Sunday, June 29, 2025
spot_img
Home Blog Page 18

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

0

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

-डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा

कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी तर मुलींच्या गटात डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग संघाने अजिंक्यपद पटकावले. शिवाजी विद्यापीठाच्या खो खो मैदानावर ही स्पर्धा झाली.कुलगुरू डॉ.राकेश कुमार मुदगल यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. क्रीडा स्पर्धेत भाग घेतल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. प्रत्येक स्पर्धेत हार-जीत होतच असते, मात्र पराभवाने खचून न जाता खेळाचा आनंद घ्यावा. आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे आव्हान डॉ. मुदगल यांनी उद्घाटनपर भाषणात केले.
यावेळी कुलसचिव डॉ. व्ही व्ही भोसले, शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.शरद बनसोडे, स्कूल ऑफ अलाईड हेल्थ सायन्स चे प्राचार्य डॉ. आर.एस.पाटील, संचालक विद्यार्थी कल्याण डॉ. अद्वैत राठोड, क्रीडा संचालक शंकर गोनुगडे डॉ. सुरज यादव, सुशांत कायपुरे, डॉ. रोहित लांडगे उपस्थित होते. मुलींच्या गटात कॉलेज ऑफ नर्सिंग व कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या दोन्ही संघात अंतिम सामना झाला. अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात दोन्ही संघाचे 6 – 6 असे गुण झाले त्यामुळे सामना विजयाचा फैसला करण्यासाठी दिलेल्या जादा वेळामध्ये कॉलेज ऑफ नर्सिंग संघाने ७- ५ गुण फरकांनी विजय मिळवत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.कुलपती डॉ. संजय डी.पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त मा.आ. ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

0

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात ‘श्री गणेशा’ म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच एका ‘श्री गणेशा’ची जोरदार चर्चा आहे. ‘श्री गणेशा’ हा एक आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांना मनोरंजनाच्या अनोख्या सफरीवर नेणार आहे. मराठी फॅमिली एन्टरटेनर असलेला ‘श्री गणेशा’ हा मराठीतील एक धमाल रोड मुव्ही आहे. या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली असून, ट्रेलरलाही तूफान प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या चित्रपटात नेमके काय पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘श्री गणेशा’ धमाल रोड ट्रीपचा आणि ‘श्री गणेशा’ फॅमिली एंटरटेनमेंटचा’ असे म्हणत खऱ्या अर्थाने रोड ट्रीपच्या रोलर कोस्टर राईडवर नेणाऱ्या ‘श्री गणेशा’ या फॅमिली एंटरटेनमेंटची प्रस्तुती एमएच-१२ सिने मीडियाने आऊट ऑफ द बॅाक्स फिल्म्सच्या सहयोगाने केली आहे. संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले या चित्रपटाचे निर्माते, तर रवि माणिक भोसले आणि महेश माणिक भोसले या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. आजवर नेहमीच आशयघन चित्रपटांना विनोदाची किनार जोडत परिपूर्ण मनोरंजनाद्वारे जनमानसापर्यंत मोलाचा संदेश पोहोचवणारे दिग्दर्शक मिलिंद कवडे ‘श्री गणेशा’च्या निमित्ताने लाफ्टर आणि मॅडनेसचा डबल धमाका करणार आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट कायम चर्चेत आहे. मिलिंद कवडे आणि प्रथमेश परब ही दिग्दर्शक-अभिनेत्याची सुपरहिट जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आली आहे. त्यामुळे हा चित्रपट म्हणजे मौज, मस्ती आणि धमाल अशी रोलर कोस्टर राईडच ठरणार आहे. प्रथमेशने यापूर्वी साकारलेल्या दगडू आणि टकाटक मधील गण्या नंतर या चित्रपटात त्याच्या रूपातील टिकल्याची कमाल पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात प्रथमेशसोबत मेघा शिंदे ही नवीन नायिका असल्याने नव्या जोडीची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आकर्षित करणार आहे. प्रथमेशच्या सोबतीला शशांक शेंडे हे कोणत्याही भूमिकेला न्याय देण्यास सक्षम असलेले अभिनेते आहेत. त्यांनी यात चक्क दाढी-मिशी चकाचक करून भाऊसाहेब पाटील हे कॅरेक्टर साकारले आहे. भाई वेंगुर्लेकरच्या रूपात संजय नार्वेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांवर मोहिनी घालण्यासाठी सज्ज आहे.
या चित्रपटातील गाणी अगोदरच लोकप्रिय झाली आहेत. ‘आली मधुबाला…’ हे गाणे चांगलेच पॅाप्युलर झाले असून, टायटल ट्रॅकही संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. हा एक रोड मुव्ही असल्याने यातील कमालीची नेत्रसुखद लोकेशन्स प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणार आहेत. या चित्रपटाबाबत मिलिंद कवडे म्हणाले की, ‘श्री गणेशा’च्या रूपात आम्ही आजवर मराठीत कधीही न सादर केलेले कथानक रोड मुव्हीच्या माध्यमातून आणले आहे. यात केवळ विनोद नसून, इमोशन्सही आहेत. यातील नातेसंबंधांची गोष्ट प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे. यासाठी प्रत्येक कलाकाराने आपले शंभर टक्के योगदान दिले आहे. प्रथमेश आणि शेंडे यांच्यातील अफलातून टायमिंग प्रेक्षकांना चित्रपट पाहताना अनुभवायला मिळेल. संजय नार्वेकरने आपल्या नेहमीच्या शैलीत केलेली फटकेबाजी आणि नाट्यमय वळणांची पटकथा शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. ‘श्री गणेशा’च्या माध्यमातून आपल्या टिमने एक परिपूर्ण कौटुंबिक मनोरंजक चित्रपट रसिकांसमोर सादर केला असल्याचेही कवडे म्हणाले. दिग्दर्शनासोबत चित्रपटाची कथासुद्धा मिलिंद कवडे यांनीच लिहिली आहे. याखेरीज त्यांनी संजय नवगिरे यांच्या सोबत मिळून पटकथालेखनही केले आहे. संजय नवगिरे यांनी संवादलेखन केले आहे. गीतकार जय अत्रे आणि मंदार चोळकर यांनी गीतलेखन केले असून, संगीतकार वरुण लिखते यांनी त्यावर स्वरसाज चढवला आहे. पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी दिले आहे. डीओपी हजरत शेख वली यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, गुरु पाटील यांनी संकलन केले आहे. राहुल ठोंबरे यांनी नृत्य दिग्दर्शन, तर सुमित पाटील कला दिग्दर्शन केले आहे. दिपक एस. कुदळे (पाटील) या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता, तर विनोद शिंदे सहदिग्दर्शक आहेत.

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

0

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद – बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताह कार्यक्रम साजरे होत असतात. त्यानिमित्ताने आज कोल्हापूर शहरात बजरंग दलाचे मोठ्या उत्साहात संचलन श्री रामाच्या जयघोषात उत्साहात झाले. यामध्ये विविध हिंदूत्ववादी संघटनांचे पदाधिकारी यांचाही शुभेच्छापर सहभाग होता.आज सकाळी मिरजकर तिकटी येथून शिस्तबद्दपणे या संचलनास प्रारंभ झाला. बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोडमार्गे श्री राम, श्री हनुमंत, भारत मातेच्या घोषणा देत, बजरंग दल म्हणजे सकल हिंदू समाजाला एक सुरक्षा कवच असल्याची ग्वाही देत हे संचलन महाद्वार रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराजानां मानवंदना देऊन दसरा चौक येथे आले, राजर्षी शाहू महाराज यांचे चरणी पुष्पहार अर्पण करून अतिशय शिस्तबद्ध व शांततेत संचलन करून समारोप करण्यात आला, शहरातील बजरंगीसह जिल्ह्यातील राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, करवीर, भुदरगड तालुक्यातूनही बजरंगी कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला होता.या संचलनाच्या प्रारंभी स्वप्नील कोडग तसेच शहरातील, भाजपाचे पदाधिकारी सह, सकल हिंदू संघटना प्रमुखांची उपस्थिती होती. हिंदू एकताचे गजानन तोडकर, दिपक देसाई, तसेच श्री अनिरुद्ध कोल्हापुरे, शिवसेनेचे बाबा भोसले, सनातनचे किरण दुसे, अभिजित पाटील, शिवप्रतिष्ठानचे आशिष लोखंडे, हिंदू महासभेचे मनोहर सोरप, तसेच प्रसन्न शिंदे, निरंजन शिंदे आदींने उपस्थित राहून आपल्या शुभेच्छा दिल्या.विश्व हिंदू परिषद कोल्हापूर जिल्हामंत्री, अनिल दिंडे, जिल्हा अध्यक्ष कुंदन पाटील, विभाग संयोजक सुरेश रोकडे, जिल्हा सहमंत्री विजय पाटील, शहर मंत्री उत्तम सांडुगडे, बजरंग दल प्रखंड संयोजक निलेश शिंदे, अक्षय ओतारी, प्रदीप सूर्यवंशी आदीने या उपक्रमाचे संयोजन केले.

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

0

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे आज १५ डिसेंबर, २०२४ रोजी सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका येथे निधन झाले आहे.उस्ताद झाकीर हुसेन हे एक भारतीय तबलावादक, संगीत दिग्दर्शक आणि तालवाद्यवादक होते. हुसेन हे तबलावादक उस्ताद अल्लारखाँ ह्यांचे सर्वात मोठे पुत्र होते.त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.त्यांना १९८८ साली भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार आणि २००२ साली पद्म भूषण पुरस्कार राष्ट्रपती अब्दुल कलाम ह्यांच्या हस्ते मिळाला. त्यांना १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कारानी सन्मानित केले गेले होते.
हुसेन ह्यांनी माहीम येथील सेंट माईकल्स हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. आणि थोड्या काळासाठी त्यांनी सेंट झेवियर कॉलेज, मुंबई येथेदेखील शिक्षण घेतले.
त्यांच्या वडिलांनी हुसेन ह्यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पखवाज शिकवायला सुरुवात केली. अल्लाह रखा हे पंजाबमधील तबलावादनाच्या परंपरेतील होते.
हुसेन ह्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिली मैफिल सादर केली. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तबलावादन करायला सुरुवात केली.
झाकीर हुसेन यांनी लहान वयापासूनच हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील सुप्रसिद्ध वादकांबरोबर साथसंगत करायला सुरुवात केली. त्यांनी पंडित रवीशंकर, उस्ताद विलायत खान, उस्ताद अली अकबर खान, पंडित हरिप्रसाद चौरासिया, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित व्ही. जे. जोग, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज आणि अशा अनेक गायक आणि वादकांना हुसेन ह्यांनी तबल्याची साथ केली.हुसेन यांना दोन भाऊ आहेत यातील उस्ताद तौफिक कुरेशी हे तालवाद्यवादक आहेत आणि उस्ताद फझल कुरेशी हे तबला वादक आहेत

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात आयईआयचा स्टुडन्ट चाप्टर सुरू

0

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात आयईआयचा स्टुडन्ट चाप्टर सुरू

 

तळसंदे/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथील कृषी अभियांत्रिकी विभागामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स इंडियाच्या (आयईआय) स्टुडन्ट चाप्टरचे उद्घाटन करण्यात आले. स्टुडन्ट ऑफ इंजिनिअर्स कोल्हापूर लोकल चाप्टरच्या माध्यमातून हा विभाग कार्यरत झाला आहे. भविष्यातील करिअर व रोजगार संधी संशोधन व अध्यापनातील मागणी वेगवेगळ्या विषयावरील प्रशिक्षणे, चर्चासत्रे इत्यादी करिता विद्यार्थ्यांना या स्टुडन्ट चाप्टरचा उपयोग होणार आहे.विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला व चिकित्सक वृत्तीला चालना देण्याकरता कृषी अभियांत्रिकी विभागामध्ये स्टुडन्ट चाप्टर सुरू करण्यात आला. ‘कृषी अभियांत्रिकी मध्ये नवनवीन संधी’ विषयी अभियंता अजय देशपांडे यांनी तर ‘विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे समाजाचा विकास’ याविषयी कुलसचिव प्रा. डॉ.जयेंद्र खोत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
‘प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक उत्तम संशोधक दडलेला असतो तो विकसित करणे; ही काळाची गरज आहे’ असे कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन यांनी याप्रसंगी नमूद केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री वसंत पंढरकर (प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कोल्हापूर) यांनी शहर व रस्ते नियोजन तसेच रस्त्याकडील झाडांची लागवड इत्यादी मधील भविष्यातील रोजगार संधी विद्यार्थ्यांसमोर सादर केल्या.
यावेळी अधिष्ठाता डॉ. संग्राम पाटील, डॉ. मुरली भूपती, आयईआय कोल्हापूर लोकलचे सचिव अभियंता योगेश चिमटे आणि कृषी अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक, प्राध्यापकतेर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता डॉ.अमोल घाडगे व डॉ.संकेत सावंत यांनी मेहनत केली. कु. साक्षी मोरे व साहिल नदाफ यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. मंगल पाटील यांनी आभार मानले.

श्री स्वामी समर्थ दत्त भक्त मंडळ, नेहरु नगरतर्फे दत्त जयंती निम्मित पार पडले विविध धार्मिक कार्यक्रम

0

श्री स्वामी समर्थ दत्त भक्त मंडळ, नेहरु नगरतर्फे दत्त जयंती निम्मित पार पडले विविध धार्मिक कार्यक्रम

श्री दत्ताची श्री गुरुचरित्र रुपात बांधण्यात आली होती पूजा

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ दत्त भक्त मंडळ, नेहरु नगरतर्फे दत्त जयंतीनिमित्त ८ ते १४ डिसेंबर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.आज श्री.दत्त जयंती निम्मित श्री. दत्ताची श्री गुरुचरित्र रुपात पूजा बांधण्यात आली होती. श्री दत्त जयंती उत्सव २०२४ अंतर्गत
भजन,स्वरतरंग प्रस्तुत, रंग भक्तीचे, संदिप लोहार यांचा भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्तिरंग प्रस्तुत, भावभक्ती गीते श्री हनुमान सोंगी भजनी मंडळ, वडणगे सोंगी भजन सायं. ४ पालखी सोहळा (गणेश मंदिर ते दत्त मंदिर) सायं. ६ श्री दत्त जन्मकाळ सोहळा आणि रात्री ७ वाजता विधायक युवक संघटना तर्फे महाप्रसाद झाला.या उत्सव साठी पुरुषोत्तम कुलकर्णी,गजानन शिंदे,अतुल हसुरकर, किरण रणदिवे,विजय चव्हाण,जयसिंग राऊत,प्रसाद उगवे विधायक संघटनेचे कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले.

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सौंदत्ती डोंगरावर मोफत आरोग्य शिबीरासह अल्पोपहार वाटपाचे आयोजन

0

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सौंदत्ती डोंगरावर मोफत आरोग्य शिबीरासह अल्पोपहार वाटपाचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : कर्नाटकात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीची यात्रा ही सर्वसामान्य कोल्हापूर वासीयांची यात्रा आहे. भक्तीभावाने तीन दिवस पार पडणाऱ्या या यात्रेनिमित्त जाणाऱ्या भाविकांसाठी २००८ पासून आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सलग तीन दिवस मोफत आरोग्य शिबीर आणि सकाळच्या सत्रात मोफत अल्पोपहार वाटपाचे आयोजन करण्यात येत आहे.यंदाही भाविकांसाठी ही सेवा अखंडित सुरु ठेवण्यात आली आहे. यंदाची यात्रा दि.१२ डिसेंबर पासून सुरु होत असून सलग तीन दिवस भाविकांना या सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती फौंडेशनच्या अध्यक्षा सौ.वैशाली राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून २००९ पासून श्री रेणुका देवीच्या भाविकांचे एस.टी.भाडे दरवाढ आणि खोळंबा आकार या माध्यमातून कोट्यावधी रुपये वाचले आहेत. भाविकांना आर्थिक बोजातून दिलासा देतानाच सौंदत्ती डोंगर येथे अपुऱ्या सुविधांमुळे भाविकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने २००८ पासूनच सौंदत्ती डोंगर येथे तीन दिवस भाविकांना मोफत आरोग्य शिबीर आणि मोफत अल्पोपहार उपलब्ध करून देण्यात येतो. याचा लाभ दरवर्षी हजारो भाविकांना झाला असून, या सुविधांमुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होते. आमदार क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने ही जनसेवा अशीच अखंडीत सुरु करण्यात येत असून, दि.१२, १३ व १४ डिसेंबर रोजी आरोग्य शिबीर व अल्पोपहार उपलब्ध ठेवण्यात आला आहे. तरी भाविकांनी या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहनही फौंडेशनच्या अध्यक्षा सौ.वैशाली राजेश क्षीरसागर यांनी केले.

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर

0

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिर हे कोल्हापूर शहराच्या सर्वात मोठ्या कपिलतीर्थ मंडई येथे वसलेले आहे परंतु या मंदिरा भोवती वर्षानुवर्षे टपऱ्या, फळ विक्रेते, भाजी विक्रेते यांनी अतिक्रमण केले आहे. महापालिका प्रशासनास वारंवार सूचना करूनही याकडे लक्ष दिले जात नाही. तसेच या मंदिराचे महात्म्य श्री महालक्ष्मी मंदिराशी सलग्न असल्यामुळे यामंदिराची स्वच्छता, भोवताली असणारे अतिक्रमण, या मंदिराचे महात्म्य सांगणारे फलक ई. गोष्टींकडे महापालिका प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. भाजपा शिवाजी पेठ मंडलाच्या वतीने आज कोल्हापूर महानगरपालिका उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी बोलताना जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये म्हणाले, कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिराची जी दुरावस्था झाली आहे ती अतिशय दयनीय आहे तसेच भक्त लोकांना प्रदक्षिणा घालण्यासाठी जो बाहेरील मार्ग आहे तो संपूर्णत:अतिक्रमनाच्या विळख्यात आहे. मंदिराच्या शिखरावर झाडे झुडपे वाढलेली आहेत मंदिराच्या भोवती असणारी गटर्स कधीच साफ केली जात नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने वरील बाबींचा गांभीर्याने विचार करून महापालिका प्रशासनाच्या वरील विषयाशी संबंधित विभागांना सूचना देऊन कडक कारवाई करावी असे नमूद केले.
या निवेदनाला उत्तर देताना उपायुक्त श्रीमती साधना पाटील म्हणाल्या, येत्या दोन दिवसात प्रत्यक्ष कपिलतीर्थ मंडई येथे येऊन मंदिर व परिसर अतिक्रमण मुक्त करू असे अस्वस्थ केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस गायत्री राऊत, युवा मोर्चा अध्यक्ष गिरीष साळोखे, संग्राम जरग, विजय आगरवाल, प्राची कुलकर्णी, युवराज शिंदे, भारत भोसले, सचिन पोवार, अनिश पोतदार ई. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

0

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

 

अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी आय आय टी गुवाहाटी येथे आयोजित ‘इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल (IISF) 2024’ च्या आयडियाज फॉर विकसित भारत ” सायन्स अँड टेक्नॉलॉजी हॅकाथॉन” मध्ये राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद मिळवले. इ ८ वीतील विद्यार्थी प्रियांशु गराई, दिगंबर मोहिते, चिराग यरगोप्पा यांनी “द रॉक इनोव्हेटर्स टीम” या नावाने राष्ट्रीय स्तरावर प्रोजेक्ट तयार केला होता. त्यांच्या अभिनव कल्पनेचे शीर्षक होते. “पल्स पायलट: नेक्स्ट-जेन ड्रायव्हर हेल्थ मॉनिटर”, गाडी चालवत असताना झोप लागत असल्यास किंवा मद्यप्राशनाखाली वाहन चालवणाऱ्या चालकांचे जीव वाचवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे प्रोजेक्ट तयार केले होते.
या विद्यार्थ्यांच्या संघाने श्रेणी 1 इयत्ता १२ वीपर्यंतच्या या गटात प्रथम क्रमांक पटकावला व ₹२५,०००/- (पंचवीस हजार रुपये) रोख बक्षीस मिळवले. या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाला भारतातील प्रमुख तज्ज्ञांचे विशेष कौतुक लाभले. इस्रोचे अध्यक्ष श्री. एस. सोमनाथ, डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत, सीएसआयआर-एनआयआयएसटीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. के. व्ही. रमेश, संचालक डॉ. सी. आनंदरामकृष्णन, तसेच एएसटीईसी असमचे संचालक डॉ. जयदीप बरुआ यांनी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाचे विशेष कौतुक केले.या विद्यार्थ्यांना श्री. हर्षित सुकडेवे, डॉ. साबीर हुसेन, सौ. बीना इनामदार, उपप्राचार्या सौ. शोभा नवीन व प्राचार्य डॉ. नवीन एच. एम. यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थापक-अध्यक्ष श्री. संजय घोडावत यांनी विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशाचे जोरदार कौतुक केले. विश्वस्त श्री. विनायक भोसले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तर संचालिका सस्मिता मोहंती यांनी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे राष्ट्रीय स्तरावर यश मिळवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले.

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा – हिंदु जनजागृती समिती

0

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा – हिंदु जनजागृती समिती

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारच्या कार्यकाळात काश्मीरमध्ये हिंदूंवर जो अत्याचार झाला, हिंदूंचा जो वंशविच्छेद झाला; हिंदू महिलांवर जे अत्याचार झाले; लहान बालकांच्या हत्या झाल्या, त्याविषयी कधी इल्तिजा मुफ्ती यांना लाज वाटली का ? गेली अनेक वर्षे काश्मीरातील लाल चौकात दिवसाढवळ्या भारताचा राष्ट्रध्वज जाळला जात होता, त्या वेळी कधी मुफ्ती कुटुंबियांची मान शरमेने खाली गेली का ? ते आज श्रीरामाला लाज वाटली पाहिजे म्हणत आहेत. भगवान श्रीरामाचा अवमान करणार्‍या हिंदुद्रोही इल्तिजा मुफ्ती यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केली आहे.
नुकतेच काश्मीरमधील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती यांनी ‘एक्स’वर एक आक्षेपार्ह पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी ‘हिंदुत्व हा एक आजार आहे, ज्याने कोट्यवधी भारतियांना ग्रासले आहे आणि देवाचे नाव कलंकित केले आहे. प्रभु राम यांना लाज वाटली पाहिजे’, असे लिहले आहे. एक कथित व्हीडीओ जो कोणत्या ठिकाणचा आहे, केव्हाचा आहे, याची काही माहिती न देता त्यावरून थेट हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभु श्रीराम यांच्याविषयी आणि हिंदु धर्माविषयी वक्तव्य करून इल्तिजा यांनी कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.
अशा प्रकारचे वक्तव्य जर एखाद्या हिंदूने केले असते, तर लगेच ‘सर तन से जुदा’च्या घोषणा दिल्या गेल्या असत्या. त्यांच्या लगेच कारवाई झाली असती. मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारच्या कार्यकाळात बी.के. गंजू यांना एका कन्टेनरमध्ये डांबून त्यांची हत्या करण्यात आली. यानंतर त्यांच्या पत्नीला त्यांच्यासमोर त्यांच्या लहान मुलाला ठार मारून त्याचा रक्तमिश्रीत भात खायला लावला, याविषयी कधी मुफ्ती परिवाराला लाज वाटली नाही, असेही समितीने म्हटले आहे.