Saturday, June 28, 2025
spot_img
Homeताज्या‘‘टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु" बनविण्याच्या प्रकल्पांना प्रोत्साहन देऊया - आमदार जयश्री जाधव

‘‘टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु” बनविण्याच्या प्रकल्पांना प्रोत्साहन देऊया – आमदार जयश्री जाधव

‘‘टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु” बनविण्याच्या प्रकल्पांना प्रोत्साहन देऊया – आमदार जयश्री जाधव

स्पर्धेचे बक्षीस वितरण : शितल पावसकर प्रथम

कोल्हापूर/प्रतिनिधी : ‘वापरा आणि फेका’ वृत्तीमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते. त्यामुळे ‘‘टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु” बनविण्याच्या कल्पना व प्रकल्पांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकांना रोजगार व अर्थाजनाचे माध्यम उपलब्ध होईल. तसेच आधीच्या वस्तूंचा पुरेपूर वापर देखील होईल असा विश्वास आमदार जयश्री जाधव यांनी व्यक्त केला.
जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनतर्फे आयोजित ‘‘टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु” बनवण्याच्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता सत्यजित जाधव होत्या.आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, दैंनदिन जीवनात आपण कितीतरी वस्तु वापरतो आणि नंतर टाकुन देतो. त्या वस्तु वापरल्यानंतरही न टाकता, आपण त्याला कसे नवे रूप, आकार देवु शकतो आणि त्याचा परत वापर करून घेऊ शकतो याबाबतच्या याबाबत महिलांच्या नवनवीन आयडियांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी फाउंडेशनने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेतील विजेत्यांनी स्पर्धेपुरत्या या वस्तूचा तयार न करता, यातून स्वतःचा व्यवसाय सुरू करावा.
स्पर्धेतील अनुक्रमे विजेते पुढील प्रमाणे : प्रथम – शितल पावसकर, द्वितीय विभागून – प्रतीक्षा शिंदे, पल्लवी भोसले, तृतीय – गीतांजली डोईफोडे, उत्तेजनार्थ – ऐश्वर्या साळोखे, शिल्पा मराठे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments