Thursday, June 26, 2025
spot_img
Homeपुणेसरकार विद्यमान असो की मागचे  कोण दगाफटका करत असेल तर त्यांना त्याची...

सरकार विद्यमान असो की मागचे  कोण दगाफटका करत असेल तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल – खा. संभाजीराजे छत्रपती

सरकार विद्यमान असो की मागचे  कोण दगाफटका करत असेल तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल – खा. संभाजीराजे छत्रपती

 

कोल्हापूर/प्रतिनिधी :
आज मराठा समाजावर अन्याय झाला! आम्ही राज्यघटनेचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो. मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे. अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची होळी केली, हजारो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या राष्ट्राच्या एकेक इंच जमिनीचे रक्षण करण्याकरिता, इथल्या संस्कृतीचे रक्षण करण्याकरिता सर्वात जास्त त्याग करणारा हा समाज आहे. त्या राष्ट्रभक्त समाजाला स्वतंत्र भारतात डावलले जात असल्याची भावना निर्माण होत आहे. राज्यघटनेच्या चौकटीत मराठा समाजालाही समतेची वागणूक मिळावी अशी अपेक्षा खा. संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे.
मी समाजाचा घटक या नात्याने जबाबदारी पूर्वक सांगू इच्छितो की, महाराष्ट्रातील विद्यमान सरकार असो की मागचे सरकार असो. समाजाने टाकलेल्या विश्वासाला गृहीत धरून कुणी दगा फटका करत असेल तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल.
यापुढे समाज जो ठरवेल ती माझी भूमिका असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments