Sunday, June 29, 2025
spot_img
Home Blog Page 326

कोंडाळामुक्त कोल्हापूरसाठी उपाययोजना करा थेट पाईप लाईनचा प्रकल्प मार्गी लावू – पालकमंत्री सतेज पाटील

0

कोंडाळामुक्त कोल्हापूरसाठी उपाययोजना करा Bथेट पाईप लाईनचा प्रकल्प मार्गी लावू
– पालकमंत्री सतेज पाटील

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर कोंडाळामुकत शहर बनविण्यासाठी आवश्यकत्या उपाययोजना करा, त्यासाठी लागणारे टिपर घेण्याची सूचनाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केली.कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी निवडणूक कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी सूचना केली. बैठकीस महापौर सौ. निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, गटनेते शारंगधर देशमुख, उपायुक्त निखिल मोरे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
कचरा उचलण्यासाठी सद्या महापालिकेकडे 104 टिपर असून आणखीन सुमारे 40 टिपर घेऊन केवळ सकाळीच कचरा न उचलता तो दिवसभर उचलण्याची कार्यवाही करुन शहर कोंडाळामुक्त करावे, अशी सूचनाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. तसेच कचरा प्रकल्पाची सध्या असलेली 200 टन निर्गतीची क्षमता आणखीन 50 टनांनी वाढविण्याची प्रक्रिया गतीने केली जाईल, असेही ते म्हणाले.
थेट पाईप लाईनचा प्रकल्प निश्चितपणे मार्गी लावू, असे सांगून पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले की, सद्या थेट पाईपलाईन प्रकल्पांतर्गत 49 किलोमिटर पाईप लाईनचे काम पूर्ण झाले आहे, जॅकवेलचेही बहुतांशी काम झाले असल्याने लवकरच थेट पाईपलाईनचे काम मार्गी लागेल, असेही त्यांनी सांगितले. तसेच अमृत योजनेचे कामही लवकरणे पूर्ण करण्यासाठी सबंधित अधिकाऱ्यांना युध्दपातळीवर काम करण्याची सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
रस्त्यांच्या कामासाठी शासन आणि जिल्हा नियोजन समितीकडून 40 कोटीचा निधी मंजूर झाला असून त्यांची टेंडर प्रक्रिया सुरु आहे. रस्त्याची कामे लवकरच हाती घेतली जातील, असे सांगून पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, शहरातील रस्त्यामध्ये पडलेली खड्डे बुजविण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेऊन नोव्हेंबरच्या पहिल्या –दुसऱ्या आठवडयात रस्त्यांचे पॅचवर्क पूर्ण केले जाईल, मात्र ज्या रस्त्यांची कामे नियोजनानुसार करण्यात येणार आहेत, त्यांचे पॅचवर्क न करता , रस्ताच केला जाईल. तसेच बिंदु चौक येथील आणि गाडी अड्डा येथील पार्किंग तसेच तावडे हॉटेल येथील मोठया वाहनासाठी नियोजित पार्किंगचा प्रश्नही मार्गी लावला जाईल. तसेच लक्ष्मी सरस्वती थिएटर जवळील 7 मजली मल्टीलेवल पार्किंगबाबतही तांत्रिक अडचणी पूर्ण करुन त्यांचीही उभारणी करु. याबरोबरच पंचगंगा स्मशानभूमी येथे इलेक्ट्रिकल करता येईल काय, याबाबत चर्चा करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
शहरातील ट्राफिक सिग्नल उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी दिला असून हे काम पूर्ण झाले आहे. तसेच आयटी पार्कची उभारणी दोन फेजमध्ये करण्याचे नियोजन असून यासाठी मान्यता मिळाल्यानंतर हा प्रश्नही मार्गी लागेल. स्थानिक आयटी कंपन्याना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच कोल्हापूरात कंपोनंट ब्लडबॅकेसाठी 1 कोटीचा निधी जिल्हा नियोजन समितीतून मंजुर केला असून 2 महिन्यात सामुग्री येउुन काम मार्गी लावण्याची सूचनाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी संबंधितांना दिली. कोल्हापूर महापालिकेची ई ऑफिस प्रणाली अतिशय चांगली असून राज्यस्तरावरही या प्रणालीचा उल्लेख मा. मुख्यमंत्री महोदयांनी केला, हे कोल्हापूर महापालिकेच्यादृष्टीने अभिमानाची बाब आहे.
महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलला जिल्हा नियोजन समितीतून निधी दिला असून सर्व सुविधायुक्त हॉस्पिटल निर्माण करण्याचे प्रयत्न असल्याचे सांगून पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले की, महापालिकेच्या प्राथमिक व माघ्यमिक शिक्षकांचा एका दिवसाचा पगार कोरोना उपाययोजनासाठी देण्यास संघटनेने सहमती दर्शविली आहे. हा निधी मिळाल्यास आयसोलेशन येथे स्वतंत्र कोरोना हॉस्पिटल विकसित करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शहरात औषध फवारणीचा 81 वॉर्डाचा आराखडा तयार करुन सातत्यपूर्ण औषध फवारणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
कोरोनामुळे महापालिकेचे 10 कर्मचारी मयत झाले असून 6 कर्मचाऱ्यांना शासन नियमानुसार देय असणाऱ्या मदतीसाठी प्रस्ताव शासनाकडे गेले आहेत, तसेच अन्य 4 कर्मचाऱ्यांच्या कुटुबियांना अन्य मार्गानी मदत करण्याबाबत प्रयत्न राहतील, असेही पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले.
यावेळी कोरानाच्या अनुषंगानेही पालकमंत्री सतेज पाटील यांनी सविस्तरपणे आढावा घेतला तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अधिक गतीमान व व्यापक स्वरुपात उपाययोजना करण्याची सूचना केली.
यावेळी महापालिकेच्या विविध अडचणीबाबत महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी सविस्तरपणे निवेदन केले. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आढावा बैठकीत महापौर सौ. निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सतिश पाटील, गटनेते शारंगधर देशमुख आदि मान्यवरांनी महापालिकेच्या समस्याबाबत माहिती दिली.
या बैठकीस सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्यलेखा परिक्षक धनंजय आंधळे, सहाय्यक संचालक प्रसाद गायकवाड, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, करनिर्धारक संजय भोसले, सिसिटम मॅनेजर यशपाल रजपूत, आशपाक आजरेकर यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

महिला बचत गट व फायनान्स कंपन्यांची कर्जे माफ करावीत मागणीसाठी मुदाळतिट्ट्यावर रस्ता रोको

0

महिला बचत गट व फायनान्स कंपन्यांची कर्जे माफ करावीत मागणीसाठी मुदाळतिट्ट्यावर रस्ता रोको

 

कोल्हापूर/सरवडे/प्रतिनिधी : महिला बचत गट व फायनान्स कंपन्याकडून घेतलेली कर्जे माफ करावीत या मागणीसाठी ब्लॅक पँन्थरच्या वतीने मुदाळतिट्टा ता.कागल येथे रस्ता रोको करत मागण्याचे निवेदन मुरगुड पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरिक्षक विद्या जाधव यांना देण्यात आले.आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.आंदोलनात महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
राष्ट्रीयकृत बँका सर्वसामान्य माणसाला कर्जासाठी दारात सुध्दा उभा करून घेत नाहीत. त्यामुळेच सामान्य कुंटूंबीतील लोक खाजगी सावकार ,फायनान्स कंपन्या व बचत गटांच्या मधून आपल्या गरजा भागविण्यासाठी कर्ज घेतात. यामध्ये
शेतमजूर, भूमिहीन, गवंडी, सेंट्रीग काम करणारे मजूर,रिक्षावाले, मोलकरीण आदि सामान्य माणसाचा सहभाग आहे.फायनान्स करणाऱ्या बहुतांश कंपन्या ह्या कर्नाटक राज्यातील आहेत. त्या मनमानी पध्दतीने वसुली करत आहेत. गुंड प्रवृत्तीच्या त्रासाला अनेक कुंटूंबे अक्षरशः कंटाळली आहेत.असे निवेदनात म्हटले आहे.
मार्च पासून कोरोना आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यामुळे सामान्य रोजीरोटीसाठी काम करणाऱ्या माणसाची कामेच बंद झाली. सरकार तांदूळ ,गहू ,डाळ देते पण जगण्यासाठी अनेक वस्तूंची गरज असते. त्यामुळे सामान्य कुंटूंबातील पुंजी संपली आहे.त्यातच कामधंदा नाही आणि कर्जाची वसुलीचा तगादा सुरु आहे. त्यामुळे सामान्य माणूस खचून गेला आहे. तरी शासनाने शेतकरी व उद्योजकाप्रमाणे सामान्य कुंटूंबीयांनी काढलेले फायनान्स ,बचत गट यांचे कर्ज माफ करावीत अशी मागणी केली आहे.आंदोलनात कोमल कांबळे, वैशाली पाटील, नर्मदा कांबळे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

पोलीस खात्याला बदनाम करणाऱ्यांची गय केली जाणार नाही – पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर पोलीस खात्याला बदनाम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही तसेच अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करून कोणत्याही प्रकारचा दबाव न घेता जनतेला विश्वासात घेऊन लोकाभिमुख कामकाज करण्याला प्राधान्य असेल असे प्रतिपादन कोल्हापूरचे नूतन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले. बलकवडे यांनी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आठ दिवसांपूर्वी झाले आहेत. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची पुणे ग्रामीण बदली झाली नुकताच त्यांनी तेथील पदभार स्वीकारला आहे त्यांच्या जागी कोल्हापूरचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बळकवडे यांची राज्य शासनाने नियुक्ती केली. शैलेश बलकवडे यांनी आज कोल्हापूरचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला, यावेळी अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, श्रीनिवास घाडगे यांच्यासह अधिकाऱ्यांनी बलकवडे यांचे स्वागत केले. मावळते पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी ज्याप्रकारे गुन्हेगारीवर अंकुश ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली होती त्याच पद्धतीने येथून पुढेही कामकाज सुरू ठेवणार याबरोबरच संघटित गुन्हेगारी मोडीत काढून गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा कायमस्वरूपी सुरूच ठेवणार असल्याचे बलकवडे सांगितले. उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य राहील असे त्यांनी सांगितले. पोलीसांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणार्‍या उपक्रमांना पाठबळ देण्यात येईल असं आश्वासन बलकवडे यांनी यावेळी दिले. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश देसाई, सत्यराज घुले यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0

 

पोलीस खात्याला बदनाम करणाऱ्यांची गय केली जाणार नाही – पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर पोलीस खात्याला बदनाम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही तसेच अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करून कोणत्याही प्रकारचा दबाव न घेता जनतेला विश्वासात घेऊन लोकाभिमुख कामकाज करण्याला प्राधान्य असेल असे प्रतिपादन कोल्हापूरचे नूतन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले. बलकवडे यांनी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.
राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आठ दिवसांपूर्वी झाले आहेत. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची पुणे ग्रामीण बदली झाली नुकताच त्यांनी तेथील पदभार स्वीकारला आहे त्यांच्या जागी कोल्हापूरचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बळकवडे यांची राज्य शासनाने नियुक्ती केली. शैलेश बलकवडे यांनी आज कोल्हापूरचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला, यावेळी अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, श्रीनिवास घाडगे यांच्यासह अधिकाऱ्यांनी बलकवडे यांचे स्वागत केले.
मावळते पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी ज्याप्रकारे गुन्हेगारीवर अंकुश ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली होती त्याच पद्धतीने येथून पुढेही कामकाज सुरू ठेवणार याबरोबरच संघटित गुन्हेगारी मोडीत काढून गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा कायमस्वरूपी सुरूच ठेवणार असल्याचे बलकवडे सांगितले.
उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य राहील असे त्यांनी सांगितले. पोलीसांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणार्‍या उपक्रमांना पाठबळ देण्यात येईल असं आश्वासन बलकवडे यांनी यावेळी दिले.
यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश देसाई, सत्यराज घुले यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0

चंदगडची अभय पतसंस्था फोडणाऱ्या तिघा चोरट्यांना अटक; २० लाखाचे ३९० ग्रॅम दागिने जप्त

 

कोल्हापूर/प्रतिनिधी :
चंदगड तालुक्यातील कोवाड येथील अभय ग्रामीण सहकारी पतसंस्था फोडून ४० लाखाचे ७५० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरणाऱ्या तिघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले. त्याच्याकडून २० लाख रुपयांचे ३९० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. महेश उर्फ पिंटू सुबराव कोले, सुनिल उर्फ जान्या रामा तलवार , संतोष उर्फ राजू ज्ञानेश्वर सुतार अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
चंदगड तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरीकांनी कोवाड येथील अभय ग्रामीण सहकारी पतसंस्थेत कोविड काळात आपली आर्थिक अडचण असल्यामुळे आपल्या घरातील सोन्याचे दागिने पतसंस्थेत गहान ठेवून कर्ज घेतले होते. शनिवार १२ सप्टेंबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी पतसंस्थेत धाडसी चोरी करून ७५० ग्रॅम दागिने लंपास केले. गहाण म्हणून ठेवलेले दागिने चोरीला गेल्यामुळे सर्वसामान्य नागरीक हवालदिल झाले होते.
अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना या चोरीचा तपास करण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, पो.हे. कॉ. श्रीकांत मोहिते, विजय कारंडे, विजय गुरखे, किरण गावडे, विठ्ठल माणिकेरी, प्रदीप पवार, संजय पडवळ, उत्तम सडोलीकर हे पथक नेमले होते. या पथकाने अत्यंत शिताफीने या चोरट्यांना जेरबंद केले असून चोरीतील साहित्य जप्त केले आहे.

राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत मेलेल्या माणसाच्या टाळू वरच लोणी खाण्याचा रुजू होऊ पाहणारा प्रकार खपवून घेणार नाही : श्री.राजेश क्षीरसागर यांचा इशारा

0

राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत मेलेल्या माणसाच्या टाळू वरच लोणी खाण्याचा रुजू होऊ पाहणारा प्रकार खपवून घेणार नाही : श्री.राजेश क्षीरसागर यांचा इशारा

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोनापासून संरक्षण करणाऱ्या मास्क, ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनरच्या किमतीवर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. ब्रँडेड कंपनीच्या नावाखाली बनावट मास्कचीही विक्री केली जात आहे. ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनरची जादा दराने विक्री करून जनतेची लुट केली जात आहे. रेमडेसिवर इंजेक्शन मिळवण्यासाठी नागरिकांची धडपड होत असताना त्याचा काळाबाजार होत असल्याच्या बातम्या प्रसिद्धीस येत आहेत. यावर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने लोकांची राजरोस लुट चालू आहे. करवीर नगरी ही राजर्षी शाहू महाराजांची पवित्र नगरी आहे आणि या नगरीत कोणी मेलेल्या माणसाच्या टाळू वरच लोणी खाण्याचा प्रकार करीत असेल तर शिवसेना तो खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिला. यासह हॉस्पिटलच्या बिलासंदर्भात कोणतीही तक्रार असेल तर शिवसेना शहर कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. एन ९५ मास्क, ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनरच्या बेलगाम किमती, रेमडेसिवर इंजेक्शनचा तुटवडा, रुग्णालयांचे फायर ऑडीट, खाजगी रुग्णालयात होणारी आर्थिक पिळवणूक आदींबाबत को.म.न.पा. आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांना बैठकीत सूचना दिल्या. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक कार्यालय ताराबाई पार्क येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या सुरुवातीसच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.
एन ९५ मास्क, ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनरच्या बेलगाम किमतीवर कोणाचे नियंत्रण आहे? ब्रँडेड कंपनीच्या नावाखाली बनावट मास्कचीही विक्री केली जात आहे. ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनरची जादा दराने विक्री करून जनतेची लुट केली जात आहे. एन-९५ मास्क २०० ते २५० रुपयांपर्यंत विकले जात असल्याने सामान्य जनतेचा स्वस्त व असुरक्षित मास्क वापरण्याकडे कल वाढत आहे, त्याचमुळे या रोगाचा प्रसार अधिक प्रमाणात वाढला आहे. त्याचबरोबर ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनरच्या गुणवत्ता आणि दरावरही प्रशासनाचे नियंत्रण नाही. त्याचमुळे सर्वसामान्य जनतेची राजरोस लुट होत आहे. रेमडेसिवर इंजेक्शनचा तुटवडा होत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शन मिळवण्यासाठी फरकट होत आहे. इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. दर कमी करूनही काही ठिकाणी जुन्या किमतीत इंजेक्शनची विक्री केली जात आहे. एकीकडे इंजेक्शनची किमत २२०० रुपये असताना दुसरीकडे ते ५८०० रुपयांना विकले जाते. ही दरात तफावत का? की इंजेक्शनच्या गुणवत्तेत फरक आहे का? औषध उपलब्ध असलेल्या काही ठिकाणी औषधे संपली असल्याचे सांगितले जाते. अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी यांचे यावर नियत्रण नाही. यापूर्वी इंजेक्शन मोफत दिली जात होती तर आता ती विकत का घ्यावी लागतात? इंजेक्शनच्या किमतीत फरक असल्याने जास्त नफ्यासाठी जादा किमतीची इंजेक्शनचा साठा करून ती विकली जात आहेत का? आधीच इंजेक्शन मिळत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच त्यांच्या परिस्थितीचा कोणी गैरफायदा घेवू नये असे क्षीरसागर म्हणाले.
यावर बोलताना आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी, मा.मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाने माझी कुटुंब माझी जबाबदारी ही योजना लोकचळवळ रूपातून उभी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. कोरोना मुक्तीसाठी या चळवळीच्या माध्यमातून तातडीने उपचार पद्धती अवलंबून रेमडेसिवर इंजेक्शन लागूच नये यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. यासह रेमडेसिवर इंजेक्शन सध्या सरकारी कोव्हीड सेंटर मध्ये काम करत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मोफत दिली जात असल्याची माहिती दिली.तर औषध नियंत्रक मनोज आहिया यांनी, इंजेक्शनच्या कंपनी वेगवेगळ्या असल्याने दरात तफावत असल्याचे सांगत, केंद्र किंवा राज्य शासनाकडून कायदा अंमलात आणल्यास दरावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार असल्याचे सांगितले. तसेच दोन्ही किंमतीच्या इंजेक्शनच्या गुणवत्तेत कोणताही फरक नसल्याचे स्पष्ट केले.
यावर बोलतना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, गुणवत्तेत फरक नसेल तर स्वस्त इंजेक्शनच का विकली जात नाहीत, असा सवाल करीत लोकांना मदत करण्याच्या भावनेने सर्वांनी काम करणे गरजेचे असून, अधिकाराचा योग्य वापर करून तातडीने विक्रेत्यांची बैठक घ्या, औषध निर्माण कंपन्याना सूचना द्या पण दोन दिवसात कोल्हापुरात स्वस्त इंजेक्शन नागरिकांना उपलब्ध करून द्या, अशा सूचना केल्या. त्याचबरोबर काल पहाटे सीपीआर मध्ये घडलेल्या दुर्घटनेच्या धर्तीवर महानगरपालिका अग्निशामक दलाने शहरातील सर्वच रुग्णालयांचे पुन्हा फायर ऑडीट करावे. फायर ऑडीटमध्ये त्रुटी असल्यास तात्काळ त्या त्रुटी रूग्णालयामार्फत दुरुस्त करून घ्याव्यात, अशी सूचना केली.त्याचबरोबर शहरातील अनेक खाजगी दवाखाने राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत आहेत. परंतु, कोरोना संकट काळात काही रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात कुचराई होत आहे. शासनाच्या महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कोरोना रुग्णांसाठी पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. परंतु या पॅकेजचा लाभ प्रत्यक्षात किती रुग्णांना मिळाला? यावर महानगरपालिका आरोग्य विभागाचे नियंत्रण नाही. वारंवार सूचना देवूनही रुग्णांच्या नातेवाईकांची बिलातून आर्थिक लुट होण्याच्या तक्रारी येत आहेत. भीतीपोटी नागरिक तक्रार करत नाहीत, प्रशासनाने खाजगी हॉस्पिटलवर समन्वयक, ऑडीटर नेमले असतानाही आर्थिक लुट सुरूच असल्याचे सांगितले. त्याचपद्धतीने नॉन कोव्हीड पेशंटच्या उपचारांवर ही तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रविभाऊ चौगुले यांनी, रुग्णाच्या नातेवाईकांना १५ – १५ लाखांची बिले दिली जातात, एवढी बिले होतात कशी? त्यांना कोणती औषधे दिली जातात? इंजेक्शन पण बाहेरून विकत घ्यावे लागते तर मग एवढे पैसे घेवून नागरिकांची लुट केली जात आहे, डॉक्टरांच्या पीपीई कीटचे पण पैसे बिलात लावले जातात. तेच कीट घालून डॉक्टर सर्व रुग्णांना एकत्रित तपासतात. तर मग सगळ्याच रुग्णांच्या बिलात पीपीई कीटचे पैसे का घातले जातात, असा प्रश्न उपस्थित केला.
यावर आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी, महापालिकेने ऑडीटर नेमले असून, दिवसाकाठी रेग्युलर बेडसाठी रु. चार हजार, आय.सी.यु.साठी रु.साडेसात हजार आणि व्हेंटीलेटर बेड साठी रु.नऊ हजार हे दर शासनाने ठरवले असून, यापेक्षा अधिक दराने कोणी पैसे आकारात असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची ग्वाही दिली. त्याचबरोबर नागरिकांना बिलात शंका असल्यास त्यांनी ऑडीटर कडून बिलाची तपासणी करून घेतल्याशिवाय बील भरू नये, त्यांचे शंका निरसन झाल्यानंतर बिलाची रक्कम जमा करण्याचे आवाहन केले.
या बैठकीस शिष्ठमंडळामध्ये शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, शिवसेना गटनेते राहुल चव्हाण, माजी जिल्हाप्रमुख रविभाऊ चौगुले, दीपक गौड, उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे, सुजय संकपाळ, महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंदळे. औषध नियंत्रक मनोज आहिया, अन्न व औषध प्रशासनाच्या प्रभारी निरीक्षक सपना घुणेकर, महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक सुभाष नांगरे, वैध मापन शास्त्र विभागाचे सहाय्यक नियंत्रक पवार आदी उपस्थित होते.

बैठकीतील ठळक मुद्दे

रेमडेसिवर इंजेक्शन, एन ९५ मास्क,ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी,
रेमडेसिवर इंजेक्शनचा अतिरिक्त साठा मागवून रुग्णांना स्वस्तात उपलब्ध करून द्या किंवा महापालिकेतर्फे मोफत उपलब्धतेसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना,रुग्णालयाच्या बिलासंदर्भात शंका असल्यास शिवसेना शहर कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन,महापालिका क्षेत्रातील सर्वच रुग्णालयांचे तातडीने फायर ऑडीट करण्याची सूचना.

कोरोनामुक्तीनंतर मंत्री हसन मुश्रीफ यांचे कागलमध्ये जल्लोषी स्वागत,देव-देवतांसह महापुरुषांना अभिवादन : सडा रांगोळ्या व फुग्यांच्या जल्लोषासह फुलांचा वर्षाव

0

कोरोनामुक्तीनंतर मंत्री हसन मुश्रीफ यांचे कागलमध्ये जल्लोषी स्वागत,देव-देवतांसह महापुरुषांना अभिवादन : सडा रांगोळ्या व फुग्यांच्या जल्लोषासह फुलांचा वर्षाव

“Level6” – ‘को-वर्किंग स्पेस’ अभिनव संकल्पनेमुळे होणार पैशांचीही बचत

0

“Level6” – ‘को-वर्किंग स्पेस’ अभिनव संकल्पनेमुळे होणार पैशांचीही बचत

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोनाव्हायरसचा परिणाम जगातील सर्व उद्योगांवर आणि अर्थव्यवस्थांवर झाला आहे. छोट्या- मोठ्या उद्योग अन व्यावसायिकांची आर्थिक घडी विस्कटली आहे.बहुतांश कंपन्या त्यांच्या कार्यालयावर प्रचंड रक्कम खर्च करतात.पण आता कोरोना, लॉकडाऊन यामुळे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी कॉर्पोरेट्स, स्टार्टअप्स, छोट्या-मोठ्या कंपन्या असे सर्वजन ऑफिस आणि त्याच्या व्यवस्थापनावरील खर्च कमी करू पहात आहेत. बर्‍याच कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची मुभा दिली आहे, पण ‘वर्क फ्रॉम होम’ला देखील काही मर्यादा आहे, त्यामध्ये कर्मचारी पूर्ण क्षमतेने आपले काम करू शकत नाही आणि त्याचा कंपनीच्या उत्पादनक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातूनच उदयाला आली आहे Level6 ची ‘को-वर्किंग स्पेस’ अभिनव संकल्पना.
Level6 ची ‘को-वर्किंग स्पेस’ ही सुविधा अशा कंपन्यांसाठी प्रभावी ठरणार आहे, ज्यांना आपल्या कर्मचाऱ्याचे मानसिक आरोग्य जपण्यासह त्यांना काम करण्यास प्रोत्साहित करण्याची इच्छा आहे. ‘को-वर्किंग स्पेस’चा वापर केल्यास कॉर्पोरेट्स, स्टार्टअप्स, छोट्या-मोठ्या कंपन्यांचा कार्यालय आणि त्याच्या व्यवस्थापनावर होणाऱ्या खर्चात मोठी काटकसर होणार आहे. खर्चात काटकसर झाल्याने त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासही मदत होणार आहे. विशेष म्हणजे याठिकाणी कर्मचार्‍यांना ऑफिस वातावरणात काम करता येणार आहे. त्यामुळे आता कोणालाही कोल्हापुरातील ‘प्राईम लोकेशन’मध्ये स्वतःचे ऑफिस सुरु करणे सहज शक्य आहे. Level6 ची ‘को-वर्किंग स्पेस’ कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. विशेष म्हणजे रेल्वे स्थानक आणि बसस्थानक (सीबीएस स्टँड) हाकेच्या अंतरावर असून राष्ट्रीय महामार्गही खूप जवळ आहे. इतकेच नव्हे तर covid -१९ च्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने सांगितलेल्या सुरक्षा नियमांचे येथे विशेष पालन केले जाते. एकूणच कर्मचाऱ्यासाठी ऑफिसचे वातावरण आणि सोबतच सुरक्षित, आरोग्यदायी व्यवस्था यामुळे Level6 ‘को-वर्किंग स्पेस’ कॉर्पोरेट्स, स्टार्टअप्स, छोट्या-मोठ्या कंपन्यांचा नक्कीच पसंतीस उतरेल, यात शंका नाही.
Level6 ‘को-वर्किंग स्पेस’ ही अभिनव संकल्पना ख्यातनाम उद्योगपती उप्पल शाह यांनी सुरु केली आहे. या संकल्पने विषयी बोलताना उप्पल शाह म्हणाले की,आम्ही कोल्हापुरात कॉर्पोरेट्स, स्टार्टअप्स आणि छोट्या – मोठ्या कंपन्यासाठी कमी किमतीत कॉर्पोरेट पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहोत. Level6– ‘को-वर्किंग स्पेस’ हि केवळ जागा नाही. या माध्यमाचा वापर करून उद्योजक आपली स्वप्ने करू शकतात. व्यवसाय सुरक्षा, स्थिरता आणि अत्यल्प खर्चात कॉर्पोरेट संस्कृतीचा भाग होता येणार आहे.
Level6 मध्ये प्राईम लोकेशन, हाय-स्पीड वायफाय,
दर्जेदार प्रिंटर्स,
कार्यक्षम सहकारी,
अत्यल्प किंमत,
स्नॅकची व्यवस्था,
स्वच्छ वातावरण,
प्रशस्त बैठक व्यवस्था आदी सुविधा मिळणार आहेत.इच्छुकांनी
9055115511 / 0231-6688880 या क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे.

 

सिद्धगिरी कोविड हॉस्पिटलचा दुसरा विस्तारित विभाग लोकार्पण सोहळा

0

सिद्धगिरी कोविड हॉस्पिटलचा दुसरा विस्तारित विभाग लोकार्पण सोहळा

 

कोल्हापूर/प्रतिनिधी :  ‘निराधारांना आधार’ या तत्वावर काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर सुरु आहे. कोल्हापुरात कोरोना संसर्ग वाढू लागल्यावर बेडची कमतरता प्रकर्षाने जाणवू लागली. बेड न मिळाल्याने कोणास प्राणास मुकावे लागू नये म्हणून अल्पावधीत सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये कोरोना विभाग कार्यरत झाला. एक महिन्याच्या कालावधीत अनेको कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. आरोग्यपूर्ण नैसर्गिक सानिध्य लाभल्यामुळे रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी अल्प दरात विलगीकरण कक्ष हि चालवण्यात येत आहे.
तरी वाढता संसर्ग पाहता रुग्णांसाठी आणखी बेडची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आल्यामुळे मा.आ.चंद्रकांत दादा पाटील यांच्या सहकार्याने सिद्धगिरी हॉस्पिटलचा नवीन दुसरा विभाग सुरु होत आहे. यामध्ये प्रामुख्याने 7 बेड व्हेंटीलेटर सहित,23 ऑक्सिजन बेड व सामान्य 10 बेड असे सुमारे चाळीस बेडचे अद्यावत कोविड रुग्णालय लोकांच्या सेवेत दाखल करण्यात आले आहे. कोरोना संसार्गानंतरही उद्भवणाऱ्या अनेक आजारांवर उपचार करणारे केंद्र म्हणून सिद्धगिरी हॉस्पिटल नावारूपास येईल. अद्यावत उपकरणे, तत्पर वैद्यकीय स्टाफ, कोरोना निदानासाठी एच.आर.सिटी., अद्यवत प्रयोगशाळा एकाच छताखाली सर्व वैद्यकीय सुविधा मिळत असल्यामुळे सिद्धगिरी हॉस्पिटल कोरोनाग्रस्तांसाठी एक आधारवड ठरणार आहे.

मराठा आरक्षणासाठी १० ऑक्टोंबरला महाराष्ट्र बंदची हाक कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषदेत घोषणा

0

मराठा आरक्षणासाठी १० ऑक्टोंबरला महाराष्ट्र बंदची हाक कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषदेत घोषणा

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर संपूर्ण राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे याच पार्श्वभूमीवर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज कोल्हापुरात मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने सुरेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती.या परिषदेत मराठा आरक्षणासह विविध १५ ठराव मंजूर करण्यात आले आहेत.
दरम्यान या गोलमेज परिषदेत पारित झालेल्या ठरावांचा गांभीर्याने विचार करुन सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा,अन्यथा १० आॅक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली.
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी सुरेशदादा पाटील होते. या परिषदेस विजयसिंह महाडिक, भरत पाटील ,शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले ,पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव,सुजित चव्हाण, प्रसाद जाधव ,वंदनाताई मोरे,इतिहास तज्ञ नामदेव जाधव ,छत्रपती ग्रुपचे प्रमोददादा पाटील यांच्या सह राज्यातील विविध मराठा संघटनांचे प्रतिनिधी,महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय,आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच,एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या.
तर आरक्षणाच्यालढाईत बलिदान दिलेल्या बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
तसेच मराठा आरक्षणासह विविध १५ ठरावावर चर्चा करून ते सर्वांमते मंजूर करण्यात आले.यावेळी विविध मान्यवरांनी मनोगते व्यक्त करून मराठा आरक्षण मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची लढाई लढण्याची तयारी दर्शवली.
यावेळी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवावी ,सारथी संस्थेच्या आर्थिक तरतुदीमध्ये वाढ करावी,मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत नोकरी भरती करु नये, मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावेत, राज्यातील गडकिल्यांचे संवर्धन करण्यात यावे यासह विविध १५ ठराव मंजूर करण्यात आले.या गोलमेज परिषदेत पारित झालेल्या ठरावांचा गांभीर्याने विचार करुन सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा,अन्यथा १० आॅक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवण्याचा इशारा सुरेशदादा पाटील यांनी दिला आहे.

कोरोनाबाधित पोलिसांसाठी ‘पोलीस फोन मित्र’ ही अभिनव संकल्पना 

0

कोरोनाबाधित पोलिसांसाठी ‘पोलीस फोन मित्र’ ही अभिनव संकल्पना

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : जुगाड कौन्सिलिंग सेंटर कोल्हापूर आणि मनःसृष्टी, पुणे यांच्या संयुक्त माध्यमातून कोल्हापूर पोलीस दलातील कोरोनाबाधित पोलिसांसाठी “पोलीस फोन मित्र” ही एक अभिनव संकल्पना गेल्या दोन महिन्यापासून राबवण्यात येत आहेत. कोल्हापूर पोलीस दलातील अधिकारी किशोर काळे व प्रणील गिल्डे यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. डॉ. कल्याणी कुलकर्णी, सुरेश खांडेकर, सुखदा आठले व सौ. गीता हसुरकर यांनी कोरोनाबाधित पोलिसांना या उपक्रमाअंतर्गत समुपदेशन दिले आहे.
‘सद्र रक्षणाय खल निग्रहणाय’ या ब्रीद वाक्याला अनुसरून कोरोनाच्या या कठीण कालावधीत योध्याप्रमाणे आपले कर्तव्य व सेवा संपूर्ण पोलिस दिवस-रात्र बजावत आहे. यात अनेक पोलिस कोरोनाबाधित झाले, तर काही जणांची प्रकृती चिंताजनक बनली. याचा त्रास त्यांच्या कुटुंबीयांना पण होत होता. याच वेळी पोलिसांना भावनिक व मानसिक आधार देण्याचे काम जुगाड व मन:सृष्टीचे निखिल वाळवगेकर व स्वप्नाली चाचड यांनी केले. कोरोनाबाधित पोलिसांची यादी घेऊन फोनवरून त्यांच्याशी संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचे काम सुरू करण्यात आले. पोलीस मित्रांनीही याला चांगला प्रतिसाद देत मनमोकळेपणाने संवाद करण्यास सुरुवात केली. त्यांच्या मनातील भीती व दडपण दूर होण्यास मदत झाली असे पोलीस मित्रांनी आपल्या अनुभवाद्वारे सांगितले.
ही संकल्पना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना आवडली. त्यांनी जातीने यात लक्ष घातले व यात सहभाग नोंदवला. या समुपदेशनामुळे पोलिसांना समाधान आणि जगण्याची उर्मी मिळाली आहे. त्यांच्यातील आत्मविश्वासही वाढला आहे.