Monday, June 30, 2025
spot_img
Homeताज्याजिल्ह्यातील रेणुका भक्तांना दिलेलं आश्वासन खरं केलं

जिल्ह्यातील रेणुका भक्तांना दिलेलं आश्वासन खरं केलं

जिल्ह्यातील रेणुका भक्तांना दिलेलं आश्वासन खरं केलं

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहर व जिल्ह्यातून लाखो रेणुका भक्त सौंदत्ती यात्रेस जातात. यात्रा काळात प्रवासाचे मुख्य साधन म्हणून एसटीला पसंती असते. एसटीच्या प्रासंगिक कराराच्या दरामध्ये मोठी तफावत असल्यामुळे सौंदत्ती यात्रेस रेणुका भक्तांना घेऊन जाणाऱ्या ग्रुप प्रमुख व गाडी प्रमुखांची मोठी अडचण निर्माण झाली होती. जिल्हा रेणुका भक्त संघटनेने राज्य नियोजन मंडळ कार्याध्यक्ष माजी आमदार माननीय राजेश क्षीरसागर यांना निवेदन देऊन सत्य परिस्थिती निदर्शनास आणून दिली.
त्यावेळी मा. क्षीरसागर यांनी गतवर्षीप्रमाणे एस. टी. भाडे आकारण्यात येईल अशी तरतूद मंत्रालयातून करून आणतो अशा पद्धतीचे आश्वासन दिले होते. ते त्यांनी आज सत्य करून दाखवल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना व जिल्ह्यातील सर्व रेणुका भक्तांच्या कडून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री युवराज मोळे, उपाध्यक्ष श्री तानाजी चव्हाण, कार्याध्यक्ष श्री अशोकराव जाधव (मालक), सरचिटणीस श्री गजानन विभुते, चिटणीस श्री सतीश डावरे, संस्थापक श्री सुभाष जाधव (बापू), श्री अच्युतराव साळोखे, चेतन पवळ, सौ लता सोमवंशी व करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments