आमदार हसन मुश्रीफ यांची मंदिरे बांधकामाची पुण्याई मोठी – परमपूज्य श्री. भगवानगिरी महाराज यांचे गौरवोद्गार
झुलपेवाडी येथे श्री. दत्त मंदिराचा वास्तुशांती सोहळा, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा उत्साहात
झुलपेवाडी/प्रतिनिधी : आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी विविध देव-देवतांची ७०० हून अधिक मंदिरांचे बांधकाम केले. राजकारण आणि समाजकारणातील त्यांची ही पुण्याई मोठी आहे, असे गौरवोद्गार नूल येथील रामनाथ गिरी समाधी मठाचे मठाधिपती परमपूज्य श्री. भगवान गिरी महाराज यांनी काढले.
झुलपेवाडी ता. आजारा येथे श्री. दत्त मंदिराचा वास्तुशांती सोहळा, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण समारंभ मोठ्या उत्साहात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हसनसाहेब मुश्रीफ उपस्थित होते. ग्रामस्थांकडून लोकवर्गणी व आमदार श्री. मुश्रीफ यांचा ५१ लाख रुपये निधी असे खर्च करून हे सुंदर मंदिर उभारले आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला परमपूज्य श्री. भगवानगिरी महाराज आणि आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांची भजनाच्या गजरात सवाद्य मिरवणूक निघाली. यावेळी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिक आणि माहेरवाशींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.भाषणात आमदार हसनसाहेब मुश्रीफ म्हणाले, गेल्या ३० -३५ वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक कारकीर्दीत विविध देव-देवतांची ७०० हून अधिक मंदिरे बांधल्याचे आत्मिक समाधान फार मोठे आहे.
हीच खरी ईश्वरसेवा
भाषणात परमपूज्य श्री. भगवानगिरी महाराज म्हणाले, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांची प्रतिमा “गोरगरिबांचा श्रावणबाळ” अशी झाली आहे. कारण; त्यांनी राजकीय सत्तेचा वापर गोरगरिबांचे अश्रू पुसण्यासाठी केला. विशेषता; त्यांच्या हातून झालेले रुग्णसेवेचे काम अलौकिक आहे. गोरगरीब रुग्णांच्या सेवाकार्यातून त्यांनी “रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा” असल्याचे सिद्ध केले आहे.
श्री दत्त मंदिरासाठी जमीन मोफत जमीन दिलेल्या कै. आबासाहेब माने यांच्या कुटुंबीयांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.यावेळी सरपंच सौ. अर्चना सुतार, मंदिर समितीचे अध्यक्ष शामराव जाधव, उपाध्यक्ष पी. डी. माने, काशिनाथ तेली, शिरीष देसाई, मारुतराव घोरपडे, देवदास जाधव, श्रीकांत जाधव, श्रीकांत धुमाळ, सुभाष आळवेकर, सुधाकर माने, शिवाजी पावले, सदाशिव जाधव, गोपाळ तोडकर, शांताराम पावले, तानाजी पाटील, उद्धव माने, बाळासाहेब धामणकर, धोंडीराम माने, संदीप ठाणेकर आदी प्रमुख उपस्थित होते.स्वागत उद्धव माने यांनी केले. प्रास्ताविक बाजीराव देसाई यांनी केले. आभार शिवाजी जाधव यांनी मानले.