामदेव पायरी येथे विठ्ठलाला साकडं घातलं
प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा या मागणीसाठी आज पंढरपुर येथे राज्यातील १३ जिल्ह्यातील शेतकरी आज एकवटले. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करा बा पांडुरंगा मुख्यमंत्र्यांना सुद्धबुद्धी दे अशा घोषणा देत वाखरी मैदान ते विठ्ठल मंदिर असा सुमारे साडेतीन किलोमीटर अंतराचा प्रवास या दिंडीने केला. हातात भगवे ध्वज, टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘शक्तीपीठ महामार्ग रद्द करा’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. पावसाची तमा न बाळगता हजारो शेतकरी या दिंडीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
दिंडी विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीवर पोहोचल्यानंतर, तिथे आमदार जयंत पाटील, आमदार सतेज पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार अमित देशमुख, कैलास पाटील आणि अभिजीत पाटील यांच्यासह संघर्ष समितीचे प्रमुख पदाधिकारी आणि १३ जिल्ह्यांतील बाधित शेतकरी एकत्र येत सामूहिक प्रार्थना केली. मुख्यमंत्र्यांना महापूजेसाठी येताना विठ्ठलाने हा विनाशकारी महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी द्यावी, असे साकडे या वेळी विठूरायाच्या चरणी घालण्यात आले.
शक्तीपीठ महामार्गामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान होणार असून, हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा नाही, असा दावा संघर्ष समितीने केला आहे. सरकार हा प्रकल्प रद्द करेपर्यंत लढा थांबणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला असून, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या आंदोलनाने सरकारवर दबाव वाढवला आहे.

नवी दिल्ली येथे 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी सहभागी होणाऱ्या कलाकारांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार

१५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात होणार्‍या कार्यक्रमात, कोल्हापुरातील श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनचे कलाकार सहभागी होणार, खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार आणि शुभेच्छा

कोल्हापूर/प्रतिनिधी : येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी, नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात होणार्‍या शासकीय कार्यक्रमात, महाराष्ट्राची पारंपारिक कला सादर करण्यासाठी कोल्हापूरच्या कलाकारांना निमंत्रीत करण्यात आले आहे. त्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांनी आज श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनच्या कलाकारांना शुभेच्छा दिल्या. तसेच २६ जानेवारी रोजी दिल्लीतील विजयपथावरील मिरवणुकीत चित्ररथात सहभागी असलेल्या कलाकारांचाही सत्कार केला.
कोल्हापूरची कलानगरी आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख आहे. नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे आणि चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, श्रीजा लोकसंस्कृती फौंडेशनचे कलाकार यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथ सोहळयात सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या चित्ररथाला यंदा पहिला क्रमांक मिळाला. या चित्ररथासोबत सादर होणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमात, कोल्हापूरच्या श्रीजा फाऊंडेशनच्या कलाकारांनी लेझीम नृत्य सादर केले होते. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आज या कलाकारांचा विशेष सन्मान करण्यात आला. दुसरीकडे श्रीजा फाउंडेशनच्या कलाकारांना येत्या १५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे होणार्‍या मुख्य शासकीय कार्यक्रमात महाराष्ट्राची पारंपारिक कला सादर करण्यासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. त्याबद्दलही या कलाकारांचे तोंडभरून कौतुक करत, खासदार महाडिक यांनी अभिनंदन केले. यावेळी सागर बगाडे यांनी खासदार महाडिक यांच्याकडून कोल्हापूरच्या कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन आणि पाठबळ मिळत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यामुळे सर्व कलाकारांनीसुध्दा खासदार महाडिक यांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रपती पुरस्कार विजेते कलावंत सागर बगाडे, श्रीजा लोकसंस्कृती फौंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष शेखर वळीवडेकर, समन्वयक निरांक घाडगे, क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

अजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया! – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

अजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया! – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

अजित पवार यांची जयंती व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्रातील जनसामान्यांचे उमदे नेतृत्व दिवंगत अजितदादा पवार यांच्या अनेक आठवणी आपणा सर्वांच्या हृदयामध्ये आहेत. बुधवार दि. २२ जुलै रोजी येणाऱ्या त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या जनसेवा सप्ताहाच्या माध्यमातून या आठवणी चिरंतन जतन करून ठेवूया, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्याच दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस येत आहे. त्यानिमित्त विविध लोकोपयोगी उपक्रमाचे आयोजन करा, असेही इथे म्हणाले.
​ उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या जनसेवा सप्ताहाच्या पूर्वतयारीच्या बैठकीत श्री मुश्रीफ कोल्हापूरमध्ये बोलत होते.
भाषणात मंत्री श्री मुश्रीफ पुढे म्हणाले, स्वच्छता, नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, शिस्तबद्धपणा हा त्यांचा अंगभूत स्थायीभावच होता. २२ जुलै हा अजित दादा पवार यांचा जन्मदिवस. परंतु या दिवशी त्यांची जयंती साजरी करावी लागेल, असे कधीही स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. या जनसेवा सप्ताहामध्ये आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छतेचा कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम, प्रबोधनपर उपक्रम असे विविध लोकोपयोगी उपक्रम आयोजित करूया. संपूर्ण हयातभर अजितदादा पवार यांनी केलेले कार्य इतके महान होते की, शासनाने त्यांची जयंती करण्याचेही ठरविले आहे. विविध समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करून त्यांना आवडणाऱ्या लोकोपयोगी गोष्टी करूया.
​ श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, दि. २२ जुलै रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा यांची जयंती आणि त्याच दिवशी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आहे. या औचित्याने महाराष्ट्र सरकारकडून दि. तीन ऑगस्टपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान राबविले जाणार आहे. त्या-त्या स्थानिक लोकप्रतिनिधींना विचारून प्रांतांच्यावतीने ते आयोजित केले जाणार आहे. या माध्यमातून त्या-त्या मतदारसंघातील लाभार्थ्यांना संबंधित सर्व लाभ द्यावयाचे आहेत.मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, दि. २२ जुलै रोजी राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमधून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. तसेच; दि. २३ ते २५ या कालावधीत राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमधून स्तनांचा कॅन्सर, हाडांच्या मजबुतीची तपासणी, गर्भाशय मुखाचा मुखांचा कॅन्सर अशा अनेक विविध रोगांवरील चिकित्सा, औषधोपचार व शस्त्रक्रिया मोफत राबविल्या जाणार आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध डॉ. मुफज्जल लकडावाला यांचे हार्निया शस्त्रक्रिया शिबिर, तसेच स्थूलता निवारण शिबिर आयोजित केले जाईल. रक्तदात्यांची संख्या तर रेकॉर्ड ब्रेकच होईल.
​ एस.आर.आय. मोहिमेबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना श्री मुश्रीफ म्हणाले, ही मोहीम अतिशय गांभीर्याने घ्या. ही मतदार यादी निव्वळ आमदारकी आणि खासदारकीची आहे, असे समजून गाफील राहू नका. येणाऱ्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका, नगरपंचायती व महापालिका निवडणुकाही याच यादीवर होणार आहेत. या मोहिमेची मुदत निवडणूक आयोगाने दि. ८ ऑगस्टपर्यंत वाढवलेली आहे.

पुणे पदवीधर अश्वमेधाचा घोडा…..!

श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, पुणे पदवीधर मतदारसंघात प्रताप उर्फ भय्या माने यांच्या रूपाने आपण अश्वमेधाचा घोडा सोडलेला आहे. आपण सर्वांनीच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक लाखभर मतनोंदणी केलेली आहे. या नोंदणीमध्ये आपण नंबर एकवर तर आहोतच. अजूनही राहिलेल्या सर्वच मतदारांची नोंदणी कशी होईल, यासाठी जिद्दीने काम करूया.

मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा…..!

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्याची तारीख दि. नऊ ऑगस्ट ही निश्चित होण्याची शक्यता आहे. या वेळी उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्रावहीनी पवार आणि उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांनाही निमंत्रित करणार आहोत. या मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सीपीआर हॉस्पिटलच्या नूतनीकरणाच्या कामाचे लोकार्पण, कागल नगरपालिकेने प्रतिष्ठापना केलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे उद्घाटन हे कार्यक्रम निश्चित केले आहेत.

अजितदादांची अशीही आठवण…….!

श्री. मुश्रीफ म्हणाले, अजितदादांना स्वच्छता प्रचंड आवडायची. अजितदादा स्वच्छतेच्या बाबतीत नेहमीच कमालीचे आग्रही असायचे. मी एकदा त्यांना स्वच्छ व सुंदर गाव स्पर्धेत राज्यस्तरीय आलेल्या जैन्याळ गावामध्ये येण्यासाठी आग्रह धरला. माझ्या आग्रहानुसार ते त्या गावात आले आणि गावात येताच त्यांनी जाऊन शौचालयांची स्वच्छता बघितली आणि समाधान व्यक्त केले. त्यामुळे ते वरकरणी स्वच्छता बघत नव्हते. झाडांच्यावर त्यांचे अतिशय मनापासून प्रेम होते. कार्यकर्त्यांना बळ आणि शक्ती देणारे ते एक हाडाचे लोकनेते होते.यावेळी माजी आमदार के पी पाटील, माजी आमदार राजेश पाटील, राहुल पी एन पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील – आसुर्लेकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शिल्पा खोत, शहराध्यक्ष आदिल फरास, इचलकरंजीचे जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे, जिल्हा परिषद सदस्य संग्राम कुपेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन दिंडे, गोकुळचे संचालक किसन चौगुले, बाळासाहेब खाडे, सतीश पाटील – गिजवणेकर, संभाजीराव पवार, अमरसिंह माने – पाटील, जिल्हा परिषद सदस्य क्रांतीसिंह पवार – पाटील, डॉ. जयंत पाटील, विद्याताई पाटील मानसी भोगन, भारत पाटील – भुयेकर, गोड साखरचे चेअरमन प्रकाशभाई पताडे, भोगावतीचे चेअरमन शिवाजीराव पाटील, प्रकाशराव गाडेकर, शिवाजी देसाई, शिरीष देसाई, अभिषेक डोंगळे, जयसिंग चव्हाण, कार्याध्यक्ष अनिल साळोखे, अमित गाताडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निहाल कलावंत, प्रकाश मुगडे, परिक्षीत पन्हाळकर, आदी प्रमुख उपस्थित होते.

मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आरोग्यवर्धिनी समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवांवर थेट देखरेख — आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आरोग्यवर्धिनी समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवांवर थेट देखरेख — आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्ह्यात “एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती”ची पहिली बैठक संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य सेवा अधिक परिणामकारक व लोकाभिमुख करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या राधानगरी- भुदरगड- आजरा विधानसभा मतदारसंघाची तिमाही आढावा बैठक सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री, कोल्हापूर नामदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीमध्ये राधानगरी, भुदरगड आणि आजरा तालुक्यातील आयुष्मान आरोग्य मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि इतर आरोग्य संस्थांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मनुष्यबळाची उपलब्धता, रिक्त पदे, औषधसाठा, वैद्यकीय उपकरणे, प्रयोगशाळा सुविधा, १०८ रुग्णवाहिका सेवा, रेफरल व्यवस्था, पायाभूत सुविधा तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, “आपला दवाखाना” तसेच इतर सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस, अतिसार यांसारख्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावाही घेण्यात आला.सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आरोग्य सेवा ही शासनाची सर्वात महत्त्वाची लोककल्याणकारी सेवा असून प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सेवा मिळणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. शासनाच्या सर्व आरोग्य योजनांची माहिती गावागावातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात यावी. कोणताही पात्र लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी आणि आरोग्य विभाग यांनी समन्वयाने काम करावे.
एमजेपीजेएवाय योजनेचे काम प्रभावीपणे राबवावे, शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूतींची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, कॅन्सरवरील तपासणीकरिता शिबिरांचे आयोजन करावे असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.
जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती आणि सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील आरोग्यविषयक प्रश्न प्रभावीपणे मांडून शासनाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यासाठी पुढाकार घ्यावा. बैठकीत लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांनुसार संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करावा,
जिल्ह्यात स्मार्ट पीएचसी अंतर्गत करण्यात आलेल्या कामांचे संकलन करून अहवाल देण्याचे निर्देश त्यांनी दिले. ग्राम पातळी तसेच इतर सर्व समिती यांचे कामकाज प्रभावीपणे करावे. हा उपक्रम आम्ही सर्वत्र महाराष्ट्रभर राबवत असून १ ऑगस्ट रोजी मा. मुख्यमंत्री महोदय यांचे समवेत याचा भव्य शुभारंभ देखील आम्ही करता आहोत. आरोग्य मंत्री म्हणून मी स्वतः या कमिट्यांच्या ग्राम पातली ते उपकेंद्र, पीएचसी, आरएच, एसएचडी पाहणी व भेटी देणार असून यामध्ये आरोग्य सेवा सर्व योजनांचा लाभ ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना सुलभ पद्धतीने मिळाव्यात हाच यामागील उद्देश आहे. मा. स्थानिक आमदार महोदय यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या समितींच्या बैठका दर तीन महिन्यांनी घ्याव्यात. त्याचा अहवाल पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखालील समितीसमोर आढावा होईल. त्यानंतर स्वतः आरोग्य मंत्री म्हणून मी सचिव, आयुक्त, संचालक यांचे स्तरावर बैठक होणार असून सुचविण्यात आलेल्या सर्व प्रस्ताव/ सूचना यावर कार्यवाही होणार आहे. त्यामुळे सर्वांनी अत्यंत सक्रियपणे कामकाज करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. तसेच सुरु असलेल्या सर्व आरोग्य संस्थांच्या बांधकामाबाबत देखील आढावा घेण्यात यावा.
आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे लवकर निदान व्हावे यासाठी विशेष तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना तसेच इतर आरोग्य विमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना विनाअडथळा उपचाराचा लाभ मिळेल याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक रुग्णाला सन्मानाने, संवेदनशीलतेने आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देणे हे आरोग्य विभागाचे सर्वोच्च कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवाभावी वृत्तीने काम करून नागरिकांच्या तक्रारींना वाव राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता, औषधांची उपलब्धता, वेळेवर उपचार, रुग्णांशी सुसंवाद आणि पारदर्शक सेवा यावर विशेष भर द्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी आपल्या क्षेत्रातील विविध आरोग्यविषयक समस्या, इ संजीवनी, टेली मेडिसिन,पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि आरोग्य सेवांबाबत सूचना मांडल्या. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. बैठकीतील निर्णयांची कालबद्ध अंमलबजावणी करून त्याचा सविस्तर अनुपालन अहवाल पुढील तिमाही बैठकीत सादर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेली “एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती”ची ही बैठक आरोग्य सेवा अधिक सक्षम, लोकाभिमुख, उत्तरदायी आणि परिणामकारक करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
बैठकीच्या प्रारंभी तालुका आरोग्य अधिकारी, राधानगरी डॉ. शेटे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख, उत्तरदायी आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने “एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती” स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या समितीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्यविषयक प्रश्नांचे जलद निराकरण होण्यास मदत होईल. कोल्हापूर जिल्ह्यातील ही पहिली बैठक असून आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले.बैठकीस या सभेस जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समिती सभापती सौ सारिका नांदेकर, राधानगरी भुदरगड आजरा पंचायत समिती सभापती सर्व, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तसेच तहसीलदार,गटविकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा शल्य चिकित्सक,ग्रामीण रुग्णालय अधीक्षक,सर्व तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.समितीचे सदस्य, राज्यस्तरीय वरिष्ठ अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, विविध विभागांचे अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. आजरा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी उपस्थित यांचे आभार मानले..