Friday, June 27, 2025
spot_img
Home Blog Page 9

नेहरूनगर येथील स्वामी भक्त मंडळातर्फे पारायण सह विविध धार्मिक कार्यक्रमाने प्रकट दिन साजरा

0

नेहरूनगर येथील स्वामी भक्त मंडळातर्फे पारायण सह विविध धार्मिक कार्यक्रमाने प्रकट दिन साजरा

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन होस्पीटल परिसरातील नेहरूनगर येथील स्वामी भक्त मंडळातर्फे पारायण सह विविध धार्मिक कार्यक्रमाने आज स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा करण्यात आला.गेली तीन दिवसापासून पहाटे महिलांनी स्वामी समर्थ मंदिरात पारायण केले.त्यानंतर दररोज आरती करण्यात आली.आज प्रकट दिनानिमित्त पालखी सोहळा पार पडला.पारंपरिक वेशभूषा करून महिलांनी पालखी सोहळ्यात लेझिम पालखी मार्गावर सादर केले.
नेहरूनगर येथील श्री. दत्त मंदीर आणि स्वामी समर्थ मंदिरतर्फे वेगवेगळे सामाजिक आणि अध्यात्मिक उपक्रम राबवले जातात.
श्रीदत्त भक्त मंडळाचे सौ.गायत्री हासुरकर,सौ.श्वेता कुलकर्णी,किरण रणदिवे, अतुल हासुरकर, विजय चव्हाण, गजानन शिंदे, जयसिंग राऊत, पुरुषोत्तम कुलकर्णी आदींनी व भक्तांनी परिश्रम घेतले.

श्री वसंतराव चौगुले पतसंस्थेची १००० कोटी व्यवसायाकडे वाटचाल

0

श्री वसंतराव चौगुले पतसंस्थेची १००० कोटी व्यवसायाकडे वाटचाल

गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एका दिवासात १७ कोटीच्या ठेवी

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री वसंतराव चौगुले नागरी सहकारी पतसंस्थेने चालू आर्थिक वर्षात उल्लेखनिय आर्थिक प्रगती
साध्य करत संस्थेने सभासद ठेवीदार यांच्या मदतीने गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एका दिवासात १७ कोटी
इतक्या ठेवी गोळा करुन सहकार क्षेत्रामध्ये आदर्श निर्माण केला आहे. संस्थेने ५०० कोटी ठेवींचे लक्ष ठेवून
२३ शाखांव्दारे अविरत सेवा देत संस्थेने ठेवी ३६० कोटी, कर्ज २५७ कोटी, व गुंतवणूक ११० कोटी असा
७२७ कोटींचा संमिश्र व्यवसाय केलेला आहे.
संस्थने बँकींग क्षेत्रामध्ये कोअर बँकींग प्रणालीचा उपयोग करुन सभासद व ग्राहकांचे हीत
साधले आहे. बँकींग व्यवसायाबरोबरच संस्था RTGS, NEFT, वेस्टर्ण मनी ट्रान्सफर, क्यू आर कोडव्दारे
संस्थेच्या कोणत्याही शाखांमध्ये रक्कम जमा करण्याची सोय, सर्व शाखामध्ये वीज बील वसुली केंद्रे, सर्व
शाखामध्ये लॉकर्स अशा सुविधा देऊन सभासद व ग्राहकांचे आपुलकीचे नाते निर्माण केले आहे. सभासद व
ग्राहकांच्या साथीने संस्थेने चांगली प्रगती केली आहे. संस्थेचा ऑडिट वर्ग सतत अ असून संस्था प्रतिवर्षी
सभासदनां लाभांश देत आहे. असे सांगतानाच सर्व शाखा स्वमालकीच्या असल्यामुळे संस्थेची स्थिती भक्कम
असल्याचे संस्थेचे चेअरमन मा.अनिल पाटील यांनी सांगितले. यावेळी व्हा.चेअरमन मा. श्रीकांत नागवेकर,
मा. मनिष चौगुले, मा. सुमित चौगुले, संचालक मा. प्रविण पाटील, मा. अमरनाथ गाताडे, मा. अभिजीत
मणियार, मा.अरुण बहिरशेट, मा. बाजीराव रावण, मा. विनित सरगर, मा. बाबुराव कांबळे, सौ. मनिषा
कुलकर्णी व असि.जनरल मॅनेजर मा. तुकाराम द. पाटील, मा.शशिकांत मोरे, मा.वसंतराव चव्हाण, बोर्ड
सेक्रेटरी कुंतिनाथ शेटे, संगणक व्यवस्थापक राजेंद्र कोळी आदी उपस्थित होते

एक एप्रिलपासून गाय दूध खरेदी दरात वाढ

0

एक एप्रिलपासून गाय दूध खरेदी दरात वाढ

राज्याचा दूध महासंघ म्हणून गोकुळची ओळख निर्माण करू : वैद्यकीय शिक्षण मंत्री
मा.नाम.हसन मुश्रीफसो

‘गोकुळ’ च्या माध्यमातून दूध उत्पादकांना नेहमीच न्याय देण्याची भूमिका : माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गोकुळ पेट्रोल पंप उद्‌घाटन, विविध बक्षीस वितरण, सायलेज बेलर व हार्वेस्टर मशिनरीचे अनावरण शुभारंभ सोहळा संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गोकुळच्या नवीन पेट्रोल पंपाचे, सायलेज बेलर व हार्वेस्टर मशिनरीचे उद्‌घाटन व ‘गोकुळ श्री’ स्पर्धेतील विजेत्यांना तसेच विविध बक्षीस वितरण खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ तसेच आमदार सतेज उर्फ बंटी पाटील व आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते व आघाडीचे नेते, संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व सर्व संचालक मंडळ, प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत रविवार दि.३०/०३/२०२५ इ.रोजी गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे संपन्न झाला. यावेळी बोलताना नामदार हसन मुश्रीफ म्हणाले कि, गोकुळने दूध उत्पादकांच्या हिताचे अनेक निर्णय घेवून दूध उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सौर उर्जा प्रकल्प, हर्बल पशुपूरक प्रकल्प, स्लरी प्रकल्प, वाशी (मुंबई) येथे दुग्ध शाळेचे विस्तारीकरण असे महत्वकांशी व संघ हिताचे प्रकल्प राबविण्यामध्ये यशस्वी झालो असून संघाने दूध वाढ कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबविला. आपण सर्वांनी प्रयत्न करून गेल्या वर्षामध्ये चांगल्या पद्धतीचं संकलन केलं आणि आपण १९ लाख लिटर पर्यंत पोहोचलो असून संघाच्या विविध योजना राबवून गोकुळचा २५ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा दूध उत्पादकांच्या सहकार्याने निश्चीतच पार पाडू असा विश्वास व्यक्त केला. गोकुळ देशातील सगळ्यात चांगला ब्रँड बनवून गोकुळच्या नावावरच राज्याची दूध विक्री व्हावी व राज्याचा दूध महासंघ म्हणून गोकुळची ओळख निर्माण करण्यासाठी आपण सर्वजन प्रयत्नशील राहू.
यावर्षी गाय दूध पावडर आणि बटरला चांगले बाजारपेठ मिळाल्यामुळे गोकुळच्या गाय दूध उत्पादकांना १ एप्रिल पासून गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर २ रुपये वाढ प्रतिलिटर २० पैसे जादा दूध दरफरक व संघाच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने प्राथमिक दूध संस्थांना जाजम (जमखाना) व घड्याळ तसेच संघ कर्मचाऱ्यांना बक्षीस देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले
यावेळी बोलताना माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटीलसो म्हणाले कि, चार वर्षात दूध खरेदी दरात अकरा रुपयांची वाढ केली आहे. गोकुळमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यापासून दूध उत्पादक हिताचा कारभार करत आहे. गेल्या चार वर्षात दूध खरेदी दरात अकरा रुपयांची दरवाढ केली. गोकुळला मिळणाऱ्या एक रुपया उत्पन्नातील ८५. ६८ पैसे इतका परतावा दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिला जातो. जिल्हा मध्यवर्ती बँक आणि गोकुळ दूध संघ या संस्था राजकारण विरहित आहेत. यावर लाखो लोकांचे जीवन अवलंबून आहे. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्याना, दूध उत्पादकांना न्याय देण्याची भूमिका आहे.’
यावेळी बोलताना आमदार चंद्रदीप नरके म्हणाले कि, अलीकडच्या काळामध्ये दुधाचा उद्योग हा खऱ्या अर्थाने कुटुंब चालवायला आणि मुख्य व्यवसाय म्हणून केला जात असून दुग्ध व्यवसायाला गती देण्याचे काम गोकुळने केले आहे. गोकुळ मध्ये चांगल्या पद्धतीने कारभार चालू असून दुध उत्पादकांना अधिकाधिक दर देण्याच्या दृष्टीने सौर उर्जेसारखा चांगले उपक्रम राबविले जात आहेत हे कौतुकास्पद असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले कि, खासदार शाहू महाराज यांनी गोकुळ दूध संघ हा साऱ्यांना बरोबर घेऊन वाटचाल करणारा संघ आहे. विविध पक्षाचे लोक येथे एकत्रितपणे शेतकऱ्यासाठी काम करत असल्याचे चित्र आहे.’गोकुळचे सहकारातील कार्य चांगले असल्यामुळेच दूध उत्पादकांना दुधाचा दर सातत्याने चांगला मिळत आहे.

यावेळी प्रास्‍ताविक भाषणामध्ये बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळने सर्व संचालक मंडळ व नेते मंडळीच्या मार्गदर्शना खाली अनेक प्रकल्प राबविले असून त्यानुसार गोकुळने पेट्रोल पंप सुरु केला आहे. हा पेट्रोल पंप गोकुळशी संबंधित सर्वांसाठीच फायदेशीर ठरणार आहे. तसेच संघामार्फत स्थापन केलेल्या वैरण बँकेकडे सायलेज बेलर व हार्वेस्टर मशीनद्वारे तयार होणारे सायलेज मार्केट मधील इतर सायलेज पेक्षा निश्चितच गुणवत्तापूर्ण व स्वस्तही असेल त्यामुळे मार्केटमधील सायलेजच्या दरवाढीस आळा बसेल परिणामी पशुपालकांचा दूध व्यवसाय सोपा, फायदेशीर व आधुनिक बनण्यास मदत होईल. जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असल्याचे मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमावेळी सन २०२३-२४ मध्ये जिल्ह्यास्तरीय तसेच तालुकास्तरीय गाय / म्हैस जास्तीत जास्त दूध पुरवठा, म्हैस उत्तम प्रत दूध पुरवठा, महिला दूध संस्था, तसेच जास्‍तीत-जास्‍त दूध विक्री करणा-या दूध वितरकांचाही सत्‍कार व बक्षीस वाटप तसेच स्लरी धनादेश, हिरक महोत्सवी भेटवस्तू वाटप उपस्थितीत मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमावेळी कोल्हापूर मध्ये सर्किट बेंच मंजूर करण्याचा ठराव सर्वानुमते सहमत करण्यात आला.

तसेच मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली, या कार्यक्रमाचे स्‍वागत संघाचे ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील यांनी केले, तर आभार संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांनी मानले.

यावेळी याप्रसंगी खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के.पी.पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, भारत पेट्रोलियमचे अजय रोके व जिल्ह्यातील दूध संस्था प्रतिनिधी, दूध उत्पादक, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गोकुळ’ नेहमीच दूध उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा : अरुण डोंगळे चेअरमन, गोकुळ दूध संघ

0

‘गोकुळ’ नेहमीच दूध उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा : अरुण डोंगळे चेअरमन, गोकुळ दूध संघ

‘गोकुळ’मार्फत दूध उत्पादक व विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार

कोल्‍हापूर/प्रतिनिधी : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा. संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या वतीने शिरोळ तालुक्यातील आदर्श दूध उत्पादकांचा व संघाचे संचालक चेतन नरके यांची महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक विकास समितीवर सल्लागार पदी व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून पोलिस निरीक्षक पदी निवड झालेबद्दल प्रशांत आनंदा इंजर रा.खोकुर्ले पैकी पडळवाडी यांचा सत्कार संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्‍ते व सर्व संचालक मंडळाच्‍या उपस्थित गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे करण्‍यात आला.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्‍हणाले कि, गोकुळ नेहमीच दूध उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून शिरोळ तालुक्यातील दूध उत्पादकांच्या संघाच्या विविध योजना राबवून आदर्श दूध व्यवसाय करून आपली प्रगती साधली आहे. खास करून संघाच्या वासरू संगोपन योजनेमध्ये सहभाग घेऊन जातिवंत जनावरे पैदास केली आहेत. हि बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. जातिवंत जनावराबरोबर दूध उत्पादन वाढविण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना गोकुळ दूध संघ सर्वोतोपरी सहकार्य करण्यास कटिबध्द आहे. असे श्री डोंगळे यांनी सांगितले. गगनबावडा तालुक्यातील पोलिस निरीक्षक म्हणून प्रशांत इंजर त्यांच्या भावी वाटचालीस संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शिरोळ तालुक्यातील अ.लाट येथील रावसाहेब गिरमल, आदिनाथ गिरमल, चिपरी येथील अभिजित पाटील, जैनापूर येथील शक्तीकुमार पाटील, कल्पना बिरंजे, दानोळी येथील धन्यकुमार पाराज, परशराम सावंत, दिलीप केकले, रोहित पाराज, सुकुमार पाटील तसेच उमळगाव येथील विनायक ठोंबरे व उदगाव येथील प्रशांत कोळी, प्रमोद कोळी या दूध उत्पादकांचा आदर्श दूध उत्पादक, आदर्श सचिव व आदर्श म्हैस व गाय गोठा तयार केल्याबद्दल गोकुळ संघामार्फत सत्‍कार करणेत आला.
याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील –चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, अंबरिषसिंह घाटगे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, तसेच सत्कारमूर्तीच्या कुटुंबातील सदस्य, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

परिक्रमा उचलताना मनात दाटलेले भाव आणि परिक्रमा पूर्ण केल्यानंतर मनात दाटलेले भाव पार अंतरगं बदलून टकणारे आहेत : शिवरूप सूर्यकांत गायकवाड

0

परिक्रमा उचलताना मनात दाटलेले भाव आणि परिक्रमा पूर्ण केल्यानंतर मनात दाटलेले भाव पार अंतरगं बदलून टकणारे आहेत : शिवरूप सूर्यकांत गायकवाड

नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आलेल्या सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त शिवरूप सुर्यकांत गायकवाड व त्यांच्या बरोबर श्री. हरिश बिलीमौरीया व प्रा. गिरीश अभ्यंकर यांचा करण्यात आला सन्मान

कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या करविर नगरीचे तीन सुपूत्र १२३ दिवसात पायी ३५०० किलोमिटरची नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आले आहेत. या मध्ये सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त शिवरूप सुर्यकांत मायकवाड व त्यांच्या बरोबर श्री. हरिश बिलीमौरीया व प्रा. गिरीश अभ्यंकर यांनीही परिक्रमा पूर्ण केली आहे. तसेच यापूर्वी नर्मदा परिक्रमा पुर्ण केलेल्या इतर परिक्रमावासीयांचा सहज सेवा ट्रस्टच्या वतीने आज परिक्रमा पुर्ण केल्याबद्दल गौरव करण्यात आला. आहे.
१८ नोव्हेंबर २०२४ रोजी ही नर्मदा परिक्रमा यात्रा या तिघांनी सुरू केली होती. या परिक्रमेची सुरुवात ओंकारेश्वर येथून सुरू झाली पुन्हा ती ओंकारेश्वर येथे संपली तर दक्षिण तट आणि उत्तर तट अशा दोन विभागात ही परिक्रमा करण्यात आली. या परिक्रमेचा शुल पाणी जंगल हा भाग लांब अंतराचा होता. हे तिघे दररोज २० किलोमीटर पायी चालत होते.
कार्यक्रमाची सुरुवात कन्यापूजनाने करण्यात आली.त्याच वेळी वरील परिक्रमावासी त्यांचे अनुभव ही कथन करणार आहेत.सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त शिवरूप सुर्यकांत गायकवाड व त्यांच्या बरोबर श्री. हरिश बिलीमोरीया व प्रा. गिरीश अभ्यंकर यांनी आपले अनुभव यावेळी उपस्थितांना सांगितले.
यावेळी शिवरूप सूर्यकांत गायकवाड यांनी आपले अनुभव सांगताना असे सांगितले की, नर्मदे हर चा जयघोष करवासा वाटला कारण अजूनही नर्मदा मैय्या डोळया समोरन जात नाही. जिचं प्रथम दर्शन, तिच्या उत्तर आणि दक्षिण दोन्ही तटावर असणारे गावे, मंदिरे, प्रत्येकाच्या वेगवेगळ्‌या कथा… शूलपाणी जंगलातील पायी सफर, दाट अरण्यातील अनुभव, वाटेत भेटलेले परिक्रमावासी… या सगळ्‌याच आठवणींचा एक कोलाज मनामध्ये भरुन गेला आहे. चार महिन्याच्या परिक्रमेत आलेले अनुभव असे सांगत बसलो तर किती रात्री आणि किती दिवस असे जातील याची मोजदाद नाही. परिक्रमा उचलताना मनात दाटलेले भाव आणि परिक्रमा पूर्ण केल्यानंतर मनात दाटलेले भाव पार अंतरगं बदलून टकणारे आहेत. मैय्याची पवित्रता मनातील अहंकार धुवुन टाकणारी आहे. याची जाणिव प्रत्येक वळणावर होत होती. पाठीवरच सामान, हातात काठी, अंगावर श्वेत वस्त्र लेवून फक्त चालत रहायचं. मुक्कामाच्या ठिक़ाणी कधी जेवण मिळायचं कधी स्वत:ला बनवावं लागायचं… बालभोग अर्थात नाष्ता बहुतेकदा मिळायचा. पण जेव्हा मिळायचा नाही तेव्हा कुणी ना कुणीतरी, कठल्या ना कूठल्या ना कुठल्या रुपात येवून नाष्ता द्‌‌‌यायचा. हे सगळे अनुभव माझ्या गाठीशी आहेत. नर्मदा परिक्रमेचा हा पायी ३२०० किलोमीटरचा प्रवास माझ्याकडून मैय्या ने करुन घेतला असा अनुभव शिवरूप सूर्यकांत गायकवाड यांनी कथन करताना सांगितले.
यावेळी सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त सन्मती मिरजे यांनी बोलताना सूर्यकांत गायकवाड हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. परिक्रमा पूर्ण करून गप्प बसणार नाही संघटनेची व्याप्ती वाढवेल आणि इतरांनाही मार्गदर्शन करेल असे उद्गार सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त सन्मती मिरजे यांनी सूर्यकांत गायकवाड यांच्या विषयी काढले. यावेळी मिरजे यांनी बोलताना त्यांच्यासोबत केलेल्या यात्रांचा अनुभव सांगितला.ही परिक्रमा पूर्ण करणे म्हणजे एक पार भक्ती आणि श्रद्धा आवश्यक आहे. या जोरावरच त्यांनीही परिक्रमा पूर्ण केली आहे.असेही
सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त सन्मती मिरजे म्हणाले.
यावेळी चंद्रकांत कडोलकर,सिद्धु लकार, बंडोपंत चव्हाण अविनाश बोकील, डॉ. प्रदीप कुलकर्णी, धैर्यशील पाटील,श्री. वसंत घाडगे, गजानन कापरे संजय जोशी, माणिक जोशी, बाळासाहेब निपाणीकर, ज्योत्स्ना डासाळकर, रवींद्र कुलकर्णी, रोहिणी कापरे, दिनेश लिंगारे, ललिता पाटील, ओंकार गाडगीळ, विश्वास माळी, अविनाश कळंत्रे, उदय कुलकर्णी, सुनिता नकाते. आदी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
यावेळी सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त सन्मत्ति मिरजे,प्रमोद पाटील,किरण शहा,अरविंद परमार यांच्यासह ट्रस्टचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री.वसंतराव चौगुले पतसंस्थेचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.प्रसन्न मालिकेर यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रास्ताविक निर्मिती ॲड एजन्सीचे अनंत खासबागदार यांनी केले.आभार प्रमोद पाटील यांनी मानले.मा.नर्मदेच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली

जीपीएच्या अध्यक्षपदी डॉ.वर्षा पाटील,सचिव पदी डॉ.राजेश सोनवणे, खजानिस पदी डॉ. दीपक पोवार यांची निवड

0

जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन (जीपीए) २०२५ /२६ ची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन

जीपीएच्या अध्यक्षपदी डॉ.वर्षा पाटील,सचिव पदी डॉ.राजेश सोनवणे, खजानिस पदी डॉ. दीपक पोवार यांची निवड

कोल्हापूर/प्रतिनिधी : जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन (जीपीए) २०२५ /२६ ची वार्षिक सर्वसाधारण सभा ही के. एम. ए हाऊस बेलबाग येथे रविवार दिनांक २३ मार्च २०२५ रोजी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. महादेव जोगदंडे यांनी २०२४/२५ चा सचिव अहवाल सादर केला,तर डॉ.गुणाजी नलवडे यांनी खजानिस लेखाजोखा अहवाल सांगितला. मावळते अध्यक्ष डॉ. अरुण धुमाळे यांनी वर्षभराच्या कामगिरीविषयी आढावा मांडला. त्यानंतर निवड समितीच्या अध्यक्षा डॉ. शुभांगी पार्टे यांनी नवीन कार्यकारिणी घोषित केली.
यावेळी डॉ.वर्षा पाटील यांची २०२५/२६ या एक वर्ष कालावधीसाठी अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. मावळते अध्यक्ष डॉ.अरुण धुमाळे यांनी त्यांना अध्यक्षीय खुर्चीवर स्थानापन्न करून पदग्रहण केले. पुढील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये सचिव पदी डॉ.राजेश सोनवणे, खजानिस पदी डॉ. दीपक पोवार यांची नेमणूक करण्यात आली. उर्वरित कार्यकारणी खालील प्रमाणे डॉ. शिवराज जितकर, डॉ. विनायक शिंदे, डॉ.गुणाजी नलवडे, डॉ.महादेव जोगदंडे, डॉ. उषा निंबाळकर,डॉ.प्रशांत खुटाळे, डॉ. शशिकांत पाटील, डॉ. अनिल कवठेकर, डॉ. सुधाकर ढेकळे, डॉ.पूजा पाटील, डॉ.सचिन आजगेकर, माजी अध्यक्ष डॉ.अरुण धुमाळे,तज्ञ सल्लागार संचालक पदी डॉ. शुभांगी पार्टे,डॉ. रमेश जाधव,डॉ. शिवाजी मगदूम, संस्थापक अध्यक्ष डॉ.विनोद घोटगे आदी.
यावेळी सभेला डॉ. उद्यम व्होरा, डॉ .उदय मुधाळे,डॉ विलास महाजन, डॉ. शिवराज देसाई, डॉ. शीतल पाटील, डॉ. चंद्रकांत सोनवणे, डॉ. किशोर निंबाळकर, डॉ. हरीश नांगरे, डॉ. राजेश सातपुते तसेच अनेक आजीवन सभासद उपस्थित होते. नूतन सचिव डॉ. राजेश सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले.

एनआयटीच्या विद्यार्थ्यांचे तंत्रशिक्षण मंडळाच्या प्रोजेक्ट स्पर्धेत यश

0

एनआयटीच्या विद्यार्थ्यांचे तंत्रशिक्षण मंडळाच्या प्रोजेक्ट स्पर्धेत यश

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमधील तृतीय वर्ष एआयएमएल विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आयोजित राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. विवान कानिटकर, हर्ष सुतार, पार्थ सुर्यवंशी, पारस कवितकर व पार्थ मिरजकर यांच्या ‘हेड कंट्रोल्ड माऊस कर्सर विथ व्हाईस कमान्ड्स फाॅर हॅन्डीकॅप्ड पर्सन’ या प्रोजेक्टने तब्बल ८१ प्रोजेक्ट्समधून हे यश संपादन केले. डोक्याच्या हालचालींवरून संगणकीय यंत्रणेला सुचना देता येत असल्याने हा प्रोजेक्ट दिव्यांग व्यक्तींना वरदान ठरेल असे प्रोजेक्टचे मार्गदर्शक प्रा. अश्विनकुमार व्हरांबळे यांनी सांगितले. गरजू समाज घटक, शेती, उर्जा, वाहन व निर्मिती उद्योग अशा विविध क्षेत्रातील समस्यांवर एआय तंत्रज्ञानातून उपाय शोधण्यासाठी एनआयटीमध्ये नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट्सना देत असलेल्या प्रोत्साहनाचे हे फलित असून यातून लवकरच स्टार्टअप सुरू होतील असे प्रतिपादन संचालक डाॅ. संजय दाभोळे यांनी यावेळी केले. सदर विद्यार्थ्यांना ट्राॅफी, प्रमाणपत्र व पन्नास हजार रूपयांचे पारितोषिक मिळाल्याची माहिती एआयएमएल विभागप्रमुख प्रा. विक्रम गवळी यांनी दिली. ‘प्रिन्स शिवाजी’ संस्थेचे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील व व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार यांनी विजेते विद्यार्थी व मार्गदर्शक यांचे अभिनंदन केले.

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रा.सुदर्शन सुतार, प्रा. मकरंद काईगडे यांचा राज्यस्तरीय सन्मान

0

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रा.सुदर्शन सुतार, प्रा. मकरंद काईगडे यांचा राज्यस्तरीय सन्मान

कोल्हापूर/प्रतिनिधी : ट्रेनिंग अँड प्लेसमेंटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल राज्य संघटनेकडून गौरव.डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता (सीडी-सीआर) प्रा. सुदर्शन नारायण सुतार आणि टिपीओ प्रा. मकरंद काईंगडे यांनी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स संघटनेच्यावतीने दोघांचाही सन्मान करण्यात आला. प्रा. सुतार यांना ‘लीडरशिप अवार्ड’ने तर प्रा. काईगडे यांचा ‘यंग अचीव्हर अवार्ड’ने गौरविण्यात आले.
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स संघटनेच्यावतीने लोणावळा येथे एमए टीपीओ डेव्हलपमेंट प्रोग्राम- २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील ५०० हून अधिक महाविद्यालयांचे टीपीओ या संघटनेचे सभासद आहेत. या कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. लोणावळा नगरपरिषदेच्या अध्यक्षा सुरेखा जाधव, उपाध्यक्ष संजय घोणे, अभिनेत्री रुपाली भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध अधिकाऱ्याना सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांतीकुमार रवंदाळे आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
यामध्ये डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता (सीडी-सीआर) प्रा. सुदर्शन नारायण सुतार यांना‘लीडरशिप अवार्ड’ने तर महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे यांना ‘यंग अचीव्हर अवार्ड’ने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे यानी प्रा. सुतार आणि प्रा. काईंगडे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

मध्यप्रदेशमधील महू येथे झालेल्या इंडिया ओपन शुटींग स्पर्धेत पृथ्वीराज महाडिक यांनी पटकावले कांस्यपदक, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

0

मध्यप्रदेशमधील महू येथे झालेल्या इंडिया ओपन शुटींग स्पर्धेत पृथ्वीराज महाडिक यांनी पटकावले कांस्यपदक, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर/प्रतिनिधी : शुटींगच्या स्पर्धेत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धा जिंकलेले चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी आज आणखी एका स्पर्धेत कोल्हापूरचा झेंडा फडकवला. मध्यप्रदेशमधील महू जिल्हयात इंडिया ओपन शुटींग स्पर्धा झाली. या स्पर्धेत शॉटगन ट्रॅप या प्रकारात आपल्या लक्ष्याचा अचुक वेध घेत, पृथ्वीराज महाडिक यांनी कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेमुळे राष्ट्रीय शुटींग अजिंक्यपद स्पर्धेसाठी त्यांची निवड झालीय.
खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र आणि चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी नेमबाजीच्या स्पर्धेत आपला ठसा उमटवलाय. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये विविध बक्षिसे मिळवत, त्यांनी आपले कौशल्य सिध्द केलंय. हीच परंपरा कायम ठेवत आणखी एका स्पर्धेत त्यांनी बक्षिसावर नाव कोरले. मध्यप्रदेशमधील महू इथल्या आर्मी बेसमध्ये इंडिया ओपन ही प्री नॅशनल शुटींग स्पर्धा पार पडली. त्यामध्ये शॉटगन, रायफल, पिस्टल आणि एअर रायफल अशा विविध प्रकारात स्पर्धा झाल्या. त्यातील शॉटगन ट्रॅप विभागात सहभागी होवून पृथ्वीराज महाडिक यांनी कांस्यपदकाची कमाई केली. महाडिक यांनी अचुक नेम साधत, ५० पैकी ४२ गुण मिळवले. या यशामुळे राष्ट्रीय शुटींग अजिंक्यपद स्पर्धेसाठी पृथ्वीराज महाडिक यांची निवड झाले आहे. या खेळासाठी त्यांना खासदार धनंजय महाडिक, सौ. अरूंधती महाडिक यांचे मार्गदर्शन लाभले.

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘उमंग २के२५ महोत्सव उत्साहात संपन्न

0

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘उमंग २के२५ महोत्सव उत्साहात संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ उमंग २के२५ हा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव मोठ्या जल्लोषात संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त, विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट गिरी, सांस्कृतिक कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. सुहास पाटील, सौ. समता तेलंग सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व इव्हेंट समन्वयक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्वस्त विनायक भोसले मार्गदर्शन करताना म्हणाले विद्यार्थी मित्रांनो चौकटी बाहेर येऊन स्वतःला ओळखणं अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये स्वयंउस्फुर्त सहभाग नोंदवून आपले कौशल्य विकसित करून ऐच्छिक उद्देशा पर्यंत पोहोचण्यासाठी या विविध गोष्टींची आवश्यकता असते आणि ती संजय घोडावत शैक्षणिक संकुलनात सर्व विभागातून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न केला जातो. संचालक डॉ. विराट गिरी यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून विविध विभागांतर्गत उल्लेखनीय केलेल्या कार्याचे सादरीकरण केले.
उमंग २के२५ सहा दिवस चाललेल्या महोत्सव मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. राष्ट्रीय स्तरावरील “निंबस २के२५” स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. कार्यक्रमाचे समन्वयक, प्रा. प्रतिक आवटी प्रा. तृप्ती पुजारी, यांनी काम पहिले. नृत्य, गायन, नाटक, फॅशन शो, पारंपरिक दिवस, मराठी भाषा गौरव दिन, मेहंदी, वादविवाद, रांगोळी, नेल-आर्ट, हेअरस्टाईल स्पर्धा, काव्य वाचन, एक्सटेम्पोर, आणि कुकिंग विदाऊट फायर यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ‘उद्योग सुरक्षा आणि आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्याच्या महत्त्वावर मार्गदर्शन करण्यात आले. या सांस्कृतिक महोत्सवाचे प्रा. सुहास पाटील आणि सौ. समता तेलंग हे प्रमुख समन्वयक होते. त्यांनी अतिशय उत्तम नियोजन करत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली.
संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन, संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शना खाली ‘उमंग २के२५ महोत्सव आयोजन करण्यात आले होते.