Monday, June 30, 2025
spot_img
Home Blog Page 324

केआयटीच्या प्रा. पल्लवी पाटील यांना पीएचडी

0

केआयटीच्या प्रा. पल्लवी पाटील यांना पीएचडी

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (स्वायत्त), कोल्हापूर मधील बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक पल्लवी पाटील यांनी विश्वेश्वरय्या तंत्रनिकेतन विद्यापीठ, बेळगांव येथून बायोटेक्नॉलॉजी अभियांत्रिकीमधील पीएचडी संपादित केली.
पीएचडीच्या अभ्यासासाठी ‘स्टडीज ऑन डेव्हलपमेंट ऑफ वाइन फ्रॉम शुगरकेन अँड फ्रुट ज्यूस युजिंग यीस्ट स्पेसीज’  हा विषय होता. त्यांना त्यांचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. उमेश देशन्नवर केलई, बेळगांव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विभाग प्रमुख प्रा. ऋतुपर्ण करकरे व सहकारी यांचेही सहकार्य लाभले.
डॉ. पल्लवी पाटील यांना केआयटीचे अध्यक्ष भरत पाटील, उपाध्यक्ष सुनिल कुलकर्णी, सचिव दिपक चौगुले व महाविद्यालयाचे संचालक डॉ. व्ही.व्ही.कार्जिन्नी, रजिस्ट्रार डॉ.एम.एम.मुजुमदार यांचे प्रोत्साहन लाभले आहे.

केआयटी व एनएचएआय यांच्यात सामंजस्य करार प्रकल्प आधारित अध्ययन पध्दत व गुणवत्तापूर्ण शिक्षणावर होणार काम

0

केआयटी व एनएचएआय यांच्यात सामंजस्य करार प्रकल्प आधारित अध्ययन पध्दत व गुणवत्तापूर्ण शिक्षणावर होणार काम

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अभियांत्रिकी महाविद्यालय (स्वायत्त), कोल्हापूर व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, कोल्हापूर (ग़्क्तॠक्ष्) (भारत सरकार) यांच्यामध्ये प्रकल्प आधारित अध्ययन व गुणवत्तापूर्ण शिक्षण या क्षेत्रातील कामासाठी सामंजस्य करार झाला. या कराराबाबतची माहिती केआयटीचे संचालक डॉ. व्ही.व्ही.कार्जिन्नी यांनी दिली.
या करारांतर्गत आर्थिक, शैक्षणिक, प्रशासकीय सुधारणांसाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, कोल्हापूर केआयटीला मार्गदर्शन व सहकार्य करणार आहे. भविष्यातील सदृढ अभियंता घडविण्यासाठी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध उपक्रमांची शृंखला नियोजित आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, कोल्हापूरच्या तज्ञांबरोबर केआयटीच्या विद्यार्थी व प्राध्यापकांना संयुक्त संशोधन प्रकल्प राबविता येतील.
या करारामध्ये भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, कोल्हापूर महाविद्यालयाच्या विद्याथ्र्यांसाठी ट्रान्स्पोर्टेशन इंजिनिअरींग या विषयामध्ये असणारे आधुनिक प्रात्यक्षिके, फिल्ड ट्रेनिंग, इंटर्नशिप प्रोग्रॅम, साईट व्हिजीट, अभ्यासक्रमामध्ये असणारा गॅप अॅनॉलिसीस इ. साठी बहुमुल्य मार्गदर्शन लाभणार आहे.
या अनुभवाचा फायदा केआयटीचे विद्यार्थी व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, कोल्हापूर यांना व्हावा या उद्देशाने हा करार झाला आहे. या करारासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, कोल्हापूर च्या वतीने वसंत पंदरकर (डीजीएम –प्रोजेक्ट डायरेक्टर), चंद्रकांत भरडे, प्रवीण गवळी उपस्थित होते. यावेळी केआयटीच्या वतीने मा. विश्वस्त श्री. दिलीप जोशी, संचालक डॉ. व्ही.व्ही.कार्जिन्नी, सिव्हील विभागप्रमुख प्रा. एम. ए. चव्हाण, पर्यावरण विभाग प्रमुख डॉ. अक्षय थोरवत, प्रा. हेमंत सडोलीकर, प्रा. रवी निकम, प्रा. शीतल वरुर, प्रा. गुरुराज कत्ती उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. रश्मी शंकर गौडा यांनी केले. या करारासाठी केआयटीचे चेअरमन भरत पाटील, व्हा. चेअरमन सुनिल कुलकर्णी, सचिव दिपक चौगुले व इतर संचालक यांनी केआयटीचे अभिनंदन केले.

आजरेकर फौंडेशनचे अध्यक्ष अश्पाक आजरेकर यांनी वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देवून सामाजिक स्तुत्य उपक्रम राबविला

0

आजरेकर फौंडेशनचे अध्यक्ष अश्पाक आजरेकर यांनी वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देवून सामाजिक स्तुत्य उपक्रम राबविला

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील आजरेकर फौंडेशनचे श्री. अश्पाक आजरेकर यांचा वाढदिवस आज शासन नियमावलीनुसार सोशल डिस्टंसिंगचे पालन करून तसेच अनावश्यक खर्चाला फाटा देत शेलाजी वन्नाजी विद्यालयाच्या प्रांगणात अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला.
जिल्हयाचे पालकमंत्री मा. सतेज उर्फ बंटी पाटील व मा. आमदार ऋतुराज पाटील यांच्या निर्देशानुसार “माझे कुटुंब – माझी जबाबदारी” या उपक्रमाच्या धर्तीवर अश्पाक आजरेकर यांनी वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत “माझा प्रभाग – माझे कुटुंब” हा उपक्रम राबवून कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. 26 कॉमर्स कॉलेज या प्रभागातील नागरीकांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक कुटुंबाला वाफेचे मशिन वाटप करून साजरा केला.
या कार्यक्रमावेळी कोल्हापूर महापालिकेच्या महापौर सौ. निलोफर आजरेकर, उपमहापौर मा. संजय मोहिते, स्थायी समिती सभापती मा. सचिन पाटील, सभागृह नेते मा. दिलीप पोवार, राष्ट्रीय काँग्रेस गटनेते मा. शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक हरीदास सोनवणे, बांधकाम व्यवसायिक जयेश कदम, सौ.मंगला हजारे, यांनी शुभेच्छा देवून आपले मनोगत व्यक्त केले.
या उपक्रमावेळी नगरसेवक अर्जुन माने, प्रतापसिंह जाधव, उदयोगपती तेज घाटगे, पूजा भोर, मुस्लिम बोर्डींगचे चेअरमन गणी आजरेकर, आश्कीन आजरेकर, बिल्कीस सय्यद, अलका सोमोशी, विनोद पंडत, बाळासाहेब पंडत, अभिजित सुर्यवंशी, निशिकांत वाकडे, महादेव पोवार, निषाद शेख, कांबळे मॅडम, सुधीर खराडे, फारूख ईगळीकर, राजू जमादार, बाळासाहेब पवार यांचेसह भागातील नागरीक उपस्थित होते.

 

आजरेकर फौंडेशनचे अध्यक्ष अश्पाक आजरेकर यांनी वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देवून सामाजिक स्तुत्य उपक्रम राबविला

0

आजरेकर फौंडेशनचे अध्यक्ष अश्पाक आजरेकर यांनी वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देवून सामाजिक स्तुत्य उपक्रम राबविला

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील आजरेकर फौंडेशनचे श्री. अश्पाक आजरेकर यांचा वाढदिवस आज शासन नियमावलीनुसार सोशल डिस्टंसिंगचे पालन करून तसेच अनावश्यक खर्चाला फाटा देत शेलाजी वन्नाजी विद्यालयाच्या प्रांगणात अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला.
जिल्हयाचे पालकमंत्री मा. सतेज उर्फ बंटी पाटील व मा. आमदार ऋतुराज पाटील यांच्या निर्देशानुसार “माझे कुटुंब – माझी जबाबदारी” या उपक्रमाच्या धर्तीवर अश्पाक आजरेकर यांनी वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत “माझा प्रभाग – माझे कुटुंब” हा उपक्रम राबवून कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. 26 कॉमर्स कॉलेज या प्रभागातील नागरीकांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक कुटुंबाला वाफेचे मशिन वाटप करून साजरा केला.
या कार्यक्रमावेळी कोल्हापूर महापालिकेच्या महापौर सौ. निलोफर आजरेकर, उपमहापौर मा. संजय मोहिते, स्थायी समिती सभापती मा. सचिन पाटील, सभागृह नेते मा. दिलीप पोवार, राष्ट्रीय काँग्रेस गटनेते मा. शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक हरीदास सोनवणे, बांधकाम व्यवसायिक जयेश कदम, सौ.मंगला हजारे, यांनी शुभेच्छा देवून आपले मनोगत व्यक्त केले.
या उपक्रमावेळी नगरसेवक अर्जुन माने, प्रतापसिंह जाधव, उदयोगपती तेज घाटगे, पूजा भोर, मुस्लिम बोर्डींगचे चेअरमन गणी आजरेकर, आश्कीन आजरेकर, बिल्कीस सय्यद, अलका सोमोशी, विनोद पंडत, बाळासाहेब पंडत, अभिजित सुर्यवंशी, निशिकांत वाकडे, महादेव पोवार, निषाद शेख, कांबळे मॅडम, सुधीर खराडे, फारूख ईगळीकर, राजू जमादार, बाळासाहेब पवार यांचेसह भागातील नागरीक उपस्थित होते.

केआयटी  कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागामधील विद्यार्थ्यांचे    “Hackathon Solve for Future”  या स्पर्धेत घवघवीत यश

0

केआयटी  कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागामधील विद्यार्थ्यांचे    “Hackathon Solve for Future”  या स्पर्धेत घवघवीत यश

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : देशपांडे स्टार्टअप्स, हुबळी यांच्या तर्फे २६ व २७ सप्टेंबर २०२० रोजी एक  व्हर्च्युल ह्यक्याथोन चा आयोजन केला होता.  ह्या व्हर्च्युल हॅक्याथॉन मध्ये विविध राज्यातून विद्यार्थी सहभागी झाले होते. ह्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना एक दैनंदिन जीवनातील समस्यांच्या आधारावर एक प्रश्न दिला गेला होता.आणि त्या समस्येचे समाधान करण्यासाठी विद्यार्थ्यांना एक अँप अथवा वेबसाइट बनवून ती २४ तासात सादर करावयाची होती आणि या देशपांडे स्टार्टअप्स तर्फे आयोजित या  “Hackathon Solve for  Future” स्पर्धेत केआयटी महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागामधील  अंतिम वर्षातील आदित्य  प्रभावळे, वागेश्वर यादव, अनमोल वाघमारे आणि पूजा कंगणे या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. त्यांनी २४ तासात त्यांना मिळालेल्या समस्येचे समाधान करण्यासाठी अँड्रॉईड अँप बनवून सादर केले.
यासाठी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागाच्या प्रमुख सौ. ममता कलश व श्री.डी.डी. महाजन यांचे सहकार्यविद्यार्थ्यांना लाभले. सदरच्या स्पर्धेस संचालक डॉ.व्ही.व्ही.कार्जिन्नी, चेअरमन भरत पाटील, व्हा. चेअरमन सुनिल कुलकर्णी, सेक्रेटरी दिपक चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात जोरदार तयारी सुरू,अंबाबाईच्या पारंपरिक दागिन्यांची केली गेली स्वच्छता

0
  • पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात जोरदार तयारी सुरू,अंबाबाईच्या पारंपरिक दागिन्यांची केली गेली स्वच्छता

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : अवघ्या चार दिवसांवर शारदीय नवरात्र उत्सव आला आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात जोरदार तयारी सुरू आहे. आज मंदिरातील गरुड मंडपात देवस्थानचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या उपस्थितीत करवीर निवासिनी अंबाबाईच्या पारंपरिक दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली.
साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरा केला जातो. मात्र,यंदा कोरोनाच्या संकटामुळे देशातील सर्व मंदिरे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे यावर्षी अंबाबाई मंदिरातील नवरात्र उत्सव भाविकांविना साजरा करण्याचा निर्णय देवस्थान समिती मार्फत घेण्यात आला आहे. अवघ्या दोन दिवसांवर नवरात्री आल्याने मंदिरातील कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.याच पार्श्वभूमीवर आज अंबाबाई देवीच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली. नवरात्र उत्सव काळात नऊ दिवस देवीची विविध रूपात सालंकृत पूजा बांधण्यात येते.यावेळी पारंपरिक दागिने देवीला परिधान केले जातात. या शाही दागिन्यांची आज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या उपस्थितीत परंपरागत कारागीरांनी दागिन्यांची स्वच्छता केली.
याचबरोबर देवस्थान समिती मार्फत येत्या काही दिवसांत देवीचे धुर्मिळ दागिने भक्तांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.यावेळी देवस्थानचे सदस्य शिवाजीराव जाधव, एन.डी जाधव,धनाजी जाधव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
नवरात्र उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर देवी अंबाबाई चे मंदिर स्वच्छ करण्यात आले आहे मंदिरास विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.कोरोनाचा पार्श्‍वभूमीवर देवी अंबाबाई चे चारी दरवाजे भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहेत यावर्षी नवरात्र उत्सव नियमित साजरा होणार आहे मात्र भाविकांना मंदिरात देवीच्या दर्शनासाठी प्रवेश दिला जाणारा नसल्याने भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आली आहे. कोरोणाच्या काळात एक वर्ष देवीचे दर्शन नाही घेतले तरी भक्तांना ऑनलाईन दर्शनाची सोय आम्ही उपलब्ध केली आहे याद्वारे देवीचे दर्शन भाविकांनी घ्यावे असे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केले आहे.

सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे दसरा- दिपावली सणांसाठी प्रतिटन ५० रुपये अदा,एफ.आर.पी. झाली प्रतिटन २९०० रुपये-अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांची माहिती

0

सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे दसरा- दिपावली सणांसाठी प्रतिटन ५० रुपये अदा,एफ.आर.पी. झाली प्रतिटन २९०० रुपये-अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांची माहिती

 

सेनापती कापशी/प्रतिनिधी : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यांने २०१९-२० या  हंगामांमध्ये गळीतास आलेल्या ऊसपिकास एफ.आर.पी. पोटी २८०० रुपये प्रतिटन अदा केले होते. ऊस उपलब्धतेसाठी व  तालुक्यातील इतर कारखान्यांच्या दराबाबत स्पर्धेसाठी २९००/- रु. प्रतिटन कारखाना ऊसउत्पादक शेतकऱ्यांना देईल, असे अभिवचन कारखाना व्यवस्थापनाने दिले होते. त्यापोटी ५०/- रुपये प्रतिटन गणपती उत्सव काळामध्ये व दसरा-दिपावली सणाच्या दरम्यान ५०/- रुपये प्रतिटन देण्याचे अभिवचन दिले होते. दरम्यान, गणेशोत्सव काळामध्ये ५०/- रुपये अदा केले असून दसरा- दिपावली सणाच्या निमित्ताने बुधवार दि.१४ ऑक्टोबर २०२० रोजी ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केले असून शेतकऱ्यांनी आपल्या बँकेत जाऊन पैसे घेऊन जाण्याची विनंती आहे. कारखान्याचे अध्यक्ष नवीन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
या पत्रकात अध्यक्ष श्री मुश्रीफ यांनी पुढे म्हटले आहे, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यांने आतापर्यंत दिलेल्या सर्व वचनांची पूर्तता केलेली आहे. दरम्यान, साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ रविवार दि. १८ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी नऊ वाजता व गळीत हंगाम शुभारंभ शुक्रवार दि. ३० ऑक्टोबर २०२० रोजी होत आहे. तोडणी-वाहतूकदारांची कोरोना महामारीबाबत कारखाना व्यवस्थापन पूर्ण काळजी घेईल.  दवाखाना, औषधोपचार, दुर्दैवाने दुर्दैवी  घटना घडल्यास कारखाना व्यवस्थापनाने महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या माध्यमातून सर्वांची जबाबदारी घेतली आहे.
सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला उत्पादित कारखान्यास घालून सहकार्य करावे, अशी विनंती आहे. या गळीत हंगामात नऊ लाख मेट्रिक टन गळीत करण्याचा संकल्प व्यवस्थापनाने केला आहे. सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.

चौकट ……
१८ ऑक्टोबरला बॉयलर अग्नी प्रदीपन व ३०ऑक्टोबरला मोळीपूजन.
या गळीत हंगामाबाबत माहिती देताना अध्यक्ष नवीद मुश्रीफ म्हणाले, चालू हंगामासाठीचा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ रविवार दि.१८ ऑक्टोबर २०२०  रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे. तसेच या हंगामासाठी मोळीपूजन शुभारंभ शुक्रवार दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे. या गळीत हंगामात कारखाना व्यवस्थापनाने नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचा संकल्प केलेला आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेला सर्वच्या सर्व ऊस सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याकडे गाळपासाठी पाठवावा, असे आवाहनही अध्यक्ष श्री. मुश्रीफ यांनी केले आहे.

कर्तुत्वात भारी मुली कोल्हापुरी’ राज्य पातळीवर पोहचेल,मुलींच्या जन्मदर वाढीसाठी मानसिकता बदलण्याची गरज-जिल्हाधिकारी दौलत देसाई

0

कर्तुत्वात भारी मुली कोल्हापुरी’ राज्य पातळीवर पोहचेल,मुलींच्या जन्मदर वाढीसाठी मानसिकता बदलण्याची गरज-जिल्हाधिकारी दौलत देसाई

 

कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय) : मानसिकता बदलून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी समाज पुढे येईल. त्याचवेळी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ आणि बेटी बढाओ’ अभियानाचे सार्थक होईल. मुलीच खरा आधार आहे. खेळ, शिक्षण आणि राजकारण यात जिल्ह्यातील मुली कुठेही मागे नाहीत, हे सिध्द करुन दाखवलय. ‘कर्तुत्वात भारी मुली कोल्हापुरी’ अभियानाची निश्चितपणे राज्यपातळीवर दखल घेतली जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्यावतीने 11 ऑक्टोबर या आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहामध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी बढाओ अंतर्गत ‘कर्तुत्वात भारी मुली कोल्हापुरी’ हे घोषवाक्य घेवून फेसबुक पेजचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमास आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती पद्माराणी पाटील, समाज कल्याण सभापती स्वाती सासने, महिला व बाल कल्याण समिती सदस्य कल्पना चौगुले, संगीता रेडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त महिला व बाल विकास विभागाने कर्तृत्वात भारी… मुली कोल्हापुरी ही टॅग लाईन घेऊन एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. कोल्हापूरच्या मुलींनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळया क्षेत्रात ठसा निर्माण केला आहे. जिल्ह्यात मुलींचा जन्मदर कमी होता मात्र आता यामध्ये सुधारणा होत आहे.  मुलगा- मुलगी एकच असून माणसाच्या मनाने हा बदल स्वीकारल्यास मुलींच्या जन्मदरात वाढ होईल. मुलींच्या जन्मदराबाबत शासकीय आकड्यात गुंतून न पडता मानसिकता बदलायची गरज आहे.  परदेशात  गर्भ निदान झाल्यानंतर तीचं नाव आधी ठरतं, तिच्या भविष्याचा विचार सुरु करतात. गर्भात असतानाच  तिच्या  स्वागताची तयारी केली जाते. याच पध्दतीने आपल्याकडेही मानसिकता बदलायची आवश्यकता आहे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी व्यक्त केली.
आमदार श्री. अबिटकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याने नेहमीच नवनवे उपक्रम, कार्यक्रम राबविले आहेत. आंतररराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त महिला व बाल कल्याण विभागाने कर्तृत्वात भारी… मुली कोल्हापुरी  हा सुरु केलेला उपक्रम मुलींना प्रेरणा देणारा आहे. हा उपक्रम देशभर स्वीकारला जावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
महिला बाल कल्याण सभापती श्रीमती पाटील यांनी सर्वांचे स्वागत करुन, महिला व बाल कल्याण विभागामार्फत अनेक उपक्रम राबविले जात आहेत. अंगणवाडी प्रवेश, पोषण माह, मुलींचा जन्मदर वाढविणे यामध्ये उल्लेखनीय काम केले असल्याचे सांगितले,
कोल्हापूरच्या मुली सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. या मुलींनी जिल्ह्याचा नावलौकिक सातासमुद्रपार वाढविला आहे. मुलींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रशासन नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीर राहील. मुलींनी आता स्वत:मध्ये बदल करायला हवा. स्वसंरक्षणाची क्षमता प्रत्येकी मुलींनी अगवत करुन अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी पुढे येणे गरजेचे अल्याचे समाजकल्याण सभापती श्रीमती सासने म्हणाल्या.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी आंतरराष्ट्रीय बालिका दिन व सप्ताहानिमित्त जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती प्रास्ताविकात दिली.
कार्यक्रमात बेटी बचाओ, बेटी पढाओ आणि बेटी बढाओ पुस्तिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात नेमबाज तेजस्विनी सावंत, अभिज्ञा पाटील, कुस्तीपटू स्वाती शिंदे, नंदिनी साळुंखे, टेबल टेनिस वैष्णवी सुतार आणि  पॅरॉ ऑलंपिक मध्ये यश मिळविलेल्या उज्वला चव्हाण या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.
पद्मश्री कुंभार यांनी सुत्रसंचालन केले तर सुहास बुधवले यांनी आभार मानले.

मी बरा आहे तुम्ही सुखरूप रहा, मंत्री मुश्रीफानी साधला रुग्णांशी संवाद, महाराष्ट्रातील पहिल्या वैद्यकीय हेल्पलाइन सेंटरचे उद्घाटन

0

मी बरा आहे तुम्ही सुखरूप रहा,
मंत्री मुश्रीफानी साधला रुग्णांशी संवाद, महाराष्ट्रातील पहिल्या वैद्यकीय हेल्पलाइन सेंटरचे उद्घाटन

 

कोल्हापूर/कागल/प्रतिनिधी : कोरोनातून मी पूर्णता बरा झालो आहे. तुम्हीही सुखरूप रहा, असा काळजीपूर्वक सल्ला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी विविध आजारांच्या रुग्णांना फोनवरून दिला. कोरोणाच्या या माहामारीत कोरोणासह इतर आजारांपासून बचावासाठी घरीच रहा, गर्दी टाळा, मास्क वापरा व स्वच्छता पाळा असा संदेशही त्यांनी दिला.
कागल पंचायत समितीमध्ये सुरू केलेल्या वैद्यकीय हेल्पलाइन केंद्रावरून श्री. मुश्रीफ यांनी  स्वतः फोन करीत रुग्णांशी संवाद साधला व उद्घाटन केले. या केंद्रामधून उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलता, कर्करोग इत्यादी विविध आजारांच्या रुग्णांना दररोज सरासरी २०० कॉल केले जाणार आहेत.
यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, गटविकास अधिकारी सुशील संसारे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम अभिनव व अत्यंत लोकोपयोगी आहे. अशा प्रकारचा महाराष्ट्र राज्यातील हा पहिला व एकमेव उपक्रम आहे. कोरोनाने झालेल्या एकूण मृत्यु पैकी ६० ते ६५ टक्के मृत्यू हे इतर व्याधीग्रस्तांचे आहेत. त्यामुळे इतर व्याधिग्रस्तांनी खबरदारीने राहणे महत्त्वाचे आहे. तज्ञांच्या अभ्यासानुसार अद्यापही ७० टक्केच लोक मास्क वापरत आहेत. १०० टक्के लोकांनी मास्क वापरल्यास कोरोनाचा कहर अजूनही कमी होईल.
प्रास्ताविकपर भाषणात गटविकास अधिकारी सुशील संसारे म्हणाले, या कॉल सेंटरमधून दररोज २०० व्यक्तींना कॉल केले जाणार आहेत. त्यांच्या तब्येतीची चौकशी करून त्यांना काही त्रास जाणवत असल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून व गरज पडल्यास कोवीड केअर सेंटरमधून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. तसेच मास्कचा वापर व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, वैयक्तिक – सार्वजनिक स्वच्छता व सामाजिक अंतर याबाबत समुपदेशन केले जाणार आहे.
श्री मुश्रीफ यांनी शिवाजीराव माने – कसबा सांगाव, श्रीकांत मगदूम- सिद्धनेर्ली, आण्णासो तोडकर – लिंगनूर दुमाला, सुमन पोवार- बिद्री, विलास दारवाडकर- यमगे या रुग्णांशी संवाद साधला.
यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, सभापती सौ. पुनम राहुल मगदूम- महाडिक, उपसभापती दिपक सोनार, माजी उपसभापती विजय भोसले, माजी उपसभापती रमेश तोडकर, सदस्य जयदीप पोवार, सौ. रुपाली सुतार, राजेंद्र माने, शशिकांत खोत, तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे आदी प्रमुख उपस्थित होते.

चौकट
लवकर निदान -लवकर उपचार मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, माझे कुटुंब- माझी जबाबदारी या अभियानाच्या सर्वेक्षणातून कागल तालुक्यात १५,३७९ रुग्ण हे उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग इत्यादी व्याधीने ग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. दररोज २०० जणांशी संवाद याप्रमाणे या सर्वांशी वैयक्तिक संवाद साधला जाणार आहे. त्यांच्या आरोग्यविषयक अडचणी जाणून घेऊन त्यांना तातडीने वैद्यकीय सेवाही पुरविली जाणार आहे. लवकर निदान लवकर- उपचार या तत्त्वावर या कॉल सेंटरची कार्यप्रणाली चालणार आहे.

कोल्हापुरी चप्पल आता अमेझॉनवर उपलब्ध-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ऑनलाइन विक्री प्रारंभ

0

कोल्हापुरी चप्पल आता अमेझॉनवर उपलब्ध-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ऑनलाइन विक्री प्रारंभ

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : देशभर लौकिक असलेले कोल्हापुरी चप्पल आता ॲमेझॉन या डिजिटल बाजारपेठ विक्री संकेतस्थळावर  उपलब्ध झाले आहे. त्यामुळे कोल्हापुरी चप्पलने जागतिक बाजारपेठेत प्रवेश केला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वेबसाईट उघडून हा ऑनलाईन विक्री प्रारंभ झाला.
कोल्हापूर जिल्हयामधील महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी उत्पादीत केलेल्या उत्कृष्ठ उत्पादनांना कायमस्वरूपी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देवून महिलांचा आर्थिक स्तर उंचावून त्यांचे सक्षमीकरण होण्यासाठी ऑनलाईन प्रॉडक्ट विक्री या मोहिमेचा प्रारंभ श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापुरात झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत उमेद -महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात येत आहे. ग्रामीण
भागातील महिलांचे सक्षमीकरण करून त्यांचे जीवनमान उंचावणे, हा या अभियानाचा मुख्य उददेश आहे. कोल्हापूर जिल्हयामध्ये १२,१००  इतक्या स्वयंसहाय्यता गटांची स्थापना करणेत आलेली आहे. तसेच २६० ग्रामसंघ व दोन  प्रभाग संघाची स्थापना करणेत आलेली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल म्हणाले, अमेझॉन या डिजीटल विक्री बाजारपेठ संकेतस्थळावर महिला स्वयंसहाय्यता गटांची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होवून ग्रामीण भागामध्ये आर्थिक विकासाला चालना देण्याची संकल्पना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विचारातून साकारण्यात येत आहे. आज कोल्हापूर जिल्हयातील प्रसिध्द असलेले कोल्हापूरी चप्पल  ऑनलाईन लिंकवरून उत्पादन विक्रीसाठी खुले करण्यात आले. कोल्हापूरी गुळ, काकवी, व्हाईट मेटल ज्वलरी, कोल्हापूरी दागिने, मध, विविध प्रकारचे
मसाले, कोल्हापूरी कांदा व लसुन चटणी, मिरची पावडर, गारमेंट प्रोडक्ट,मास्क, इत्यादी अनेक वस्तू अमेझॉन या संकेतस्थळावर ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल, प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास व जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन पानारी आदी उपस्थित होते.

चौकट…….
जगात भारी….. कोल्हापुरी…….ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जगात भारी…. कोल्हापुरी …… असा कोल्हापूर जिल्ह्याचा लौकिक सर्वदूर आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या शेतीमालासह औद्योगिक व महिला बचत गटांच्या उत्पादनांनाही दर्जा व गुणवत्तेमुळे बाजारपेठेत मोठी मागणी आहे. अमेझॉनसारख्या डिजिटल बाजारपेठ विक्री संकेतस्थळामुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळून त्यांचे सक्षमीकरण होईल.