करवीर तालुक्यातील भुये येथील संतु पाटील घराण्याची पर्यावरणपुरक गणेश मुर्तीची अखंडित परंपरा
कोल्हापूर/प्रतिनिधी : करवीर तालुक्यातील भुये येथील संतु पाटील घराण्याची पर्यावरणपुरक गणेश मुर्तीची अखंडित परंपरा चालूच आहे.आजही संतु पाटील घराण्यातील पिढीने पर्यावरण पूरक गणपतीची प्रतिष्ठापनेची परंपरा जोपासली आहे.आणि त्यातून समाजाला एक वेगळा संदेश दिला आहे. आजच्या काळात गणेशोत्सव साजरा करताना घरगुती असो किंवा सार्वजनिक असो गणेशाची मूर्ती ही प्लँस्टर आँफ पँरिस ची असते त्याचबरोबर मुर्तीला रासायनिक रंग दिला जातो.तसेच मुर्ती विसर्जन नदीमध्ये किंवा विहीर , तलाव यामध्ये करतात या प्लँस्टर मुळे व रासायनिक विषारी कलर मुळे पाणी दुषित होते..जलचर प्राणी तसेच माणसाच्या जीविताला हे हानिकारक आहे पण तरीही लोक या प्लँस्टर आँफ पँरिसच्या मुर्तीचा वापर सर्रास करतात ..पण आजही काही गावांमध्ये कलरविरहीत इको फ्रेंडली गणेश मुर्ती गणेशोत्सव साठी वापरतात.
यामध्ये करवीर तालुक्यातील भुये या गावांमध्ये पुर्वी पासुन आजही इको फ्रेंडली कलरविरहीत गणेश मुर्तीचा वापर करतात.विशेषतः भुये गावातील संतु पाटील घराण्याने आजही ही परंपरा चालू ठेवली आहे .त्यांच्या घरी गेल्या सहा ते सात पिढ्यांपासून शाडुची आणि रासायनिक रंग विरहीत सिंहासनाधिष्ठीत व एकाच आकाराची गणेश मुर्ती घरी बसवली जात आहे.. त्यांनी जपलेली इको गणेश मुर्तीची ही परंपरा खुपच कौतुकास्पद आणि लोकांना प्रेरणादायी आहे*सध्या संतू पाटील घराण्याची सहावी पिढी कार्यरत असून त्यांनीही ही परंपरा जोपासली आहे.मूर्तिकार अनिल वागवेकर( कुंभार) पापाची तिकटी कोल्हापूर यांनी ही पर्यावरण पूरक मूर्ती तयार केली आहे.
मूर्ती प्रतिष्ठापना प्रसंगी बाजीराव पाटील (दादा ) शिवाजी पाटील ,अमर पाटील ,प्रणव पाटील ,पार्थ पाटील ,केदार पाटील ,वेद आणि सई तसेच संतू पाटील घराण्यातील सर्व सदस्य उपस्थित होते.