Sunday, June 29, 2025
spot_img
Home Blog Page 20

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

0

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान

कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत सुरु आहे. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रांवर सुरु असलेल्या मतदानाची मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे.

सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यतची विधानसभा मतदारसंघ निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे

271- चंदगड – 68.58 टक्के
272- राधानगरी –72.83 टक्के
273- कागल –74.33 टक्के
274- कोल्हापूर दक्षिण – 68.72 टक्के
275- करवीर – 72.18 टक्के
276- कोल्हापूर उत्तर – 59.76 टक्के
277- शाहूवाडी – 70.40 टक्के
278- हातकणगंले – 65.10 टक्के
279- इचलकरंजी – 57.83 टक्के
280- शिरोळ – 68.49 टक्के
0000

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

0

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान

करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

२७७ शाहूवाडी मतदार संघात सर्वाधिक सरासरी ६१.७० टक्के मतदान

कोल्हापूर, दि.२०(जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत सुरु झाली.जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात ३ हजार ४५२ मतदान केंद्रांवर सुरु असलेल्या मतदानाची मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे.

सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत ६ तासांची विधानसभा मतदार संघानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे

२७१- चंदगड – ३९.२९ टक्के
२७२- राधानगरी – ४२.८२ टक्के
२७३- कागल – ४१.३६ टक्के
२७४ कोल्हापूर दक्षिण – ३५.३९ टक्के
२७५- करवीर – ४५.२९ टक्के
२७६- कोल्हापूर उत्तर – ३५.५३ टक्के
२७७- शाहूवाडी – ४१.३० टक्के
२७८- हातकणगंले – ३५.१५ टक्के
२७९- इचलकरंजी – ३२.७९ टक्के
२८०- शिरोळ – ३७.०३ टक्के

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत सुरु झाली आहे. जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात ३ हजार ४५२ मतदान केंद्रांवर सुरु असलेल्या मतदानाची मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे.

सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ८ तासांची विधानसभा मतदारसंघ निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे

२७१- चंदगड – ५४.६३ टक्के
२७२- राधानगरी – ५९.५० टक्के
२७३- कागल – ५८.७१ टक्के
२७४ कोल्हापूर दक्षिण – ५१.२० टक्के
२७५- करवीर – ५८.६३ टक्के
२७६- कोल्हापूर उत्तर – ४८.०३ टक्के
२७७- शाहूवाडी – ६१.७० टक्के
२७८- हातकणगंले – ५०.०१ टक्के
२७९- इचलकरंजी – ४५.२८ टक्के
२८०- शिरोळ – ५२.६६ टक्के

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

0

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

२७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान

कोल्हापूर, दि.२० (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी ७ वा.पासून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे. जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात ३ हजार ४५२ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु असून जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदानाची मतदार संघानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे.
सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतची या ४ तासाची विधानसभा मतदार संघानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे

२७१- चंदगड – २२.०१ टक्के
२७२- राधानगरी – २३.०० टक्के
२७३- कागल – २३.६८ टक्के
२७४- कोल्हापूर दक्षिण – १७.५७ टक्के
२७५- करवीर – २६.१३ टक्के
२७६- कोल्हापूर उत्तर – २०.७५ टक्के
२७७- शाहूवाडी – १७.५२ टक्के
२७८- हातकणगंले – १४.२५ टक्के
२७९- इचलकरंजी – १९.७७ टक्के
२८०- शिरोळ – २१.४३ टक्के

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

0

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला. पदयात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून गांधीनगरवासियांनी आमदार ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ देण्याचा निर्धार केला.
आमदार ऋतुराज पाटील यांनी गांधीनगर मुख्यमार्गावरील गणेश टॉकीज येथून पदयात्रेला सुरुवात केली. श्री चौक, युवा एकता ग्रुप, बी ग्रुप, सर्वधर्मीय तरुण मंडळ, जी पी ग्रुप, खाऊ गल्ली, कोयना कॉलनी, पर्सनल पॉवर ग्रुप, छत्रपती शिवाजी चौक, हनुमान मंदिर या मार्गावरून ही पदयात्रा काढण्यात आली. नागरीकांनी ठिकठिकाणी आ.पाटील यांचे उत्साही स्वागत केले.
सरपंच संदीप पाटोळे म्हणाले, गांधीनगर बाजारपेठ व परिसराच्या विकासासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. बाजारपेठेतील मुख्य रस्ता रुंदीकरणाचे काम केल्याने वाहतुकीची कोंडीचा प्रश्न मिटला आहे. गांधीनगरच्या विकासासाठी सतत प्रयत्नशिल असलेल्या आ.ऋतुराज पाटील यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे आहोत.आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या गांधीनगर व्यापारवाढीसाठी प्रयत्नशिल आहे. भविष्यात गांधीनगरला अधिक समृध्द व विकसीत करण्यासाठी माझे योगदान असेल.
उपसरपंच विनोद हुजराणी, सदस्य निवास तामगावे, रियाज सनदी, सनी चंदवानी, अर्जुन मिसाळ, गजेंद्र हेगडे, वैशाली चोबे, जाहिदा इनामदार, प्रीत हुजराणी, विजया उदासी, दिपाली जाधव, अमृता सावंत, सोनी सेवलानी, प्रताप चंदवानी, आनंदा घोळे, नितेश चोबे, सचिन जोशी, महेश पोपटानी, विशाल पहुजा, राजेंद्र कांबळे, रेश्मा दर्डा, आनंद कांबळे, सद्दाम सोलापूरे, सुनील आवळे, तानाजी पोवार, विठ्ठल देवकुळे, लखन पवार, पार्श्व वळवडे, पप्पू पाटील, सुहास यादव, ओमकार जोशी, शैलेश शिंदे, सुनील हेगडे, राजू चंदनशिवे, आनंद साळुंखे, अथर्व संकपाळ, प्रभाकर कांबळे यांच्या नागरीक उपस्थित होते.
फोटो ओळी : गांधीनगर येथील पदयात्रेदरम्यान आमदार ऋतुराज पाटील.

कोल्हापूर ‘थिंक टॅंक’च्या माध्यमातून नव्या संकल्पना राबवणार – आमदार ऋतुराज पाटील

0

कोल्हापूर ‘थिंक टॅंक’च्या माध्यमातून नव्या संकल्पना राबवणार – आमदार ऋतुराज पाटील

दक्षिणच्या विकासाचा संकल्पनामा

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिणला नवा चेहरा देण्यासाठी दक्षिण व्हिजन २.० च्या माध्यमातून नवसंकल्पना राबवणार आहे. कोल्हापूर शहराच्या सर्वाधीक वेगाने वाढणा-या उपनगरांचा सुनियोजित विकास करण्यावरसुध्दा माझा भर असेल. विविध क्षेत्रातील तज्ञ, युवा पिढी यांना सोबत घेऊन कोल्हापूर थिंक टँकची यासाठी मदत घेणार आहे. यासाठी युवा पिढीने स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. साने गुरुजी वसाहत येथे आयोजित युवा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख, सुरज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ.पाटील म्हणाले, इंडस्ट्री एरियासाठी आवश्यक फॅसिलिटी, आयटी कंपन्यांसाठी फॅसिलिटी तसेच नवीन आयटी कंपन्यांना एमआयडीसीच्या दरामध्ये शेंडा पार्क परिसरात जागा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. मिशन रोजगार अंतर्गत छोटे स्टार्टप्स आणि बिझनेस सुरू करण्यासाठी फॅसिलिटेटर म्हणून काम करणार आहे. त्याचबरोबर मार्केटसाठी आवश्यक असणाऱ्या स्किलड लेबरची माहिती घेऊन आवश्यक स्किल ट्रेनिंग देऊन युवा पिढीची रोजगारक्षमता वाढवणार आहे. मिशन रोजगार संकल्पनेची व्याप्ती वाढवून युवा पिढीला जॉब मिळवून देण्यावर विशेष भर देऊ. मोबाईल फोनपासून मुक्त असणाऱ्या पब्लिक रिडींग स्पेसेस निर्माण करणार असून जनतेच्या सोयीसाठी चालते फिरते ‘जनहित केंद्र’ सुरु करणार आहे.

पर्यावरण संवर्धन

पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक ठिकाणी झाडे लावून ग्रीन झोन तसेच ऑक्सिजन पार्क तयार करणार आहे. गावतलावांचे संवर्धन, सुशोभिकरण यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ.

महिला सक्षमीकरण

महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी आर्थिक साहाय्य तसेच महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे. विविध कंपन्यांच्या बिझनेस आऊटसोर्सिंग मधून महिलांसाठी घरबसल्या उद्योग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. महिलांमध्ये तसेच शालेय मुलींमध्ये आरोग्यविषयक जागृती तसेच हेल्थ कॅम्पचे आयोजन करणार आहे.

स्मार्ट स्कूल व आरोग्य सुविधा

उंचगाव येथील स्मार्ट स्कूलच्या धर्तीवर जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या प्राथमिक शाळांना दर्जेदार सुविधा देऊन स्मार्ट स्कूल ही संकल्पना अधिक व्यापक करणार आहे. दक्षिणमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांना निधी देऊन लोकांसाठी चांगल्या आरोग्य सुविधा देणार. साळोखे नगर विरंगुळा केंद्राच्या धर्तीवर ग्रामीण भाग तसेच उपनगरांमध्ये विरंगुळा केंद्र उभारणार आहे.

सार्वजनिक सुरक्षा

सार्वजनिक ठिकाणी शासन निधी तसेच लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहे. महाविद्यालय तसेच विविध संस्थांमध्ये ट्रॅफिक जनजागृती अभियान राबविले जाईल. पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम सक्षम करण्यासाठी केएमटीला बसेस उपलब्ध करून देणार आहे.

पाणी सुविधा व कचरा व्यवस्थापन

मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी पाठपुरावा करेन शहरात थेट पाईपलाईन पाणी वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील राहीन. ग्रामीण भागातील कचरा उठाव करून कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा तसेच महापालिकेच्या माध्यमातून उपनगरातील कचरा उठाव प्रभावीपणे व्हावा यासाठी पाठपुरावा करू.

क्रीडा विकास

ग्रामीण व शहरी भागात उपलब्ध जागांमध्ये क्रीडांगण विकसित करणार आहे. दर्जेदार स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्याबरोबरच मतदारसंघात इनडोअर स्पोर्टस स्टेडियम उभारण्यासाठी प्रयत्नशील राहीन.

करिअर लाईट हाऊस

उपनगर परिसर आणि ग्रामीण भागामध्ये जागेच्या उपलब्धतेनुसार अभ्यासिका उभारणार, करिअर लाईट हाऊस संकल्पना राबवून युवा पिढीला करिअर निवडण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले जाईल. शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच उत्पादन वाढीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, क्षेत्रभेटीचे आयोजन करणार आहे.
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ अधिक प्रगतीपथावर नेण्यासाठी मी आखलेल्या विविध योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या सर्वांचे भक्कम पाठबळ मिळावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी किरण पाटील, दिग्वीजय मगदूम, मयूर पाटील, इजाज नागरगट्टी यांच्यासह तरुण-तरुणी उपस्थित होत्या.

कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय फुटबॉल अकॅडमी उभारणार : राजेश क्षीरसागर

0

कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय फुटबॉल अकॅडमी उभारणार : राजेश क्षीरसागर

राजारामपुरी येथे कोपरा सभेचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहर हे कला, क्रीडा आणि कुस्तीपंढरी म्हणून तसेच “फुटबॉल पंढरी” ही म्हणून ओळखले जाते. आपल्या शहरातील फुटबॉल खेळाला सुमारे १०० पेक्षा अधिक वर्षांची मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथे फुटबॉल खेळला जातं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक फुटबॉल संघ शहरात आहेत. येथील फुटबॉल खेळाडू आणि खेळाच्या विकासासाठी आगामी काळात कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय फुटबॉल अकॅडमी उभारली जाईल, असे प्रतिपादन कोल्हापूर उत्तरचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर केले.राजारामपुरी येथे आयोजित फुटबॉल प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना क्षीरसागर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय फुटबॉल अकॅडमीसाठी सरकारकडे यापूर्वीच प्रस्ताव सादर करण्यात आला असून यासाठी शेंडा पार्क येथे जागेची मागणीही करण्यात आली आहे. कोल्हापुरात फुटबॉलचा देशात कोलकत्ता नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा प्रेक्षक वर्ग आहे. परंतु, सुसज्ज मैदान, तंत्रशुद्ध प्रशिक्षण आणि फुटबॉलसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने कोल्हापूरसह आसपासच्या भागातील फुटबॉल खेळाडूंच्या प्रशिक्षणावर आणि खेळावर मर्यादा येत आहेत. यामुळे अनेक फुटबॉलपटू स्थानिक संघापुरते मर्यादित राहिले आहेत. काही खेळाडू पुणे, मुंबई, गोवा, कलकत्ता आदी ठिकाणच्या नामांकित क्लबकडून खेळतात. बाहेर जाणार्‍या खेळाडूंना कोल्हापुरातच सुसज्ज मैदान आणि तंत्रशुद्ध प्रशिक्षण प्राप्त होण्यासाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल अकॅडमी उभारण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडू घडावेत यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. कोल्हापुरात फुटबॉल अकॅडमी उभारण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची त्यांनी ग्वाही दिली आहे. याबाबत मी सातत्याने ते सरकारकडे पाठपुरावा करत असून लवकरच या प्रयत्नांना यश येईल, असा विश्वास क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
राजेश क्षीरसागर यांच्यातर्फे दरवर्षी “राजेश चषक फुटबॉल स्पर्धे”चे आयोजन करून खेळाडूंना भरघोस बक्षीस देऊन प्रोत्साहित करण्यात येते. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान (जिल्हास्तर) योजनेंतर्गत श्री रावणेश्वर मंदिर ते टेंबे रोडपर्यंत फुटबॉल स्ट्रीट विकसित झाला असून या कामासाठी तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. कोल्हापुरात आंतराष्ट्रीय फुटबॉल अकॅडमी उभी रहावी यासाठी महायतीचे सरकार सत्तेत येणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यासाठी धनुष्यबाण चिन्हा समोरील बटण दाबून मला प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहन राजेश क्षीरसागर यांनी केले.

काँग्रेस नगरसेवकांची कुंडली असा अनावधानाने उल्लेख – फरास

पापाची तिकटी येथील सभेतील माझ्या भाषणात काँग्रेस नगरसेवकांची कुंडली माझ्याकडे आहे, असा उल्लेख असा अनावधानाने झाला आहे, असे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व माजी स्थायी समिती सभापती आदील फरास यांनी पत्रकात म्हटले आहे. वास्तविक महाविकास आघाडी काँग्रेस पुरस्कृत राजेश लाटकर यांची महापालिकेत नगरसेवक असतानाची संपूर्ण कुंडली माझ्याकडे आहे, असा तो उल्लेख आहे. स्वतःला गरीब म्हणून प्रचार करणारे लाटकर ४० ते ५० लाखांच्या गाडीतून फिरतात. शिवाजी पार्कात त्यांचा लॅव्हीश फ्लॅट आहे. सर्वसामान्य म्हणून सांगणाऱ्या लाटकर यांच्या कुटुंबाची संपत्ती साडेतीन कोटी कशी? हा खरा प्रश्न आहे. महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी नेता होऊ पाहणार्या महाविकास आघाडी पुरस्कृत या उमेदवाराने स्वतःचा चेहरा आरशामध्ये पहावा. लाटकर यांनी महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्यावर खोटे आणि बिनबुडाचे आरोप करू नयेत. अन्यथा यापुढे त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही फरास यांनी दिला आहे.या प्रचारसभेला शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, भाजप सचिव महेश जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, सत्यजित कदम, संदीप कवाळे, मुरलीधर जाधव, दुर्गेश लिंग्रस, रेखा आवळे, रूपराणी निकम, गीता भंडारी, अभिजित शिंदे, दीपक चव्हाण, बापू जाधव, दीपक जाधव, मंदार तपकिरे, कमलाकर किलकिले, जयराज निंबाळकर, राहुल चिकोडे, अमित पसारे, अंकुश निपाणीकर, धैर्यशील साळोखे, धनराज कणसे, अक्षय पाटील, योगेश मोहिते, अमर निंबाळकर, आसिफ मुल्लाणी, विघ्नेश आरते, शशी चौगुले, बाळासाहेब शेलार, करण जाधव, विश्वास जाधव, अजिंक्य पाटील, जयराज जाधव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला गृहीत धरू नये – आमदार सतेज पाटील

0

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला गृहीत धरू नये – आमदार सतेज पाटील

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा आरक्षणाच्या मागणी करिता आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू असताना, मराठा समाजातील लोकांच्यावर झालेला लाठीमार आणि गोळीबार मराठा समाज विसरलेला नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला गृहीत धरू नये असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. ते आज पत्रकारांशी बोलत होते.काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची उद्या शनिवारी १६ नोव्हेंबर रोजी गांधी मैदान या ठिकाणी सभा होत आहे. या ठिकाणी आज आमदार सतेज पाटील यांनी पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते बोलत होते.
मराठा समाज महायुतीच्या बाजूने उभा राहील. असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. यावर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील ज्यावेळी मराठा आरक्षणासाठी उपोषण बसले होते. त्यावेळी, पोलिसांनी केलेला लाठीमार आणि गोळीबार कोणी केला, हे मराठा समाजाला माहिती आहे. त्यामुळ राज्यातला मराठा समाज महायुतीला सहकार्य करणार नाही. असा विश्वास त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, विधानसभा प्रचाराकरिता राज्याच्या दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅग तपासल्या गेल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्याबाबत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी हा केवळ दिखावा असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्ही कसे निष्पक्ष आहोत हे दाखवण्याचां हा प्रयत्न सुरू असल्याची टीकाही सतेज पाटील यांनी केली.
बटेंगे तो कटेंगे…एक है तो सेफ है असे.मुद्दे महायुती सरकारकडून जनतेला गृहीत धरून, असं वक्तव्य करत असेल तर जनताच त्यांना जागा दाखवून देईल. असा इशाराही त्यांनी दिला. जनता मतदान करणारं आहे. आणि ते महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान होईल. असंही सतेज पाटील यांनी सांगितले.

प्रियंका गांधी यांची निर्णायक सभा यशस्वी करावी – आमदार सतेज पाटील

0

प्रियंका गांधी यांची निर्णायक सभा यशस्वी करावी – आमदार सतेज पाटील

सभेच्या नियोजना संदर्भात, गांधी मैदान या ठिकाणी भेट देऊन केली पाहणी

कोल्हापूर/प्रतिनिधी : काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची, उद्या शनिवारी गांधी मैदान या ठिकाणी जाहीर सभा होत आहे. या सभेच्या अनुषंगाने आमदार सतेज पाटील यांनी गांधी मैदान या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत सभेच्या नियोजना संदर्भात माहिती घेतली.महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची उद्या शनिवारी दुपारी एक वाजता गांधी मैदान येथे ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी गांधी मैदान या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
काँग्रेससह इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी तसचं कार्यकर्ते सभा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत आहेत. खासदार शाहू महाराज छत्रपती, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.
याआधी गांधी कुटुंबातील इंदिरा गांधी, राजीव गांधी,सोनिया गांधी यांच्या जाहीर सभा कोल्हापुरात झाल्या आहेत. राहुल गांधी हेही प्रचार आणि इतर कार्यक्रमांसाठी तीनवेळा कोल्हापुरात आले आहेत.प्रियंका गांधी मात्र पहिल्यांदाच जाहीर सभेसाठी कोल्हापुरात येणार आहेत. त्यांच्या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
या सभेच्या नियोजना संदर्भात आमदार सतेज पाटील यांनी गांधी मैदान या ठिकाणी, महाविकास आघाडी मधील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत, पाहणी करून चर्चा केली.सभेला येणाऱ्यांची बैठक व्यवस्था, सभेच्या ठिकाणी येणारी वाहनांचे पार्किंग व्यवस्था, याची माहितीही त्यांनी घेतली. आप आपल्या मतदार संघातील प्रभागातील लोकांना सभेला घेऊन या. कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने या सभेला उपस्थित राहून, ही निर्णायक सभा यशस्वी करावी.असे आवाहनही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आम. सतेज पाटील यांनी यावेळी केल. प्रियंका गांधी यांच्या सभेमुळे, कार्यकर्त्यांना मोठं बळ मिळेल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, विजय देवणे, आर के पोवार, रवीकिरण इंगवले, माजी उपमहापौर अर्जुन माने, माजी उपमहापौर विक्रम जरग, भूपाल शेटे माजी नगरसेवक तोफिक मुलांनी, सचिन पाटील, अजय इंगवले, ईश्वर परमार, इंद्रजीत बोंद्रे, प्रताप जाधव,दुर्वास कदम, यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील दहा मतदार संघात आजपासून गृहमतदानाला सुरुवात

0

जिल्ह्यातील दहा मतदार संघात आजपासून गृहमतदानाला सुरुवात

पहिल्या दिवशी २५५९ दिव्यांग आणि जेष्ठ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

कोल्हापूर/ (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या गृहमतदानाला आज सुरुवात झाली. गृहमतदानाच्या पहिल्या दिवशी २५५९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांपुढील व दिव्यांग मतदार जे मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकणार नाहीत. त्यांच्यासाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघातील ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे, दिव्यांग मतदारांची नोंद करून अर्ज भरून घेतले आहेत. यापैकी मतदान केंद्रात जावून मतदान करणे शक्य नसलेल्या मतदारांची संख्या ४ हजार ६०१ एवढी आहे. यात ८५ वर्षावरील ३ हजार ८७० मतदार असून ७३१ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. या सर्व गृहमतदारांच्या मतदानाला आज सुरुवात झाली. आज झालेल्या मतदानात ३८३ दिव्यांग , २१६८ जेष्ठ आणि ८ कोविड रुग्णांचा समावेश होता.
गृह मतदानासाठी जिल्ह्रयातील दहा मतदार संघात सर्व दिव्यांग व वृद्ध मतदारांच्या घरी जावून विधानसभा मतदार संघनिहाय दि.१६ नोव्हेंबर पर्यंत मतदान घेतले जाणार आहे. त्यासाठी २०९ पथके तयार करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघातील ज्या ८५ वर्षावरील व दिव्यांग मतदारांनी गृह मतदानासाठी नोंद केली आहे त्यांनी याची नोंद घेऊन आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा व लोकशाही बळकट करण्यासाठी आपला हातभार लावावा,असे आवाहनही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

आ.ऋतुराज पाटील यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य देऊया : खासदार शाहू महाराज

0

आ.ऋतुराज पाटील यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य देऊया : खासदार शाहू महाराज

कोल्हापूर/प्रतिनिधी : आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदार संघात अतिशय चांगले काम करून आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवली आहे. मतदारसंघाचा विकास आणखी गतीने होण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांना रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य देऊन विजयी करुया असे आवाहन खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी केले. आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गोकुळ शिरगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते . यावेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाहू महाराज पुढे म्हणाले, ऋतुराज पाटील यांचे काम मी पाच वर्षे जवळून पाहिले आहे. जनहिताच्या अनेक योजना त्यांनी मतदारसंघात यशस्वीपणे राबवल्या.मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना खासदार म्हणून आवश्यक ते सर्व सहकार्य करु.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल घाटगे म्हणाले, खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिकांची संस्कृती असून विधायक काम करणा-यांना आमदार ऋतुराज पाटील यांना पाठबळ देऊया.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत म्हणाले, कणेरीवाडी पाणी योजना रद्द करण्याचे पत्र महाडिकांनी दिले होते. मात्र त्यावर ते काहीच बोलत नाहीत.
शिवसेना उपनेते संजय पवार म्हणाले, सुशिक्षित व सर्वांना सोबत घेऊन जाणा-या आमदार ऋतुराज पाटील यांना पुन्हा निवडून देऊया.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख अवधूत साळुंखे म्हणाले माझे कुटुंब माझी जबाबदारी ही घोषणा महाडिकांनी फारच मनावर घेतली आहे. सगळी पदे आपल्याच घरात पाहिजे असा त्यांचा हट्ट आहे. मुलाला आमदार करण्यासाठी पाहुण्यालाही कट्यावर बसवणाऱ्यांपासून सावध रहा.
आरपीआयच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रुपा वायदंडे, सरपंच चंद्रकांत डवरे आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र संघटक बबन शिंदे डॉ. विशाल पाटील प्रणोती भाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. अर्जुन इंगळे, के डी पाटील, उत्तम आंबवडे, निशीकांत पाटील, टी. के. पाटील, संभाजीराव पाटील, दयानंद शिंदे, डी. डी. पाटील, गणपती कागले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

चौकट
जनसेवेसाठी तत्पर ऋतुराजना साथ द्या – आ.सतेज पाटील

ऋतुराज पाटील यांची विकास कामांच्या माध्यमातून जनतेशी नाळ जोडली आहे. क्रीडांगण विकसित करण्यासाठी गायरान मधील जमीन मंजूर करून घेण्याचा निर्णय आ.ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्यातूनच झाला. सत्ता नसताना जिद्द, कष्ट आणि सचोटीने त्यांनी मोठा निधी आणला आहे. जनसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या ऋतुराज पाटील यांना साथ द्या असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.