Sunday, June 29, 2025
spot_img
Home Blog Page 21

महिला तुमच्या पंपावर पैसे मागायला आल्या होत्या का? – विजय गायकवाड

0

महिला तुमच्या पंपावर पैसे मागायला आल्या होत्या का? – विजय गायकवाड

कोल्हापूर/प्रतिनिधी : महिलांना धमकी देता, दादागिरीची भाषा बोलता, व्यवस्था करतो म्हणता. या महिला काय तुमच्या पंपावर पैसे मागायला आल्या होत्या का? असा सवाल विजय गायकवाड यांनी महाडिकांना केला. नंदगाव येथे आ.ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.आ. ऋतुराज पाटील पुढे म्हणाले, स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगेंनी सहकार क्षेत्रात जे काम केले आहे, ते संपूर्ण देशात आदर्श घेण्यासारखे आहे. त्यांनी राजकारण करताना सुद्धा एका वेगळ्या विचारसरणीने केले. राजकारणात कधी शत्रुत्व मानलं नाही तर लोकशाही मधली एक प्रक्रिया असे मानलं. हाच विचार माझ्यासारख्या तरुण आमदाराला भावतो आणि त्यांच्या विचारांवरच माझी वाटचाल सुरु आहे.                                             नंदगावच्या माजी उपसरपंच मयुरी नरके म्हणाल्या, खासदार धनंजय महाडिकांनी केलेला अपमान कोल्हापूरच्या रणरागिनी कधीही विसरणार नाहीत. महिलांची व्यवस्था करतो म्हणणा-या महाडिकांचा महिलाच बंदोबस्त करतील.सनी नरके म्हणाले, विरोधक विकासकामांवर बोलण्यापेक्षा जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. आम्ही विकासाचे व्हिजन असलेल्या ऋतुराज पाटील यांना आमदार करू. डी. आर. पाटील, डॉ. महिपती पाटील, विलास साठे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी निगवे खालसा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार मंचच्या कार्यकर्त्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांना पाठिंबा दिला. सभेला मारुती निगवे, प्रकाश सावंत, शाबाजी कुराडे, सर्जेराव कांबळे, पांडुरंग नरके, मोहन कुंभार, अंकुश झांबरे, सुषमा चौगले, सुजाता पाटील, पांडुरंग वाघमारे, संजय नरके, संजय पाटील, विश्वास दिंडोर्ले, विजय नलावडे, बाळासाहेब चौगले संग्राम नरके मोहन पाटील यांच्यासह नंदगाव येथील विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

दुस-यांच्या संस्थेत घुसून महाडिकांनी स्वत:चा फायदा केला : सुयोग वाडकर

जिल्ह्यात स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांनी शाहू दूध संघ, आनंदराव पाटील-चुयेकर यांनी गोकुळ दूध संघ, दादासाहेब कौलवकर यांनी भोगावती कारखाना अशा अनेक चांगल्या संस्था सुरू केल्या. मात्र, महाडिकांनी व्यंकटेश्वरा वाहतूक संघाच्या माध्यमातून ४० ते ५० टँकर गोकुळ दूध संघामध्ये स्वत:च्या फायद्यासाठीच लावले. संस्था उभारण्यापेक्षा दुस-यांनी उभारलेल्या संस्थेत घुसून महाडिकांनी स्वत:चा फायदा करुन घेतला अशी टीका बाजार समिती संचालक सुयोग वाडकर यांनी केली.

पर्यटन हबद्वारे शहराचा विकास करणार – राजेश क्षीरसागर उत्तरेश्वर पेठ येथील प्रचारफेरीत प्रतिपादन

0

पर्यटन हबद्वारे शहराचा विकास करणार – राजेश क्षीरसागर उत्तरेश्वर पेठ येथील प्रचारफेरीत प्रतिपादन

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा आणि शहराला ऐतिहासिक महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूरचे नाव छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कर्तृत्वामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. आपल्या कोल्हापुरात पर्यटन विकासाला प्रचंड संधी आहे. यासाठी जिल्ह्यात पर्यटन हब उभे करून त्याद्वारे जिल्ह्याचा आणि शहराचा विकास करू, अशी ग्वाही कोल्हापूर उत्तरचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी दिली.शुकवार पेठ, उत्तरेश्वर पेठ येथे आयोजित प्रचार फेरीत ते बोलत होते.
पुढे बोलताना क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूर शहरात जगप्रसिद्ध अंबाबाई मंदिर, जुना राजवाडा, ऐतिहासिक बिंदू चौक, नवीन राजवाडा, रंकाळा, पंचगंगा नदी, पाण्याचा खजिना, साठमारी, छत्रपती शाहू महाराज स्मारक, जन्मस्थळ, पन्हाळा गड, विशाळगड, जोतिबा डोंगर, टेंबलाई मंदिर अशी असंख्य प्रेक्षणीय स्थळे आहेत. यांचा पर्यटन पूरक विकास केल्यास जिल्ह्यातील पर्यटन वाढेलच सोबत स्थानिकांच्या व्यापार उदिम यात वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देश विदेशातील पर्यटकांची संख्या वाढल्यास जिल्ह्यातील कृषी पर्यटनही वाढेल. कोल्हापूरचा गूळ आणि कोल्हापुरी चप्पल जगात प्रसिद्ध आहे. तसेच येथील मिसळ, तांबडा पांढरा रस्साही देश विदेशात माहीत आहे. करवीर निवासिनी आई अंबाबाई जगात प्रसिद्ध आहे. येथील प्राचीन मंदिरे, गड – किल्ले, वारसास्थळे यांचा सुनियोजितपणे विकास केल्यास येथील पर्यटन वाढण्यास मदत होईल. कमीत कमी गुंतवणूक असलेले पर्यटन हे एकमेव क्षेत्र आहे. जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी या ठिकाणी पर्यटन हब उभारण्याची नितांत गरज आहे. आगामी काळात मी यासाठी जोरदार प्रयत्न करेन, अशी ग्वाही क्षीरसागर यांनी यावेळी दिली. यातील पंचगंगा नदी काठ, रंकाळा यांच्या सौंदर्यात भर घालण्यात आपणास यश आले असून, उर्वरित ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा आगामी काळात विकास करण्यात येईल.
विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, महाराष्ट्रावर कॉँग्रेसने तब्बल ५० वर्षे राज्य केले. पण सर्वसामान्य नागरिकांसाठी काही केले नाही. महायुती सरकारने केवळ अडीच वर्षांत राज्यात विकासाची गंगा आणली. अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. यामुळेच विरोधकांना धडकी भरली आहे. लाडकी बहीण योजनेच्या विरोधात न्यायालयात जाणारे विरोधक आता आमची सत्ता आली तर ३ हजार रुपये देऊ, असे म्हणत आहेत. ज्यांनी ५० वर्षांत आमच्या माता भगिनींचा कधीही विचार केला नाही. अशा लोकांवर किती विश्वास ठेवायचा हे तुम्हीच ठरवा, असे आवाहन त्यांनी केले. आमच्या सरकारने लाडकी बहीण सुरू केली. गेले पाच महिन्यापासून पैसे देणेही सुरू केले. त्यामुळे प्रत्यक्ष काम करणार्‍यांवर विश्वास ठेवायचा की नुसतीच आश्वासने देणार्‍यांवर ठेवायचा याचा निर्णय मतदारांनी घ्यावा, असे क्षीरसागर म्हणाले.
राज्य सरकारने जागतिक बँकेच्या सहाय्याने जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी ३ हजार २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शहरातील रस्ता कामांसाठी १०० कोटींची वर्क ऑर्डर निघाली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर या कामाला जोमाने सुरुवात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, यावेळी इतर उपस्थित मान्यवरांचीही भाषणे झाली. या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यात महिलांची संख्या लक्षणीय होती.
यावेळी माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, सुरेश सुतार, उदय जगताप, संभाजी बसुगडे, धनाजी आमते, विश्वास आयरेकर, पिंटू शिराळे, किशोर घाटगे, दीपक काटकर, रामदास काटकर, अरुण पाटील घरपणकर, सतीश पाटील घरपणकर, महेश नलवडे, विराज चिखलीकर, सनी अतिग्रे, अशोक राबाडे, राहुल केर्लेकर, शिवराज घरपणकर, रोहित माने, विनायक साळोखे, कुंदन ओतारी, अरुण सावंत, धीरज पवार, रोहित पसारे, निरंजन खाडे, धनराज जाधव, संतोष घोडगीळकर, रियाज बागवान, राकेश पोवार, अनंत पाटील, सुरज धनवडे, शिवतेज सावंत, अक्षय बोडके, प्रशांत संकपाळ, जयराज ओतारी, शुभम माळवी आदी उपस्थित होते.

एल अँड टी एज्यु टेक सोबत घोडावत विद्यापीठाचा सामंजस्य करार

0

एल अँड टी एज्यु टेक सोबत घोडावत विद्यापीठाचा सामंजस्य करार

अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठाने बी. कॉम, बीबीए, एमबीए, एम. टेक, सिविल इंजीनियरिंग शाखांसाठी चेन्नई स्थित एल अँड टी एज्यु टेक संस्थेशी सामंजस्य करार केला. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक मुरली अय्यर, डाटागामी कन्सल्टिंग चे संस्थापक धवल शहा, सीईओ सुरेश कुमार, घोडावत ट्रस्टचे चे विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रो. उद्धव भोसले कुलसचिव डॉ. विवेक कायंदे उपस्थित होते.अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा झपाट्याने विविध क्षेत्रात विकास होत आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधीही वाढत आहेत. शिक्षण आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील दरी दूर करण्यासाठी व विद्यार्थ्यांमधील कौशल्य वाढीसाठी हा करार महत्त्वाचा आहे. स्वतः उद्योग क्षेत्रातील तज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्यामुळे नोकरीसाठीची कौशल्ये विकसित होऊन रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. यासाठी हा करार महत्त्वाचा असल्याचे कुलगुरू प्रो.भोसले यांनी सांगितले.

चौकट

घोडावत शिक्षण संकुलात २० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये विकसित व्हावीत व रोजगार मिळावा यासाठी सातत्याने विविध संस्थांशी करार करण्यात येतो. चेअरमन संजय घोडावत यांच्या दूरदृष्टीचा हा एक भाग आहे असे विश्वस्त विनायक भोसले म्हणाले आहेत.

‘गुलाबी’ – मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणारी हृदयस्पर्शी कहाणी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

0

‘गुलाबी’ – मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणारी हृदयस्पर्शी कहाणी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती

कोल्हापूर/प्रतिनिधी : प्रेक्षकांच्या उत्सुकतेचं कारण बनलेला मराठी चित्रपट ‘गुलाबी’ २२ नोव्हेंबर २०२४ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. अभ्यंग कुवळेकर यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला आणि व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत हा चित्रपट मैत्री, स्वप्नं, आणि स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास रंगवतो. यात प्रमुख भूमिकांमध्ये अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी आणि श्रुती मराठे या तीन अभिनेत्रींच्या अभिनयाचा खास नजराणा प्रेक्षकांना पाहायला मिळेल.’गुलाबी’ चित्रपट जयपूर या गुलाबी नगरीत तीन स्त्रियांच्या अनोख्या प्रवासाची कहाणी सांगतो. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील या तिघींच्या आयुष्यातील मैत्री, स्वातंत्र्य, आणि स्वतःला शोधण्याचा संघर्ष हा चित्रपट प्रभावीपणे मांडतो. एकत्र येऊन आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू करणाऱ्या या तिघींच्या प्रवासातून मैत्रीचे गहिरे रंग प्रेक्षकांच्या मनाला भिडतील.
या चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच प्रेक्षकांसमोर आले असून, त्याला साई-पियुष यांचे संगीत लाभले आहे. मंदार चोळकर यांच्या लेखणीतून साकारलेले हे गाणं हंसिका अय्यर यांनी गायलं आहे. जयपूरच्या विविधरंगी वातावरणात तिघी मैत्रिणींच्या मैत्रीची धमाल यात अनुभवायला मिळते. हे गाणं तितकंच उत्साहपूर्ण असून, प्रेक्षकांच्या मनात घर करणारं आहे.
त्याचप्रमाणे, ‘सफर’ हे प्रेरणादायी गाणं देखील सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होत आहे. अदिती द्रविड यांनी लिहिलेलं हे गाणं राहुल देशपांडे यांनी आपल्या मोहक आवाजात गायलं आहे. या गाण्यात तिघींच्या आयुष्यातील प्रवास आणि त्यांचा स्वत्वाचा शोध अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. जयपूरच्या रंगीत रस्त्यांमध्ये या गाण्याचं सादरीकरण झाल्यामुळे त्याला एक अनोखा रंग मिळतो.
चित्रपटाचे दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, “ ‘गुलाबी’ चित्रपटाचं शीर्षक गीत या तिघींच्या आयुष्यातील उत्साह, आनंद आणि मोकळेपणाचे प्रतीक आहे. आम्ही या गाण्याच्या माध्यमातून मैत्री, स्वातंत्र्य, आणि स्वप्नांची एक अनोखी गोष्ट उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. जयपूरच्या सुंदर निसर्गात प्रेक्षकांना या तीन स्त्रियांच्या जीवनातील विविध रंग अनुभवता येतील.”गुलाबी चित्रपटात अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी, श्रुती मराठे, सुहास जोशी, शैलेश दातार, निखिल आर्या आणि अभ्यंग कुवळेकर या गुणी कलाकारांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत. या स्त्रीप्रधान चित्रपटाची कथा स्त्रियांच्या नात्यांवर, त्यांची स्वप्नं आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध यांवर आधारित आहे, जी सर्व वयोगटातील प्रेक्षकांना भावेल.
दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, “ ‘गुलाबी’ हा केवळ महिलांचा चित्रपट नाही, तर प्रत्येक पुरुषाने आपल्या आई, बहिण, पत्नी, मुलगी किंवा मैत्रिणीसोबत बघावा, कारण या चित्रपटात जीवनाच्या विविध अंगांचा वेध घेण्यात आला आहे.”व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित हा चित्रपट २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. सोनाली शिवणकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती आहे.

महिलांचा सन्मान राखणाऱ्या आ. ऋतुराज पाटील यांना विजयी करा- मधुरिमाराजे छत्रपती

0

महिलांचा सन्मान राखणाऱ्या आ. ऋतुराज पाटील यांना विजयी करा- मधुरिमाराजे छत्रपती

कोल्हापूर/प्रतिनिधी : सध्या महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र आमदार ऋतुराज पाटील यांच्यारूपाने आपल्या सर्वाना सुशील, सुसंस्कृत आणि सर्वांची काळजी घेणारे नेतृत्व लाभले आहे. नेहमीच महिलांचा सन्मान राखणारे, त्यांचा आदर करणारे आ. ऋतुराज पाटील यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा असे आवाहन मधुरिमाराजे छत्रपती यांनी केले. आ. ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ उचगाव येथे झालेल्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.मधुरिमाराजे छत्रपती म्हणाल्या, आपण सर्व महिला या स्वाभिमानी व कष्टकरी आहोत. सर्वच क्षेत्रात आपण आघाडीवर आहोत. ऋतुराज पाटील हे महिलांचा सन्मान राखणारा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के आरक्षण देणाऱ्या पक्षाचे उमेदवार आहेत. सर्व सामान्यामध्ये मिसळणारे नेतृत्व आपल्याला पुन्हा निवडून द्यायचे आहे.
महिला प्रदेश काँग्रेसच्या सचिव भारती पोवार म्हणाल्या, महिलांचा अपमान करणारे महाडिक पाच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार होते. या काळात मिळालेले मानधन त्यांनी पक्षाकडे जमा करावे आणि मगच महिला भगिनींना फुकाचे सल्ले द्यावेत.पुजा ऋतुराज पाटील म्हणाल्या, आ. ऋतुराज पाटील यांनी महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. महिलांसाठी स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षण राबवून अनेक महिलांना स्वावलंबी बनवले आहे. ‘मी दुर्गा’या उपक्रमातर्गत १५ हजाराहून अधिक शालेय विद्यार्थीना सुरक्षित बनवण्यासाठी तज्ञ डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन व समुपदेशन केले. या पुढील काळात बचत गटांतील महिलांची उत्पादने घरबसल्या विकली जातील अशी बाजारपेठ निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे.
खासदार धनंजय महाडिक यांची महिलांबद्दल असलेल्या भावना, त्यांची वृत्ती, संस्कृती आपण सर्वांनी पाहिलीच आहे. महिलांना पायाखालची धूळ समजणाऱ्या महाडिकांना ताराराणीच्या लेकी धडा शिकवतील असा इशारा कोल्हापूर दक्षिण महिला काँग्रेस कौशल्य विभाग प्रमुख राणी खंडागळे यांनी दिला.शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव, सरपंच मधुकर चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले माजी सभापती पुनम जाधव, जि.प. माजी सदस्य मंगल वळकुंजे, माजी सरपंच मालुताई काळे, संजीवनी वळकुजे, सुरेखा चौगुले, ग्रा. पं. सदस्य सुनिता चव्हाण सारिका माने, नीता हावळ, शीला मोरे, मयुरा चव्हाण, वैजयंती यादव, त्रिशा पाटील, जयश्री पाटील, माजी उपसरपंच मनीषा गाताडे, उमा कदम, कल्पना चौगुले महिला उपस्थित होत्या.

चौकट

महिलांना धमकावण्याची भाषा महाडिकांना महागात पडेल- अश्विनी चव्हाण

आम्ही लाचार नाही, स्वाभिमानी आहोत हे महाडीकांनी लक्षात ठेवावे. आम्हाला तुम्ही दीड हजार दिले म्हणजे विकत घेतले असे समजू नका. एकवेळ उपाशी राहू ,पण अशी लाचारी स्वीकारणार नाही. महिलांना धमकावण्याची भाषा महाडिकांना महागात पडेल असा इशारा ग्रामपंचायत सदस्य अश्विनी चव्हाण यांनी दिला.

स्वाभिमानी महिलाच महाडिकांची व्यवस्था लावतील – शशिकांत खोत

0

स्वाभिमानी महिलाच महाडिकांची व्यवस्था लावतील – शशिकांत खोत

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाडिकांनी महिलांची व्यवस्था करण्याची भाषा वापरली. मात्र या निवडणुकीत स्वाभिमानी महिलाच महाडिकांची व्यवस्था लावतील अशी टीका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी केली. आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ कणेरीवाडी येथे आयोजित सभेत ते बोलत होते.खोत पुढे म्हणाले, महाडिकांनी घरात खासदार, दोन आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष अशी पदे असताना कोणतीही कामे केली नाहीत. त्यामुळे जनतेने 2019 ला अमल महाडिकांना पराभूत केले. पाच वर्षात मतदारसंघात न फिरकणा-या महाडिकांना निवडणुक आल्यावर जनतेची आठवण होते. महाडिकांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. त्यामुळे महाडिकांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही.
आमदारकीच्या काळात ऋतुराज पाटील यांनी कोट्यवधीची कामे केली. ब वर्ग तीर्थक्षेत्रातून कणेरीसाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला. आपल्या कामातून आमदार ऋतुराज पाटील यांनी कार्यतत्पर आमदार अशी ओळख निर्माण केली असून त्यांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून आणूया. आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, मतदारसंघातील जनतेने प्रत्येक निवडणुकीत आम्हाला साथ दिली आहे. जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर मतदारसंघात भरीव काम करु शकलो. मतदारसंघाच्या गतिमान विकासासाठी युवा, महिला, जेष्ठ नागरीक, शेतक-यांनी मला पाठबळ द्यावे.
माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश खोत म्हणाले, जलजीवन योजनेच्या टाकीचे काम खासगी जागेत सुरु असल्याचा आरोप तानाजी पाटील यांनी केला होता. मात्र ही जागा खासगी नसून ग्रामपंचायतीची असल्याचा सातबारा तानाजी पाटील यांच्या घरावर चिकटवा. लोकांच्या हिताच्या कामात अडथळा आणणा-यांना खड्यासारखे बाजूला करा.शिवसेनेचे ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख अवधूत साळेखे म्हणाले, आमदार ऋतुराज पाटील यांचा जनसंपर्क आणि कामामुळे त्यांना दक्षिणमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ऋतुराज हे दक्षिणचे परमनंट आमदार असणार आहेत.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सुनिल मोदी, डॉ.अमर वारके यांनी मनोगत व्यक्त केले. सभेला सरपंच शामल कदम, उपसरपंच सीमा खोत ,सेवा संस्थेचे चेअरमन अप्पासाहेब मोरे, तंटामुक्त अध्यक्ष सदाशिव म्हाकवे, अमर मोरे, समाधान सोनुले, अर्जुन इंगळे, विश्वास शिंदे, विजय मोरे, अमित पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट

महाडिकांचे “ते” पत्र शशिकांत खोत यांनी दाखवले वाचून
जलजीवन योजना रद्द व्हावी यासाठी खासदार धनंजय महाडिक व माजी आमदार अमल महाडिक यांनी पत्र लिहिले होते. शशिकांत खोत यांनी सभेत ते पत्र वाचून दाखवत महाडिकांचा खरा चेहरा उघड केला.

प्रथमेश परब आणि शशांक शेंडेच्या नव्या लुकचा ‘श्री गणेशा’

0

प्रथमेश परब आणि शशांक शेंडेच्या नव्या लुकचा ‘श्री गणेशा’

कोल्हापूर/प्रतिनिधी : ‘येड्यांची जत्रा’ तसेच ‘टकाटक’सारखे सुपरडुपर हिट चित्रपट बनवणारे मिलिंद झुंबर कवडे पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज घेऊन आले आहेत. निर्माते संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले यांची निर्मिती असलेल्या तसेच मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या आगामी चित्रपटाची घोषणा मोशन पोस्टर प्रदर्शित करून करण्यात आली आहे. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांची मांदियाळी आणि त्यांची धमाल ‘श्री गणेशा’ या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याची जणू झलकच मोशन पोस्टरवर पाहायला मिळते. २० डिसेंबरला सर्वत्र रिलीज होणाऱ्या ‘श्री गणेशा’ या चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांना एक रोड ट्रीप चा परिपूर्ण फॅमिली एन्टरटेनर पाहायला मिळणार आहे.
एमएच-१२ सिने मीडियाने आऊट ऑफ द बॅाक्स फिल्म्सच्या सहयोगाने प्रस्तुत केलेला ‘श्री गणेशा’ हा चित्रपट म्हणजे एक धमाल रोड मुव्ही आहे. हास्य-विनोद, धमाल-मस्ती, नाट्यमय घडामोडी, रोमान्स आणि इमोशन्सची रोलर कोस्टर राईड असलेल्या या चित्रपटाची निर्मिती संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले यांनी केली आहे. लाफ्टर आणि मॅडनेसचा डबल धमाका असलेल्या या चित्रपटाच्या मोशन पोस्टरवर सुरुवातीला हिरवा साज लेऊन नटलेल्या निसर्गामधून जाणारा रस्ता आणि वर निरभ्र-निळं आकाश आहे. काळ्याकुट्ट डांबरी रस्त्यावर एक लाल रंगाची कार आहे. कारच्या पुढील बाजूला उजव्या बाजूला कुर्ता-पायजमा घातलेला, पिकलेली पण स्टायलिश दाढी-मिशी असलेला संजय नार्वेकर डावा हात बोनेटवर टेकून उभा आहे. डाव्या बाजूला आजवर कधीही न दिसलेल्या गेटअपमध्ये शशांक शेंडे उजवा हात बोनेटवर टेकून उभे आहेत. नेहमी वाढलेल्या दाढी-मिशीत दिसणाऱ्या शशांक यांचा या चित्रपटात क्लीन शेव्ह लुक रसिकांना नक्कीच आवडेल. कारच्या बोनेटवर बसलेला प्रथमेश परब आपल्या हटके लुकमुळे लक्ष वेधून घेतो. त्याच्या शेजारी चित्रपटाची नायिका मेघा शिंदे बसलेली आहे. हा चित्रपट म्हणजे धमाल रोड ट्रीपचा ‘श्री गणेशा’च असल्याचं सांगत मोशन पोस्टरवर शेवटी शीर्षक येतं. पोस्टरच्या तळाशी हा चित्रपट २० डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असल्याचं घोषित करण्यात आलं आहे.
प्रथमेशने आजवर नेहमीच विविधांगी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्याचा हा चित्रपटही वेगळ्या वाटेने जाणारा आहे. कायम लांबलचक केसांमध्ये दिसणाऱ्या प्रथमेशची बदललेली हेअर स्टाईल मोशन पोस्टरवर दिसते. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमेश आणि मिलिंद कवडे यांचं रियुनियन झालं आहे. ‘टकाटक’सारखा धमाल ब्लॅाकबस्टर देणारी ही जोडी पुन्हा एक नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाल्याचं मोशन पोस्टर पाहिल्यावर जाणवतं. टिपटॅाप शर्ट-पँट आणि विंचरलेले केस असा शशांक शेंडे यांचा लुकही रसिकांना नक्कीच आकर्षित करेल. बऱ्याचदा भाईगिरी करणारा संजय नार्वेकर या चित्रपटात काहीशा सोज्वळ भूमिकेत दिसणार असल्याचे संकेत मोशन पोस्टरवरून मिळतात. थोडक्यात काय तर मिलिंद कवडे यांचा हा चित्रपट मुख्य कलाकारांसाठी इमेज ब्रेकिंग ठरणार आहे.
‘श्री गणेशा’ या चित्रपटाची कथा मिलिंद कवडे यांची असून पटकथा मिलिंद यांनी संजय नवगिरे यांच्या साथीने लिहिली आहे. संवादलेखन संजय नवगिरे यांनी केलं आहे. गीतकार जय अत्रे आणि मंदार चोळकर यांनी लिहिलेल्या अर्थपूर्ण गीतांना सुमधूर संगीतसाज चढवण्याचं काम संगीतकार वरुण लिखते यांनी केलं आहे. पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी दिलं असून, संकलन गुरु पाटील यांनी केले आहे. सिनेमॅटोग्राफी डीओपी हजरत शेख वली यांनी केली आहे. अंकित चंदिरामानी यांचा सनशाईन स्टुडिओज हा चित्रपट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वितरीत करणार आहे.

राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ कदमवाडी परिसरात प्रचारफेरी

0

पूरस्थिती, कोरोना काळात लाटकर कुठं होते ? : सत्यजित उर्फ नाना कदम यांची लाटकर यांच्यावर टीका

राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ कदमवाडी परिसरात प्रचारफेरी

कोल्हापूर/प्रतिनिधी : फिल्मी स्टाईलने भाषण करून जनतेचे मनोरंजन करणारे कॉंग्रेसचे पुरस्कृत उमेदवार पूरस्थिती आणि कोरोना काळात कुठं होते. संकटसमयी जनतेला वाऱ्यावर सोडून कुठे लपले होते याचा खुलासा करावा. सामाजिक, विकासात्मक कामांच्या आधारावर अपेक्षित निवडणूक मुद्दामहून भावनिक केली जात आहे. पण, विरोधकांच्या हा डाव जनतेने वेळीच ओळखला असून, संकटसमयी कुटुंबप्रमुखाप्रमाणे जनतेच्या पाठीशी उभे राहणाऱ्या राजेश क्षीरसागर यांना लाखोंचे मताधिक्य देतील, असा विश्वास माजी नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम यांनी व्यक्त केला. महायुती उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ कदमवाडी परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार फेरीस महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला.ते पुढे म्हणाले कि, राजेश क्षीरसागर हे देखील सर्वसामान्य कार्यकर्तेच आहेत. टोल, एल.बी.टी. थेट पाईपलाईन असे अनेक प्रश्न क्षीरसागर यांच्या पुढाकारानेच मार्गी लागले आहेत. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांची जाणीव त्यांना आहे कारण ते सदैव जनतेमध्येच आणि जनतेसाठीच उपलब्ध असतात. पण, विरोधकांकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने त्यांनी सामान्य कार्यकर्त्याचे कार्ड बाहेर काढले आहे. अशा या फसव्या प्रचारास जनता बळी पडणार नाही. राजेश क्षीरसागर यांच्या कामाची तुलना अशक्य आहे. कोरोनामध्ये गोरगरीब आणि सामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाच्या मदतीसह प्रशासनावर नियंत्रण ठेवून रुग्णसेवेची भूमिका चोखपणे बजावली. पूरस्थितीत बाधित नागरिकांना मदत मिळवून देण्यापासून स्वत: मदतीसाठी पाण्यात उतरून सामान्य कार्यकर्ता कसा असावा याचे उदाहरण दिले. लोकप्रतिनिधी म्हणून आवश्यक असणारे सर्व गुण राजेश क्षीरसागर यांच्या असल्याने त्यांची लोकप्रियता अखंड वाढत आहे. परंतु, विरोधक कॉंग्रेस पुरस्कृत उमेदवार पूरस्थिती, कोरोनात समाजकार्यात होते काय? हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्ता असलेल्या राजेश क्षीरसागर यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.यावेळी माजी नगरसेवक मारुती माने, वैभव माने, स्वरूप कदम, विनय वाणी, यशवंत उर्फ बंडा माने, अनमोल तोरस्कर, बापू खोत, कुणाल क्षीरसागर, संग्राम दुर्गुळे, प्रसन्न माने, अक्षय कुंभार आदी उपस्थित होते.

निवडणूक जनतेनेच हातात घेतल्यामुळे विजय निश्चित – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

0

निवडणूक जनतेनेच हातात घेतल्यामुळे विजय निश्चित – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

जनता जनार्दनासह अबाल वृद्ध व माता-भगिनींचा उठाव मोठा

नानीबाई चिखलीत प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नानीबाई चिखली/प्रतिनिधी : या निवडणुकीत माझ्या समर्थनार्थ जनता जनार्दनाचा उठाव मोठा आहे. ही निवडणूक जनतेनेच हातात घेतल्यामुळे ऐतिहासिक आणि क्रांतिकारी मताधिक्याने आपला विजय होईल, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. जनता जनार्दन व अबाल -वृद्धांसह विशेषता: माता- भगिनी माझ्या विजयासाठी अग्रभागी सरसावल्या आहेत, असेही ते म्हणाले.नानीबाई चिखली ता. कागल येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अरुण भोसले होते.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, जनतेने दिलेली आमदारकी आणि मंत्रिपदाची सत्ता ही गोरगरिबांच्या कल्याणासाठीच वापरली. त्यामुळेच राजसत्ता गोरगरिबांच्या चुलीपर्यंत देण्याचे भाग्य मला मिळाले. मला खात्री आहे की, गेल्या पाच निवडणुकांप्रमाणे सहाव्या निवडणूकीतही ऐतिहासिक मतांच्या फरकाने जनता मला निवडून आणील.गेल्या ३०-३५ वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासात अनेक अडथळे संकट आली गोरगरीब दिन दलित वंचित उपेक्षित लोकांसाठी काम करत असताना तुमच्या पाठबळामुळेच घडत गेलो, आणि ही वाट तुडवत चालत राहिलो.

हा शाश्वत विकास नव्हे काय…?

गेल्या चार-पाच वर्षाच्या कालावधीत मंत्री हसन मुश्रीफ यांनी ७ हजार कोटी रुपयांचा निधी आणला आहे. या निधीतून रस्ते, सांस्कृतिक सभागृह, शाळा, अंगणवाडी इमारत, आरोग्य केंद्र, पाझर तलाव, गावातील अंतर्गत रस्ते, गटरी, पाणीपुरवठा योजना अशी एक ना अनेक कामे आपल्यासमोर आहेत. हा शाश्वत विकास नव्हे काय ? असा सवाल गोकुळचे संचालक अमरीश घाटगे यांनी उपस्थित केला.

संकटग्रस्तांचा पाठीराखा

भाषणात बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक प्रवीणसिंह भोसले म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ म्हणजे जनतेच्या अडीअडचणी आणि संकटात धावून जाणारा नेता नव्हे तर कार्यकर्ता आहेत. दरवर्षी येणाऱ्या महापुरात मंत्री हसन मुश्रीफ कमरेहून अधिक उंच पाण्यातून, कधी जेसीबीतून तर कधी ट्रॅक्टर- ट्रॉलीतून पूरग्रस्तांपर्यंत पोहोचले आणि त्यांची चूल पेटवली. खरंतर मंत्री हसन मुश्रीफ म्हणजे संकटग्रस्तांचा पाठीराखाच आहेत.
प्रवीणसिंह भोसले म्हणाले, गावेच्या गावे महापुरात बुडालेली असताना मंत्री हसन मुश्रीफ सोडून कोणीही इकडे फिरकले सुद्धा नाहीत. जनतेला केंद्रस्थानी मानून तळागाळापर्यंत विकास करण्याची धमक फक्त मंत्री मुश्रीफांमध्येच आहे.
स्वागत सदाशिव दुकान यांनी केले. व्यासपीठावर अरुण भोसले माजी जिल्हा परिषद सदस्य शिवानी भोसले, हमिदवाडा कारखाना संचालिका मंगल तुकान, प्रकाश वाडकर, अनिल गुरव, सुरेश गळतगे, स्वप्निल जाधव यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर यांचा प्रचार शुभारंभ

0

महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर यांचा प्रचार शुभारंभ

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ आदरणीय खासदार शाहु छत्रपती महाराज, आदरणीय सरोज पवार- पाटील ( माई ) आणि माझ्या उपस्थितीत मिरजकर तिकटी येथे झाला. याप्रसंगी आमदार जयंत आसगांवकर, आमदार हसन मौलाना, काँग्रेस निरिक्षक सुखवंतसिंह ब्रार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रचारसभेला नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून जनतेने सामान्य कार्यकर्त्याला विजयी करण्याचे ठरवले असल्याचे निश्चित वाटत होते.
यावेळी शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनिल मोदी, काँग्रेसचे सचिन चव्हाण, राष्ट्रवादीचे आर. के. पवार, कॉ. दिलीप पवार, कॉ. सतिशचंद्र कांबळे, कॉ. अतुल दिघे, आपचे संदिप देसाई, दौलत देसाई, बाबुराव कदम, शिवाजीराव परुळेकर, व्यंकाप्पा भोसले, बबन रानगे, सौ. सरलाताई पाटील, डी. जी. भास्कर, टी. एस. पाटील, सौ. प्रज्ञाताई उत्तुरे, पद्मजा तिवले, श्रीमती भारतीताई पोवार, बाबासो देवकर, अँड. बाबा इंदुलकर,सर्व माजी नगरसेवक, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.