Friday, January 17, 2025
Home ताज्या अल्पसंख्याकांच्या न्यायावर व अधिकारावर केंद्र व राज्य शासन गदा आणत आहे म्हणून...

अल्पसंख्याकांच्या न्यायावर व अधिकारावर केंद्र व राज्य शासन गदा आणत आहे म्हणून राजर्षी शाहू मुस्लीम वेल्फेअरने केला निषेध

अल्पसंख्याकांच्या न्यायावर व अधिकारावर केंद्र व राज्य शासन गदा आणत आहे म्हणून राजर्षी शाहू मुस्लीम वेल्फेअरने केला निषेध

कोल्हापूर/प्रतिनिधी : १८ डिसेंम्बर हा अल्पसंख्याक हक्क दिवस होता त्याचे नियोजन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ऑनलाईन / वेबिनार द्वारे साजरा करण्यासाठी अल्पसंख्याक आयोगाने परिपत्रक डिसेंबर मध्ये पाठवले होते.त्यामुळे अल्पसंख्याक हक्क दिनी राजर्षी शाहू मुस्लीम वेल्फेअरने अल्पसंख्याकांच्या न्यायावर व अधिकारावर केंद्र व राज्य शासन गदा आणत आहे. म्हणून जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन न देता निषेध व्यक्त केला.
गेली अनेक वर्ष झाली फोंडेशनेने अनेक मागण्या शासन व प्रशासन दरबारीं निवेदनाद्वारे सादर केलेल्या आहेत. अल्पसंख्याकांच्या विकासासाठी व शासनाने केलेल्या आदेशाची अंमलबजावणी जिल्हा व तालुका स्तरावर होत नाही, तसेच अल्पसंख्याक विभाग हा वेगळा स्वतंत्र असून देखील, शासन जाणीवपूर्वक निधीची भरीव तरतूद करीत नसून व अल्पसंख्याक समाजातील पायाभूत आर्थिक रोजगाराचे व निराधारांना मदत करण्याचे ठोस निर्णय घेत नाही,तसेच केंद्र व राज्य शासन जिल्हा वार्षिक आराखड्याचे राखीव नियोजनाच्या निधीची देखील तरतूद करीत नसून, राज्य व जिल्हा स्तरावर अल्पसंख्याक कमिटीची पदे भरली जात नाहीत. मौलाना आझाद महामंडळाचे चेअरमनपद रिक्त आहे व अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पद देखील भरले नसून अल्पसंख्याक विभाग हा सामाजिक न्याय विभागाला तात्पुरत्या रित्या जोडलेला आहे. त्यामुळे अल्पसंख्याक विभागामध्ये मंत्रालय स्तरावर अधिकारी कर्मचारी आहेत.
जिल्हा स्तरावर. अल्पसंख्याक
योजनांची अंमलबजावणी करणे करिता समाजकल्याण विभागाला सामावून घेऊन त्यांना अल्पसंख्याक योजना जिल्हा व तालुकास्तरावर स्तरावर राबविण्यासाठी अधिकार व महामंडळाच्या व शासनाच्या नवीन अशा कोणत्याही योजनांची घोषणा किंवा आदेश बरीच वर्षे झाली, तरी हि जाणीवपूर्वक अल्पसंख्याक समाजामध्ये मागासलेपण दूर होऊ नये यासाठी शासन व प्रशासन सुधारित आराखडा तयार करीत नाहीत.
अल्पसंख्याक म्हणून संबोधलेल्या जवळपास म्हणजे जैन, ख्रिश्चन, शीख, मुस्लिम, बौद् ,पारसी या सहा धर्मांवर समाविष्ट केलेल्या विभागाला बंद पाडण्याच्या उद्देशाने कोणत्याही नाविन्यपूर्ण योजनांची व आराखड्याची घोषणा व अंमलबजावणी प्रशासकीय स्तरावर निधीची मागणी होत नाही.तसेच गेली ७ ते ८ वर्षे झाली तरीही मोजकेच शासन निर्णय तुटपुंजा निधीची तरतूद अपुरा कर्मचारी वर्ग हे गेली अनेक वर्ष झाली जिल्हा व तालुका स्तरावर योजना राबविल्या जात नसून व राज्य व जिल्हा स्तरावर कोणत्या हि .पदाची समिती स्थापन व निवड केलेली नसून हे स्पष्ट धोरण शासनाचे दिसत आहे.
म्हणूनच फोंडेशनच्या मार्फत कोणते हि निवेदन न देता, कोणत्या हि मागणीचे निवेदन न देता प्रशासन व शासनाचा निषेध मनोगतातून व्यक्त केला आहे. यावेळी फोंडेशनचे अध्यक्ष दस्तगीर मुल्ला, ख्रिश्चन समाजाचे पीटर डिसूझा व जैन समाजा चे अनिल गडकरी, ऑनलाइन वेबिनरद्वारे कार्यक्रमाला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे नवीन...

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन – गणी आजरेकर यांनी दिली माहिती

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन - गणी आजरेकर यांनी दिली माहिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : उर्दू भाषेची ओळख व्हावी आणि...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये कोल्हापूर/ (जिमाका) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.आज सोमवार,दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी...

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान कोल्हापूर/प्रतिनिधी : आरोग्य, पर्यावरण, व्यसनाधीनता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन...

Recent Comments