भुये (ता. करवीर) येथे भैरोबा माळावर वृक्ष लागवड मोहीम उत्साहात संपन्
कोल्हापूर/प्रतिनिधी : भुये व भुयेवाडी (ता. करवीर) येथील भैरोबा वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन समिती यांच्या वतीने आज रविवारी वृक्ष लागवड मोहीम उत्साहात पार पडली. या मोहिमेला निसर्गप्रेमी, वृक्षप्रेमी आणि भैरोबा भक्तांचा मोठा प्रतिसाद लाभला.या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक वृक्षप्रेमीने एक देशी झाड घेऊन आले होते व ते झाड स्वतः लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारीही स्वीकारली. यावेळी वड, पिंपळ, लिंब, करंज, माळुंग, कवट, चिंच, जांभूळ, सीताफळ, रामफळ, आंबा, पिपरणी, नारळ, लिंबू, पारिजातक व फुलझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण जनजागृतीचा एक सकारात्मक संदेश दिला गेला.
समितीचे समन्वयक अमर पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केल्यावर शेकडो नागरिकांनी सकाळी आठ वाजता उपस्थित राहून उपक्रमात सहभाग घेतला.
या प्रसंगी भुये गावाचे माजी सरपंच अभिजीत पाटील, ग्रामपंचायत सदस्य कृष्णात (पिंटू) चौगुले,दिपक पाटील, अमर मिसाळ,शेतकरी संघटनेचे विक्रम पाटील, अमित पाटील, अरुण पाटील, प्रमोद माने, संपत पाटील, सर्जेराव पाटील(S.Y), संजय पाटील, विकास पाटील, संतोष मानकापुरे, संभाजी पाटील (भुयेवाडीकर), तानाजी पाटील(आप्पा), देव पाटील, प्रदीप पाटील(कॉन्ट्रेक्ट्रर), आश्लेश खाडे, रामभाऊ पाटील, संपत पाटील, प्रणव पाटील, युवराज तळेकर, यशराज पाटील, रोहित पाटील, प्रथमेश पाटील, निलेश पाटील, सचिन पाटील, पार्थ पाटील, अथर्व पाटील, कान्होजी स्वामी, केदार पाटील, सुभाष साळोखे, दिनकर पाटील, दीपक शिंदे, शामराव पाटील (काका), विष्णुपंत पाटील, केवल पाटील, आणि हलगी सम्राट भार्गव आवळे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी, लावलेल्या प्रत्येक झाडाचे संरक्षण व संगोपन करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त करत उपक्रमाचे महत्व अधोरेखित केले.आमच्या आवाहनाला साथ देऊन आपल्या सर्वांच्या सहकार्याने वृक्षलागवाडीची ही चळवळ यशस्वीरीत्या संपन्न केल्याबद्दल भैरोबा वृक्ष संवर्धन समिती भुये भुयेवाडीच्या वतीने आभार मानण्यात आले.