Monday, June 30, 2025
spot_img
Home Blog Page 323

मराठी कवी लेखक संघटना जिल्हाध्यक्षपदी श्रीराम पचिंद्रे

0

मराठी कवी लेखक संघटना
जिल्हाध्यक्षपदी श्रीराम पचिंद्रे

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठी कवी आणि लेखकांचे हितसंवर्धन करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या मराठी कवी लेखक संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ कवी, लेखक, संपादक श्रीराम पचिंद्रे यांची निवड करण्यात आलेली आहे. उपाध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री लेखिका सुजाता पेंडसे तर सचिवपदी ज्येष्ठ कवी विलास माळी यांची निवड करण्यात आलेली आहे.
संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष दिनकर दाभाडे यांनी ही निवड जाहीर केली.इतर कार्यकारिणी अशी- सहसचिव- समीक्षक, लेखक प्रा.डॉ. गोपाळ गावडे, कोषाध्यक्ष- अरुणा भोसले, सहकोषाध्यक्ष- अर्पणा माने, संघटक- संजय थोरात, सल्लागार- प्रदीप गबाले, मधुकर मुसळे, प्रा. डॉ. राजेंद्र पोंदे, प्रा. डॉ. आनंद बल्लाळ आणि वसंत लिंगनूरकर. संघटनेची व्यापक ऑनलाईन बैठक शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर या दिवशी घेण्यात येणार आहे.

शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आई अंबाबाईची अलंकार रुपात पूजा

0

शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आई अंबाबाईची अलंकार रुपात पूजा

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : आज अश्विन शुक्ल तृतीया अर्थात शारदीय नवरात्र महोत्सवाचा तिसरा दिवस. आजच्या दिवशी करवीर निवासिनी माता महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची अलंकार पूजा साकारली आहे ती नागांनी केलेल्या स्थितीवर स्तुतीवर प्रसन्न होऊन आशिर्वाद देणाऱ्या स्वरूपामध्ये. महर्षि पराशर यांच्या तपा मध्ये प्रथम इंद्र देवाने विघ्न आणण्याचा प्रयत्न केला परंतु महर्षींनी आपल्या संयमाने त्याच्यावर विजय मिळवला नंतर पराशरांच्या उग्र तपाचा परिणाम ब्रह्मगिरी वर असलेल्या नाग लोकांना भोगायला लागला ,त्या उष्णतेने त्रस्त होऊन नागांनी सर्वतीर्थातील जल शोषून घेतले महर्षींनी गरुड अस्त्राने मंत्रून दर्भ नागां वर सोडले त्यामुळे विव्हल झालेले नाग पराशर यांना शरण आले.
महर्षींनी त्यांना क्षमा केली नागांनी सर्व तीर्थ परत आणले आणि स्वतःचे असे नवीन नागतीर्थ निर्माण केले आज या तीर्थाला पन्हाळ्यावर नागझरी म्हणून ओळखले जाते. नाग आणि पराशर यांची मैत्री झाली खरी पण नागांच्या विषयुक्त फुत्कायामुळे माता सत्यवती भयभीत झाली. तेव्हा तुम्ही मुके व्हा असा शाप परशरांनी नागांना दिला .आपल्या कृतीचा पश्चाताप होऊन आपले स्वभाव दोष जाण्यासाठी नागांनी पराशरांना मार्ग विचारला तेव्हा त्यांनी करवीर परिक्रमा करा असे सांगितले. नाग मंडळी परिक्रमेला निघाली जिथे जिथे ज्या नागाचे दुष्टत्व गेले तेथे त्या नागाचे तीर्थ निर्माण झाले. अखेरीला सर्व नाग जगदंबेच्या मंदिरात पोहोचले तिथे देवीचे दर्शन घेऊन ते धन्य झाले त्यांनी याप्रसंगी देवीची स्तुती केली त्याचा तिला सर्व सिद्धिप्रद स्तोत्र असे नाव आहे या स्तोत्रांमधे महाकाली महालक्ष्मी आणि सिद्ध लक्ष्मी म्हणजे महासरस्वती यांची स्तुती आहे त्यानंतर जगदंबेची अनेक प्रकारे स्तुती करून तिच्या १०८ नावांचे वर्णन आहे या स्तोत्राचा पाठ केल्यानंतर लक्ष्मी प्राप्ति आणि सर्व सिद्धी प्राप्त होतील असे वरदान या स्तोत्र ला आहे सोबत या स्तोत्राची संहिता जोडलेली आहे
श्रीमातृचरणारविंदस्य दासः प्रसन्न सशक्तीकःही पूजा माधव मुनींश्वर व मकरंद मुनींश्वर यांनी बांधली.

करवीर निवासिनी अंबाबाईची दुसऱ्या दिवशी महाविष्णु रूपात पूजा,देवीसाठी उत्सव मूर्तीसाठी  बारा तोळ्यांच्या दोन ठुशी अर्पण

0

करवीर निवासिनी अंबाबाईची दुसऱ्या दिवशी महाविष्णु रूपात पूजा,देवीसाठी उत्सव मूर्तीसाठी  बारा तोळ्यांच्या दोन ठुशी अर्पण

 

कोल्हापूर/ प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवाचा दुसऱ्या दिवशी रविवारी करवीर निवासिनी अंबाबाई ची महाविष्णू रुपात पूजा बांधण्यात आली होती.नवरात्री उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या आरतीनंतर अंबाबाईची ही पूजा बांधण्यात आली होती पराशर ऋषि पुत्रप्राप्तीसाठी विष्णूची घोर तपश्चर्या करीत असताना अंबाबाईनी त्यांना या रूपात दर्शन दिले होते त्यामुळे त्यांचा सर्व संशय दूर होऊन ते नतमस्तक होतात व सर्व संशय हरण करणाऱ्या अष्टकाने आणि तिची स्तुती करतात असे पूजेतून दाखविण्यात आले आहे.
ही पूजा माधव मुनेश्वर मुनीश्वर व मकरंद यांनी बांधली होती कोल्हापुरातील रंगावलीकार महेश पोतदार हे करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडपात रांगोळीने देवीची विविध रूपे साकारून आपली सेवा देत आहेत शनिवारी त्यांनी देवीची ब्रह्मचारिणी आणि रविवारी शैलपुत्री ही रंगावली साकारली होती.
शिवाय रविवारी सकाळी 11 वाजता कोल्हापुरातील रुईकर कॉलनी येथील बांधकाम व्यवसायिक अजयसिंह देसाई यांनी देवीच्या मूळ मूर्ती साठी दहा तोळे आणि उत्सव मूर्ती साठी दोन तोळे अशा बारा तोळ्यांच्या दोन ठुशी अर्पण केल्या या ठुशींची किंमत सहा लाख रुपये आहे.
यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव कोषाध्यक्ष वैशाली क्षिरसागर, अंजली देसाई, अभिषेक देसाई, ऋतुजा देसाई, सदस्य शिवाजीराव जाधव, राजू जाधव विजय पवार,डॉ संदीप पाटील उपस्थित होते.

हस्तकला विभागीय कार्यालयास जिल्हा प्रशासनाकडून हवी ती मदत – जिल्हाधिकारी दौलत देसाई

0

हस्तकला विभागीय कार्यालयास जिल्हा प्रशासनाकडून हवी ती मदत – जिल्हाधिकारी दौलत देसाई

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : हस्तकला विभागीय कार्यालयास हवी ती मदत जिल्हा प्रशासनाकडून केली जाईल, असे मत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यक्त केले.येथील उद्योग भवन येथे हस्तकला विभागाच्या कार्यालयाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पूर्वी शाहूपुरी पहिली गल्ली येथे असणारे कार्यालय उद्योग भवन येथे स्थलांतरित झाले. उदघाटनंतर हस्तकला विभागाचे सहायक निदेशक चंद्रशेखर सिंग यांनी या कार्यालयामार्फत चालवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
श्री. सिंग यांनी यावेळी सांगितले की, शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या या कार्यालयाला हस्त कारागिरांनी भेट देऊन त्यांच्यातील कलेला प्रोत्साहन देण्याबरोबरच अर्थार्जनही करून आत्मनिर्भर बनावे. सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांबरोबरच नागरिकांनी भेट देऊन यावेळी शुभेच्छा दिल्या. श्री. सिंग, रितेशकुमार, मनोहर मीना आणि नवीनकुमार यांनी स्वागत केले.

महाद्वार रोड मुख्य बाजारपेठ येथील व्यावसायिकांची मोफत केली गेली तपासणी

0

महाद्वार रोड मुख्य बाजारपेठ येथील व्यावसायिकांची मोफत केली गेली तपासणी

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : माझे कुटुंब, माझी जबाबदारी याच धर्तीवर माझे व्यावसायिक, माझी जबाबदारी या संकल्पनेतून महाद्वार व्यापारी रहिवासी संघाच्यावतीने महाद्वार रोड मुख्य बाजारपेठ येथील व्यावसायिकांनी एकत्र येत बाजारपेठ येथील प्रत्येक दुकानदाराची आँक्सिजन लेवल मोफत करण्याचे अभियान राबविण्यात आले.साधारण पणे शंभर पेक्षा अधिक व्यावसायिक बंधूंचे चेकअप करण्यात आले.याच बरोबर व्यावसायिकांनी मास्क चा वापर, सँनिटायझर चा वापर, सोशल डिस्टन्स चे पालन या गोष्टींची खबरदारी घ्यावी अशाप्रकारचे प्रबोधन ही करण्यात आले.
सदर चा उपक्रम हा एक सामाजिक जबाबदारी म्हणून राबविण्यात आला. पुन्हा काही दिवसांनी चेक करण्यासाठी चा संकल्प ही करण्यात आला.या उपक्रमाचे महाद्वार परिसरात सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
महाद्वार व्यापारी रहिवासी संघटनचे अध्यक्ष शामराव जोशी ,उपाध्यक्ष महेश उरसाल , कार्याध्यक्ष गुरुदत्त म्हाडगुत , ग्यानभाई नैनवाणी , विनीत नैनवानी , चारुदत्त सूर्यवंशी , अमित माने ,विक्रम निसार , अमित निगवेकर सर , अजित देशपांडे , प्रदीप जरग , गणेश रेळेकर ,शिवनाथ पावसकर ,शशिकांत देढीया , संजय फलटणकर ,श्रीधर चिले , दिपक गुळवणी , अशोक लोहार , कमलेश विरा , विपुल मुळे , यतीन पोसरेकर , वरद देशींगे,संजय हावळ, अमर काकडे , तनसुख खेमसिया ,सुशांत पोतदार आदीं सह व्यापारी रहिवासी उपस्थित होते.

पंचनाम्यातून नुकसानग्रस्त शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार – पालकमंत्री सतेज पाटील

0

पंचनाम्यातून नुकसानग्रस्त शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार
– पालकमंत्री सतेज पाटील

 

कोल्हापूर/(जिल्हा माहिती कार्यालय) : अतिवृष्टी, वादळीवारे व ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या चंदगड तालुक्यातील शेती क्षेत्राचे पंचनामे ग्रामसेवक आणि तलाठी यांनी करावेत. पंचनाम्यात कोणताही शेतकरी सुटणार नाही याची दक्षता घ्यावी. पंचनाम्यातून शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार असतील. याबाबतचे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी काढावेत, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली. शेतकऱ्यांनीही गट विकास अधिकारी, तहसिलदार यांच्याशी पंचनाम्याबाबत संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पालकमंत्री श्री. पाटील यांनी चंदगड तालुक्यातील दुंडगे, कुदनूर, काळकुंद्री, हुदळेवाडी, किणी, कोवाड आणि निट्टूर या गावातील अतिवृष्टी, वादळीवारे व ढगफुटीमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी आमदार राजेश पाटील उपस्थित होते. पालकमंत्री श्री. पाटील यांनी शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी करुन कोवाड येथे बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी जिल्ह्यातील शेत पिकांचे नुकसान, सुरु असणारे पंचनामे याबाबत सविस्तर माहिती दिली.
पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले, जिल्ह्यामध्ये सुरु असणारे पंचनामे 30 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा. पंचनाम्यामधून कोणताही शेतकरी सुटणार नाही याची दक्षता ग्रामसेवक आणि तलाठी यांनी घ्यावी. त्याबाबत त्यांची जबाबदारी राहील, तसे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी काढावेत.
पंचनाम्यासाठी ज्या गावात जाणार आहेत, त्याबाबत ग्रामस्थांना अदल्यादिवशी त्याबाबत गावांमध्ये दवंडी देवून कळवावे. पंचनामा करण्यात येणार असल्याबाबतचा संदेशही एक दिवस आधी पाठवावा. शेतकऱ्यांनी पंचनाम्याबाबत. तहसिलदार, गट विकास अधिकारी यांना संपर्क करुन सहकार्य करावे. राज्य शासन तत्परतेने गांभीर्यपूर्वक भरपाई देण्यासाठी पावले उचलत असून लवकरात लवकर मदत दिली जाईल.
वादळीवारे, अतिवृष्टीमुळे शेतात पडलेला ऊस गाळपाला आधी गेला पाहिजे त्याबाबतची यादी कृषी विभागाने तयार करुन तसे पत्रही पाठवावे, असेही पालकमंत्री म्हणाले. पालकमंत्र्यांनी साधला महिला शेतकऱ्याशी शेतावर संवाद किणी, कोवाड येथील भात पिकाचे नुकसान झालेल्या रुक्मिणी गोविंद गिरी या शेतकरी महिलेच्या शेत पिकाचे नुकसान पाहून पालकमंत्री श्री. पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. श्रीमती रुक्मिणी गिरी म्हणाल्या, दुसऱ्याचे शेत कसायला घेतले होते. अतिवृष्टीमुळे आणि वादळी पावसामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संबंध पीक वाया गेले आहे. त्यावर पालकमंत्री श्री. पाटील यांनी, काळजी करु नका शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाईल, असा दिलासा त्यांनी दिला.दुंडगे, कुदनूर पुलाबाबत लवकरच बैठक दुंडगे, कुदनूर गावांना जोडणाऱ्या पुलाची पाहणीही पालकमंत्र्यांनी आज केली. या पुलाला संरक्षित कठडा नसल्याने हा पूल धोकादायक होत आहे. या पुलावरुन व्यक्ती वाहून जाण्याच्या घडलेल्या घटनेची माहिती आमदार श्री. पाटील आणि ग्रामस्थांनी यावेळी पालकमंत्र्यांना दिली. या पुलाबाबत लवकरच बैठक घेवून, हा‍ पूल ग्रामस्थांसाठी सुरक्षित केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.
यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगन, अरुण सुतार, गडहिंग्लजचे पंचायत समिती सदस्य विद्याधर गुरबे, दुंडगेचे सरपंच राजेंद्र पाटील, तहसिलदार विनोद रणावरे, गट विकास अधिकारी चंद्रकांत बोदरे , उप विभागीय कृषी अधिकारी,नंदकुमार कदम आदींसह या परिसरातील अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

अतिवृष्टी नुकसान पाहणीसाठी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती मराठवाडा दौऱ्यावर ​

0

अतिवृष्टी नुकसान पाहणीसाठी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती मराठवाडा दौऱ्यावर ​

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील बहुतांश भाग प्रभावित झाला आहे. विशेषतः मराठवाडा भागात या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे या नुकसानाकडे राज्यशासनाचे दुर्लक्ष होत असताना, युवराज संभाजीराजे छत्रपती हे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रत्यक्ष मैदानात उतरल्याचे दिसून येते.
घटस्थापनेच्या दिवशी संभाजीराजे हे अतिवृष्टी नुकसान पाहणीसाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी पंढरपूर व सांगोला भागातील नुकसानग्रस्त भागांत प्रत्यक्ष भेटी देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी द्राक्ष व डाळींब बागायतदार तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी राजेंकडे आपल्या व्यथा मांडल्या. आज संभाजीराजे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी, सुरतगाव, सिंदफळ, अपसिंगा, कात्री, कामठा, तुळजापूर, बसवंतवाडी, गंधोरा, सलगरा दिवटी, किलज, होर्टी, मुरटा, दहिटना, काटगाव या सर्वाधिक नुकसानग्रस्त भागांस भेटी देऊन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना राजे म्हणाले, झालेल्या नुकसानीची तीव्रता अधिक आहे. कोरोनामुळे आधीच बिकट परिस्थिती असताना ऐन सणासुदीच्या काळात हाती आलेले पीक अतिवृष्टीने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांपुढे फार बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. पीक तर पूर्णपणे हातचे गेलेच आहे पण कित्येक ठिकाणी शेतातील मातीच वाहून गेली आहे, विहिरी बुजल्या आहेत, शेतात ओढे शिरले आहेत. त्यामुळे आता पुढे तरी शेती करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. त्यामुळे पंचनाम्यांसारख्या वेळखाऊ गोष्टीत सरकारने अधिक वेळ न दवडता ताबडतोब सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी राजेंनी सरकारकडे केली आहे.
संभाजीराजेंच्या या दौऱ्यास स्थानिक शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार शरद पवार यांनी केलेल्या निराशाजनक वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा संभाजीराजेंकडे आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवून आपल्याला योग्य न्याय मिळवून देणारा आश्वासक चेहरा म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन वाढतो आहे. तूर्तास दोन दिवसांपासून हा दौरा सुरू असला तरी आणखी दोन ते तीन दिवस राजेंचा दौरा सुरु राहण्याची शक्यता आहे.

पहिल्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची महाशक्ती कुंडलिनी रूपात पूजा

0

शारदीय नवरात्रो उत्सवाच्या पहिल्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची महाशक्ती कुंडलिनी रूपात पूजा बांधण्यात आली. प्रतिपदेला करवीर निवासिनीची महाशक्ती कुंडलिनी स्थानापन्न झालेली आहे . कुंडलिनी हीच आत्मशक्ती निर्माण पालनकरणारी हि पूजा माधव मुनीश्वर व मकरंद मुनीश्वर यांनी बांधली.

श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईची नऊ दिवस विविध रुपात पूजा व नऊ रंगातील साडी

0

श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईची नऊ दिवस विविध रुपात पूजा व नऊ रंगातील साडी

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : आज १७ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवात श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या नऊ दिवस विविध रुपात पूजा बांधण्यात येणार आहेत.
या येणाऱ्या नऊ दिवसातील पुजा आणि या नऊ दिवसात देवीला नेसवण्यात येणाऱ्या साड्यांचे रंग खालील प्रमाणे असतील
दि.१७/१०/२०२० शनिवार-घटस्थापना कुण्डलिनी स्वरुपात पूजा बांधली जाणार आहे.तर १८/१०/२०२० रविवार- द्वितीया पराशरकृत सर्वसंशयहर श्रीमहालक्ष्म्यष्टक रुपात पूजा बांधण्यात येणार आहे.१९/१०/२०२० सोमवार- तृतीया नागकृत महालक्ष्मी स्तवन,२०/१०/२०२० मंगळवार-चतुर्थी सनत्कुमार महालक्ष्मी सहस्त्रनाम रूपातील पूजा बांधली जाणार आहे.तर २१/१०/२०२० बुधवार-पंचमी गजारुढ अंबारीतील पूजा बांधली  जाणार आहे.
२२/१०/२०२० गुरुवार- षष्ठी श्रीशिवकृत महालक्ष्मी स्तुती रूपातील पूजा व
२३/१०/२०२० शुक्रवार- सप्तमी अगस्त्यकृत सरस्वती स्तवन रुपात पूजा व
२४/१०/२०२० शनिवार-अष्टमी महिषासुरमर्दिनी रुपात पूजा बांधली जाणार आहे.
२५/१०/२०२० रविवार- दसरा अश्वारुढसाडी रंगात पूजा बांधली जाणार आहे.
या नऊ दिवसात देवीला १७/१०/२०२० लाल,
१८/१०/२०२० पितांबरी,
१९/१०/२०२० केशरी,
२०/१०/२०२० निळा / जांभळा,
२१/१०/२०२० लाल,
२२/१०/२०२० पांढरा सोनेरी काट,
२३/१०/२०२० पिवळा / लिंबू,
२४/१०/२०२० लाल आणि
२५/१०/२०२० कोणत्याही रंगाची साडी नेसवली जाणार आहे.अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष मा.महेश जाधव, सदस्य, सचिव, श्री पूजक माधव मुनिश्वर व हक्कदार श्री पूजक मंडळ यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

केआयटी महाविद्यालयाला एनसीसी युनिटची मान्यता,एनसीसी युनिट असणारे जिल्हयातील पहिले इंजिनिअरींग महाविद्यालय

0

केआयटी महाविद्यालयाला एनसीसी युनिटची मान्यता,एनसीसी युनिट असणारे जिल्हयातील पहिले इंजिनिअरींग महाविद्यालय

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर इन्स्टिटयुटऑफटेक्नॉलॉजीच्या अभियांत्रिकी महाविद्यालय (स्वायत्त), कोल्हापूरला 1 महाराष्ट्र आर्टिलरी बॅटरी एनसीसी युनिटची मान्यता नुकतीच मिळाली. त्याबाबतचे पत्र कमांडिंग ऑफिसर लेफटनंट कर्नल एस.बी.सरनाईक यांनी केआयटी महाविद्यालयाचे संचालक डॉ. व्ही.व्ही.कार्जिन्नी यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
केआयटीने विद्याथ्र्यांची मागणी व अभियांत्रिकी विद्याथ्र्यांचा शासकीय सेवा विशेषत: सैनिकी सेवेमध्ये असलेला रस लक्षात घेता केआयटीने मार्च 2020 मध्ये एनसीसी युनिटची मागणी करणारा अर्ज केला होता. त्यानुसार 80 विद्याथ्र्यांची क्षमता असलेले स्वयंअर्थसहाय्यित वरिष्ठ युनिट केआयटीमध्ये सुरु करण्याची परवानगी केआयटीला मिळाली.
एनसीसी युनिटची परवानगी असलेले कोल्हापूर जिल्हा आणि परिसरातील केआयटी हे एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. सध्या महाविद्यालयात एनएसएस, लिड इंडिया, शौर्य यासारख्या विद्यार्थी क्लबच्या माध्यमातून विद्याथ्र्यांना एसएसबी, एनडीए, युपीएससी अशा परीक्षांची माहिती दिली जाते आणि बरेच विद्यार्थी यशस्वी देखील झाले आहेत. परंतू या एनसीसी युनिटच्या परवानगीने विद्याथ्र्यांच्या तयारीमध्ये सुसूत्रता, शिस्त यांची मदत होईल असे मत केआयटीचे संचालक डॉ. विलास कार्जिन्नी यांनी व्यक्त केले. प्रा. अमर काटकर यांची एनसीसी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
येत्या शैक्षणिक वर्षापासून हे एनसीसी युनिट विद्याथ्र्यांसाठी सक्रीय असेल. हेयुनिट केआयटीला मिळावे म्हणून केआयटीचे विश्वस्त कर्नल प्रतापसिंह रावराणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. व प्रा. विजय रोकडे शारीरीक शिक्षण संचालक यांनी प्रयत्न केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. भरत पाटील, उपाध्यक्ष श्री. सुनिल कुलकर्णी व सचिव श्री. दिपक चौगुले व इतर विश्वस्त यांनी संस्थेचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या व विद्याथ्र्यांनी यासंधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले.