Saturday, June 28, 2025
spot_img
Home Blog Page 16

२९ ते ४ फेब्रुवारी कोल्हापूरमध्ये गांधी शिल्प बाजार म्हणजेच हस्तकला आणि हातमाग प्रदर्शन व विक्री दालनचे आयोजन

0

२९ ते ४ फेब्रुवारी कोल्हापूरमध्ये गांधी शिल्प बाजार म्हणजेच हस्तकला आणि हातमाग प्रदर्शन व विक्री दालनचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालय, विकास आयुक्त कार्यालय (हस्तकला) यांच्या मार्गदर्शनाखाली भारत हाउसिंग सोसायटी हॉल, आठवी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर येथे गांधी शिल्प बाजार म्हणजेच हस्तकला आणि हातमाग प्रदर्शनाचे व विक्री दालनाचे आयोजन करण्यात आले आहे याचे आज उदघाटन करण्यात आले. २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी पर्यत सुरू राहणाऱ्या प्रदर्शनी मध्ये विविध २९ राज्यातील ५० कारागीर ५० स्टॉलसह उपस्थित राहतील. एकूण ५० स्टॉलवर हस्तकला कारागीर पारंपारिक कलाकृती या प्रदर्शनात सादर करणार आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आज सायंकाळी ५ वाजता होणार आहे.त्यामुळे कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर आसपासच्या कलाप्रेमी जाणकारांना कला आणि हस्तकलेचा वारसा पाहण्याची आणि हस्तकला कारागीर ते थेट ग्राहक योजनेतून खरेदीचा आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे.वस्त्र मंत्रालय, भारत सरकार (हस्तकला), वरिष्ठ सहाय्यक निर्देशक चंद्रशेखर सिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी ह्या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे याबद्दल त्या सर्वांचे अभिनंदन केले तसेच हे प्रदर्शन भरविण्यासाठी कोल्हापूर शहराची निवड केली आहे.
या राष्ट्रीय प्रदर्शनात ग्राहक आणि कारागीर यांच्यात थेट बाजारपेठ जोडण्याची व्यवस्था, ग्राहकांच्या गरजा विचारात घेऊन गरजेनुसार डिझाइन तयार करून दिले जाते.महाराष्ट्रातील जी. आय. मानांकन प्राप्त पुणेरी पगडी, कोल्हापूरी चप्पल, वारली पेंटिंग, पैठणी तसेच सोलापूरी चादर टॉवेलचे स्टॉल लावण्यात येणार आहेत.विविध राज्यांतील राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिल्पगुरु, राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र धारक, राज्य पुरस्कार विजेते, बचत गट इत्यादींचा या मध्ये सहभाग आहे.
या प्रदर्शनात आर्ट मेटल वेअर, बीड्स क्राफ्ट, केन आणि बांबू उत्पादन, कार्पेट, शंख-शिंपले, बाहुली आणि खेळणी, भरतकाम आणि क्रोशेटेड वस्तू, काच, गवत, पाने, वेत वेळू आणि फायबर उत्पादन, हाताने छापलेले कापड स्कार्फ, इमिटेशन ज्वेलरी, ज्यूट क्राफ्ट, तंजावर पेंटिंग, टेक्सटाईल (भरतकाम), लाकडी वस्तू, कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी ज्वेलरी क्राफ्ट, विविध पेंटिंग. छत्तीसगड डोकरा कास्टिंग, मधुबनी पेंटिंग, पंजाबची फुलकारी फॅब्रिक्स अशा विविध प्रकारच्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले आहेत.त्यामुळे कोल्हापूर शहर वासीयांनी ह्या प्रदर्शनाला भेट द्यावी व हस्तकलेला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन यावेळी केले.

कंदमूळ आणि औषधी वनस्पतींचा ठेवा जपणं आवश्यक; खासदार धनंजय महाडिक

0

कंदमूळ आणि औषधी वनस्पतींचा ठेवा जपणं आवश्यक; खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर / प्रतिनिधी : आपल्या भारतामध्ये जे रामायण आणि महाभारतापासून औषधी वनस्पती आणि कंदमुळे आहेत त्यांचा ठेवा आपण जपणं आवश्यक आहे. आत्ताच्या पिढीला त्याची माहिती करून देण्यासाठी हे प्रदर्शन अतिशय उपयुक्त आहे. या प्रदर्शनामध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व औषधी वनस्पती आणि कंदमुळे यांचे औषधीमूल्य सर्वदूर पोहोचणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. कंदमूळ आणि औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. शेतकऱ्यांनी आपल्या मुख्य पिकाबरोबरच या औषधी वनस्पती आणि कंदमुळांची पूरक शेती केली तर त्यांच्या व्यवसायवृद्धीला चालना मिळेल. तसेच नवीन कृषी क्षेत्रात आलेल्या तरुणांनीदेखील आपला स्टार्टअप बिझनेस म्हणून याकडे बघायला हरकत नाही, अशी अपेक्षा यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली.
“लेट्स गेट बॅक टु अवर रूट्स “ह्या ब्रीदवाक्याचा अंगिकार करून आपल्या मातीत वाढणाऱ्या, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आरोग्यवर्धक कंदमुळांची माहिती घेऊन चौकस आहारातून सुदृढ पिढी घडवण्यासाठी विद्यार्थी, आबालवृद्ध तसेच सर्व नागरिकांनी एकमेव वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनाचा लाभ अवश्य घ्यावा असे आवाहन एनजीओ कम्पॅशन २४ , कोल्हापूर वुई केअर चे अध्यक्ष मिलिंद धोंड ह्यांनी केले आहे.
रानकंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबतची माहिती शहरवासियांना आणि खेड्यापाड्यातील ग्रामस्थांना व्हावी, शेतकऱ्यांनी त्यांची लागवड त्यांच्या शेतात करण्याच्या हेतूने “निसर्गअंकुर ‘ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर वुई केअर आणि एनजीओ कम्पॅशन २४ ह्या संस्थेच्या आयोजनातून तसेच श्री. शाहू छत्रपती शिक्षण संस्था, गार्डन्स क्लब कोल्हापूर ,युथ ऍनेक्स ,वुई केअर हेल्पलाईन ह्या संस्थांच्या सहकार्याने दिनांक १८ आणि १९ जानेवारी रोजी १०० हून अधिक कंदमुळांचे आणि १५० हुन अधिक औषधी वनस्पतींचे तसेच ५० पेक्षा अधिक फुलपाखरांना आकर्षित करणाऱ्या विशेष वनस्पतींचे माहितीपूर्ण प्रदर्शन दसरा चौक येथील शहाजी कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात केले आहे .
लोकांना कंदमुळांची ओळख आणि चांगली माहिती मिळावी म्हणून श्री .मोहन माने ह्यांच्या अथक प्रयत्नातून हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. पौराणिक काळापासून मानव कंदमुळांचा अन्न म्हणून वापर करत आला आहे. शतावरी ,अमरकंद,सफेद मुसळी ,पेनवा इत्यादी वनस्पतींच्या कंदाचा औषधात वापर करतात. गाजर, मुळा, बीट, आले, हळद , कांदा ,लसूण इत्यादी वनस्पतींच्या कंदाचा आपण आपल्या आहारात वापर करतो. अळू ,कमळं, सुरण हे कंदही भाजीसाठी वापरतात . साबुकंदापासून साबुदाणा तयार करतात.मानवी आहारात उपयुक्त असणाऱ्या अशा बहुतांश कंदवर्गीय वनस्पतींची शेतात लागवड केली जाते. ह्या प्रदर्शनात सताप ,गुगुळ , कुसर,कोष्ट कोलीजंन, लक्ष्मी तरु , सागर गोटा ,बेडकी पाला, अक्कल कारा, दमवेल, काजरा ह्या दुर्मिळ अश्या औषधी वनस्पती तसेच कणगा ,काटे कणग ,कोराडू , करांदा,वराहकंद ,वासकंद,पासपोळी, शेंडवेल,आळसी ,शेवळा ,सुरण ह्या वनस्पतींची कंदमुळे,कंदीका आणि कंदक तसेच मोठा कासार अळू ,काळा अळू ,हिरवा अळू ,पांढरा पेरव ,उंडे ,शेडवाळे असे अळुंचे विविध प्रकार आणि त्यांचे कंद ,त्याचबरोबर काळी हळद ,आंबेहळद ह्यासारखे हळदीचे विविध प्रकार व त्यांचे कंद अशाप्रकारच्या सुमारे १०० हुन अधिक प्रकारच्या कंदाच्या जाती प्रजातींची मांडणी ह्या प्रदर्शनात केली आहे.
कंदमुळांपासून पाककृती या प्रदर्शनात पाहता येतील. तसेच खाद्यपदार्थ येथे उपलब्ध आहेत.काही कंदमुळे, रानभाज्या,वृक्ष, औषधी वनस्पतींची माहिती असणारी पुस्तके आणि काही वनस्पतींची रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
प्रदर्शनात ठेवण्यात येणाऱ्या कंदांचे संकलन प्रामुख्याने कर्नाटकातील जोयडा ,महाराष्ट्रातील बेल्हे ( पुणे) व गगनबावडा ( कोल्हापूर) आणि एका भागातून करण्यात आले आहे.
चॅनल बी हे ह्या प्रदर्शनाचे मीडिया पार्टनर असून गार्डन्स क्लब कोल्हापूर, सौ. मंजिरी कपडेकर कूकींग क्लासेस,युथ ऍनेक्स आणि वुई केअर हेल्पलाईन ह्या संस्थांच्या मोलाच्या सहकार्याने हे प्रदर्शन पार पडणार आहे. प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून विनामूल्य आहे.
यावेळी शहाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.के शानेदिवाण,अतिरीक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे,निसर्ग अंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मधुकर बाचुळकर, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.अशोक वाली,मंजिरी कपडेकर ,सौ. सुप्रिया भस्मे, अमृता वासुदेवन, सुशिल रायगांधी, अभिजीत पाटील, सुशांत टकळक्की, भूषण पाटील, जयेश ओसवाल आदी उपस्थित होते.

मेरे कैलासा,तेरे दिवाने या संगीतमय कार्यक्रमाचे आज देवल क्लब येथे आयोजन

0

मेरे कैलासा,तेरे दिवाने या संगीतमय कार्यक्रमाचे आज देवल क्लब येथे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : आज सोमवार २० जानेवारी २०२५ रोजी, गोविंदराव टेंबे रंगमंदिर,देवल क्लब कोल्हापूर येथे सादर होणाऱ्या, मेरे कैलासा,तेरे दिवाने या संगीतमय कार्यक्रमाविषयी माहिती गायक जितेंद्र पंडीत, संगीत संयोजक विशाल प्रकाश, गुरूप्रसाद कुलकर्णी यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि दिली.प्रतिथयश गायक कैलाश खेर यांनी गायलेल्या गाण्यांचा आविष्कार गायक जितेंद्र पंडीत सादर करणार आहेत. मूळचे कोल्हापूरचे असणारे जितेंद्र पंडीत यांनी मुंबई, पुणे,गोवा, बेंगळुरू इ. ठिकाणी सुप्रसिद्ध सेलीब्रेटींसोबत कार्यक्रम सादर केले आहेत.त्यांचे प्रायव्हेट अल्बम प्रसिद्ध झाले आहेत. शिवाय बॉलिवूडमध्ये सुध्दा त्यांनी प्रवेश केला आहे. या कार्यक्रमाचे मुंबई,गोवा, या ठिकाणी शो झाले आहेत. त्याला मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. कोल्हापूर मध्ये या संकल्पनेवर आधारित असा शो प्रथमच सादर होत आहे. या कार्यक्रमासाठी संगीत संयोजन विशाल प्रकाश यांनी केले आहे. कार्यक्रमाची संकल्पना गुरुप्रसाद कुलकर्णी यांची असून पब्लिसिटी संजय लोंढे, वैभव एंटरप्रायजेस यांनी केली आहे.स्पिरीच्युएल शो ही संकल्पना प्रथमच कोल्हापूरात सादर होत आहे, हा कार्यक्रम नक्कीच रसिकांना वेगळा अनुभव देईल.त्याचा सर्व रसिक प्रेक्षकांनी लाभ घ्यावा, असे संयोजकानी आवाहन केले आहे.

साळोखेनगरच्या डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ”नॅक”कडून मानांकन

0

साळोखेनगरच्या डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ”नॅक”कडून मानांकन

-डॉ ए.के. गुप्ता यांची माहिती : पहिल्याच प्रयत्नात पाच वर्षासाठी मानांकन

साळोखेनगर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या साळोखेनगर येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ‘राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषदे’चे (NAAC) प्रतिष्ठित मानांकन प्राप्त झाले आहे.
हे मानांकन पाच वर्षासाठी म्हणजे डिसेंबर २०२९ पर्यंतच्या कालावधीसाठी मिळाले आहे. यामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डी. ए.के गुप्ता यांनी दिली.
‘नॅक’ मूल्यांकन समितीने अभ्यासक्रम पद्धत, मूल्यांकन पद्धत, संशोधनात्मक काम ,पायाभूत सुविधा, प्राध्यापकांची संख्या, विविध विषयांचे निकाल, कॅम्पस प्लेसमेंट सुविधा आदींची माहिती घेतली. समितीने मूल्यांकन करून अखेर पाच वर्षासाठी मानांकन जाहीर केल्याचे कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने यांनी सांगितले
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश माने म्हणाले २०१४ मध्ये स्थापन झालेल्या या महाविद्यालयाने पहिल्याच प्रयत्नात मानांकन मिळवले आहे .या मानांकनामुळे संस्थेच्या शिक्षणाची गुणवत्ता, संशोधन कार्य, पायाभूत सुविधा व विद्यार्थी विकासाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. या यशामध्ये प्राध्यापकवर्ग, कर्मचारी व आजी माजी विद्यार्थी, पालक यांचा मोठा वाटा आहे.संस्थचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मेरीट स्कॉलरशिप’ मुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना – डॉ. संजय डी. पाटील

0

‘मेरीट स्कॉलरशिप’ मुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना – डॉ. संजय डी. पाटील

-डी. वाय. पाटील ग्रुपमधील १८८ विद्यार्थ्यांना ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिप’ प्रदान

कोल्हापूर/प्रतिनिधी : सौ शांतादेवी डी. मेरीट स्कॉलरशिपमुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी निकोप स्पर्धा निर्माण होईल आणि त्यातून अधिकाधिक गुणवंत विद्यार्थी घडतील असा विश्वास डी. वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी व्यक्त केला. डी.वाय पाटील शिक्षण समूहाच्यावतीने सौ.शांतादेवी डी पाटील (आईसाहेब )यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन आयोजित करण्यात आलेल्या ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिप’ वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी १८८ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ‘सौ शांतादेवी डी. मेरीट स्कॉलरशिप’ देऊन गौरविण्यात आले.
हॉटेल सयाजीच्या व्हिक्टोरिया सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास सौ.शांतादेवी डी. पाटील, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ.संजय डी. पाटील, विश्वस्त सौ. वैजयंती संजय पाटील, स्कॉलरशिप समिती अध्यक्ष ऋतुराज पाटील, उपाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, देवश्री पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋतुराज पाटील यांनी केले. ऋतुराज पाटील म्हणाले, नातवंडांच्या आयुष्यात आजीचे एक वेगळं स्थान असते. दादा आणि आईसाहेबांना आम्ही नेहमीच दैवत मानतो. दादा सांगतात की माणसात देव बघायला शिका. आम्ही त्यांच्यातच देव पाहिला. शिक्षणाचं महत्व फारसं नसलेल्या काळात आईसाहेबांनी त्यांच्या सर्व मुलांना चांगलं शिक्षण मिळेल यासाठी आग्रह धरला. राजकारण सोडून शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा निर्णय दादांनी घेतला आणि त्याला खंबीर असं पाठबळ आईसाहेबांनी दिलं. वात्सल्याच्या धाग्यातून त्यांनी कुटुंबाला बांधून ठेवलं. हे आमचं घरातील विद्यापीठच आहे. म्हणूनच शिक्षणाविषयी आस्था असलेल्या त्यांच्या दूरद्ष्टीचा विचार करूनच आम्ही ही शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे.
डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, आम्हाला घडवण्यात आईचे मोठे योगदान आहे. त्याकाळात आम्हा भावंडाना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा आणि मोठ्या बहिणीला शिक्षणासाठी पुण्याला पाठवण्याचा धाडसी निर्णय आईनी घेतला. आईच्या मार्गदर्शन व आशीर्वादाने आज आम्ही सर्व भावंडे आपल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवू शकलो.
डॉ. पाटील पुढे म्हणाले, २०२३ मध्ये आईसाहेबांच्या जन्मदिनी हि योजना सुरु केली. या योजनेत २०२२-२३ मध्ये ६६ विद्यार्थ्यांना तर २०२३-२४ मध्ये १३६ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली. यावर्षी १८८ विद्यार्थ्यांना हि स्कॉलरशिप प्रदान करण्यात आली आहे. केवळ गुणवत्ता हाच निकष ठेऊन यामध्ये विद्यार्थ्यांची निवड केली जाते. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढविण्यासाठी निकोप स्पर्धा व्हावी या हेतूने हि मेरीट स्कॉलरशिप सुरु करण्यात आली आहे. याचा आतिशय चांगला परिणाम विद्यार्थ्यामध्ये दिसून आला आहे. यावर्षीच्या १८८ विद्यार्थ्यांमध्ये तब्बल १५२ नव्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळाली आहे. केवळ ३६ विद्यार्थीच असे आहेत कि ज्यांना यापूर्वीही हि स्कॉलरशिप प्राप्त झाली आहे.या समारंभात पाटील कुटुंबियांच्यावतीने केक कापून सौ. शांतादेवी डी. पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आई साहेबांचा जीवनपट उलगडून दाखवणारी चित्रफीत दाखवण्यात आली. यावेळी स्कॉलरशिपप्राप्त काही विद्यार्थी व पालकांनी उत्स्फुर्तपणे मनोगत व्यक्त करत डी. वाय. पाटील ग्रुपबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. स्कॉलरशिप समितीच्या सदस्या सीएचआरओ सौ. श्रीलेखा साटम यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. मधुगंधा मिठारी व प्रा. रोहिणी तुरंबेकर यांनी केले.
या समारंभाला भाभा ऍटोमिक रिसर्चचे माजी सहसंचालक प्रा. डॉ. जे.व्ही. याखमी, डॉ. डी. वाय. पाटील इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे कार्यकारी संचालक डॉ. भरत पाटील, व्यवस्थापकीय संचालिका डॉ. श्वेता पाटील, डी वाय पाटील ग्रुपच्या अॅडव्हायझर सौ.पूजा ऋतुराज पाटील, अॅडव्हायझर सौ.वृषाली पृथ्वीराज पाटील, अजितराव पाटील बेनाडीकर, लोकमतचे संपादक डॉ. वसंत भोसले, डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक ए. के. गुप्ता, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलगुरू डॉ. के. प्रथापन, मेडिकल कॉलेज डीन डॉ. आर के शर्मा, कुलसचिव डॉ व्ही. व्ही. भोसले, डॉ. जे. ए. खोत, प्राचार्य डॉ. एस. आर. पावसकर, डॉ. एस. बी. पाटील, डॉ. संतोष चेडे, डॉ. महादेव नरके, डॉ. अजित पाटील, डॉ. अमृत कुवर रायजादे, डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. चंद्रप्रभू जंगमे, डॉ. सुरेंद्र माने, डॉ. उमाराणी जे., रुधीर बारदेस्कर, डी. एन. शेलार, डॉ. लीतेश मालदे यांच्यासह डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप मधील अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कोल्हापूर: स्कॉलरशिपप्राप्त विद्यार्थ्यांसमवेत डावीकडून देवश्री पाटील, सौ. पूजा ऋतुराज पाटील, ऋतुराज संजय पाटील, डॉ. संजय डी. पाटील, सौ. वैजयंती संजय पाटील, सौं. वृषाली पृथ्वीराज पाटील, पृथ्वीराज संजय पाटील आदी.

मेरीट स्कॉलरशिप’ मुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना – डॉ. संजय डी. पाटील

0

मेरीट स्कॉलरशिप’ मुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना – डॉ. संजय डी. पाटील

-डी. वाय. पाटील ग्रुपमधील १८८ विद्यार्थ्यांना ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिप’ प्रदान

कोल्हापूर/प्रतिनिधी : सौ शांतादेवी डी. मेरीट स्कॉलरशिपमुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी निकोप स्पर्धा निर्माण होईल आणि त्यातून अधिकाधिक गुणवंत विद्यार्थी घडतील असा विश्वास डी. वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी व्यक्त केला. डी.वाय पाटील शिक्षण समूहाच्यावतीने सौ.शांतादेवी डी पाटील (आईसाहेब )यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन आयोजित करण्यात आलेल्या ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिप’ वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी १८८ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ‘सौ शांतादेवी डी. मेरीट स्कॉलरशिप’ देऊन गौरविण्यात आले.
हॉटेल सयाजीच्या व्हिक्टोरिया सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास सौ.शांतादेवी डी. पाटील, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ.संजय डी. पाटील, विश्वस्त सौ. वैजयंती संजय पाटील, स्कॉलरशिप समिती अध्यक्ष ऋतुराज पाटील, उपाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, देवश्री पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋतुराज पाटील यांनी केले. ऋतुराज पाटील म्हणाले, नातवंडांच्या आयुष्यात आजीचे एक वेगळं स्थान असते. दादा आणि आईसाहेबांना आम्ही नेहमीच दैवत मानतो. दादा सांगतात की माणसात देव बघायला शिका. आम्ही त्यांच्यातच देव पाहिला. शिक्षणाचं महत्व फारसं नसलेल्या काळात आईसाहेबांनी त्यांच्या सर्व मुलांना चांगलं शिक्षण मिळेल यासाठी आग्रह धरला. राजकारण सोडून शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा निर्णय दादांनी घेतला आणि त्याला खंबीर असं पाठबळ आईसाहेबांनी दिलं. वात्सल्याच्या धाग्यातून त्यांनी कुटुंबाला बांधून ठेवलं. हे आमचं घरातील विद्यापीठच आहे. म्हणूनच शिक्षणाविषयी आस्था असलेल्या त्यांच्या दूरद्ष्टीचा विचार करूनच आम्ही ही शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे.
डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, आम्हाला घडवण्यात आईचे मोठे योगदान आहे. त्याकाळात आम्हा भावंडाना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा आणि मोठ्या बहिणीला शिक्षणासाठी पुण्याला पाठवण्याचा धाडसी निर्णय आईनी घेतला. आईच्या मार्गदर्शन व आशीर्वादाने आज आम्ही सर्व भावंडे आपल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवू शकलो.
डॉ. पाटील पुढे म्हणाले, २०२३ मध्ये आईसाहेबांच्या जन्मदिनी हि योजना सुरु केली. या योजनेत २०२२-२३ मध्ये ६६ विद्यार्थ्यांना तर २०२३-२४ मध्ये १३६ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली. यावर्षी १८८ विद्यार्थ्यांना हि स्कॉलरशिप प्रदान करण्यात आली आहे. केवळ गुणवत्ता हाच निकष ठेऊन यामध्ये विद्यार्थ्यांची निवड केली जाते. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढविण्यासाठी निकोप स्पर्धा व्हावी या हेतूने हि मेरीट स्कॉलरशिप सुरु करण्यात आली आहे. याचा आतिशय चांगला परिणाम विद्यार्थ्यामध्ये दिसून आला आहे. यावर्षीच्या १८८ विद्यार्थ्यांमध्ये तब्बल १५२ नव्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळाली आहे. केवळ ३६ विद्यार्थीच असे आहेत कि ज्यांना यापूर्वीही हि स्कॉलरशिप प्राप्त झाली आहे.या समारंभात पाटील कुटुंबियांच्यावतीने केक कापून सौ. शांतादेवी डी. पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आई साहेबांचा जीवनपट उलगडून दाखवणारी चित्रफीत दाखवण्यात आली. यावेळी स्कॉलरशिपप्राप्त काही विद्यार्थी व पालकांनी उत्स्फुर्तपणे मनोगत व्यक्त करत डी. वाय. पाटील ग्रुपबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. स्कॉलरशिप समितीच्या सदस्या सीएचआरओ सौ. श्रीलेखा साटम यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. मधुगंधा मिठारी व प्रा. रोहिणी तुरंबेकर यांनी केले.
या समारंभाला भाभा ऍटोमिक रिसर्चचे माजी सहसंचालक प्रा. डॉ. जे.व्ही. याखमी, डॉ. डी. वाय. पाटील इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे कार्यकारी संचालक डॉ. भरत पाटील, व्यवस्थापकीय संचालिका डॉ. श्वेता पाटील, डी वाय पाटील ग्रुपच्या अॅडव्हायझर सौ.पूजा ऋतुराज पाटील, अॅडव्हायझर सौ.वृषाली पृथ्वीराज पाटील, अजितराव पाटील बेनाडीकर, लोकमतचे संपादक डॉ. वसंत भोसले, डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक ए. के. गुप्ता, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलगुरू डॉ. के. प्रथापन, मेडिकल कॉलेज डीन डॉ. आर के शर्मा, कुलसचिव डॉ व्ही. व्ही. भोसले, डॉ. जे. ए. खोत, प्राचार्य डॉ. एस. आर. पावसकर, डॉ. एस. बी. पाटील, डॉ. संतोष चेडे, डॉ. महादेव नरके, डॉ. अजित पाटील, डॉ. अमृत कुवर रायजादे, डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. चंद्रप्रभू जंगमे, डॉ. सुरेंद्र माने, डॉ. उमाराणी जे., रुधीर बारदेस्कर, डी. एन. शेलार, डॉ. लीतेश मालदे यांच्यासह डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप मधील अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कोल्हापूर: स्कॉलरशिपप्राप्त विद्यार्थ्यांसमवेत डावीकडून देवश्री पाटील, सौ. पूजा ऋतुराज पाटील, ऋतुराज संजय पाटील, डॉ. संजय डी. पाटील, सौ. वैजयंती संजय पाटील, सौं. वृषाली पृथ्वीराज पाटील, पृथ्वीराज संजय पाटील आदी.

कंदमुळे आणि औषधी वनस्पतींचे भव्य प्रदर्शन १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी

0

कंदमुळे आणि औषधी वनस्पतींचे भव्य प्रदर्शन १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी

१०० हून अधिक कंदमुळे आणि १५० हून अधिक औषधी वनस्पती होणार प्रदर्शित

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : निसर्गात कंदमुळे देणाऱ्या अनेक वनस्पती आहेत.अनेक कंदमुळांच्या वनस्पती ह्या रानावनात, जंगलात वाढतात. अशा रानकंद वनस्पतींबाबतचे पारंपरिक ज्ञान वनवासी, आदिवासी आणि कोकणवासीयांच्याकडे आहे. अशाप्रकारच्या विविध रानकंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबतची माहिती शहरवासियांना आणि खेड्यापाड्यातील ग्रामस्थांना व्हावी, शेतकऱ्यांनी त्यांची लागवड त्यांच्या शेतात करण्याच्या हेतूने “निसर्गअंकुर ‘ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर वुई केअर आणि एनजीओ कम्पॅशन २४ ह्या संस्थेच्या आयोजनातून तसेच श्री. शाहू छत्रपती शिक्षण संस्था, गार्डन्स क्लब कोल्हापूर ,युथ ऍनेक्स ,वुई केअर हेल्पलाईन ह्या संस्थांच्या सहकार्याने दिनांक १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी १०० हून अधिक कंदमुळांचे आणि १५० हुन अधिक औषधी वनस्पतींचे तसेच ५० पेक्षा अधिक फुलपाखरांना आकर्षित करणाऱ्या विशेष वनस्पतींचे माहितीपूर्ण प्रदर्शन दसरा चौक येथील शहाजी कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
ह्या प्रदर्शनाचे उदघाटन माननीय प्रमुख पाहुणे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते होणार असून
शाहू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमनमानसिंग बोंद्रे, शहाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.के शानेदिवाण ह्यांच्या विशेष उपस्थितीत हा प्रदर्शनाचा सोहळा पार पडणार आहे.
ह्या प्रदर्शनास जिल्हाधिकारी
अमोल येडगे,कोल्हापूर आणि
अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे व इतर मान्यवर भेट देतील. अशी माहिती वुई केअर चे मिलिंद धोंड यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
लोकांना कंदमुळांची ओळख आणि चांगली माहिती मिळावी म्हणून श्री .मोहन माने ह्यांच्या अथक प्रयत्नातून हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
अगदी पुरातन पौराणिक काळापासून मानव कंदमुळांचा अन्न म्हणून वापर करत आला आहे. शतावरी ,अमरकंद,सफेद मुसळी ,पेनवा इत्यादी वनस्पतींच्या कंदाचा औषधात वापर करतात. गाजर, मुळा, बीट, आले, हळद , कांदा ,लसूण इत्यादी वनस्पतींच्या कंदाचा आपण आपल्या आहारात वापर करतो. अळू ,कमळं, सुरण हे कंदही भाजीसाठी वापरतात . साबुकंदापासून साबुदाणा तयार करतात.मानवी आहारात उपयुक्त असणाऱ्या अशा बहुतांश कंदवर्गीय वनस्पतींची शेतात लागवड केली जाते. ह्या प्रदर्शनात सताप ,गुगुळ , कुसर,कोष्ट कोलीजंन, लक्ष्मी तरु , सागर गोटा ,बेडकी पाला, अक्कल कारा, दमवेल, काजरा ह्या दुर्मिळ अश्या औषधी वनस्पती तसेच कणगा ,काटे कणग ,कोराडू , करांदा,वराहकंद ,वासकंद,पासपोळी, शेंडवेल,आळसी ,शेवळा ,सुरण ह्या वनस्पतींची कंदमुळे,कंदीका आणि कंदक तसेच मोठा कासार अळू ,काळा अळू ,हिरवा अळू ,पांढरा पेरव ,उंडे ,शेडवाळे असे अळुंचे विविध प्रकार आणि त्यांचे कंद ,त्याचबरोबर काळी हळद ,आंबेहळद ह्यासारखे हळदीचे विविध प्रकार व त्यांचे कंद अशाप्रकारच्या सुमारे १०० हुन अधिक प्रकारच्या कंदाच्या जाती प्रजातींची मांडणी ह्या प्रदर्शनात केली जाणार आहे अशी माहिती निसर्गअंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ .मधुकर बाचुळकर ह्यांनी दिली.
कंदमुळांपासून विविध खाद्यपदार्थ कसे बनविले जातात. त्याच्या पाककृती या प्रदर्शनात पाहता येतील. तसेच या पदार्थांची चवही चाखता यावी यासाठी हे खाद्यपदार्थ खाण्यासाठी उपलब्ध असतील.काही कंदमुळे विक्रीसाठी असतील.रानभाज्या,वृक्ष आणि औषधी वनस्पतींची माहिती असणारी पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असतील.तसेच काही वनस्पतींची रोपे आपणास खरेदी करता येतील.
प्रदर्शनात ठेवण्यात येणाऱ्या कंदांचे संकलन प्रामुख्याने कर्नाटकातील जोयडा ,महाराष्ट्रातील बेल्हे ( पुणे) व गगनबावडा ( कोल्हापूर) आणि एका भागातून करण्यात आले आहे.
“लेट्स गेट बॅक टु अवर रूट्स “ह्या ब्रीदवाक्याचा अंगिकार करून आपल्या मातीत वाढणाऱ्या, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आरोग्यवर्धक कंदमुळांची माहिती घेऊन चौकस आहारातून सुदृढ पिढी घडवण्यासाठी विद्यार्थी, आबालवृद्ध तसेच सर्व नागरिकांनी एकमेव वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनाचा लाभ अवश्य घ्यावा असे आवाहन एनजीओ कम्पॅशन २४ , कोल्हापूर वुई केअर चे अध्यक्ष मिलिंद धोंड ह्यांनी केले आहे.
चॅनल बी हे ह्या प्रदर्शनाचे मीडिया पार्टनर असून गार्डन्स क्लब कोल्हापूर, सौ. मंजिरी कपडेकर कूकींग क्लासेस,युथ ऍनेक्स आणि वुई केअर हेल्पलाईन ह्या संस्थांच्या मोलाच्या सहकार्याने हे प्रदर्शन पार पडणार आहे . हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून प्रवेश विनामूल्य आहे.

प्रदर्शन :
स्थळ : शहाजी कॉलेज , यशवंतराव चव्हाण सभागृह ,दसरा चौक , कोल्हापूर
दिनांक आणि वेळ :
१८ जानेवारी २०२५- सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत
१९ जानेवारी २०२५- सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत .
ह्या प्रदर्शनाचे प्रोजेक्ट चेअरमन सुशांत टक्कळकी असून को चेअरमन अमृता वासुदेवन आहेत .
ह्या प्रदर्शनासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मिलींद धोंड , निसर्ग अंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मधुकर बाचुळकर, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.अशोक वाली,मंजिरी कपडेकर ,सौ. सुप्रिया भस्मे, अमृता वासुदेवन, सुशिल रायगांधी, अभिजीत पाटील, सुशांत टकळक्की आदी उपस्थित होते.

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

0

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डिप्लोमा अभियांत्रिकी, शॉर्ट-टर्म विभाग, आयटीआय सर्व शाखांच्या क्रीडा स्पर्धा २०२४-२५ इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट गिरी यांच्या मार्गदर्शना खाली नियोजनबद्ध आणि उत्साहात नुकत्याच संपन्न झाल्या आहे.तीन दिवस चालेल्या या क्रीडा स्पर्धेत सर्व विभागाच्या सिव्हिल, कॉम्पुटर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल विभागांच्या १००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी विविध क्रीडाप्रकारात सहभाग नोंदवला. या क्रीडा स्पर्धेचे प्रमुख समन्वयक प्रा. विनायक पावटे, प्रा. प्राजक्ता मलगे यांनी सामन्यांचे नियोजनबद्ध वेळापत्रक तयार करून सर्व सामने शिस्तबद्ध पार पाडले. या स्पर्धेत सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक, लॅब असिस्टंट आणि ऑफिस बॉय यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
फुटबॉल विजेता संघ एस वाय मेकॅनिकल, उपविजेतासंघ एफवाय-टी वाय सिव्हिल, क्रिकेट विजेता एस वाय टी वाय कॉम्पुटर, उपविजेता एस वाय टी वाय इलेक्ट्रिकल, टग ऑफ वॉर विजेता एफ वाय एस वाय टीवाय कॉम्पुटर उपविजेता- एफ वाय एस वाय टीवाय मेकॅनिकल, कबड्डी मुले विजेता एस वाय सिव्हिल उपविजेता एस वाय टी वाय कॉम्पुटर.वार्षिक क्रीडा स्पर्धेत संजय घोडावत विद्यापीठा चे चेअरमन संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स” या CBSE प्रशिक्षण कार्यक्रमाचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन

0

ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स” या CBSE प्रशिक्षण कार्यक्रमाचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे “ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स” या सीबीएसई बोर्ड मार्फत विशेष कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) चे विशेष प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे.दोन दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी, डॉ. विवेक कायंदे (रजिस्टार संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर ) श्री विपिन भार्गव, उपसंचालक, ISTM (इन्स्टिट्यूट ऑफ सेक्रेटेरियट ट्रेनिंग अँड मॅनेजमेंट) डॉ. सुनील धापटे, संचालक, ओमिटा कन्सल्टन्सी,
श्री. राजीव गर्ग, (प्राचार्य, दत्ता मेघे वर्ल्ड अकादमी, ठाणे,)
मिस पल्लवी, (सेक्शन ऑफिसर, CBSE RO पुणे,)
सस्मिता मोहंती, (व्हेन्यू डायरेक्टर आणि संचालिका-प्राचार्या, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल,) शिल्पा कपूर (डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग कॉर्डिनेटर ) श्री मंदार पसरणीकर (डेप्युटी डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग कॉर्डिनेटर )
तसेच सीबीएसईचे नामांकित प्रशिक्षक, प्रशासकीय अधिकारी आणि विविध शाळांचे प्राचार्य उपस्थित होते.
CBSE च्या “ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स” कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शिक्षकांना नवीन शिक्षण पद्धती, तंत्रज्ञान आणि शैक्षणिक कौशल्यांमध्ये प्रशिक्षित करणे हा आहे. या उपक्रमाद्वारे शिक्षकांच्या व्यावसायिक कौशल्यांमध्ये सुधारणा होऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे ध्येय आहे.
यावेळी बोलताना, श्री. विपिन भार्गव यांनी शिक्षकांसाठी प्रशासकीय प्रशिक्षणाचे महत्त्व विषद केले. डॉ. सुनील धापटे यांनी अभ्यासक्रमातील नाविन्यता आणि विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले. श्री. राजीव गर्ग यांनी शिक्षण व्यवस्थापन आणि शिक्षकांची भूमिका यावर विचार मांडले.
याप्रसंगी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले स्वागत गीत आणि थीम बेस्ड डान्स कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. या सादरीकरणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फोटो पूजन करून दोन दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमाला औपचारिक सुरुवात करण्यात आली. उपस्थित शिक्षक आणि प्रशिक्षकांनी विविध सत्रामध्ये सहभाग घेतला आणि CBSE च्या नवीन उपक्रमांची व कौशल्यांची माहिती घेतली.या प्रशिक्षणामुळे शिक्षकांना नवीन दृष्टिकोन प्राप्त होईल आणि विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात अधिक चांगल्या सुविधा मिळतील, असा विश्वास विवेक कायंदे यांनी व्यक्त केला.
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घेतलेला पुढाकार शैक्षणिक क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले.

सीमा लढ्याच्या खटल्यात महाराष्ट्र सरकारने अनास्था दूर करून मराठी भाषिकांना न्याय द्यावा ! – मनोहर किणेकर, महाराष्ट्र एकीकरण समिती

0

सीमा लढ्याच्या खटल्यात महाराष्ट्र सरकारने अनास्था दूर करून मराठी भाषिकांना न्याय द्यावा ! – मनोहर किणेकर, महाराष्ट्र एकीकरण समिती

कोल्हापूर, १७ जानेवारी (वार्ता.) – महाराष्ट्र शासनाने बेळगाव, भालकी,निपाणी बिदर यांसह ८६५ गावे महाराष्ट्रात समाविष्ट व्हावीत यांसाठी सर्वोच्च न्यायालयात २९ मार्च २००४ ला खटला प्रविष्ट केला आहे. दुर्दैवाने कोरोनाच्या कालखंडानंतर न्यायालयात होणार्‍या सुनावणीसाठी महाराष्ट्राचे कुणीही अधिकारी अथवा अधिवक्ता सुनावणीसाठी उपस्थित नसतात. याउलट कर्नाटकचे अधिकारी, अधिवक्ता प्रत्येक वेळी उपस्थित असतात. न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल; मात्र सीमा लढ्याच्या खटल्यात महाराष्ट्र सरकारने अनास्था दूर करून तेथे सक्षमपणे बाजू मांडून मराठी भाषिकांना न्याय द्यावा, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आणि माजी आमदार मनोहर किणेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. या प्रसंगी समितीचे खचिनदार प्रकाशराव मरगाळे, अधिवक्ता एम्.जी. पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे उपस्थित होते.मनोहर किणेकर पुढे म्हणाले, ‘‘गेली अनेक वर्षे आम्ही या संदर्भातील लढा देत असून समितीच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर ७-८ खटले, तर आमच्यावर २०-२२ खटले आहेत. प्रत्येक आंदोलन झाल्यावर कर्नाटक शासन आमच्यावर खटले नोंद करते. माझ्यावर एका खटल्यात ३०२ सारखी गंभीर कलमेही लावण्यात आली होती. आम्ही मराठी असल्याने आम्हाला कर्नाटक राज्यात चाकरी मिळत नाही. त्यामुळे मराठी युवकांना केवळ केंद्राची सैन्याची चाकरीच केवळ उपलब्ध आहे. त्यासाठी आम्ही यापुढे आता महाराष्ट्रात आंदोलन करणार आहोत. याचा प्रारंभ आम्ही १७ जानेवारीला हुतात्मा दिवसापासून करणार आहोत. या दिवशी मोठ्या संख्येने जमून आम्ही बेळगाव येथून येऊन कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत. यानंतर आंदोलनाची व्याप्ती वाढवत पुढे सांगली, सातारा, पुणे आणि १ मे या दिवशी मुंबईत भव्य आंदोलन करण्याचा आमचा विचार आहे.२१ फेब्रुवारी या दिवशी देहली येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात  या संदर्भात ठराव व्हावा, तसेच भूमिका मांडली जावे, अशी आमची मागणी आहे. त्या संदर्भात आम्ही अध्यक्षा तारा भवाळकर यांना भेटलो आहे. य.दी. फडके जेव्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांच्या भाषणात प्रत्येक पृष्ठावर सीमालढ्याविषयी आणि मराठी बांधवांवर होणार्‍या अन्यायाविषयी मत मांडण्यात आले होते.’’