Saturday, June 28, 2025
spot_img
Home Blog Page 13

बोंद्रेनगरातील ७७ जणांच्या घराचे स्वप्न पूर्णत्वाकडे सतेज पाटील यांच्याकडून पाहणी: अपूर्ण कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना

0

बोंद्रेनगरातील ७७ जणांच्या घराचे स्वप्न पूर्णत्वाकडे
सतेज पाटील यांच्याकडून पाहणी: अपूर्ण कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना

कोल्हापूर/प्रतिनिधी : महिपतराव बोंद्रे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या महानगरपालिका प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांची विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी पाहणी केली. सर्व लाभार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. यातील जी कामे अपूर्ण आहेत ती लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.फुलेवाडीमधील महिपतराव बोंद्रेनगर येथील महिपतराव बोंद्रे सहकारी गृहनिर्माण संस्थेची महानगरपालिका प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण ७७ घरे बांधण्यात आली आहेत. या घरांचे मागील तीन वर्षापासून काम सुरु होते, ते पूर्ण झाले आहे. यासाठी आमदार सतेज पाटील व माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सात्यत्याने पुढाकार घेऊन या ७७ कुटुंबांचे घरांचे स्वप्न पूर्ण केले. यासाठी लागणाऱ्या कर्जासाठीही आमदार पाटील यांनी सर्वांना मदत केली होती. या घरांची त्यांनी पाहणी करून सर्व लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी लाईट मीटर, नळ कनेक्शन अशा काही अपूर्ण कामाबद्दल संबंधित अधिकाऱ्याशी संवाद साधत तात्काळ कामे मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या कामासाठी शेल्टर असोसिएशनच्या अध्यक्षा प्रतिभा जोशी, ऋतुजा भराटे, मेघा लोंढे, महादेव कांबळे, मनोज्ञा कुलकर्णी आदींची सुद्धा मदत झाली. तर कम्युनिटी हॉलसाठी शिरीष बेरी यांनी मदत केली.
यावेळी माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, धनंजय भोंगळे, अभिजित देठे, प्रकाश भोपळे, प्रकाश शिंदे, बाबुराव बोडके, ठेकेदार राजेंद्र दिवसे, कै. महिपतराव बोंद्रे सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष अशोक देगावे, सचिव भिकाजी वायदंडे,राणी खंडागळे सचिन शिंदे, संभाजी भोरे, भीमराव आवळे, सुरेश भोरे, संजय गोसावी, शिवाजी मोरे, सीताबाई पोवार, हिंदुराव गडकर, बबन गोसावी यांच्यासह सर्व लाभार्थी उपस्थित होते.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या नूतन कुलगुरूपदी डॉ. आर. के. शर्मा

0

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या नूतन कुलगुरूपदी डॉ. आर. के. शर्मा

कसबा बावडा/वार्ताहर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे नवे कुलगुरू म्हणून डॉ. आर. के. शर्मा यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी केली. विद्यमान कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल यांचा कार्यकाल समाप्त झाल्याने डॉ. शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठात झालेल्या विशेष कार्यक्रमात नव्या कुलगुरुंनी सूत्रे स्वीकारली.
फेब्रुवारी २०२० पासून विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. आर. के. मुदगल कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठाने फार्मसी कॉलेज, फ़िजिओथेरपी कॉलेज, अलाईड हेल्थ सायन्सेस, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट सारखी नवी महाविद्यालये सुरु झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापिठाला नॅकचे ‘ए++’ हे सर्वोच्च मानांकन मिळाले आहे. विद्यापीठाच्या प्रगतीमध्ये डॉ. मुदगल यांनी मोठे योगदान दिले असल्याचे गौरवोद्गार कुलपती डॉ. संजय पाटील यांनी यावेळी काढले.
डॉ. मुदगल यांचा कार्यकाल समाप्त होत असल्याने त्यासाठी राबवलेल्या अर्ज प्रक्रियेमध्ये देशभरातील ६५ जणांचे अर्ज प्राप्त झाले होते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार गठीत केलेल्या त्रिसदस्यीय समितीकडून त्यातील १५ जणांच्या मुलाखती घेऊन तीन उमेदवारांची नावे कुलपतींकडे सादर करण्यात आले होते. यामधून डॉ. आर. के. शर्मा यांची कुलगुरू पदासाठी निवड करण्यात आली आहे.डॉ. शर्मा हे गेल्या ९ वर्षापासून डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत असून ख्यातनाम स्त्रीरोग तज्ञ अशी त्यांची ओळख आहे. त्यापूर्वी त्यांनी आर्मी हॉस्पिटलमध्ये प्रदीर्घ सेवा दिली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) नियामक मंडळावर ते कार्यरत आहेत. त्यांना ४० वर्षांहून अधिक काळाचा शैक्षणिक व प्रशासकीय कार्याचा अनुभव आहे. मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी योगदान दिले आहे.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी मावळते कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत नवे कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा यांचे अभिनंदन केले. डॉ. शर्मा यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ आणखी नव्या उंचीवर पोहचेल असा विश्वास व्यक्त करताना पुढील पाच वर्षात जगातील ५०० विद्यापीठामध्ये डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा समावेश होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या कार्यक्रमात डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. आर. के. शर्मा, डॉ. शिंपा शर्मा, डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. के. प्रथापन, डॉ. ए. के. गुप्ता, डॉ. महादेव नरके, डॉ. अभिजित माने यांनी डॉ. मुदगल यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. स्नेहल शिंदे यांनी केले. यावेळी विविध संस्थांचे प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.

डी.वाय.पी अभियांत्रिकीच्या रायगड किल्ल्यावर आधारित एआर-व्हीआर सादरीकरणाची शासनाकडून प्रशंसा

0

डी.वाय.पी अभियांत्रिकीच्या रायगड किल्ल्यावर आधारित
एआर-व्हीआर सादरीकरणाची शासनाकडून प्रशंसा

कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग विभागातील विद्यार्थ्यांनी रायगड किल्ल्यावर आधारित ऑगमेंटेड रिऑलिटी आणि व्हर्च्युअल रिऑलिटी (एआर-व्हीआर) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेला प्रकल्पाची महाराष्ट्र शासनाकडून प्रशंसा करण्यात आली आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा अत्याधुनिक माध्यमांतून सादर करण्याच्या या प्रयत्नांचे कौतुक करत शासनाकडून प्रशंसा पत्र देण्यात आले आहे.
शिवरायांचा पराक्रम, राज्यकारभार हा सर्वांसाठीचा प्रेरणादायी आहे. त्यामुळेच किल्ला तयार करणे हा मुलांचा आवडता उपक्रम. दगड-मातीपासून किल्ले बांधणाऱ्या विद्यार्थ्यानी आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हि आवड पुढे नेली आहे. त्यांनी युनिटी हब आणि इमर्सिव्ह टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने रायगड किल्ल्याची डिजिटल पुनर्रचना केली आहे. विशेषतः विकलांग आणि वृद्ध व्यक्तींना किल्ल्याचा संपूर्ण अनुभव डिजिटल स्वरूपात घेता यावा, यासाठी व्हर्च्युअल टूरची सोय केली आहे. १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ३९५ व्या शिवजयंतीचे औचित्य साधून या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले होते. त्याला राज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्स्फूर्त दाद दिली.
महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग अभियांत्रिकी विभागातील तृतीय वर्षाचे विद्यार्थी राजवीर पृथ्वीराज देसाई, अनिरुद्ध अनिल घाटगे आणि प्रियांका प्रसाद उत्तुरे या विद्यार्थ्यांनी डॉ. तन्वी राहुल पाटील आणि विभागप्रमुख डॉ. सिद्धेश्वर विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम केला आहे.
या प्रकल्पामध्ये थ्री डी मॉडेल्स, इंटरॅक्टिव्ह अनुभव आणि व्हर्च्युअल टूरचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी पेटंट आणि कॉपीराइटसाठी अर्ज दाखल करण्यात आला असून, या संशोधनावर आधारित शोधनिबंध एप्रिलमध्ये होणाऱ्या आयईईई पुणेकॉन या आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केला जाणार आहे.विद्यार्थ्यांच्या या सर्जनशील विचारांचे आणि आधुनिक पद्धतीने गड किल्य्यांचा इतिहास मांडण्याच्या उपक्रमाचे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून कौतुक करण्यात आले आहे. या विभागचे मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत प्रशंसा पत्र लिहिले आहे. हे पत्र संस्थेचे विश्वस्त ऋतुराज संजय पाटील आणि कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना देण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज संजय पाटील,विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांनी हा प्रकल्प सादर करणाऱ्या टीमचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडने महाराष्ट्रातील अभियांत्रिकी इच्छुकांसाठी सुरू केले MHT-CET

0

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडने महाराष्ट्रातील अभियांत्रिकी इच्छुकांसाठी सुरू केले MHT-CET

नवीन MHT-CET अभ्यासक्रमांची सुरूवात ही प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी तयारी करणाऱ्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याच्या आकाशच्या दृष्टीकोनाचा एक भाग आहे

कोल्हापूर/प्रतिनिधी : आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL), जी टेस्ट प्रिपरेटरी सेवांची राष्ट्रीय अग्रणी संस्था आहे, त्यांनी महाराष्ट्रातील १० वी आणि ११ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी CET (सामान्य प्रवेश परीक्षा) अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम विशेषतः अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठीच्या प्रादेशिक प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. इंग्रजी माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या या वर्गांना बोर्ड परीक्षेनंतर सुरुवात होईल.
नवीन MHT-CET अभ्यासक्रम आकाशच्या प्रादेशिक बाजारपेठांमध्ये आपली उपस्थिती वाढविण्याच्या दृष्टिकोनाचा एक भाग आहे आणि राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच CBSE अभ्यासक्रमासाठी दर्जेदार प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. हा कार्यक्रम आपल्या राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षण समाधान प्रदान करेल.
यासाठी इयत्ता ११ वीच्या स्वतंत्र बॅचेस तयार केल्या जातील आणि अध्यापनाचे माध्यम इंग्रजी असेल.
MHT-CET मध्ये २०२२ मध्ये ६,०६,७९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ४,६७,३७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २०२३ मध्ये ६,३६,८०४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी ५,९१,१३० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर २०२४ मध्ये ७,२५,७७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आणि ६,७५,३७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

या नवीन उपक्रमाच्या काही वैशिष्ट्ये अशी आहेत

इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बॅचेस चालवल्या जातील.
MHT-CET अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने विस्तृत अभ्यासक्रम तयार केला जाईल.इयत्ता ११ वीच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत असलेल्या विषयांसह (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) उच्च-स्तरीय अध्ययन सामग्री पुरवली जाईल.आकाशद्वारे तयार केलेले अत्यंत आकर्षक परीक्षापत्र.
आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे मुख्य शैक्षणिक आणि व्यवसाय प्रमुख, डॉ. एच. आर. राव म्हणाले, “आम्ही विद्यार्थ्यांना उच्च-स्तरीय शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसाठी सर्वसमावेशक प्रशिक्षण देण्यास कटिबद्ध आहोत. महाराष्ट्रात CET अभ्यासक्रम सुरू करून, आम्ही राज्यातील इच्छुक विद्यार्थ्यांना भक्कम शैक्षणिक पाया प्रदान करण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून ते MHT-CET मध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकतील. आमचे उद्दीष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा विकास करणे आणि त्यांना राज्यातील सर्वोत्तम अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यास मदत करणे.”
आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) बद्दल
आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) ही भारतातील आघाडीची परीक्षा तयारी संस्था आहे, जी वैद्यकीय (NEET) आणि अभियांत्रिकी (JEE) तसेच स्पर्धात्मक परीक्षा (NTSE, ऑलिम्पियाड्स) यांसाठी व्यापक आणि प्रभावी तयारी सेवा पुरवते.
AESL ही संपूर्ण भारतभर ३१५ हून अधिक केंद्रांचे नेटवर्क असलेली संस्था आहे, ज्यात ४,००,०००+ विद्यार्थी सध्या प्रवेशित आहेत. गेल्या ३६ वर्षांमध्ये संस्थेने आपली भक्कम बाजारपेठ निर्माण केली आहे आणि उच्च गुणवत्तेच्या परीक्षेच्या तयारीसाठी वचनबद्ध आहे.
AESL विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या वैयक्तिक गरजा लक्षात घेते. त्यांची प्रशिक्षक टीम अत्यंत अनुभवी असून विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. कंपनीच्या अभ्यासक्रमात लवचिकता असून अध्यापन तंत्रज्ञानाच्या आधुनिक सुविधांनी परिपूर्ण आहे, जेणेकरून विद्यार्थी परीक्षांसाठी उत्तम प्रकारे तयार होऊ शकतील.

संजय घोडावत इन्स्टिट्यूट “निंबस २के२५” राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन

0

संजय घोडावत इन्स्टिट्यूट “निंबस २के२५” राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या प्रांगणा मध्ये २६ फेब्रुवारी २०२५ रोजी वेळ सकाळी १०.०० ते ०५.०० “निंबस २के२५” राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. विद्यार्थांच्या नावीन्य, सर्जनशीलता आणि तांत्रिकतेच्या उत्कर्षाला प्रज्वलित करण्यासाठी विविध तांत्रिक स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थी आणि तंत्रज्ञांन कौशल्यांची कसोटी पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या मध्ये तांत्रिक कॅड बस्टर्स: संगणक-सहाय्यित डिझाइनच्या कलेमध्ये प्रभुत्व मिळविणे, सर्किटिक्स: सर्किट डिझाइन आणि इलेक्ट्रिकल मधील विविध पैलूंवर विद्यार्थांची पकड़ निर्माण करणे, टेक रोबस्टा: रोबोटिक्सच्या क्षेत्रातील नवीनतम सर्जनशीलतेचे प्रदर्शन करणे, ब्रेन स्टॉर्मर्स (क्विझ): तांत्रिक समस्यांची उत्तरे शोधत, विद्यार्थांच्या विश्लेषणात्मक क्षमतेला चालना देणे, कोड क्रुसेड: प्रोग्रामिंगची विविध आव्हाने पार करणे, पेपर प्रेझेंटेशन: विद्यार्थांच्या ग्राउंडब्रेकिंग संशोधन आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा सादरीकरण करण्यासाठी निंबस २के२५ मध्ये इजिनिअरिन क्षेत्रात शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्याने सहभाग नोंदवून आपल्या कौशल्याचे सादरीकरण करण्याचे आव्हान इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट गिरी यांनी केले आहे.
या स्पर्धेसाठी एक लाखाहून अधिक बक्षिसे असून विविध उद्योग आणि उद्योजकांनी स्पॉन्सरशिप देण्याचे घोषित केलेले आहे. कार्यक्रमाचे समन्वयक, प्रा. प्रतीक एस. आवटी, प्राध्यापिका तृप्ती एस. पुजारी, व टीम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन, संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शना खाली निंबस २के२५ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

संजय घोडावत यांच्या वाढदिवसासाठी बॉलीवूड फिल्म स्टार आयुष्यमान खुराना राहणार उपस्थित

0

“संजय घोडावत यांचा २८ फेब्रुवारी रोजी वाढदिवस” विविध कार्यक्रमाचे आयोजन

‘संजय घोडावत यांच्या वाढदिवसासाठी बॉलीवूड फिल्म स्टार आयुष्यमान खुराना राहणार उपस्थित

कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठाचे, चेअरमन, उद्योजक संजय घोडावत यांचा ६० वा वाढदिवस २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता घोडावत विद्यापीठाच्या प्रांगणात विविध कला, गुणदर्शनाने साजरा करण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर,उद्योजक, अधिकारी उपस्थित राहणार असून याप्रसंगी बॉलीवूड फिल्म स्टार, गायक ‘आयुष्यमान खुराना’ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती विश्वस्त विनायक भोसले यांनी दिली आहे.
याप्रसंगी विद्यापीठाचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘उमंग’ कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे. यामध्ये संगीत, नृत्य, फॅशन शो,गायन,नाटक याद्वारे विद्यार्थी आपले कलागुण सादर करणार आहेत. त्याचबरोबर कला, क्रीडा,संस्कृती,साहित्य, शिक्षण, उद्योग क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या नेतृत्वाला ‘एसजीयु आयकॉन २०२५’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.विद्यापीठ स्तरावर या वार्षिक स्नेहसंमेलनाची आणि वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती आयोजक कमिटीने प्रसारमाध्यमास दिली आहे.

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “मराठी भाषा” संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा

0

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “मराठी भाषा” संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा

कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सांगता कवी, गझलकार, गीतकार ‘अपूर्व राजपूत’ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांनी केले. यावेळी ग्रंथालय विभाग प्रमुख सुनील नांदणीकर, सर्व विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत असणारे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.उपस्थितांना मार्गदर्शन करताना राजपूत म्हणाले महाविद्यालयीन शिक्षणासोबतच मातृभाषा “मराठीचे” जतन करणे काळाची गरज बनली आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये भाषाशैली आणि त्या भाषेचे महत्त्व आजच्या तरुण पिढीने समजून घेऊन त्यावर अभ्यास करणे आवश्यक आहे. उच्च शिक्षणाबरोबरच भाषण कौशल्य काव्य कौशल्य आणि लेखन कौशल्य याविषयी महत्त्वाच्या टिप्स उपस्थित विद्यार्थ्यांना राजपूत यांनी देवून त्यांच्या नावाजलेल्या स्वरचित कवितांचे सादरीकरण केले त्या कवितांना उपस्थितानी उस्फुर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सुहास पाटील यांनी केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम आयोजनास संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.

स्वत:ची अकार्यक्षमता लपविण्यासाठी माजी पालकमंत्री यांच्याकडून शेतकरी बांधवांची दिशाभूल : रणजीत जाधव, शिवसेना शहरप्रमुख

0

स्वत:ची अकार्यक्षमता लपविण्यासाठी माजी पालकमंत्री यांच्याकडून शेतकरी बांधवांची दिशाभूल : रणजीत जाधव, शिवसेना शहरप्रमुख

कोल्हापूर/प्रतिनिधी : शक्तीपीठ महामार्गामुळे दळणवळणात वाढ होवून पर्यटनवाढीस चालना मिळणार आहे. एकीकडे देश विकासाच्या प्रगतीपथावर मार्गक्रमण करत असताना विकासाला चालना देणारे प्रकल्प होणे काळाची गरज आहे. दळणवळण, पर्यटन वाढीचा फायदा जिल्ह्याच्या विकासासाठीच होणार आहे. याचा फायदा स्थानिक नागरिकांनाच होणार आहे. परंतु राजकीय स्वार्थापोटी काही नेत्यांकडून शेतकरी बांधवांची दिशाभूल केली जात आहे. शेतकरी बांधवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जिल्ह्याच्या विकासात योगदान देणाऱ्या या प्रकल्पाला विरोध करण्याचे काम माजी पालकमंत्री यांच्याकडून केले जात असल्याची टीका, शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, यात कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, अशी शाश्वती जिल्ह्याचे शिवसेना नेते आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. विरोधक सत्तेत असताना त्यांनी फक्त तोंडाची हवा वायफळ घालविण्याचे कामे केले. जनहिताचे काम करणे माजी पालकमंत्री महोदयांना कधी जमलेच नाही. आपली अकार्यक्षमता लपविण्यासाठी जिल्ह्यात कोणताच प्रकल्प होवू द्यायचा नाही जेणेकरून जिल्ह्याच्या विकासाचा फायदा सत्ताधारी महायुतीस होईल हाच यामागचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांची दिशाभूल करून राजकीय पोळी भाजण्याचे काम माजी पालकमंत्री यांच्याकडून सातत्याने सुरु आहे. विधानसभा निवडणुकीतही अशाच अफवा पसरविण्याचे काम माजी पालकमंत्री यांनी केले आहे. शहरातील १०० कोटींचे रस्त्यांच्या वर्कऑर्डर झाल्या नसल्याच्या वल्गना त्यांनी केल्या होत्या पण प्रत्यक्षात वर्कऑर्डर झाल्या होत्या. महापालिकेचे ५०६ रोजंदारी कर्मचारी कायम झाले नसल्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण आमदार राजेश क्षीरसागर यांनी कर्मचारी कायम केल्याचे आदेशच दिल्याने माजी पालकमंत्री यांना तोंडघशी पडावे लागले आहे. सद्या माजी पालकमंत्री यांच्याकडे जनतेत गैरसमज पसरविण्याशिवाय कोणतेही काम शिल्लक नाही. तोडपानी स्पेशालीस्ट जिल्हाप्रमुखांचे आयुष्य कर्तव्यशून्य आहे. आजपर्यंत आंदोलनांच्या नावाखाली तोडपानी करण्याची त्यांची स्टाईल कोल्हापूरच्या जनतेला सर्वश्रुत आहे. जिल्हाप्रमुखांची आंदोलनातील तोडपानी करून किंवा बळकावलेली जमीन कदाचित या महामार्गात येत असल्याने ते कासावीस झाले असावेत. परंतु, त्यांचीही जमीन बाधित होवून नुकसान होत असेल तर त्याचा योग्य मोबदला सरकार देण्यास सक्षम आहे. त्यामुळे त्यांनी बेताल वक्तव्ये बंद करावीत अन्यथा येणाऱ्या काळात अशा वक्तव्यांना शिवसेनाप्रमुखांच्या स्टाईलने उत्तर देवू, असा इशारा त्यांनी दिला.
समृद्धी महामार्गाला देखील सुरवातीला विरोध झाला परंतु शासनाने बाधितांना अधिक पटीने मोबदला दिला. आज समृद्धी महामार्गामुळे उत्तर महाराष्ट्र व विदर्भात औद्योगिक गुंतवणूक वाढली आहे. परंतु, कोल्हापूरची भौगोलिक स्थिती पूरक असतानाही असे प्रकल्प झाले नसल्याने जिल्ह्याची पीछेहाट झाली आहे. याचा सारासार विचार सर्वांनी करावा. महायुती सरकार कोणावरही अन्याय करणार नाही याची खात्री बाळगावी. तसेच दिशाभूल करणाऱ्या माजी पालकमंत्री व तोडपानी स्पेशालीस्ट जिल्हाप्रमुखा पासून शेतकरी बांधवांनी सावध रहावे, असे आवाहनही शहरप्रमुख रणजीत जाधव यांनी केले.

शेतकऱ्यांनी लोकांचे आरोग्य सुरक्षितेसाठी सेंद्रिय शेतीकडे वळावे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

0

*हरियाणातील विधायक नावाचा रेडा,चायना झिंग जातीचा बोकड आकर्षण*अन्य पशु जनावरे,शेती उपयुक्त साहित्य,भाजीपाला आकर्षण*

*भीमा प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी आवर्जून भेट देण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन*

*शेतकऱ्यांनी लोकांचे आरोग्य सुरक्षितेसाठी सेंद्रिय शेतीकडे वळावे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे शेतकऱ्यांना आवाहन*

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून शेती विकसित करण्यावर भर देणे आवश्यक असून यासाठी सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही त्यामुळे लोकांच्या आरोग्य सुरक्षेतसाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर भर द्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी भीमा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी शेतकऱ्यांना केले.
भीमा कृषी पशू प्रदर्शनास आजपासून प्रारंभ झाला आहे.आज उपस्थित कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर माजी.आमदार महादेवराव महाडिक, खासदार धैर्यशील माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसमोर शेती शिवाय दुसरा कोणताच व्यवसाय नाही शेतकरी प्रचंड अडचणीत आहे हे आमच्या ध्यानात आहे मात्र आता शेतीमध्ये विकासावर अधिक भर देणे शेतकऱ्यांनी आवश्यक आहे. त्यासाठी अशी प्रदर्शने महत्त्वपूर्ण असून नव नवीन तंत्रज्ञान उपयोग करून शेती कशी करावी यावर धोरणे राबविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे सांगितले. वातावरणात होणारे बदल यामुळे शेती व्यवसाय अडचणीत येतो अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान होते त्यावेळी आमचा शेतकरी कसा सुसह्य कसा होईल यासाठी प्रयत्नशील राहू असे सांगितले.ड्रोन आणि रोबोच्या माध्यमातून शेतीचा विस्तार कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.केंद्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शेतीमध्ये बदल कसा घडवून आणता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आता तर शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत.डायरेक्ट थेट त्यांच्या खात्यामध्ये डेबिटद्वारे रक्कम देण्यासाठी ही महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे त्यासाठी कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांना सोबत घेऊन केंद्रीय पातळीवर आम्ही चर्चा करणार आहोत असे आश्वासन कृषीमंत्री कोकाटे यांनी दिले.महाराष्ट्र राज्यामध्ये आमचे बरेच सहकारी विविध ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी कृषी प्रदर्शन भरवत असतात या प्रदर्शनासाठी विमा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही आश्वासन कृषी मंत्री यांनी यावेळी दिले आहे.खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य असे भीमा कृषी व पशु पक्षी प्रदर्शन शेतकऱ्यांना उपयुक्त असल्याचे कोकाटे यांनी सांगितले.
यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी स्वागतपर बोलताना गेली १७ वर्षापासून भीमा कृषी व पशु प्रदर्शन मधून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त शेती पूरक माहिती साधने विक्री व खरेदी करता येत आहेत.प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक संधी उपलब्ध झाली असून चार दिवसांमध्ये मोठी उलाढाल प्रदर्शनाच्या माध्यमातून होत असते आणि शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान पाहावयास खरेदी करता येते असे सांगितले.सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारसरणीतून शेतकऱ्यांसाठी विविध योजना पुढे आणल्या जात आहेत याचा शेतकऱ्यांना लाभ होत आहे. किसान क्रेडिट कार्ड आता तीन लाखाहून पाच लाखापर्यंत करण्यात आले आहे किसान योजना आहे १९ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. प्रधानमंत्री अन्नधान्य योजना अंमलात आणली जात आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे देशातील १४४ करोड लोकांना कसदार धान्य उपलब्ध व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. शिवाय महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतलेले आहेत. शेतकऱ्यांना वीज बिले माफ केली आहे सोलर बाबत योजना पुढे आणली आहे असे सांगितले.

ग्रामीण भागामध्ये उत्कृष्टरित्या पशुवैद्यकीय सेवा व लंपी रोगाच्या प्रादुर्भावामध्ये चांगल्या रीतीने सेवा आणि पशुधन दुग्ध उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने प्रशासकीय कामगिरी केली आहे अशा व्यक्तींना भीमा गुणवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात पशुधन विकास अधिकारी डॉ.दिपाली चितरंजन भुतकर गणबावले,सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक लिंगाप्पा गावडे, डॉ.हनुमंत गुरव, पशुधन पर्यवेक्षक डॉ.आनंदा पाटील, डॉ. निवृत्ती पाटील, डॉ. पल्लवी खोत, डॉ .दिलीप बारड, वर्णउपचारक श्री. संजय पाटील आदींचा सन्मान करण्यात आला. ड्रोन दीदी रेश्मा पाटील सीमा पाटील, सन्मान केला गेला.शिवाय कृषी अधिकारी उमेश पाटील यांचाही मानपत्र देऊन शेतकरी,संस्था यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी भीमा कृषी प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी खासदार धनंजय महाडिक,आमदार अमल महाडिक,आमदार सुरेश हाळवणकर,माजी आमदार भरमु अण्णा पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस,कार्तिकेयन, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त श्रीमती के. मंजूलक्ष्मी, भागीरथी महिला संस्था अध्यक्ष सौ. अरुंधती महाडिक, भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष भाजप महानगर कोल्हापूर विजय जाधव, ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष भाजपा नाथाजी पाटील, ग्रामीण पूर्व जिल्हाध्यक्ष भाजप राजवर्धन निंबाळकर, भाजप कोल्हापूर महानगर महिला जिल्हाध्यक्ष सौ.रूपाराणी निकम, महिला जिल्हाध्यक्ष भाजपा कोल्हापूर पश्चिम प्रा. अनिता चौगुले,सौ. पुष्पा पाटील , उपाध्यक्ष काडाचे राहुल चोरडिया उपस्थित होते.जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ.प्रमोद बाबर.आदी उपस्थित होते.आभार भीमा सहकारी साखर कारखाना चेअरमन विश्वजित महाडिक यांनी मानले.

*विधायक रेडा आकर्षण पहिल्याच दिवशी पाहण्यासाठी गर्दी*

*जगातील सर्वात उंच पानिपत हरियाणातील पद्मश्री नरेंद्रसिंग यांचा ४ वर्षाचा सात वेळा नॅशनल चॅम्पियन मिळालेला मुऱ्हा जातीचा विधायक नावाचा रेडा भीमा कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे.गोलू २ रेड्याचा हा मुलगा असून या रेड्याचे वजन जवळजवळ दीड टन आहे. हा विधायक १४ फूट लांब आणि साडे साडेपाच फूट उंच आहेत्या रेड्याची किंमत २५ करोड रुपये असून प्रतिदिन २० किलो दूध २० किलो फीड आणि ३० किलो चारा आणि भुसा खातो.त्याचे राहणीमान ऋतुमानानुसार असते गर्मीमध्ये त्याला एसी आणि पंख्याची आवश्यकता असते.त्याच्या अंघोळीसाठी खास स्विमिंग पूल पानिपत येथे बांधण्यात आलेला आहे या रेड्याच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न बीज प्रक्रियेतून प्राप्त होते. सर्वांनाच बघण्यासाठी आणि त्याच्याकडून काहीतरी शिकण्यासाठी मिळते.विधायक रेड्याने महेंद्रगड, रोहतक,मेरठ उत्तर प्रदेश या तीन ठिकाणी गोलू टू म्हणजेच आपल्या वडिलाला स्पर्धेमध्ये हरविलेले आहे. २०१९ मध्ये सरकारने याला पद्मश्री किताब देऊन गौरविले आहे.असा हा विधायक नावाचा रेडा २०२५ च्या भीमा कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे.*

*चायना झिंग जातीचा बोकड आकर्षण*

*चायना येथून आणण्यात आलेला कवठे महांकाळ येथील राकेश कोळेकर यांचे तीन वर्षाचे सुलतान नावाचे बोकड हे प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे.३० किलो वजनाचे हे बोकड असून त्याच्या अंगावर पूर्ण पांढऱ्या रंगाचे केस आहेत.त्याची लांबी ५ फूट,उंची १ फूट ८ इंच,आणि शिंगे १ फूट ४ इंच आहे.*

प्रदर्शनामध्ये देश-विदेशातील विविध प्रचलित कंपन्यांचा समावेश आहे. याचबरोबर पशुपक्षी पालन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन तज्ञांची व्याख्याने आणि विविध कंपन्यांचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी विविध तंत्रज्ञान उपयुक्त माहिती देणारे हे सर्वात परिपूर्ण प्रदर्शन आहे. तरी या प्रदर्शनास शेतकऱ्यांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी केले आहे.

या प्रदर्शनामध्ये ४५० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचे स्टॉल आहेते.त्याचबरोबर भागीरथी महिला संस्थेच्या मा. सौ अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली २०० बचत गटांना मोफत स्टॉल देण्यात आले आहेत.ज्याद्वारे महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला या ठिकाणी थेट बाजारपेठ मिळवून दिली गेली आहे.

*चौकट*

आज २२ फेब्रुवारी रोजी.दुपारच्या सत्रात पश्चिम महाराष्ट्रातील गळीत धान्य पीक लागवड तंत्रज्ञान या विषयावर
डॉ. प्रशांत बाळासाहेब पवार, प्राध्यापक, कृषीविद्या विभाग, शासकीय कृषी महाविद्यालय, कराड, जिल्हा सातारा.
दुर्लक्षित फळझाडांची लागवड व प्रक्रिया तंत्रज्ञान या विषयावर
डॉ. विष्णू कुंडलीक गरांडे, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे.आणि अचूक व काटेकोर जमीन व्यवस्थापन उत्पादनवाढीसाठी गरजेचे या विषयावर डॉ. जनार्दन पांडुरंग पाटील माजी वरिष्ठ संशोधन अधिकारी, प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर. हे वक्ते आपले विचार व्यक्त करणार आहेत.

आत्माच्या वतीने शेतकरी गट कंपन्यांची माहिती दिली जाणार आहे शिवाय प्रदर्शनामध्ये तांदूळ महोत्सव हेही आकर्षण आहे. ज्यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी २४,भोगावती, इंद्रायणी आदि नमुनांचे तांदूळ आहे आज पहिल्याच दिवशी तांदळाची तसेच बाजरी नाचणी गूळ,हळद यांची विक्री झाली .शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान,सेंद्रिय शेती,मत्स्यपालन कसे करावे याची प्रात्यक्षिके पहावयास मिळणार आहेत.तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती व याठिकाणी दिली जाणार आहे.तसेच विविध प्रकारचा स्थानिक आणि विदेशी भाजीपाला, ऊस, बी – बियाणे पाहाव्यास मिळणार आहेत.
याचबरोबर प्रदर्शनामध्ये लाल कंधारी गाय, पंढरपूर मधील गायी, संकरित गायी म्हैशी, जाफराबादी उस्मानाबादी शेळी, बोकड, कडकनाथ कोंबडी, सस्ते पांढरे उंदीर तसेच कुक्कुटपालन इमूपालन वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्या बैल घोडे, पशुपक्षी विविध जनावरांच्या जाती पहावयास मिळणार आहेत. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे.आज संभाजी जाधव यांचा हास्य व्याख्यानाचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला.
प्रदर्शनास हाऊस ऑफ इव्हेंट, असोसिएशन संस्थेने कृषी प्रदर्शनाला सहकार्य केले आहे. व आपला सहभाग नोंदवला आहे. कृषी व किसन कल्याण मंत्रालय,शेती विभाग महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग,आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर,एचसीपीएसी यांचे सहकार्य लाभले आहे. प्रदर्शन चार दिवस सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.याचबरोबर लाईव्ह डेमिस्ट्रेशन पहाण्यास मिळत आहे.

.

डॉ. संजय डी. पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

0

डॉ. संजय डी. पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांचा ६१ वा वाढदिवस मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील निवासस्थानी कुटुंबीयांनी औक्षण करून त्यांना दीर्घायुष्यसाठी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. शिक्षण, कृषी सहकार सह विविध क्षेत्रात क्षेत्रात भरीव योगदान देत असलेल्या डॉ. संजय डी पाटील व त्यांच्या स्नुषा सौ पूजा ऋतुराज पाटील यांना माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी वाय पाटील आणि
सौ. शांतादेवी डी. पाटील यांनी शुभाशीर्वाद दिले. त्यानंतर कुटुंबीयांकडून केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सौ. वैजयंती संजय पाटील, आमदार सतेज पाटील, ऋतुराज संजय पाटील, पृथ्वीराज संजय पाटील, तेजस सतेज पाटील, देवश्री सतेज पाटील, सौ वृषाली पृथ्वीराज पाटील, यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.
डॉ. संजय डी पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी उपस्थिती लावली. यामध्ये माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, प्रकाश आवाडे, डॉ. सुजित मिणचेकर, नावेद मुश्रीफ, शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ ए. एन. जाधव, गोकुळ अध्यक्ष अरुण डोंगळे, माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील (आबाजी), डॉ. चेतन नरके, यांच्यासह सर्व संचालक, सचिन झंवर, क्रीडाईचे अजय डोईजड, गौतम परमार, ललित संघवी, गिरीश शहा, प्रताप महाले, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, श्रीराम सोसायटी अध्यक्ष संतोष पाटील व संचालक, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा.रघुनाथ ढमकले, डॉ. व्हि. एम पाटील, ऍड अजित पाटील, ऍड अभिषेक मिठारी, संजय पवार, विजय देवणे, सुनील मोदी, विविध वृत्तपत्रांचे संपादक, पत्रकार व अधिकारी, शिक्षण, सहकार, बांधकाम, राजकीय, सामाजिक व औद्योगिकसह विविध क्षेत्रातील मान्यवर व डी वाय पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे अधिकारी प्राध्यापक कर्मचारी यांनी डॉ. पाटील यांना शुभेच्छा दिल्या. विविध मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे डॉ. पाटील यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.