Monday, June 30, 2025
spot_img
Home Blog Page 23

गद्दारांना गाडून महाराष्ट्रद्रोही महायुतीचे सरकार उलथवून टाका : उद्धव ठाकरे यांचे आदमापूरातील सभेत आवाहन

0

गद्दारांना गाडून महाराष्ट्रद्रोही महायुतीचे सरकार उलथवून टाका : उद्धव ठाकरे यांचे आदमापूरातील सभेत आवाहन

महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी. पाटील यांचा प्रचंड गर्दीत प्रचार शुभारंभ संपन्न

गारगोटी/प्रतिनिधी : आपल्या अडीच वर्षांच्या काळात आपण जनतेच्या विकासाच्या योजना राबविल्या. मात्र या काळात एकही उद्योग राज्याबाहेर जाऊ दिला नसल्याने आपलं सरकार विश्वासघाताने पाडलं. ही विधानसभा निवडणूक महाराष्ट्रद्रोही विरोधात महाराष्ट्रप्रेमी अशी असून जनतेने या निवडणूकीत गद्दारांना गाडून महाराष्ट्रद्रोही महायुतीचे सरकार उलथवून टाका, असे आवाहन शिवसेना ( उबाठा ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
राधानगरी- भुदरगड मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी. पाटील यांचा प्रचार शुभारंभ आज संपन्न झाला हा शुभारंभ आदमापूर ( ता. भुदरगड ) येथील संत बाळूमामा मंदिरात करण्यात आला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे बोलत होते.
यावेळी बोलताना श्री. ठाकरे यांनी बोलताना मागील दोन निवडणूकांत ज्या आमदारांना जनतेने विश्वासाने निवडून दिले, त्यांनीच जनतेचा विश्वासघात केला. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरुन नेणाऱ्यांच्या टोळीत राधानगरीचा आमदार सामील झाला हे मोठे दुर्दैव आहे. आपल्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारी करणाऱ्या ४० जणांच्या टोळक्याला स्वाभिमानी जनताच आता घरी बसवणार असून या गद्दारांना गाडण्याची सुरुवात जनतेने राधानगरीतून करावी असे
श्री. ठाकरे म्हणाले, यंदा महाविकास आघाडीचे सरकार आणणारचं असून आपण राज्याला स्थिर सरकार देणार आहे. सध्याच्या टक्केवारीच्या सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील करुन टाकले आहे. आपल्या काळात महागाई वाढू न देता पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपण स्थिर ठेवणार आहे. मालवणच्या शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणाऱ्यांची जाऊ तिथं खाऊ हीच प्रवृत्ती आहे. भविष्यात प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचे मंदिर आपले सरकार बांधणार आहे. तर महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी महिला पोलिसांची भरती करून स्वतंत्र महिला पोलिस स्टेशनची उभारणी करणार आहे असे सांगितले.
आम. सतेज पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या पहिल्या अडीच वर्षांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मांडीला मांडी लावून काम केलेल्यांनी स्वार्थासाठी त्यांचा विश्वासघात केला. ही गद्दारी राज्यातील स्वाभिमानी जनतेला रुचलेली नसून त्याचा परिणाम या विधानसभा निवडणूकीत दिसणार आहे. आजच्या सभेला झालेली गर्दी पाहता ही सभा के. पी. पाटील यांच्या प्रचाराची नसून विजयाची सभा आहे.
उमेदवार के. पी. पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या आणि शिवसेनेच्या प्रचाराची सुरुवात करण्याचा बहुमान उद्धव ठाकरे यांनी राधानगरीला दिला यातच आपल्या जीवनाचे सार्थक झाले. गद्दारांच्या यादीत विद्यमान आमदारांनी सामील होऊन राधानगरीचे नाव बदनाम करण्याचे पाप केले. पाटगाव धरणाचे पाणी अदानीला देणाऱ्या आबिटकरांना जनता यंदा पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी प्रकाश पाटील, संजयसिंह पाटील, विजयसिंह मोहिते, शरद पाडळकर यांनीही मनोगते व्यक्त केली. या सभेस खा. शाहू महाराज छत्रपती, अरुण दुधवाडकर, मिलिंद नार्वेकर, तेजस ठाकरे, विजय देवणे, संजय पवार, व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, सुनील शिंत्रे, हिंदूराव चौगले, शामराव देसाई, राहूल देसाई, अनिल घाटगे, जयवंतराव शिंपी, राजेश पाटील, आर. के. मोरे, सदाशिव चरापले, मुकुंदराव देसाई, पंडीत केणे, धनाजी देसाई, मधुकर देसाई, प्रा. किसन चौगले, अभिजित तायशेटे, धैर्यशील पाटील-कौलवकर, राजू शमनजी, विश्वनाथ कुंभार, उमेश भोईटे, सुरेश चौगले, यांच्यासह महायुतीच्या घटकपक्षातील नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रकाश पाटील यांनी मानले.

चौकट

या प्रचार शुभारंभावेळी के. पी. यांच्या समर्थकांनी विविध घोषणांचे फलक सभास्थळी लावली होती. शिवसेनेत बंड झाल्यावर उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेऊन शिंदेंसेनेत गेलेल्या आमदारांत राधानगरीच्या विद्यमान आमदारांचाही समावेश होता. याला अनुसरुन लावलेल्या घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यातील पन्नास खोके, एकदम ओके आणि गद्दारांना नाही माफी, यंदा आमदार के. पी. या घोषणा लक्षवेधी होत्या.

चौकट

सभेला येण्यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गारगोटी ते आदमापूर पर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर कार्यकर्ते सभास्थळी आले. त्यांच्या मोठ्या उपस्थितीने सभामंडप खचाखच भरुन गेला होता. अनेक कार्यकर्ते सभामंडपाच्या बाहेर उभारलेल्या स्क्रिनवर सभेचे थेट प्रक्षेपण पाहत होते.

चौकट

या प्रचारसभेला मतदारसंघातून आलेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती. डोक्यावर भगवी टोपी आणि गळ्यात मशाल चिन्हाचा स्कार्फ घालून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी १० फूट उंचीचा आणि ३०० किलो वजनाचा फुलांचा हार आणला होता. हा हार क्रेनच्या सहाय्याने ठाकरे यांना घालण्यात आला.

भाजप नेते राहुल देसाई यांचा काँग्रेसमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश

0

भाजप नेते राहुल देसाई यांचा काँग्रेसमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश

कोल्हापूर/प्रतिनिधी : भाजपचे कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल बजरंग देसाई यांनी राधानगरी, भुदरगड विधानसभा मतदार संघातील आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज आणि माझ्या उपस्थितीमध्ये आज सोमवार 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी देसाई कुटुंबियांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या तीन पिढ्यांनी काँग्रेस पक्षासाठी काम केले आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेल्या राहुल यांच्या स्वगृही परतण्याने या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे बळ मिळाले आहे.
यावेळी माजी आमदार बजरंग आण्णा देसाई, पी.डी. धुंदरे, सदाशिवराव चरापले, आर. के. मोरे, शामराव देसाई, प्रकाश देसाई, प्रकाश कुलकर्णी, सचिन घोरपडे, विश्वजीत जाधव, जीवन पाटील, दिनकर कांबळे, धोंडीराम मगदूम, हिंदुराव चौगुले, संजयसिंह पाटील, विश्वनाथ पाटील, एस. एन. पाटील, पांडुरंग भांदिगरे, संजय सावंत, दिग्वीजय कुऱ्हाडे, नौशाद बुडेखान, बाळासाहेब गुरव, भुजंगराव मगदुम, संजय सरदेसाई यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजप नेते राहुल देसाई यांचा काँग्रेसमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश

0

भाजप नेते राहुल देसाई यांचा काँग्रेसमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश

कोल्हापूर/प्रतिनिधी : भाजपचे कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल बजरंग देसाई यांनी राधानगरी, भुदरगड विधानसभा मतदार संघातील आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज आणि माझ्या उपस्थितीमध्ये आज सोमवार 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी देसाई कुटुंबियांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या तीन पिढ्यांनी काँग्रेस पक्षासाठी काम केले आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेल्या राहुल यांच्या स्वगृही परतण्याने या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे बळ मिळाले आहे.
यावेळी माजी आमदार बजरंग आण्णा देसाई, पी.डी. धुंदरे, सदाशिवराव चरापले, आर. के. मोरे, शामराव देसाई, प्रकाश देसाई, प्रकाश कुलकर्णी, सचिन घोरपडे, विश्वजीत जाधव, जीवन पाटील, दिनकर कांबळे, धोंडीराम मगदूम, हिंदुराव चौगुले, संजयसिंह पाटील, विश्वनाथ पाटील, एस. एन. पाटील, पांडुरंग भांदिगरे, संजय सावंत, दिग्वीजय कुऱ्हाडे, नौशाद बुडेखान, बाळासाहेब गुरव, भुजंगराव मगदुम, संजय सरदेसाई यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजेश क्षीरसागर यांच्या प्रचाराचा उद्या दि.०५ रोजी शुभारंभ क्षीरसागरांची हायटेक प्रचार यंत्रणा सज्ज

0

राजेश क्षीरसागर यांच्या प्रचाराचा उद्या दि.०५ रोजी शुभारंभ क्षीरसागरांची हायटेक प्रचार यंत्रणा सज्ज

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर रिंगणात उतरले आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्या वेळी राजेश क्षीरसागर निवडणूक लढवत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता यावी यासाठी राज्यभरातील महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकवटले आहेत.गेल्या तीन निवडणुकांचा पूर्वानुभव पाहता क्षीरसागर यांनी यावेळीही प्रचारासाठी हायटेक यंत्रणा सज्ज केली आहे. यामध्ये एल.ई.व्हॅन, रिक्षा आदीसह विभागवार सुमारे २५ प्रचार फेऱ्या, ४५ कोपरा सभा, मुख्य ५ सभा याद्वारे शिवसेनेचे भगवे वादळ शहरात घोंगावणार आहे. यामध्ये महायुतीचे सर्वच नेते, पदाधिकारी यांचा सहभाग असणार आहे. यासह क्षीरसागर यांचे संपूर्ण कुटुंब प्रचारात उतरले असून, वैयक्तिक भेटी गाटी, तालीम संस्था मंडळांना भेटीच्या माध्यमातून घरोघरी प्रचारास गती घेतली आहे.राजेश क्षीरसागर यांच्या हायटेक प्रचार यंत्रणेचा उद्या शुभारंभ होणार असून, उद्या मंगळवार दि.०५ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता “कोटीतीर्थ तलाव, कोल्हापूर” येथून प्रचारास शुभारंभ होणार आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे. यानंतर कोटीतीर्थ तलाव येथून प्रचार फेरीस शुभारंभ होणार आहे. ही फेरी शाहू मिल – मातंग वसाहत – पिंपळेश्वर मंदिर – पांजरपोळ रोड – शिवाजी तालीम मार्गे राजारामपुरी भाजी मंडई येथे समाप्त करण्यात येणार आहे.

कोल्हापूर उत्तर मधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मधुरीमाराजे यांची माघार

0

कोल्हापूर उत्तर मधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मधुरीमाराजे यांची माघार

कोल्हापूर / प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर मध्ये आता मोठा भूकंप झाला असून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार असलेल्या मधुरीमाराजे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघारी घेतली आहे. अपक्ष अर्ज भरलेले राजेश लाटकर यांनी उमेदवारी बाबत आग्रह धरला होता त्यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र काँग्रेसच्या नगरसेवकांचा याला विरोध होता हा विरोध लक्षात घेऊन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मधुरिमा राजे यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये अधिकृत काँग्रेसची उमेदवारी दिली होती आणि या अधिकृत काँग्रेसच्या उमेदवार असलेल्या मधुरीमाराजे यांनी आपला अर्ज दाखल केला होता मात्र अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी राजेश लाटकर यांनी आपला मोबाईल फोन स्विच ऑफ करून ठेवल्याने नॉट रिचेबल मोबाईल लागला. दिवसभर त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न सर्वच पातळीवर केला गेला शिवाय खासदार छत्रपती शाहू महाराज यांनीही राजेश लाटकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी राजेश लाटकर माघारीसाठी आलेच नाहीत म्हणून मधुरीमाराजे यांनी माघार घेतली असल्याचे खासदार शाहू महाराज यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
सुरुवातीला मला अर्ज भरण्यास सांगण्यात आले मी अर्ज भरला आणि मला पुन्हा उमेदवारी मागे घेण्याची विन विनंती केली गेली असा आरोप राजेश लाटकर यांनी केला होता यावर पक्षांनी विचार केला आणि मधुरिमाराजे यांना उमेदवारी दिली गेली होती.पण माघारीच्या दिवशीच राजेश लाटकर यांचा मोबाईल नॉट रीचेबल लागला त्यामुळे त्यांची माघारी होणार नाही म्हणूनच मधुरीमाराजे यांनी माघार घेतली आहे.असे खासदार शाहू महाराज यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या महाविकास आघाडीला मधुरीमा राजे यांनी माघार घेतल्याने धक्का बसला आहे.उत्तरेत काँग्रेसचा अधिकृत उमेदवारच आता निवडणुकीच्या रिंगणात नाही.

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

0

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी वाय पाटील (दादासाहेब) यांचा 90 वा वाढदिवस मंगळवारी कौटुंबिक वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील निवासस्थानी कुटुंबीयांनी औक्षण करून त्यांना दीर्घायुष्यसाठी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. डॉ. डी. वाय. पाटील यांनी १९८४ साली कसबा बावडा येथे पहिले अभियांत्रिकी महविद्यालय सुरू केले. त्यानंतर कोल्हापूर, मुंबई व पुणे येथे डी.वाय’ पाटील ग्रुपचा विस्तार करत अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, व्यवस्थापन, आर्किटेक्चर, हॉस्पीटल, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था सुरू केल्या. दादासाहेबांच्या दूरदृष्टी नेतृत्वातून आज ८ विद्यापीठे,१८२ संस्था, २२ हजाराहून अधिक कर्मचारी, सव्वा चार लाखाहून अधिक माजी विद्यार्थी असा संस्थेचा मोठा विस्तार झाला आहे.
शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या दादासाहेबांनी मंगळवारी 91 व्या वर्षात पदार्पण केले. कुटुंबीयांनी औक्षण करून दादासाहेबांना निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत आशीर्वाद घेतले. यावेळी दादासाहेब यांची ग्रंथतुला करण्यात आली. ही पुस्तके गरजवंत विद्यार्थ्यांना वितरीत केली जाणार आहेत. दादासाहेबाच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सौ. शांतादेवी डी. पाटील, डॉ. संजय डी. पाटील, डॉ. विजय डी. पाटील, आमदार सतेज डी. पाटील, अजिंक्य डी. पाटील, सौ. सुप्रियाताई पाटील, डॉ. नंदिनी पालशेतकर, डॉ. प्रिया चोलेरा, सौ. राजश्री काकडे, सौ. वैजयंती संजय पाटील, सौ. शिवानी पाटील, सौ. पूजा पाटील, श्री. मेघराज काकडे, डॉ. रष्मित चोलेरा, डॉ.पालशेतकर, आमदार ऋतुराज पाटील, सौ. पूजा ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील, सौ. स्मिता योगेश जाधव, सोमनाथ पाटील, भरत पाटील, करण काकडे, चैत्राली काकडे, सौ. स्नेहल समीर मुळे यांच्यासह सुना, जावई, नातसुना-जावई, नातवंडे- पणतवंडे यांच्यासह सर्व कुटुंबीय उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, भारती विद्यापीठाचे डॉ. शिवाजीराव कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी फोनद्वारे दादासाहेबाना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी टी शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर, अजित पाटील बेनाडीकर, शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे डॉ. डी. आर. मोरे, डॉ. व्ही. एम. पाटील, जयकुमार देसाई, डॉ. मंजिरी मोरे, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी, रमाताई बोंद्रे, अभिषेक बोंद्रे, अण्णासाहेब चव्हाण पाटील, धैर्यशील पाटील, गोकुळचे संचालक, श्रीराम सोसायटीचे सर्व संचालक यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य,पत्रकारितेसह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच डी. वाय. पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष भेटून दादासाहेबांना शुभेच्छा दिल्या.

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना ‘वेल्डींग, सीएनसी कोर्स’ व ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

0

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना ‘वेल्डींग, सीएनसी कोर्स’ व ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

शिरोली एमआयडीसी/प्रतिनिधी : केंद्रशासना मार्फत व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधी सर्व स्तरावर पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून शासकीय तसेच अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भारतभर सातत्याने प्रयत्न करीत आहेत.
डीजीटी नवी दिल्ली ने नुकतीच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची [ आयटीआय ] ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची वाढीव मुदत दि. २३ ऑक्टोबर २०२४ पर्यन्त असल्याचे जाहिर केले आहे.
शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर संचलित औद्यागिक प्रशिक्षण संस्था व मुलभूत प्रशिक्षण केंद्रात गेल्या अनेक वर्षापासून उत्तम व्यावसायिक शिक्षण व गुणवत्तावर आधारित प्रात्याक्षिक व्यवसायाच्या शैक्षणिक संधी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.यातील खास बाब म्हणजे एक वर्ष मुदतीचा वेल्डर [ गॅस व इलेक्ट्रिक ] व सीएनसी प्रोग्रामर कम ऑपरेटर या व्यवसायात ही मुलींना प्रवेशासाठी विशेष प्राधान्य दिले जात आहे.
त्याच बरोबर संस्थेमध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, ड्राफ्टस्मन (मॅकेनिकल )व मशिनिष्ट या व्यवसायात देखील प्रशिक्षण दिले जाते आहे.
स्मॅक आयटीआय मध्ये गरजू मुलींना व युवकांना फी मध्ये विशेष सवलत दिली जात असून दहावी पास किंवा नापास मुली व युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण देवून त्यांना कुशल कारागीर बनवण्याचे कार्य अविरतपणे चालू आहे. अशा अनेक मुले व मुली या कोर्सनंतर अनेक नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पगारावर नोकरी करत आहेत व त्यांना रोजगाराच्या चांगल्या संधीही उपलब्ध होत आहेत.
तरी दि. २३ ऑक्टोंबर २०२४ पर्यन्त गरजू मुली व युवकांना ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत शासनाने दिली असून अर्ज भरलेल्या उमेदवारांनी दि. ३० ऑक्टोंबर २०२४ पर्यन्त संस्थेमध्ये उपस्थित राहून आपले प्रवेश निश्चित करावेत असे आवाहन स्मॅक चे चेअरमन सुरेन्द्र जैन, स्मॅक आयटीआयचे चेअरमन प्रशांत शेळके व प्राचार्य प्रसन्न वरखेडकर यांनी केले आहे.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

0

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डी.वाय. पाटील.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य असलेले डॉ.डी.वाय. पाटील १९५७ ते १९६२ दरम्यान कोल्हापूर शहराचे महापौर होते. १९६७ व १९७२ साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर निवडून आले. २४ डिसेंबर २०१८ रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था स्थापन केल्या, ज्यात डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स अँड मॅनेजमेंट, आकुर्डी, पुणे डी.वाय.पाटील विद्यापीठ, पुणे येथील डॉ.पद्मश्री डीवाय पाटील विद्यापीठ, नवी मुंबई डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय नवी मुंबईचे डॉ.डी.वाय.पाटील एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी पुण्यातील डॉ.डी.वाय.पाटील नॉलेज सिटी,डॉ. डी. वाय पाटील इंटरनॅशनल स्कूल, मुंबई डीवाय पाटील इंटरनॅशनल स्कूल, नागपूर डॉ डी वाय पाटील इंटरनॅशनल स्कूल, कांगडा (हिमाचल प्रदेश)डी वाय पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, कोल्हापूर डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर पुण्यातील डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ.डी.वाय. पाटील हॉस्पिटल , मुंबई डी..वाय पाटील इंटरनॅशनल स्कूल, बेल्जियम,डॉ डी वाय पाटील कनिष्ठ महाविद्यालय, पुणे,डी.वाय.पीडीसी सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह रिसर्च अँड स्टडीज,डॉ. डी.वाय.पाटील पुष्पलता पाटील इंटरनॅशनल स्कूल, पाटणा,डॉ डी.वाय. पाटील बी-स्कूल, पुणे,डॉ.डी.वाय.पाटील बायोटेक्नॉलॉजी अँड बायोइन्फर्मेटिक्स इन्स्टिट्यूट, पुणे आदी संस्थांची उभारणी त्यांनी केली.                                                               डॉ. डी.वाय.पाटील १९५७ मध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून कोल्हापूर नगरपरिषदेवर निवडून आले आणि १९६२ पर्यंत ते या पदावर राहिले. १९६७-७८ पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते . १९६७ आणि १९७२ या दोन्ही निवडणुकांमध्ये ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. २१ नोव्हेंबर २००९ रोजी त्यांची त्रिपुरा राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आणि २७ नोव्हेंबर २००९ रोजी त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. ९ मार्च २०१२ रोजी त्यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली.इंदिरा गांधी यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याचा किंवा संजय गांधींशी असलेल्या मैत्रीचा राजकीय लाभ घ्यावा असे डी.वाय. पाटील यांना त्यावेळीही वाटले नाही, आणि तो घेतला नाही त्याबद्दल आजही खंत वाटत नाही. किंबहुना त्यांची तशी प्रवृत्ती नव्हती आणि नाही. त्यामुळेच राजकारणात ते रमले नसावेत.डॉ. डी. वाय. पाटील यांची मंत्रिपदाची पहिली संधी हुकली नसती, तर ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचू शकले असते आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा भविष्यातला पोत बदलून गेला असता. १९७८ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यामुळे त्या संधीने पुन्हा पाठ फिरवली. पुढच्या पराभवानंतर त्यांचा राजकारणातला रस हळुहळू कमी होत गेला आणि ऐन उमेदीत त्यांनी राजकारणाला रामराम ठोकला.पन्नास हे ख-या अर्थाने राजकारण सुरू करण्याचे वय असते. परंतु डी. वाय. पाटील यांनी वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी राजकारणाचा त्याग करून आजच्या काळात विश्वसनीय वाटणार नाही, असे धाडस केले.एकदा राजकारणाचा चस्का लागला की मरेपर्यंत त्याचा मोह सुटत नाही, असे आपल्याकडील अनेक उदाहरणांवरून दिसून येते. परंतु डी. वाय. पाटील हे वेगळेच आहेत. त्यांनी ते धाडस दाखवले आणि सक्रीय राजकारणाचा पुन्हा स्वप्नातही विचार केला नाही.                        राजकारण सोडल्यानंतरच्या उर्वरित आयुष्यात त्यांनी जे काही उभे केले, ते एका व्यक्तिला नव्हे, तर एका सरकारलाही शक्य होणार नाही एवढे प्रचंड आहे.सरकारच्या आणि सरकारमधल्या दूरदृष्टीच्या लोकांच्या पाठिंब्यावरच त्यांचे सगळे शैक्षणिक साम्राज्य उभे राहिले असले तरी ते उभे करण्यासाठी जी दृष्टी आणि जिगर असावी लागते, ती एखाद्याच डी. वाय. पाटील यांच्याकडे असू शकते.कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्यासारख्या ऋषितुल्य माणसांनी शिक्षण क्षेत्रात केलेले काम डी. वाय. पाटील यांच्यासमोर होते. किंबहुना ते पाहात, त्यांच्या त्यागाच्या गोष्टी ऐकतच ते मोठे झाले. डी. वाय.पाटील यांनी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. कर्मवीर आणि बापूजींच्या काळातल्यासारखी परिस्थिती नव्हती. शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहोचली होती. शिवाजी विद्यापीठासारख्या विद्यापीठामुळे खेड्यापाड्यातल्या मुलांना उच्च शिक्षणाचे दरवाजेही खुले झाले होते. परंतु हे सगळे शिक्षण पारंपरिक पठडीतले होते.वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी मर्यादित जागा होत्या आणि उच्च प्रतीच्या गुणवत्तेमुळे तिथे ठराविक वर्गातील मुलांचीच मक्तेदारी होती. ही कोंडी फोडली वसंतदादा पाटील यांच्यासारख्या अवघी सातवी इयत्ता उत्तीर्ण असलेल्या मुख्यमंत्र्यांनी. राज्यात विनाअनुदानित शिक्षणाचे धोरण आणले आणि खेड्यापाड्यातल्या मुलांना वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले. राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी पुढाकार घेतला आणि विनाअनुदानित शिक्षणाचे धोरण राबवले. परंतु सहकाराची कोणतीही ताकद नसलेल्या डी. वाय. पाटील, पतंगराव कदम यांच्यासारख्यांनी हे धोरण प्रभावीपणे आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून राबवले. वसंतदादा पाटील यांनी जे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी पुढे शरद पवार य़ांच्यासारख्या दूरदृष्टीच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर अधिकची जबाबदारी सोपवली, ती त्यांनी उत्तमपणे पार पाडली. राज्याच्या प्रमुख शहरांमधून संस्थांचा विस्तार केला.                                              Bडी. वाय. पाटील यांनी नेपाळ, मॉरिशसमध्ये शिक्षणसंस्था काढल्या त्याची खूप चर्चा झाली. परंतु ती चर्चा त्यावेळी तेवढ्यापुरतीच झाली. डी. वाय. पाटील ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील असामी बनली. किंवा त्यांचे साम्राज्य देशाबाहेर विस्तारले आहे, बिहारमधील उच्च शिक्षणाची सगळी व्यवस्था किडली होती. आधीच्या राज्यपालांनी पैसे घेऊन कुलगुरूंच्या नेमणूका केल्या होत्या, त्याची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली होती. दरम्यान डी. वाय. पाटील यांची त्रिपुराहून बिहारमध्ये राज्यपाल म्हणून बदली झाली. त्यांनी तिथल्या उच्च शिक्षण व्यवस्थेला जी काही शिस्त लावली,त्यामुळे नीतिश कुमार यांच्यासारखे मुख्यमंत्रीही थक्क झाले होते. जिथे जायचे तिथे तिथले होऊन काम करायचे, उत्तमातले उत्तम रिझल्ट द्यायचे, ही डी. वाय. पाटील यांच्या कामाची पद्धत आहे, ती त्यांनी राज्यपाल पदावरूनही दाखवली. त्रिपुरासारख्या गरीब राज्यासाठी आपल्या पदाचा उपयोग करताना त्यांनी केंद्रातील ओळखींचा उपयोग करून पॉवर प्रोजेक्ट मंजूर करून घेणे, त्रिपुराला एज्यूकेशन हब बनवण्यासाठी प्रयत्न केले. राज्यपालपद हे केवळ वृद्धापकाळ आरामात व्यतीत करण्यासाठी नसते, तर राज्याच्या विकासात तेही योगदान देऊ शकतात, हा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. अवघा एक रुपया मानधन घेऊन काम करणारा हा राज्यपाल देशाच्या इतिहासात विरळाच म्हणावा लागेल.बहुजन समाजातील शेतकरी कुटुंबातील एक तरुण जिद्दीच्या बळावर काय करू शकतो, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. सधन शेतकरी कुटुंबातील लाडात वाढलेला मुलगा, बेदरकार तरूण, राजकारणात झोकून देऊन काम करणारा नेता, राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांशी मैत्र जोडणारा कार्यकर्ता, कर्जबाजारी शिक्षण संस्थाचालक ते शिक्षण क्षेत्रातील प्रचंड मोठ्या साम्राज्याचे अनभिषिक्त सम्राट अशी अनेक वळणे त्यांच्या आयुष्याला आहेत. या सगळ्या प्रवासामध्ये जिवाभावाच्या माणसांचा गोतावळा मात्र सतत त्यांच्या सभोवती राहिला. त्यांच्या सामाजिक जाणिवेचे प्रतिबिंब डॉ. संजय डी पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसते, तर त्यांनी अर्ध्यात सोडलेला राजकीय प्रवास सतेज पाटील आणि नातू ऋतुराज पाटील यांनी पुढे सुरू केला आहे.त्यांच्या अफाट कार्यकर्तृत्वाला कोटी कोटी प्रणाम!

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

0

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर

या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे आवाहन

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कार्बन क्रेडीट योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ,कोल्हापूर (गोकुळ) व एन.डी.डी.बी.मृदा तसेच सिस्टीम बायो यांच्या आर्थिक व तांत्रिक सहकार्यातून ‘गोबरसे समृद्धी’ कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण देशामध्ये गोकुळने ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबविली असल्याने जिल्ह्यातील गोकुळच्या ५,७४३ दूध उत्पादकांचे अत्यंत अल्प किमतीत बायोगॅस प्रज्वलित झाले आहेत. या बायोगॅस योजनेमुळे जिल्हयातील महिला दूध उत्पादकांना २० कोटी २५ लाख इतके अनुदान मिळाले आहे. मागील वर्षी या योजनेला दूध उत्पादकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे या योजनेच्या टप्पा दोन मध्ये सन २०२४-२५ साला करिता नवीन ४,००० बायोगॅस मंजूर झाले असल्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले.
या योजनेमधील बायोगॅसच्या नवीन मॉडेलमध्ये वाढीव क्षमता व सुरक्षिततेसाठी काही सुधारणा केल्या असून, यामध्ये दीर्घकाळ चालणारा आधुनिक चार्जिंग लाइटर, शेण कालावण्यासाठी मिक्सिंग टूल (मिक्सर), गॅसच्या सुरक्षिततेसाठी जादा सेफ्टी व्हॉल्व व पुनर्वापर करता येणारा फिल्टर या नवीन गोष्टीचा समावेश केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती कार्बन क्रेडीट अनुदानात घट झाल्यामुळे सिस्टीमा कंपनीच्या टप्पा दोन मधील नवीन बायोगॅसचे अनुदान कमी झाले आहे. २ घनमीटर बायोगॅस युनिटची वरील सुधारणेसह एकूण रु.४१,२६० इतकी किमत असून, अनुदान वजा जाता रुपये ९,९९९ इतकी रक्कम दूध उत्पादकांनी भरणा करावयाची आहे. बायोगॅसचे अंतर १५० फुटापेक्षा जास्त असलेस १५०० रुपये बुस्टर पंपासाठी भरावयाचे आहे.कार्बन क्रेडीट बायोगॅस योजनेमुळे हजारो दूध उत्पादक महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून. दूध उत्पादक कुटुंबाच्या घरगुती वापरासाठी होणाऱ्या गॅस सिलेंडरच्या खर्चामध्ये वार्षिक जवळ जवळ १५ ते १८ हजार रुपयांची बचत होत आहे. तसेच बायोगॅस मधून बाहेर पडणारी बायोस्लरी शेतीला सेंद्रिय खत म्हणून वापरली जात असल्यामुळे खतांच्या खर्चामध्ये ५० टक्के बचत होऊन शेतीचे सेंद्रिय उत्पादन वाढण्यास मदत होत आहे. या बायोगॅस योजनेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास नक्कीच हातभार लागला आहे. या नवीन योजनेमध्ये १५०० महिला दूध उत्पादकांनी नोंदणी केली असून जिह्यातील जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले आहे.

“कर्मयोगी आबासाहेब” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

0

“कर्मयोगी आबासाहेब” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

२५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेत चित्रपट होणार प्रदर्शित

कोल्हापूर/प्रतिनिधी :राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दमदार आमदार, राज्याचे कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वर्गीय मा. गणपतराव देशमुख म्हणजेच ऊर्फ आबासाहेब यांच्या जीवनकार्याचा वेध “कर्मयोगी आबासाहेब” या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला असून, २५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेतही हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.
मायका माऊली फिल्म प्रॉडक्शन आणि मुंबई क्रिएशन एंटरटेन्मेंटच्या मारुती तुळशीराम बनकर, बाळासाहेब महादेव एरंडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अल्ताफ दादासाहेब शेख यांनी चित्रपटाचं लेखन, गीतलेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. अवधूत गुप्ते यांनी संगीत, कुमार डोंगरे यांनी छायांकन आणि संकलनाची जबाबदारी निभावली आहे. कुणाल गांजावाला, मनीष राजगिरे यांनी गाणी गायली आहेत. चित्रपटात अनिकेत विश्वासराव, हार्दिक जोशी, देविका दफ्तरदार, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, प्रदीप वेलणकर, सुरेश विश्वकर्मा, अरबाज शेख, तानाजी गलगुंडे, घनश्याम दरोडे (छोटा पुढारी), अहमद देशमुख, वृंदा बाळ, निकिता सुखदेव,अली शेख, अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कार्यकारी निर्माता अमजद खान शेख असून प्रोडक्शन कंट्रोल सय्यद दादासो शेख यांनी काम पाहिले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण आता चांगलंच तापू लागलं आहे.                                          निवडणुकीची आचारसंहिताही लागू झाली आहे. आता प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. मात्र, समाजाचा उद्धार, उन्नती करण्यासाठी मा. गणपतराव देशमुख यांच्यासारखे नेते विरळच… त्यामुळेच “कर्मयोगी आबासाहेब” या चित्रपटातून मा. गणपतराव देशमुख यांच्या हळव्या, कर्तव्यकठोर, कृतीशील, विचारी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्यात आला आहे. अकरा वेळा आमदार म्हणून निवडून येताना त्यांनी केलेला संघर्ष, त्यातलं राजकारण उलगडतानाच त्यांनी केलेला विकास, सुधारणा, शेतकरी, वंचित घटकांसाठीचं काम दाखवण्यात आलं आहे. त्यामुळेच जनतेनं आबासाहेबांवर अलोट प्रेम केलं. या सर्वांचं दर्शन “कर्मयोगी आबासाहेब” या चित्रपटातून गडणार आहे.