Thursday, June 26, 2025
spot_img
Home Blog Page 4

गोकुळच्‍या चेअरमनपदी नविद मुश्रीफ यांची निवड

0

गोकुळच्‍या चेअरमनपदी नविद मुश्रीफ यांची निवड

कोल्‍हापूर/प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाच्‍या चेअरमनपदी श्री.नविद हसन मुश्रीफ यांची एकमताने निवड झाली निवडणूक अधिकारी राजकुमार पाटील विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दूग्ध पुणे) यांच्‍या अध्‍यक्षतेखाली निवड करणेत आली. या चेअरमन पदाच्‍या निवडीकरीता सुचक म्‍हणून – श्री.विश्वास नारायण पाटील व अनुमोदक म्‍हणून – श्री.अरुण गणपतराव डोंगळे आहेत.
यावेळी निवडणूक अधिकारी राजकुमार पाटील विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध पुणे), संघाचे माजी चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे बेड वेडिंग मार्गदर्शन शिबिर संपन्न

0

डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे बेड वेडिंग मार्गदर्शन शिबिर संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : ‘जागतिक बेड वेटिंग डे’ निमित्त डी.वाय.पाटील हॉस्पिटल येथे मंगळवारी मुलांमधील अंथरूण ओले करण्याच्या समस्येबाबत मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. शंभरहून अधिक मुलांच्या पालकांनी या शिबिराचा लाभ घेतला.मे महिन्याच्या शेवटच्या मंगळवार हा जागतिक बेड वेटिंग दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. कदमवाडीतील डी.वाय.पाटील हॉस्पिटल येथे बालरोग विभाग व मूत्ररोग विभागाच्यावतीने विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बी. नेर्ली म्हणाले, मुल झोपेत असताना अनवधानाने अंथरूण ओले करण्याची समस्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यत सामान्य समस्या आहे. वैद्यकीय भाषेत याला नॉक्टर्नल एन्युरेसिस असे म्हणतात. झोपेत असताना मुलांचे मूत्राशयावर नियंत्रण नसते. पाच वर्षानंतर सुद्धा अशी समस्या मुलांमध्ये असेल तर या समस्येचं रूपांतर मानसिक समस्येत होते. याच्यावर योग्य उपचार होणं गरजेचं आहे. या समस्येविषयी वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे.
यावेळी उपस्थित मुलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या पालकांना योग्य तो सल्ला देण्यात आला. या समस्ये मध्ये पालकांनी घाबरून न जाता ही समस्या समजून घेऊन, मुलांशी मोकळेपणी बोलावे. तसेच वैदयकीय अधिकाऱ्याचे मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बी. नेर्ली यांनी केले. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रभारी वैद्यकीय अधीक्षिका डॉ. राजश्री माने, बालरोग तज्ज्ञ डॉ. मोहन पाटील, डॉ. सुहास कुलकर्णी, डॉ. देवयानी कुलकर्णी, डॉ. रमेश निगडे, साईप्रसाद कवठेकर, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, तेजशील इंगळे, सौरभ पाटील, यांच्यासह डॉक्टर्स, कर्मचारी पालक व मुले उपस्थित होते.

मलकापूर येथे भर दिवसा घर फोडले.आठ लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल लंपास

0

मलकापूर येथे भर दिवसा घर फोडले.आठ लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल लंपास

कोल्हापूर/प्रतिनिधी : मलकापूर ता . शाहूवाडी येथील पंकज मोहन प्रभावळे यांच्या बंद घराचे कुलूप फोडून भर दिवसा सुमारे आठ लाख पन्नास हजार रुपयांची धाडसी चोरी केल्याची घटना घडली आहे . या घटनेची नोंद शाहुवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे .
शाहूवाडी पोलिसातून मिळालेल्या अधिक माहिती अशी की पंकज मोहन प्रभावळे वय 33 यांचे मलकापूर येथील साखरे गल्लीत घर आहे . शुक्रवार दि . 23 रोजी दुपारी तीन ते चार च्या दरम्यान घराला कुलूप असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने कुलूप चावीने उघडून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केले आहे . त्यामध्ये एक लाख वीस हजार रुपये किमतीचा १५ ग्रॅम चा सोन्याचा नेकलेस . एक लाख वीस हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅमचे सोन्याचे गंठण . एक लाख साठ हजार रुपये किमतीचा २० ग्रॅम चा सोन्याचा लक्ष्मी हार व चार लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम. असे एकूण सुमारे आठ लाख पन्नास हजार रुपये घेऊन चोरटा पसार झाला आहे. या घटनेची नोंद शाहूवाडी पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहुवाडी पोलीस करीत आहेत.

रस्त्याचे रिस्टोरेशन झाल्याशिवाय पुढील काम करु देणार नाही आमदार सतेज पाटील

0

रस्त्याचे रिस्टोरेशन झाल्याशिवाय पुढील काम करु देणार नाही
आमदार सतेज पाटील

गांधीनगर प्रादेशीक नळ पाणी पुरवठा बैठक : कंत्राटदाराला धरले धारेवर

गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना आढावा बैठक

कोल्हापूर/प्रतिनिधी : रस्त्याच्या रिस्टोरेशनचे काम पूर्ण केल्याशिवाय पुढील काम चालू करू देणार नाही असा सक्त इशारा विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला. गांधीनगर प्रादेशीक नळ पाणी पुरवठ्याचे काम अनेक गावात अर्धवट तर अनेक ठिकाणी संधगतीने सुरूय. त्यामुळे आज सर्किट हाऊस येथील राजर्षी शाहू सभागृहात घेतलेल्या गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना आढावा बैठकीत त्यांनी हा इशारा दिला.विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 13 गावांच्यासाठी गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना ही महत्वाकांक्षी नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. त्यासाठी ३४३ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी देखील मंजूर झाला आहे. यामधील पन्नास टक्के रक्कम देखील उचल करण्यात आली आहे. मात्र, या योजनेचे काम अनेक गावात अर्धवट तर अनेक ठिकाणी संथगतीने सुरू आहे. बहुतेक गावात रस्त्याचे रिस्टोरेशन करण्यापुर्वीच पाईप टाकल्या जातात. त्यामुळे ग्रामस्थांना अडचणी येत आहेत. नळ योजनेचे काम सुरू होऊन ३ वर्ष झाली. ३४३ कोटी ६८ लाखाचा निधीतून ४१० किमीची वितरण वाहिनी, ९६ किमीची गुरूत्व वाहिनी तसेच जॅकवेल स्ट्रक्चरसह ३२ टाक्यांचे काम या योजनेतुन करण्यात येणार आहे. कामाची मुदत संपली तरी काम पुर्ण होत नाही. अद्यापही अनेक गावामध्ये कामाचा बोजवारा उडाला आहे. या कामाचा संबंधीत अधिकारी, कंत्राटदार आणि ग्रामपंचायतींचे सरपंच लोकप्रतिनिधी यांच्यासोबत सविस्तर आढावा घेतला. यामध्ये प्रत्येक गावातील किती काम पुर्ण झाले, किती शिल्लक राहिले आहे याची माहिती घेतली गेली. यात मोरेवाडीचे काम ३९ किमी त्यात केवळ २ किमीचे रिस्टोरेशन झाल्याचे सांगण्यात आले. पाचगाव येथील ५ टाक्यांचे काम पुढील मार्च पर्यंत पुर्ण होईल असे सांगण्यात आले. मुडशिंगीचे काम १८ किमी पुर्ण तर २.४ किमी रिस्टोरेशन झाल्याचे सांगण्यात आले. कळंब्याचे १३ किमीपैकी ५ किमी काम पुर्ण तर रस्त्याचे रिस्टोरेशन झालेच नसल्याचे स्पष्ट झाले. गोकुळ शिरगावच्या तीन टाक्यापैकी १ टाकी पुर्ण झाल्याचे सांगण्यात आले. कणेरीवाडीच्या २२ किमी पैकी १३ किमीचे काम पुर्ण झाले याचबरोबरच सरनोबतवाडी, उजळाईवाडी, न्यू-वाडदे वसाहत या ग्रामपंचायतींच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. यावेळी सर्व अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदाराला आमदार पाटील यांनी धारेवर धरले.
दरम्यान, आता रस्त्याच्या रिस्टोरेशनचे काम पूर्ण केल्याशिवाय पुढील काम चालू करू देणार नाही, असा सज्जड इशारा आमदार सतेज पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला. तसेच तुम्ही सर्वांनी कामावर लक्ष द्या, येत्या पंधरा दिवसांनी केलेल्या कामांचा परत आढावा घेवू असे उपस्थित सर्व ग्रामपंचायत संरपंचांना आमदार पाटील यांनी सांगितले.दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग आणि प्राधिकरण यांच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी योजनेमधील अपूर्ण राहिलेल्या वादग्रस्त कामा संदर्भात येत्या सोमवारी बैठक घेण्याचे ठरले.
यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, प्राधिकरणचे डी के पाटील डेप्यूटी इंजिनियर, प्रभाकर गायकवाड, संजय चव्हाण, जगदीश काटकर तर मेघा इंजिनिअरींगचे जनरल मॅनेजर डी सेल्वा मूर्गन, प्रोजेक्ट मॅनेजर मलिक सुतार, मेका शरदचंद्र, नरेश कुमार, नितीन माने, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, प्रकाश पाटील, युवराज गवळी, आनंदा बनकर बाबासो माळी, सचिन पाटील, दिलीप टिपुगडे, सुनिल पोवार, मोरेवाडी सरपंच ए के कांबळे, अमर मोरे,आशिष पाटील, पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील, उचंगाव सरपंच मधुकर चव्हाण, वळिवडे सरपंच रूपाली कुसाळे, गोकुळ शिरगांव सरपंच चंद्रकांत डावरे, साताप्पा कांबळे, किरण आडसूळ, रावसाहेब पाटील, गांधीनगर सरपंच संदीप पाटोळे, प्रताप चंदवाणी, विनोद हजुराणी, न्यु वाडदे वसाहत सरपंच दतात्रय पाटील, कणेरी सरंपच निशांत पाटील अर्जून इंगळे आदी उपस्थित होते.

खलो इंडिया यूथ गेम्समध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या ऐश्वर्याचे सुवर्ण

0

खलो इंडिया यूथ गेम्समध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या ऐश्वर्याचे सुवर्ण

अतिग्रे /प्रतिनिधी : नुकत्याच पाटणा, बिहार येथे पार पडलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स २०२५ मध्ये कोल्हापूरची टेनिसस्टार ऐश्वर्या दयानंद जाधव हिने उत्तुंग कामगिरी करत महाराष्ट्राच्या मानचिन्हात भर घातली आहे. ऐश्वर्याने लॉन टेनिसच्या डबल्स इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक पटकावताना, सिंगल्समध्ये रौप्य पदक जिंकून आपली कौशल्यपूर्ण कामगिरी सिद्ध केली.
सिंगल्स स्पर्धेतील प्रवास खालीलप्रमाणे:पहिल्या फेरीत ऐश्वर्याने हंसिका सिंह (बिहार) हिला ६-२, ६-० असा सरळ सेटमध्ये पराभूत करत विजयी सुरुवात केली. दुसऱ्या फेरीत तिने काशवी सुनील (कर्नाटक) हिचा ६-३, ६-२ असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत तिने लक्ष्मीश्री दांडू (तेलंगणा) हिला एका चुरशीच्या लढतीत ३-६, ६-४, ६-२ असे हरवत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत, रिशिता बासिरेड्डी (तेलंगणा) विरुद्ध सामना अत्यंत अटीतटीचा ठरला. ऐश्वर्याने पहिला सेट १-६ ने गमावला, दुसरा ६-२ असा जिंकून बरोबरी साधली, परंतु तिसऱ्या सेटमध्ये ३-६ ने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ऐश्वर्याने सिंगल्समध्ये रौप्य पदक पटकावले.
डबल्स स्पर्धेतील सुवर्ण झळाळी:
ऐश्वर्या जाधव आणि तिची साथीदार आकृती सोनाकुसरे (महाराष्ट्र) ह्या जोडीने लॉन टेनिस डबल्स इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक पटकावले.
पहिल्या फेरीत, हरियाणाच्या जोडीदार आदिती रावत आणि आदिती त्यागी अनुपस्थित राहिल्यामुळे महाराष्ट्राच्या जोडीने थेट पुढील फेरीत प्रवेश केला.
उपांत्य फेरीत, त्यांनी शगुनकुमारी आणि महिका खन्ना (उत्तर प्रदेश) ह्यांना ६-१, ६-१ असा दणदणीत पराभव दिला.
अंतिम फेरीत, त्यांनी रिशिता बसिरेड्डी आणि लक्ष्मीसरी दांडू (तेलंगणा) ह्यांना ६-०, ६-४ अशा सरळ सेट्समध्ये नमवून सुवर्ण पदक मिळवले. ऐश्वर्याची आंतरराष्ट्रीय लेवलला ज्युनियर वर्ल्ड रँकिंग टूरमध्ये पण चमकदार कामगिरी सुरू आहे.
ऐश्वर्या जाधव ही संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथील इयत्ता १२ वी ची विद्यार्थिनी असून सध्या ती अल्टेव्हल टेनिस अकॅडमी , अहमदाबाद येथे प्रशिक्षण घेत आहे. तिला श्रीमल भट आणि अर्शद देसाई ह्यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
संस्थापक संजय घोडावत, विश्वस्त श्री विनायक भोसले, संचालिका सस्मिता मोहंती, प्राचार्य नितेश नाडे यांनी ऐश्वर्याचे अभिनंदन केले.

गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न सामंजशाने सुटेल; आमदार सतेज पाटील

0

गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न सामंजशाने सुटेल; आमदार सतेज पाटील

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. असे मला वाटत नाही; आमदार सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाविकास आघाडी म्हणून आम्ही गोकुळची निवडणूक लढवली नव्हती, गोकुळ मध्ये मी आणि मंत्री मुश्रीफ एकत्र असलो तरी आजरा कारखान्यात एकमेकांच्या विरोधात आहोत. त्यामुळे सहकारामध्ये पक्षीय राजकारण नसते. फॉर्मुलानुसार अरुण डोंगळे यांनी राजीनामा द्यावा. अशी अपेक्षा होती. सामंजशाने हा प्रश्न सुटेल. असा विश्वास विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. ते पत्रकारांशी बोलत होते.
गोकुळ अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासाठी अरुण डोंगळे तयार नसतानाच, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेचे आमदार सतेज पाटील यांनी यावर भाष्य करत या सर्वातून मार्ग निघेल. अरुण डोंगळे यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणण्याची वेळ येणार नाही. सामंजशाने हा प्रश्न सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार सतेज पाटील पत्रकारांशी बोलत होते.
गोकुळ अध्यक्षपदाच्या घडामोडीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. असे मला वाटत नाही, हे जिल्ह्याच राजकारण आहे. फॉर्मुलानुसार दोन दोन वर्ष ठरले होते 15 मे पर्यंत अरुण डोंगळे यांनी राजीनामा द्यावा. अशी अपेक्षा होती अजून ही आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही गोकुळची निवडणूक लढवली नव्हती, गोकुळ मध्ये मी आणि मंत्री मुश्रीफ एकत्र आहोत. मात्र आजरा कारखान्यात एकमेकांच्या विरोधात आहोत. सहकारामध्ये पक्षीय राजकारण नसते असेही आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.खा. धनंजय महाडिक यांनीही गोकुळच्या अध्यक्षपदावरून आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर, खास. महाडीक यांचे गोकुळ संदर्भात ज्ञान कमी असल्याची टीका त्यांनी केली. भीमा कारखान्याचे क्रशिंग किती झाले आहे हे त्यांनी सांगितले तर कोल्हापुरातील सहकाराला त्यांच मार्गदर्शन होईल. असा टोलाही आम. सतेज पाटील यांनी लगवला. कदाचित अरुण डोंगळे यांची एक वर्ष वाढीव अध्यक्ष राहण्याची इच्छा झाली असेल, मात्र लवकरच यातून मार्ग निघेल असा विश्वासही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संकपाळ यांच्या उपस्थितीत पॉलिटिकल अफेअर कमिटीची बैठक आम्ही घेणार आहोत. प्राथमिक चर्चा सुरू आहेत. जिथे महाविकास आघाडी म्हणून शक्य असेल तेथे आम्ही एकत्र असणार आहोत. पावसाळ्याचे वातावरण असल्याने त्याच नियोजन कसे करणार. असा सवाल त्यांनी उपस्थित करत निवडणूक आयोगाला अशा अनेक प्रश्नांसंदर्भात महाविकास आघाडी म्हणून भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यात येणार नसल्याचे खा धनंजय महाडिक म्हणत आहेत. मात्र धनजंय महाडिक आता खासदार झाले आहेत त्यांनी माहिती घेणे अपेक्षित असल्याचा टोला त्यांनी लगावला. केंद्रीय मंत्र्यांनी गेल्या आठवड्यात तिन राज्यांच्या मंत्र्यांची बैठक बोलावली होती. कृष्णा लवादाने निर्णय दिलेला आहे केंद्राने त्याचा गॅजेट काढायचा आहे ते गॅजेट काढू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कर्नाटक सरकारने निधीची तरतूद केली असून जागा देखील हस्तांतरित केली आहे. मग स्थगिती कशाची आहे. याची खासदारांनी माहिती घ्यावी ते दर आठवड्याला दिल्लीत जातात. असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रत्येक जिल्ह्याला समन्वयक पाठवून दिले आहेत .रत्नागिरी सिंधुदुर्ग संदर्भात अहवाल आला आहे. रत्नागिरीचा कारभार कसा सोपा होईल याचा प्रयत्न करणार आहोत. राणे काँग्रेसमध्ये होते तेव्हा तिथे ताकद वाढली होती. आगामी निवडणुकीत काँग्रेसची ताकद कशी वाढेल याचा आम्ही प्रयत्न करतोय. असेही त्यांनी सांगितले.

गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामावर अधिकारी धारेवर राजकारणातून योजनेला विरोध करणाऱ्याना धडा शिकऊ

0

गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना आढावा बैठक

अन्यथा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकू; आमदार सतेज पाटील यांचा इशारा

गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामावर अधिकारी धारेवर राजकारणातून योजनेला विरोध करणाऱ्याना धडा शिकऊ

कोल्हापूर/प्रतिनिधी : गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच काम, रखडल्याने विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयाला सोमवारी १९ मे रोजी टाळे ठोकण्याचा इशारा त्यानी दिला. याशिवाय ज्या गावांमध्ये या योजनेच काम सूरू आहे ते आजपासून बंद पाडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेची आढावा बैठक विधान परिषदेतील काँग्रेसचे गट नेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयामध्ये संपन्न झाली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता मनीष पवार, मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर मलिक सुतार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च उपकार्यकारी अभियंता डी.के. पाटील, उपकार्यकारी अभियंता प्रभाकर गायकवाड, उपकार्यकारी अभियंता संजय चव्हाण या बैठकीला उपस्थित होते. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून, दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तेरा गावांच्यासाठी ही महत्वाकांक्षी नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. त्यासाठी ३४३ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी देखील मंजूर आहे.. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी या योजनेचे काम करीत आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये या योजनेचे काम सुरू झाले. २७ महिन्याची मुदत असतानाही, अद्यापही या योजनेचे काम पूर्ण झालेलं नाही. यावरून, आमदार सतेज पाटील यांनी, या आढावा बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली. गेली तीन वर्ष या योजनेचे काम सुरू आहे. मात्र अद्यापही या योजनेचे काम पूर्णत्वाकडे गेलेल नाही. आम्ही योजना आणली म्हणून राजकारणातून कोणी विरोध करत असेल तर त्याला धडा शिकवू. यापुढे काम सुरू करू देणार नाही. आम्ही कामं बंद पाडणार. असा इशाराही आमदार सतेज पाटील यांनी दिला. मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कडून, योजनेच्या कामाबाबत दिरंगाई होत आहे. याकडे जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत असल्याने, प्राधिकरणचा कारभार मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी चालवत आहे काय. असे खडे बोल सुनावत सोमवार पर्यंत वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत बैठक लावून कामे सुरळीत करा. अन्यथा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयाला सोमवारी १९ मे रोजी टाळे ठोकण्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी आणि ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत तुमच गुणगाणं ऐकायला आम्ही येथे आलेलो नाही. तुम्ही यामध्ये राजकरण आणणार आहात काय?
लोकांचा उद्रेक झाला आहे.
कामाच्या ठिकाणी अधिकारी गेलेले नाहीत, केवळ कागदोपत्री काम चालू
आहे. आम्हाला तुमच्या समस्या सांगू नका.कामे वेळेत पूर्ण करा. मनुष्यबळ वाढवा. अशा सूचना त्यानी केल्या.जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील यांनी, या योजनेला कोण वाली नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा योजनेचे कामामुळे लोकांच्या प्रश्नांना तोंड आम्हाला द्यावें लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
उजळाईवाडीच्या उपसरपंच भाग्यश्री पारखे यांनी, कंपनीने ठीक ठिकाणी पाईपलाईन साठी रस्ते उकरून ठेवले आहेत. पावसाळा आला आहे. त्यामुळे मोठा चिखल होणार असल्याचे त्यांनी सांगितले. उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, मोरेवाडी चे माजी सरपंच अमर मोरे, युवराज गवळी यांनी, उपकार्यकारी अभियंता प्रभाकर गायकवाड यांची खाते निहाय चौकशी करण्याची मागणी बैठकीत केली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता मनीष पवार यांनी, वेळेत काम पूर्ण न झाल्याने ठेकेदार कंपनीला नोटीस बजावली असल्याचे सांगितले. या बैठकीला पाचगावच्या सरपंच प्रियांका पाटील, मोरेवाडी सरपंच ए. व्ही. कांबळे, कनेरीचे सरपंच निशांत पाटील, सरनोबतवाडी सरपंच शुभांगी किरण आडसूळ, गोकुळ शिरगाव सरपंच चंद्रकांत डावरे, उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, कळंब्याच्या सरपंच सुमन गुरव, गांधीनगर सरपंच संदीप पाटोळे, उचंगावच्या उपसरपंच शीला मोरे, उजळाईवाडी ग्रामपंचायत सदस्य सारिका माने, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

लाइमलाइट लॅब ग्रोन डायमंड्सचे कोल्‍हापूरमध्‍ये ३५ वे स्‍टोअर लाँच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्‍या हस्‍ते उद्घाटन संपन

0

लाइमलाइट लॅब ग्रोन डायमंड्सचे कोल्‍हापूरमध्‍ये ३५ वे स्‍टोअर लाँच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्‍या हस्‍ते उद्घाटन संपन

कोल्हापूर/प्रतिनिधी : झपाट्याने विकसित होत असलेल्‍या लॅब ग्रोन डायमंड ज्‍वेलरी ब्रँडचा देशातील लॅब ग्रोन डायमंड्स ज्‍वेलरीच्‍या वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍यासाठी आगामी महिन्‍यांमध्‍ये १२ हून अधिक स्‍टोअर्स सुरू करण्‍याचा मनसुबा आहेकोल्‍हापूर, १२ मे २०२५ – लाइमलाइट लॅब ग्रोन डायमंड्स या भारतातील सर्वात मोठ्या लॅब- ग्रोन डायमंड ज्‍वेलरी ब्रँडने कोल्‍हापूरमध्‍ये आपले पहिले स्‍टोअर ४९० / २ बी . ई वॉर्ड, स्टेशन रोड, व्हीनस कॉर्नर जवळ, लाँच केले आहे, जे देशभरातील ब्रँडचे ३५ वे एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍टोअर आहे. लोकप्रिय मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्‍या हस्‍ते या स्‍टोअरचे उद्घाटन करण्‍यात आले.
यावेळी लाइमलाइट डायमंड्सचे संचालक करण सिंग चावला, एस ग्रुपचे श्री. रणजीत कुलकर्णी आणि श्रीमती रूतुजा कुलकर्णी यांच्या सह अन्य मान्यवर ही उपस्थित होते.या लाँचसह लाइमलाइटने देशभरात आपले विस्‍तारीकरण सुरू ठेवले आहे, जेथे ब्रँड आता ३५ हून शहरांमध्‍ये उपस्थित असण्‍यासह भारतभरातील मुंबई, दिल्‍ली, हैदराबाद व चेन्‍नई यांसारख्‍या महानगरांमध्‍ये ३५ हून अधिक एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍टोअर्स आणि ४० हून अधिक शॉप-इन-शॉप्‍स आहेत. यासह शाश्‍वत सॉलिटेअर ज्‍वेलरीसाठी पसंतीचे गंतव्‍य म्‍हणून ब्रँडचे स्‍थान अधिक दृढ झाले आहे.
”हा आमच्‍यासाठी अभिमानास्‍पद क्षण आहे, जेथे आम्‍ही सांस्‍कृतिकदृष्‍ट्या संपन्‍न व डिझाइनप्रती जागरूक शहर कोल्‍हापूरमध्‍ये आमचे अत्‍याधुनिक लॅब- ग्रोन डायमंड ज्‍वेलरी सादर केले आहेत,” असे लाइमलाइट डायमंड्सचे संचालक करण सिंग चावला म्‍हणाले.लाइमलाइटच्‍या ऑफरिंगने प्रभावित झालेल्‍या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्‍हणाल्‍या, ”अशा लक्षवेधक व आकर्षक सॉलिटेअर डिझाइन्‍स पाहून आनंद होत आहे, ज्‍या शाश्‍वत आणि मेड इन इंडिया आहे. लाइमलाइटच्‍या दागिन्‍यांमध्‍ये आधुनिक स्‍टाइल व समकालीन मोहकतेचे संयोजन आहे, जे भारतातील आजच्‍या आत्‍मविश्‍वासू महिलांसाठी परिपूर्ण मॅच आहेत.”
११५० चौरस फूटहून अधिक जागेवर पसरलेले हे स्‍टोअर लाइमलाइटच्‍या सिग्‍नेचर कलेक्‍शनला दाखवते, ज्‍यामध्‍ये सॉलिटेअर अंगठ्या, नेकलेस, कानातले आणि ब्रेसलेट्सचा समावेश आहे. प्रत्‍येक पीस प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून डिझाइन करण्‍यात आले आहे आणि कालातीत डिझाइन्‍समध्‍ये स्थित आहेत. ब्रँड अतिरिक्‍त ग्राहक फायदे देतो, जसे लाइफटाइम बायबॅक, कस्‍टमायझेशन, १०० टक्‍के एक्‍स्‍चेंज आणि मूल्‍य-सुरक्षित विमा, ज्‍यामुळे ब्रँड फाइन ज्‍वेलरी विक्रीमध्‍ये विश्‍वास व पारदर्शकतेचा नवीन दर्जा स्‍थापित करत आहे.
आपला आनंद व्‍यक्‍त करत प्रादेशिक सहयोगी एस ग्रुपचे श्री. रणजीत कुलकर्णी आणि श्रीमती रूतुजा कुलकर्णी म्‍हणाले, ”लॅब- ग्रोन हिरे जागरूक लक्‍झरीचे भविष्‍य आहेत. कोल्‍हापूरमध्‍ये अर्थपूर्ण, आधुनि‍क ज्‍वलेरीसाठी वाढत्‍या मागणीसह आम्‍हाला विश्‍वास आहे की लाइमलाइटच्‍या उच्‍च दर्जाच्‍या डिझाइन्‍स आणि विश्‍वसनीय मूल्‍य ऑफरिंग्‍ज ग्राहकांचे लक्ष वेधून घेतील.”
ग्राहक मोठ्या प्रमाणात शाश्‍वत पर्यायांची निवड करत असताना लाइमलाइट नाविन्‍यता, डिझाइन सर्वोत्तमता आणि उपलब्‍धतेला एकत्र करत लॅब- ग्रोन डायमंड श्रेणीमध्‍ये नेतृत्‍व करत आहे.

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ६१ कुटुंबांचे स्वप्न साकार – स्पार्क मिंडा कंपनीमध्ये निवड

0

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ६१ कुटुंबांचे स्वप्न साकार – स्पार्क मिंडा कंपनीमध्ये निवड

कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल अंतर्गत कॅम्पस ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले होते. देशातील नामवंत कंपनी स्पार्क मिंडा, पुणे या कंपनीने ६१ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. या निवड प्रक्रियेत विविध इंजीनियरिंग महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूट चे १४ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. नैसर्गिक कलचाचणी, तांत्रिक फेरी, एचआर मुलाखत या निकषाच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या निवडीसाठी इन्स्टिट्यूट ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. आशिष पाटील, विभाग समन्वयक प्रा. प्रविण चव्हाण, प्रा. प्रथमेश गोंधळी , प्रा. विशाल तेली, संदीप पिंपळे यांचे सहकार्य लाभले.
स्पार्क मिंडा कंपनीने निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक पॅकेजसह स्पॉन्सर्ड डिग्री ऑफर केली आहे. पहिल्या वर्षी २.४० लाख रुपये वार्षिक, दुसऱ्या वर्षी ३.६० लाख रुपये, आणि तिसऱ्या वर्षी ५.७० लाख रुपये एवढे सिटीसी देण्यात येणार आहे.
या यशाबद्दल विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

जलरथांच्या माध्यमातून ‘तलावांचे पुनरुज्जीवन’ कामांना वेग शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व गावांनी पुढे यावे

0

जलरथांच्या माध्यमातून ‘तलावांचे पुनरुज्जीवन’ कामांना वेग
शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व गावांनी पुढे यावे

कोल्हापूर /प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ तसेच ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ या महत्वाकांक्षी योजनेचे राज्यात युद्धपातळीवर काम सुरू झाले आहे. प्रत्येक गावागावात जाऊन या योजनेचा जलरथद्वारे प्रचार-प्रसार तथा जनजागृती केली जात आहे. या जलरथांना राज्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच ही योजना राबविण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण जिल्हा, तालुका पातळीवर मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे. जिल्हाधिकारी, झेडपी सीईओ, जलसंधारण अधिकारी, गट विकास अधिकारी यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली सरपंच, ग्रामसेवक, शेतकरी यांना ऑडिओ, व्हिडिओ, पीपीटी सादरीकरण या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जात आहे. आतापर्यंत या योजनेचा प्रचार-प्रसार करणार्‍या जलरथाचे उद्घाटन राज्यातील २३ जिल्ह्यात संपन्न झाले. यात अहिल्यानगर, अकोला, भंडारा, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, जळगाव, जालना, नंदुरबार, सांगली, सातारा, सोलापूर, वाशिम, यवतमाळ, धुळे, वर्धा, अमरावती, धाराशीव, गडचिरोली, लातूर, गोंदिया, कोल्हापूर, नागपूर आदी जिल्ह्यांचा समावेश आहे.
योजनेची सर्व माहिती तसेच अर्ज करण्यासाठी ‘गाळमुक्त धरण’ म्हणजेच ‘www.shiwaar.com’ या शासनाच्या पोर्टलला भेट द्यावी. डिमांड जनरेशन या टॅबवरुन मागणी अर्ज डाउनलोड करून भरलेला अर्ज ‘बीजेएस अॅप’वर अपलोड करावा. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त गावांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाचे मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक तसेच सचिव गणेश पाटील यांनी केले आहे..सदरील योजनेद्वारे शासन गावागावांतील तलावांमधील गाळ काढून त्यांचे पुनरुज्जीवन करणार आहे. गाळ काढण्याचा संपूर्ण खर्च शासन करणार असून यासाठी पूर्ण राज्यात एकच दर निश्चित करण्यात आला आहे. तसेच तलावातून काढलेला गाळ शेतात टाकण्यासाठी अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी, विधवा, अपंग शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून निश्चित दरानुसार अनुदानही दिले जाणार आहे.
शासनाची ही योजना गावागावात पोहोचवणे, शेतकर्‍यांना गाळ घेऊन जाण्यासाठी प्रोत्साहन देणे, जनजागृती करून जनआंदोलन उभे करणे, मागणी अर्ज निर्माण करणे तसेच ‘गाळमुक्त धरण’ पोर्टलची निर्मिती करण्यासाठी भारतीय जैन संघटना आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.
बीजेएसने सर्व जिल्ह्यात नेमलेले प्रशिक्षित जिल्हा समन्वयक तसेच महाराष्ट्रातील बीजेएसचे हजारो कार्यकर्ते हे बीजेएसच्या माध्यमातून शेतकर्‍यांना, ग्रामपंचायतींना, तालुका-जिल्हा प्रशासनाला सहयोग करीत आहेत. या योजनेच्या जनजागृतीसाठी ‘सुहाना स्पाइसेस’ यांनी बीजेएसला सहकार्य केले आहे.