गव्याच्या हल्ल्यात पन्हाळा तालूक्यातील कसबा ठाणे येथील माजी उपसरपंच माणिक पाटील यांचा जागीच मूत्यू
कोल्हापूर/प्रतिनिधी : मानवी वस्तीत गव्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यात गव्यांच्या हल्ल्यात अनेक लोक मृत्यू पावत आहेत तर जखमी होत आहेत.आजही एकाचा गव्यांच्या हल्ल्यात मृत्यू हा झाला आहे.
र्वेरण आणण्यासाठी शेताकङे जात आसताना गव्याने हल्ला केल्याने पन्हाळा तालूक्यातील कसबा ठाणे येथील माजी उपसरपंच माणिक बळवंत पाटील वय ४८ यांचा जागीच मूत्यू झाला.
आज दूपारी दोन वाजण्याच्या सूमारास म्हारकी नावाच्या शेतात जणावरानां र्वेरण आण्यासाठी जात असताना गवा मक्क्याच्या शेतात उभा होता. यावेळी गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या छातीत शिंग घूसल्याने ते जागीच ठार झाले. या घटनेची माहीती मिळताच शेजारील शेतकर्यांनी त्यानां उपचारासाठी सी. पी. आर रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मूत्यू झाला.त्यांच्या पश्यात आई,पत्नी,दोन मूली असा परिवार आहे.