Grid Posts

View All
माय मराठी

गोकुळ’ मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

ताज्या देश पुणे प्रीमियम महाराष्ट्र माय मराठी मुंबई

सयाजी हॉटेल्सने सांगलीत ‘एफोटेल बाय सयाजी’द्वारे व्यवसाय-केंद्रित हॉटेल सुरू करत केला धोरणात्मक विस्तार

माय मराठी

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा मंगळवारी १४ वा दीक्षांत समारंभ : पूज्य डॉ. ज्ञानवत्सल स्वामी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी

ताज्या महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागर

माय मराठी

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

माय मराठी

भाजप युवा मोर्चाचे नुतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे कोल्हापुरात भव्य रॅलीने जंगी जल्लोषी स्वागत

Thumbnail

View All
माय मराठी

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

माय मराठी

भाजप युवा मोर्चाचे नुतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे कोल्हापुरात भव्य रॅलीने जंगी जल्लोषी स्वागत

माय मराठी

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे आज  जल्लोषी स्वागत

माय मराठी

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये  ‘इनो क्वेस्ट २के २६’ नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

माय मराठी

डॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकाला राजारामबापू पाटील साहित्य पुरस्कार

माय मराठी

कोल्हापूरात अनूसुचित ‘शॉर्टफिन डेव्हिल रे’ मासा विक्रीसाठी; वनविभागाची धडक कारवा

Tile List

View All
माय मराठी

तरुणांच्या श्रमशक्तीतूनच साकार होईल,समृद्ध गावाचे स्वप्न : सरपंच प्रियांका पाटील

तरुणांच्या श्रमशक्तीतूनच साकार होईल,समृद्ध गावाचे स्वप्न : सरपंच प्रियांका पाटील कोल्हापूर/प्रतिनिधी : पाचगाव येथे डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटचे श्रमसंस्कार…

माय मराठी

कोल्हापूर महापालिका सभा पाणी प्रश्नावरून गाजली

माय मराठी

संजय घोडावत यांचा ‘द ज्वेल्स ऑफ इंडिया’ पुरस्काराने सन्मान

माय मराठी

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी स्पर्धांचे आयोजन

Tile Posts

View All
ग्लोबल ताज्या देश प्रीमियम महाराष्ट्र माय मराठी

मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करूया: जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या बैठकीतील संकल्प

My Marathi

सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय हिंदू, शीख आणि बौद्धांनाच अनुसूचित जातीचा दर्जा

सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय हिंदू, शीख आणि बौद्धांनाच अनुसूचित जातीचा दर्जा ख्रिश्चन, मुस्लिमांना अनुसूचित जातीचा दर्जा देता येणार नाही मुंबई/प्रतिनिधी…

माय मराठी

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील ‘उत्तर दरवाजा कमान’ परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला

ऐतिहासिक वारशाची जपवणूक: जोतिबा डोंगरावरील 'उत्तर दरवाजा कमान' परिसर स्वच्छता मोहिमेने चकाकला कोल्हापूर/प्रतिनिधी  : 'दख्खनचा राजा' श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेचा…

माय मराठी

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन

राजश्री शाहू महाराज शाहू मिल बाबत २८ रोजी बैठकीचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : रविवार दिनांक २२ मार्च २०२६ रोजी सकाळी साडेदहा…

List Posts

View All
माय मराठी

शहरातील टायर विक्री आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या भव्य शोरूमचे कळंबा येथे उद्घाटन

शहरातील टायर विक्री आणि सर्विस क्षेत्रातील नामांकित नाव असलेल्या आर.एम.टायर्सच्या दुसऱ्या भव्य शोरूमचे कळंबा येथे उद्घाटन   कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर…

माय मराठी

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन

कोल्हापूरात २१ व २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे आयोजन कोल्हापूर (जिमाका) : शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा,…

माय मराठी

कोल्हापुरी चप्पलसह चर्मकला जतन आणि विकसित करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले संसदेत विधेयक

कोल्हापुरी चप्पलसह चर्मकला जतन आणि विकसित करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले संसदेत विधेयक, स्थानिक कारागिरांच्या उपजिविकेची सुरक्षा निश्‍चित करण्याचा…

माय मराठी

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार राष्ट्रीय स्पर्धेत ‘डीवायपीसीइटी व्हेक्टर्स’ संघ तृतीय कोल्हापूर /प्रतिनिधी :…

Thumbnail

View All
ताज्या महाराष्ट्र माय मराठी मुख्य

कोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागर

माय मराठी

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

माय मराठी

भाजप युवा मोर्चाचे नुतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे कोल्हापुरात भव्य रॅलीने जंगी जल्लोषी स्वागत

माय मराठी

भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या कृष्णराज महाडिक यांचे आज  जल्लोषी स्वागत

माय मराठी

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये  ‘इनो क्वेस्ट २के २६’ नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

माय मराठी

डॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकाला राजारामबापू पाटील साहित्य पुरस्कार

माय मराठी

डीवायपी साळोखेनगर इंक्युबेशन सेंटर येथे ‘दागिने मूल्यांकन व मूल्यमापक’ प्रशिक्षण संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : डॉ. डी. वाय. पाटील साळोखेनगर कॅम्पस येथे महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्या सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या सूक्ष्म, लघु व…

माय मराठी

श्रेयस तळपदे प्रस्तुत ” मर्दिनी ” द्वारेमोठ्या पडद्यावर उलगडणार नारीसामर्थ्याची गाथा !

कोल्हापूर/प्रतिनिधी : प्रत्येक स्त्रीतील मर्दिनीला जागं करणारा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘मर्दिनी’ आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नारीशक्तीचा प्रभावी आणि प्रेरणादायी…

माय मराठी

घोडावत विद्यापीठात भूगोल दिन साजरा’माय व्हिलेज माय मॅप’ पोस्टर स्पर्धा यशस्वी

अतिग्रे/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांना स्थानिक भूगोलाची शास्त्रीय समज, नकाशावाचन कौशल्य आणि ग्रामीण विकासाबाबतची जाणीव वाढीस लागावी या हेतूने १४ जानेवारी भूगोल…

माय मराठी

कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघ घोटवडे प्रचारसभा

अमृता डोंगळे, संग्राम कलीकते, पुनम पाटील यांच्या विजयाने कै. दादासाहेब पाटील-कौलवकर, माजी आमदार गोविंदराव कलिकते, गणपतराव डोंगळे यांच्या कार्याचा गौरव…

माय मराठी

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडून नॉर्थ ईस्ट कनेक्ट उपक्रमाचे यशस्वी आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : २६ जानेवारी २०२६ रोजी ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मा. पोलीस महासंचालक साो, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निर्देशानुसार “नॉर्थईस्ट…

माय मराठी

कोल्हापूर महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी मुरलीधर जाधव, तर शिवसेनेच्या गटनेतेपदी शारंगधर देशमुख

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिकेत भाजपकडून गटनेतेपदी अनुभवी नगसेवक मुरलीधर जाधव यांची, तर शिवसेनेकडून माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांची…

माय मराठी

८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारणाचे सूत्र अवलंबून जनसेवेच्या कामातून प्रभागाच्या विकासात योगदान द्या : आमदार राजेश क्षीरसागर

शिवसेनेच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार; गट स्थापनेच्या प्रक्रियेला सुरवात कोल्हापूर दि.२३ : पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने ऐतिहासिक यश मिळवीत इतिहास…

माय मराठी

शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार होणार… शिवसेनेचा महापौर होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही : आमदार राजेश क्षीरसागर

शिवसेनाप्रमुखांच्या १०० व्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त अभिवादन कोल्हापूर /प्रतिनिधी : या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवीत शिवसेनेने घवघवीत यश संपादित केले आहे.…

माय मराठी

सेंद्रिय गुळापासून जिलेबीप्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सेंद्रीय गुळाच्या जिलेबीच्या स्टॉलचा शुभारंभ

कोल्हापूर/प्रतिनिधी : चव, रंग आणि गोडी यामुळे जगप्रसिध्दी मिळालेल्या कोल्हापुरी गुळापासून आता जिलेबी तयार करण्याची युक्ती शेतकऱ्यांनी लढवली आहे. निमित्त…

डीवायपी साळोखेनगर इंक्युबेशन सेंटर येथे ‘दागिने मूल्यांकन व मूल्यमापक’ प्रशिक्षण संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : डॉ. डी. वाय. पाटील साळोखेनगर कॅम्पस येथे महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्या सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची कार्यक्षमता वाढ अर्थात ‘रॅम्प’ योजनेतर्गत ‘दागिने मूल्यांकन व मूल्यमापक’ हा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. कोल्हापूर, पुणे, सांगली व सातारा जिल्ह्यांतील एकूण ४५ प्रशिक्षणार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि डी. वाय. पाटील समूहाच्या कोल्हापूर इंक्युबेशन सेंटर मध्ये झालेल्या सामंजस्य कराराअतर्गत रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, साळोखेनगर येथील कोल्हापूर इंक्युबेशन सेंटर ‘दागिने मूल्यांकन व मूल्यमापक’ या प्राशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
दागिने क्षेत्रातील ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले मुंबई येथील भारतीय रत्न व दागिने संस्थेचे उत्पादन विभागप्रमुख विनोद काटकर यांनी आठ तासांच्या सखोल प्रशिक्षण सत्रामध्ये दागिने व्यवसायातील विविध तांत्रिक पैलूंविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. दागिने निर्मिती प्रक्रिया, बनावट दागिन्यांची ओळख, तसेच सोन्या-चांदीच्या दागिन्यांची शुद्धता तपासण्याच्या पद्धती, दागिने निर्मितीतील विविध टप्पे तसेच बनावट दागिने ओळखण्याचे तंत्र सोप्या भाषेत स्पष्ट केले.हॉलमार्किंग प्रक्रियेची माहिती व कालानुरूप हॉलमार्क चिन्हांमध्ये झालेल्या बदलांची सखोल माहिती त्यांनी दिली. प्रात्यक्षिक सत्रात प्रशिक्षणार्थ्यांना स्पर्शदगड चाचणी आणि घनता चाचणी यांच्या सहाय्याने सोन्याची शुद्धता तपासण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. या प्रक्रियेमुळे प्रशिक्षणार्थ्यांचे गणितीय व विश्लेषणात्मक कौशल्य विकसित झाले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठाच्यावतीने मूल्यमापन परीक्षा घेण्यात आली.
डॉ. डी. वाय. पाटील साळोखेनगर कॅम्पसचे संचालक डॉ. अभिजीत माने म्हणाले की, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला बळकटी देणाऱ्या ‘रॅम्प’ योजनेच्या माध्यमातून आणि उद्योगांच्या बदलत्या गरजांचा विचार करून विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. आगामी काळात कृषी, अन्नप्रक्रिया तसेच साखर प्रक्रिया क्षेत्रातही असे रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतील.कौशल्य विकास समन्वयक राजन डांगरे यांनी उपक्रम आयोजनात महत्वाची भूमिका पार पाडली. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, कुलसचिव डॉ. राजेंद्र तलवारे, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील तसेच कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

श्रेयस तळपदे प्रस्तुत ” मर्दिनी ” द्वारेमोठ्या पडद्यावर उलगडणार नारीसामर्थ्याची गाथा !

कोल्हापूर/प्रतिनिधी : प्रत्येक स्त्रीतील मर्दिनीला जागं करणारा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘मर्दिनी’ आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नारीशक्तीचा प्रभावी आणि प्रेरणादायी आविष्कार असलेला हा सिनेमा ३ जुलै २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाच्या या नव्या पोस्टर मध्ये एक ठाम पाऊल, उग्र रूप आणि ज्वालांनी वेढलेलं नाव ‘मर्दिनी’ पाहायला मिळतं.
सामान्य चौकटी मोडत, स्त्रीच्या संयम, संघर्ष आणि आत्मबळाचा ठसा उमटवणारा ‘मर्दिनी’ भावनांना स्पर्श करणारा आणि मनाला प्रश्न विचारायला लावणारा अनुभव देईल असा दिसतोय.
प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी, राजेश भोसले यांसारख्या प्रमुख कलाकारांच्या सशक्त अभिनयासोबत बालकलाकार मायरा वैकुळ हिची भूमिका कथेला एक वेगळी भावनिक उंची देते.
अजय मयेकर यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट असून, दिप्ती तळपदे यांच्या निर्मितीखाली ‘मर्दिनी’ साकारला जात आहे. तर सह निर्माती टिना राकेश कोठारी, छायांकन शब्बीर नाईक, संकलन अभिषेक शेठ, संगीत हितेश मोडक, पटकथा आणि संवाद महाबळेश्वर नार्वेकर यांनी केले आहे.ताकदीला आवाज आणि धैर्याला दिशा देणारा ‘मर्दिनी’ ३ जुलै २०२६ पासून प्रदर्शित.

घोडावत विद्यापीठात भूगोल दिन साजरा’माय व्हिलेज माय मॅप’ पोस्टर स्पर्धा यशस्वी

अतिग्रे/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांना स्थानिक भूगोलाची शास्त्रीय समज, नकाशावाचन कौशल्य आणि ग्रामीण विकासाबाबतची जाणीव वाढीस लागावी या हेतूने १४ जानेवारी भूगोल दिनाचे औचित्य साधून संजय घोडावत विद्यापीठात नुकताच भूगोल दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी भूगोल विभागाच्या वतीने ‘माय व्हिलेज माय मॅप’ स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. उद्धव भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, परीक्षा नियंत्रक डॉ. एन. के. पाटील, मानवविदया व सामाजिक शास्त्र संकुलाचे अधिष्ठाता डॉ. उत्तम जाधव, भूगोल विभाग प्रमुख डॉ. कपिल पाटील, तसेच प्रा. विशाल जाधव, प्रा. गोपाळ पाटील उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षण प्रा. आज्ञा मांजरेकर व प्रा. अंबपकर यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या गावाचा भौगोलिक नकाशा, नैसर्गिक संसाधने, लोकवस्ती, वाहतूक, जलस्रोत तसेच विकासाच्या संधी व समस्या यांचे पोस्टरद्वारे प्रभावी सादरीकरण केले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, नकाशा मांडणी, विषयाची स्पष्टता व सादरीकरण कौशल्य यांचे विशेष कौतुक केले.यासाठी विश्वस्त विनायक भोसले यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भूगोल विभागातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. याबद्दल संस्थेचे चेअरमन संजयजी घोडावत यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघ घोटवडे प्रचारसभा

अमृता डोंगळे, संग्राम कलीकते, पुनम पाटील यांच्या विजयाने कै. दादासाहेब पाटील-कौलवकर, माजी आमदार गोविंदराव कलिकते, गणपतराव डोंगळे यांच्या कार्याचा गौरव करूया : मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

कसबा तारळे जिल्हा परिषद मतदार संघाची घोटवडे येथे जाहीर प्रचारसभा

घोटवडे/प्रतिनिधी : भोगावती खोऱ्याच्या सर्वांगीण विकासामध्ये कै. दादासाहेब पाटील- कौलवकर, माजी आमदार गोविंदराव कलीकते आणि कै. गणपतराव डोंगळे या तिघांचेही योगदान मोठे आहे. या निवडणुकीत ही तिन्ही घरांणी एकत्र आली आहेत. कसबा तारळे जिल्हा परिषद मतदार संघाच्या उमेदवार कु. अमृता डोंगळे, कसबा तारळे पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार संग्राम अरूण कलीकते, कौलव पंचायत समिती मतदार संघाच्या उमेदवार सौ. पुनम युवराज पाटील यांच्या विजयाने कै. दादासाहेब पाटील-कौलवकर, माजी आमदार कै. गोविंदराव कलिकते, कै. गणपतराव डोंगळे यांच्या कार्याचा गौरव करूया, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

कसबा तारळे जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ घोटवडे ता. राधानगरी येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, लोकप्रतिनिधी या नात्याने प्रदीर्घकाळ जनसेवा करायची असेल तर गरीब, सामान्य, दिनदलित, पददलित, युवक, बेरोजगार यांच्या सुखदुःखात मिसळून काम करण्याची गरज आहे. आमचे सर्वच उमेदवार गोरगरिबांच्या कल्याणाच्या कार्यात अग्रभागी राहतील.

माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, या निवडणुकीत कै. दादासाहेब पाटील- कौलवकर, माजी आमदार गोविंदराव कलीकते आणि कै. गणपतराव डोंगळे ही तिन्ही घरांणी एकत्र आली आहेत.त्यामुळे या जिल्हा परिषद मतदार संघात प्रचंड मताधिक्याने सर्वच उमेदवारांचा विजय होईल, याची खात्री आहे. अरुणराव डोंगळे यांच्या सहकार्याने या विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा पुढे नेऊ. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते या नात्याने राधानगरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांच्या विजयासाठी त्यांचे योगदान लाभणार आहे. आम्ही सर्वजण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली काम करू.

राष्ट्रवादी नंबर एक असेल….!
माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निकालामध्ये नंबर एक असेल. त्यामध्ये राधानगरी तालुक्याचा वाटा सिंहाचा असेल.

चौकट….
धर्माच्या बाजूने उभे राहा……!
श्री. मुश्रीफ म्हणाले, अरुणराव डोंगळे गेली अनेक वर्षे गोकुळ दूध संघाच्या संचालक पदाच्या माध्यमातून सहकारात सेवार्थ आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने दुर्दैवाने त्यांच्या घरातच धर्मयुद्ध सुरू झाले आहे. शेवटी जे महाभारतात झाले तेच होणार आहे. धर्म विरुद्ध अधर्मची ही लढाई आहे. तुम्ही सर्वजण धर्माच्या बाजूने उभे रहा.

यावेळी व्यासपीठावर गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुणराव डोंगळे, राष्ट्रवादीचे राधानगरी तालुका अध्यक्ष किसनराव चौगुले, भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील- कौलवकर, केडीसीसी बँकेचे संचालक रणजिसिंह पाटील, आनंदराव आतवडे आदी प्रमुख उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडून नॉर्थ ईस्ट कनेक्ट उपक्रमाचे यशस्वी आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : २६ जानेवारी २०२६ रोजी ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मा. पोलीस महासंचालक साो, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निर्देशानुसार “नॉर्थईस्ट कनेक्ट” हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.या उपक्रमामध्ये कोल्हापूर जिल्हयामध्ये वास्तव्यास असलेल्या व शिक्षणासाठी आलेल्या ईशान्य राज्यांतील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण समारंभ, संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी वरिष्ठ पोलीस व नागरी अधिका-यांशी संवाद साधला.
त्यानंतर मा. पोलीस अधीक्षक श्री योगेशकुमार गुप्ता साो, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री डॉ बी धीरजकुमार सोो, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील शहर विभाग, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री आप्पासाहेब पवार शाहुवाडी विभाग, व मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री सुजितकुमार क्षीरसागर करवीर विभाग, पोलीस निरीक्षक श्री सुशांत चव्हाण स्थानिक गुन्हे शाखा यांचे उपस्थितीत ईशान्य राज्यांतील विद्यार्थी कोण कोणत्या क्षेत्रात शिक्षण घेत आहेत, ते वास्तव्यास कोठे आहेत त्यांना काय अडचणी आहेत याबाबत माहिती घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना आलेले अनुभव देखील कथन केले. याप्रसंगी पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांनी ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे वतीने संपूर्ण सहकार्य व संरक्षणाची हमी दिली. यावेळी विद्यार्थ्यांना डायल ११२ आपत्कालीन सेवा, सीसीटीव्ही देखरेख तसेच पोलीस नियंत्रण कक्षाच्या कार्यप्रणालीबाबत माहिती देण्यात आली. या उपक्रमास विद्यार्थ्यांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला.
एकंदरीत, “नॉर्थईस्ट कनेक्ट” हा उपक्रम कोल्हापूर जिल्हयात यशस्वीपणे राबविण्यात आला असून ईशान्य राज्यांतील विद्यार्थ्यांमध्ये विश्वास, सुरक्षितता आणि समाजातील आपलेपणाची भावना दृढ करण्यास तो उपयुक्त ठरला आहे.

कोल्हापूर महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी मुरलीधर जाधव, तर शिवसेनेच्या गटनेतेपदी शारंगधर देशमुख

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिकेत भाजपकडून गटनेतेपदी अनुभवी नगसेवक मुरलीधर जाधव यांची, तर शिवसेनेकडून माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रसकडून माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास आणि काँग्रेसकडून इंद्रजीत बोंद्रे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडीसाठी ६ फेब्रुवारीला विशेष सभा आयोजित केली आहे. याचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी अमोल येडगे भूषवणार आहेत. महायुतीचे ४५ उमेदवार निवडून आल्याने त्यांचाच महापौर होणार हे निश्‍चित आहे. हे पद नागीरकांचा मागास प्रर्वगासाठी आरक्षित झाले आहे. महापौरपदासाठी विजयसिंह देसाई आणि विजयसिंह खाडे या दोघा नावांची अधिक चर्चा चालू आहे.

मानवतावादी साहित्य संमेलन माणसाला माणूस बनवण्याची प्रक्रिया पार पाडेल : संमेलनाध्यक्ष अ‍ॅड. डॉ. रमेश विवेकीडॉ. सुनीलकुमार लवटे, अ‍ॅड. जयंत जायभावे ‘मानवतावादी’ जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित

कोल्हापूर/प्रतिनिधी : सद्य परिस्थितीमध्ये भारत जात, धर्म, वर्ग, वर्ण यामध्ये विभागला गेला आहे माणूस देखील कप्पे बंद झाला आहे. संस्कृतीच्या नावाखाली माणसं दुरावली जातील यासाठी धार्मिक राजकारण उभे केले जात आहे अशा काळात साहित्यिकांनी भूमिका घेत मानवतावादी विचारांची प्रेरणी करणे गरजेचे आहे. माणूस जगला तर देश जगेल. देश महासत्ता बनायचा असेल तर माणूस समृद्ध झाला पाहिजे. माणसाच्या विकासाची नवी परिभाषा निर्माण केली पाहिजे. धर्मांध राजकारण झुगारून मानवतावादी संस्कृती निर्माण करण्याची गरज आहे. मानवतावादी साहित्य संमेलन माणसाला माणूस बनवण्याची प्रक्रिया पार पाडेल असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, दिग्दर्शक आणि निर्माते आणि संमेलनाध्यक्ष अ‍ॅड. डॉ. रमेश विवेकी यांनी प्रतिपादन केले.
ते लोकराजे राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत मानवतावाद जोपासण्याच्या दृष्टिकोनातून मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आयोजित अखिल भारतीय मानवतावादी साहित्य संमेलनात बोलत होते.
यावेळी कोल्हापूरचे ज्येष्ठ मानवतावादी साहित्यिक व विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे आणि नाशिकचे भारतीय संविधानाचे अभ्यासक, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रा अँड गोव्याचे मा. चेअरमन अ‍ॅड. जयंत जायभावे यांना अ‍ॅड. विवेक घाटगे यांच्या हस्ते ‘मानवतावादी’ जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.अ‍ॅड. जयंत जायभावे म्हणाले, संविधानाने सर्वांना समान अधिकार दिला असून लोकशाहीमध्ये अल्प असणारा विरोधी पक्षाला सन्मान देण्याची भूमिका अधोरेखित केली असताना सध्याच्या बहुमत असणारे लोक हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहेत. लोकशाही मोडीत काढून हुकूमशाहीकडे वाटचाल देशासाठी व संविधानासाठी घातक आहे. त्यामुळे मानवतावादी लोकांनी एकत्र येऊन याचा प्रतिरोध करणे गरजेचे आहे.
डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले, माणसांनी माणसांशी माणसाप्रमाणे वागावे. यासाठी मानवतावादी विचारांचा जागर होणे गरजेचे आहे. सत्यासोबत उभे राहणे माणसाला मानवीमूल्य प्राप्त करून देणे, त्याच्या अभिव्यक्तीला अबाधित ठेवण्यासाठीची भूमिका साहित्यिक विचारवंतांनी घेतली पाहिजे. मानवतावाद मानवी विकासाला मदत करणारा आशावाद आहे.
स्वागताध्यक्ष डॉ. राजेखान शानेदिवाण, संस्थापक अध्यक्ष अनिल म्हमाने, डॉ. मिलिंद आवाड, अ‍ॅड. विवेक घाटगे, डॉ. शोभा चाळके, निमंत्रक अंतिमा कोल्हापूरकर, भरत लाटकर यांनी मनोगते व्यक्त केली. तत्पूर्वी मानवतावादी गाणं म्हणून शाहीर शीतल साठे व शाहीर सचिन माळी संमेलनाच उद्घाटन केले.
आदित्य म्हमाने आणि दूर्वा राजहंस लिखित आम्हाला जगायचे आहे! या बाल लेखकाच्या पुस्तकावर विशेष चर्चा करण्यात आली. भविष्यातील मुलं जगायची आहेत म्हणतात हा आशावाद येणाऱ्या पिढीसाठी खूपच खूपच सुखद आहे अशी प्रतिक्रिया संमेलनातील विविध मान्यवरांनी अधोरेखित केली. संमेलनात आम्हाला जगायचे आहे! या पुस्तकाच्या पंचवीस हजार प्रतींची वाचकांनी विक्रमी खरेदी केली.
दुपारच्या सत्रात मानवतावाद या विषयावर डॉ. कपिल राजहंस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात अ‍ॅड. कृष्णा पाटील, अ‍ॅड. करुणा विमल, प्राचार्य सुरेश कांबळे यांनी मानवतावादावर भाष्य केले. कवी व पत्रकार ताज मुल्लाणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कवी संमेलनास डॉ. किरण भिंगारदिवे, डॉ. वसंत भागवत, तानाजीराव जाधव, डॉ. सागर भजनावळे यांच्यासह शंभरहून अधिक कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
व्यंकाप्पा भोसले, भरत लाटकर, लालासाहेब नाईक, सुरेश केसरकर, कृष्णात पाटील, मधुकर शिर्के, प्रमोद कांबळे, सुनील जाधव यांच्यासह महाराष्ट्रातील विविध भागातून मोठ्या संख्येने साहित्यिक आणि विचारवंत उपस्थित होते.
मानवतावादी संमेलनात एकाच वेळी मानवतावादी ऐशी पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
निमंत्रक अंतिमा कोल्हापूरकर, अर्हंत मिणचेकर, गंगाधर म्हमाने, सिद्धार्थ तामगावे, निवेदक अभिजीत मासुर्लीकर, बालनिमंत्रक आदित्य म्हमाने, अमिरत्न मिणचेकर, दुर्वा राजहंस यांनी संमेलनाचे आयोजन होते.

८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारणाचे सूत्र अवलंबून जनसेवेच्या कामातून प्रभागाच्या विकासात योगदान द्या : आमदार राजेश क्षीरसागर

शिवसेनेच्या नूतन नगरसेवकांचा सत्कार; गट स्थापनेच्या प्रक्रियेला सुरवात

कोल्हापूर दि.२३ : पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने ऐतिहासिक यश मिळवीत इतिहास रचला आहे. १९८६ सालच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या स्थापनेपासून अपेक्षित यश मिळाले न्हवते परंतु या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे १५ शिलेदार निवडून आले आहेत. आज शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची १०० वी जन्मशताब्दी जयंती असून, शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा सर्वांनी संकल्प करावा. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे सूत्र अवलंबून जनसेवेच्या कामातून प्रभागाच्या विकासात मोलाचे योगदान द्या, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनेच्या नवनियुक्त नगरसेवकांना दिल्या.नूतन नगरसेवकांच्या विजयानंतर आता महापालिकेत अधिकृत गट स्थापन करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने शिवालय शिवसेना जिल्हा कार्यालय शनिवार पेठ कोल्हापूर येथे शिवसेनेच्या नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावतीने नूतन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. तसेच गट स्थापनेसाठी आवश्यक कागदपत्रे तात्काळ जमा करण्याच्या सूचनाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिल्या. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले कि, निवडून आल्यानंतर केवळ पदाचा उपभोग न घेता, प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या अडीअडचणीला धावून जा. ‘नगरसेवक’ ही केवळ एक पदवी आहे, पण लोकांच्या मनात ‘जनसेवक’ म्हणून जागा मिळवणे हेच खऱ्या लोकप्रतिनिधीचे यश आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला हा मूळ मंत्र अमलात आणून प्रभागाचा कायापालट करण्यासाठी झटून काम करा. राजकारण केवळ निवडणुकीपुरते मर्यादित ठेवून उर्वरित काळ समाजाच्या हितासाठी, प्रभागाच्या विकासासाठीच ठेवा. मतदारांशी सतत संवाद ठेवा. निवडणुकीत ज्या विश्वासाने त्यांनी मतदान केले, तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी कायम उपलब्ध रहा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.यावेळी माजी महापौर सुनील कदम, माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर, जिल्हा समन्वयक सत्यजित उर्फ नाना कदम, नगरसेवक शारंगधर देशमुख, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेवक अजय इंगवले, नगरसेवक आस्कीन आजरेकर, नगरसेवक सत्यजित जाधव, नगरसेवक वैभव माने, नगरसेवक स्वरूप कदम, नगरसेवक अभिजित खतकर, नगरसेविका मंगल साळोखे, नगरसेविका अर्चना पागर, नगरसेविका प्राजक्ता जाधव, नगरसेविका शिला सोनुले, नगरसेविका अनुराधा खेडकर, नगरसेविका संगीता सावंत, नगरसेविका कौसर बागवान उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार होणार… शिवसेनेचा महापौर होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही : आमदार राजेश क्षीरसागर

शिवसेनाप्रमुखांच्या १०० व्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त अभिवादन

कोल्हापूर /प्रतिनिधी : या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवीत शिवसेनेने घवघवीत यश संपादित केले आहे. कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर व्हावा, हे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. त्यांचे विचार घेवूनच शिवसेनेचे शिलेदार काम करत असून, या कामाच्या रूपानेच जनतेने शिवसेनेवर विश्वास दाखविला. नॅचरल जस्टीस प्रमाणे शिवसेनेचा महापौर होणार हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नसल्याचे सांगत कोल्हापूरवासियांनी वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल आभार व्यक्त करीत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
आज शिवसेनाप्रमुखांच्या १०० व्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. यावेळी “अमर रहे अमर रहे शिवसेनाप्रमुख अमर रहे” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले कि, महाराष्ट्रात एकमेव कोल्हापुरातच महायुती म्हणून आम्ही निवडणुकीस सामोरे गेलो आहे. निवडणुकीच्या सुरवातीपासूनच वरिष्ठ नेत्यांसोबत महायुती होण्याकडे आम्ही वाटचाल केली. महायुतीमध्ये कोणताही वाद होऊ नये यासाठी शिवसेनेने जागा वाटपात एक पाऊल मागे घेतले. या त्यागाचा मोबदला म्हणून महापौर पद शिवसेनेला मिळणे हा आमचा ‘नैसर्गिक हक्क’ आहे. महायुतीचे संख्याबळ ४६ हे सत्तास्थापने साठी पूरक आहे. त्यामुळे महायुतीत कोणताही वाद होईल अशी कोणाचीच भूमिका राहणार नाही. गेल्या काही वर्षातील महानगरपालिकेतील पदांच्या वाटपाचा लेखाजोखा करून सर्वच पक्षांना न्याय मिळेल अशा पद्धतीने पदांचे वाटप केले जाणार आहे. स्वीकृत नगरसेवकांची पदे कायद्याची अंमलबजावणी करून निवड केली जातील. देशात, राज्यात आणि महापालिकेत महायुतीचे सरकार असल्याने विकासकामांना कोणताही निधी कमी पडणार नाही. शहरातील प्रमुख प्रलंबित प्रश्नही लवकरच मार्गी लावू. नागरिकांना सेवा पुरविण्यात शिवसेना आणि महायुतीचे नगरसेवक कमी पडणार नाहीत. शहरातील प्रश्न सोडवून सुसज्ज आणि आधुनिक कोल्हापूरची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी माजी महापौर सुनील कदम, माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर, जिल्हा समन्वयक सत्यजित उर्फ नाना कदम, नगरसेवक शारंगधर देशमुख, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेवक अजय इंगवले, नगरसेवक आस्कीन आजरेकर, नगरसेवक सत्यजित जाधव, नगरसेवक वैभव माने, नगरसेवक स्वरूप कदम, नगरसेवक अभिजित खतकर, नगरसेविका मंगल साळोखे, नगरसेविका अर्चना पागर, नगरसेविका प्राजक्ता जाधव, नगरसेविका शिला सोनुले, नगरसेविका अनुराधा खेडकर, नगरसेविका संगीता सावंत, नगरसेविका कौसर बागवान, शहरप्रमुख रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, रमेश खाडे, उदय भोसले, राहुल चव्हाण, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, अरविंद मेढे, विजय जाधव, दादा माने, महिला आघाडीच्या पूजा भोर, अमरजा पाटील, पूजा कामते, सुनिता भोपळे, पूजा आरदांडे आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेंद्रिय गुळापासून जिलेबीप्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सेंद्रीय गुळाच्या जिलेबीच्या स्टॉलचा शुभारंभ

कोल्हापूर/प्रतिनिधी : चव, रंग आणि गोडी यामुळे जगप्रसिध्दी मिळालेल्या कोल्हापुरी गुळापासून आता जिलेबी तयार करण्याची युक्ती शेतकऱ्यांनी लढवली आहे. निमित्त आहे. प्रजासत्ताक दिनाचे. प्रा. अशोक पाटील यांच्या संकल्पनेतून गूळ उत्पादक शेतकरी राजेंद्र करंबे यांनी त्यांच्या शेतात उत्पादित झालेल्या उसाच्या रसापासून हा गूळ तयार करण्यात आला आहे. त्याच गुळाच्या पाकातून जिलेबी तयार केली आहे. मिरजकर तिकटी येथे सुरु करण्यात आलेल्या जिलेबी स्टॉलचा शुभारंभ जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या हस्ते झाला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, नगरसेवक विशाल शिराळे, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे, कृषीअभ्यास डी.बी.चव्हाण, माजी नगरसेवक किरण शिराळे, बाबा पार्टे, सीपीआरचे डॉ. शिरीष मुरगुंडे, शिक्षक नेते पी.के.पाटील, डॉ. नरेंद्र पाटील, जयाकुमार शिंदे, एसएससी बोर्डाचे अधिकारी रणजित देसाई आदी उपस्थित होते.
कोल्हापूरकर नेहमीच वेगळे कांही शोधत असतात, त्यातून साखरेच्या पाकापासून तयार केलेल्या जिलेबीबरोबर कोल्हापुरीतील गुळापासुन तयार केलेल्या जिलेबीचा स्टॉल सर्वानाच आवडेल, असा विश्वास जिल्हा पोलिस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक प्रा. अशोक पाटील यांनी केले. पुढारीचे संपादक डॉ. प्रतापसिहं जाधव यांच्या प्ररेणेने गुळाच्या जिलेबीचा स्टॉल सुरु केला आहे. या जिलेबीसाठी संपूर्णपणे सेंद्रीय गुळाचा वापर केला आहे. त्यामुळे कोल्हापूरशहर वासियांच्याबरोबर भाविक, पर्यंटक यांना ही जिलेबी आवडेल, असेही प्रा. पाटील यांनी सांगितले.