Monday, June 30, 2025
spot_img
Home Blog Page 25

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

डेलिया ग्रुप प्रथम : जैना ओसवाल गरबा क्वीनची मानकरी : महिलांनी लुटला नृत्याचा आनंद

कोल्हापूर/प्रतिनिधी : शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन यांच्यावतीने आयोजित रास दांडिया कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवार पेठ येथील शुभंकरोति सांस्कृतिक भवनमध्ये रास दांडियाचा कार्यक्रम रंगला.रास दांडियाचे उद्घाटन आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता सत्यजित जाधव, दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या आईसाहेब श्रीमती प्रेमला पंडितराव जाधव, माजी नगरसेविका वहिदा सौदागर, वैभवी जरग, रिलस्टार डॉ. शिवानी खामकर, राजमती सावंत, राजकुवर सावंत, नेहा होमिओपॅथिक असोसिएशनच्या सदस्या डॉ. सुषमा जगताप, डॉ. मंजुश्री मोरे, डॉ. दिपाली मॅडम, राष्ट्रीय काँग्रेस युवती विभागाच्या शहराध्यक्ष अंजली जाधव, निर्मला सालढाणा, विद्या घोरपडे, रजत ओसवाल, सोहन टिंडवानी, स्वप्नाली जगोजे, साहिल भारती आदी उपस्थित होते.                      रास दांडियामध्ये युवती, महिला व लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले. नॉनस्टॉप म्युझिक, डीजे आणि दांडियाच्या तालावर सर्वांनीच नृत्याचा आनंद लुटला. पारंपारिक वेशभूषेत महिला व युवतींनी ग्रुप दांडिया नृत्याचे बहारदार सादरीकरण केले.रास दांडिया मध्ये विविध स्पॉट गेमने धमाल उडवली. तसेच नृत्याचा आनंद घेताना फाउंडेशनच्या वतीने विविध गटात बक्षीस देण्यात आली.विविध गटातील विजेते पुढीलप्रमाणे : दांडिया ग्रुप : डेलिया ग्रुप (रंकाळा स्टॅन्ड), सनेडो ग्रुप (भक्तीपूजानगर), शरण्या ग्रुप (सम्राटनगर), उत्तेजणार्थ – गर्ल्स फॉरेव्हर (मंगळवार पेठ), विश्वशांती गरबा क्वीन ग्रुप (सम्राट नगर), करवीर निवासिनी ग्रुप (लाईन बझार, कसबा बावडा). गरबा क्वीन : जैना ओसवाल. बेस्ट ड्रेपरी : संपदा चव्हाण. राधाकृष्ण वेशभूषा : प्रीती पेडणेकर -नलिनी मेंगे, सपना शिंदे – अनिश शिंदे. दांडिया सजावट : स्मिता गुंदेशा. बेस्ट सेल्फी : श्रावणी सूर्यवंशी, अमरजा जाधव, रितल मालवणकर. लाईव्ह रील : सान्वी बाबर, श्रावणी बाबर, निशिगंधा पंडत, भाग्यश्री पाटील. उत्साही जेष्ठ नागरिक महिला : प्रीती पवार.या रास दांड्या कार्यक्रमात उपस्थित महिलांच्यामध्ये लकी ड्रॉ द्वारे भाग्यवंत महिलेस दोन रात्री व तीन दिवसाची गोवा ट्रिप देण्यात आली. गोवा ट्रिपच्या विजेत्या सुप्रिया कारेकर ठरल्या.

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

0

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

अतिग्रे/प्रतिनिधी : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संजय घोडावत यांना एज्युकेशन टुडे संस्थेच्या वतीने यावर्षीचा एज्युकेशन आयकॉन पुरस्कार मुंबई येथे सुप्रसिद्ध मनोविकार तज्ञ कन्नन गिरीश यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अनिल शर्मा उपस्थित होते.घोडावत यांनी पश्चिम महाराष्ट्र व बेळगाव येथे शैक्षणिक संकुलाची निर्मिती केली आहे. केजी टू पीएचडी पर्यंतचे शिक्षण इथे घेता येते.येथील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. उत्कृष्ट प्रॅक्टिकल लॅब, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, फूड कोर्ट अशा पायाभूत सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या. आहेत. संजय घोडावत विद्यापीठातील विद्यार्थी जागतिक स्तरावर विविध कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यांना गुणवत्तापूर्ण आणि कौशल्यपूर्ण शिक्षण विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाद्वारे दिले जाते.तसेच विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी व कौशल्य वाढीस लागावे यासाठी विविध कोर्सेस व वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे.
शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रातही येथील विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा गाजवत आहेत. स्कूल, विद्यापीठ यांच्यामार्फत सामाजिक कार्याचा आदर्श त्यांनी समाजासमोर घालून दिला आहे.या पुरस्काराबद्दल बोलताना अध्यक्ष संजय घोडावत म्हणाले,की विद्यापीठाने विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून पायाभूत सोयी सुविधा वातावरण व कोर्सेसची निर्मिती केली आहे. येथे कार्यरत असणाऱ्या सर्व प्राध्यापक,अधिकारी,कर्मचारी यांच्यामुळे विद्यापीठाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. विद्यार्थी व पालकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे हे यश मिळाले आहे.जागतिक स्तरावर विद्यापीठ नवा रूपाला आणणेचे आमचे प्रयत्न आहेत. या यशाचे श्रेय विश्वस्त विनायक भोसले,कुलगुरू प्रो.उद्धव भोसले, प्राचार्य डॉ. विराट गिरी, संचालक श्री वासू ,संचालक-प्राचार्य सस्मिता मोहंती, इतर सर्व डीन, प्राचार्य,प्राध्यापक, कर्मचारी यांनी घेतलेल्या मेहनतीचे आहे.या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून संजय घोडावत यांचे अभिनंदन होत आहे.

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

0

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

कोल्हापूर/प्रतिनिधी : २५ ऑक्टोबरला एक धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तो म्हणजे ‘नाद – द हार्ड लव्ह’ हा प्रेमाची नवी व्याख्या सांगणारा चित्रपट खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटांच्या कक्षा रुंदावणारा ठरणार आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’च्या रूपात दर्जेदार निर्मितीमूल्ये असलेला संगीतप्रधान रोमँटिक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘देवमाणूस’ या मालिकेद्वारे महाराष्ट्राच्या घरोघरी लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून, त्याचे एक वेगळेच रूप यात आहे.
टिझर आणि ट्रेलरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर निर्माते संजय पगारे आणि रुपेश दिनकर यांनी शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकरच्या बॅनरखाली बनवलेला ‘नाद – द हार्ड लव्ह’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रुपाली दिपक पवार आणि वैशाली नितीन पवार या चित्रपटाचे निर्मिती व्यवस्थापक आहेत. दिग्दर्शनाची धुरा प्रकाश जनार्दन पवार यांनी सांभाळली आहे. आपल्या कल्पक दिग्दर्शन शैलीद्वारे पवार यांनी ‘नाद’मध्ये एक अनोखी प्रेमकहाणी सादर केली आहे. या चित्रपटात उदय आणि शुभ्रा यांची प्रेमकहाणी पाहायला मिळेल. या चित्रपटातील अजिंक्य ही आणखी एक महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. ‘नाद’ हा म्हणजे दोन प्रेमी जीवांची आवड पूर्ण करण्याचा प्रवास आहे. या चित्रपटात जरी आजवर कधीही न पाहिलेली लाल मातीतील अ‍ॅक्शनदृश्ये पाहायला मिळतील. सकस कथानकाला मुद्देसूद कथानकाची जोड आणि सहजसुंदर अभिनयाच्या साथीने सादर केलेली प्रेमकथा हे ‘नाद’चं वैशिष्ट्य आहे. या चित्रपटामध्ये दोन रोमँटिक, एक सॅड आणि एक धमाल नाचो गीत अशी एकूण चार गाणी आहेत. मराठी सिनेसृष्टीतील आजचे आघाडीचे संगीतकार पंकज पडघन यांनी गीतकार वैभव देशमुख आणि विनायक पवार यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतसाज चढवला आहे. ‘डोळ्यांत तूच आहे…’, ‘तुझ्यामुळे जिंदगी सपान वाटते रे…’, ‘नादखुळा डान्स करा रे…’ आणि ‘जीवाचे हाल…’ ही चारही गाणी चित्रपटामध्ये वेगवेगळ्या प्रसंगी येतात आणि मनाला भुरळ घालतात. अर्थपूर्ण शब्दांना सुरेल संगीताची जोड हे या गाण्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. नयनरम्य लोकेशन्सवर चित्रीकरण करण्यात आल्याने पडद्यावर चित्र पाहताना ते सुखावह वाटेल.
किरण गायकवाडची मुख्य भूमिकेसाठी करण्यात आलेली निवड आणि त्याची सपना माने या नवोदित अभिनेत्रीसोबत जमलेली जोडी चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. किरण गायकवाडसाठी हा चित्रपट इमेज ब्रेकिंग ठरणारा असून, त्याने आपल्या व्यक्तिरेखेसाठी खूप मेहनत घेतल्याचे दिग्दर्शक जनार्दन पवार म्हणाले. ते म्हणाले की, चित्रपटातील व्यक्तिरेखांसाठी अचूक कलाकारांची निवड करण्यात आली आहे. किरणसारखा तगडा अभिनेता मुख्य भूमिकेत असल्याने ‘नाद’ एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे. त्याला सपनाची सुरेख साथ लाभली आहे. इतर कलाकारांनी आपापल्या व्यक्तिरेखांना न्याय देण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. यातील गाणी संगीतप्रेमींच्या ओठांवर रुंजी घालणारी असून, चित्रपटगृहातून बाहेर पडणारे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर एक परिपूर्ण कलाकृती पाहिल्याचा आनंद पाहायला मिळेल अशी आशाही पवार यांनी व्यक्त केली आहे. संतोष दाभोळकर आणि दिपक पवार यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून, पटकथा व संवादलेखन डॉ. विनायक पवार यांनी केलं आहे. किरण गायकवाड आणि सपना माने यांच्यासह यशराज डिंबळे, तानाजी गालगुंडे, किरण माने, विजय पाटकर, जयवंत वाडकर, कमलेश सावंत, टिशा संजय पगारे, सूरज पवार, विनायक पवार, श्रीकांत गायकवाड, गणेश पदमाळे, आशिष वारंग, ईश्वर सातलिंग बोरामणी आदी कलाकारांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. कला दिग्दर्शन सतीश चिपकर यांनी केले असून, डिओपी अमित सिंह यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. कोरिओग्राफी सिद्धेश दळवीने केली असून, वेशभूषा निगार शेख यांची आहे. रमेश शेट्टी या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर असून आमिरा शेख क्रिएटिव्ह हेड आहेत. लाइन प्रोड्युसर संकेत चव्हाण असून, सुजित मुकटे कार्यकारी निर्माते आहेत.

११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद

0

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र

११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद

कोल्हापूर/प्रतिनिधी : शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद कोल्हापूर मध्ये येत्या २१ ऑक्टोबर रोजी होत आहे असे आज खासदार छत्रपती शाहू महाराज,आमदार सतेज पाटील,विधान परिषद गटनेता खासदार समन्वयक गिरीश फोंडे यांनी सर्किट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
गोवा ते नागपूर अशा ८०५ किलोमीटर लांबीच्या ८६ हजार कोटी नियोजित खर्चाचा शक्तीपीठ महामार्ग हुकूमशाही पद्धतीने लादण्याचा निर्णय महाराष्ट्रातील महायुती सरकारने २८ फेब्रुवारी व ७ मार्च २०२४ च्या गॅझेट नोटिफिकेशन द्वारे घेतला. याच दिशेला जाणारे पर्यायी दोन महामार्ग असताना या अनावश्यक अशा शक्तिपीठ महामार्गाची योजना सरकारने केली. या महामार्गामुळे २७ हजार एकर जमीन १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जाणार आहे. कोल्हापुरातील ५,२८१ एकर जमीन ही संपादित केली जाणार आहे. मार्च महिन्यापासूनच कोल्हापुरातील शेतकरी हे अत्यंत आक्रमकपणे आंदोलन करत आहेत. ४ एप्रिल रोजी सर्वपक्षीय निर्धार मेळावा घेऊन या विरोधात एकत्रित लढण्याचा निर्धार झाला.
सर्वप्रथम कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर ११ मार्च रोजी व नंतर १८ जून रोजी भव्य मोर्चा काढून शेतकऱ्यांनी सरकारला इशारा दिला होता. मंत्र्यांना कोल्हापूर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलीस व जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीने आंदोलनाचा धसका घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर मीटिंग पार पडल्या.कोल्हापुरातील सहा तालुक्यांमध्ये या विरोधात जनजागृती मेळावे व रास्ता रोको आंदोलने झाली. एवढ्या सर्व गोष्टी घडत असताना देखील फक्त शब्दांची फिरवा फिरव करण्यापलीकडे महायुती सरकारने कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही याबद्दल कोल्हापूर सहित १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मध्ये असंतोष खदखदत आहे.
आता महायुती सरकारचा कार्यकाळ संपत असताना आचारसंहिता ही दोन दिवसांमध्ये लागू होण्याची परिस्थिती असताना सरकार हे सवंग लोकप्रियतेसाठी वोट बँक नजरेसमोर ठेवून शेकडो निर्णय घेत मंत्रिमंडळ बैठकांचा सपाटा लावला आहे. सरकारची तिजोरी खाली असताना देखील सात लाख कोटीचे कर्ज राज्यावर असताना देखील सरकार जनतेतील आपली भ्रष्टाचारी प्रतिमा खोडून काढण्यासाठी अनेक घोषणांचा पाऊस पडत आहे. पण लाडक्या कंत्राटदारांचे हे सरकार शेतकऱ्याला मात्र सावत्र भावाची वागणूक देत आहे. शेतकऱ्यांची उदरनिर्वाहाच्या जमिनी काढून व त्यांस आत्महत्येस प्रवृत्त करायला लावून शेतकरी महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसण्याचे काम हे सरकार करत आहे. शेतकरी बहिणी या लाडक्या बहिणी नाहीत का ? असा सवाल शेतकरी करत आहे. त्यामुळे आता शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी हे निर्णायक भूमिका घ्यायच्या तयारीत आहेत.
शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची ऑनलाइन बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद राजर्षी शाहू महाराजांचा वारसा लाभलेल्या कोल्हापूरमध्ये घ्यायचा निर्णय घेण्यात आला. सोमवार २१ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी बारा वाजता ही परिषद होणार आहे.
या परिषदेसाठी संयुक्त किसान मोर्चाचे शेतकरी नेते व महाराष्ट्रातील विविध राजकीय विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.या परिषदेमध्ये खा. शाहू महाराज, आ.सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर, भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकैत, राजाराम सिंह , कृषी अभ्यासक योगेंद्र यादव, माजी आमदार संजय बाबा घाटगे, आ. विश्वजीत कदम, खा.विशाल पाटील, आ.अरुण लाड, आ. ऋतुराज पाटील, आ. राजू बाबा आवळे, किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख, माजी आमदार के पी पाटील , दत्त सहकारी साखर कारखान्याचे गणपतराव पाटील, विजय देवणे, आर के पवार यासह बारा जिल्ह्यातील आमदार खासदार उपस्थित असतील. तसेच खासदार शरदचंद्र पवार साहेब व शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना देखील निमंत्रण दिले जाणार आहे.
अजून देखील वेळ गेलेली नाही आचारसंहितेपूर्वी हा महामार्ग रद्द केल्याची व भूमी संपादन देखील रद्द केल्याची लेखी अधिसूचना काढावी. बारा जिल्ह्यातील इंडिया आघाडीचे व महाविकास आघाडीचे सर्व आमदारांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी व इतरही शेतकरी यांच्या मनात त्या आमदारांबद्दल सहानुभूती असणे नैसर्गिक आहे. त्या सर्व आमदारांचे खासदारांचे आम्ही शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने आभार मानत आहोत व शक्तिपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत त्यांनी शेतकऱ्यांच्या सोबत राहावे अशी आशा खा. श्री. छत्रपती शाहू महाराज,आमदार सतेज पाटील,विधान परिषद गटनेता खासदार समन्वयक गिरीश फोंडे,सम्राट मोरे,शिवाजी मगदूम, आनंदा पाटील,प्रकाश पाटील, कृष्णात पाटील,प्रकाश पाटील, शिवाजी कांबळे,सुधाकर पाटील, शिवाजी पाटील, युवराज शेटे, योगेश कुळवमोडे.,नितीन मगदूम,दादासो पाटील, युवराज कोईंगडे,मच्छिंद्र मुगडे,जालिंदर कुडाळकर, साताप्पा लोंढे ,तानाजी भोसले,आनंदा देसाई यांनी व्यक्त केली आहे.

मिशन रोजगार’च्या माध्यमातून युवापिढीला नोकरीक्षम बनविण्याचा प्रयत्न -आ. ऋतुराज पाटील -कॉर्पोरेट स्किल डेव्लपमेंट प्रोग्राम उत्साहात

0

मिशन रोजगार’च्या माध्यमातून युवापिढीला नोकरीक्षम बनविण्याचा प्रयत्न -आ. ऋतुराज पाटील
-कॉर्पोरेट स्किल डेव्लपमेंट प्रोग्राम उत्साहात

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरमध्ये टॅलेंटची कमतरता नाही. पण अनेकदा विविध स्किल्सच्या अभावामुळे युवा पिढी नोकरीच्या स्पर्धेत मागे पडते. त्यामुळे युवा पिढीला योग्य कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरीक्षम बनविण्यासाठी ‘मिशन रोजगार’ रोजगाराच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी केले.आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील युवा पिढीसाठी ‘मिशन रोजगार’ अंतर्गत आयोजित केलेल्या ‘कॉर्पोरेट स्किल डेव्लपमेंट प्रोग्राम’च्या शुभारंभ प्रसंगी आमदार पाटील बोलत होते. यावेळी मोटीव्हेशनल स्पीकर आणि कॉर्पोरेट स्किल ट्रेनर प्रा. गणेश भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आमदार पाटील म्हणाले, मिशन रोजगाराच्या माध्यमातून युवा पिढीसाठी विविध उपक्रम राबवत आहोत. गतवर्षी ‘जॉब फेअर’च्या माध्यमातून २५० कंपन्यांच्या सहभागातून तब्बल ७, ५०० युवक युवतींना नोकरीची संधी मिळवून देऊ शकलो याचे समाधान आहे. स्किल असेल तर संधीसुद्धा आहेत. त्यासाठी आपल्यातील स्किल्स डेव्हलप करणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेची चांगली तयारी करता यावी, अभ्यास करता यावा , यासाठी कोल्हापुरात चार कोटीच्या निधीतून ५ अभ्यासिका सुरू केल्या आहेत. या माध्यमातून आपल्या घराजवळच अभ्यास करण्याची संधी युवा पिढीला मिळवून दिली आहे. शेंडा पार्क मधील जागा आयटी पार्क विकसित करण्यासाठीही आमचे प्रयत्न सुरू आहेत. युवकांच्या विकासासाठी, त्यांच्या करिअरसाठी जेवढे काही चांगले करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही आमदार पाटील यानी यावेळी दिली.
प्रा. गणेश भोसले यांनी, उपस्थित युवक -युवतीना हार्ड स्किल, सॉफ्ट स्किल आणि लाईफ स्किल या संकल्पना समजावून सांगितल्या. स्वतःमधील कौशल्ये ओळखून ती विकसित केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणे शक्य आहे.
कॉर्पोरेट क्षेत्रासाठी जबाबदारी स्वीकारणे आणि ताकदीने पूर्ण करणे हे सर्वात मोठे कौशल्य आहे. निर्णय क्षमता, क्रिएटीव्ह कम्युनिकेशन आणि इमोशनल कोशंट वर भर दिल्यास करिअरमध्ये निश्चितच यश मिळेल. आपल्याकडे असलेल्या कौशल्यबाबत आत्मपरीक्षण करून ती अपस्केल, अपग्रेड करणे आवश्यक आहे. करियर प्लॅनिंग आणि स्किल्स प्लॅनिंग यांचा एकत्रित विचार करणे गरजेचे आहे.
प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी प्रास्ताविकात ‘मिशन रोजगार’ उपक्रम व त्या अंतर्गत राबवलेले उपक्रम, युवा पिढीसाठीच्या उपलब्ध केलेल्या संधी, विविध उपक्रम यांची माहिती दिली.दीपरत्न पवार, मृणाल भोसले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रा. मकरंद काइंगडे, रोहन चौगले यांच्यासह युवक- युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मिशन रोजगार’ अंतर्गत रविवारी* कॉर्पोरेट स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम – आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून उपक्रम

0

मिशन रोजगार’ अंतर्गत रविवारी* कॉर्पोरेट स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम – आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून उपक्रम

कोल्हापूर/प्रतिनिधी : आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून ‘मिशन रोजगार’ अंतर्गत रविवार दि. १३ ऑक्टोबर रोजी ‘कॉर्पोरेट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’चे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी नोंदणी केलेल्या युवक -युवतींसाठी कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी येथे हा उपक्रम राबवला जाणार आहे.आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील युवक -युवतींना रोजगारक्षम बनविण्यासाठी ‘मिशन रोजगार’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमातर्गत युवक -युवतींना नोकरीसाठी आवश्यक विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. याच उपक्रमातर्गत यापूर्वी नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी रविवारी ‘कॉर्पोरेट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’चे आयोजन करण्यात आले आहे.
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी येथे सकाळी ९ ते १२ या कालावधीत हा कार्यक्रम होणार असून यात तज्ञांकडून विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. नोकरीसाठी मुलाखत देण्यापूर्वी कोणती पूर्वतयारी करावी, रिझ्युम कसा तयार करावा, त्यात कोणत्या गोष्टी ठळकपणे नमूद कराव्या, मुलाखतीसाठी जाताना पोशाख कसा असावा, व्यक्तिमत्व विकासासाठीच्या टिप्स, मुलाखतीची तंत्रे आदी विविध गोष्टीबाबत तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या युवक – युवतीना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तरी नोंदणी केलेल्या युवक -युवतींनी या कॉर्पोरेट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅमसाठी उपस्थित राहून नोकरीसाठीची उत्तम कौशल्ये आत्मसात करावी असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले आहे.

एसएस मोबाईलमध्ये श्याओमीचा दिवाली विथ मी ऑफर

0

एसएस मोबाईलमध्ये श्याओमीचा दिवाली विथ मी ऑफर

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील सुप्रसिद्ध टेकनॉलॉजी ब्रँड श्याओमी ने ब्रिन्ग होम मॅजिक या घोष वाक्याद्वारे दिवाली विथ मी सेल एसएस मोबाईलच्या संपूर्ण महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील 300 शाखांमध्ये जाहीर केला आहे. या प्रसंगी सजू रथनम ( नॅशनल सेल्स हेड श्याओमी),सिद्धार्थ शहा – (चेयरमन एस एस मोबाईल), तुषार जैन (वेस्ट इंडिया हेड श्याओमी), मोहमद इफ्तेकार (मार्केटिंग हेड श्याओमी ) आशिष राय ( सेल्स प्लॅनर श्याओमी ) नितीन जैन (सी इ ओ एस एस मोबाईल), चेतन दोशी (सी ओ ओ एस एस मोबाईल ) नितेश उतेकर (सेल्स मॅनेजर श्याओमी ) अमित पाटील ( बिझनेस हेड एस एस मोबाईल ) उपस्थित होते.
दिवाली विथ मी ऑफर्ससाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री कतरीना कैफ या ब्रँड अँबेसेडर असून या ऑफर अंतर्गत खास ग्राहकांसाठी अविश्वसनीय डिल्स, भरघोस डिस्काउंट, कॅशबॅक व लिमिटेड टाइम ऑफर्स असे भरपूर म्हणजे रु १००० कोटींची ऑफर्स मिळणार आहेत.
स्मार्टफोन व स्मार्ट टीव्ही खरेदीवर प्रत्येक मिनिटाला रेडमी 10000 mAh पॉवर बँक, रेडमी बड्स 5A जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. तसेच बंपर बक्षीस अंतर्गत 4 ह्युंदाई व्हेन्यू कार व 17 रॉयल इन्फिल्ड बाइक्स किंकण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. बेस्ट स्मार्टफोन डील श्याओमी सि व्ही 14 फोन चक्क रु 37999 मध्ये श्याओमी सिव्ही 14 पॉवरफुल स्नॅपड्रॅगॉन 8s Gen 3 प्रोसेसर, 6.55” एमोलेड डिस्प्ले व ट्रिपल कॅमेरा लायका लेन्स सह फक्त रु.37999 च्या इफेक्टिव्ह किमती मध्ये मिळणार आहे.
बेस्ट स्मार्टफोन डील रेडमी नोट 13 प्रो 5G चक्क रु.19999 मध्ये.
रेडमी नोट 13 प्रो 5G फोन 6.67” एमोलेड डिस्प्ले, 200 मेगा पिक्सेल कॅमेरा 67 वॅट फास्ट चार्जिंग सह फक्त रु.19999 च्या इफेक्टिव्ह किमतीमध्ये मिळणार आहे. तसेच रेडमी नोट 13 प्रो प्लस 5G फोन एमोलेड डिस्प्ले, 200 मेगा पिक्सेल कॅमेरा 120 वॅट फास्ट चार्जिंग चक्क स्पेशल किंमत रु 24999 च्या इफेक्टिव्ह किमती मध्ये मिळणार आहे.
बेस्ट 5G फोन चक्क रु 12499 च्या इफेक्टिव्ह किमती मध्ये.
दिवाली विथ मी सेल अंतर्गत रेडमी 13 5G फोन 6.79” डिस्प्ले सह 108 मेगा पिक्सेल कॅमेरा आणि 33 वॉट चार्जिंग सह चक्क रु. 12499 च्या इफेक्टिव्ह किमती मध्ये खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. बेस्ट QLED स्मार्ट तव फक्त रु.29999 च्या इफेक्टिव्ह किमती मध्ये या ऑफर मध्ये श्याओमी 43″ X प्रो QLED टीव्ही चक्क रु 29999 च्या इफेक्टिव्ह किमती मध्ये मिळणार आहे.
स्मार्ट होम डिव्हायसेस वर 70% पर्यंत डिस्काउंट या ऑफरअंतर्गत श्याओमी स्मार्ट डिव्हाइसेसवर 70% पर्यंत डिस्काउंट, रेडमी वॉच 5 ऍक्टिव्ह रु 2599 व रेडमी बड्स 5 सि रु 1599 मध्ये मिळणार आहे.
सर्व नामवंत कंपनीचे EMI, बँक कॅशबॅकची सुविधा, सोबत श्याओमी चा दिवाली विथ मी चे ऑफर्स व भरपूर बक्षिसे यांचा फायदा घेऊन दसरा व दिवाळी उत्साहाने साजरा करा असे आवाहन एसएस मोबाईल व श्याओमीकडून करण्यात आले आहे.

शारदीय नवरात्र उत्सवाच्या सहाव्या दिवशी आई अंबाबाईची गजारुढ अंबारीतील पूजा

0

शारदीय नवरात्र उत्सवाच्या सहाव्या दिवशी आई अंबाबाईची गजारुढ अंबारीतील पूजा

कोल्हापूर/प्रतिनिधी : आज शारदीय नवरात्र उत्सवाच्या सहाव्या दिवशी आई अंबाबाईची गजारुढ अंबारीतील पूजादेव आणि दानव यांच्या युद्धामध्ये कामाक्ष राक्षसाने आपल्या योगदंडाच्या बळावर सर्व देवांना शेळ्या-मेंढ्या बनवले होते.देवी त्र्यंबोलीने ( टेंबलाई ) आपल्या चतुराईने कामाक्षा कडील योग दंड काढून घेऊन देवांना पूर्ववत केले व कामाक्षा बरोबर युद्ध करुन त्याचा वध केला. त्या विजया प्रित्यर्थ श्री महालक्ष्मी ( अंबाबाई ) ने विजय सोहळा आयोजित केला. परंतु या सोहळ्याचे त्र्यंबोली देवीला आमंत्रण द्यायचे राहून गेले.त्यामुळे सखी देवी त्र्यंबोली रुसुन पुर्वेकडील टेकडीवर जाऊन बसली. महालक्ष्मी ( अंबाबाई ) च्या हे लक्षात आल्यावर ती त्र्यंबोली देवी चा रुसवा काढण्यासाठी आजच्या ललिता पंचमी दिवशी तिला भेटायला गेली व तिचा रुसवा काढून दोघींची हृद्य भेट झाली.आजची आई अंबाबाईची पूजा हत्तीवर बसून त्र्यंबोली देवीच्या भेटीला जातानाची आहे.

शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

0

कोल्हापुरात साकारत आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी

शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती

३० एकरांत राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये होणार ६०० बेडचे सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभाग, २५० बेडचे कॅन्सर हॉस्पिटल आणि २५० बेडचे सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, रुग्णसेवा हा माझा जिव्हाळ्याचा विषय

माझ्या जिल्ह्यातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी माझ्या आयुष्यातील सर्वोच्च समाधानाची बाब

कोल्हापूर:प्रतिनिधी : कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये ३० एकरांच्या विस्तीर्ण जागेवर राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी साकारत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत १,१०० बेडच्या हॉस्पिटलचे भूमिपूजन आज बुधवार दि. ९ होत असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सायंकाळी पाच वाजता शेंडा पार्कमध्ये भूमिपूजन आणि साडेपाच वाजता तपोवन मैदानावर जाहीर सभा होणार असल्याचेही, श्री. मंत्री यांनी सांगितले.मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, एक हजार कोटींचे १,१०० बेडचे सर्व सोयी आणि सेवा- सुविधायुक्त अद्ययावत आरोग्य संकुल होत आहे. या अद्ययावत आरोग्य संकुलात ६०० बेडचे सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभाग, २५० बेडचे कॅन्सर हॉस्पिटल आणि २५० बेडचे सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल होणार आहे.
यावेळी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, शेंडा पार्क येथे होत असलेल्या राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी एकूण ३० एकर जागा राखीव ठेवलेली आहे. ही जागा आणि संपूर्ण परिसर विकसित करण्याचे काम वैद्यकीय शिक्षण विभागाने युद्धपातळीवर हाती घेतलेले आहे. लवकरच एकूण अकराशे बेडच्या सर्व सुविधायुक्त व अत्याधुनिक अशा या महाविद्यालयाच्या हॉस्पिटलचा भूमिपूजन समारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभागासाठी ६०० बेड आहेत, २५० बेडचे स्वतंत्र अत्याधुनिक व अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटल आणि २५० बेडचे सर्व सुविधांयुक्त सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अशी विभागणी आहे.
या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवारातील ऑडिटोरियम हॉल, नवीन परीक्षा भवन, मध्यवर्ती ग्रंथालय इमारत, शव विच्छेदन गृह, मुलींचे वस्तीगृह या पूर्ण झालेल्या पाच इमारतींचे लोकार्पण होणार आहे. तसेच पुढील इमारतींचा भूमिपूजन सोहळा होणार आहे.

असे होणार आरोग्य संकुल……

एकूण ३० एकरांत साकारत आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी…..
सामान्य रुग्णालय व बाह्यरुग्ण विभाग बेड ६००
कॅन्सर हॉस्पिटल बेड २५०
सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल बेड २५०
न्यायवैद्यक शास्त्राची स्वतंत्र इमारत
निवासी डॉक्टर्स व आंतरवासिताकरिता पुरूष वस्तीगृह- क्षमता २५०
निवासी डॉक्टर्स व आंतरवासिताकरिता महिला वस्तीगृह- क्षमता २५०
मुलींचे वस्तीगृह- क्षमता १५०
मुलांचे वस्तीगृह- क्षमता १५०
परिचारिका प्रशिक्षण केंद्र इमारत- क्षमता १००
सेंट्रल लायब्ररी
परीक्षा भवन- क्षमता ४००
अंतर्गत रस्ते डांबरीकरण व काँक्रिटीकरण

सर्वोच्च समाधान…...!
पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, माझा स्वतःचा जिल्हा असलेल्या कोल्हापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी साकारत आहे याचा मला आनंद, अभिमान आणि समाधान आहे. रुग्णसेवा हा माझा जिव्हाळ्याचा विषय. या वैद्यकीय नगरीतील १,१०० बेडचे हे अत्याधुनिक आरोग्यसंकुल ही माझ्या आयुष्यातील सर्वोच्च समाधानाची बाब. या आरोग्य संकुलाच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय सुविधा तर मिळतीलच. परंतु; पुणे -मुंबईसारख्या मोठ्या शहरात होणारे यकृत प्रत्यारोपण, मेंदूच्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, कॅन्सर, किडनी, हृदय पोटाचे गंभीर विकार, सांधे रोपण इत्यादी विशेष उपचारही कोल्हापुरातच मिळतील.

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

0

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

सेनापती कापशी येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुतळ्याचेही अनावरण

कागल विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा

उत्तुर येथील निसर्गोपचार व योग महाविद्यालय भूमिपूजनासह मौजे सांगाव येथील आयुर्वेद महाविद्यालयाचेही भूमिपूजन

कागल/प्रतिनिधी : कोल्हापुरातील शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलचा भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच, सेनापती कापशी येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुतळ्याचे अनावरण, कागल विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा, उत्तुर येथील निसर्गोपचार व योग महाविद्यालय भूमिपूजनासह मौजे सांगाव येथील आयुर्वेद महाविद्यालयाचेही भूमिपूजन होणार आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.रविवार दिनांक ६ रोजी चार वाजता सेनापती कापशी येथील हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते व वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.
सोमवार दि. ७ रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते दुपारी ४ वाजता देशातील पहिल्या शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय तसेच हॉस्पिटलचा भूमिपूजन, कोनशीला अनावरण उत्तूरमध्ये होणार आहे. सायंकाळी पाच वाजता पदवी प्रवेश कार्यक्रम बहिरेवाडी ता. आजरा येथील जे. पी. नाईक हॉलमध्ये होत आहे. तसेच; सायंकाळी ६ वाजता उत्तुर येथील उत्तुर- धामणे रोडवरील एसटी स्टँड बांधकाम व तलाव सुशोभीकरण शुभारंभ व येथील नेहरू चौकात जाहीर सभा होणार आहे.
बुधवार दि. ९ रोजी कोल्हापूर येथील शेंडा पार्कमधील ११०० बेडचे हॉस्पिटल तसेच येथील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत होत आहे. तसेच तपोवन मैदानावर जाहीर सभा होणार आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन होणार आहे.गुरुवार दि १० रोजी सायंकाळी ४ वाजता मौजे सांगाव येथील नवोदय विद्यालय शेजारी ग्रामीण सेंटर १०० बेडच्या हॉस्पिटलच्या कामाचा भूमिपूजन, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय शुभारंभ नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू श्रीमती माधुरीताई कानिटकर यांच्या शुभहस्ते व वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन साहेब मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. सायंकाळी सात वाजता मौजे सांगाव येथील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा होणार आहे.