भारत अँग्रो सर्विसेस व महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादन संघाच्या वतीने आज १२ मार्च रोजी राज्यस्तरीय ऊस विकास परिषदेचे आयोजन
कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ व भारत अँग्रो सर्व्हिसेस यांच्या वतीने उद्या १२ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे. महाराष्ट्र ऊस भूषण कार्यगौरव पुरस्कार २०२२ पुरस्कार वितरण सोहळा आर. के.मंगल कार्यालय,बामणी, ता. कागल जिल्हा कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती भारत सर्व्हिसेस चेअरमन सत्यजीत विजय भोसले यांनी परिषदेत दिली.
या ऊस परिषदेत महाराष्ट्रातील ऊस शेतीचे आजचे चित्र सर्वांना परिचित आहे. ऊस शेती करणारे शेतकऱ्यांची परिस्थिती बरीचशी आज नाजूक झालेली आहे.शेतीमधील वाढत आहेत. समस्यांवर उपाय योजनांसाठी ऊस शेतीतील विचारवंत आणि ऊस शेतीशी पूरक उद्योजकांनी एकत्रित या परिस्थितीवर योग्य चर्चा करून त्यांचे कारणे शोधून त्यावर ठोस उपाययोजना सुचविण्याची गरज निर्माण झाली आहे म्हणूनच कोल्हापूरातील गेली ४० वर्षे शेतकरी शेतीविषयक कार्यात अग्रेसर असणारे भारत अँग्रो सर्व्हिसेस या संस्थेने परिषदेमध्ये आपला सहभाग नोंदविला आहे. संस्थेचा ऑरमिकेम ब्रँड शेतक-यांमध्ये लोकप्रिय बनविण्यात भोसले यांनी योगदान दिले आहे. म्हणूनच शेतक-यांसाठी आयोजित ऊस विकास परिषदेचे भारत ॲग्रो सर्व्हिसेस महाराष्ट्र उत्पादक संघ यांनी एकत्रित आयोजित केले आहे. या परिषदेत २१ शेतकऱ्यांचा,५ ऊस विकास अधिकारी आणि २ कृषी पत्रकार यांचा सन्मान करण्यात येणार आहे.अशी माहिती या भारत अँग्रोचे चेअरमन सत्यजीत भोसले आणि महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुल नाना माने पाटील दिली आहे.
या ऊस परिषदेत कृषिरत्न डॉ.अरुण मराठे, ऊस विकास अधिकारी संजीव माने, संतोष सहाणे, श्री. उत्तम परीट आदी मार्गदर्शन करणार आहेत.तरी या ऊस परिषदेत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन सत्यजित भोसले, अतुल दादा माने पाटील यांनी या पत्रकार परिषदेत केले आहे. या पत्रकार परिषदेसाठी श्री अरुण मराठे उपस्थित होते.
या राज्यस्तरीय ऊस विकास परिषदेच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र रण्याचे माजी मंत्री.आमदार हसन मुश्रीफ,खा. संजय मंडलिक यांची उद्घाटक म्हणून उपस्थिती असणार आहे.तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अतुल नाना माने पाटील यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी केळी उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष किरण भाऊ चव्हाण, अन्नपूर्णा शुगरचे चेअरमन माजी आमदार संजय घाडगे, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक प्रताप भैय्या माने,राज्य उस संघाचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र डुचे पाटील,ऊस संघाचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ हुलगे,टोकाई शुगर हिंगोली चे उपाध्यक्ष शिवाजीराव सवंडकर आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी चर्चासत्रात संजीवदादा माने हे एकरी शंभर टन सहज शक्य या विषयावर तर शामकांत पाटील हे ऊस सिंचन प्रणाली व फायदे या विषयावर आणि डॉ. अरुण मराठे हे उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य खत व्यवस्थापन या विषयावर तर उत्तमराव परीट हे आदर्श ऊस शेती पॅटर्न या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
महाराष्ट्र राज्य ऊस भूषण पुरस्कार ऊस शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य व १०० टन उत्पादन घेतलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य व उत्पादक संघ यांच्या वतीने पुरस्कार देण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी या ठिकाणी पार पडणार असून यावेळी कार्यक्रमासाठी केळी उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष किरण भाऊ चव्हाण,विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगिरे, पंचायत समिती कृषी अधिकारी कागल बी. एन. कुंभार,प्रा. समिती कोल्हापूर उमेश पाटील,तालुका कृषी अधिकारी कागल अरुण भिंगारदिवे, जैन इरिगेशन सि. लि. जळगाव चे शामकांत पाटील,भारत ऍग्रो चे चेअरमन सत्यजित भोसले आदी उपस्थित राहणार आहेत.तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे संस्थापक अतुल नाना माने पाटील यांची उपस्थिती असणार आहे.