माजी कुलगुरुच्या कारने सायबर चौकात चार गाड्यांना उडविले कार चालकासह तीन जणांचा मृत्यू,पाच जण गंभीर जखमी
कोल्हापूर/प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू आणि भारती विद्यापीठाचे माजी संचालक डॉ.व्हि.एम.चव्हाण (७४,रा. वैभव हौ.सोसायटी,शाहू टोल नाका कोल्हापूर) हे त्यांच्या चारचाकी गाडीतून शिवाजी विद्यापीठ मार्गावरुन सायबर चौकातून जात असताना, दुपारी अडीचच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने गाडी अनियंत्रित झाली. त्यात ब्रेक ऐवजी ॲक्सीलेटरवर त्यांचा पाय पडल्याने सायबर चौकात मोठा अपघात घडला.या अपघातात कारने चार गाड्यांना उडविले यात कार चालकासह तीन जणांचा मृत्यू हा झाला आहे. ब्रेक ऐवजी ॲक्सीलेटरवर त्यांचा पाय पडल्याने अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.या अनियंत्रित चार चाकी गाडीने चौकातील दुचाकींना अक्षरशः चिरडले, ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोघेजण हवेत १० ते १२ फूट उडाले.आणि दुचाकींना २० फूट फरपटत नेऊन सिग्नलच्या खांबाला धडकून चार चाकी गाडी पलटी झाली.सायबर चौकात भरधाव वेगाने येणाऱ्या या कारने वाहनांना धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु वसंत मारुती चव्हाण (वय ७४.रा शाहु टोल नाका) ,अनिकेत चौगुले (वय २२.रा पोर्ले तर्फ ठाणे ),हर्षद सचिन पाटील (वय १६.)आणि प्रथमेश सचिन पाटील ( वय १९.दोघे रा .दौलतनगर ,राजारामपुरी कोल्हापूर ) ह्या दोघा सख्या भावासह अन्य दोघे जण मयत झाले असून तिघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक माहिती अशी की,यातील मयत माजी कुलगुरू हे स्वतः कार चालवित भरधाव वेगाने कार चालवित येत असताना त्यांना अचानक हार्ट अटॅक आल्याने त्यांचा पाय ब्रेकवर पडण्या ऐवजी अँक्सीलेटरवर पडल्याने त्यांनी चार पाच वाहनांना उडविल्याची माहिती समोर आली आहे.हर्षद आणि प्रथमेश हे दोघे सख्खे भाऊ दुपारच्या सुमारास राजाराम तलाव येथे पोहण्यास गेले असताना ही दुर्घटना घडली असून यां दोघांना त्याची आई जेऊन बाहेर जावा असे म्हणत असल्याचे त्यांच्या नातेवाईकाकडुन माहिती मिळाली.अनिकेत चौगुले हा एका कंपनीत नोकरी करत असल्याचे समजले.तो एकुलता एक मुलगा होता.माजी कुलगुरू वसंत मारुती चव्हाण हे आपल्या कुंटुबिया समवेत रहात असून त्यांना पत्नी ,दोन विवाहित मुली आणि एक मुलगा कॉलेज मध्ये शिकत आहे.हर्षद सचिन पाटील मयत झाल्याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.