Sunday, June 29, 2025
spot_img
Home Blog Page 328

विजयादशमीला कोरोनारुपी रावणाचे दहन करूया-ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ कागलमधून ‘माझं कुटुंब- माझी जबाबदारी’   अभियानाचा प्रारंभ

0

विजयादशमीला कोरोनारुपी रावणाचे दहन करूया-ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ कागलमधून ‘माझं कुटुंब- माझी जबाबदारी’   अभियानाचा प्रारंभ

 

कोल्हापूर/कागल/प्रतिनिधी : वाढत चाललेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणि विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘माझं कुटुंब- माझी जबाबदारी’ हे अभियान हाती घेतले आहे. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या अभियानाचा पहिला टप्पा, १२ ऑक्टोबर २४ ऑक्टोबर या अभियानाचा दुसरा टप्पा आहे. २५ ऑक्टोबर रोजी विजयादशमीला कोरोनारुपी रावणाचे दहन करूया, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जनतेने आणि कोरोना योद्ध्यांनी कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सज्ज व्हा, अशी प्रेरणाही मंत्री मुश्रीफ यांनी दिली.
राज्य शासननाच्या ‘माझ कुटुंब-माझी जबाबदारी’ या अभियानाचा प्रारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सोमवारी झाला. कागल, मुरगूड शहरासह तालुक्यातील ८६ गावात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, घरोघरी सर्व्हे करून अजून बाहेर न पडलेले रुग्ण शोधून त्यांना उपचारापर्यंत आणण्याशिवाय पर्याय नाही. शासनाने आणि विशेष करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतुन पुढे आलेला हा कार्यक्रम असून मंगळवारपासून घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात येणार आहे. आज अनेक व्यक्तींना लक्षणे दिसून येताहेत मात्र असे लोक घाबरून उपचार घेण्यास पुढे येत नाहीत. जे आरोग्यदूत म्हणून सर्व्हे करणार आहेत, त्यांनी न घाबरता काम करावे, अशा सर्वांची जबाबदारी नगरपालिका, शासन घेत आहे. अशा आरोग्य दूतासाठी बाधित झाल्यास  उपचाराचा खर्च म्हणून तीन लाख रुपयांचा विमा, दुर्दैवाने मृत्यू झाल्यास कागल नगरपालिकेच्यावतीने ११ लाख रुपयांचा विमा तसेच नगरविकास विभागाने २५ लाखाचे विमाकवच दिले असून अनुकंपाचे धोरणही घेतले आहे. त्यामुळे आपण चिंता करु नये. आपण ताकदीने काम करुन कोरोनाचे दहन करुनच थांबायचे आहे, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.                  यावेळी माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, उपनगराध्यक्ष सौरभ पाटील, पक्षप्रतोद नितीन दिंडे, नगरसेवक प्रवीण काळबर, विवेक लोटे,ॲड. संग्राम गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रेयस जुवेकर, कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंडीत पाटील, स्वच्छता निरीक्षक अभिजीत गोरे आदी उपस्थित होते.

चौकट…..
कमावलेले गमावू नका……
मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, गेल्या दहा दिवसांच्या जनता कर्फ्यूला कागल आणि गडहिंग्लज तालुक्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे. दरम्यान, गेल्या दहा दिवसात जनता कर्फ्यू यशस्वी करून जे कमावले आहे, ते उद्यापासून गर्दी करून गमावू नका. कामाव्यतिरिक्त अजिबात फिरु नका. खरेदी, बाजाराच्या निमित्ताने होणारी गर्दी टाळा. सामूहिक संसर्ग रोखण्यासाठी वेळ पडल्यास पोलिसांनी बळाचा वापर करावा, पण गर्दी होवू देवू नका. अशा सुचनाही त्यांनी दिल्या.                           स्वागत तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी केले. प्रास्ताविक प्रांताधिकारी रामहरी भोसले यांनी केले. आभार गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी मानले.

 

आई माझी काळुबाई’ मालिकेत आर्याच्या भूमिकेसाठी प्राजक्ता गायकवाडने घेतली विशेष मेहनत

0

‘आई माझी काळुबाई’ मालिकेत आर्याच्या भूमिकेसाठी प्राजक्ता गायकवाडने
घेतली विशेष मेहनत

कोल्हापूर/प्रतिनिधी : नवीन मालिका, सिनेमा, नाटक म्हटलं की त्यातील पात्रानुसार कलाकारांना स्वत:मध्ये बदल करावेच लागतात. क्वचित, कधी तरी आपण जसे आहोत तसेच पात्रं असल्यामुळे बदल करण्याची आवश्यकता नसते. पण ब-याच प्रमाणात पात्रानुसार बदल करणे देखील गरजेचे असते, कारण कलाकारांना पात्रात पूर्णपणे शिरल्याशिवाय जमेना आणि म्हणूनच तर प्रेक्षकांना कलाकारांचा अभिनय भूमिकेसह कायमस्वरुपी लक्षात राहतो.

सोनी मराठीवरील ‘आई माझी काळुबाई’ या नव्या मालिकेतील आर्या हे पात्रं साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने देखील तिच्या नव्या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतली आहे. यापूर्वी प्राजक्ताला अनेकांनी ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेत पाहिले आहे आणि तिने साकारलेल्या ‘महाराणी येसूबाई’ च्या भूमिकेला संपूर्ण महाराष्ट्राने प्रचंड प्रेम दिले. ऐतिहासिक भूमिका साकारल्यानंतर पौराणिक कथा पण कॉलेज तरुणीची भूमिका करणे हे थोडं फार चॅलेंजिंग नक्कीच ठरले असेल. आतापर्यंत पाहिलेली प्राजक्ता आणि आता नवी मालिकेत दिसणारी प्राजक्ता या दोघींमध्ये फार फरक आहे. प्राजक्ताचा एक नवा आणि वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. आर्याच्या भूमिकेसाठी प्राजक्ताने वजन कमी केलं असून हेअर स्टाईल सुद्धा बदलली आहे. नवीन पात्रं साकारताना माझ्याकडे आर्या या भूमिकेतूनच पाहिलं जाईल असा विचार करुन प्राजक्ता या पात्रासाठी विशेष मेहनत घेत आहे.
आर्याची उर्फ प्राजक्ताची नवी मालिका ‘आई माझी काळुबाई’ १४ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. त्यामुळे सहकुटुंबासोबत नक्की पाहा फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

खासगी हॉस्पिटलमध्ये बेड वाढविण्यासाठी आणखीन 13 आरोग्य निरिक्षकांची नियुक्ती – आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

0

खासगी हॉस्पिटलमध्ये बेड वाढविण्यासाठी
आणखीन 13 आरोग्य निरिक्षकांची नियुक्ती
– आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

कोल्हापूर /प्रतिनिधी : शहरातील उर्वरित खासगी हॉस्पिटलमध्ये बेड वाढविण्यासाठी आणखीन 13 आरोग्य निरिक्षकांची नियुक्ती केली असून या आरोग्य निरिक्षकांनी आपापल्या वॉर्डामधील खासगी हॉस्पिटलमध्ये अधिकाधिक बेड वाढविण्याची सूचना महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज केली.
शहरातील उर्वरित खासगी हॉस्पिटलमध्ये बेड वाढविण्यासाठी तसेच कोव्हिड केअर सेंटर आणि अलगीकरण कक्षामधील आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक कार्यालयात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस उपायुक्त विनायक औंधकर, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पोवार तसेच शहरातील सर्व आरोग्य निरिक्षक उपस्थित होते.
शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये बेड वाढविण्यासाठी यापूर्वी महानगरपालिकेने विशेष अधिकाऱ्यांची यापूर्वीच नियुक्ती केली असून उर्वरित हॉस्पिटलध्येही बेड वाढविण्यासाठी 13 आरोग्य निरिक्षकांची अतिरिक्त स्वरुपात नियुक्ती केली आहे. शहरातील सर्वच खासगी हॉस्पिटलनी त्यांच्याकडील बेड उपलब्धतेबाबतची दैनंदिन माहिती शासनाने तयार केलेल्या ॲपवर तात्काळ अपलोड करावी, यासाठीही आरोग्य निरिक्षकांनी लक्ष देण्याची सूचनाही आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केली.
याबरोबरच आरोग्य निरिक्षकांनी आपापल्या वॉर्डातील कोव्हिड केअर सेंटर आणि अलगीकरण कक्षामधील आरोग्य सुविधेबाबत अधिक दक्षता घ्यावी, तसेच आरोग्य निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनीही काम करतांना कोरोनाच्या अनुषंगाने आपलीही काळजी घेण्याची सूचनाही आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केली.

जनतेचे मत विचारात न घेता ,जनतेवर जबरदस्तीने जनता कर्फ्यु लादनाऱ्या प्रवृत्तीला समस्त हिंदुत्ववादी संघटनेचा तीव्र विरोध

0

जनतेचे मत विचारात न घेता ,जनतेवर जबरदस्तीने जनता कर्फ्यु लादनाऱ्या प्रवृत्तीला समस्त हिंदुत्ववादी संघटनेचा
तीव्र विरोध

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोविड 19 च्या धर्तीवर प्रशासनाने मार्च पासून कोल्हापूर जिल्हा आणि शहरात घेतलेल्या अनेल निर्णयावर कोल्हापूरच्या जनतेने स्वीकार करत प्रशासनाला पाठिंबा देत प्रशासनाला मदत करायचे धोरण स्वीकारले.मात्र गेले काही दिवसापासून प्रशासन हे कोविड रुग्णांना तसेच इतर नॉन कोविड रुग्णांना योग्य त्या सुविधा जिवंतपनी आणि मेल्यानंतरही देण्यास कमी पडत असताना त्याकडे गांभीर्याने लक्ष घालायचे सोडून आर्थिक अडचणी ,सोय सुविधा मिळत नसलेल्या त्रस्त जनतेला जनता कर्फ्युच्या गोंडस नावाखाली त्रास देऊन पुन्हा निष्पाप जनतेलाच जनतेमुळेच कोरोना प्रसार वाढतोय असे सांगून स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालायाचा प्रयत्न करत असेल तर हिंदुत्ववादी संघटना हे खपवून घेणार नाही.
काल महापालिकेमध्ये जी जनता कर्फ्यु साठी बैठक आयोजित करण्यात आली होती ,त्या मिटिंगला जे निर्णय घेण्यात आले ते निर्णय कोल्हापूरचे जिल्हाधिकारी ,पोलीस अधीक्षक ,आयुक्त यांची
मान्य आहे काय ? अशी विचारणा समस्त हिंदुत्ववादी संघटनेने केली आहे.
काल व्यापारी संघटनाच्या मीटिंग मध्येच व्यापारी संघटना मध्ये दुकाने बंद करण्यावरून मतभेद झाले आहेत. एका गटाने दिनांक 11 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर पर्यंत दुकाने बंद करायचा निर्णय घेतला आहे तर दुसऱ्या गटाने चालू ठेवायचा निर्णय घेतला आहे.तर यापुढे जाऊन महापालिका प्रशासनाने 11 ते 21 सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यु पाळावा असे आव्हान केले आहे.मग यासर्वामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
तसेच काही दुकाने चालू आहेत म्हणून ते बंद करण्यासाठी काही गट एकमेकांची दुकाने बंद करण्यासाठी आक्रमक झाली आणि त्यातून काही अनपेक्षित प्रसंग घडला तर त्याची जबाबदारी प्रशासन घेणार काय ? तसेच महापालिका 10 दिवस कर्फ्यु पाळा म्हणत आहे तर 6 दिवस दुकान बंद ठेवल्यावर सातव्या दिवशी ते दुकान उघडणार मग नक्की जनता कर्फ्युत नक्की काय साध्य होणार ?
महापालिका प्रशासनाने मास्क नाही घातला म्हणून 5 हजार दंड करायचा निर्णय घेतला आहे हा हास्यास्पद आहे. 3 महिन्यापासून अधिक काळ नोकरदारांना पगार नाही ,व्यावसायिकांचे
उत्पन्न नाही ,घरभाडे , लाईटबिल तटलेल आहे त्यातून चुकून इतर आजार अथवा कोरोना झालाच तर हॉस्पिटलला द्यायला पैसे नाहीत.त्यातून अनेक हॉस्पिटलला शासकीय योजना लागू केलेल्या नाहीत.यासर्व अडचणी असताना असा जिझिया कर लावणे महापालिकेला शोभनिय नाही कारण महापालिकेच्या चौकात आणि कार्यक्रमात मास्क न वापरणे आणि सोशल
डीस्टन्स वारंवार मोडला जात आहे मात्र नाममात्र कारवाई सोडली तर ठोस कारवाई दिसत नाही मग सामान्य जनतेवर अन्याय का ?
यासर्व विषयांकडे गांभीर्याने बघायचं सोडून हिंदुत्ववादी संघटना, तालीम मंडळ यांचे प्रमुख ,रिक्षावाले ,फेरीवाले ,भाजीवाले संघटना यांचे प्रतिनिधी मीटिंगला न बोलवता मोजक्याच लोकांच्या मताचा विचार करून संपूर्ण कोल्हापूरच्या जनतेला वेठिला धरणार असाल तर तीव्र विरोध आम्ही नक्कीच करणार. प्रशासनाने सुरुवातीला चांगले कार्य केले आहे त्यामुळे आम्ही अनेक आंदोलने प्रशासनाला डोकेदुखी ठरू नयेत म्हणून शांत आणि संयमी पने रद्द केले आहेत. याचा प्रशासनाने गैर अर्थ काढू नये .त्यामुळे प्रशासनाने मनमानी निर्णय घेण्यापूर्वी सर्वांची भूमिका लक्षात घ्यावी अन्यथा हिंदुत्ववादी संघटना या जनता कर्फ्युच्या विरोधात रस्त्यावर जनआंदोलन उभे करू हे गांभीर्याने विचारात घ्यावे असा इशारा हिंदुत्ववादी संघटनेने दिला आहे.
हे पत्रक प्र. द.गणपुले ,
संभाजी साळुंखे , महेश उरसाल , किशोर घाटगे , अशोक देसाई , संजय
साडविलकर , प्रमोद सावंत , सुनील पाटील , अवधूत भाट्ये , राजेंद्र सूर्यवंशी , प्रकाश सरनाईक , प्रसाद जाधव ,विशाल पाटील ,रणजित आयरेकर , मनोहर सोरप,अनिल कोडोलीकर, विराज पाटील , नितेश कोकितकर आदींच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात येत आहे.

सायबर कोविड केअर सेंटरमध्ये साजरा झाला 80 वर्षीय आजोबांचा हॅपी वाला बर्थडे…

0

सायबर कोविड केअर सेंटरमध्ये साजरा झाला 80 वर्षीय आजोबांचा हॅपी वाला बर्थडे…

 

कोल्हापूर /प्रतिनिधी : वाढदिवस म्हंटले की प्रत्येकाच्या आयुष्यातील एक आनंदाचा दिवस असतो. सर्वजण आपल्या प्रियजनांचा वाढदिवस अविस्मरणीय बनविण्यासाठी प्रयत्न करत असतात. याचीच प्रचिती कोल्हापूरातील सायबर कोव्हीड सेंटर मध्ये आली. येथील डॉक्टर ,नर्सिंग स्टाफ आणि इतर कोरोनाबाधित रुग्णांनी एका 80 वर्षांच्या आजोबांचा वाढदिवस साजरा करून त्यांचा दिवस अविस्मरणीय बनवलाय.
कोल्हापूर येथील व्हिजन चारीटेबल ट्रस्टच्या वतीने सायबर कॉलेज इथं उभारल्या गेलेल्या मोफत कोविड केअर सेंटरमध्ये आजचा दिवस प्रकाश टोपले या आजोबांच्यासाठी खास होता. कारण उजळाईवाडी इथल्या 80 वर्षीय प्रकाश टोपले यांचा आज वाढदिवस होता. दरवर्षी कुटुंबीयांसोबत हे आजोबा वाढदिवस साजरा करत असतात मात्र त्यांना गेल्या 10 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर संताजी घोरपडे व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सायबर कॉलेज येथे उभारलेल्या कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू आहेत. त्यामुळे ते यावर्षी आपल्या कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा करू शकत नव्हते. मात्र हे समजल्यावर क्षणाचाही विलंब न करता संताजी घोरपडे आणि डॉक्टर संगीता निंबाळकर यांनी कोविड सेंटरमध्ये या आजोबांच्या वाढदिवसाचं केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं. आजोबांसाठी सुद्धा हा वाढदिवस अविस्मरणीय होता. यावेळी व्हिडिओ कॉल करून त्यांच्या कुटुंबीयांना देखील वाढदिवसात सहभागी करून घेतले.

सरकार विद्यमान असो की मागचे  कोण दगाफटका करत असेल तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल – खा. संभाजीराजे छत्रपती

0

सरकार विद्यमान असो की मागचे  कोण दगाफटका करत असेल तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल – खा. संभाजीराजे छत्रपती

 

कोल्हापूर/प्रतिनिधी :
आज मराठा समाजावर अन्याय झाला! आम्ही राज्यघटनेचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो. मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे. अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची होळी केली, हजारो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या राष्ट्राच्या एकेक इंच जमिनीचे रक्षण करण्याकरिता, इथल्या संस्कृतीचे रक्षण करण्याकरिता सर्वात जास्त त्याग करणारा हा समाज आहे. त्या राष्ट्रभक्त समाजाला स्वतंत्र भारतात डावलले जात असल्याची भावना निर्माण होत आहे. राज्यघटनेच्या चौकटीत मराठा समाजालाही समतेची वागणूक मिळावी अशी अपेक्षा खा. संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे.
मी समाजाचा घटक या नात्याने जबाबदारी पूर्वक सांगू इच्छितो की, महाराष्ट्रातील विद्यमान सरकार असो की मागचे सरकार असो. समाजाने टाकलेल्या विश्वासाला गृहीत धरून कुणी दगा फटका करत असेल तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल.
यापुढे समाज जो ठरवेल ती माझी भूमिका असेल.

इचलकरंजी येथील आयजीएम रूग्णालयातही 6 हजार लिटर लिक्वीड ऑक्सिजनचा टँक

0

इचलकरंजी येथील आयजीएम रूग्णालयातही 6 हजार लिटर लिक्वीड ऑक्सिजनचा टँक

 

कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय) : येथील सीपीआर रूग्णालयातील 20 हजार लीटर लिक्वीड ऑक्सिजन टँकनंतर काल इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रूग्णालयात 6 हजार लीटरचा लिक्वीड ऑक्सिजन टँक बसवण्यात आला आहे. दिवसाला 200 हून अधिक रूग्णांच्या ऑक्सिजनची सोय झाली असून शनिवारपर्यंत हा टँक कार्यान्वित होणार आहे.
कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची तात्काळ सोय उपलब्ध व्हावी यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी युध्दपातळीवर निर्णय घेवून जिल्हा नियोजन समितीमधून सीपीआरसाठी 20 हजार लिटरच्या तसेच इचलकरंजी येथील आयजीएमसाठी 6 हजार लिटर लिक्विड ऑक्सिजन टँक व तद्अनुषंगे कामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला. हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला व त्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली काम पूर्ण करण्यात आले.
17 फूट उंच, 2 फूट व्यास असलेला हा लिक्विड ऑक्सिजन टँक काल बसविण्यात आला. यासोबतच 200 क्युबिक मीटर प्रती तास क्षमतेचा वेपोरायझरही बसविण्यात आला आहे. 6 हजार लीटर क्षमतेचा हा टँक असून यातील 1 लीटर द्रवापासून 850 लीटर वायूरुप ऑक्सिजन मिळणार आहे. या टँकमधून आयजीएम रूग्णालयात असणाऱ्या ऑक्सिजन बँकमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल. तेथून पाईपलाईनद्वारे रुग्णांच्या खाटापर्यंत ऑक्सिजनची सुविधा देण्यात येत आहे. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नातून हा टँक बसविण्यात आला.
या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने हे नियंत्रण अधिकारी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा टँक बसविण्यासाठी कोल्हापूर ऑक्सिजन लिमीटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र गाढवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, उपअभियंता बी.एल.हजारे, शाखा अभियंता सतीश शिंदे, बायोमेडिकल अभियंता वैजनाथ कापरे, विनोद खोंद्रे यांचे पथक कार्यरत आहे.

वयात येणार्‍या मुला-मुलींचे पालक नव्हे; मित्र बना; नकार किंवा अपयश पचवण्याची सवय लावा – भारतीय बालरोग संघटनेच्या वेब सेमिनारमध्ये तज्ञांचा सल्ला

0

 

वयात येणार्‍या मुला-मुलींचे पालक नव्हे; मित्र बना; नकार किंवा अपयश पचवण्याची सवय लावा – भारतीय बालरोग संघटनेच्या वेब सेमिनारमध्ये तज्ञांचा सल्ला

 

कोल्हापूर /प्रतिनिधी : वयात येणार्‍या मुला-मुलींचे पालकत्व निभावत असताना त्यांचे मित्रही बना. मुलांना तुमच्यासमोर मन मोकळे करण्याची संधी देऊन त्यांच्याशी संवाद साधा असे आवाहन बालरोग तज्ञांच्या वेब सेमिनारमध्ये करण्यात आले.
वयात येणार्‍या मुला-मुलींच्याबद्दल भागिरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्यावतीने ‘कळी उमलताना’ हा कार्यक्रम घेतला जातो. पण वयात येणार्‍या मुलांच्या शारीरीक, मानसिक बदलावर आजवर कधीच खुली चर्चा झालेली नाही. हे लक्षात आल्याने भारतीय बालरोग संघटना, रोटरी ड्रीस्ट्रीक्ट 3170 आणि इनरवील क्लबच्यावतीने पौगंडावस्थेतील मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी ‘देऊ ताकद मुलांना, अपयशासी दोन हात करण्याची:!’ या विषयावरील वेब सेमिनार आयोजित करण्यात आला होता. भारतीय बालरोग संघटना आणि असोसिएशन ऑफ ऍडोल्टसन अ‍ॅण्ड चाईल्ड केअर इन इंडियाच्या संचालीका डॉ. स्वाती भावे यांनी झूम आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यामातून मार्गदर्शन केले. आजच्या युवा पिढीमध्ये नकार किंवा अपयश पचवण्याची ताकद नाही. वयात येणर्‍या मुला-मुलींच्याबरोबर पालकांचा संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे मुले मोबाईलमध्ये गुंतली आहेत.
काहीवेळा वयातील मुला-मुलींच्यामध्ये नैराश्य आणि आत्महत्येचे प्रमाणही वाढले आहे. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी पालक आणि मुलांचे संवाद सेतू बनावे तसेच त्यांना आजच्या स्पर्धेच्या युगात नकार आणि अपयश पचवण्याएवढा आत्मविश्वास निर्माण करावा असे आवाहन डॉ. स्वाती भावे यांनी केले.
प्रख्यात बालरोग तज्ञ डॉ. प्रकाश संघवी यांनी पौगंडावस्थेतील मुलांच्यामध्ये नैराश्य किंवा आत्महत्येचे विचार येत असतील तर पालकांनी त्याला विश्वासात घेऊन बोलते करावे आणि मानसोपचार तज्ञांचा वेळीच सल्ला घ्यावा अशा परिस्थतीमध्ये मुलांचे चांगले पालक बनण्याबरोबरच त्यांचे मित्रही बना असा सल्ला दिला. डॉ. दिपा कित्तूर यांनी पालकांनी मुलांच्यावर आपल्या अपेक्षांचे ओझे लादू नये त्यांच्या बौधिक व शारीरीक क्षमता ओळखून त्यांचे करियर घडवू द्यावे असे नमूद केले. डॉ. प्रसन्न पवार यांनी घरातील मोठ्या व्यक्तिनीं मुलांच्यासमवेत एकवेळ जेवण घ्यावे आणि यातून दिवसभराच्या घटनांचा त्यांच्याकडून आढावा घ्यावा. जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने जीवन कौशल्यावरील कार्यशाळा आयोजित केली जाते. त्याचाही मुलांना लाभ मिळवून द्यावा असा सल्ला दिला.
या वेब सेमिनारमध्ये रोटरी डिस्ट्रीक्ट 3170 चे संग्राम पाटील, उत्कर्षा पाटील, शिल्पा देशपांडे, रितू वायचळ, रुपाली बाड, अनिकेत अष्टेकर, शिशीर मिरगुंडे यांच्यासह नामवंत बालरोग तज्ञ आणि मानसोपचार तज्ञ सहभागी झाले होते.

वयात येणार्‍या मुला-मुलींचे पालक नव्हे; मित्र बना; नकार किंवा अपयश पचवण्याची सवय लावा – भारतीय बालरोग संघटनेच्या वेब सेमिनारमध्ये तज्ञांचा सल्ला

0

वयात येणार्‍या मुला-मुलींचे पालक नव्हे; मित्र बना; नकार किंवा अपयश पचवण्याची सवय लावा – भारतीय बालरोग संघटनेच्या वेब सेमिनारमध्ये तज्ञांचा सल्ला

 

कोल्हापूर /प्रतिनिधी : वयात येणार्‍या मुला-मुलींचे पालकत्व निभावत असताना त्यांचे मित्रही बना. मुलांना तुमच्यासमोर मन मोकळे करण्याची संधी देऊन त्यांच्याशी संवाद साधा असे आवाहन बालरोग तज्ञांच्या वेब सेमिनारमध्ये करण्यात आले.
वयात येणार्‍या मुला-मुलींच्याबद्दल भागिरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्यावतीने ‘कळी उमलताना’ हा कार्यक्रम घेतला जातो. पण वयात येणार्‍या मुलांच्या शारीरीक, मानसिक बदलावर आजवर कधीच खुली चर्चा झालेली नाही. हे लक्षात आल्याने भारतीय बालरोग संघटना, रोटरी ड्रीस्ट्रीक्ट 3170 आणि इनरवील क्लबच्यावतीने पौगंडावस्थेतील मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी ‘देऊ ताकद मुलांना, अपयशासी दोन हात करण्याची:!’ या विषयावरील वेब सेमिनार आयोजित करण्यात आला होता. भारतीय बालरोग संघटना आणि असोसिएशन ऑफ ऍडोल्टसन अ‍ॅण्ड चाईल्ड केअर इन इंडियाच्या संचालीका डॉ. स्वाती भावे यांनी झूम आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यामातून मार्गदर्शन केले. आजच्या युवा पिढीमध्ये नकार किंवा अपयश पचवण्याची ताकद नाही. वयात येणर्‍या मुला-मुलींच्याबरोबर पालकांचा संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे मुले मोबाईलमध्ये गुंतली आहेत.
काहीवेळा वयातील मुला-मुलींच्यामध्ये नैराश्य आणि आत्महत्येचे प्रमाणही वाढले आहे. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी पालक आणि मुलांचे संवाद सेतू बनावे तसेच त्यांना आजच्या स्पर्धेच्या युगात नकार आणि अपयश पचवण्याएवढा आत्मविश्वास निर्माण करावा असे आवाहन डॉ. स्वाती भावे यांनी केले.
प्रख्यात बालरोग तज्ञ डॉ. प्रकाश संघवी यांनी पौगंडावस्थेतील मुलांच्यामध्ये नैराश्य किंवा आत्महत्येचे विचार येत असतील तर पालकांनी त्याला विश्वासात घेऊन बोलते करावे आणि मानसोपचार तज्ञांचा वेळीच सल्ला घ्यावा अशा परिस्थतीमध्ये मुलांचे चांगले पालक बनण्याबरोबरच त्यांचे मित्रही बना असा सल्ला दिला. डॉ. दिपा कित्तूर यांनी पालकांनी मुलांच्यावर आपल्या अपेक्षांचे ओझे लादू नये त्यांच्या बौधिक व शारीरीक क्षमता ओळखून त्यांचे करियर घडवू द्यावे असे नमूद केले. डॉ. प्रसन्न पवार यांनी घरातील मोठ्या व्यक्तिनीं मुलांच्यासमवेत एकवेळ जेवण घ्यावे आणि यातून दिवसभराच्या घटनांचा त्यांच्याकडून आढावा घ्यावा. जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने जीवन कौशल्यावरील कार्यशाळा आयोजित केली जाते. त्याचाही मुलांना लाभ मिळवून द्यावा असा सल्ला दिला.
या वेब सेमिनारमध्ये रोटरी डिस्ट्रीक्ट 3170 चे संग्राम पाटील, उत्कर्षा पाटील, शिल्पा देशपांडे, रितू वायचळ, रुपाली बाड, अनिकेत अष्टेकर, शिशीर मिरगुंडे यांच्यासह नामवंत बालरोग तज्ञ आणि मानसोपचार तज्ञ सहभागी झाले होते.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास बॅंकेकडून शंभर कोटी कर्ज मंजूर – संजय पवार यांची माहिती

0

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास बॅंकेकडून शंभर कोटी कर्ज मंजूर – संजय पवार यांची माहिती

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास बॅंकेकडून शंभर कोटी कर्ज मंजूर झाले असल्याचे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष यांनी सांगितले आहे.
मराठा समाजातील बेरोजगारांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी व व्यवसाय असल्यास तो वाढवण्यासाठी या महामंडळाच्या वतीने तीन प्रकारच्या बिनव्याजी कर्ज योजना राबवण्यात येत आहेत. असेही पवार यांनी सांगितले आहे.
यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना , गट कर्ज व्याज परतावा योजना,गट प्रकल्प योजना यांचा समावेश आहे.
आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1308 लाभार्थ्यांनी याचा वैयक्तिक लाभ घेतला असून गट कर्जामध्ये 9 लोकांनी लाभ घेतला आहे. ह्या योजनेसाठी बॅंकेकडून 101,25,40,730/- रुपये कर्ज वाटप झाले असून व्याज परताव्याची एकुण रक्कम रुपये 5,47,54,792/- इतकी आहे.
अनेक बॅंकानी ह्या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आहे. भविष्यामध्ये मराठा समाजातील तरुण-तरुणींनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या व्यवसाय सुरु करण्यासाठी ह्या महामंडळाच्या लाभ घ्यावा व नोकरी मागणारे न बनता नोकरी देणारे धाडसाने बना.
ह्या योजनेअंतर्गत लाभार्थ्याचे व्याज महामंडळाच्यावतीने दिले जाते. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1317 लाभार्थी असून महाराष्ट्रामध्ये 17,867 इतके लाभार्थी आहेत. या योजनेसाठी बॅंकेकडून 1094,46,42,398/- रुपये कर्ज वाटप झाले आहे.
मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार, मा.बाळासाहेब थोरात, मा. अध्यक्ष नरेंद्र पाटील, मा. जिल्हाधिकारी, मा. व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील, अग्रणी जिल्हा बॅंक प्रबंधक राहुल माने, सर्व अधिकरी, कर्मचारी व विषेशतः जिल्हा समन्वयक यांचे इथपर्यंत यशस्वी सहकार्य लाभले.
भविष्यात सुध्दा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिद्दीने काम करणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत-जास्त मराठा लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संजय पवार यांनी केले आहे.