Sunday, June 29, 2025
spot_img
Home Blog Page 329

प्रभावी काँटॅक्ट ट्रेसिंग आणि प्रभाग निहाय, गावनिहाय सर्व्हेक्षण करा – नागरिकांनीही सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे आवाहन

0

कोल्हापूर, दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय)- प्रभाग समिती, ग्राम समिती पुन्हा एकदा सक्रीय करुन प्रभावी काँटॅक्ट ट्रेसिंगचे काम करा. आशा, शिक्षक, पर्यवेक्षक यांच्यामार्फत प्रभागनिहाय, गावनिहाय सर्व्हेक्षण करावे. नागरिकांनीही लवकर उपचार सुरु करण्याच्यादृष्टीने आपली लक्षणं लपवू नयेत. सर्व्हेक्षणाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.     जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीडीओ कॉन्फरंन्सींगद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांनी आज संपर्क साधला. कोव्हीड-१९ बाबत सद्यस्थितीचा तालुकानिहाय आढावा घेवून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, संसर्ग रोखण्यासाठी, मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी काँटॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या. तलाठी, ग्रामसेवक यांनी समन्वयाने जबाबदारी पार पाडावी. एका रुग्णामागे १५ ते २० ट्रेसिंग झाले पाहिजे. मोठ्या प्रमाणात  तपासण्या वाढवा. इली, सारीच्या रुग्णांचीही माहिती मिळवा. खासगी डॉक्टर्स, वैद्यकीय दुकानदार यांचा व्हाटस ॲप ग्रुप तयार करुन या ग्रुपच्या माध्यमातून रुग्णांची माहिती आणि पुढील कार्यवाहीचे नियोजन करा.     मास्कचा वापर, सामाजिक अंतर, वारंवार हात धुणे आदीबाबत जनजागृती करा. अंमलबजावणी न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा. गावांसाठी नियुक्त संपर्क अधिकाऱ्यांना सक्रीय करा. सर्व्हेक्षण आणि ट्रेसिंग चे काम प्रभावीपणे होते का याचीही तपासणी करावी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.                                                      लोकांनी लोकांसाठी केलेले सर्व्हेक्षण – प्रतिबंधात्मक क्षेत्रात नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन सर्वेक्षणही व्हायला हवे. प्रभागनिहाय, गावनिहाय सर्वेक्षण करतान नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, संस्थ, सार्वजनिक मंडळे यांचाही सहभाग घेवून लोकांनी लोकांसाठी केलेले सर्व्हेक्षण व्हायला हवे. १५ दिवसात चांगले चित्र दिसेल. मृत्यूदरही कमी राखण्यास मदत होईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, बावड्यासारख्या ठिकाणाहूनही स्वॅब घेण्यास प्रारंभ केल आहे. ग्रामीण आणि शहरी अशा भागात समन्वयाने काँटॅक्ट ट्रेसिंग आणि सर्वेक्षणाचे काम करा. शहरातील स्वच्छता मोहिमेत सहभागी असाणारे सामाजिक कार्यकर्ते, संस्था हे देखील या सर्व्हेक्षणात योगदान देणार आहेत. त्यांचीही मदत घ्या. प्रतिबंधित क्षेत्राची अंमलबजावणी करावी. गृह अलगीकरणातील व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास ५ हजाराचा दंड लागू केल आहे. विना मास्क दिसणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा. अर्ली डिटेक्शन फार महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनीही सर्वेक्षणावर भर देवून, तो होतो का याची तपासणी करा अशी सूचना केली. डॉ. अनिता सैबण्णावर यांनी यावेळी उपचार प्रोटोकॉलविषयी तर डॉ. उषादेवी कुंभार यांनी पोर्टल अपडेशनविषयी सूचना केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी सी केम्पीपाटील, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्हा राष्ट्र प्रेमी रिक्षा संघटनेची दसरा चौकात निदर्शने

0

कोल्हापूर /प्रतिनिधी : लाॅकडाऊन
च्या काळात रिक्षा चालकांना मोठा आर्थिक फटका बसला त्यानंतरही अद्याप प्रवासी संख्या ही घटली आहे सध्या रिक्षाचालक मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे रिक्षाचालकांचा घरफाळा आणि पाणीबीले माफ करावीत या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी आज दसरा चौकात कोल्हापूर जिल्हा राष्ट्र प्रेमी रिक्षा संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.याबातचे निवेदन शिष्टमंडळातर्फे महापालिका प्रशासनास देण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमध्ये रिक्षाची ही चाके थांबली आणि हातावर पोट असणारे रिक्षा व्यवसायिक हतबल झाला.तर लाॅकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर रिक्षाची चाके पुन्हा एकदा रस्त्यावर धावू लागली. मात्र कोरोनामुळे रिक्षा व्यवसायावर मंदी आली असून रिक्षा चालकाला घर चालवणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या वतीने सध्याची परिस्थिती लक्षात घेता रिक्षा चालकांचा घरफाळा आणि पाणीबीले माफ करावीत या प्रमुख मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा राष्ट्र प्रेमी रिक्षा संघटनेच्या वतीने दसरा चौकात निदर्शने करण्यात आली.यावेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतंर्गत रिक्षा चालकांना विना अट एक लाख रुपयांचे कर्ज द्यावे, भाडेकरू रिक्षाचालकांना पंतप्रधान आवास योजनेमधून तात्काळ घरकुले मंजूर करावीत, रिक्षा चालकांचा सुवर्ण जयंती दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये समावेश करावा ,रिक्षा चालकांना घरे दुरुस्तीसाठी आर्थिक सहाय्य करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
आंदोलनात शरद सोनुले,मारुती पोवार, विजय बोंर्दे,अलताफ इनामदार, संजय दणाणे,सागर दुगे,बापू चव्हाण यांच्या सह संघटनेचे पदाधिकारी ,रिक्षा चालक सहभागी झाले होते.

पृथ्वीराज जगताप युवा मंच व नृसिंह दोस्त मंडळ यांच्यावतीने इम्मुनिटी बूस्टर औषधाच वाटप

0

पृथ्वीराज जगताप युवा मंच व नृसिंह दोस्त मंडळ यांच्यावतीने आयोजित केलेले सिद्धेश्वर महाराज यांची इम्मुनिटी बूस्टर औषधाच वाटण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई व आहार हॉटेलचे मालक प्रकाश जगताप यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी उपस्थित श्रीकांत माने,अमर सरनाईक, रणजीत पाटील , व तेजस जिरगे,नचिकेत बागलकोठे,रणजीत जगताप,महेश नार्वेकर,ऋषिकेश सुतार, चिन्मय वेळापुरे व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
हे औषध किमान तीन हजार लोकांनी पुरेल एवढं असून लोकांनी त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती युवा मंचचे अध्यक्ष पृथ्वीराज जगताप यांनी केले आहे
यावेळी नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग पालन करून सहकार्य केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार

केडीसीसी बँकेचा सहा हजार कोटी ठेवींचा टप्पा पार..*

0
कोल्हापूर/प्रतिनिधी :कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तब्बल सहा हजार कोटी रुपये ठेवींचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. बँकेच्या गेल्या ८२  वर्षांच्या वाटचालीतील हे ऐतिहासिक यश आहे. या यशाबद्दल बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कर्मचाऱ्यांप्रती  कृतज्ञता व्यक्त केली.
     आठवड्यापूर्वीच बँकेने कर्मचाऱ्यांना कोविडसह, अपघाती मृत्यू, इतर व नैसर्गिक मृत्यूबद्दल विमासुरक्षा कवच लागू केल्याबद्दल कृतज्ञता म्हणून अध्यक्ष श्री. मुश्रीफ यांचा सत्कार कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या हस्ते झाला.
       भाषणात मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, बँकेचा कर्मचारी हा नोटांची देवाण-घेवाण आणि ग्राहकांच्या संपर्काच्या रूपाने जीवावर जोखीम घेऊन काम करीत असतो. कर्मचारी व कर्मचारी संघटनांच्या मागणीनुसार हा विमासुरक्षा कवच लागू केले. दुर्दैवाने कुणाच्या बाबतीत वाईट घडू नये, झालंच तर के.डी.सी.सी.बँक सर्वच कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी हिमालयासारखी उभी आहे. बँकेच्या या ऐतिहासिक यशाबद्दल अध्यक्ष या नात्याने मला मनापासून आनंद आहे. जोपर्यंत ठेवी वाढणार नाहीत, तोपर्यंत व्यवस्थापन खर्च कमी येणार नाही. या उद्देशाने मी हे ध्येय घेतलेलं होतं. या यशात बँकेचे सर्व ठेवीदार, हितचिंतक, ग्राहक, सभासद, सर्व संचालक तसेच कर्मचारी व अधिकारी यांचे मोठे योगदान आहे, अशी कृतज्ञता ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
       स्वागत व प्रास्ताविकपर
भाषणात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर ए.बी.माने म्हणाले, अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेृत्त्वाखालील गेल्या पाच वर्षाच्या कार्यकालात विद्यमान संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन अडीच हजार आवरून दहा हजार केले. दैनिक वेतनावरील १०० कर्मचाऱ्यांना कायम केले. हक्काच्या रजेचा पगार सुरू केला. कर्मचाऱ्यांना ९ % बोनस दिला. गणवेशासाठी बोनसमध्ये वाढ केली.  ६४६ कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली. अनुकंपा तत्त्वावरील ७० कर्मचाऱ्यांची भरती केली.

प्रादेशिक सह आयुक्‍त पशुसवंर्धन विभाग पुणे यांची गोकुळ दूध संघास भेट…

0

कोल्‍हापूर : ता. ०४ प्रादेशिक सह आयुक्त डॉ.संतोष पंचपोर पशुसवंर्धन विभाग पुणे यांनी कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या., कोल्‍हापूर (गोकुळ) दूध संघास सदिच्‍छा भेट दिल्‍याबद्दल गोकुळचे चेअरमन मा.श्री.रविंद्र आपटे यांच्‍या हस्‍ते त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला. केंद्र पुरस्‍कृत राष्‍ट्रीय पशुरोग नियंञण कार्यक्रमा अंतर्गत कोल्‍हापूर जिल्‍ह्यामध्‍ये ०१ सप्‍टेंबर २०२० पासून लाळखुरकत रोग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम सुरु करण्‍यात आली आहे. त्‍याचा आढावा घेण्‍यासाठी व सध्‍या महाराष्‍ट्रात जनावरांमध्‍ये लंपीस्‍कीन डीसीज या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्‍याने  पशुपालकांमध्‍ये जनजागृती करणेसाठी व त्‍यावरील प्रति‍बंधात्‍मक लसी संदर्भात माहिती देणेसाठी ते कोल्‍हापूर जिल्‍ह्याच्‍या दौ-यावर आले होते.गोकुळ दूध संघामार्फत दूध उत्‍पादक शेतक-यांसाठी राबविल्‍या जाणा-या  सर्व योजनांची माहिती घेवून व संघामार्फत खासकरून राबवली जाणारी वासरूसंगोपन योजने बद्दल त्‍यांनी गोकुळ दूध संघाचे कौतुक करुन समाधान व्‍यक्‍त केले.यावेळी संघाचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक विश्‍वास पाटील (आबाजी), कार्यकारी संचालक श्री.डी.व्‍ही.घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी श्री.एस.एम.पाटील, व्‍यवस्‍थापक प्रशासन श्री.डी.के.पाटील, जिल्‍हा उपायुक्‍त पशुसंवर्धन विभाग कोल्‍हापूर डॉ.पठाण, जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी (जि.प.) डॉ.पवार, संघाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

निविदा जाहिराती मूळ मजकूरासहित वृत्तपत्रांना प्रसिध्दीसाठी मिळाव्यात : आप्पासाहेब पाटील

0

निविदा जाहिराती मूळ मजकूरासहित वृत्तपत्रांना प्रसिध्दीसाठी मिळाव्यात : आप्पासाहेब पाटील

नेेेे

कराड (प्रतिनिधी) : वृत्तपत्रात दिली जाणारी निविदा जाहिरात मूळ मजकूरासहित प्रसिध्दीसाठी देण्यात याव्यात, यामुळे कारभारातील पारदर्शकता दिसून येईल, अशी मागणी असोसिएशन ऑफ स्मॉल अॅण्ड मिडियम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे केली आहे.

असोसिएशन ऑफ स्मॉल अॅण्ड मिडियम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, संघटनेचे उपाध्यक्ष अजिंक्य म्हात्रे, राज्य सचिव प्रवीण पाटील, राष्ट्रीय कौन्सिल सदस्य, संघटक गोरख तावरे, राष्ट्रीय कौन्सिल सदस्य, समन्वयक नेताजी मेश्राम, राज्य प्रसिध्दीप्रमुख रंगराव शिंपूकडे यांच्या पत्रावर स्वाक्षरी आहेत. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाकडून विकासात्मक, लोककल्याणकारी कामाच्या प्रक्रिया असणाऱ्या निविदा या वृत्तपत्रांमध्ये संक्षिप्तपणे दिल्या जात असल्यामुळे राज्य शासन करीत असलेल्या संबंधित विभागातील कामाची माहिती आम जनतेला होत नाही. संक्षिप्त निविदा प्रसिद्ध होत असल्याने शासकीय अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्यापुर्ती गोपनीय माहिती राहत असल्यामुळे कामांच्या निविदांमध्ये पारदर्शकता दिसत नाही. निविदा प्रसिद्ध करताना पारदर्शकता असावी आणि आम जनतेला त्याची माहिती व्हावी. यासाठी मूळ निविदा सविस्तरपणे वृत्तपत्रात प्रसिद्धीला देण्याच्या अनुषंगाने निवेदन देण्यात आले आहे.

शासनाचेवतीने विविध खात्याच्या निविदा अगर अन्य जाहिराती वृत्तपत्राकडे प्रसिद्धीसाठी दिल्या जातात. या जाहिराती प्रसिद्ध करण्याचा उद्देश असा आहे की, शासन त्या त्या भागात कोणते कामे करीत असुन, त्याचे स्वरूप, खर्च, होणारे फायदे याची माहिती जनेतला करुन देणे असा असतो. आणि कामात पारदर्शकपणा असावा आणि शासन जनतेसाठी ज्या योजना राबवित आहे. त्या आमच्या जनेतला माहिती करुन देणे आणि त्यामुळे शासनाचे काम आम नागरिकांना समजावे. संबंधित काम आहे, त्या परिसरातील नागरिकांना कामाची माहिती व्हावी. हा उदात्त हेतू शासनाचा असतो. असेही निवेदनात म्हटले आहे.

परंतु ऑनलाईन प्रणाली आणि संगणकीय प्रणाली आले पासुन संबंधित खाते मूळ जाहिरातीचा मजकूर प्रसिद्धीस देत नाही. त्याऐवजी संबंधित काम आणि वेबसाईट पत्ता दिला जातो. यामुळे राज्य शासनाच्या पारदर्शक कारभाराबाबत संशय निर्माण होत आहे.प्रशासकीय अधिकारी व ठेकेदार यांच्या व्यतिरिक्त आम जनतेला संबंधित कामाची माहिती होत नाही किंवा सदर कामाची माहिती मिळत नाही. तेव्हा अजूनही देशातील जनता संगणक निरक्षर झालेली नाही. त्यांना संगणक वेबसाईटवर जाऊन संबंधित काम पाहणे, कामाची माहिती घेणे शक्य नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या प्रत्येक खात्याच्या जाहिरात स्वरूपात असणाऱ्या निविदा आम जनतेपर्यंत पोहचत नाहीत. यामुळे सदर कामाची निविदा वृत्तपत्रात जाहिराती स्वरूपात देताना मूळ मजकुरासह सविस्तरपणे माहिती होणे गरजेचे आहे. यामुळे राज्य शासनाच्या कारभारात पारदर्शकता दिसून येईल.

आपल्या राज्याची संकल्पना ही “लोककल्याणकारी “राज्य अशी आहे. भारतीय राज्य घटनेची उदात्त देणगी आहे. यामुळे लोककल्याणकारी जे शासन काम करीत आहे ते काम
लोकांपर्यंत जाहिराती रूपाने प्रसिद्ध होणे आवश्यक व गरजेचे आहे. जनतेला माहिती जाणून घेण्याचा हक्क देखील घटनात्मक असाच आहे. हा मुळ उद्देश संगणक प्रणालीद्वारे होत असलेल्या जाहिरात प्रसारणामुळे होत नाही. यामुळे शासनाचे काम आम जनतेपर्यंत पोहचत नाही. याची राज्य शासनाने विशेषत्वाने दखल घेऊन राज्य शासनांतर्गत असणाऱ्या प्रत्येक खात्याची निविदा ही वृत्तपत्रात सविस्तरपणे प्रसिद्धीसाठी द्यावी. अशी मागणी करण्यात आले आहे.

सदर प्रश्नाकडे राज्य शासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे आणि केलेला सूचनेचा सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रत्येक खात्याची निविदाही सविस्तरपणे वृत्तपत्रात प्रसिद्धीला देण्यासाठी परिपत्रक अथवा अध्यादेश पारित करावा. सदर कामाची निविदा वृत्तपत्रात सविस्तरपणे प्रसिद्ध झाल्यात संबंधित परिसरातील नागरिकांना राज्य शासन करीत असलेल्या कामाची माहिती मिळेल आणि कारभारामध्ये पारदर्शकता येईल. वृत्तपत्राला प्रसिद्धीसाठी दिली जाणारी निविदाही सविस्तर यापूर्वी दिले जात होती. मात्र अलीकडच्या काळामध्ये संक्षिप्तपणे वृत्तपत्राला निविदा देऊन मूळ निविदा ही वेबसाईटवर पहा, असे म्हटले जाते यामुळे पारदर्शकता राहत नाही. सदर वृत्तपत्राला निविदा देताना त्यामध्ये वेबसाईटवर निविदा पहावी, असा उल्लेख ही असावा. असे शेवटी निवेदनात म्हटले आहे

निविदा जाहिराती मूळ मजकूरासहित वृत्तपत्रांना प्रसिध्दीसाठी मिळाव्यात : आप्पासाहेब पाटील  नेेेे

0

निविदा जाहिराती मूळ मजकूरासहित वृत्तपत्रांना प्रसिध्दीसाठी मिळाव्यात : आप्पासाहेब पाटील
नेेेे

कराड (प्रतिनिधी) : वृत्तपत्रात दिली जाणारी निविदा जाहिरात मूळ मजकूरासहित प्रसिध्दीसाठी देण्यात याव्यात, यामुळे कारभारातील पारदर्शकता दिसून येईल, अशी मागणी असोसिएशन ऑफ स्मॉल अॅण्ड मिडियम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे केली आहे.

असोसिएशन ऑफ स्मॉल अॅण्ड मिडियम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, संघटनेचे उपाध्यक्ष अजिंक्य म्हात्रे, राज्य सचिव प्रवीण पाटील, राष्ट्रीय कौन्सिल सदस्य, संघटक गोरख तावरे, राष्ट्रीय कौन्सिल सदस्य, समन्वयक नेताजी मेश्राम, राज्य प्रसिध्दीप्रमुख रंगराव शिंपूकडे यांच्या पत्रावर स्वाक्षरी आहेत. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाकडून विकासात्मक, लोककल्याणकारी कामाच्या प्रक्रिया असणाऱ्या निविदा या वृत्तपत्रांमध्ये संक्षिप्तपणे दिल्या जात असल्यामुळे राज्य शासन करीत असलेल्या संबंधित विभागातील कामाची माहिती आम जनतेला होत नाही. संक्षिप्त निविदा प्रसिद्ध होत असल्याने शासकीय अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्यापुर्ती गोपनीय माहिती राहत असल्यामुळे कामांच्या निविदांमध्ये पारदर्शकता दिसत नाही. निविदा प्रसिद्ध करताना पारदर्शकता असावी आणि आम जनतेला त्याची माहिती व्हावी. यासाठी मूळ निविदा सविस्तरपणे वृत्तपत्रात प्रसिद्धीला देण्याच्या अनुषंगाने निवेदन देण्यात आले आहे.

शासनाचेवतीने विविध खात्याच्या निविदा अगर अन्य जाहिराती वृत्तपत्राकडे प्रसिद्धीसाठी दिल्या जातात. या जाहिराती प्रसिद्ध करण्याचा उद्देश असा आहे की, शासन त्या त्या भागात कोणते कामे करीत असुन, त्याचे स्वरूप, खर्च, होणारे फायदे याची माहिती जनेतला करुन देणे असा असतो. आणि कामात पारदर्शकपणा असावा आणि शासन जनतेसाठी ज्या योजना राबवित आहे. त्या आमच्या जनेतला माहिती करुन देणे आणि त्यामुळे शासनाचे काम आम नागरिकांना समजावे. संबंधित काम आहे, त्या परिसरातील नागरिकांना कामाची माहिती व्हावी. हा उदात्त हेतू शासनाचा असतो. असेही निवेदनात म्हटले आहे.

परंतु ऑनलाईन प्रणाली आणि संगणकीय प्रणाली आले पासुन संबंधित खाते मूळ जाहिरातीचा मजकूर प्रसिद्धीस देत नाही. त्याऐवजी संबंधित काम आणि वेबसाईट पत्ता दिला जातो. यामुळे राज्य शासनाच्या पारदर्शक कारभाराबाबत संशय निर्माण होत आहे.प्रशासकीय अधिकारी व ठेकेदार यांच्या व्यतिरिक्त आम जनतेला संबंधित कामाची माहिती होत नाही किंवा सदर कामाची माहिती मिळत नाही. तेव्हा अजूनही देशातील जनता संगणक निरक्षर झालेली नाही. त्यांना संगणक वेबसाईटवर जाऊन संबंधित काम पाहणे, कामाची माहिती घेणे शक्य नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या प्रत्येक खात्याच्या जाहिरात स्वरूपात असणाऱ्या निविदा आम जनतेपर्यंत पोहचत नाहीत. यामुळे सदर कामाची निविदा वृत्तपत्रात जाहिराती स्वरूपात देताना मूळ मजकुरासह सविस्तरपणे माहिती होणे गरजेचे आहे. यामुळे राज्य शासनाच्या कारभारात पारदर्शकता दिसून येईल.

आपल्या राज्याची संकल्पना ही “लोककल्याणकारी “राज्य अशी आहे. भारतीय राज्य घटनेची उदात्त देणगी आहे. यामुळे लोककल्याणकारी जे शासन काम करीत आहे ते काम
लोकांपर्यंत जाहिराती रूपाने प्रसिद्ध होणे आवश्यक व गरजेचे आहे. जनतेला माहिती जाणून घेण्याचा हक्क देखील घटनात्मक असाच आहे. हा मुळ उद्देश संगणक प्रणालीद्वारे होत असलेल्या जाहिरात प्रसारणामुळे होत नाही. यामुळे शासनाचे काम आम जनतेपर्यंत पोहचत नाही. याची राज्य शासनाने विशेषत्वाने दखल घेऊन राज्य शासनांतर्गत असणाऱ्या प्रत्येक खात्याची निविदा ही वृत्तपत्रात सविस्तरपणे प्रसिद्धीसाठी द्यावी. अशी मागणी करण्यात आले आहे.

सदर प्रश्नाकडे राज्य शासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे आणि केलेला सूचनेचा सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रत्येक खात्याची निविदाही सविस्तरपणे वृत्तपत्रात प्रसिद्धीला देण्यासाठी परिपत्रक अथवा अध्यादेश पारित करावा. सदर कामाची निविदा वृत्तपत्रात सविस्तरपणे प्रसिद्ध झाल्यात संबंधित परिसरातील नागरिकांना राज्य शासन करीत असलेल्या कामाची माहिती मिळेल आणि कारभारामध्ये पारदर्शकता येईल. वृत्तपत्राला प्रसिद्धीसाठी दिली जाणारी निविदाही सविस्तर यापूर्वी दिले जात होती. मात्र अलीकडच्या काळामध्ये संक्षिप्तपणे वृत्तपत्राला निविदा देऊन मूळ निविदा ही वेबसाईटवर पहा, असे म्हटले जाते यामुळे पारदर्शकता राहत नाही. सदर वृत्तपत्राला निविदा देताना त्यामध्ये वेबसाईटवर निविदा पहावी, असा उल्लेख ही असावा. असे शेवटी निवेदनात म्हटले आहे.

डस्टरच्या प्रवासात नवीन अध्यायाची सुरुवात होणार – मामील्लाप

0

कोल्हापूर/ प्रतिनिधी- भारतातील डस्टरच्या प्रवासात नवीन अध्यायाची सुरुवात होणार आहे. जागतिक दर्जाचे इंजिन आणि शक्ती यामुळ सारख्या वैश्विक एसयुव्ही तसेच क्रॉसओव्हर्स यशस्वी ठरल्या असे उदगार रेनो इंडिया मॅनेजिंग डायरेक्टर वेंकटराम मामील्लापले यांनी केलंय.

मामील्लापले म्हणाले, सर्वात आक्रमक वाहन बाजारांत डस्टरने लक्षवेधी दर्जा गाठला आहे. इतक्या वर्षांत साहसी वाहनप्रेमी आणि अनेक भारतीय कुटुंबांनी एक सच्ची एसयुव्हीसोबत बळकट नाते विणले आहे. आक्रमक आणि अधिक शक्तिशाली डस्टरने नक्कीच लक्षावधी लोकांना प्रेरणा दिली असून साहसी प्रवास इच्छुकांची संख्या वाढते आहे. नवनवीन प्रदेश आणि क्षितिजे गाठत एसयुव्ही प्रकाराचा बादशाह असलेले हे नाव ग्राहकांना ड्रायव्हिंगचा सहज अनुभव देते आहे. रेनो इंडियाच्या वतीने 1.3L टर्बो पेट्रोल इंजिन लॉन्चची घोषणा करण्यात आली असून त्यामुळे भारतातील सर्वात यशस्वी एसयुव्ही सर्वशक्तिमान ठरेल. 1.3L टर्बो पेट्रोल इंजिनयुक्त नवीकोरी डस्टर तीन वेरीयंटमध्ये उपलब्ध होणार आहे. असही ते म्हणालेत.

सोनी सबवरील मालिका ‘मॅडम सर’मध्‍ये अमित मिस्‍त्री व उर्मिला तिवारी साकारणार लहानशी भूमिका

0

सोनी सबवरील मालिका मॅडम सरमध्‍ये अत्‍यंत प्रतिभावान कलाकार अमित मिस्‍त्री व उर्मिला तिवारी यांचा प्रवेश होताना पाहायला मिळणार आहे. ते विवादित जोडपे विजय व अनिताची भूमिका साकारणार आहेत. हे नवीन पात्र मॅडम मलिक (गुल्‍की जोशी) व तिच्‍या टीमसाठी एक अनोखी केस सादर करणार आहेत. सोनी सबवरील मालिका मॅडम सर चार डायनॅमिक महिला पोलिस अधिकारींच्‍या दृष्टिकोनातून सामाजिक समस्‍यांना दाखवते. मालिका हलका-फुलका कन्‍टेन्‍ट व कलाकारांच्‍या उत्तम अभिनयासह प्रेक्षकांची मने जिंकत आहे.

अत्‍यंत प्रतिभावान कलाकार अमित मिस्‍त्री वर्कहोलिक स्‍टॉकब्रोकर विजयच्‍या भूमिकेत, तर उर्मिला तिवारी त्‍याची पत्‍नी अनिताची भूमिका साकारताना दिसणार आहे. अनिताला वैवाहिक जीवनामध्‍ये कमी लेखले जात असल्‍यासारखे वाटते. अनिता त्‍यांच्‍या वैवाहिक जीवनात पुन्‍हा प्रेमाचा अंकुर बहरण्‍यासाठी एका रंगरसिया बाबाने दिलेले लाडू विजयला खाण्‍यासाठी दबाव टाकते आणि तेथूनच समस्‍या सुरू होतात. पत्‍नीचा एका फोनीबाबावर असलेला विश्‍वास पाहून विजयला अधिक राग येतो. तो ढोंगी बाबा लाडू देण्‍याच्‍या बदल्‍यात त्‍याच्‍या पत्‍नीचे सोन्‍याचे दागिने घेतो. बाबाला धडा शिकवण्‍यासाठी विजय मॅडम मलिक व तिच्‍या टीमकडे मदत मागण्‍यासाठी जातो.

हसीना मलिक व तिची टीम फोनीबाबाकडून या जोडप्‍याची होत असलेली फसवणूक कशाप्रकारे थांबवतील? या समस्‍येचे निराकरण करण्‍यासाठी टीम कोणती नवीन युक्‍ती अंमलात आणतील?

विजयच्‍या भूमिकेत मालिकेमध्‍ये प्रवेश करण्‍याबाबत आनंदित असलेला अमित मिस्‍त्री म्‍हणाला,”माझे सोनी सबसोबत दीर्घकाळापासून नाते जुडलेले आहे. मॅडम सर या प्रेरणादायी मालिकेचा भाग होण्‍याचा आनंद होत आहे. आगामी एपिसोडमधील माझी भूमिका एका महत्त्वाच्या समस्‍येवर प्रकाश टाकेल. आपल्‍यापैकी अनेकांनी अवतीभोवती ही समस्‍या पाहिली असावी. माझी भूमिका विजयला त्‍याच्‍या पत्‍नीचा कंटाळा आला आहे. त्‍याच्‍या पत्‍नीची एका बाबाकडून फसवणूक होते. तो बाबा जोडप्‍याचे वैवाहिक जीवन आनंदमय करण्‍याचे सांगत तिला जादुई लाडू देतो आणि बदल्‍यात तिच्‍याकडून सोन्‍याचे दागिने घेतो. तो स्‍वत:हून या समस्‍येचे निराकरण करण्‍याचे ठरवतो. विजयच्‍या या समस्‍येसाठी या चार डायनॅमिक महिला पोलिस अधिकारी अंमलात आणणारा उपाय पाहणे रोमांचक असणार आहे. मी या सीक्‍वेन्‍सच्‍या शूटिंगदरम्‍यान खूप धमाल केली. मला खात्री आहे की, प्रेक्षक या नवीन केसबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक असतील.

अनिताची भूमिका साकारणारी उर्मिला तिवारी म्‍हणाली,”माझी भूमिका अनिता ही शिक्षित तरूण महिला आहे. ती अत्‍यंत समर्पित व आशावादी पत्‍नी आहे. वर्कहोलिक पतीकडून होणारे दुर्लक्ष आणि त्‍यांच्‍यामधील प्रेम कमी होत असल्‍याचे जाणवल्‍यानंतर ती त्‍यांचे नाते आनंदमय करण्‍याच्‍या प्रयत्‍नांमध्‍ये रंगरसिया बाबा व त्‍याच्या कृत्‍यांना बळी पडते. तिला आशा व विश्‍वास आहे की, बाबाने दिलेले लाडू तिच्‍या वैवाहिक जीवनात जादू निर्माण करेल. मॅडम सरचे आगामी एपिसोड्स प्रेक्षकांना या तरूण जोडप्‍याचे जीवन व त्‍यांच्‍यामधील संघर्षांना दाखवेल.

अधिक जाणण्‍यासाठी पाहत राहा मॅडम सर दर सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता फक्‍त सोनी सबवर

पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब लोकांच्या सहभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

0

कोल्हापूर, दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय): पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब आहे. मुंबई, ठाण्याकडून या साथीचा फोकस सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकणे निश्चितच जबाबदारी वाढवणारा आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वसामान्य जनतेचा सहभाग होता. तसाच कोरोना मुक्तीत प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्वाचे आहे. कोरोना दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज केले.मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील कोरोनाबाबतचा आढावा व्हिडीओ कॉन्फरंसिंगव्दारे घेतला. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले, पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे कोरोना लढ्यात ज्या चुका यापूर्वी इतर काही जिल्ह्यांकडून झाल्या असतील त्या तुम्ही होवू देवू नका. इतर देश फक्त कोव्हिड एके कोव्हिडचा मुकाबला करत आहेत. आपल्याकडे गणेशोत्सव, मोहरम पार पडला. आता नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण येतील. त्यातच पाऊस सुरु आहे. त्यामुळे आपले आव्हान अधिक मोठे आहे. हा कसोटीचा काळ आहे. सुविधा कितीही उभ्या केल्या तरी शेवटी काही प्रमुख मूळ मुद्यांवर लक्ष केंद्रीत करा तर 15 दिवसांत चांगले परिणाम दिसतील. हे मुद्दे म्हणजे एकेका रूग्णामागचे जास्तीत-जास्त संपर्क शोधा. चेस द व्‍हायरस मोहीम अधिक गांभीर्यपूरक राबवा. कंटेन्टमेंट क्षेत्रात कडक नियम पाळा. चाचण्यांची क्षमता वाढवा. घरोघर सर्वेक्षणाला अधिक गती द्या.आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, वैद्यकीय सहाय्यक यांच्या सहभागाने घरोघरी भेटी देवून कुटूंबाच्या आरोग्याची चौकशी करणारी मोहीम राबविणार आहोत. ही तपासणी नसेल असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, यात घरातील कुणाला इतरही काही आजार आहेत का. त्यांचे आरोग्य कसे आहे. त्यांना न्युमोनिया सदृश्य काही लक्षणे आहेत का. घरात बाहेरून कुणी व्यक्ती आले आहेत. मास्क व इतर शारिरीक अंतराच्या नियमांचे पालन व्यवस्थित केले जाते का. याविषयी पूर्ण माहिती विचारली जाईल. केवळ पश्चिम महाराष्ट्रातीलच नव्हे तर कोणत्याही जिल्ह्याला या कोरोना लढ्यात काही अडचण आल्यास किंवा काही कमतरता भासल्यास राज्य शासन संपूर्ण सहकार्य करणार. मात्र कुचराई करू नका, गाफील राहू नका.कोरोना विषाणूवर लस येईल तेव्हा येईल, पण कायमस्वरूपी चेह-याला मास्क लावा. शारीरिक अंतर राखणे, गर्दी टाळणे, वारंवार हात धुणे ही त्रिसुत्री अतिशय महत्वाची आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, सुविधा उभारण्यात मदत केली जाईल. निधीही कमी पडू दिला जाणार नाही. मात्र या सुविधा वापरायची वेळ येणार नाही इतक्या जबाबदारीने काम करा आणि कोरोना रोखा. अनलॉकमध्ये अनेक व्यवहार सुरू केले आहेत. मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्याच्या विनंत्या करण्यात येणार आहेत. मात्र सावधानता बाळगावीच लागणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.            सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी यावेळी कोरोनाबाबतचा सविस्तर आढावा दिला. मुख्य सचिव संजय कुमार, आरोग्य विगागाचे प्रधान सचिव डॉ. व्यास आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार श्री. मेहता यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ. सुहास वारके उपस्थित होते.