Monday, June 30, 2025
spot_img
Homeताज्याआज होणार फैसला

आज होणार फैसला

आज होणार फैसला

 

कोल्हापूर/श्रद्धा जोगळेकर : भारत देशातील लोकसभेच्या निवडणुका ७ टप्प्यांमध्ये पार पडलेल्या आहेत.याचा निकाल आज चार जून रोजी लागणार असून देशातील सर्वच उमेदवारांचे भवितव्य आज निश्चित होणार आहे. सर्वच पक्षाच्या वतीने आपल्या उमेदवारांचा प्रचार चांगल्या पद्धतीने केला गेला आहे. त्यामुळे आता मतमोजणी मधून कोणता उमेदवार बाजी मारणार हे आजच्या मतमोजणी नंतर कळणार आहे.मात्र एक्झिट पोलमध्ये देशांमध्ये नरेंद्र मोदी यांची सत्ता येणार आहे असे सांगितले गेले आहे. तर महाराष्ट्रातील चित्र वेगळे असणार आहे असेही सांगितले गेले आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला फायदा होण्याची शक्यता आहे असेही सांगितले गेले आहे. तर अबकी बार ४०० पार म्हणणाऱ्या भाजपला तिसऱ्यांदा यश मिळेल असाही पोल सांगितला गेला आहे. मात्र याबाबत चर्चा होऊ लागलेल्या आहेत एक्झिट पोल बाबतही विरोध दर्शविला जात आहे. खरे पाहता आज मतमोजणीनंतर भारत देशातील सत्ता कोणाची येणार याचे भवितव्य कळणार आहे.त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार कोणता उमेदवार आघाडी घेणार हे चित्र त्याच्या मतमोजणी मध्ये स्पष्ट होणार आहे. सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी आणि नेत्यांनी चांगल्या पद्धतीने प्रचार हा केलेला आहे. आता केवळ निकाल लागणे बाकी आहे. बऱ्याच उमेदवारांचे फलक हे ठिकठिकाणी विजयाचे झळकलेले आहेत. मतमोजणी आधीच उमेदवारांचे फलक ठिकाणी झळकल्याने याबाबत ही चर्चा जोरदार रंगत चालल्या आहेत. एकूणच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी आपला उमेदवार निवडून यावा यासाठी कंबर कसून प्रचार केलेला आहे. आता याचे फलित आजच्या मतमोजणी मध्ये दिसून येणार आहे. त्यासाठी सर्वच उमेदवार यांची धास्ती वाढलेली आहे. निवडणूक म्हटले की हार जीत ही पत्करावीच लागते त्यामुळे उमेदवारांनी आपला मत मोजणीकडे लक्ष केंद्रित केलेले आहे. प्रशासनानेही जोरदार तयारी मत मोजणीची केली आहे. देशाची सत्ता कोणाच्या हाती जाते याबाबत गेल्या महिनाभर चर्चा सुरू आहेत. सात टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानानंतर आता मतमोजणीची प्रतीक्षा सर्वांनाच आहे ही प्रतीक्षा आज चार जून रोजी संपणार आहे. आणि उमेदवारांचे भवितव्य निश्चित होणार आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने निवडणुकीसाठी उमेदवार प्रचार करून आपला विजयाचा तयारी करत असतो.त्याच पद्धतीने आता मतमोजणी मध्येही त्याची धास्ती ही वाढत चाललेली आहे. मात्र प्रत्येकालाच आपण या निवडणुकीच्या माध्यमातून निवडणुकीमधून विजय होणार असे वाटू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांमध्ये बऱ्याच ठिकाणी सभा या घेतलेल्या आहेत त्यामुळे भाजपचा प्रत्येक उमेदवाराला आपली विजयाची खात्री वाटत चालली आहे. मात्र महाराष्ट्र मधील चित्र फारच वेगळे असणार आहे.कारण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने फोडाफोडीचे राजकारण झाले आहे त्याचा परिणाम भाजपाला बसू शकतो, असेही बोलले जात आहे. एक्झिट पोलच्या माध्यमातून हेच सांगितले गेलेले आहे मात्र मतमोजणी आणि प्रत्यक्ष निकाल काय लागतो यामधूनही खरे चित्र स्पष्ट होणार आहे. एक्झिट पोलच्या माध्यमातूनही विरोध केला गेलेला आहे. आता मात्र याबाबत अधिक चर्चा न करता आज लागणाऱ्या निकालाकडे सर्वजण लक्ष देऊन आहेत.आज मतमोजणीकडे आणि आपल्या विजयाकडे उमेदवारांचे लक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments