कोल्हापुरात ड्रग्ज माफियांना जबर धक्का! तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा ,एमडी आणि चरस आगीत खाक
कोल्हापूर/प्रतिनिधी : नशामुक्त महाराष्ट्र अभियानाला अधिक बळ देत कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थांच्या अवैद्य टोळीविरोधात मोठी कारवाई केली आहे.जिल्ह्यातील १५ पोलिस ठाण्यामध्ये नोंद असलेल्या ८९ गुन्हयांमधून जप्त करण्यात आलेले तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा,
एमडी आणि चरस न्यायालयाच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आले.या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांच्या बेकायदेशीर जाळ्याला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
ही नाश प्रक्रिया कसबा बावडा येथील जैववैद्यकीय कचरा निर्मलून प्रकल्पात पार पाडली.पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीच्या उपस्थित न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर पध्दतीने पूर्ण करण्यात आली.यावेळी वजन-माप विभाग,
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तसेच पंच उपस्थित होते.
लक्ष्मीपुरी,राजारामपुरी,करवीर ,शाहुपुरी ,गोकुळ शिरगाव ,हुपरी,
शाहुवाडी,आजरा ,शहापूर,भुदरगड ,गांधीनगर गावभाग,शिवाजीनगर,एमआयडीसी आणि इचलकरंजी परिसरातील विविध पोलिस ठाण्यामध्ये दाखल गुन्हयांमधील जप्त अंमली पदार्थांचा यात समावेश आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचारी ही नाश प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली.१५ पोलिस ठाण्यातील ८९ गुन्हयांमधील अंमली पदार्थांचा नाश.५१५ किलो ४७२ gm गांजा,एमडी आणि चरस नष्ट.न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेशीर प्रक्रिया.नशामुक्त महाराष्ट्र अभियानाला कोल्हापूर पोलिसांची मोठी साथ मिळाली आणि यामुळे ड्रग्ज माफियांना मोठा धक्का बसला आहे.

